Wednesday, October 22, 2008

आजीचे घड्याळ - भाग ९ घटिकापात्र


"खरंच, दिवस व महिना ठरवण्याची खूप चांगली पद्धत आपल्या पूर्वजांनी तयार केली होती." अमोल म्हणाला.
मी सांगितले,"यातले एक वैशिष्ट्य असं आहे की आज कोणती तिथी आहे हे समजण्यासाठी कागदावर छापलेल्या कुठल्याही कॅलेंडरची जरूरी नाही. निरभ्र आभाळ असेल तर चंद्राची कला आणि तो कोणत्या नक्षत्रात आहे एवढे पाहणे हे महिना आणि तिथी ठरवायला पुरेसे आहे."
"पण वर्ष कसं ओळखायचं?"
"गुरु आणि शनी यांच्या स्थानावरून त्याचा अंदाज कसा लावायचा हे मी दाखवलंच होतं. प्राचीन काळातल्या आपल्या विद्वानांनी असं पाहिलं की गुरु आणि शनी आज ज्या राशीत आहेत त्यामधून त्यातला कोणताही ग्रह एकदा पुढे गेला की पुन्हा ते दोघेही एकाच वेळी आज असलेल्या आपापल्या स्थानांवर यायला साठ वर्षे लागतील. गुरु पांच सूर्यप्रदक्षिणा घालून आणि शनी दोन चकरा पूर्ण करून तेंव्हा पुन्हा आजच्या जागांवर परत येतील. अशा रीतीने हे चक्र फिरत राहील. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात साठ वर्षांचे काळ भरपूर मोठे असतात. या साठ वर्षांना त्यांनी वेगवेगळी नांवे दिली. त्यांना संवत्सर असे म्हणतात. त्यांची यादी माहीत असेल तर नांवावरून ते संवत्सर किती वर्षापूर्वी येऊन गेले आणि किती वर्षानंतर पुन्हा येणार आहे ते समजते. इसवी सन, विक्रम संवत आणि शालिवाहन शक या आजपर्यंत चालत आलेल्या गणना सुमारे दोन हजार वर्षे जुन्या आहेत. त्यापूर्वीच्या सम्राटांनी किंवा यामधल्या काळातील इतर राजांनी अशाच प्रकारच्या किती सनावल्या सुरू केल्या, त्यातल्या किती लोकप्रिय झाल्या आणि त्या किती काळ टिकल्या हे ठाऊक नाही. पण संवत्सरांच्या पद्धतीने कोणत्याही काळात निदान एका माणसाच्या आयुष्यामधल्या घटनांची नोंद क्रमवार करता येणे शक्य झाले हे कांही कमी नाही."
"तिथी, महिना, वर्ष यांच्या गणना ठरल्या, पण दिवसातली वेळ कशी मोजायची याचीसुद्धा कांही पद्धत त्यांनी तयार केली होती कां?"
"त्या काळात यांत्रिक घड्याळे नव्हती. आमच्या आजीच्या काळापर्यंत ती परिस्थिती होती. म्हणून 'आजीच्या जवळी' असलेल्या 'चमत्कारिक' घड्याळाचं एवढं कौतुक वाटायचं. पूर्वी वेळेची गणना निसर्गातल्या घटनांवरूनच करायची होती. ते फारच महत्वाचं काम होतं. आज आपण सूर्योदय अमूक वाजून तमूक मिनिटांनी झाला असे म्हणतो. पण ते दाखवणारे घड्याळच नसेल तर काय करणार? भारतातल्या पद्धतीप्रमाणे सूर्योदयापासूनच दिवसाला सुरुवात होत असे. युरोपातली परिस्थिती बरीच वेगळी आहे. अगदी उत्तरेला गेलात तर उन्हाळ्यात मध्यरात्रीसुद्धा सूर्य दिसतो आणि थंडीच्या दिवसात भर दुपारी सुद्धा अंधार असतो. सूर्योदय जर झालाच नाही तर त्यावरून वेळ तरी कशी काढणार? इंग्लंडमध्ये सुद्धा दिवस आणि रात्र यांचा कालावधी कमीत कमी पाच सहा तास ते जास्तीत जास्त अठरा एकोणीस तासाइतका असतो. त्यामुळे सूर्योदयाच्या वेळेत प्रचंड फरक पडतो, म्हणून त्यांनी नाइलाजाने मध्यरात्रीची वेळ ही नव्या दिवसाच्या सुरुवातीची वेळ ठरवली असणार. भारतीय पंचांगाप्रमाणे दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते. त्यानंतर प्रत्यक्ष सूर्यच आकाशात असतांना तो पूर्वेकडून पश्चिमेकडे किती सरकला ते
ढळढळीत दिसतच होते. सूर्याकडे पाहून डोळे दिपत असले म्हणून थेट त्याच्याकडे टक लावून पहायचे टाळले तरी जमीनीवर पडणा-या सांवल्यांची लांबी तर मोजतासुद्धा येत असे. सावलीवरून वेळ दाखवणारी सनडायल्स प्राचीन काळात अनेक ठिकाणी होती. दिल्ली आणि जयपूर येथील जंतरमंतरमध्ये अशा अजस्त्र आकाराच्या सनडायल्स आहेत. आमच्या घराच्या एका पूर्वपश्चिम दिशेने बांधलेल्या भिंतीवर एक मोठा खिळा ठोकून मी घड्याळात पाहून त्यावर किती वाजता खिळ्याची सांवली कुठे पडते याच्या खुणा करून ठेवल्या होत्या. त्यावरून मला ब-यापैकी अचूकपणे वेळ कळत असे. रात्र पडल्यावर ता-यांच्या सहाय्याने वेळेचे निदान करता येत असे.
पूर्वीच्या काळातले जीवन आजच्यासारखे यंत्रवत झालेले नव्हते. वेळेनुसार चालणारी ऑफिसे नव्हती की पाळ्यांमध्ये चालणारे कारखाने नव्हते. वेळापत्रकावर धांवणा-या आगगाड्या आणि बस नव्हत्या. कोणाची अँपॉइंटमेंट ठरलेली नसे की टीव्हीवरची मालिका पहायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या रोजच्या जीवनात अगदी काटेकोरपणाने वेळ समजण्याची गरज नव्हती. तेंव्हा वीज तर नव्हतीच पण रॉकेलचे कंदीलसुद्धा नव्हते. देवापाशी लावलेल्या समई किंवा निरांजनातल्या ज्योतीचा मिणमिणीत उजेड सोडल्यास घरातसुद्धा सगळीकडे काळोखच असायचा. अशा काळात भल्या पहाटे लवकर उठून तरी समईच्या मिणमिणत्या उजेडात कसली कामे करणार? फार तर देवासमोर बसून कांही स्तोत्रं म्हणता येतील. झुंजूमुंजू सकाळ झाली की उठायचं, स्नान, न्याहारी वगैरे करून कामाला लागायचं, दुपार झाली की जेवण करून थोडा आराम करायचा. पुन्हा वाटल्यास कांही वेळ काम करून दिवेलागणी व्हायच्या आंत घरी परत यायचं आणि संध्याकाळची जेवणं करून झोपी जायचं असा दिनक्रम होता. सांवल्यांवरून आणि कवडशावरून येणारा वेळेचा अंदाज त्याठी पुरेसा होता.
"आता आपण तास, मिनिटे, सेकंद यामध्ये वेळ मोजतो. तसे कांही मोजमाप तेंव्हा होते कां?"
"अभ्यासू विद्वानांनी आपल्या चिकित्सक वृत्तीने अगदी सूक्ष्म कालावधींच्या व्याख्या केल्या होत्या. आपल्या शास्त्राभ्यासासाठी ते त्याचा उपयोग मुख्यतः करीत असत. दिवस मोठा झाला की रात्र लहान होते आणि रात्र मोठी झाली की दिवस लहान हे चक्र चालू असतांना या दोघांची बेरीज फारशी बदलत नाही हे त्यांनी पाहिले आणि तिचे साठ भाग करून त्याला घटिका असे नांव दिले. ही आजच्या चोवीस मिनिटांएवढी असते. प्रत्येक घटिकेचे साठ भाग आणि त्यातील प्रत्येकाचे पुन्हा साठ भाग करून त्यांना पळ व विपळ अशी नांवे दिली. एक विपळ हा एका सेकंदाच्या पाव हिश्याहून थोडा लहान इतका सूक्ष्म असतो. सूर्य चंद्रांच्या निरीक्षणातून आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे रोजच सूर्य जितका वेळ आभाळात दिसतो त्यापेक्षा चंद्र सुमारे घटकाभर अधिक वेळ आभाळात रेंगाळतो. कदाचित त्यावरून त्यांना घटिका हे परिमाण सुचले असावे."

"खरंच, दिवस व महिना ठरवण्याची खूप चांगली पद्धत आपल्या पूर्वजांनी तयार केली होती." अमोल म्हणाला.
मी सांगितले,"यातले एक वैशिष्ट्य असं आहे की आज कोणती तिथी आहे हे समजण्यासाठी कागदावर छापलेल्या कुठल्याही कॅलेंडरची जरूरी नाही. निरभ्र आभाळ असेल तर चंद्राची कला आणि तो कोणत्या नक्षत्रात आहे एवढे पाहणे हे महिना आणि तिथी ठरवायला पुरेसे आहे."
"पण वर्ष कसं ओळखायचं?"
"गुरु आणि शनी यांच्या स्थानावरून त्याचा अंदाज कसा लावायचा हे मी दाखवलंच होतं. प्राचीन काळातल्या आपल्या विद्वानांनी असं पाहिलं की गुरु आणि शनी आज ज्या राशीत आहेत त्यामधून त्यातला कोणताही ग्रह एकदा पुढे गेला की पुन्हा ते दोघेही एकाच वेळी आज असलेल्या आपापल्या स्थानांवर यायला साठ वर्षे लागतील. गुरु पांच सूर्यप्रदक्षिणा घालून आणि शनी दोन चकरा पूर्ण करून तेंव्हा पुन्हा आजच्या जागांवर परत येतील. अशा रीतीने हे चक्र फिरत राहील. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात साठ वर्षांचे काळ भरपूर मोठे असतात. या साठ वर्षांना त्यांनी वेगवेगळी नांवे दिली. त्यांना संवत्सर असे म्हणतात. त्यांची यादी माहीत असेल तर नांवावरून ते संवत्सर किती वर्षापूर्वी येऊन गेले आणि किती वर्षानंतर पुन्हा येणार आहे ते समजते. इसवी सन, विक्रम संवत आणि शालिवाहन शक या आजपर्यंत चालत आलेल्या गणना सुमारे दोन हजार वर्षे जुन्या आहेत. त्यापूर्वीच्या सम्राटांनी किंवा यामधल्या काळातील इतर राजांनी अशाच प्रकारच्या किती सनावल्या सुरू केल्या, त्यातल्या किती लोकप्रिय झाल्या आणि त्या किती काळ टिकल्या हे ठाऊक नाही. पण संवत्सरांच्या पद्धतीने कोणत्याही काळात निदान एका माणसाच्या आयुष्यामधल्या घटनांची नोंद क्रमवार करता येणे शक्य झाले हे कांही कमी नाही."
"तिथी, महिना, वर्ष यांच्या गणना ठरल्या, पण दिवसातली वेळ कशी मोजायची याचीसुद्धा कांही पद्धत त्यांनी तयार केली होती कां?"
"त्या काळात यांत्रिक घड्याळे नव्हती. आमच्या आजीच्या काळापर्यंत ती परिस्थिती होती. म्हणून 'आजीच्या जवळी' असलेल्या 'चमत्कारिक' घड्याळाचं एवढं कौतुक वाटायचं. पूर्वी वेळेची गणना निसर्गातल्या घटनांवरूनच करायची होती. ते फारच महत्वाचं काम होतं. आज आपण सूर्योदय अमूक वाजून तमूक मिनिटांनी झाला असे म्हणतो. पण ते दाखवणारे घड्याळच नसेल तर काय करणार? भारतातल्या पद्धतीप्रमाणे सूर्योदयापासूनच दिवसाला सुरुवात होत असे. युरोपातली परिस्थिती बरीच वेगळी आहे. अगदी उत्तरेला गेलात तर उन्हाळ्यात मध्यरात्रीसुद्धा सूर्य दिसतो आणि थंडीच्या दिवसात भर दुपारी सुद्धा अंधार असतो. सूर्योदय जर झालाच नाही तर त्यावरून वेळ तरी कशी काढणार? इंग्लंडमध्ये सुद्धा दिवस आणि रात्र यांचा कालावधी कमीत कमी पाच सहा तास ते जास्तीत जास्त अठरा एकोणीस तासाइतका असतो. त्यामुळे सूर्योदयाच्या वेळेत प्रचंड फरक पडतो, म्हणून त्यांनी नाइलाजाने मध्यरात्रीची वेळ ही नव्या दिवसाच्या सुरुवातीची वेळ ठरवली असणार. भारतीय पंचांगाप्रमाणे दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते. त्यानंतर प्रत्यक्ष सूर्यच आकाशात असतांना तो पूर्वेकडून पश्चिमेकडे किती सरकला ते
ढळढळीत.सूर्याकडे पाहून डोळे दिपतात म्हणून थेट त्याच्याकडे टक लावून पहायचे टाळले तरी जमीनीवर पडणा-या सांवल्यांची लांबी तर मोजतासुद्धा येते. सावलीवरून वेळ दाखवणारी सनडायल्स प्राचीन काळात अनेक ठिकाणी होती. दिल्ली आणि जयपूर येथील जंतरमंतरमध्ये अशा अजस्त्र आकाराच्या सनडायल्स आहेत. आमच्या घराच्या एका पूर्वपश्चिम दिशेने बांधलेल्या भिंतीवर एक मोठा खिळा ठोकून मी घड्याळात पाहून त्यावर किती वाजता खिळ्याची सांवली कुठे पडते याच्या खुणा करून ठेवल्या होत्या. त्यावरून मला ब-यापैकी अचूकपणे वेळ कळत असे. रात्र पडल्यावर ता-यांच्या सहाय्याने वेळेचे निदान करता येत असे.
पूर्वीच्या काळातले जीवन आजच्यासारखे यंत्रवत झालेले नव्हते. वेळेनुसार चालणारी ऑफिसे नव्हती की पाळ्यांमध्ये चालणारे कारखाने नव्हते. वेळापत्रकावर धांवणा-या आगगाड्या आणि बस नव्हत्या. कोणाची अँपॉइंटमेंट ठरलेली नसे की टीव्हीवरची मालिका पहायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या रोजच्या जीवनात अगदी काटेकोरपणाने वेळ समजण्याची गरज नव्हती. तेंव्हा वीज तर नव्हतीच पण रॉकेलचे कंदीलसुद्धा नव्हते. देवापाशी लावलेल्या समई किंवा निरांजनातल्या ज्योतीचा मिणमिणीत उजेड सोडल्यास घरातसुद्धा सगळीकडे काळोखच असायचा. अशा काळात भल्या पहाटे लवकर उठून तरी समईच्या मिणमिणत्या उजेडात कसली कामे करणार? फार तर देवासमोर बसून कांही स्तोत्रं म्हणता येतील. झुंजूमुंजू सकाळ झाली की उठायचं, स्नान, न्याहारी वगैरे करून कामाला लागायचं, दुपार झाली की जेवण करून थोडा आराम करायचा. पुन्हा वाटल्यास कांही वेळ काम करून दिवेलागणी व्हायच्या आंत घरी परत यायचं आणि संध्याकाळची जेवणं करून झोपी जायचं असा दिनक्रम होता. सांवल्यांवरून आणि कवडशावरून येणारा वेळेचा अंदाज त्याठी पुरेसा होता.
"आता आपण तास, मिनिटे, सेकंद यामध्ये वेळ मोजतो. तसे कांही मोजमाप तेंव्हा होते कां?"
"अभ्यासू विद्वानांनी आपल्या चिकित्सक वृत्तीने अगदी सूक्ष्म कालावधींच्या व्याख्या केल्या होत्या. आपल्या शास्त्राभ्यासासाठी ते त्याचा उपयोग मुख्यतः करीत असत. दिवस मोठा झाला की रात्र लहान होते आणि रात्र मोठी झाली की दिवस लहान हे चक्र चालू असतांना या दोघांची बेरीज फारशी बदलत नाही हे त्यांनी पाहिले आणि तिचे साठ भाग करून त्याला घटिका असे नांव दिले. ही आजच्या चोवीस मिनिटांएवढी असते. प्रत्येक घटिकेचे साठ भाग आणि त्यातील प्रत्येकाचे पुन्हा साठ भाग करून त्यांना पळ व विपळ अशी नांवे दिली. एक विपळ हा एका सेकंदाच्या पाव हिश्याहून थोडा लहान इतका सूक्ष्म असतो. सूर्य चंद्रांच्या निरीक्षणातून आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे रोजच सूर्य जितका वेळ आभाळात दिसतो त्यापेक्षा चंद्र सुमारे घटकाभर अधिक वेळ आभाळात रेंगाळतो. कदाचित त्यावरून त्यांना घटिका हे परिमाण सुचले असावे."

"या परिमाणांचा उपयोग त्यांना कसल्या अभ्यासात होत असेल?"
"कुठलीही गोष्ट विशेषज्ञांच्या ताब्यात गेली की ते त्यात परफेक्शन आणण्यासाठी खूप काँप्लिकेशन्स करतात हे आपल्याला ठाऊक आहे. ज्योतिषशास्त्रातल्या तज्ञ मंडळींनी सगळ्या ग्रहांच्या भ्रमणाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. समजा एक ग्रह सतरा दिवसात तेवीस अंशाने पुढे सरकला तर तेवीस भागले सतरा इतके अंश, कला , विकला एवढे अंतर तो सरासरी रोज पुढे सरकला अशी त्याची सरासरी गती झाली. तसेच सतरा भागले तेवीस दिवस एवढ्या वेळात जितक्या घटिका, पळे, विपळे येतील तेवढ्या वेळात तो एक अंश पुढे गेला असे गणित मांडता येते. अशा प्रकारची असंख्य निरीक्षणे करून व गणिते मांडून त्यांनी ग्रहांच्या भ्रमणासंबंधीची सूत्रे निर्माण केली. एवढेच नव्हे तर तिथीसाठी एक शास्त्रशुद्ध परिमाण ठरवले. सूर्याच्या तुलनेने चंद्र बारा अंशाने पुढे जाईल तेंव्हा तिथी बदलायची असे ठरवले. त्यामुळे रोजचा दिवस सूर्योदयापासून सुरू झाला तरी तिथी दिवसा किंवा रात्री केंव्हाही बदलते. त्याची वेळ तसेच चंद्राने एका नक्षत्रातून पुढच्या नक्षत्रात प्रवेश करण्याची वेळ घटका पळे या परिमाणात हिशोब करून निश्चित करतात आणि पंचांगात दाखवतात. याखेरीज योग, करण वगैरे संकल्पना निर्माण करून त्याला अधिकाधिक सूक्ष्मता आणली."
"पण ही इतकी सूक्ष्म वेळ मोजण्याची कोणती व्यवस्था होती?"
"पळे आणि विपळे मोजण्याची सोय होती की नाही ते मलाही माहित नाही. कदाचित त्या गणितातल्या संकल्पना असतील. घटिका मोजण्यासाठी मात्र एक विशिष्ट प्रकारचे पात्र असायचे. अभिषेक करण्यासाठी वापरतात तसे खाली छिद्र असलेले हे भांडे एका मोठ्या पात्रात पाणी भरून त्यात ठेवायचे. रिकामे भांडे पाण्यावर तरंगते. पण छिद्रातून हळू हळू पाणी आत शिरल्यावर ते जड होऊन हळू हळू खाली खाली जाते. पूर्ण भरत आले की पुरेसे जड झाल्याने एकदम भरून बुडून जाते. म्हणूनच 'घटका भरली' असा शब्दप्रयोग केला जातो. पात्राचा आकार तसेच छिद्राचा आकार नियंत्रित करून ते बरोबर एक घटकेमध्ये बुडावे याची खात्री करून घेत असतील. मुहूर्ताची वेळ यासारख्या महत्वाच्या वेळा दाखवण्यासाठी या घटिकापात्राचा उपयोग करीत असत."

. . .. . . . . . . . . . .. . (क्रमशः)

No comments: