Friday, January 25, 2013

दृष्टीभ्रम

पांडवांच्या मयसभेमध्ये अनेक मायावी दृष्ये होती. दुर्योधनाने तिथे भेट दिलेली असतांना एका जागी पाणी आहे असे त्याला वाटले म्हणून तो आपला पीतांबर सावरीत तिथून गेला आणि ती जमीन निघाली, तर दुस-या एका जागी भक्कम जमीन समजून त्याने पाऊल ठेवले तर ते पाण्यात पडून तो भिजून गेला. हे पाहतांना द्रौपदी त्याला हसून म्हणाली, "आंधळ्याचा मुलगासुध्दा आंधळा !" हा अपमान दुर्योधनाला सहन झाला नाही. त्याचा सूड उगवण्यासाठी त्याने कपत कारस्थाने केली आणि त्यातून महाभारत झाले.

"दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं." असे म्हणतात, पण आपल्यालाच एका बाजूने एक दिसले आणि दुस-या बाजूने त्याच्या विपरीत काही दिसले तर त्यातले कोणते खरे आणि कोणते खोटे, काय बरोबर आणि काय चूक हेच समजेनासे होते. त्रिमिती आकृती द्विमितीमध्ये म्हणजे सपाट कागदावर काढतांना विशिष्ट प्रकारे त्रिमितीचा भास उत्पन्न केला जातो. पण यात खुबीने असे भास निर्माण करता येतात की नक्की काय आहे तेच कळत नाही.

खाली दिलेली याची काही उदाहरणे पहातांना नक्कीच चक्रावून जाल !








No comments: