tag:blogger.com,1999:blog-204845152024-03-06T20:25:33.821-08:00आनंदघनविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणीAnand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comBlogger1000125tag:blogger.com,1999:blog-20484515.post-335424879714228182024-01-14T06:25:00.000-08:002024-01-14T06:25:24.679-08:00अमेरिकेतली देवळे<p> अमेरिकेत आता भारतीय लोकांची बरीच वस्ती झाली आहे आणि ते सगळे सुखवस्तू लोक आहेत. त्यांनी जागोजागी सुंदर मंदिरे बांधली आहेत. त्यांच्या गुणवत्तेत तसेच संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. भारतातून अमेरिकेत फिरायला गेलेल्या लोकांना तर त्यांचे अप्रूप वाटते. ही सगळी देवळे गेल्या काही दशकांमध्येच बांधलेली असल्यामुळे त्यांना पौराणिक स्थानमहात्म्य नाही आणि अजूनतरी ती जागृत देवस्थाने झालेली नाहीत. त्यामुळे नवससायास करणाऱ्या भाविक लोकांना त्यांची ओढ नाही. सुटीच्या दिवशी किंवा विशिष्ट धार्मिक महत्वाच्या तिथींना थोडी जास्त गर्दी जमते.पण एरवीसुद्धा सगळीकडे माफक संख्येने भक्तजन दिसतात. काही देवळे वास्तुशिल्पाच्या दृष्टीने खूप सुंदर असल्यामुळे ती प्रेक्षणीय स्थळेही आहेत. आणखी काही वर्षांनी अमेरिकेतल्या मंदिरांची तीर्थयात्रा करण्याची टूम आणि टूर निघाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. मी इंग्लंडमधल्या लीड्स शहरात रहात असतांना तितल्या एकमेव 'हिंदू टेंपल'ला जात असेच, शिवाय बर्मिंगहॅम इथे बांधल्या जात असलेल्या प्रति तिरुपती व्यंकटेशाचे दर्शनसुध्दा घडले. माझी गणना 'भाविकां'त होत नसली तरी सुंदर मंदिरांमधले पवित्र आणि प्रसन्न वातावरण मला मोहित करते. आपोआप माझे पाय देवळांकडे वळतात.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg8e9CO7gSMzW349AYFToWV8juB-OJLAq5RIidEJ8qX_DKBgc-UkNYOYR7BCajQ0UOxWeeGsuRWF1qFIvbfNODUMYjNfQBuCH4qb-1i7B-fPlm2MSUcvYN3hdWwnAd4Jh4uPikhhWksnznH-Erf2vnbFqYXUblGxbNCCDlMs5TPqv_SgP9AeUturQ/s1280/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%20%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="800" data-original-width="1280" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg8e9CO7gSMzW349AYFToWV8juB-OJLAq5RIidEJ8qX_DKBgc-UkNYOYR7BCajQ0UOxWeeGsuRWF1qFIvbfNODUMYjNfQBuCH4qb-1i7B-fPlm2MSUcvYN3hdWwnAd4Jh4uPikhhWksnznH-Erf2vnbFqYXUblGxbNCCDlMs5TPqv_SgP9AeUturQ/w640-h400/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%20%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8.JPG" width="640" /></a></div><br /><p>मी पहिल्यांदा अमेरिकेत गेलो तेंव्हा अॅटलांटाजवळील अल्फारेटा या शहरात राहिलो होतो. तिथेही एक दोन लहानशी स्थानिक मंदिरे होतीच, पण अॅटलांटाजवळ लिलबर्न या ठिकाणी गुजराथी लोकांचे एक <a href="https://anandghan.blogspot.com/2009/01/blog-post_27.html">स्वामीनारायणाचे भव्य मंदिर </a>होते, तसेच दक्षिण भारतीय समाजाचेही एक चांगले मोठे देऊळ होते. स्वामीनारायण मंदिराची इमारत छायाचित्रात बाहेरून जितकी सुबक दिसते त्याहूनही अधिक सुरेख ती आंतून दिसते. प्रत्येक खांबावर आणि छपरावर सुबक आणि रेखीव शिल्पकृती कोरल्या आहेत. त्यावर कलात्मक पध्दतीने टाकलेले प्रकाशाचे झोत रंग बदलत असतात. त्याने त्या शिल्पकृतींना अधिकच उठाव येतो. इंग्लंड अमेरिकेत बहुतेक सगळ्या मंदिरांमध्ये मुख्य देवतेशिवाय इतर अनेक देवांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. त्यामुळे सगळ्या भक्तांची सोय केली जाते. इथेही राधाकृष्ण, शिव- पार्वती, गणेश, श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत, पण या मंदिरात पारंपरिक हिंदू देवतांपेक्षा स्वामीनारायण संप्रदायातील गुरूंना अधिक महत्व दिलेले दिसते.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9Ygnk4DDVEVSId7Zx7_DoOPhsPKd6p_4jHRVtl56Mi816WZBSZEnVYT7RFzc2AKFttm196ZdkeEjh8luVxdFZq0oW-x8qdAPuqSIJudE_gg5rJfErcn9_KFadriFJv0TNZs5V9XiMchNk6BxwqJNCIc5tRwhNh9fqSwhRl4Cy4JOSwM41W4Bs0A/s850/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="500" data-original-width="850" height="376" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9Ygnk4DDVEVSId7Zx7_DoOPhsPKd6p_4jHRVtl56Mi816WZBSZEnVYT7RFzc2AKFttm196ZdkeEjh8luVxdFZq0oW-x8qdAPuqSIJudE_gg5rJfErcn9_KFadriFJv0TNZs5V9XiMchNk6BxwqJNCIc5tRwhNh9fqSwhRl4Cy4JOSwM41W4Bs0A/w640-h376/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpg" width="640" /></a></div><br /><p>माझ्या अमेरिकेच्या दुसऱ्या भेटीत मी लॉसएंजेलिसजवळ टॉरेन्स इथे रहात होतो. तिथे आमच्या घराहून सर्वात जवळ असलेले मंदिर पंचमुखी हनुमानाचे होते. मारुतीचे हे रूप मी तरी प्रथमच पाहिले. या देवळातसुद्धा हनुमानाशिवाय इतर मुख्य देवतांची स्थापना केली आहे. गणेशोत्सव, देवीचे नवरात्र वगैरे उत्सवसुद्धा त्या मंदिरांमध्ये साजरे केले जातात. हे दक्षिण भारतीय लोकांचे मंदिर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा, अभिषेक आणि मंत्रपठण वगैरे विधीवत प्रकार तिथे नेहमी चाललेले असतात. त्या भेटीत मी लेक श्राइन नावाचा परमहंस स्वामी योगानंदांचा रम्य आश्रम पाहिला होता. या आश्रमात सर्वधर्मसमभाव आहे. योगानंदांची शिकवण जगातील सर्व धर्मीयांच्या कल्याणासाठी आहे.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixNd08P-TGRPLXnhdtw9bmDmD1POOG9Z3wOD7aPA3B-pk4GMDgecxwWMyqCQZRgoOnCAc7AyNMOyRnH8Pn0J6oNOC8ripTXSZU3DMVFdbDKQmByQrWoGHs5sxN2th6Ib1AlPYmE8vkxv8a-cie94dF1uIRmWzvCw7U_yXJupB16TzeP8DOJ_qR3w/s1050/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="930" data-original-width="1050" height="566" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixNd08P-TGRPLXnhdtw9bmDmD1POOG9Z3wOD7aPA3B-pk4GMDgecxwWMyqCQZRgoOnCAc7AyNMOyRnH8Pn0J6oNOC8ripTXSZU3DMVFdbDKQmByQrWoGHs5sxN2th6Ib1AlPYmE8vkxv8a-cie94dF1uIRmWzvCw7U_yXJupB16TzeP8DOJ_qR3w/w640-h566/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE.jpg" width="640" /></a></div><br /><p>गेल्या वर्षी मी पुन्हा अमेरिकेला गेलो तेंव्हा न्यूजर्सीमधल्या साउथ प्लेनफील्ड नावाच्या लहानशा गावात रहात होतो. तिथल्या रहिवासामध्येसुद्धा मला अनेक देवळांचे आणि देवतांच्या मूर्तींचे दर्शन घडले. तिथे गेल्या गेल्या आम्ही जवळच्या ब्रिजवॉटर इथल्या बालाजी मंदिरात जाऊन आलो. अनादि, अनंत, निर्गुण, निराकार, जगातील कणाकणात भरलेला असे परमेश्वराचे वर्णन असंख्य वेळा ऐकूनसुद्धा त्याच्या देवळात जाऊन त्याच्या मनोहर रूपाचे दर्शन घ्यायला लोकांना अतीशय आवडते. आंध्रप्रदेशातील तिरुपति येथील वेंकटेश किंवा बालाजीचे मंदिर जास्तीत जास्त भक्तगणांच्या गर्दीसाठी प्रसिद्ध आहे. हा भगवान विष्णूचा अवतार आहे अशी श्रद्धा असली तरी "परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय" यातल्या कुठल्या कारणासाठी हा अवतार घेतला गेला याची कथा मी कधी ऐकली नाही. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUeM0-h0LWr-NTheNo_z6liZlnWnlRkdqiRr4mvHZEl7AIK37wVihFGqLBTr2PVfLpT6Scxj8rYQ6sETqw-KyGi7CucZn35R_h788FL-3er5TPt1bLnw-lcuYQF0l1019MsUyD44pNfw_V06voFjMcBX9BrDQoXaPYvFW5T1qQQAJHMSpuK5TIfw/s1200/sri-venkateswara-temple.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1016" data-original-width="1200" height="542" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUeM0-h0LWr-NTheNo_z6liZlnWnlRkdqiRr4mvHZEl7AIK37wVihFGqLBTr2PVfLpT6Scxj8rYQ6sETqw-KyGi7CucZn35R_h788FL-3er5TPt1bLnw-lcuYQF0l1019MsUyD44pNfw_V06voFjMcBX9BrDQoXaPYvFW5T1qQQAJHMSpuK5TIfw/w640-h542/sri-venkateswara-temple.jpg" width="640" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiylLYAiBEBWOzslF3rdobiAcI8zeJtKKF6PmdC2erXgqiG6riQneV5Gc5uKfao7zbxsuGIE7lXbFO4JV0OhkA_0U2RnLhHaHsTlgUvgEzAUphg4tRVXhExXt8BYrJaqkGp6j_le0WSqqiZhjbrW88bej2f2ZQ6WaFJhDxyaoX6cEk14DlEMBfEAA/s2048/Venktesh%20temple1.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="1536" data-original-width="2048" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiylLYAiBEBWOzslF3rdobiAcI8zeJtKKF6PmdC2erXgqiG6riQneV5Gc5uKfao7zbxsuGIE7lXbFO4JV0OhkA_0U2RnLhHaHsTlgUvgEzAUphg4tRVXhExXt8BYrJaqkGp6j_le0WSqqiZhjbrW88bej2f2ZQ6WaFJhDxyaoX6cEk14DlEMBfEAA/s320/Venktesh%20temple1.jpg" width="320" /></a></div><p>तिरुपतीचा व्यंकोबा दोन भक्तांना दर्शन देण्यासाठी आमच्या जमखंडीजवळच्या कल्हळ्ळीच्या डोंगरावर अवतरला अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आम्ही लहानपणापासून त्या देवाचे दर्शन घेण्यासाठी "व्यंकटरमणा गोविंदा" या नामाचा घोष करत तिथे अनेक वेळा जात होतो. आमच्या परिवारातले अनेक लोक मुंबईपुण्याहून त्याच्या दर्शनासाठी जमखंडीला येऊन जात होते, अजूनही जात असतात. त्यांच्या बोलण्यात त्याचा उल्लेख येत असतोच. माझ्या आईने या कल्हळ्ळीचा व्यंकटेशावर कवने रचली होती. लहानपणापासूनच व्यंकटेश या देवाबद्दल मनात खूप आपुलकी आणि भक्तीभाव होता. आम्ही दक्षिण भारताची सहल आधी तिरुपतीला जाऊन व्यंकोबाचे दर्शन घेऊन सुरू केली होती.</p><p><br /></p><p>या देवाचे भक्त जगभर पसरलेले आहेत. त्यांनी इतर अनेक ठिकाणी बालाजीची सुंदर मंदिरे बांधली आहेत. पुण्याजवळील केतकावली इथले प्रतितिरुपति देऊळ प्रसिद्ध आहेच, मी तिथेही दोनदा जाऊन आलो आहे. अमेरिकेतल्या न्यूजर्सीमधील ब्रिजवॉटर नावाच्या गावातसुद्धा एक अत्यंत सुंदर असे वेंकटेशाचे देऊळ आहे आणि अमेरिकेतले भारतीय वंशाचे लोक तिथे दर्शनासाठी येत असतात. आम्ही या देवळात गेलो तेंव्हा तळमजल्यावर आत जाताच समोरील एका हॉलमध्ये बरीच गर्दी दिसत होती, पण आत जाऊन पाहिल्यावर ते लोक एकाद्या खाजगी धार्मिक कार्यक्रमासाठी जमले होते असे समजले. मुख्य मंदिर वरच्या मजल्यावर होते म्हणून आम्ही जिना चढून वर गेलो. तिथल्या भव्य हॉलमध्ये मधोमध श्रीव्यंकटेशाचे मुख्य मंदिर होते. तिथे आत जाऊन दर्शन घेतले. बाहेर आल्यावर देवळाला प्रदक्षिणा घालण्याच्या वाटेवर श्रीदेवी, भूदेवी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वति, श्रीराम, श्रीकृष्ण, आंजनेय (मारुती), महागणपति, सुब्रह्मण्यम, नवग्रह इत्यादि सतरा देवतांच्या लहानलहान पण सुबक अशा घुमटी होत्या. मंदिराच्या संपूर्ण परिसरातली स्वच्छता आणि शांतताही वाखाणण्यासारखी होती. अपेक्षेप्रमाणे प्रसादाचा बुंदीचा लाडू मिळालाच. तिरुपतीला, केतकावलीला आणि ब्रिजवॉटरला मिळालेल्या प्रसादाची चंव अगदी एकसारखी होती इतके त्याचे जागतिक प्रमाणावर स्टँडर्डायझेशन झाले आहे.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjadkD8N1FJ_jLg2FwYL_fuA-Sbjh9ViwqeGx_WoYtIrB3EKetdHZxBYaf0H4RbBgiDN4xsB5zV8sipK77MXQa_Alq4m5i54xyLevzOFPvvQ8sVOfsC3eJHFMwB1wP6gjI16GsRGLc7VO1cdnm0lbt0Mwm_Vc816RiSV9_CNvfi57B-xKltJM06eg/s1770/Ringan%20NJ.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="820" data-original-width="1770" height="296" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjadkD8N1FJ_jLg2FwYL_fuA-Sbjh9ViwqeGx_WoYtIrB3EKetdHZxBYaf0H4RbBgiDN4xsB5zV8sipK77MXQa_Alq4m5i54xyLevzOFPvvQ8sVOfsC3eJHFMwB1wP6gjI16GsRGLc7VO1cdnm0lbt0Mwm_Vc816RiSV9_CNvfi57B-xKltJM06eg/w640-h296/Ringan%20NJ.jpg" width="640" /></a></div><br /><p>मी अमेरिकेत असतांना आषाढी एकादशी आली होती. यानिमित्याने त्या भागात राहणाऱ्या काही मराठी मंडळींनी उत्साहाने काही कार्यक्रम केले होते. एका सुटीच्या दिवशी एका लहानशा मैदानात एक प्रतीकात्मक दिंडी काढून पालकीची मिरवणूक काढली होती. त्याला रिंगण असे नाव दिले होते. शंभर सव्वाशे लोक भारतीय पोशाख घालून हातात भरवा झेंडा घेऊन रामकृष्णहरी नामाचा घोष करत नाचत नाचत चालत होते. नंतर श्री.कुलकर्णी नावाच्या एका अमेरिकेतल्या भक्ताच्या घरी एक मोठा कार्यक्रम झाला. त्यांनी आपल्या बंगल्यातल्या एका शेडमध्ये श्रीविठ्ठलरखुमाईचे देऊळ तयार केले आहे. तिथेही आधी एका पालखीत विठोबारखुमाईच्या मूर्ती ठेऊन चाळीसपन्नास भक्तांनी त्याची मिरवणूक काढली आणि अमेरिकेतले रहदारीचे सगळे नियम पाळून तिला फूटपाथवरूनच मैलभर फिरवून आणले. त्यानंतर प्रवचन, भजन, भक्तीसंगीत वगैरेंचा सुरेल कार्यक्रम झाला, त्यालाही शंभरावर लोक आले होते. ते आजूबाजूच्या शंभर मैलांच्या परिसरातून आले होते.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiy2AHfc10hlL2OmLoqP_xTHGIgraBmzl2kN2vrWZBCJ9P5QjcI_35Cp8KLxvZ3a5cLIWjUXd8WUx1M45F7ClEYOZJVmyppJULoI4YleYI6-SANhZi_nURQDtupA0b-1IVQg9DEfEzjt2m58nvF2w-qd40_d_wCOhrAjm2RSCSmailtL3M7aVzR2Q/s1156/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1156" data-original-width="867" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiy2AHfc10hlL2OmLoqP_xTHGIgraBmzl2kN2vrWZBCJ9P5QjcI_35Cp8KLxvZ3a5cLIWjUXd8WUx1M45F7ClEYOZJVmyppJULoI4YleYI6-SANhZi_nURQDtupA0b-1IVQg9DEfEzjt2m58nvF2w-qd40_d_wCOhrAjm2RSCSmailtL3M7aVzR2Q/w480-h640/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpg" width="480" /></a></div><br /><p><br /></p><p>माझी भारतात परतायची वेळ आली त्या सुमाराला असे कळले की न्यूजर्सीमध्येच भारताबाहेरील सर्वात मोठे असे अक्षरधाम मंदिर बांधले जात होते. त्याचे औपचारिक उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होणार होते, पण त्याआधीच ते पाहून घ्यावे असा विचार करून आम्ही कारने रॉबिन्सविले या गावी त्या मंदिराच्या प्रांगणापर्यंत जाऊन पोचलो. तिथे पार्किंग लॉटमध्ये शेकडो मोटारी दिसत होत्या आणि आतमध्येही शेकडो लोक फिरतांना दिसत होते. पण आम्हाला गेटपाशीच अडवले आणि फक्त पासधारकांनाच प्रवेश आहे असे सांगितले. हे पास आधीपासून ऑनलाइन बुकिंग करून मिळवले जात होते आणि आयत्या वेळी आलेल्या लोकांना तिथल्या तिथे काही शुल्क आकारून पास देण्याची काही व्यवस्थाच नव्हती. तिथे कडक पोलिसबंदोबस्त होता आणि गळ्यात पास धारण न केलेला कोणी इसम दिसल्यास स्थानिक अमेरिकन पोलिस आयोजकांवरच कडक कारवाई करणार असा धाक घातला होता. त्यामुळे अगदी काकुळतीने विनवण्या करूनसुद्धा आम्हाल प्रवेश मिळालाच नाही. अखेर मंदिराचे दुरूनच शिखरदर्शन करून घरी परत जावे लागले.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEcj8pfT-UzCcPFoAl5dFQuM-g6eAZf8AV9gFjTdqUhbYZKI2jslOhHHtozFCvvnqvuE3WmaYO_-EaabwL-QJdp8Jvd6VP0RX06Zyj4REuQR4fl29LMHJtuiMoe0_97-HdO4DUlqZlV1metgjqIkJoYQApu1HH5XfqjNREuuRoJWUjWVimtSGwww/s600/NJ%20Akshardham%20temple.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="338" data-original-width="600" height="360" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEcj8pfT-UzCcPFoAl5dFQuM-g6eAZf8AV9gFjTdqUhbYZKI2jslOhHHtozFCvvnqvuE3WmaYO_-EaabwL-QJdp8Jvd6VP0RX06Zyj4REuQR4fl29LMHJtuiMoe0_97-HdO4DUlqZlV1metgjqIkJoYQApu1HH5XfqjNREuuRoJWUjWVimtSGwww/w640-h360/NJ%20Akshardham%20temple.jpg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p><br /></p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20484515.post-88276110050309760222023-12-25T07:09:00.000-08:002023-12-25T07:09:56.248-08:00शास्त्रज्ञ की राक्षस ?<p> </p><p>सकाळी सूर्य उगवतो आणि सगळीकडे उजेड पसरतो, तो दिवसभर आकाशात असतो, संध्याकाळी मावळतो, त्यानंतर रात्र होते आणि सगळीकडे अंधार पसरतो, पण त्यावेळी चंद्राचा थोडा उजेड असतो. रात्रीच्या काळ्या आकाशात चांदण्या लुकलुकतात, पण दिवसा त्या दिसत नाहीत. कधीकधी आभाळात काळे ढग येतात आणि सूर्याला झाकून टाकतात, त्यातून पावसाच्या धारा पडतात आणि जमीनीवर पडलेले पाणी नदी नाले ओढे वगैरेंमधून वहात वहात दुसरीकडे जाते. मातीतून झाडे उगवतात, त्यांना पाने फुले, फळे वगैरे लागतात. जन्माला येतांना लहानसे असलेले बाळ हळूहळू मोठे होते आणि मोठा झालेला माणूस शेवटी म्हातारा होतो. निसर्गात अशासारखे असंख्य बदल होत असतात हे आदिमानवापासून सर्वांनी पाहिलेले असते. पण हे बदल का किंवा कशामुळे होतात याचा फारसा विचार सगळे लोक गंभीरपणे करत नाहीत. अदृष्य आणि सर्वशक्तीमान असा परमेश्वर हे सगळे चमत्कार घडवून आणत असतो असे काही शहाणे लोक सांगतात आणि ते बहुतेक सगळ्या लोकांना पटते. मात्र काही लोकांचे तेवढ्यावर समाधान होत नाही. या जगात कुठलीही गोष्ट का घडते याचा ते लोक सखोल विचार करतात आणि त्यामागे असलेल्या निसर्गाच्या नियमांचा शोध घेतात, त्याची अधिकाधिक माहिती मिळवत राहतात. त्यांना आपण शास्त्रज्ञ म्हणतो. हे शास्त्रज्ञ लोक निसर्गाचे नियम आणि पदार्थांचे गुणधर्म यांचा अभ्यास करून थांबत नाहीत, तर पुढे जाऊन त्यांचा मानवाच्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचे प्रयत्नही करत असतात. या प्रयत्नामधूनच प्रगति होत निरनिराळ्या प्रकारची यंत्रे आणि वस्तू निर्माण होत गेल्या आणि आपण आजच्या जगातल्या सुखसोयींचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे शास्त्रज्ञ हे जगाच्या कल्याणासाठी काम करणारे महान लोक असतात अशी त्यांची एक प्रतिमा मनात असते.</p><p><br /></p><p>पण जगाच्या सुरुवातीपासूनच माणसांबरोबर राक्षसही निर्माण होत गेले आहेत. ते दुसऱ्यांवर हल्ला करून त्याची मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नात असतात. राक्षसी वृत्तीच्या काही लोकांना तर विध्वंस करण्यातच आनंद मिळतो. त्यामुळे जसजसे निरनिराळे शोध लागत गेले आणि त्यामधून निरनिराळी औजारे व यंत्रे तयार होत गेली, त्यांच्या बरोबरच अधिकाधिक तीक्ष्ण हत्यारे आणि विध्वंसक स्फोटकेही तयार होत गेली. यामुळे विज्ञान हे विकासाचे साधन आहे की विनाशाचे? असा प्रश्न काही तत्वज्ञानी विचारवंत उपस्थित करत असतात. अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या काही प्रमुख शास्त्रज्ञांची उदाहरणे मी या लेखात घेतली आहेत. </p><p>. . . .</p><p>ऑप्पनहायमर हा हॉलिवूडचा सिनेमा आला आणि सगळीकडे त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली.</p><p>"कोण हा ऑप्पनहायमर?"</p><p>"अरे तो नाही का, त्यानं पहिला अॅटमबाँब बनवला?"</p><p>"म्हणजे जसा एकाद्या रामू हलवायानं सामोसा तळला किंवा राधाकाकूनं उकडीचा मोदक केला तसाच या पठ्ठ्यानं एकट्यानं अॅटमबाँब केला असेल का?" </p><p>"असेल की! अरे सामोसा म्हणजे तरी काय असतो? एका कणकेच्या कवचाच्या आत मीठमिरची, बटाटा आणि मटारचा गोळा आणि मोदक म्हणजे त्यात गूळ आणि खोबरंच ना? यानंही एक स्पेशल भांडं घेतलं असेल आणि त्यात खूप सारे अॅटम खच्चून कोंबून ठेवले असतील."</p><p>सर्वसामान्य माणसाचे या विषयातले ज्ञान इतपतच असते. हा पहिला अॅटमबाँब तयार करण्यासाठी एक मोठ्ठे मॅनहॅटन प्रॉजेक्ट होते आणि त्यात हजारो माणसे गुंतली होती हे सहसा कुणाला माहीतही नसते. हे काम इतक्या गुप्तपणे चालले होते की यातल्या बहुतेक लोकांनासुद्धा आपण नेमके कशासाठी काम करतो आहोत याचा पत्ता नव्हताच. अर्थातच या प्रॉजेक्टचा मुख्य अधिकारी असलेल्या ऑप्पनहायमरला मात्र पूर्ण कल्पना होतीच, इतकेच नव्हे तर त्याने या गोष्टीचा ध्यास घेतला होता आणि दोन तीन वर्षे अविश्रांत काम करून ते उद्दिष्ट साध्य करून दाखवले होते. विश्वातला प्रत्येक अणू म्हणजे ऊर्जेचेच वेगळे रूप असते हे त्याआधीच आइन्स्टाइनने गणिते मांडून सिद्ध करून दाखवले होते, पण प्रत्यक्षात आपल्याला वाटेल त्या अणूला फोडून त्यातली ही सुप्त ऊर्जा बाहेर काढता येत नाही. कुठकुठल्या विशिष्ट पदार्थांच्या अणूंना कशा प्रकारे फोडून हे काम करता येते यावर जगभरातल्या सगळ्या प्रगत देशांमध्ये गुप्तपणे संशोधन चालले होते त्याचा धागा धरून हे काम चालले होते.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhutT2ZJU0PTvdNduBW0IAq3QZAePWtx5YhiAdWX6x_J9KOH4WFSCtgS6eDeBmLkq99Oi-nRxXq9hXr_VtKHDfcWJAU2Fe5_KFQne-fEtYFp9aW1J5CtukW8UdvAbksrS9_Iy1Lir7NHZiVhgfSYFLEvodOydI8sFh1A1_sb_fxWvxtTpHDnOucjA/s458/Einstein%20Oppenheimer.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="458" data-original-width="458" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhutT2ZJU0PTvdNduBW0IAq3QZAePWtx5YhiAdWX6x_J9KOH4WFSCtgS6eDeBmLkq99Oi-nRxXq9hXr_VtKHDfcWJAU2Fe5_KFQne-fEtYFp9aW1J5CtukW8UdvAbksrS9_Iy1Lir7NHZiVhgfSYFLEvodOydI8sFh1A1_sb_fxWvxtTpHDnOucjA/w400-h400/Einstein%20Oppenheimer.jpg" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>आल्बर्ट आइनस्टाइन या शास्त्रज्ञाला परंपरागत भौतिकशास्त्राचा अभ्यास करत असतांना काही क्रांतिकारक नवे विचार सुचले आणि त्याने ते सापेक्षता सिद्धांत (theory of relativity) या नावाने मांडून विज्ञानाच्या क्षेत्रात इतिहास घडवला. त्या आधीची दोनशे वर्षे प्रयोगशाळांमध्ये निरनिराळे प्रयोग करून, त्यातली निरीक्षणे पाहून त्यांवरून निष्कर्ष काढून विज्ञानातले नवे सिद्धांत मांडले जात होते, पण आइनस्टाइनने मात्र घरी किंवा ऑफिसात बसून फक्त तर्कशुद्ध विचार आणि किचकट गणिते यांच्या आधारे कागदावर असे दाखवून दिले की विश्वातले सगळे वस्तुमान आणि ऊर्जा या एकच असतात. (mass–energy equivalence formula E = mc^2) त्याने या दोन्हीमधील संबंधाचे सूत्रही सांगितले. यावरून असे दिसून आले की अगदी कणभर पदार्थातही प्रचंड ऊर्जा दडलेली असते. आइनस्टाइनने हे समीकरण प्रयोगातून सिद्ध करून दाखवले नाही, किंबहुना ते त्याला शक्य नव्हतेच, पण इतर शास्त्रज्ञ लोकांनी त्यावर विश्वास ठेवला आणि अशी ऊर्जा मिळवण्यासाठी जोरात संशोधन सुरू झाले. अणुशक्ती हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे एक नवे दालन उघडले. त्यातील संशोधनामुळेच अणूबाँब तयार करणे शक्य झाले. म्हणून त्यासाठी आइनस्टाइनलासुद्धा जबाबदार धरले जाते. याचे आणखी एक कारण आहे. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर आइनस्टाइनने जर्मनी सोडून अमेरिकेत आसरा घेतला होता. त्याला अशी माहिती मिळाली होती किंवा त्याचा असा विश्वास होता की हिटलरचे सरकार अॅटमबाँब तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते यशस्वी झाले तर त्याच्याकडे एक भयानक संहार करणारे अस्त्र असेल. त्या वेळी अमेरिकेत रहात असलेल्या काही शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या तत्कालिन प्रेसिडेंटला पत्र लिहून ही माहिती दिली आणि अमेरिकेनेही त्यासाठी प्रयत्न करून जर्मनीच्या आधी हे तंत्रज्ञान विकसित करावे अशी सूचना केली. त्या पत्रावर आइनस्टाइनसारख्या प्रमुख शास्त्रज्ञाने सही केली होती म्हणून प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनी ते पत्र मनावर घेतले आणि मॅनहॅटन प्रॉजेक्टला मंजूरी दिली. आइनस्टाइन हा व्यक्तिशः अत्यंत मानवतावादी मानव होता तरीही अशा प्रकारे तो अप्रत्यक्षपणे या विध्वंसक कामाला कारणीभूत ठरला. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcM-sRNvfue9cfYfTcaHPfSawXEF8Dp-8q-Um-isHpLCw8ktOw2rbCjxb8fCKSIEAlVZMs-z5RCIWcabUvcv3MsHbQL3_JLCrT5PT3uv__eb1EyVT6Sdh7Rv4hdfU_hDeI-KmzmMciVelGPmCE4RdKtrQmrvCdD3iBO8iroIrb54LRw81Tqjh0qA/s1002/Eistein%20letter%20to%20US%20president.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1002" data-original-width="800" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcM-sRNvfue9cfYfTcaHPfSawXEF8Dp-8q-Um-isHpLCw8ktOw2rbCjxb8fCKSIEAlVZMs-z5RCIWcabUvcv3MsHbQL3_JLCrT5PT3uv__eb1EyVT6Sdh7Rv4hdfU_hDeI-KmzmMciVelGPmCE4RdKtrQmrvCdD3iBO8iroIrb54LRw81Tqjh0qA/w510-h640/Eistein%20letter%20to%20US%20president.jpg" width="510" /></a></div><br /><p><br /></p><p>भारतातल्या काही लोकांना ऑप्पनहायमरचे मोठे कौतुक वाटते. ते त्याची कार्यकुशलता किंवा त्याने केलेले संशोधन याचे कौतुक नसून ते एका वेगळ्याच कारणामुळे वाटते, ते म्हणजे या माणसाने संस्कृत भाषा आणि भगवद्गीता यांचा अभ्यास केला होता म्हणे. असेही सांगितले जाते की पहिल्या अॅटमबाँबची चाचणी पाहिल्यावर त्याला भगवद्गीतेतला एक श्लोक आठवला. पूर्वी मी असे वाचले होते की भगवंताने अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले तेंव्हा त्याचे हजार सूर्यांएवढे तेज त्याचे मर्त्य डोळे पाहू शकत नव्हते म्हणून कृष्णाने त्याला दिव्यचक्षू दिले होते, तशा प्रकारचा भयानक उजेड त्या बाँबस्फोटातून निघाला होता. पण आता जी चर्चा चालली आहे त्यात असे वाचले की ऑप्पनहायमरला दुसराच एक श्लोक आठवला होता. त्यात कृष्णाने सांगितले होते, "मी काळ आहे". ज्यांना टीव्हीवरले महाभारत आठवत असेल त्यांना हरीश भीमाणीच्या खर्जातल्या आवाजातले "मैं समय हूँ ... " ची आठवण येईल, पण या ऑप्पनहायमरने स्वतःलाच म्हंटले, "मी सर्व जगाचा संहार करणारा काळ झालो आहे." तो कदाचित पुढे "हाहाहा!!!" करून राक्षसासारखे भेसूर हसलासुद्धा असेल. गीतेमध्ये सांगितलेल्या सत्वरजतमोगुणापैकी याने तामसी गुणच उचलला असावा.</p><p>ते काही का असेना, ऑप्पनहायमरला गीता आठवली एवढ्यासाठी इथले काही लोक आपल्या महान संस्कृतीच्या नावाने आपली पाठ थोपटून घेतात आणि 'त्या लोकांना' जेवढे समजते तेवढेही आपल्या लोकांना कळत नाही, हे लोक गीतेकडे पाठ फिरवून बसले आहेत, म्हणून आपला देश मागे राहिला आहे असेसुद्धा सांगतात. मग एकजण विचारतो, "तुम्ही ती वॉट्सॅपवरली गोष्ट वाचली नाहीत का? त्यात एक महान शास्त्रज्ञ धोतर नेसून आणि उपरणे पांघरून समुद्रकिनारी गीता वाचत बसलेला असतो. तिथे आलेला शर्टपँटमधला एक तरुण त्याची टिंगल करत असतो. तेवढ्यात एक मोठी मोटारगाडी तिथे येते आणि तिच्यातून उतरून सैन्यातले दोन अधिकारी त्या माणसाला कडक सॅल्यूट ठोकून गाडीत यायला सांगतात. त्या गोंधळलेल्या तरुणाला तो शास्त्रज्ञ आपली ओळख देतो. मग तो तरुण शास्त्रज्ञही गीतेचा अभ्यास करायला लागतो. नंतर भारतानेही अणुस्फोट करून दाखवलाच नाही का?"</p><p><br /></p><p>आइन्स्टाइन आणि ऑप्पनहायमर हे दोघेही ज्यू होते. दुसरे महायुद्ध सुरू झाले त्या वेळी हिटलरच्या जर्मनीत दिसेल त्या ज्यूला पकडून मारून टाकले जात होते आणि त्याच्या बातम्या अमेरिकेत पोचत होत्याच. त्यांचा या दोघांच्या मनावर काय परिणाम होत असेल? तोपर्यंत अॅटमबाँब ही फक्त एक वैज्ञानिकांच्या मनातली कल्पना होती, पण ती शक्यतेच्या जवळ येतांना दिसत होती. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात जर्मनीची सरशी होत होती. अशा वेळी जर्मन शास्त्रज्ञांनी हा बाँब तयार केला तर मग तो सगळ्या जगावर आपली हुकूमत गाजवेल अशी भीती वाटणे शक्य होते. पण जर्मनीला कसे थांबवणार? म्हणून अमेरिकेने पुढाकार घेऊन आधीच हा बाँब तयार केला तर जर्मनीच्या विरुद्ध पक्षाची बाजू मजबूत होणार होती. सुरुवातीला अमेरिका दुसऱ्या महायुद्धात नव्हतीही. पण तिने युद्धात उतरल्यानंतर मॅनहॅटन प्रोजेक्टला भरपूर अर्थसहाय्य केले गेले आणि ऑप्पनहायमर त्यावर दिवसरात्र जिद्दीने मेहनत घेत होता. जरी या प्रकल्पात इतर हजारो लोक होते, तरीही ऑप्पनहायमरलाच अॅटमबाँबचा जनक मानले जाते इतके मोठे योगदान त्याने केले होते.</p><p><br /></p><p>प्रत्यक्षात पहिला बाँब तयार झाला तोपर्यंत जर्मनीने महायुद्धात शरणागती पत्करली होती. त्याच्या आधीच्या काळात जर्मनीने बाँब तयार करण्याइतकी मजल मारलेलीही नव्हतीच. त्यामुळे ज्या उद्देशाने या कामाची सुरुवात आणि घाई केली होती तो मूळ उद्देश आता शिल्लक राहिला नव्हता. पण जपानने अजून लढाई सुरूच ठेवली होती. तिकडे जास्त सैन्य पाठवून ती लढाई जिंकण्यापेक्षा जपानवर हा नव्याने निर्माण झालेला बाँब टाकून त्याला लगेच शरण यायला भाग पाडावे असे ठरले. या निर्णयात ऑप्पनहायमर सामील होता. यात अपरिमित जीवहानी होणार होती आणि तीही सैन्याची नव्हे तर नागरिकांची होणार होती. पण महायुद्धाच्या काळात दोन्ही बाजूंनी नागरी वस्त्यांवर विमानहल्ले करून हे विनाशकारी काम चालवलेले होतेच. अॅटमबाँबने नेमकी किती हानी होणार आहे हे त्या वेळी माहीतही नव्हते आणि असा विध्वंसक बाँब तयार केला गेला आहे ही बातमीसुद्धा गुप्तच ठेवलेली होती. ६ ऑगस्ट १९४५ला अचानक हिरोशिमा या शहरावर पहिला अॅटमबाँब टाकला गेल्यानंतर जगाला त्याचे भयानक स्वरूप दिसले.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNE3JpxRP-VJ-xJVA-QsTxwZ32N8FSZOJNhme6snLdJJy5BAUi0fjpFc5Sxujj1XqDFkabu9lJTxg4iKMillbr187uk49Kw9naHjhcZ5zmUzeByKHBaQkhAcPFpTSDFenTB8Bd399dzkMnbCajzRfMfQio8K4VGaeBOnB6yHMr1de2D2Rn7kH01w/s976/fritz_haber_hutton_getty3305300.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="549" data-original-width="976" height="225" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNE3JpxRP-VJ-xJVA-QsTxwZ32N8FSZOJNhme6snLdJJy5BAUi0fjpFc5Sxujj1XqDFkabu9lJTxg4iKMillbr187uk49Kw9naHjhcZ5zmUzeByKHBaQkhAcPFpTSDFenTB8Bd399dzkMnbCajzRfMfQio8K4VGaeBOnB6yHMr1de2D2Rn7kH01w/w400-h225/fritz_haber_hutton_getty3305300.jpg" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>ऑप्पनहायमरच्याही आधीच्या पिढीमध्ये फ्रिझ हेबर नावाचा आणखी एक ज्यू शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवले तसेच लक्षावधी लोकांना ठार मारले असे सांगितले जाते. (Fritz Haber — The Genius Scientist Who Murdered Millions And Saved Billions.) अठराव्या शतकात होऊन गेलेल्या माल्थस या शास्त्रज्ञाने असे भाकित केले होते की ज्या वेगाने लोकसंख्या वाढते तितक्या वेगाने अन्नाचे उत्पादन वाढू शकत नाही. त्यामुळे जर लोक मारामाऱ्या व लढायांमुळे किंवा रोगराईंमुळे मेले नाहीत आणि त्यांची संख्या कमी झाली नाही तर ते दुष्काळ पडून त्यात उपाशी तडफडून मरतील. कायमच अन्नाचा तुटवडा राहणार आहे आणि तो लोकसंख्येचे नियंत्रण करणार आहे. त्या काळापर्यंत युरोपमधली बहुतेक सगळी सुपीक जमीन लागवडीखाली आणली गेली होती आणि तिथल्या थंड हवामानात वर्षात अनेक पिके घेऊन अन्नाचे उत्पादन वाढवणे शक्यच नव्हते म्हणूनही त्याने असा निष्कर्ष काढला असेल.</p><p><br /></p><p>यावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालले होते. फ्रिझ हेबर या शास्त्रज्ञाने हवेमधील नायट्रोजन वायूपासून अमोनिया हे संयुग तयार करण्याची कृति शोधून काढली आणि बॉश कंपनीच्या सहाय्याने अमोनिया आणि त्यापासून रासायनिक खते तयार करण्याचे कारखाने काढले. या खतांमुळे अन्नधान्यांचे उत्पादन अनेक पटींनी वाढले आणि वाढत्या लोकसंख्येला खाण्यासाठी अधिक अन्नाचे उत्पादन सुरू झाले. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली तरी त्यांची अन्नान्नदशा झाली नाही. याचे बरेचसे श्रेय हेबरकडे जाते, पण कुणीही त्याचा देवदूत म्हणून गौरव करत नाही. याचे कारण असे आहे की याच माणसाने रासायनिक युद्धाची सुरुवात करून दिली. त्यानेच तयार केलेल्या पद्धतीमधून पहिल्या महायुद्धाच्या काळात शत्रूसैनिकांवर विषारी वायूचा मारा करून झुरळे मारल्यासारखे हजारो सैनिकांचे जीव घेतले गेले. या राक्षसी कृत्यामुळे त्याची प्रचंड प्रमाणात निंदाही झाली.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi_qAeupyzkw6kMvc1O98KsNnCwggBuSfpUNxJUqoXUNwm0jM4Na__mLaIOtcK0lWSWL_Xa_wQ_DqWaWsuOF7EXuSOfONqA5KMw5AVRiDUrPfn37RTHszHTwgRDMuFN-UpOwg2mkFt7OdDp1WLK_L4DNt67jN4r0nKd4Hw6WRXsj1x8gsXR3Kchpg/s503/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%20%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="481" data-original-width="503" height="306" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi_qAeupyzkw6kMvc1O98KsNnCwggBuSfpUNxJUqoXUNwm0jM4Na__mLaIOtcK0lWSWL_Xa_wQ_DqWaWsuOF7EXuSOfONqA5KMw5AVRiDUrPfn37RTHszHTwgRDMuFN-UpOwg2mkFt7OdDp1WLK_L4DNt67jN4r0nKd4Hw6WRXsj1x8gsXR3Kchpg/s320/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%20%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2.jpg" width="320" /></a></div><br /><p><br /></p><p>त्याच्याही आधीच्या शतकात होऊन गेलेल्या आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनॅमाइट तयार करण्याची प्रक्रिया शोधून काढली आणि त्याचे अनेक कारखाने काढले. या रसायनाचा उपयोग मुख्यतः खाणी किंवा बांधकाम यात खडक फोडण्यासाठी होता आणि आजही केला जातो, पण नोबेलने पुढे जाऊन तोफांसाठी उपयोगात आणायची अनेक स्फोटके तयार केली आणि त्यांचाही व्यापार करून अपार श्रीमंती मिळवली. जगभरातल्या युद्धांमध्ये त्यांचा वापर केला गेला आणि त्यात असंख्य लोक मारले गेले. नोबेल व्यावसायिक यशाच्या शिखरावर असतांना एक घटना घडली. त्याच्या भावाचा मृत्यू झाला असतांना एका वर्तमानपत्रवाल्याचा गैरसमज झाला आणि त्याने आल्फ्रेड नोबेलच्याच मृत्यूची बातमी छापून दिली. ती देतांना मर्चंट ऑफ डेथ किंवा मौतका सौदागर मेला असे छापले. ती बातमी वाचून नोबेलला धक्का बसला आणि आपली या नावाने कीर्ती शिल्लक राहील या विचाराने त्याला अस्वस्थ केले. त्याने आपल्या नावाने एक ट्रस्ट स्थापन करून आपली सगळी संपत्ती तिला दिली आणि त्या रकमेच्या व्याजातून जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ, साहित्यिक तसेच शांततेसाठी काम करणारे कार्यकर्ते शोधून काढून त्यांना आपल्या नावाने पुरस्कार द्यावा अशी योजना करून ठेवली. आजही नोबेल प्राइझ हाच जगातला अत्युच्च सन्मान समजला जातो आणि नोबेलला आता कुणी राक्षस म्हणत नाही.</p><div><br /></div>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-52888104777092371442023-11-23T08:02:00.000-08:002024-01-15T03:18:41.459-08:00शाश्वत ऊर्जा<p> ऊन, वारा आणि नदीचा प्रवाह या निसर्गातील शक्तींचा उपयोग करून घेऊन आपले जीवन अधिकाधिक चांगले बनवण्याचे प्रयत्न मानव खूप पूर्वीपासून आजतागायत करत आला आहे. पूर्वी वाऱ्यामधील ऊर्जेवर शिडाची जहाजे चालत असत, हॉलंडमधले लोक पवनचक्क्यांचा उपयोग पाणी उपसण्यासाठी करत असत, लाकडाचे ओंडके आणि तराफे यांना पूर्वापारपासून नदीच्या पाण्याच्या सहाय्याने पुढे वहात नेले जात असे, मध्ययुगात काही ठिकाणी पाणचक्क्या बसवून त्यांच्या सहाय्याने यंत्रे चालवली जात होती. निसर्गामधील ऊर्जेच्या या साधनांचा उपयोग करून घेण्यासाठी ऊर्जेचे हे स्रोत (सोर्सेस) जिथे आणि जेंव्हा उपलब्ध असतील तेंव्हा त्या ठिकाणी जाऊन तिथेच आपले काम करणे शक्य असते. दुसरी गोष्ट म्हणजे या नैसर्गिक स्त्रोतांवर माणसाचे कणभरही नियंत्रण नसते. जेवढे प्रखर ऊन पडेल, जेवढ्या जोराचा वारा सुटेल आणि ज्या वेगाने पाणी वहात असेल त्यानुसार त्याला आपली कामे करून घ्यावी लागतात. </p><p>अग्नी चेतवणे आणि विझवणे याचे तंत्र मानवाने अवगत करून घेतल्यानंतर ऊर्जेचे हे साधन मात्र त्याला केंव्हाही, कोठेही आणि हव्या तेवढ्या प्रमाणात मिळवणे शक्य झाले. अन्न शिजवणे, खनिजापासून धातू तयार करणे आणि त्यांना तापवून आणि ठोकून हवा तसा आकार देणे अशा अनेक कामांसाठी गरजेप्रमाणे चुली, शेगड्या आणि भट्ट्या वगैरे बांधून आपण आपल्याला गरज असेल तेंव्हा आणि पाहिजे त्या जागी अग्नीचा उपयोग करून घेऊ शकतो. या ऊष्णतेचा उपयोग करून यंत्रांची चाके फिरवता येतात आणि ती यंत्रे चालवून अनेक वस्तूंचे उत्पादन केले जाते. पण ऊष्णता ही ऊर्जासुद्धा जिथे निर्माण केली जाते तिथेच तिचा वापर करावा लागतो.</p><p>एका जागी असलेल्या वीजनिर्मितीकेंद्रात (पॉवर स्टेशनमध्ये) मोठ्या प्रमाणावर तयार झालेली वीज तारांमधून कितीतरी दूरपर्यंत नेता येते आणि तितक्या दूरवर पसरलेल्या शेकडो गावांमधल्या हजारो घरातले दिवे, पंखे, यंत्रे वगैरेंना पुरवता येते. वीज या प्रकारच्या ऊर्जेचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, गतिज ऊर्जा (Kinetic Energy) यांच्यासारख्या ऊर्जेच्या इतर रूपांमध्ये तिचे परिवर्तन करणे सुलभ असते. त्यामुळे मानवाच्या जीवनात क्रांतीकारक बदल झाले. दिव्यांच्या उजेडात रात्री अभ्यास किंवा काम करणे शक्य झाले, कारखान्यांमधली अवजड यंत्रे विजेवर चालतात आणि आपल्याला लागणाऱ्या बहुतेक सगळ्या वस्तू तिथे तयार होतात, विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या इंजिनांमुळे प्रवास सुखकर झाला आहे. विजेच्या उपयोगामुळेच टेलिफोन, काँप्यूटर्स, इंटरनेट वगैरे अनंत उपकरणे चालतात, आपले रोजचे जीवन आता जवळजवळ पूर्णपणे विजेवर अवलंबून असते. एकाद्या देशाचा किंवा विभागाचा किती विकास झाला आहे याचे मोजमाप आता तिथे होत असलेल्या विजेच्या वापराशी निगडित झाले आहे.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjq3ieK5qyloJjCgxGObFUByyHp-CFTC5Mx_nSi0sOTTvjAmYok14mMVBDzOJX9LUubKaZQ6WaHr-G9-ZBryIKE_JuGJxmwt3puiqw96UnWJ9RmU2N_CefCaQI2K4-ZJhWOjlyowUeY1Io9x0LJl3wyj44gqPPvYrmZcxQE7vmPeFc5zfPK8seHSA/s922/146%20Power%20stations%20Marathi.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="590" data-original-width="922" height="410" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjq3ieK5qyloJjCgxGObFUByyHp-CFTC5Mx_nSi0sOTTvjAmYok14mMVBDzOJX9LUubKaZQ6WaHr-G9-ZBryIKE_JuGJxmwt3puiqw96UnWJ9RmU2N_CefCaQI2K4-ZJhWOjlyowUeY1Io9x0LJl3wyj44gqPPvYrmZcxQE7vmPeFc5zfPK8seHSA/w640-h410/146%20Power%20stations%20Marathi.jpg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p>जगातील विजेच्या उत्पादनातील साठ टक्क्याहून जास्त वीज आज कोळसा, तेल किंवा नैसर्गिक ज्वलनशील वायू ही इंधने जाळून तयार केली जाते. या वीजनिर्मितीकेंद्रांमध्ये इंधन जाळून निर्माण झालेल्या ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ तयार करतात आणि त्या वाफेने टर्बाइन नावाच्या यंत्राचे चाक फिरवले जाते. त्या चाकाला जोडलेल्या जनरेटरमध्ये वीज तयार होते. पण इंधनाच्या ज्वलनामधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंमुळे वातावरणाचे प्रदूषण होते आणि आता हे प्रदूषण इतके वाढले आहे की पृथ्वीवरचे तापमान वाढून सगळ्या जीवसृष्टीवरच भयानक संकटे येण्याची भीती आहे. शिवाय या भूमिगत इंधनांचा मर्यादित साठा कधीतरी संपणारही आहे. यावर जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे आणि औष्णिक वीजकेंद्रांवर कडक बंधने घालण्यात येत आहेत. त्यांची संख्या कमी कमी करत हळूहळू ती शून्यावर आणायचा विचार आहे. पण आजचे जीवन सुरळीतपणे चालवण्यासाठी विजेचा वापरही अत्यावश्यक आहे. म्हणून वीजनिर्मितीचे पर्यायी मार्ग शोधले जात आहेत. त्यात पुनर्निर्मितीक्षम स्रोतांपासून (रिन्यूएबल एनर्जी सोर्सेसपासून) तयार केल्या जाणाऱ्या शाश्वत ऊर्जेला विशेष महत्वाचे स्थान आहे. या ऊर्जेसाठी लागणारे घटक निसर्गाकडूनच मिळणारे असल्यामुळे ते अनंत काळपर्यंत मिळत रहावेत अशी अपेक्षा आहे.</p><p>जलऊर्जा (हैड्रोइलेक्ट्रिक पॉवर) हे शाश्वत ऊर्जेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. यात पाण्याच्या प्रवाहामुळे फिरणारे चाक वीज तयार करते. आभाळातून पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणांमध्ये येत राहते आणि वीज उत्पादनासाठी धरणामधून खाली सोडलेल्या पाण्याची त्यातून भरपाई होत असते. विजेचे उत्पादन करण्याच्या क्रियेत ते पाणी नष्ट होत नाही. तेच पाणी पुढे कृषी आणि इतर उपयुक्त कामांसाठी वापरता येते. या ऊर्जानिर्मितीत जमीन, पाणी किंवा वातावरणाचे प्रदूषण होत नाही. या प्रकारच्या विजेचे उत्पादन गेली शंभरावर वर्षे होत आले असल्यामुळे त्यामधील तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री चांगली परिचयाची आहे. पण आतापर्यंत बहुतेक सगळ्या नद्यांवर शक्य असतील तितकी धरणे बांधून झाली आहेत. आणखी नवीन धरणे बांधण्यासाठी जमीन संपादन करणे, त्यामधून विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणे यासाठी होणारा प्रचंड खर्च पाहता या क्षेत्रात अधिक वाढ होण्याला मर्यादा आहेत. सध्या जगातले सुमारे सोळा टक्के वीज उत्पादन पाण्यापासून होते, त्यात किती वाढ करता येईल हे पहावे लागेल.</p><p>अणूऊर्जा या प्रकारातून सध्या सुमारे दहा टक्के वीजनिर्मिति केली जाते. यात युरेनियम धातूच्या अणूच्या विखंडनातून बाहेर पडलेल्या ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ तयार करतात आणि त्या वाफेवर फिरणारे टर्बोजनरेटर वीज तयार करते. अणूभट्ट्यांमध्ये काही तीव्र किरणोत्सारी द्रव्ये तयार होतात त्यांना सध्या सुरक्षितपणे वेगळे ठेवले जाते, पण त्यांना नष्ट करता येत नाही आणि अपघाताने ती माणसांच्या संपर्कात आली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या भीतीमुळे अणूऊर्जेचा प्रसार बराच काळ मंदावला होता. पण या अणुविद्युतकेंद्रांमधून औष्णिक केंद्रांसारखे विषारी वायू वातावरणात सोडले जात नाहीत त्यामुळे पर्यावरणाचा विचार करता अणुशक्तीवर पुनर्विचार सुरू झाला आहे आणि कदाचित भविष्यकाळात अशा प्रकारची अधिक केंद्रे बांधली जातील अशी शक्यता आहे. जगामधील युरेनियमचा साठाही मर्यादितच असल्यामुळे तोही कधीतरी संपेलच. त्यामुळे या विजेलाही शाश्वत म्हणता येणार नाही. पण पूर्णपणे शाश्वत ऊर्जेकडे वळेपर्यंत मधली काही दशके अणूऊर्जा आपली विजेची गरज भागवू शकेल आणि तिच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होणार नाही. </p><p>सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या शाश्वत ऊर्जांच्या दोन प्रकारांवरवर सध्या खूप भर दिला जायला लागला आहे. सूर्याच्या उन्हामधून पृथ्वीवर भरपूर ऊर्जा येत असते. पण त्या ऊर्जेचे विजेत रूपांतर करणे इतके सोपे नसते. आता ते तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे. सोलर पॅनेल नावाच्या तबकड्यांवर बसवलेले सोलर सेल्स हे रूपांतर करतात. आधी त्यांची किंमत फार जास्त असल्यामुळे ही वीज परवडत नव्हती. आता त्याच्या किंमती आवाक्यात येऊ लागल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा उपयोग करण्याच्या योजना आखल्या जात आहेत. पण ही वीज फक्त सूर्यप्रकाशातच तयार होऊ शकते त्यामुळे ती दिवसाच उपलब्ध असते, पण उजेडासाठी तिची रात्री गरज असते. त्यामुळे दिवसा तयार झालेली वीज बॅटऱ्यांमध्ये साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी लागते. तेसुद्धा खूप खर्चिक असते. हे केंद्र दिवसभरातून फक्त काही तासच विजेचे उत्पादन करत असल्यामुळे या केंद्राची कार्यक्षमता कमी असते.</p><p>वाहत्या वाऱ्याने फिरणाऱ्या चक्रांमधून पवनऊर्जा तयार केली जाते. पण फक्त काही ठिकाणीच जोरात वाहणारे वारे असतात आणि तेही वर्षातल्या काही काळातच वाहतात. तेवढा वेळच ही वीज निर्मिती होऊ शकते. अशा जागा शोधून काढून तिथे पवनचक्क्या उभ्या करण्याचे काम चालू आहे, पण याला निसर्गाच्याच मर्यादा आहेत. या पवनऊर्जेतसुद्धा मिळेल तेंव्हा वीज तयार करून तिचा वापर इतर वेळी करण्यासाठी व्यवस्था करावी लागतेच. या केंद्रांची कार्यक्षमता कमीच असते.</p><p>जैवऊर्जा (बायोएनर्जी) नावाचा शाश्वत ऊर्जेचा आणखी एक प्रकार आहे. वनस्पती आणि प्राणिमात्रांची शरीरे ज्या असंख्य सूक्ष्म पेशींपासून बनतात त्यांचे रेणू (मॉलेक्यूल्स) मुख्यतः कार्बन, हैड्रोजन आणि ऑक्सीजन या मूलद्रव्यांनी भरलेले असतात. या सगळ्याला बायोमास असे म्हंटले जाते. झाडांची मुळे, खोडे, फांद्या, पाने. फुले, फळे वगैरे भाग आणि त्यापासून तयार केले जात असलेले कागद व कापड यासारखे कृत्रिम पदार्थ, तसेच प्राणिमात्रांचे मृतदेह, मलमूत्र वगैरे सर्वांचा समावेश या बायोमासमध्ये होतो. हे जैव पदार्थ कुजतात तेंव्हा काही सूक्ष्म जंतू या पदार्थांच्या अवाढव्य रेणूंचे विघटन करून त्यापासून लहान लहान आणि साधे रेणू वेगळे करतात. त्यातून कार्बन व हैड्रोजन यांची मीथेनसारखी वायुरूप संयुगे (काँपौंड्स) निघतात. त्यांना बायोगॅस म्हणतात. या ज्वलनशील वायूला जाळून त्यामधून ऊर्जेची निर्मिती करता येते. हीच जैवऊर्जा झाली. हा बायोगॅस स्वयंपाकघरातला एलपीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) आणि वाहनांमध्ये भरला जाणारा सीएनजी (काँप्रेस्स्ड नॅचरल गॅस) यांच्यासारखाच असतो. गोबर गॅसच्या स्वरूपात ही ऊर्जा खेड्यापाड्यांमधून उपयोगात आणण्याचे प्रयत्न बरेच वर्षांपासून चाललेले आहेत. अधिक मोठ्या प्रमाणात या गॅसचे उत्पादन करून त्यापासून विजेची निर्मिती केली तर त्यांमुळे भारत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकेल. पण जितका बायोमास आपण जाळू तितकाच नवा बायोमास निर्माण करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन झाडे लावणे आणि त्यांना वाढवणे यांच्यावर लक्ष द्यावे लागेल. ते जमले तरच ही शाश्वत ऊर्जा होईल. बायोमासच्या ज्वलनामुळेसुद्धा हवेत कार्बन डायॉक्साइड वायू टाकला जाईलच, पण नवीन वृक्षांच्या वाढीत तो शोषला जाईल आणि वातावरणातला समतोल कायम राहील. </p><p>शहरामध्ये रोज गोळा होणारा टनावधी कचरा ही नगरवासियांपुढे असलेली एक मोठी समस्या आहे. त्याचे काय करायचे हेच उमजेनासे झाले नसल्यामुळे तो नष्ट करणे हेच महत्वाचे आहे. अशा वाया जाणाऱ्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केली तर त्याचेपासून सुटका होईलच, शिवाय त्यापासून ऊर्जा निर्माण करून तिचा वापर करता येईल. यामुळे शहरांसाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. बायोगॅसच्या निर्मितीपर्यंत होणारा खर्च नगरविकासाखाली केला (म्हणजे गॅस फुकट मिळवला) आणि त्यापासून पुढे वीजनिर्मिती करण्याचा खर्च वीजग्राहकाकडून वसूल केला तर ती वीज माफक दरात प्राप्त करता येईल. या कारणाने शहरांमध्ये अशा प्रकारे ऊर्जेची निर्मिती करणे गरजेचे आहे. शहरातला नागरिक टाकाऊ जैव वस्तूंचे काहीही करू शकत नाही किंवा त्या साठवूनही ठेवू शकत नाही, त्यामुळे त्यांचा योग्य प्रकारे निचरा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर येते.</p><p>पण खेड्यांमधली परिस्थिती वेगळी आहे. भाजीची साले, फोलपटे, देठ, पालापाचोळा, उरलेले अन्न, गवत वगैरे गोष्टी तिथे जनावरांना खाऊ घातल्या जातात, त्यांचे शेण आणि उरलेला चुरा, भूसा वगैरेंचासुध्दा खत म्हणून किंवा ज्वलनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे जैव कचऱ्यापासून मुक्ती मिळवणे हा तिथे इतका मोठा प्रश्न नाही. वीजउत्पादन करण्यासाठी भरपूर बायोमासाचा सतत पुरवठा करावा लागेल आणि तो उत्पन्न करण्यासाठी एलेफंट ग्रास, जट्रोपा यासारखी लवकर वाढणारी खास झाडे मुद्दाम लावून वाढवली, अन्नधान्ये, तेलबिया, ऊस, कापूस, पालेभाज्या, फळफळावळ यासारख्या उपयुक्त पिकांऐवजी शेतात ही झाडे लावली आणि त्यांच्यापासून तेवढेच किंवा जास्त उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा बाळगली तर त्याला लागणारा खर्चसुध्दा विजेच्या उत्पादनखर्चात धरावा लागेल आणि ते केले तर ही वीज केवढ्याला पडेल हे पहावे लागेल.</p><p>वीज निर्माण न करताही जैवऊर्जेचा उपयोग पूर्वीपासून रोजच्या जीवनात केला जात आहेच ते ही थोडे पाहू. सूर्यप्रकाशात झाडांची पाने हवेमधील कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साइड) वायू ग्रहण करतात आणि त्यामधील कार्बन अणूचा पाणी व इतर क्षारांसोबत संयोग घडवून त्यातून निरनिराळ्या सेंद्रिय (ऑर्गॅनिक) पदार्थांचे अणू तयार करतात. या प्रक्रियेत कर्बद्विप्राणील वायूमधील प्राणवायूचे (ऑक्सीजनचे) हवेत उत्सर्जन केले जाते आणि सूर्यप्रकाशामधील ऊर्जा सेंद्रिय पदार्थांमध्ये सुप्त रासायनिक ऊर्जेच्या (केमिकल पोटेन्शियल एनर्जी) स्वरूपात साठवून ठेवली जाते. हे सेंद्रिय पदार्थ झाडांच्या निरनिराळ्या भागांमध्ये पाठवून देऊन तिकडे ते साठवले जातात. त्यांच्यावरच जगातील इतर सर्व पशुपक्षी, कृमीकीटक, मासे वगैरे सजीवांचे प्रत्यक्ष किंवा परोक्ष रीतीने पोषण होते. या सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन होत असतांना त्यांच्यामध्ये सुप्त असलेली ऊर्जा पुन्हा प्रकट होते. ही जैव ऊर्जा दोन प्रकारांने उपयोगात आणली जाते. </p><p>वर दिल्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थ कुजवून त्यातून जैव वायू (बायोगॅस) बाहेर काढून तो जाळणे हा अलीकडील काळातला उपाय आहे. लाकडाच्या किंवा सुकलेल्या पालापाचोळ्याच्या स्वरूपातील त्या पदार्थांनाच जाळून ऊष्णता निर्माण करणे हे माणसाला अग्नीचा शोध लागल्यापासून आजतागायत चालत राहिले आहे. भूगर्भामधील दगडी कोळसा आणि खनिज तेल हेसुध्दा लक्षावधी किंवा कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जगत असलेल्या वनस्पतींपासूनच निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्वलनातून मिळणारी ऊर्जासुद्धा मुळात सौर ऊर्जेपासून तयार झालेली आहे असेही म्हणता येईल. जैव ऊर्जेचा माणसाच्या कामासाठी उपयोग करण्यात तसे काहीच नवीन नसले तरी हा उपयोग अधिकाधिक कार्यक्षम रीतीने करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत.</p><p>खेडी आणि लहान नगरे या भागात मुख्यतः स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या चुली, शेगड्या वगैरेंमध्ये सुधारणा करून त्या जास्त कार्यक्षम कशा करता येतात यासाठी प्रयत्न होत आहेत. काही नव्या सुधारणांमुळे इंधनाची बचत होईल, तसेच धुराचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करता येईल असा तिहेरी लाभ होतो. खेड्यांमधील काही महिला जळणासाठी लाकूडफाटा गोळा करणे, शेणाच्या गोवऱ्या थापणे, त्या वाळवणे आणि ते जाळून त्यावर स्वयंपाक करणे यावरच दररोज निदान तीन चार तास घालवतात. आधुनिक बायोगॅस शेगडीवर त्यांचा सगळा स्वयंपाक एका तासात तयार होऊ शकतो. अर्थातच उरलेल्या वेळात त्या कुक्कुटपालन, दूधदुभते यासारखे कोणतेही दुसरे उत्पादक काम करू शकतात. शिवाय स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत होते. परंपरागत पध्दतीच्या चुलीशेगड्यांमध्ये लाकूडफाटा, पालापाचोळा वगैरे जाळल्याने त्यामधील फक्त दहावीस टक्के ऊर्जेचा उपयोग होतो आणि उरलेली बरीचशी ऊर्जा वाया जाते, पण तिच्या लहान लहान चपट्या गोळ्या (पेलेट्स) किंवा कांड्या बनवून त्या खास प्रकारच्या भट्ट्यांमध्ये जाळल्या तर त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. जैववस्तुमानाचा भुगा करून त्यांना यंत्रात घालून चेपून त्याच्या गोळ्या किंवा कांड्या बनवल्यास त्यांची साठवणूक आणि वाहतूक करणे, तसेच त्यांना शेगडी किंवा भट्टीमध्ये भरणे सोपे जाते आणि ते काम स्वयंचलित यंत्रांद्वारे करता येते.</p><p>रसायने, रंग, औषधे वगैरे तयार करणाऱ्या अनेक प्रकारच्या कारखान्यांमध्ये चालणाऱ्या प्रक्रियांसाठी लागणारी ऊष्णता बॉयलर्समध्ये खनिज तेल जाळून मिळवली जाते. त्यामधील कमी तपमानावरील ऊष्णता निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करता येईल. उन्हात ठेवलेल्या विशिष्ट प्रकारच्या नळ्यांमध्ये पाणी तापवून ते तप्त पाणी पुरेशा आकारांच्या पात्रांमध्ये (ड्रम्समध्ये) साठवायचे आणि ऊष्णता विनिमयस्कांद्वारे (हीट एक्स्चेंजरमार्गे) त्यामधील ऊष्णता संयंत्राला पुरवायची असे करता येते. आजकाल काही वसाहतींमध्ये गच्चीवर असे संयंत्र बसवून रहिवाशांना आंघोळीसाठी गरम पाणी नळातून पुरवले जाते. </p><p>आता काही खाजगी कंपन्या आणि सेवाभावी संस्था अपारंपरिक ऊर्जेकडे गंभीरपणे लक्ष देऊ लागल्या आहेत. यातून नफा मिळवणे हा खाजगी कंपन्यांचा उद्देश असतो आणि निदान 'ना नफा ना तोटा' या तत्वावर सेवाभावी संस्था चालवणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न व्यावहारिक (प्रॅक्टिकल) असण्याची अधिक शक्यता असते. पण अपारंपरिक ऊर्जेसंबंधीच्या प्रत्येक बाबतीत आज तरी 'अनुदान', 'सहाय्य' किंवा 'कायद्यानुसार करावी लागणारी गोष्ट' अशा प्रकारचे उल्लेख येतात. या अपारंपरिक ऊर्जा असल्या कुबड्यांवर अधिक काळ किंवा मोठ्या प्रमाणात उभ्या राहू शकणार नाहीत. सौर ऊर्जेपासून वीज तयार करण्यासाठी लागणारी सोलर पॅनेल्स किंवा पवनचक्कीमधील यंत्रसामुग्री यांचे उत्पादन करण्यासाठी आधी खूप ऊर्जा खर्च करावी लागते. ती ऊर्जा अन्य स्वस्त मार्गाने तयार करूनसुध्दा आपण स्वस्त दरात सौर किंवा वायुऊर्जा निर्माण करू शकत नसू तर त्याला फारसा अर्थ उरत नाही. फक्त सौर किंवा वातऊर्जेचाच वापर करून जर आपण त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार करू शकलो आणि तिचा उपयोग करून मिळणारी वीज वाजवी भावात मिळाली तरच हा पर्याय खऱ्या अर्थाने स्वावलंबी म्हणता येईल आणि शाश्वत ठरेल. औष्णिक ऊर्जेला ठाम नकार दिला तर भविष्यकाळात हे होऊ शकेल.</p><p>जैवऊर्जा (बायोएनर्जी) या बाबतीत बरीच आशादायी वाटते. स्वयंपाकघरात होत असलेल्या ज्वलनाच्या पारंपरिक पध्दतींमध्ये सुधारणा करून त्यातून ऊर्जेची बचत करणे आणि प्रदूषण कमी करणे हे तर उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आवश्यक आहे आणि ते शक्य होत आहे असे दिसते. युकॅलिप्टस किंवा सुबाबूळ ही जलद वाढणारी झाडे मोठ्या प्रमाणावर लावून आणि योजनाबध्द पध्दतीने त्यांची कापणी करून त्यापासून संततऊर्जा निर्माण करण्याची स्वप्ने वीस काही दशकांपूर्वी पाहिली गेली होती. पण त्याबाबतीत निराशाच पदरी आली हा ताजा इतिहास आहे. त्यामुळे सुपीक जमीनीवर वृक्षांची लागवड करून त्यामधून ऊर्जा मिळवत राहण्याची कल्पना आजच्या घटकेला तितकीशी व्यवहार्य वाटत नाही. पण खनिज तेलाची उपलब्धता कमी होत गेली आणि त्याच्या किंमती अशाच वाढत गेल्या तर मात्र लवकरच जैवऊर्जा तुलनेने वाजवी भावात मिळू लागेल. टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबर त्यातून ऊर्जा निर्माण करणे तर नक्कीच लाभदायक आहे. त्याच्या मार्गात येणारे गैरतांत्रिक (नॉनटेक्निकल) अडथळे दूर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समाजाच्या प्रबोधनाची गरज आहे. </p><p>या सगळ्याच्या सोबतीला किंवा अधिक अग्रक्रम देऊन रोजच्या जीवनात ऊर्जेचा वापरच कमी करून तिची शक्य तितकी बचत करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व अनावश्यक वापरावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. </p><p>----</p><p>मी हा लेख विज्ञानधारा या मासिकासाठी लिहिला होता. तो या मासिकाच्या दिवाळी विशेषांकात (ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३) प्रसिद्ध झाला आहे.</p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-86775597928575447382023-06-28T17:47:00.004-07:002023-06-29T08:04:50.163-07:00ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग <p> माणूस निवृत्त झाल्यानंतर अध्यात्माच्या मार्गाला लागतो किंवा त्याने त्या मार्गाला लागावे अशी अपेक्षा असते. माझे वडील ५५ वर्षाचे असतांनाच त्या काळातल्या नियमांनुसार सेवानिवृत्त झाले होते आणि खरोखरच पूर्णवेळ भजन, पूजन,कीर्तन, प्रवचन वगैरेंमध्ये मग्न असत. पण मी साठ वर्षांनंतर निवृत्त झालो तरी तेंव्हा मला तशी बुद्धी झाली नाही. ७५ वर्षे उलटून गेल्यानंतर अध्यात्म म्हणजे नेमके काय आहे याचा शोध घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला आणि मला समजले तेवढे मी एका लेखात लिहिले होते. हे काम करत असतांनाच मला तत्वज्ञान या शब्दाचा वेगळा अर्थ समजला, त्यावर मी दुसरा लेख लिहून प्रसिद्ध केला होता. या मालिकेतले हे तिसरे पुष्प ज्ञानयोग, कर्मयोग वगैरेंवर देत आहे. मी हा लेख फेसबुकवर पाच भागात दिला होता. त्याच क्रमाने तो इथे देत आहे. </p><p><br /></p><p><b>ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग भाग -१</b></p><p>भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करायच्या निमित्याने सगळ्या जगाला ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग हे तीन मार्ग धरायला सांगितले आहेत. या तीन्हीपैकी आपल्या इच्छेप्रमाणे कुठलाही मार्ग धरला तरी तो अखेर त्याच शिखराकडे घेऊन जातो वगैरे गोष्टी मी अनेक वेळा ऐकल्या किंवा वाचल्या आहेत आणि इतरांना सांगितल्याही असतील. पण मला स्वतःला त्यांचा अर्थ कधीच नीट समजला नाही असे आता वाटायला लागले आहे.</p><p>बऱ्याच लोकांना असे वाटते की पहिली वीसपंचवीस वर्षे शाळाकॉलेजात शिक्षण घेतांना ज्ञानमार्ग धरावा, चाळीसपन्नास वर्षे काम करतांना कर्मयोग पाळावा आणि नंतर उरलेले आयुष्य हरीहरी करत भक्तियोगात घालवावे असे सांगण्याचा उद्देश असेल. पण ते तसे नाही.</p><p><br /></p><p><b>भाग -२ ज्ञानयोग</b></p><p>आपण शाळाकॉलेजात अनेक विषयांचा अभ्यास करतो, घरातले मोठे लोक आणि इतर लोकही सतत काही माहिती देत असतात, उपदेश करत असतात, पुस्तके वाचून आणि टीव्ही पाहून माहिती आणि विचार मिळत असतात, अलीकडे तर इंटरनेट आणि वॉट्सॅपमधून आपल्यावर माहितीचा भडिमार होत आहे. या सगळ्यामधले जे आपल्याला चांगले समजले आणि लक्षात राहिले त्याला आपण ज्ञान (नॉलेज) म्हणतो. या ज्ञानामधून आपल्याला शहाणपणा, हुषारी मिळेल, त्यातून काही प्रमाणात यश, कीर्ती आणि संपत्तीसुद्धा प्राप्त होईल, पण परमेश्वर कसा भेटणार? मोक्ष कसा मिळणार? असा प्रश्न मला पडला होता कारण गीतेमधल्या तीन्ही मार्गांचे हे अंतिम लक्ष्य असावे असे मला वाटत होते.</p><p>अलीकडेच एका पंडिताने मला असे सांगितले की मी जन्मभर विज्ञानतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करून या विषयांमधले जे थोडेफार ज्ञान मिळवले असेल ते मुळी 'ज्ञान' नाहीच. हे विश्व म्हणजे मोहमाया आहे आणि त्याला खरे समजणे हेच अज्ञान आहे. आपल्या आत्म्यावर या अज्ञानाची अनेक पुटे चढलेली असतात. त्यांना बाजूला सारून जो आत्म्याची ओळख करून घेतो तो खरा 'ज्ञानी' आणि अंतरात्मा म्हणजेच परमात्मा हे अद्वैत समजून घेणे म्हणजे गीतेमधले 'ज्ञान'. हे ज्ञान मिळवण्यासाठी आधी मीपणा पूर्णपणे सोडून द्यायला हवा. मला, माझे असे काहीही मनातसुद्धा येता कामा नये. हे होण्यासाठी पूर्वसंचित असायला हवे आणि ज्ञानी सद्गुरु भेटला पाहिजे असेही म्हणतात. यातले काहीच आपल्याला जमण्यासारखे नाही. ज्ञानमार्ग हा आपला मार्ग असू शकत नाही. त्या मार्गावर एक पाऊलसुद्धा टाकणे मला अशक्य वाटले.</p><p><br /></p><p><b>भाग -३ कर्मयोग</b></p><p>कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्माते संगोऽस्त्वकर्मणि ॥ </p><p>हे गीतेच्या कर्मयोगाचे सूत्र आहे. "(हे माणसा), तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही. कर्माचा व फलाचा उद्देशही तुझ्या मनात असता कामा नये. इतके असूनही कर्म न करण्याची आसक्तीही तुला नको". असे या एका श्लोकात ग्रथित केलेले आहे. इथे कर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा घेतला आहे असे वाटेल. कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या हितासाठी निरनिराळी कर्तव्ये ठरवलेली आहेत आणि सर्वांनी ती पाळावीत अशी अपेक्षा असते. कर्तव्य करतांना स्वतःच्या व्यक्तिगत नफातोटा पाहिला तर त्यामुळे इतरांचे नुकसान होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ बापाने आपले कर्तव्य पाळले नाही तर मुलांचे, शिक्षकाने कर्तव्य टाळले तर विद्यार्थ्यांचे आणि नागरिक बेपर्वा झाले तर देशाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कर्तव्यांच्या बाबतीत फळाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करायला हवेच. मग त्यात मोठा योग कसला आला आणि त्यातून मोक्ष कसा मिळणार किंवा ब्रह्म कसे भेटणार? असे वाटेल.</p><p>पण कर्तव्य हा कर्माचा एक लहानसा भाग आहे. त्याशिवायही माणूस सतत काही ना काही कर्म करतच असतो. हातापायांनी केलेले कामच नव्हे तर तोंडाने खाणेपिणे किंवा बोलणे, इतकेच काय पण मनात आलेले विचार, आखलेल्या योजना हेसुद्धा कर्मात येते. बहुतेक वेळा त्याला या कर्मांपासून काहीतरी लाभ मिळत असतो, पण कधीकधी तो मिळतच नाही. श्वास घेण्यासारखे कर्म नकळत होत असले तरी समजून उमजून केलेल्या कर्मांवर नियंत्रण ठेवावे, ते करतांना (सतत आणि फक्त) स्वार्थाचा विचार करू नये किंवा "मी हे करून काय फायदा झाला?" असा विचारही मनात आणू नये असा कर्मयोगाचा अर्थ असावा असे मला वाटते. निरपेक्ष वृत्तीने काम करतांना हळूहळू आसक्ती कमी होते. मनासारखे न झाल्यामुळे होणारी निराशा, दुःख, राग वगैरेंचा त्रास होत नाही, मन शांत राहते, चित्तशुद्धी होते आणि त्यामुळे ज्ञानमार्ग सुकर होतो. मानवी स्वभावानुसार त्याला काहीतरी आशा आकांक्षा असतातच, मोटिव्हेशनशिवाय काम करणे तसे सोपे नाहीच, पण तसा प्रयत्न करावा.</p><p><br /></p><p><b>भाग ४ भक्तियोग </b></p><p>ज्ञानयोगामध्ये अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करून स्वतःचा शोध घेणे असते, तर कर्मयोगामध्ये निरपेक्ष भावनेने निरासक्त वृत्ती बाळगून मनावर ताबा ठेवायचा असतो हे आधीच्या भागांमध्ये पाहिले आहे. या दोन्हींमध्ये कुठल्या देवाचा थेट संबंध यायची गरज नसते. पण भक्तीमार्गासाठी मात्र एकाद्या तरी देवतेवर अनन्य श्रद्धा असणे आवश्यक आहे. बहुतेक हिंदू लोकांच्या घरी दोनचार देवांच्या लहानशा मूर्ती, प्रतिमा, संतांच्या तसबिरी वगैरे असतात. ते त्यांना गंधफूलअक्षता हळदकुंकू वगैरे वाहून पूजा करतात, त्यांना निरांजनाने आणि उदबत्तीने ओवाळतात, नैवेद्य दाखवतात, अशा प्रकारचे काही उपचार करतात. अधूनमधून एकाद्या देवळात जातात, कधीकधी पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर यासारख्या तीर्थक्षेत्रांना जाऊन पाया पडून येतात. ही सगळी भक्तीमार्गावरली सुरुवातीची पाउले आहेत. संसाराचा गाडा सांभाळता सांभाळता जमेल तेवढा भक्ती भाव दाखवलेला असतो.</p><p>संत ज्ञानदेव, रामदास वगैरेंनी संसार केलाच नाही, तर संत नामदेव, तुकाराम यांच्यासारख्या भक्तांनी निरासक्त भावनेने संसार केला, पण ते त्यात रमले नाहीत. त्यांचे चित्त सतत विठ्ठलाला वाहिलेले होते. संत एकनाथ महाराजांनी एका अभंगात सांगितले आहे, </p><p>आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||</p><p>नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्षुमीचा जाणतसे || २ ||</p><p>सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ ||</p><p>जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ ||</p><p>एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ ||</p><p><br /></p><p>तर संत नामदेव म्हणतात,</p><p>देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥</p><p>चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥</p><p>वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥</p><p>नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥४॥</p><p><br /></p><p>संत तुकारामांनी देवालाच असे दान मागितले आहे,</p><p>हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥</p><p>गुण गाईन आवडी ।हेचि माझी सर्व जोडी ॥२॥</p><p>न लगे मुक्ति आणि संपदा ।संतसंग देई सदा ॥३॥</p><p>तुका ह्मणे गर्भवासी ।सुखें घालावें आह्मांसी ॥४॥</p><p>त्यांना तर या जन्मात धनसंपत्ती नको आहेच, पण मोक्षमुक्तीसुद्धा नको आहे.</p><p>ही संतमंडळी समर्पण या भक्तीमार्गाच्या शिखरावर जाऊन पोचली होती.</p><p><br /></p><p><b>भाग -५ समारोप</b></p><p>या तीन योगांशिवाय राजयोग नावाचा आणखी एक प्रकार आहे. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा पायऱ्यांमधून साधना केली जाते. भारतीय आणि हिंदू तत्वज्ञानामधील चार्वाक सोडून इतर सहा दर्शनांमध्ये मोक्षप्राप्ती हेच मानवाचे अंतिम ध्येय ठरवले आहे, किंबहुना त्यासाठीच मनुष्यजन्म मिळतो असे सांगितले आहे आणि त्यासाठी ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग वगैरे मार्ग सांगितले आहेत. या मार्गांच्या उपयोगाविषयी सगळ्या विद्वान आचार्यांमध्ये एकमत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृति असल्यामुळे सरसरकट सगळ्या लोकांना सगळे मार्ग शक्य, योग्य किंवा पुरेसे आहेत असे त्यांना वाटत नाही. मग सामान्य माणसाची काय कथा? जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्ञानमार्गाला प्राधान्य दिले आहे तर नंतर आलेल्या मध्वाचार्य, रामानुजाचार्य आदींनी भक्तीमार्ग आवश्यक आहे असे सांगितले. सर्व संतांनी भक्तीमार्गच सांगितला आणि त्याचा प्रचंड प्रसार झाला. </p><p>ज्ञानयोग हा ज्ञानाचा मार्ग आहे. सत् आणि असत् यांचा विवेक आणि शास्त्रविचार ही याची प्रमुख अंगे आहेत. अध्यात्मामधील 'ज्ञान' या शब्दाला तत्त्वज्ञानीय अर्थ अभिप्रेत आहे. त्याची सुरुवात बुद्धीवादापासून होते आणि शेवट साक्षात्कारात होतो. ज्ञानयोगात तीन प्रगतीपर साधना असतात: श्रवण (ऐकणे), मनन (विचार/चिंतन करणे) आणि निध्यासन (सदैव सखोल ध्यान करणे). उपनिषदांतील चार महावाक्ये या चिंतनाचा विषय आहेत: ‘प्रज्ञानं ब्रह्म,’ ‘तत्त्वमसि,’ ‘अयमात्मा ब्रह्म’ आणि ‘अहम् ब्रह्मास्मि.’ ‘विवेकबुद्धीने सत् आणि असत् यांच्यामधील फरक जाणून घेणे आणि शेवटी स्वत:चे आणि परब्रह्माचे रूप एकच आहे, याचे ज्ञान होणे' हेच ज्ञानयोगाचे ध्येय आहे. सर्वसामान्य कुवतीच्या संसारी माणसाला हे शक्य नाहीच. त्यासाठी आधी निरीच्छ होऊन सर्व संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारणे अवश्य आहे असे मला वाटते. </p><p>त्या मानाने कर्मयोग हा कार्य करण्याचा मार्ग थोडा तरी समजण्यासारखा आहे. आपण काय करू नये यापासून त्याची सुरुवात होते. त्यानंतर आपण स्वार्थी इच्छांपासून प्रेरित झालेल्या कार्याचा त्याग करावा. त्यानंतर जागृत मनोवृत्तीने आपल्या जीवनातले कर्तव्य करण्याची इच्छा होते. त्यानंतर कदाचित ज्ञानमार्गाकडे जाता येईल.</p><p>भक्तियोग हा परमेश्वराच्या भक्तीचा आणि परमेश्वरावर प्रेम करण्याचा मार्ग आहे. देवाबद्दल कथा श्रवण करणे, भक्तिगीतांचे गायन करणे, तीर्थयात्रा करणे, मंत्रजप करणे आणि देवळांत आणि स्वगृही देवपूजा करणे या कृती या मार्गाची साधने आहेत. सरतेशेवटी परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणे आहे. कुठलीही पूजा विधि केल्यानंतर अखेरीस "तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु।" असे म्हणून त्या सत्कर्माचे फळसुद्धा परमेश्वराला देऊन टाकले जाते. हा निष्काम कर्मयोगाचा प्रकार आहे. भगवद्गीतेमध्ये सत्व,रज,तम वगैरे गुण आणि प्रवृत्ती, वर्ण, आश्रम वगैरे सांगून त्यानुसार आपापला धर्म ओळखून तसे वागावे वगैरे सांगून झाल्यानंतर शेवटी अठराव्या अध्यायात "सर्वधर्मान् परित्यज्य मामेकम् शरणम् भज। अहं त्वाम् सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः॥" असे सांगून भगवंताने सांगता केली आहे. परमेश्वराला शरण गेल्यानंतर तो माणसाला त्याला सर्व पापांमधून मुक्त करतो असे आश्वासन दिले आहे. गंमत म्हणजे बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि इस्लाम या सगळ्या धर्मांमध्ये अशाच प्रकारची वचने आहेत.</p><p>हा लेख लिहिण्यासाठी मी गूगलवर थोडीशी शोधाशोध करून काही माहिती मिळवून ती इथे दिली आहे. ती मला पूर्णपणे समजली किंवा पटली आहे असे माझे म्हणणे नाही.</p><p>(समाप्त)</p><div><br /></div>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-35540384454403426762023-03-06T04:01:00.002-08:002023-03-08T00:25:59.556-08:00तत्वज्ञानाची ओळख<p><br /></p><p>मी आयुष्यभर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्यामुळे ते माझे आवडते विषय आहेत. विज्ञानावर मी लिहिलेले काही लेख या ब्लॉगवर एकत्र केले आहेत.<a href="https://anandghan.blogspot.com/2021/05/blog-post.html."> ज्ञान, विज्ञान, सायन्स आणि नॉलेज</a> <a href="https://anandghan.blogspot.com/2021/05/blog-post.html.">https://anandghan.blogspot.com/2021/05/blog-post.html.</a></p><p>अलीकडच्या काळात मी अध्यात्म या विषयाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला होता त्याबद्दल इथे लिहिले आहे. <a href=" https://anandghan.blogspot.com/2022/11/blog-post_27.html ">अध्यात्माची ओळख</a> <a href=" https://anandghan.blogspot.com/2022/11/blog-post_27.html ">https://anandghan.blogspot.com/2022/11/blog-post_27.html </a></p><p>यासाठी वाचन करत असतांना माझ्या असे लक्षात आले की ज्ञान, विज्ञान, अज्ञान, तत्वज्ञान वगैरे शब्दांचे जे अर्थ मी इतके दिवस समजत होतो त्यापेक्षा त्या शब्दांचे मुळातले संस्कृत भाषेत अभिप्रेत असलेले अर्थ काहीसे वेगळे असतात. कदाचित सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, पण मराठी भाषेतला पहिला शब्दकोष जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कँडी या दोन इंग्रजांनी दीर्घकाळ प्रचंड मेहनत घेऊन तयार केला. श्री.दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण तयार केले, इंग्रजीमधली काही विरामचिन्हे मराठीत आणली आणि मराठीच्या नव्या प्रमाणभाषेची सुरुवात झाली. पूर्वी सगळे संत आणि पंत कवी आपल्या रचना पद्यामध्ये करत असत. गद्यलेखन त्या मानाने अलीकडच्या काळात सुरू झाले. बहुधा त्याच सुमाराला मुद्रणकला भारतात आली, छापखाने निघाले आणि पुस्तके छापली जाऊ लागली. त्याच काळात इंग्रजीमधील Knowledge, Science, Ignorance आणि Philosophy या शब्दांना ज्ञान, विज्ञान, अज्ञान आणि तत्वज्ञान हे मराठी प्रतिशब्द दिले गेले. बहुतेक मराठी लेखकांनी इंग्रजी साहित्याचाही अभ्यास केला होता आणि त्यांच्या लेखनावर इंग्रजी पुस्तकांमधील विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे या शब्दांचे इंग्रजी भाषेतले मूळ अर्थ या मराठी शब्दांना येऊन चिकटले आणि रूढ झाले. निदान मी तरी, आतापर्यंत हे मराठी शब्द त्या इंग्रजी अर्थांनी वापरत आलो आहे.</p><p>पण गीता, भागवत यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये हे संस्कृत शब्द वेगळ्या अर्थांनी योजले असावेत असे वाटते. कुठल्याही विषयाचे नॉलेज म्हणजे त्याचे ज्ञान असे आपल्याला वाटते. आपण अनेक विषयांची माहिती शाळाकॉलेजात किंवा घरातल्या मोठ्या लोकांकडून शिकतो, पुस्तके वाचून किंवा आजकाल इंटरनेटवरून माहिती मिळते, त्यातले जेवढे समजते, लक्षात राहते त्याला आपण ज्ञान समजतो. असे जे ज्ञान आपल्या आजूबाजूच्या खूप लोकांना असते त्याला आपण सामान्यज्ञान म्हणतो. ज्या लोकांकडे निरनिराळ्या विषयातल्या माहितीचे भांडार असते त्यांना नॉलेजेबल समजले जाते, पण ज्ञानी आणि नॉलेजेबलमध्ये फरक आहे. ज्ञानी हा शब्द बहुतेक वेळा साधू, संत, स्वामी अशा साक्षात्कार झालेल्या लोकांसाठी वापरला जातो. </p><p>अर्जुन एका प्रख्यात राजघराण्यात जन्मला होता, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर यासारख्या मोठ्या विद्वान गुरूंकडे धनुर्विद्या, नीतीशास्त्र वगैरे शिकला होता, तरीही गीतोपदेश मिळेपर्यंत तो अज्ञानातच राहिला होता. भगवंताकडून त्याला ज्ञान मिळाले. हे पाहता ज्ञान या शब्दाचा आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान वगैरे असा वेगळा अर्थ लक्षात येतो. हे ज्ञान सरसकट सर्व लोकांना कुणाक़डून शिकून किंवा पुस्तके वाचून समजेल असे नाही. पुराणकाळातले ऋषीमुनी एकटेच अरण्यात जाऊन कठोर तपश्चर्या करत असत आणि त्यांना ज्ञान प्राप्त होत असे, काही लोकांनी पूर्वजन्मी तपश्चर्या करून प्राप्त केलेले ज्ञान त्यांना जन्मतःच मिळते असे म्हणतात, तर काही लोकांना योग्य गुरु भेटला तर तो ज्ञानाचा मार्ग दाखवतो. पुराणातल्या कथांमधले ऋषीमुनी ध्यान धरून बसले की त्यांना कुणीही न सांगता अनेक गोष्टी अंतर्ज्ञानाने समजत असत. त्रिकालज्ञानी मुनींना तर भूतकाळात घडून गेलेल्या, वर्तमानकाळात कुठेही घडत असलेल्या आणि भविष्यकाळात कुठे तरी घडणार असलेल्या गोष्टी, इतकेच नव्हे तर कुणाच्या अनेक पूर्वजन्मांमधले तर कुणाच्या भविष्यातल्या जन्मातले प्रसंगसुद्धा आपोआप समजत असत असे म्हणतात. अशा अविश्वसनीय गोष्टी मी शिकलेल्या विज्ञानामध्ये म्हणजे सायन्समध्ये बसत नाहीत, पण संस्कृतमधल्या ज्ञानविज्ञानात कदाचित ते ही शक्य असावे असे वाटते.</p><p>तत्वज्ञान असा शब्द प्राचीन काळातील संस्कृत भाषेत प्रचलित होता की नाही हे मला माहीत नाही. मी जे काही थोडे संस्कृत श्लोक वगैरे वाचले आहेत त्यात मला तत्वज्ञान हा शब्द दिसला नाही. कदाचित तो मराठीतच प्रचलित झाला असेल. हिंदी भाषेत फिलॉसॉफीला दर्शन असे म्हणतात. तत्व या शब्दातला त्व हा प्रत्यय महत्व, अस्तित्व वगैरे सारखा धरला तर तत्व याचा अर्थ तत् चे असणे असा होतो. तत् म्हणजे ते. मी आणि तू सोडून ती, तो वगैरे इतर सगळे जे काही या जगात किंवा कल्पनेतही असेल ते सगळे यात आले. इंग्लिशमधल्या principle या अर्थानेही तत्व हा शब्द मराठीत वापरला जातो. हे सगळे काय आहे, कशासाठी आहे वगैरेचे ज्ञान, तत्वांचे किंवा पदार्थांचे यथार्थ स्वरूप किंवा त्याचे सार म्हणजे तत्वज्ञान. या अर्थाने तत्वज्ञान हा शब्द फिलॉसॉफीच्या जवळ येतो. पण सर्व अर्थांनी समान वाटत नाही. वेद, उपनिषद, भगवद्गीता वगैरेंमध्ये असे सांगितले आहे की या विश्वात जे काही आहे ते सगळे परब्रह्म आहे. त्यामुळे तत्वज्ञान म्हणजेच 'त्या'चे ज्ञान याचा अर्थ ब्रह्मज्ञान असाच अर्थ शास्त्रीपंडितांकडून घेतला जातो. हिंदू तत्वज्ञान अशा प्रकारे हिंदू धर्माशी जोडले गेले आहे.</p><p>फिलॉसॉफी हा शब्द फिलिओ (प्रेम) आणि सोफिया (ज्ञान) या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. ज्ञानाचे प्रेम असा त्याचा साधारणपणे अर्थ निघतो. सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल वगैरे ग्रीक विचारवंत त्यांच्या काळातले अत्यंत बुद्धिमान तसेच ज्ञानी विद्वान होते. त्यांनी निरनिराळ्या विषयांवर मांडलेले सिद्धांत, विचार, मते वगैरे गोष्टी फिलॉसॉफीमध्ये गणल्या जाऊ लागल्या आणि आजही फिलॉसॉफी या विषयात त्या शिकवल्या जातात. हे लोक येशू ख्रिस्ताच्याही आधीच्या काळात होऊन गेले होते. नंतरच्या दोन हजारवर्षांमध्ये तर युरोपात कित्येक महान फिलॉसॉफर्स होऊन गेले. माणसाला ज्ञान संपादन करण्याची निरनिराळी साधने मिळालेली आहेत. आपली पाच ज्ञानेंद्रिये मुख्य आहेत. आजूबाजूला दिसत असलेल्या गोष्टी किंवा घडत असलेल्या घटना पाहून त्यावरून बोध घेतला जातो हा पहिला राजमार्ग, पण कधीकधी दिसते तसे नसते, दिसलेले दृष्य एकादे प्रतिबिंब, मृगजळ किंवा भास असू शकते, यामुळे ते पू्र्णपणे विश्वासार्ह नसते, कानाने ऐकलेलेही खोटे असू शकते, त्यामुळे चुका होऊ शकतात. म्हणून आपल्या बुद्धीचा उपयोग करून काय बरोबर आहे हे तर्काने ठरवणे हा एक श्रेयस्कर मार्ग आहे असा दुसरा विचार आहे. शिवाय माणसाच्या मनात काय चालते, माणसे कशी वागतात, सत्य आणि असत्य, नीती आणि अनीती, न्याय आणि अन्याय अशा अनेक प्रकारच्या गोष्टी फिलॉसॉफीमध्ये येतात. मी कोण आहे आणि हे जग म्हणजे काय आहे, माझ्या आणि या जगाच्या अस्तित्वाचे काय कारण आहे असे प्रश्न सामान्य लोकांना पडत नसतील, पण तत्वज्ञांना ते रात्रंदिवस छळत असतील आणि आपापल्या मतीने ते लोक या प्रश्नांची समर्पक उत्तरे शोधत राहिले होते. </p><p>या प्रकारच्या तत्वज्ञानात आत्मा, परमात्मा वगैरे आणण्याची तितकीशी गरज नसते. पण हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध, जैन वगैरे सगळ्याच मुख्य धर्मांमध्ये या प्रश्नावर विचार करणारे धर्मगुरू होऊन गेल्यामुळे या धर्मांमध्ये त्यांच्या तत्वज्ञानाला महत्वाचे स्थान आहे. पण ख्रिश्चन धर्माशी संबंधित असलेले किंवा नसलेले अशा युरोपमधील प्राचीन काळातील सगळ्याच मान्यवर विद्वानांनी सांगितलेले सगळे विचार, मते, तर्क, सिद्धांत, नियम वगैरे ज्ञान फिलॉसॉफीमध्ये येत गेले. नंतरच्या काळात त्यामधील नॅचरल फिलॉसॉफीला सायन्स असे वेगळे नाव दिले गेले. </p><p>भारतामधले तत्वज्ञान युरोपपेक्षाही काही हजार वर्षांनी पुरातन आहे. त्याची सुरुवात वेद आणि उपनिषदांपासून होते. अहम् ब्रह्मास्मि, तत्वमसि अशासारख्या सूत्रांमध्ये गहन अर्थ भरलेला आहे. पौराणिक काळातील ऋषीमुनी आणि इतिहासकाळातील आचार्यांनी त्यांचे सखोल विश्लेषण करून त्यात भर घातली आहे. यामध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा दोन मुख्य विचारसरणी आहेत. आस्तिक विचारसरणींमध्ये वेदांत, सांख्य, योग, न्याय, मीमांसा, वैशेषिक अशी सहा दर्शने आहेत. त्यातून पुढे द्वैत, अद्वैत, विशिष्ट अद्वैत वगैरे प्रवाह किंवा उपप्रवाह आले आहेत. प्राचीन काळामधले विद्वान किंवा आचार्य या मतांवरून शास्त्रार्थांचा वादविवाद करत असत. वादे वादे जायते तत्वबोधः असे सुभाषित आहे. देवीच्या आरतीमध्ये "साही विवाद करता पडिले प्रवाही" या ओळीत सहा दर्शनांचा उल्लेख आहे. नास्तिक विचारसरणीमध्ये चार्वाक, बौद्ध आणि जैन ही प्रमुख तत्वज्ञाने येतात. या दोन्ही प्रकारच्या विचारसरणीमधील प्रत्येक दर्शनामध्ये अनेक तत्वे, तर्क, सिद्धांत आणि उदाहरणे दिली आहेत. </p><p>या सगळ्यांचा विस्तार खूप मोठा आहे. मला याबद्दल काहीच माहिती नव्हती. तत्वज्ञान या विषयाची उत्सुकतेपोटी जेवढी ओळख झाली ती थोडक्यात दिली आहे.</p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-4610362712463169742023-01-19T03:19:00.002-08:002023-01-19T03:37:58.663-08:00तेथे कर माझे जुळती - २१ डॉ.अच्युत शंकर आपटे<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5VzJGpfAWWtdfqy8Fp3KA_bVN6ZgeXz0ApzsXeS4QsF4qqTGyga2051H4xWM0iE08G-FQELeFUjROiXx3LTinf7Ow9vFPZ9FeIgwtdmcnUpxm3anrDcl0w2Yw8dPjf3LstECyeuc-D2QpcvzMJ068qNfy1whhJ6oZN7Gnb-D1YMfOq69OeOY/s875/%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="600" data-original-width="875" height="438" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5VzJGpfAWWtdfqy8Fp3KA_bVN6ZgeXz0ApzsXeS4QsF4qqTGyga2051H4xWM0iE08G-FQELeFUjROiXx3LTinf7Ow9vFPZ9FeIgwtdmcnUpxm3anrDcl0w2Yw8dPjf3LstECyeuc-D2QpcvzMJ068qNfy1whhJ6oZN7Gnb-D1YMfOq69OeOY/w640-h438/%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87.jpg" width="640" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><p>माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या ज्या थोर लोकांनी माझ्या मनावर खोलवर छाप सोडली आहे अशा वीस खास लोकांच्या आठवणी मी या मालिकेत सादर केल्या होत्या. याला अपवाद म्हणून मी या लेखात एका अशा व्यक्तीबद्दल लिहिणार आहे, जिला भेटण्याची मला लहानपणापासून खूप इच्छा होती, पण तसा योगच आला नाही. मी त्यासाठी फारसे प्रयत्नही केले नाहीत हेही तितकेच खरे आहे.</p><p>मी जमखंडी इथे शाळेत शिकत असतांना शाळेमधले मास्तर लोक आमच्यापुढे गुरुदेव रामभाऊ रानडे यांचा आदर्श ठेवत असत, पण त्या ऋषितुल्य साधुसंताचा थोरपणा त्या लहान वयात आमच्या आकलनाच्या पलीकडचा होता. त्यामुळे आपण मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे सद्गुरु व्हावे, आश्रमात रहावे, आपला शिष्यपरिवार असावा वगैरे मला चुकूनही कधी वाटले नाही. त्याच काळात आमच्या घरातली वडीलधारी मंडळी डॉ.अच्युतराव आपटे यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवत असत. त्यांनी नेमके काय काय पराक्रम केले हे कदाचित त्यांनाही माहीत नसेल, पण ते खूप हुषार होते आणि आपल्या हुषारीच्या जोरावर ते परदेशी जाऊन काहीतरी भव्यदिव्य असे उच्च शिक्षण घेऊन आले होते एवढी माहितीही त्या काळात खूप आकर्षक होती. आजकाल दर दोन तीन मुलांमधला एक तरी परदेशात जात येत असतो, त्यामुळे कुणाला त्याचे फारसे कौतुक वाटत नाही. पण माझ्या लहानपणी परदेशी जाणे ही अशक्यप्राय इतकी भारी गोष्ट वाटायची. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू वगैरे मोठमोठी पुढारी मंडळी परदेशी जाऊन आले होते हे मला माहीत होते, पण आमच्या माहितीत तरी अशी कोणती ओळखीतली व्यक्ती नव्हती.</p><p>अच्युतराव आपटे आमच्या गावातच जन्मलेले आणि आमच्या शाळेतच शिकलेले होते. ते माझ्या आत्याच्या नात्यात होते आणि त्यांचे घरही आत्याच्या घराला लागूनच होते, त्यामुळे आम्हाला जातायेतांना ते घर दिसत असे. कदाचित माझ्या लहानपणी ते तिथे अधूनमधून येतही असतील, पण त्याच काळात त्यांच्या घरी जायची संधी मला कधीच मिळाली नाही. ते वयाने माझ्याहून खूप मोठे असल्यामुळे आमची ओळख होण्याची काही शक्यताही नव्हती. त्यांनी माझे नावसुद्धा कधी ऐकले नसेल. पण माझी आई आणि आत्या यांच्या बोलण्यात अच्युतरावांच्या कर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख नेहमी येत असे, त्यामुळे माझ्या मनात या व्यक्तीसाठी एक खूप मोठे मानाचे स्थान तयार झाले होते. आपणही त्यांच्यासारखे मन लावून अभ्यास करून भरपूर शिकावे आणि स्कॉलरशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी परदेशी जावे हे मला त्या वेळी शक्यतेच्या कोटीतले वाटत होते. चांगले मार्क मिळवून मोठी डिग्री घेतली तर जाण्यायेण्याच्या खर्चाची सोय आपोआप होत असावी असेही तेंव्हा कदाचित वाटत असेल. पण कॉलेजात गेल्यानंतर पाहिले की ज्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे होते त्यांना त्यासाठी खूप धडपड आणि खर्चही करावा लागतो, अगदी विद्यापीठात पहिला आलेल्या मुलाचीही त्यातून सुटका नसते, तेंव्हा मी तो नाद सोडून दिला. माझ्याच वर्गातली काही मुले आपापल्या प्रयत्नाने परदेशी गेलेली पाहिली आणि मलाही नोकरीतून परदेशी जायची संधी मिळणारच याची जवळ जवळ खात्री होती. त्यामुळे मला परदेशगमनाचे वाटणारे अप्रूप कमी झाले.</p><p>माझ्या नात्यातल्या एका मुलाची आर्थिक परिस्थिति बेताची होती. पण श्री.अच्युतराव आपटे यांनी त्याच्या पुण्यात राहण्याजेवण्याची आणि शिक्षणाची सोय लावून दिली असे ऐकले तेंव्हा मला समजले की ते उच्चशिक्षित विद्वान होते तसेच बरीच समाजसेवाही करत होते. पण त्या काळी मला त्याचा जास्त तपशील समजला नाही. आमच्या घरात माझी आई आणि आत्या सोडून इतर कुणी अच्युतरावांना ओळखतही नव्हते, त्यामुळे नंतर घरातल्या कुणाच्या बोलण्यातून त्यांचा उल्लेख येईनासा झाला. मराठी वर्तमानांमध्ये कधी विद्यार्थी सहाय्यक संघाविषयी काही माहिती किंवा बातमी आली तर त्यात अच्युतराव आपटे यांचा उल्लेख येत असे, पण ती बातमी कधी कधीच माझ्या वाचनात आली असेल.</p><p>पुण्यात राहणाऱ्या जमखंडीकरांचा एक समूह तयार झाला आणि मला त्यात प्रवेश मिळाला. त्या संपर्कातून मला अलीकडेच अच्युतरावांवरील दोन लेख वाचायला मिळाले. त्यातला एक प्रा.स.पां.देशपांडे यांनी विवेक साप्ताहिकाच्या महाराष्ट्र नायक या श्रुंखलेसाठी लिहिला आहे आणि दुसरा लेख उल्का कळसकर यांनी सकाळ वर्तमानपत्राच्या सप्तरंग पुरवणीसाठी लिहिला आहे. हे लेख वाचून आतापर्यंत मला नसलेली त्यांच्या कार्याविषयी बरीच माहिती मिळाली आणि अच्युतराव आपटे यांच्या विषयी माझ्या मनात लहानपणापासून असलेला आदर अनेकपटींनी वाढला. 'दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती' या कवितेप्रमाणे मी मनोमनी दोन्ही हात जोडून त्यांना प्रणाम केला.</p><p>श्री.अच्युतराव आपटे यांनी १९४२ सालच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास घडला होता. तुरुंगातून सुटल्यावर ते बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेले आणि डॉ. होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेसॉन फील्ड्स’ या भौतिकशास्त्रातल्या विषयावर संशोधन करू लागले. पुढे त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली. मात्र स्वतंत्र गणिती संशोधनास वाहून घेण्याची प्रज्ञा असताना, १९४९ सालापासून खडकवासला येथल्या भारत सरकारच्या केंद्रीय जलविद्युत संशोधन संस्थेच्या गणित विभागात संशोधन अधिकारीपदाची त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली, ती १९७९ साली संगणक विभागप्रमुख म्हणून पायउतार होईतो, त्यांनी समर्थपणे निभावली. तीस वर्षांच्या या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी समस्यांची उकल करण्यासाठी अथक प्रयत्न करून अच्युतरावांनी गणिती प्रतिकृतीच्या (मॅथेमॅटिकल मॉडेल्स) अनेकविध प्रणाली निर्माण केल्या. त्यांपैकी काही तर आव्हानात्मक होत्या. अशा गणिती प्रतिकृती विकसित करून संशोधनाच्या या क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रगतीचा भारत सरकारने गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.</p><p> केंद्रीय जलविद्युत संशोधन संस्था (सीडब्ल्यूपीआरएस) हे मुख्यत्वे सिव्हिल इंजिनियरिंगचे संशोधन केंद्र आहे, पण डॉ.अच्युतराव आपटे यांनी तिथे गणितामधील ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करून गंगा, ब्रह्मपुत्रा वगैरे नद्यांमधील जलप्रवाहांच्या मोजमापांमधल्या किचकट समस्या सोडवल्या आणि महापुरांचे नियंत्रण व कोलकाता शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा असे महत्वाचे लोकोपयोगी प्रकल्प यशस्वी केले. कोयना धरणाच्या आसपास आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे मूळ आलेख मिळवून त्यांचे विश्लेषण करण्यातही त्यांनी आपले कौशल्य दाखवले.</p><p>हे शास्त्रीय काम करत असतांनाच अच्युतराव समाजकार्याकडे वळले. ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’, ‘इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन’ आणि ‘फ्रेंच मित्र मंडळ’ ही त्यांची तीन सामाजिक अपत्ये. शिक्षणाची इच्छा असूनही गरिबीमुळे ग्रमीण भागातल्या असंख्य मुलांना शहरात राहण्या-जेवण्याच्या सोयीअभावी शिक्षण सोडावे लागते. हे जाणून १९५६ साली विद्यार्थी साहाय्यक समितीची स्थापना करून अच्युतरावांनी विद्यार्थ्यांची अल्पदरात ही सोय केली. उत्तम संस्कार, व्यक्तिविकासाबरोबर श्रमशक्तीची जाणीव करून देताना समितीच्या मनात ना उपकाराची भावना ना विद्यार्थ्यांच्या लेखी लाचारीची, असे वातावरण ठेवले. अशाच प्रकारे मनुष्यबळातली गुंतवणूक (इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन) ही दुसरी सामाजिक संस्था, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील ग्रामीण परिसरात, फुगेवाडी येथे अच्युतरावांनी काढली. तेथे निराधार बालकांवर सुसंस्कार करण्यासाठी बालसदन, नरसी मोनजी तंत्रशाळा उभारण्याबरोबरच ग्रमीण भागातील तरुणांना शेती, दुग्धव्यवसाय, छपाई व इतर औद्योगिक व्यवसायांतले कसब आत्मसात करण्याचे प्रशिक्षण देण्याची ही व्यवस्था केली. त्यांतून अनेकांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध झाले. दोन्ही संस्थांत अच्युतराव निर्मळ वृत्तीने विश्वस्त राहून, संस्थांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही याबद्दल दक्ष असत. त्याशिवाय संत ज्ञानेश्वरमहाराजांनी दिलेल्या ‘हे विश्वचि माझे घर’ या संदेशानुसार सन १९६७ मध्ये त्यांनी ‘फ्रान्स मित्रमंडळ’ची स्थापना केली. या मंडळातर्फे दरवर्षी काही काळ भारतीय नागरिक फ्रान्समध्ये, तर फ्रेंच नागरिक भारतामध्ये ठेवणे अशी आखणी होऊन आजवर हजारो नागरिकांना परस्परांच्या देशांतल्या समाजजीवनाचा परिचय झालेला आहे.</p><p>अच्युतरावांची राहणी महात्मा गांधीजींप्रमाणेच साधी होती. नीतितत्त्वांचं आचरण व सेवाभाव त्यांच्या ठायी होता. ग्रामीण भागाची, तिथल्या माणसांची दुःखं तळमळीनं जाणून घेणारा समाजसेवक अशीच अच्युतरावांची ओळख होती. अनाचार, भ्रष्टाचार आदी बाबींपासून ग्रामीण भागातला विद्यार्थी मुक्त असावा, त्याला राजकारणापेक्षा विद्याव्यासंगात आनंद मिळावा, त्यानं नीतीमूल्यं मानून आपला विकास करावा, अशी तळमळ अच्युतरावांना होती. त्यांना कुणी ‘समाजवादी विचारवंत’, कुणी ‘गांधीवादी समाजसेवक’ म्हणत असत; परंतु ते ‘समतावादी समाजशिक्षक’ होते . सर्वांबद्दल प्रेम बाळगून व काही मूल्यं उराशी बाळगून विचार करणारे ते ‘आचारवंत’ होते.</p><p>असे हे आमच्या गावाचे भूषण असलेले डॉ.अच्युतराव आपटे होऊन गेले. त्यांचे कार्यक्षेत्र पुण्यात होते आणि ते पुण्याचेच रहिवासी होते, पण त्यांना भेटण्याचा योग जुळून आला नाही किंवा मी त्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत याची खंत मनात राहील.</p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-64713933158012355282022-11-27T07:39:00.004-08:002023-02-23T03:34:40.973-08:00अध्यात्माची ओळख<p> अध्यात्म आणि मी या मथळ्याखाली मी फेसबुकवर लिहिलेल्या स्फुट लेखांचे संकलन करून हा लेख तयार केला आहे. </p><p>मी लहान असतांना 'अध्यात्म' आणि 'परमार्थ' हे शब्द कधी कधी घरातल्या मोठ्या लोकांच्या बोलण्यामधून कानावर पडत असत. या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असावा आणि तो आत्मा, परमात्मा वगैरेशी संबंधित असावा अशी माझी समजूत झाली होती. तीही अगदीच चुकीची नव्हती. माणूस मरतो तेंव्हा त्याचा आत्मा शरीरातून बाहेर निघून जातो आणि तो स्वर्गात किंवा नरकात जातो किंवा दुसऱ्या एकाद्या बाळाच्या किंवा कुठल्याशा इतर प्राण्याच्या पिल्लाच्या शरीरात शिरतो असे ऐकले होते. काही अतृप्त आत्मे मात्र भूतपिशाच्च होऊन इथेच दीर्घकाळ सतत त्रास देत रहातात असेही मी त्या काळात ऐकले होते आणि मनातून त्यांची भीतीही वाटत होती. पण हा आत्मा जीवंत माणसाच्या शरीरात रहात असतांना तिथे काय काम करतो याची मात्र मला तेंव्हाही फारशी माहिती नव्हती. सत्तर वर्षांपूर्वीच्या काळात अशी परिस्थिती होती की कदाचित मला हा प्रश्न कधी पडलाच नसेल आणि पडला असलाच तरी तो मोठ्या लोकांना विचारायचे धाडस मी करू शकलो नसेन. लहान मुलांनाही आत्मे असतात असे त्या काळातल्या वडीलधारी लोकांना बहुधा वाटतच नसावे. सदान् कदा त्यांच्या अंगावर ओरडून आणि चांगला मार देऊन मुलांना नेहमी धाकातच ठेवले जात असे. त्यांची तोंड वर करून काही बोलायची प्राज्ञा नव्हती, मग प्रश्न कसले विचारणार? त्यामुळे अध्यात्म हे माझ्यासाठी एक प्रकारचे गूढ होते, पण ते समजून घेण्याचीही त्या वेळी मला काडीचीही गरज वाटत नव्हती. गुरुवारी दत्ताची आरती करणे, शनिवारी मारुतीच्या देवळात जाऊन नारळ फोडणे आणि एकादशीला साबूदाण्याची खिचडी खाणे हेसुद्धा अध्यात्मात येत असावे अशीही माझी (गैर)समजूत झाली होती.</p><p>कॉलेजमध्ये गेल्यानंतरच्या काळात मी ज्या प्रकारची पुस्तके आणि लेख वाचले, नाटके आणि सिनेमे पाहिले त्यावरून माझी अशी खात्री पटत गेली की कुणीही एकाद्या आत्म्याला जाता येतांना किंवा काही उद्योग करतांना कधीच पाहिलेले नाही, ती एक फक्त कल्पना आहे, वाटल्यास एक संकल्पना आहे. ती समजून घेण्यावाचून त्यावेळी तरी माझे काही अडत नव्हते. त्यामुळे मी अध्यात्म हा विषयच बाजूला ठेवला. माझ्या अभ्यासात आणि नंतर कामात मी इतका गुंतत गेलो की तो विषय पन्नास वर्षे तसा बाजूलाच राहिला. या काळात मी ज्या वातावरणात रहात होतो, तिथे आजूबाजूचे लोक देवदर्शन, पूजा, आरती वगैरे गोष्टी माफक प्रमाणात करत होते आणि मीसुद्धा आपण होऊन त्यात हौसेने सहभागी होत होतो. मी त्यांना कधी विरोध केला नाही. माझाही असलाच तर तेवढ्यापुरता 'अध्यात्मा'शी संबंध टिकून राहिला होता.</p><p>. . .</p><p>या विश्वातल्या अणुरेणूंनाही (Aoms and Molecules) कुणीही कधीही डोळ्यांनी पाहिलेले नाही किंवा नाककान यासारख्याआपल्या ज्ञानेंद्रियांकडूनही इतर कुठल्याही प्रकारे आपल्याला त्यांचे अस्तित्व जाणवत नाही, पण ते प्रत्येक पदार्थात असतातच असे काही शास्त्रज्ञांनी तर्काच्या आधाराने सांगितले, तसेच त्यांचे काही संभाव्य गुणधर्मही सांगितले. ते मान्य केले तर त्या काळातल्या विज्ञानापुढे असलेल्या अनेक प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरे मिळत होती म्हणून बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्यांना मान्यता दिली आणि त्यांच्या आधारावर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात पुढील काळात अनेक शोध लागत गेले, तसेच तंत्रज्ञानात भर पडत गेली. पुढच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी अणूच्या अंतर्गत रचनेची कल्पनाचित्रे (मॉडेल्स) तयार करून त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म अशा कणांचे कल्पनेतूनच शोध लावले. न्यूट्रॉन नावाचे एरवी निष्क्रिय असलेले कण खवळले तर प्रचंड मोठा स्फोट घडवतात हे त्यांनी नुसते तर्कानेच सांगितले नाही तर प्रत्यक्षात तसे स्फोट घडवून दाखवले. मग निसर्गामधून अशा प्रकाराने मिळणाऱ्या ऊर्जेचा शांतताप्रिय कामात उपयोग करणेही सुरू झाले. अणुशक्तीपासून विजेची निर्मिती करण्याच्या क्षेत्रात मी आयुष्यभर काम केले. त्यामुळे अणुरेणूंना मी कधी पाहिले नसले तरी त्यांच्या अस्तित्वाबद्दल माझ्या मनात कधीच शंका आली नाही.</p><p>सेवानिवृत्तीनंतर माझा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी असलेला संबंध कमी होत गेला. याच काळात आंतरजालाचा प्रसार अकल्पनीय वेगाने वाढत गेला आणि आपल्याला हवे ते जगभरातले ज्ञान घरबसल्या प्राप्त करता येणे शक्य झाले. हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेले महर्षी व्यास, वाल्मिकी, शेकडो वर्षांपूर्वीचे आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदासस्वामी यांनी तेंव्हा काय लिहून ठेवले होते यांचे आजच्या काळातल्या विद्वानांनी सोप्या शब्दांमध्ये सांगितलेले सार वाचणे मला आता शक्य झाले. त्यांनी केलेले निरूपण मला कुठल्याही देवळात किंवा सभागृहात न जाता माझ्या सवडीनुसार घरबसल्या किंवा पडल्यापडल्यासुद्धा ऐकता येणे शक्य झाले. तेंव्हा माझ्या मनात असा विचार आला की शास्त्रज्ञांनी सांगितले म्हणून मी जसा अणुरेणूंवर विश्वास ठेवला होता आणि त्यामुळे मला विज्ञान समजायला मदत झाली होती, त्याचप्रमाणे या विद्वानांनी सांगितल्याप्रमाणे आत्मा ही संकल्पना मान्य केली तर कदाचित अध्यात्म या बाजूला ठेवलेल्या विषयाशी निदान तोंडओळख तरी होईल. माझ्या पिढीतल्या इतर काही लोकांना त्याची गोडी का वाटते ते समजेल.</p><p>. . .</p><p>ईमेल, फेसबुक, वॉट्सॅप वगैरेंमुळे आपला संदेश जगभरात कुठेही असलेल्या एका किंवा अनेक व्यक्तींना क्षणार्धात आणि फुकटात पाठवणे शक्य झाले, एवढेच नव्हे तर त्या संदेशात अक्षरे, चित्रे आणि ध्वनिसुद्धा पाठवता यायला लागले. यामुळे आज अनेक जुनी तसेच नवी माणसे माझ्या संपर्कक्षेत्रात आली आहेत. त्यात माझे जवळचे आणि दूरचे नातेवाईक, शाळेतले, कॉलेजातले, नोकरीतले आणि कॉलनीमधले मित्र असे निरनिराळ्या प्रकारचे आणि भिन्न वयोगटातले लोक आहेत. रोज कमीतकमी दोनअडीचशे तरी संदेश माझ्या सेलफोनवर येऊन पोचत असतात. त्यातले ९०-९५ टक्के केवळ मौजमजा आणि टाइमपाससाठी असले तरी ५-१० टक्के संदेश 'वाचा आणि विचार करा' या प्रकारचेही असतात. यातल्या चारपाच मित्रांनी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यासारख्या ग्रंथांची पारायणे केली आहेत, दोन तीन जणांनी कुठल्या कुठल्या ज्ञानयज्ञांना हजेरी लावली आहे आणि एकदोघांनी तर चक्क आध्यात्मिक गुरू शोधून त्यांचे शिष्यत्व पत्करले आहे. आपल्या इतर अज्ञानी मित्रांचाही उद्धार व्हावा या पवित्र हेतूने यातले काहीजण अधूनमधून चमचाभर ज्ञानामृत आपल्या संदेशात टाकत असतात. ते प्राशन करून त्यातले काही कण माझ्या मेंदूपर्यंत पोचले असावेत. तेवढ्या आधारावर मी हा लेख लिहीत आहे. </p><p>"तुला तुझ्या स्वतःच्या आत्म्याची जाणीव झाली आहे का?" असे मी एका जवळच्या आध्यात्मिक मित्राला सरळ विचारले होते. त्यावर त्याने उत्तर दिले की आता कुठे त्याची त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. जेंव्हा त्याची पात्रता पुरेशी वाढली आहे असे त्याच्या सद्गुरूंना वाटेल त्या वेळी ते तेवढी कृपा करतील. त्यांच्या सहाय्याशिवाय आपल्या आपणच आपल्या आत्म्याला शोधता येणे शक्य नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर हा अध्यात्माचा ज्ञानमार्ग फार बिकट दिसतो. त्यासाठी आधी ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा असा एक खरोखर चांगला गुरु मिळायला पाहिजे आणि त्याने तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारायला हवे. ते तर मला या जन्मात जमेल असे वाटत नाही. कारण विज्ञानाच्या मार्गाने जातांना मला जास्तच चिकीत्सक वृत्ती मिळाली आहे. त्या मानाने भक्तीमार्ग सोपा असावा. आपल्याला स्वप्नात किंवा ध्यान धरलेले असतांना अमक्या तमक्या देवाने किंवा देवीने दर्शन दिले आणि काहीतरी करायला सांगितले असे दृष्टांत किंवा प्रचीतीचे दाखले मी लहानपणापासून अनेक लोकांकडून ऐकले आहेत. ते सांगतांना त्यांना इतके आनंदाचे भरते आलेले असते की त्यावर शंका व्यक्त करून विरजण घालावे असे मला वाटत नाही. </p><p>. . .</p><p>बाबा, स्वामी, कीर्तनकार, प्रवचनकार वगैरे लोकांना विज्ञानाचे वावडे असावे असे वाटते. हे लोक विज्ञानामधील प्रगतीमुळे उपलब्ध झालेल्या सगळ्या सुविधांचा लाभ तर घेत असतात, पण "या विज्ञानाला हे तरी समजले आहे का?" आणि "ते तरी कुठे जमते ?" वगैरे ताशेरे मारून त्याची टिंगल करत असतात आणि बहुतेक सगळे भाबडे श्रोते त्यांना दाद देत असतात. "यांचे विज्ञान जिथे संपते तिथे आमचे अध्यात्म सुरू होते" हे त्यांचे एक आवडते वाक्य आहे. इतर सर्वसामान्य आणि काही चांगले शिकलेसवरलेले लोकसुद्धा हे वाक्य अधूनमधून ऐकवत असतात. यावरून कुणाला असे वाटेल की विज्ञानाला न सोडवता आलेले गहन प्रश्न अध्यात्मामधून चुटकीने सोडवता येत असतील. पण तसे एकादेही उदाहरण माझ्या तरी ऐकिवात किंवा पाहण्यात नाही.</p><p>मात्र अध्यात्म हे विज्ञानाच्या पलीकडे आहे हे विधान तसे पाहता बरोबरच आहे, कारण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (Physics, Chemistry, Biology) यामधून झालेल्या संशोधनातून आत्मा अस्तित्वात असल्याचा कसलाही पुरावा अजूनपर्यंत सापडलेला नाही आणि यातल्या कुठल्याही विषयात त्याचे गुणधर्म शिकवले जात नाहीत. म्हणजे आत्मा ही संकल्पना विज्ञानाच्या बाहेर किंवा पलीकडे तर आहेच आणि अध्यात्म हे ज्ञान आत्मा, परमात्मा वगैरेंशी संबद्धित असल्यामुळे ते विज्ञानात येत नाही. मात्र आचार्य प्रशांत या एका आधुनिक बाबाने आपल्या एका व्हीडिओमध्ये असे सांगितले आहे की सगळे विज्ञानच अध्यात्मात समाविष्ट आहे. विज्ञान हा अध्यात्माचा एक सबसेट आहे. या विधानानुसार अध्यात्म हे आपोआपच विज्ञानाहून मोठे ठरते.</p><p>. . . </p><p>अधि + आत्म मिळून अध्यात्म हा शब्द तयार होतो. अधिकार, अधिकृत, अधिपति, अधिवेशन, अधिष्ठान वगैरे शब्द पाहिल्यास अधि या उपसर्गाचा नेमका काय अर्थ असेल ते समजत नाही. 'आत्म्याविषयीचे ज्ञान' असा अध्यात्म या शब्दाचा एक सोपा अर्थ सोयिस्कररीत्या केला जातो. "मी कोण आहे ? कुठून आलो ? कशासाठी आलो ?" अशासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे अध्यात्म असेही समजले जाते. "मी अमुक तमुक, मुंबईहून काही कामासाठी पुण्याला आलो आहे." असली उत्तरे इथे म्हणजे अध्यात्मात चालत नाहीत. ती या देहाला लागू पडतात, पण मी म्हणजे माझा हा नश्वर देह नव्हे. अंतर्मुख होऊन " खरोखर मी कोण आहे?" याचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. असे सांगतात. पण हे अंतर्मुख कसे व्हायचे असते तेच मला तरी अजून समजलेले नाही.</p><p>"मला आनंद होतो, मला वाईट वाटते, मला आश्चर्य, भीती, काळजी वगैरे वाटते, मला आवडते, मला पटते, मी शहाणा आहे, मी प्रेमळ आहे, वगैरे वगैरे... " असे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा यातला मी नेमका कोण असतो? शरीराच्या आत राहणाऱ्या या अदृष्य 'मी'साठी मन, बुद्धी, अहंकार (मीपण)आणि चित्त असे चार शब्द दिले आहेत, त्यांच्या संकल्पनांमधील सीमारेषा अस्पष्ट आहेत. पण मी यातलाही कुणीच नव्हे असे जगद्गुरु शंकराचार्य त्यांच्या प्रसिद्ध निर्वाणषटकात सांगतात. ("मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहम्।") पुढे जाऊन मी तर चिदानंदरूपी शिव आहे, थोडक्यात सांगायचे झाल्यास मी परमेश्वरच आहे असे ते या स्तोत्रात म्हणतात. पण सगळे जण असे समजायला लागले तर जगात केवढा गोंधळ होईल? मुख्य म्हणजे मी असे म्हंटले तर लोक ते मान्य करणार आहेत का ? असे नुसते म्हंटल्याने मी परमेश्वर होणार आहे का? पण तसे स्वतःला खरोखर वाटणे म्हणजे निर्वाण, कैवल्य वगैरे असे अध्यात्म सांगते म्हणे.</p><p>. . .</p><p>मी स्वतः कोणा आध्यात्मिक गुरूला शरण गेलेलो नाही. त्यामुळे गूगलबाबालाच अध्यात्माबद्दल विचारले. तर त्याने अर्ध्या सेकंदात १,२८,००,००० इतके रिझल्ट दाखवले. यावरून असे दिसते की अध्यात्मावर काहीतरी लिहिणारेही लक्षावधी लोक या आंतर्जालावर नेहमी संचार करत असतात. अध्यात्माबद्दलचे ब्लॉग आणि व्हीडिओ सुद्धा विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. मी पहिल्या ४०-५० संदर्भांची फक्त शीर्षके वाचली. त्यावरून असे दिसते की अध्यात्म या शब्दाखाली अनंत गोष्टी येतात. आत्मा आणि परमात्मा तर आहेतच, पण मानवता, नैतिकता, दया, करुणा, अहिंसा, प्रामाणिकपणा, निरपेक्ष कर्म करणे, मनःशांति, रागावर नियंत्रण ठेवणे अशा गोष्टीसुद्धा त्यात येतात. 'जे जे उत्तम उदात्त सुंदर, महन्मधुर ते ते' असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रतेबद्दल जे लिहिले आहे ते अध्यात्माच्या कक्षेतही येते असे दिसते. </p><p>कोणी म्हणतो अध्यात्म आणि धर्म या वेगळ्या गोष्टी आहेत, पण हिंदू, बौद्ध, जैन, शीख आदि भारतीय धर्म किंवा पंथ सोडून इतर कुठल्या धर्मांमध्ये अध्यात्माचा उल्लेख येत नाही आणि या भारतीय धर्मांबद्दल बोलणारे गुरु अध्यात्माच्या गोष्टी करत असतात असे मला वाटते. रिलिजन या शब्दाला धर्म हा प्रतिशब्द वापरला जात असला तरी त्या दोन्हीमध्ये फरक आहेच. तो लक्षात घेतला तर देवाची उपासनापद्धति या अर्थाचा अध्यात्माशी तसा थेट संबंध नाही, पण भाविक लोक मात्र आपल्या भजनपूजनाला अध्यात्म समजतात हे मी लहानपणापासून पहात आलो आहे. काही लोक अध्यात्माचा संबंध योगाशी जोडतात. योग या शब्दाचा अर्थच बहुधा परमेश्वराशी जुळणे असा आहे, पण आपण तो एक फक्त व्यायामाचा प्रकार समजतो. बाह्य गोष्टींपासून मिळणाऱ्या तात्कालिक किंवा खोट्या आनंदाऐवजी चिरकाल टिकणारा खरा आनंद प्राप्त करणे हे अध्यात्माचे उद्दिष्ट आहे यावर मात्र बहुतेक लोकांचे एकमत दिसते. </p><p>. . .</p><p>अध्यात्म या विषयावर जे काही सांगितले किंवा लिहिले जाते त्यात काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात.</p><p>१. आत्मा अमर आहे आणि तो एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात जात असतो, पण तो आपल्या आधीच्या आणि या जन्मात केलेल्या कर्मांचे गाठोडे सोबत घेऊन पुढे जातो.</p><p>२. माणसाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांची फळे त्याला याच किंवा पुढे येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या जन्मात मिळतातच, किंवा स्वर्गात किंवा नरकात काही काळ राहून ती भोगावी लागतात.</p><p>३. माणसाचे बहुतांश जीवन दुःखाने भरलेले आहे. इतर प्राण्यांचे हाल तर विचारायलाच नको.</p><p>४. ते दुःख टाळण्यासाठी आणि कायम टिकणारा आनंद मिळवण्यासाठी या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर पडणे हे मनुष्यजन्माचे ध्येय असायला हवे. </p><p>५. आपल्या पापपुण्याची फळे भोगून झाल्यावर ती पाटी कोरी होते तेंव्हा मोक्ष मिळतो. त्या वेळी आत्मा परमात्म्यात विलीन होतो. त्याचे वेगळे अस्तित्व शिल्लक रहात नाही.</p><p>क्रमांक ३ वर लिहिलेले निरीक्षण पूर्वीच्या काळात कदाचित पूर्णपणे बरोबर असेल. त्या काळातले लोक फार पापे करत होती का? आणि म्हणून ती सतत दुःखी रहात असतील का ? आजकाल माणसाचे जगणे हे बऱ्याच प्रमाणात सुखावह झाले आहे. "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे", "आनंदीआनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे", "फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा" अशी गाणी कवी लिहितात आणि ती लोकांना आवडतात. आजकाल वयोवृद्ध लोकसुद्धा जास्तीत जास्त आनंदात कसे रहाता येईल असा विचार करायला लागले आहेत. कदाचित त्यामुळे ते आजकाल अध्यात्माच्या वाटेने फारसे जात नाहीत. तान्ही बाळे किंवा मानसिक वाढ खुंटलेली मुले बहुतेक वेळा हसतमुख असतात. त्यांना पाहून असे वाटते की आनंदात राहणे ही मानवाची खरी मूळ अंतःप्रेरणा असावी. दुःखी राहणे ही नाही. इतर मुद्दे पडताळून पाहणे सर्वसामान्य माणसाला अशक्य आहे. आजकाल त्रिकालज्ञानी महापुरुष कुठे भेटत नाहीत. त्यामुळे मागच्या किंवा पुढच्या जन्माबद्दल किंवा मोक्षप्राप्तीबद्दल कोणीच काही ठामपणे सांगू शकत नाही आणि ते सिद्ध करू शकत नाही. एकाद्याला काही लाभ झाला तर ती त्याच्या पूर्वजन्मीची पुण्याई आणि फटका बसला तर ते कुठल्याशा पापाचे फळ असे जुन्या काळातले लोक नेहमी म्हणत असत. नव्या पिढीमधल्या लोकांच्या बोलण्यात अशी वाक्ये येत नाहीत.</p><p>. . .</p><p> अध्यात्म हा विषय आत्म्याच्या संबंधात असला तरी त्यावरील चर्चा परमात्म्यापर्यंत जाऊन पोचतातच. हिंदू धर्मग्रंथांमधील थिअरीप्रमाणे या विश्वातील अणुरेणू आणि त्यांच्यामध्ये असलेली पोकळीसुद्धा निर्गुण निराकार अशा परमेश्वराने व्यापलेली आहे. ज्या काळात या विश्वात काहीच नव्हते तेंव्हासुद्धा हा अनादि अनंत असा भगवंत होताच. त्याने ब्रह्म आणि माया किंवा पुरुष आणि प्रकृति अशी दोन रूपे घेतली. प्रकृति किंवा मायेने स्वतःमधूनच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते निर्माण केली आणि त्यांना एकमेकांमध्ये मिसळून सगळे निर्जीव पदार्थ, तसेच सजीवांचे देह तयार केले आणि ते काम ती करतच राहिली आहे. परमेश्वरामधला 'पुरुष' सूक्ष्म अंशाने जीवात्म्याच्या रूपाने त्या देहांमध्ये प्रवेश करून त्यांना सचेतन करतो आणि तो माणूस चालायला, बोलायला, पहायला, ऐकायला, काम करायला लागतो. अखेर त्या जीवात्म्याने देहातून बाहेर पडल्यानंतर पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले आणि वाढलेले त्याचे शरीर काम करणे थांबवते आणि त्याचे विघटन होऊन ते पंचमहाभूतांमध्ये मिसळून जाते. पण तो जीवात्मा मात्र दुसऱ्या एका शरीरात शिरून त्या शरीराचा ताबा घेतो. असे होत राहते. काही पुण्यवान जीवात्मे यातून बाहेर पडून परमात्म्यात विलीन होतात. त्यांना मोक्ष मिळाला असे समजले जाते. </p><p>इथे या विश्वाची निर्मिति आणि विनाश करणारा परमेश्वरच त्याच्या कणाकणात भरलेलाही आहे आणि त्याला चालवणारे चैतन्यही तोच आहे. म्हणजे निर्माता हा स्वतःच स्वतःची निर्मिति आहे आणि तिचा चालकही आहे. असे गुंतागुंतीचे तत्वज्ञान समजण्यासाठीसुद्धा माणसाला खूप उच्च दर्जाचा बुद्ध्यांक असावा लागतो. तो नसल्यामुळे सर्वसामान्य लोक सगळी परमेश्वराची लीला या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण या विश्वातली रहस्ये समजून घेण्याचा वैज्ञानिक पद्धतीने प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ लोक त्यावर विचार करतात. अध्यात्मामधल्या परमेश्वराबद्दलच्या या विचारात अनेक काल्पनिक गोष्टी गृहीत धरल्या आहेत असे त्यांना वाटते. पण धार्मिक लोक त्या गृहीतकांनाच ज्ञान म्हणतात आणि जे लोक ते मानत नाहीत अशा लोकांना अज्ञानी ठरवतात. इथे अध्यात्म आणि विज्ञान या क्षेत्रांतील भक्तांमधला संघर्ष समोर येतो.</p><p>. . .</p><p>गुरु, बाबा, कीर्तनकार वगैरे लोक नेहमीच विज्ञानाची टिंगल करत असतात किंवा ते कसे हिणकस आहे असे या ना त्या मार्गाने दाखवत असतात हे समजण्यासारखे आहे. सर्वसामान्य लोकांनी वैज्ञानिक दृष्टीने तर्कशुद्ध विचार केला तर त्यांच्यावर आपली पकड राहणार नाही ही भीती त्यांना वाटत असावी. आजकाल त्यांनी एक नवीन युक्ती वापरायला सुरुवात केली आहे. "नासाने किंवा कुठल्याशा जर्मन शास्त्रज्ञांनी सुद्धा हे मान्य केले आहे" असे म्हणत हे लोक त्यांना वाटेल ते (खोटे) सांगायला लागले आहेत आणि बाबावाक्यम् प्रमाणम् असे मानणारे त्यांचे अनुयायीही सर्रास तशी विधाने करायला लागले आहेत. कोणी म्हणतात आपल्या डोळ्यांना तर फक्त काही वेव्हलेंग्थचा प्रकाश दिसतो आणि कानांना फक्त काही फ्रिक्वेन्सीजचा ध्वनि ऐकायला येतो. त्यामुळे विज्ञानाने काढलेली माहिती नगण्य आणि अपूर्ण असते. या विश्वात त्याच्या पलीकडेसुद्धा खूप काही आहे. हे तसे पाहता खरेही आहे.</p><p>विज्ञान हे अपूर्णच आहे आणि कितीही प्रगति केली तरी त्यानंतरही ते नेहमी अपूर्णच राहणार आहे यात काही दुमत नाहीच, कारण कालपरवा मिळालेल्या माहितीमधून आज नवे प्रश्न मनात उत्पन्न होतात आणि उद्यापरवातेरवा अनेक दिवस (महिने, वर्षे, शतके वगैरे) त्यांची उत्तरे शोधण्यात जातात, कधी कधी तर ती उत्तरे मिळतच नाहीत, असेच आजवर चालत आले आहे आणि पुढेही चालत राहणार आहे. पण आपल्याला न दिसणारे किरण आणि न ऐकू येणारे ध्वनि या विश्वात आहेत हे मात्र विज्ञानामुळेच आपल्याला समजले आहे, कारण ते ग्रहण करण्याची साधने वैज्ञानिक संशोधनांमधूनच तयार केली गेली. त्या बाबतीत विज्ञानाने आता पुष्कळ प्रगति केली आहे. </p><p>"आमच्या ऋषीमुनींना अंतर्ज्ञानानेच सगळे समजत होते" असे अध्यात्मवादी लोक सांगतात. पण त्याचा आज काय उपयोग आहे ? त्या ऋषीमुनींचे टेक्निक कुणी स्वामीने शोधून ते सामर्थ्य जगाच्या उपयोगासाठी जगाला दिले तर त्याचा जगाला फायदा होईल.</p><p>. . .</p><p>अध्यात्माच्या मार्गाने जाणारे लोक विज्ञाननिष्ठांना 'अज्ञानी' म्हणतात, तर विज्ञानाचे वाटसरू अध्यात्म हे पूर्णपणे काल्पनिक आहे आणि त्यावर विश्वास ठेवणारे लोक अंधश्रद्धाळू किंवा अडाणी आहेत असे समजतात. त्यांचा वाद ऐकला तर ते एकच भाषा बोलत आहेत की नाही याबद्दल मनात शंका येते. त्याचे कारण ज्ञान, विज्ञान, अज्ञान, तत्वज्ञान वगैरे शब्दांचे त्यांना अभिप्रेत असलेले अर्थ वेगवेगळे असतात. कदाचित सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, पण मराठी भाषेतला पहिला शब्दकोष जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कँडी या दोन इंग्रजांनी दीर्घकाळ प्रचंड मेहनत घेऊन तयार केला. श्री.दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी त्यांच्या सहकार्याने मराठी भाषेचे व्याकरण तयार केले आणि नव्या प्रमाणभाषेची सुरुवात झाली. पुढे सगळ्या लेखकांनी आपापली पुस्तके त्या प्रमाणभाषेत लिहिली आहेत.</p><p>इंग्रजीमधील Knowledge, Science, Ignorance आणि Philosophy या शब्दांना ज्ञान, विज्ञान, अज्ञान आणि तत्वज्ञान हे मराठी प्रतिशब्द दिले गेले. बहुतेक मराठी लेखकांनी इंग्रजी साहित्याचाही अभ्यास केला होता आणि त्यांच्या लेखनावर इंग्रजी पुस्तकांमधील विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे या इंग्रजी भाषेतले मूळ अर्थ या मराठी शब्दांना येऊन चिकटले आणि रूढ झाले. आपणही, निदान मी तरी, ते मराठी शब्द त्या इंग्रजी अर्थांनी वापरत आलो आहे. पण गीता, भागवत यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये हे संस्कृत शब्द वेगळ्या अर्थांनी योजले असावेत असे संदर्भावरून वाटते. कुठल्याही विषयाचे नॉलेज म्हणजे त्याचे ज्ञान असे आपल्याला वाटते, पण मी जन्मभर कष्ट करून कणाकणाने शिकून घेतलेले सायन्स आणि इंजिनियरिंगमधले नॉलेज हे ज्ञान नाहीच, याला आम्ही ज्ञान म्हणत नाही असे एका पंडिताने सांगितले तेंव्हा मला धक्का बसला.</p><p>.. .</p><p>तो विद्वान म्हणाला की सायन्स आणि इंजिनियरिंगसारखे नॉलेज असलेच तर विद्या किवा विज्ञानाचा भाग असेल, ज्ञान नाहीच. त्याच्या मताप्रमाणे ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान किंवा स्वतःला झालेली आत्म्याची ओळख असा आहे आणि ते ज्ञान पुस्तके वाचून किंवा शिकून मिळत नाही. वर्षानुवर्षे किंवा अनेक जन्मांमध्ये समाधी, साधना, चिंतन वगैरे योगाने तपश्चर्या केल्यानंतर ते प्राप्त होते, किंवा ते देण्यासाठी महाज्ञानी गुरूचा अनुग्रह होणे आवश्यक असते. खरे 'ज्ञानी' सत्पुरुष क्वचितच जन्माला येतात आणि बहुतेक वेळा ते पूर्वजन्मांमध्ये संपादन करून ठेवलेले ज्ञान या जन्मात आपल्यासोबत घेऊन येतात अशी भाविकांची श्रद्धा असते. </p><p>संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान याबद्दल असे लिहिले आहे.</p><p>मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।</p><p>जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥</p><p>कारण की स्वरूपज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही ॥७-४॥</p><p>तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे ।</p><p>तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥</p><p>त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही ॥७-५॥</p><p>अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।</p><p>तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥</p><p>हे अर्जुना, त्याचे नाव ज्ञान होय. दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाचे ठिकाणी खरेपणाची बुद्धी असणे त्यास अज्ञान म्हणतात, हेही तू समज. ॥७-६॥</p><p>. . .</p><p>पुस्तके वाचून किंवा शिक्षकाकडून शिकता येते ती विद्या असते, ते ज्ञान नव्हे असा काही तरी ज्ञान या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ असावा असे दिसते. प्राचीन काळात लहान मुलांना विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठवत असत. मोठेपणी काही मुमक्षु लोक सद्गुरूकडे किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या करून ज्ञान प्राप्ती करत असत असे सांगितले जाते. विज्ञान या शब्दाचा अर्थ 'प्रपंचू' म्हणजे रोजच्या जीवनात उपयोगी पडणारे ज्ञान असा असावा. गीतेच्या सातव्या अध्यायाचे नाव ज्ञानविज्ञानयोग असे आहे आणि सुरुवातीलाच "ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः" म्हणजे "मी तुला विज्ञानासह सगळे काही ज्ञान सांगतो" असे श्रीकृष्णाने म्हंटले आहे. पण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र वगैरे जे काही आपण विज्ञानातून शिकतो त्यातले काहीही त्या अध्यायात पुढे कुठेच आलेले नाही. पंचमहाभूते आणि मन, बुद्धी व अहंकार यांच्यामधून प्रकृति (निसर्ग) होते एवढा भाग कदाचित विज्ञान असेल, पण पुढे गेल्यावर "ते सर्वही मीच आहे" वगैरे ज्ञान किंवा अध्यात्म दिले आहे.</p><p>कणाद, भास्कराचार्य आदि प्राचीन भारतीय वैज्ञानिकांनी सांगितलेले सिद्धांत 'सायन्स'मध्ये येत असले तरी ते परंपरागत गुरुशिष्यपरंपरेमधून किंवा वंशपरंपरेतून आपल्यापर्यंत येऊन पोचले नाहीत. त्यांच्या काळात तरी ते विद्वान त्याला विज्ञान म्हणत होते की नाही कोण जाणे. त्यामुळे मी जे काही थोडे फार विज्ञान शिकलो ते पूर्णपणे पाश्चात्य शास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या सायन्समधूनच शिकलो आहे. कदाचित विज्ञान या मूळ संस्कृत शब्दात इतिहास, भूगोलासारख्या इतरही अनेक विषयांच्या सामान्य ज्ञानाचा समावेश त्या काळात होत असावा. सायन्स हा इंग्रजी शब्दही तसा फार जुना नाही. पूर्वी त्या विषयाला नॅचरल फिलॉसॉफी म्हंटले जात असे. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले अचेतन पदार्थ आणि मन, बुद्धी, अहंकार असलेले सजीव यांचा अभ्यास म्हणजे विज्ञान असा त्या शब्दाचा प्राचीन अर्थ असला तर तो अर्थही सायन्स या शब्दाच्या जवळ येतो. आता आपण माती, पाणी, हवा वगैरेसुद्धा मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे यातून निर्माण झाली आहेत असे म्हणतो एवढेच.</p><p>. . .</p><p>विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे माणसाचे कष्ट आणि वेळ वाचवणारी साधने, तसेच अनेक नवनवी उपयुक्त अशी उत्पादने उपलब्ध झाली. या सर्वांमुळे लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झाले, त्यांचे इतर लोकांवर असलेले परावलंबित्व कमी झाले, त्यामुळे सामाजिक परिस्थिति पार बदलली. काही प्रमाणात कुटुंबव्यवस्थाच विस्कळित होत गेली. यातून काही जुने प्रश्न नाहीसे झाले, तर अनेक नवे प्रश्न उद्भवले आहेत. माणसाचे शारीरिक कष्ट कमी झाले असले तरी त्याचे मानसिक तणाव वाढले आहेत असे काही लोकांना वाटते . ते लोक त्यासाठी विज्ञानाला सर्वस्वी जबाबदार धरतात आणि अध्यात्म हा त्यावर नामी उपाय आहे असे प्रतिपादनही करतात. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात जिथे हे तणाव आधी सुरू होऊन विकोपाला गेले तिथे काही स्वामी, योगी आचार्य वगैरेंना चांगला प्रतिसाद मिळाला आणि मिळत आहे. त्यांच्या संस्थांची संस्थाने जगभर उभी राहिली आहेत आणि ती पसरत चालली आहेत. </p><p>या सर्वांचा अध्यात्माशी किती थेट संबंध आहे हे मला माहीत नाही. पण त्यांच्या अनुयायांचे मानसिक तणाव काही प्रमाणात तरी कमी झाले असावेत असे वाटते. भारतातले माझ्या आईवडिलांच्या पिढीपर्यंतले बहुतेक लोक आपल्या प्रपंचाचा आणि काळज्यांचा भार परमेश्वरावर सोडून देत असल्यामुळे ते लोकही त्यांना मानसिक त्रास होईल इतके जास्त टेन्शन घेत नव्हते. "आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार, ठेवोनिया । " अशा वृत्तीने ते रहात होते. पण आमच्या पिढीपासून देवावरचा विश्वास कमी होत गेला आणि काही वेळा आपण स्वतःही काही करू शकत नाही अशा असहाय्य परिस्थितीला सामोरे जाणे कठीण व्हायला लागले. अशा आजच्या काळातल्या लोकांना वारकरी संप्रदायासारख्या जुन्या परंपरांपेक्षा आधुनिक काळातल्या आध्यात्मिक गुरूंचे आकर्षण जास्त वाटते. आता त्यांच्या सहाय्याने ते मोठ्या संख्येने अध्यात्माच्या मार्गाकडे वळू पहात आहेत. त्यांना आत्मा, परमात्मा वगैरेंचे ज्ञान आणि मोक्ष वगैरे मिळो ना मिळो, पण त्या निमित्याने ते व्यसनापासून दूर रहात असतील, त्यांच्यातला प्रामाणिकपणा, माणुसकी, परोपकार आणि दानवृत्ती वगैरे गुण वाढत असतील तर ते त्यांच्यासाठी तसेच समाजासाठीही चांगलेच आहे.</p><p>. . .</p><p>मी गेले काही दिवस अध्यात्माची थोडी तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी आणि हिंदी या भाषांमधून मला जी माहिती सुलभपणे आंतर्जालावर मिळत गेली तेवढ्यातूनच काही समजून घेण्याचा हा अगदी तोकडा प्रयत्न आहे. त्यातून मला जेवढे समजत गेले ते मी या आधी तेरा भागांमध्ये लिहिले आहे. यावरून मला असे दिसले की अध्यात्म या शब्दाची सर्वसंमत अशी व्याख्या नाही. या जगात कालपरवा जे काही होते ते नाहीसे झाले आणि आज जे काही आहे ते उद्यापरवा इथे असणार नाही. पण अनादि अनंत असा परमात्मा पूर्वीही होता आणि पुढेही असणार आहे हे अंतिम सत्य आहे, तसेच तो परमात्मा सूक्ष्मरूपाने आपल्यात वास करत आहे. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न असा काहीसा अध्यात्माचा अर्थ असावा. प्रत्येकाने तो प्रयत्न करावा अशा उपदेश केला जात असतो.</p><p>दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रियांना मिळणारे सुख तात्कालिक असते आणि ते कमी कमी होत जाते हे आपण पहातोच. लाडवाचा पहिला तुकडा खातांना छान लागतो, पण दोन तीन लाडू खाल्यानंतर आणखी खावासाही वाटत नाही. एकादे गाणे कितीही आवडले तरी आपण ते सतत ऐकत रहात नाही. पण परमेश्वराला भेटल्यानंतर आत्म्याला मिळणारा परमानंद, चिदानंद वगैरे दैवी सुख या सर्व भौतिक सुखांच्या मानाने असंख्यपटीने मोठे आणि निरंतर असे असते असे सांगितले जाते. पण ते मिळवण्यासाठी आधी स्वतःच्या इंद्रियांना पूर्णपणे काबूत ठेवलेत तरच तुम्ही एक पाऊल तरी पुढे जाल अशी अध्यात्माची अट आहे.</p><p>या उलट "ये जिंदगी ना मिले दोबारा" असे म्हणत करता येईल तितकी मौजमजा करून घ्यावी असा चंगळवादी विचार आजकाल प्रबळ होत चालला आहे आणि मिळू शकेल तेवढे सुख ओरबाडून घेणे चालले आहे. त्यातून पर्यावरणाच्या प्रदूषणासारखे जागतिक प्रश्न उद्भवल्यामुळे विचारवंतांना भविष्याची काळजी वाटायला लागली आहे. माणसामाणसांतही सामंजस्य न राहिल्यामुळे ते एकमेकांबरोबर सहकार्य करण्याऐवजी एकमेकांचा विनाश करू पहात आहेत. त्याने अध्यात्माचा विचार केला किंवा तो ते करू शकला तर ते निश्चितपणे समाजासाठी चांगले होईल.</p><p>मानव हासुद्धा एक सोशल अॅनिमल आहे, तो कळप करून राहणारा आहे. यातून निघालेली नैसर्गिक अंतःप्रेरणा (इन्स्टिंक्ट) त्याला पुढेही तारून नेईल, असेही सांगितले जाते, पण ही अतःप्रेरणा असणे हाच मुळी मानवांना अंतरात्मा असल्याचा पुरावा आहे आणि निसर्ग हे परमात्म्याचेच रूप आहे असे अध्यात्मवादी सांगतात.</p><p>(समाप्त) </p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p> *****************</p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20484515.post-55896880253706233132022-11-13T22:33:00.001-08:002022-11-13T22:33:11.284-08:00बँकांचे व्याजदर<p><br /></p><p>बँका ठेवीदारांना देत असलेल्या व्याजाचे दर कमी कमी होत गेल्यामुळे अनेक वृद्ध अडचणीत आले आहेत, तर कर्जावरील व्याजाचे दर कमी झाल्यामुळे गृहकर्ज घेतलेल्या लोकांचे ईएमआयचे हप्ते कमी झाले म्हणून ते सुखावले आहेत. एकाच कुटुंबात अशा दोन्ही प्रकारचे लोक दिसत असल्यामुळे ते जरा भांबावलेही आहेत. या पार्श्वभूमीवर मी मुखपुस्तकावर लिहिलेल्या लेखमालिकेचे संपादन करून ती या एकाच लेखात सादर केली आहे. </p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर -१</p><p>मी १९६१मध्ये माझे बँकेतले पहिले खाते उघडले आणि त्यानंतर सेव्हिंग, रिकरिंग, फिक्स्ड डिपॉझिट वगैरे अनेक खाती उघडली आणि बंद केली. असा मला गेल्या साठ वर्षांचा अनुभव आहे. त्यामधून मला जेवढे समजले तसे इथे लिहिले आहे. यात उगाच अर्थशास्त्राचे सिद्धांत किंवा परिभाषा आणलेली नाही.</p><p>त्या काळात बचत खात्यावर सुमारे २% व्याजाचा दर होता आणि मुदतींच्या ठेवींवर तो ४-५ % पर्यंत जात होता. आता पुन्हा साधारण तशीच परिस्थिति आली आहे. मध्यंतरीच्या साठ वर्षांमध्ये ते दर बरेच वाढले होते, पण आता ते कमी झाल्यामुळे अनेक लोकांचे नुकसान आणि अपेक्षाभंग झाला आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात असंतोष निर्माण होणे हे अगदी साहजिक आहे. मीसुद्धा समदुःखी असल्यामुळे त्यांच्याशी सहमत आहे. पण हे दर कशामुळे वाढतात किंवा कमी होतात हे ही समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी बँका नेमके काय काम करतात हे पहायला हवे.</p><p>अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास ज्या लोकांकडे पैसे आहेत त्यांच्याकडून या बँका पैसे घेतात, ते पैसे व्यापार किंवा उद्योग करणाऱ्या लोकांना कर्जाने देतात. त्या लोकांना त्यातून जो नफा मिळतो त्यातून ते लोक बँकांना व्याज देतात, त्यातला थोडा भाग बँका ठेवीदारांना देतात आणि उरलेल्या भागातून स्वतःचा खर्च चालवतात व नफा कमावतात. या सर्वांच्याकडून सरकार कर वसूल करते. अशा प्रकारे सगळ्यांचाच फायदा होत असल्यामुळे ही व्यवस्था चालत राहते आणि त्याची वाढ होत जाते.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर -२</p><p>बँकेत आपले पैसे ठेवायला तयार असणारे ठेवीदार आणि बँकेकडे कर्ज मागायला येणारे कर्जदार हे दोघेही बँकेच्या अस्तित्वासाठी महत्वाचे घटक असतात. पहिल्यांसाठी बँकेला पुरेसा विश्वास कमावावा लागतो. कुणीही शहाणा माणूस आपल्या कष्टाचे पैसे बँकेत ठेवायच्या आधी तिथे आपले पैसे सुरक्षित राहतील आणि ते आपल्याला परत मिळतील याची खात्री करून घेईल. कुणाला कर्ज देतांना तो माणूस कर्जाऊ घेतलेले पैसे परत करेल तसेच त्यावरचे व्याज न चुकता देत जाईल याची खात्री बँकेला करून घ्यावी लागते. बँकेत पैसे ठेवणाऱ्याला जास्तीत जास्त व्याजाचा दर हवा असतो, तर कर्ज घेणाऱ्याला तो कमीत कमी असावा असे वाटते. या दोघांनाही सांभाळून घेण्याची कसरत बँका करतात. त्यांच्याकडे ठेवीच आल्या नसतील तर ते कर्ज कसे देणार ? आणि कर्ज देण्यासाठी कोणी विश्वासू गिऱ्हाईक मिळाले नाही तर बँकेला कुठून उत्पन्न मिळणार? हा समतोल साधता आला नाही किंवा कर्जदार पैसे घेऊन पळून गेला तर ती बँक बु़डते. अशा प्रकारचे घोटाळे होऊन अनेक बँका बुडल्या आहेत आणि त्यांच्याकडे ज्यांनी ठेवी ठेवल्या होत्या त्या खातेदारांचेही अमाप नुकसान झाले आहे. ते नुकसान कमी व्हावे यासाठी सरकारने काही कायदे केले आहेत.</p><p>पूर्वी देशातल्या सगळ्या बँका खाजगी क्षेत्रात होत्या. माननीय इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी त्यातल्या सगळ्या सर्वात मोठ्या बँकांचे एका फटक्यात राष्ट्रीयीकरण केले, पण त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून धरले. या सरकारी बँका कधीच बुडणार नाहीत असा विश्वास लोकांना वाटायला लागला. काही प्रमाणात ही परिस्थिति अजून तशीच आहे. पुढे सरकारीकरण झालेल्या बँकांमध्ये महत्वाच्या पदांवर सरकारी अधिकारी नेमले गेले, ते आपली लालफीताशाही सोबत घेऊन गेले. बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी मजबूत आणि आक्रमक अशा कामगार संघटना उभ्या केल्या. सरकारच्या दबावाखाली ग्रामीण किंवा दुर्गम विभागात न चालणाऱ्या शाखा काढल्या गेल्या, पण तिथे पुरेसा व्यवसाय होऊ शकत नव्हता. कर्जवाटपावरही काही दबाव यायला लागले. अशा काही कारणांमुळे या बँकांमधल्या कार्यक्षमतेवर आणि कार्यकुशलतेवर परिणाम व्हायला लागला. या शतकाच्या सुरुवातीपासून सरकारच्या धोरणात बदल झाला आणि खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळायला लागले. त्यानुसार काही खाजगी बँका सुरू झाल्या आणि त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व मॅनेजमेंट स्टाइलच्या जोरावर भरघोस आघाडी घेतली असे चित्र दिसते. पण हा या लेखाचा मुख्य विषय नाही. </p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - ३</p><p>मी आज एक हजार रुपये बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पाच टक्के व्याजाने ठेवले तर मला वर्षभरानंतर त्याच्या व्याजापोटी पन्नास रुपये मिळतील आणि माझ्याकडे १०५० रुपये होतील. पण माझ्या पाकिटात १००० रुपये असले काय किंवा १०५० रुपये असले काय? त्याने मला काय फरक पडतो? मी आज बाजारात जाऊन माझ्या गरजेचे सामान आणले तर मात्र मला १००० रुपयात जेवढे सामान मिळेल त्यापेक्षा १०५० रुपयात थोडे जास्त मिळेल. पण वर्षभरात सगळ्या मालाचे दर पाच टक्क्याने वाढले तर आज १००० रुपयांना मिळणाऱ्या सामानासाठीच मला एक वर्षानंतर १०५० रुपये द्यावे लागतील, त्याहून जास्त काहीच मिळणार नाही. मग त्या व्याजाचा मला काय उपयोग झाला? मी ते पैसे बचत खात्यातच ठेवले तर मला फक्त वीस रुपयेच व्याज मिळेल, म्हणजे मी आज १००० रुपयांना जेवढे सामान घेऊ शकतो तेवढेही एक वर्षानंतर घेऊ शकणार नाही, आणि ते पैसे मी घरीच ठेवले तर त्याहूनही कमी सामान मिळेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास जेंव्हा बाजारभाव वाढत असतात तेंव्हा आपल्याकडे असलेल्या पैशाचे मोल आपोआप कमी होत जाते. ते बँकेत ठेवले तर आपल्या खात्यामधल्या शिल्लकेचा आकडा वाढतांना दिसला तरी त्याची किंमत कमीच होत जाते हे मी गेली साठ वर्षे पहात आलो आहे. या सगळ्या काळात बँका देत असलेल्या व्याजाचे दर महागाईत होत असलेल्या वाढीच्या दराच्या तुलनेत कमीच राहिलेले आहेत. </p><p>दर महिन्याला माझा पगार नेहमी बचत खात्यात जमा होत असे, त्यातला महिन्याचा खर्च करून झाल्यावर उरलेला तिथेच शिल्लक रहात असे. पुढे मागे अडीअडचणीला लागतील म्हणून मी ते पैसे राखून ठेवत असे. कधी मधी तशा गरजाही निर्माण होत असत किंवा एकादी नवी वस्तू विकत घेतली जात असे आणि ती शिल्लक कमी होत असे. अशा प्रकारे मी तरी माझ्या आयुष्यात आपले बहुतेक सगळे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्येच ठेवले आहेत. क्वचितच कधी दीर्घ मुदतीची खाती उघडली होती. त्यामुळे वर लिहिल्याप्रमाणे बँकेच्या व्याजामधून मला जेवढे काही उत्पन्न मिळाले असेल ते सगळे वाढत गेलेल्या महागाईनेच गिळंकृत केले. त्यातून माझ्या संपत्तीत काही वाढ झाली नाही.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - ४</p><p>पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात मुंबईमधले काही मध्यमवर्गीय लोक नोकरी करताकरता विमे उतरायचा जोडधंदा रत असत. ते लोक एकादा मुलगा नोकरीला लागला रे लागला की त्याला घरात, ऑफिसमध्ये किंवा कुठेही गाठून त्याच्याशी गोड गोड बोलून त्याने विमा उतरवणे किती गरजेचे आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करत असत. अशा अनेक एजंटांना यशस्वीरीत्या तोंड देऊन टाळल्यानंतर माझ्या एका जवळच्या मित्राच्या सासऱ्याने अखेर मला गाठलेच आणि माझा ही विमा उतरवूनच दिला. त्यावेळी माझा पगार दरमहा पाचशे रुपये होता हेही त्याला माहीत होते. आपल्याकडच्या पुस्तकातली अनेक पाने उघडून मला निरनिराळे पर्याय सांगून त्यानेच माझ्यासाठी सर्वात योग्य असा पर्याय निवडला.</p><p> त्याप्रमाणे दर वर्षाला पाचशे रुपये भरले तर ३०-३२ वर्षांसाठी पंधरा हजार रुपयांचे कव्हर मिळणार होते. म्हणजे माझे काही बरेवाईट झाले तर माझ्या कुटुंबाला माझा तीस महिन्यांचा पगार एकदम मिळेल, ते लोक लगेचच अगदीच रस्त्यावर येणार नाहीत, त्यांना सावरायला अवधी मिळेल वगैरे. तेंव्हा तर माझे लग्नही झालेले नव्हते, पण भावी कुटुंबाची काळजी घेण्याची पूर्वतयारी मी आधीच करून ठेवत होतो. त्याने आणखी सांगितले की मी देत असलेले पाचशे रुपयेसुद्धा आयुर्विमा महामंडळ माझ्या नावाने जमा करत राहील आणि त्यावर बँकेप्रमाणे व्याजही चढवत राहील असे करून मुदत संपल्यावर मला मी भरलेल्या हप्त्यांच्या दुप्पट म्हणजे ३०-३२ हजार रुपये एकदम मिळतील, म्हणजे साठपासष्ठ महिन्यांचा पगार हातात येईल. अशा प्रकारे नोकरी संपल्यावरसुद्धा माझ्या हातात भरपूर पैसे रहातील. त्या काळात तरी रिटायर होऊन पाच सहा वर्षे जगलेले कोणीच माझ्या माहितीत नव्हते. त्यामुळे त्याच्या पुढचा विचार करायची गरज नव्हती. "योगक्षेमम् वहाम्यहम्" असे ब्रीदवाक्य असलेल्या आयुर्विमा महामंडळाकडे माझ्या क्षेमकुशलाची जबाबदारी सोपवून मी मुक्त झालो होतो.</p><p>त्या हुषार गृहस्थाने एक गोष्ट मात्र माझ्यापासून लपवून ठेवली होती, ती म्हणजे चलनवाढ किंवा इन्फ्लेशन! मला शेवटी प्रत्यक्षात जी रक्कम मिळाली ती त्या काळातल्या एका महिन्याच्या पगाराइतकीही नव्हती आणि कधी किंवा कुठे खर्च होऊन गेली ते कळलेही नाही.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - ५</p><p>"अंथरूण पाहून पाय पसरावे" या म्हणीचा जप करत आणि अत्यंत काटकसरच्या वातावरणात माझे लहानपण गेल्यामुळे ती सवय माझ्या रक्तात भिनली होती. तरीही बरेचसे समवयस्क मित्र, शेजारी पाजारी आणि नातेवाईक यांच्या घरी एकादी नवी वस्तू आलेली दिसली की ती आपल्याकडेही असायला हवी असे वाटायला लागतेच आणि बँकेतली शिल्लक डोळ्यांना दिसत असेल तर घरात त्या वस्तूचे आगमनही होतेच असा संसारशास्त्राचा नियम आहे. त्यामुळे ती बँकेत साठलेली शिल्लक पुन्हा कमी होऊन जात असे. पण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठीसुद्धा आपण काही तरी करायला हवे या भावनेची टोचणीही असे. म्हणून जेंव्हा त्यांनी शाळेत प्रवेश केला त्याच वेळी मी त्यांच्यासाठी रिकरिंग डिपॉझिट्स उघडली. त्यामुळे दर महिन्याला थोडे पैसे वेगळ्या खात्यात जमा होतील आणि ते शिल्लकेमध्ये दिसणार नाहीत याची व्यवस्था झाली.</p><p>मी विमा उतरवला तेंव्हा त्याचा हप्ता भरणे जरा जड वाटत होते, पण पगार, महागाई आणि महागाईभत्ता यात वाढ झाल्यानंतर तो भार हलका होत गेला आणि त्याच्या जोडीला या आवर्ती योजनांचे हप्ते भरणे शक्य झाले. माझे काही मित्र मला हसायचे, माझी थट्टा करायचे. एका मित्राने तर मला विचारलेच, "अरे, तुझ्या रिकरिंग डिपॉझिट्सचे असे किती पैसे मिळणार आहेत? दहा वर्षांनंतर त्याला काय किंमत राहणार आहे आणि त्यातून तू मुलांना किती शिक्षण देणार आहेस?"</p><p>मी म्हंटले, "मला बँकेकडून मिळणारे सगळे व्याज जरी इन्फ्लेशनने खाल्ले तरी मी दहा वर्षे भरत असलेल्या पैशाएवढी तरी त्याची किंमत राहील, शिवाय त्यावर इनकमटॅक्समध्ये सूट मिळेल हा फायदा आहे. एवढे पैसे पुरेसे असणार नाहीत हे मलाही मान्य आहे, पण निदान तेवढे तरी माझ्या हाताशी राहतील. ते कमी पडले तर मी तुझ्याकडे मागायला येईनच. तेंव्हा तू मला मदत करशील ना?"</p><p>त्याने लगेच विषय बदलला.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - ६</p><p>बहुतेक सगळ्या मराठीभाषी मुलांनी साने गुरूजींचे श्यामची आई हे पुस्तक वाचलेले असेलच, मदर इंडिया हा सिनेमाही पाहिला असेल. पूर्वीच्या काळी खेड्यातले लबाड सावकार गोरगरीबांना कसे लुबाडत असत याचे हृदयविदारक चित्रण त्यात केले आहे. ते निर्दयी लोक गरजू गरीबांकडून त्यांचे दागदागिने, भांडीकुंडी, बैलजोडी, घर, शेतजमीन वगैरे जे असेल ते गहाण ठेऊन घेऊन त्यांना कर्ज देत असत आणि त्यावर जबरदस्त दराने व्याज आकारत. ठराविक मुदतीत ते लोक त्या कर्जाची व्याजासह परतफेड करू शकले नाहीत तर गहाण ठेवलेल्या वस्तू जप्त करून टाकीत आणि गुंडांना पाठवून त्यांचे घर, जमीन वगैरे आपल्या ताब्यात घेत असत. अशा प्रकारे एकादा माणूस एकदा का सावकारी पाशात अडकला की त्याची पुरती विल्हेवाट लावून ते सावकार गबर होत असत.</p><p>गावोगावी बँका उघडल्यानंतर त्यांनी लोकांना वाजवी दराने कर्जे द्यायला सुरुवात केली. त्या लोकांची घरे आणि शेते बळकावून ती राखत बसण्यात बँकांना विशेष रस नव्हता. यामुळे सावकारांच्या जुलुमाला थोडा आळा बसला असेल. माझ्या आधीच्या पिढ्यांमधल्या प्रतिष्ठित लोकांना कुणाकडूनही कर्ज घेणेच कमीपणाचे वाटत असे. माझ्या वडिलांनी जन्मभरात कधीही सावकाराकडूनच नव्हे तर कुठल्या बँकेकडूनही कर्ज घेतले नाही. ऋण काढून कुठलाही सण साजरा केला नाही, त्यांना सहज परवडेल एवढीच मौजमजा केली. कधीही उधारीने सामान आणले नाही. "मी कुणाचे एक पैशाचेही देणे लागत नाही." असे ते स्वाभिमानाने सांगत असत आणि तशीच शिकवण त्यांनी आम्हाला दिली. मीसुद्धा वयाच्या ४०-४२ वर्षांपर्यंत त्या शिकवणीचे कसोशीने पालन केले. कुठल्या गोष्टीसाठी आपल्यालाही बँकेकडून कर्ज मिळू शकेल, ते आपण घ्यावे असा विचारही कधी मनात आणला नाही. </p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - ७</p><p>मी १९६६मध्ये नोकरीसाठी मुंबईला आलो तोपर्यंत माझ्या कुठल्याही नातेवाइकाकडे रेफ्रिजरेटर नव्हता. मुंबई दूरदर्शन केंद्र अजून सुरू झाले नव्हते आणि कपडे धुणे हे काम कामवाल्या बाईकडे होते. मी तर एकटा असेपर्यंत मित्रांबरोबर रहात होतो आणि आम्हीच आपापले कपडे धूत होतो. पण दहा बारा वर्षातच फ्रिज, टीव्ही आणि वॉशिंग मशीन या गोष्टी मध्यमवर्गाच्या न्यूनतम गरजा झाल्या आणि घरोघरी दिसायला लागल्या. मला वाटते, त्या काळातच 'हायर परचेस'ची टूम निघाली आणि फोफावत गेली. </p><p>या स्कीममध्ये तुम्ही अर्धीच किंवा त्याहून कमी किंमत आधी देऊन ती वस्तू घरी घेऊन जाता आणि उरलेली रकम हप्त्याहप्त्याने एक दीड वर्षात भरता. त्यासाठी एका करारावर सही करायची असते त्यानुसार जर तुम्ही हप्ते चुकवले तर दुकानदार ती वस्तू परत घेऊन जाऊ शकतो. कुठल्याही प्रतिष्ठित माणसाला ही नामुष्की झालेली आवडणार नाही आणि ९९% लोक तरी ती वेळ येऊ देणार नाहीत याची दुकानदाराला खात्री असते आणि तो दुकानदारसुद्धा गिऱ्हाईकाचा प्रतिष्ठितपणा पाहूनच हा व्यवहार करतो.</p><p>हे करतांना काही वेळा व्याजाचा दर सांगितला जातो तर कधीकधी तो शून्य टक्के आहे असेही दाखवतात, पण तो दुकानदार थोडी घासाघीस केली तर रोख खरेदीवर १०-१२ टक्के डिस्काउंट द्यायला तयार असतो. याचाच अर्थ त्याने हायर परचेसवर तेवढे व्याज लावलेले असते. बहुतेक वेळा एकादी बँक त्या दुकानदाराच्या सोबतीला असते. ती त्याला उरलेले पैसे लगेच देते आणि गिऱ्हाइकाकडून ते हप्त्यांनी वसूल करते.</p><p>हे सुद्धा एक प्रकारचे कर्ज किंवा उधारी असते म्हणून मी त्याला संमति देत नव्हतो. आधी बचत आणि नंतर खर्च हे तत्व पाळत होतो. पण तेवढी बचत करण्यात १-२ वर्षे गेली आणि तेवढ्यात किंमती वाढल्याने बोलणी खावी लागली. "पण आपल्याला नवे सुधारलेले मॉडेल मिळाले" अशी मनाची समजूत घातली. पुढची पिढी मात्र नेहमीच बिनधास्तपणे सगळ्या वस्तू इन्स्टॉलमेंटवर घेतांना दिसते.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - ८</p><p>1985 च्या सुमाराला भारतातही क्रेडिट कार्डांचा प्रसार सुरू झाला आणि लवकरच तो चांगला फोफावला. त्या काळात मला नेहमी ऑफिसच्या कामासाठी परगावी जावे आणि तिथे दोन तीन दिवस रहावे लागत असे. विमानाचे तिकीट आणि चांगल्या हॉटेलचे भाडे बरेच असे. ऑफिसकडून सगळा खर्च मिळणार असला तरी काउंटरवर मलाच पैसे द्यावे लागत होते. त्यासाठी जास्त पैसे घेऊन जाणे आणि ते प्रवासात सांभाळणे जोखमीचे होते. मी एकदोनदा इतर प्रवाशांना क्रेडिट कार्ड वापरतांना पाहिले, चौकशी केली आणि आंध्र बँकेचे क्रेडिट कार्ड घेऊन टाकले. ज्या बँकेत माझा पगार जमा होत होता तिने अजून क्रेडिट कार्ड काढले नव्हते आणि घराजवळ कुठेही आंध्र बँकेची शाखा नव्हती. महिन्यातून एकदा ती बँक आपले बिल पोस्टाने पाठवायची आणि दिलेल्या मुदतीत एकदा तिच्या शाखेत जाऊन मी ते पैसे भरून येत असे. एकाद्या महिन्यात ते जमले नाही तर त्यावर जबर व्याज द्यावे लागत असे आणि आपले क्रेडिट रेटिंग कमी होत असे म्हणून मी शक्यतो तशी वेळ आणू दिली नाही. त्या क्रेडिट कार्डासाठी वर्षभराला थोडा चार्ज होता, पण सोय पाहता तो परवडण्यासारखा होता. </p><p>मी सुरुवातीला विमानाची तिकीटे आणि हॉटेलची बिले यासाठी क्रेडिट कार्ड काढले असले तरी जसजसा त्याचा प्रसार वाढत गेला त्याप्रमाणे उपयोगही वाढत गेला. मोठ्या दुकानांमधली खरेदी आणि मुंबईतल्याच हॉटेल्समधले खाणे हेसुद्धा क्रेडिट कार्डावर व्हायला लागले. कार्डने पैसे दिल्यानंतर बँक ती माहिती गोळा करून महिनाभराचे बिल एकत्र पाठवत असे आणि ते भरायला काही मुदत देत असे. तेवढा जास्तीचा वेळ मला मिळत असे. फिरतीवरून परत आल्यानंतर मी सगळ्या पावत्यांसह ऑफिसमधल्या अकाउंट डिपार्टमेंटकडे क्लेम केल्यावर तो पास होऊन मला पैसे मिळायलाही वेळ लागत असे. अशा प्रकारे नेहमीच मला थोडे देणे आणि येणे असायला लागले.</p><p>नोकरीच्या सुरुवातीला मला रोख पगार मिळत असे आणि सगळा खर्चही रोखच होत असे. पाकिटातले पैसे मोजले की शिल्लक कळत असे आणि ती पुढचा पगार मिळेपर्यंत कशी पुरवायची ते ठरवता येत असे. कधी ती गरजेपेक्षा जास्त वाटली तर मग मी बँकेत थोडी रक्कम जमा करून येत असे आणि ते मला माहीत असे. पण पगार परस्पर बँकेत जमा व्हायला लागला आणि काही खर्च रोख तर काही क्रेडिट कार्डाने व्हायला लागल्यानंतर कुठल्याही दिवशी माझ्याकडे नेमके किती पैसे शिल्लक आहेत किंवा माझ्यावर किती उधारी आहे हेच मला कळेनासे झाले. माझी मुले नोकरीला लागल्यापासून याच परिस्थितीत राहिली आहेत आणि त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. त्यांच्यासाठी ते अगदी नॉर्मल आहे.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - ९</p><p>बाहेरगावाहून मुंबईला नोकरीला आलेल्यांना तिथे आपलेही घर असावे अशी इच्छा असते, पण मला ती नव्हती. याचे मुख्य कारण इथल्या जागांच्या भरमसाट किंमती पाहता मला इथे माझ्या ताकतीवर घर बांधता येईल अशी कणभरही शक्यता नव्हती आणि दुसरे म्हणजे मला चांगला प्रशस्त सरकारी फ्लॅट रहायला मिळाला असल्यामुळे आपले वेगळे घर बांधायची काही गरजही वाटत नव्हती. कुणाकडूनही कर्ज घ्यायचे नाही या तत्वावर मी ठाम होतो. पण जेंव्हा वयाची चाळिशी आली तेंव्हा मी पाहिले की माझ्या आधी तसेच माझ्याबरोबर जे इतर लोक नोकरीला लागले होते त्यातल्या बहुतेक सगळ्यांनीच सरकारकडून कर्ज घेऊन कुठे ना कुठे एक फ्लॅट घेतला होता किंवा तो बांधला जात होता. माझ्या बरोबर काम करत असलेल्या एका मित्राने त्या सगळ्यांच्या आर्थिक बाजूचा बारकाईने अभ्यास केला आणि मला आकडेवारीसह पटवून दिले की "हम लोग भी ये काम कर सकते हैं । हमें भी जल्द ही कुछ करना ही चाहिये।" मग माझ्या तत्वाला आणि वडिलांनी दिलेल्या शिकवणीला मुरड घालून मी त्याला साथ द्यायला तयार झालो.</p><p>हे सरकारी कर्ज जवळ जवळ फुकट वाटेल इतक्या अगदीच कमी दरात मिळते आणि रिटायर होईपर्यंत सावकाशपणे फेडायचे असते. पण ते मिळण्यासाठी आपल्याकडे आधी जमीन आणि घराची मंजूर झालेली रूपरेखा असावी लागते. आम्ही दोघांनी ऑफिसातलेच आमच्यासारखे राहून गेलेले आणखी दहा लोक गोळा केले आणि आम्ही सर्वांनी मिळून एक सोसायटी स्थापन केली. तेंव्हा वाशी इथे सिडकोकडून प्लॉट दिले जात होते, त्यातला एक आम्हाला मिळाला. तो घेण्यासाठीसुद्धा आधी बरेच पैसे लागणार होते आणि ते तर माझ्याकडे आणि दुसऱ्या काहीजणांकडे नव्हते. पण ज्यांनी आधी घरे बांधली होती त्यांनी मार्ग दाखवून ठेवला होता. तोपर्यंत वीस वर्षे सर्व्हिस झालेली असल्यामुळे आमच्या भविष्यनिर्वाहनिधीमध्ये वीस वर्षांच्या दरमहा पगाराहून जास्त पैसे साठले होते आणि आम्ही त्यातून कर्ज घेऊ शकत होतो. अशा प्रकारे मी आयुष्यातले पहिले कर्ज माझ्याच प्रॉव्हिडंट फंडातून म्हणजे माझ्याच भविष्यकाळाकडून घेतले आणि ते हप्त्याहप्त्याने परत करायला लागलो. मला त्यावर काही व्याज द्यावे लागत नव्हते, पण तेवढ्या रकमेवर मला सरकारकडून मिळणारे व्याज मात्र बुडत होते. ते एक अदृष्य प्रकारचे नुकसान होते.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - १०</p><p>आमच्या ऑफिसातल्या १५-२० मित्रांनी मिळून त्यांच्या सोसायटीसाठी वाशीला एक बिल्डिंग बांधली होती, ती त्या वेळी नुकतीच पूर्ण झाली होती आणि त्यांना आलेल्या एकंदर खर्चाचे आकडे आम्हाला मिळाले होते. आम्हाला त्या वेळी मिळू शकणारे सरकारचे कर्ज आणि आमच्या भविष्यनिर्वाहनिधीमधून मिळू शकणारे कर्ज दोन्ही मिळून आम्हीही तेवढे पैसे उभे करू शकत होतो असे तेंव्हा दिसत होते. या दोन्ही कर्जांना 'अॅडव्हान्स' असे गोंडस नाव दिलेले असल्यामुळे 'कर्ज' न घेण्याच्या माझ्या तत्वालाही तांत्रिक दृष्टीने बाधा येत नव्हती. असा विचार करूनच मला माझ्या मित्राचे म्हणणे पटले होते आणि मी त्याला होकार दिला होता.</p><p>पण 'घर पहावे बांधून' अशी जी म्हण आहे तिचा प्रत्यय आम्हालाही येत गेला. आम्हाला जी जमीन सिडकोने दिली तिचा भावच आधीच्या मानाने दुप्पट लावला होता. शिवाय ती जमीन आम्हाला ज्या वेळी मिळाली तेंव्हा ती अजून गुढघाभर पाण्याखाली होती. पावसाळा संपल्यावर ते पाणी ओसरले असले तरी आम्हाला घर बांधायच्या आधी त्यात भर घालून जमीनीची पातळी उंचावणे जरूरीचे होतेच. ती जमीन कमालीची भुसभुशीत असल्यामुळे खूप खोलवर पाइल्स ठोकाव्या लागल्या. आयुष्यात एकदाच बांधलेले घर उत्कृष्टच असायला हवे असे सर्वांनाच वाटत होते. आम्ही एफ एस आयचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला. त्यामुळे बांधकामाचे क्षेत्रफळ थोडे वाढले. त्यावेळी बारा सदस्यांपैकी फक्त एकाकडेच कार होती, पण भविष्यात उरलेल्यांच्याकडेसुद्धा आली तर त्यांना पार्किंग करायला जागा हवी म्हणून तळमजला पूर्णपणे रिकामा ठेवून तिथे स्टिल्ट केले. हे दोन्ही चांगले निर्णय होते हे नंतर आलेल्या अनुभवावरून सिद्ध झाले. स्वयंपाकघर आणि बाथरूम्समध्ये त्या काळानुसार चांगल्या सोयी केल्या, त्या मात्र पुढे कालबाह्य झाल्या. मोठ्या हौसेने केलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे अर्थातच घराची किंमत वाढत गेली. शिवाय सिमेंट, पोलाद, वाळू वगैरेंच्या किंमती खूप वाढल्या, मजूरीचे दरही वाढले. प्राथमिक अंदाज आणि प्रत्यक्ष आलेला खर्च यातली तूट भरून काढण्यासाठी आम्हालाही धडपड करावी लागलीच.</p><p>ज्या सदस्यांना त्यांचे आईवडील, मोठे भाऊ, सासरे वगैरेंचा भक्कम आर्थिक आधार होता त्यांना काही समस्या नव्हती, पण मला असे कुणाचे ठोस पाठबळ नव्हते आणि मला कुणाकडेही पैसे मागायचे नव्हतेच. हे संभाव्य घर बांधकाम सुरू होण्याच्या आधीच सरकारकडे गहाण टाकलेले असल्यामुळे त्यासाठी बँकेकडे कर्ज मागणे तेंव्हा शक्य नव्हते. आपल्याला कुठून कुठून पैसे मिळू शकतील याचाच मी शोध घेत राहिलो. मी थोडे शेअर्स घेऊन ठेवले होते ते विकून टाकले, ऑफिसमधल्या सहकारी पतसंस्था (क्रेडिट सोसायटी) आणि आयुर्विमा महामंडळ यांच्याकडून कर्जे घेतली, त्या कर्जांवरचा व्याजाचा दर फार जास्त नसला तरी ८-९ टक्के इतका होता. त्या दरम्यान माझे प्रमोशन आणि पगारवाढ झाली त्याचे जे काही अरिअर्स मिळाले ते सगळे त्यातच गेले. प्रॉव्हिडंट फंडाच्या कर्जाचे मी भरलेले हप्ते आणि पगारामधून दरमहा होत जाणारी कपात यामधून तो फंड हळूहळू वाढत होता, त्यामधून पुन्हा अॅडव्हास घेतला. त्या कालावधीत कमालीची काटकसर करून घरखर्च किमान पातळीवर ठेवला होता हे तर सांगायला नकोच. अशा प्रकारे त्या घरासाठी लागलेल्या पैशाची कशी बशी व्यवस्था करेपर्यंत मला घाम फुटला होता, डोक्यावर थोडासा कर्जांचा बोजा झाला होता आणि त्यांवर व्याज द्यावे लागत होते. ती फेडायला पुढील काही वर्षांचा काळ गेला. तोपर्यंत 'ऑपरेशन काटकसर' सुरूच राहिली.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - ११</p><p>सरकारकडून मिळू शकत असलेला हाउस बिल्डिंग अॅडव्हान्स आणि प्रॉव्हिडंट फंडामधून घेता येत असलेला अॅडव्हान्स या दोन्ही गोष्टी मिळवणेही तसे सहज सोपे नसते. त्यासाठी बऱ्याच खटपटी लटपटी कराव्या लागतात आणि अनंत काळ वाट पहात बसावे लागते. पण त्या केल्यानंतर फक्त त्यांच्यामधून आपले घर बांधता येईल अशा गोड गैरसमजुतीतून मी या कामात उडी घेतली होती. त्यासाठी आणखी बराच जास्त खर्च येणार आहे हे बराच वेळ, श्रम आणि पैसे खर्च केल्यानंतर मला समजले. पण आता मागे फिरण्यात अर्थ नव्हता. अनेक प्रकारची कर्जे घेऊन ते काम तडीला न्यायचे होते.</p><p>मी घेतलेल्या कर्जांच्या परतफेडीचे हप्ते त्या घराचे बांधकाम पूर्ण व्हायच्या आधीच सुरू झाले आणि त्यात माझा तेंव्हाचा अर्धा पगार जायला लागला. उरलेल्या अर्ध्या पगारातूनही अन्न, वस्त्र, निवारा या आमच्या मूलभूत गरजा भागत होत्या, त्यात काही कमी पडत नव्हते, सर्वसामान्य लोकांच्या मानाने आम्ही तसे कम्फर्टेबल जीवन जगत होतो, पण इतर अनावश्यक अवांतर खर्चांना कात्री लावावी लागली. बाजारात आलेल्या नव्या वस्तू घरात आणणे कमी झाले. आजूबाजूचे लोक जी थोडीफार चैन करत होते आणि जी आम्हीसुद्धा आधी उत्साहाने करत होतो ती आता करता येत नसल्यामुळे मन बेचैन झाले होते. एवढे करूनही ते घर ताब्यात येत नव्हते याचा जास्त त्रास होत होता. </p><p>तरी आमच्या सुदैवाने आमच्या घराचे बांधकाम वेळेवरच आणि निर्विघ्नपणे पूर्ण झाले. आम्हाला महापालिकेकडून तसे प्रमाणपत्र मिळाले तेंव्हा तो आनंद साधेपणानेच साजरा केला. मग एक चांगला भाडेकरू मिळाला आणि त्याच्याकडून थोडे डिपॉझिट मिळाल्यावर माझ्या बँकेतल्या खात्यातला खडखडाट संपून थोडी रिस्पेक्टेबल शिल्लक दिसायला लागली. दरमहा येत असलेल्या भाड्यामधून परतफेडीच्या हप्त्यांचा भारही हलका व्हायला लागला आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. आता गाडी रुळावर यायला लागली. </p><p>पण लगेच नवे आवश्यक खर्चही सुरू झाले. मुलांच्या कॉलेजशिक्षणासाठी कॉलेजची फी, त्यांच्या राहण्याजेवण्यासाठी, येण्याजाण्यासाठी खर्च येत होता. पण मी आता अनुभवाने निर्ढावलो असल्यामुळे नवनवीन कर्जे काढून त्याची तरतूद करत गेलो. त्याशिवाय आणखी एक मोठे कर्ज काढून कार घेतली, मग लहान कर्ज काढून घरात कॉम्प्यूटर घेतला. ती कर्जे मी सेवानिवृत्त होईपर्यंत फेडत राहिलो.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - १२</p><p>थोडक्यात सांगायचे झाल्यास मी पहिली वीस वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीला लागलो आणि नोकरीमधली पहिली वीस वर्षे जितका पगार मिळाला त्यातला बहुतेक सगळा खर्च केला. त्यातून घरात ढीगभर सामान आणले असेल, पण बँकेत फारसे काही साठवून ठेवले नाही. त्यानंतरची वीस वर्षे मी कर्जे काढत आणि पगारातून ती फेडत राहिलो. त्यामुळे सेवानिवृत्त व्हायच्या वेळीसुद्धा बँकेत जास्त शिल्लक नव्हतीच. त्यामुळे तोपर्यंत मला बँकेकडून मिळालेले व्याज अगदी क्षुल्लक होते, त्या मानाने मी घेतलेल्या कर्जांवर कितीतरी जास्त व्याज दिले होते. पण तोपर्यंत मी अखेर पूर्णपणे कर्जमुक्त झालो. शिवाय रिटायरमेंट बेनेफिट्समधून एक घशघशीत रक्कम मिळाली. ती बँकेत किंवा पोस्टात ठेऊन आता त्यावर मला व्याज मिळायची सुरुवात झाली.</p><p>मी जर कर्जे काढलीच नसती आणि त्यावर व्याज दिलेच नसते तर कदाचित नोकरीच्या शेवटी तितके पैसे माझ्याकडे साठले असते, पण त्यातून मी फारसे काही विकत घेऊ शकलो नसतो. इतकेच नव्हे तर मी काटकसर करून जितक्या कर्जांची परत फेड केली तेवढे पैसे जरी त्या वेळी वेगळे काढून ठेवले असते तरी त्या जमा केलेल्या पैशामधूनसुद्धा माझे घर आणि गाडी मला रियायर व्हायच्या वेळी मिळाली नसती, कारण त्या वीस वर्षांमध्ये त्या घराची किंमत सातआठ पटीने वाढली होती आणि गाडी घेतल्यानंतर तिची विक्रीची किंमत घटत गेली असली तरी नव्या गाडीची (खरेदीची) किंमत दुप्पट झाली होती. या दोन्हीच्या बाबतीत मी वेळेवर कर्ज घेतले तेच बरे केले असे म्हणावे लागेल.</p><p>त्या काळात काँप्यूटर मात्र दिवसेदिवस स्वस्तच होत गेले आणि जुन्या संगणकाला तर काहीच किंमत राहिली नाही. पण मी जेंव्हा कर्ज काढून तो घेतला होता तेंव्हा मला त्याची गरज होती ती भागली हेच महत्वाचे होते. गरजेचे मोल करता येत नाही. त्या बाबतीत नफा तोटा पहायचा नसतो.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - १३</p><p>सेवानिवृत्त झाल्यावर मला सरकारी पेन्शन मिळायला लागली ती पगाराच्या सुमारे अर्धीच होती पण मुले नोकरीला लागल्यानंतर घरात उरलेल्या आम्हा दोघांसाठी ती पुरेशी होती. शिवाय पोस्ट आणि बँकेकडून थोडे व्याजही मिळत होते, त्यावेळी त्याचीही तितकीशी गरज वाटत नव्हती. त्यामुळे आम्ही काही पैसे घराच्या नूतनीकरणावर खर्च केले, दोघेजण केसरीबरोबर युरोपच्या सहलीवर जाऊन आलो आणि काही पैसे आजारपणात खर्च झाले. असे करून रिटायरमेंट बेनेफिटचे बरेचसे पैसे खर्च होऊन गेले आणि महागाई वाढत गेल्यामुळे उरलेल्या पैशांची किंमत गेल्या सतरा वर्षात फक्त पावपटच राहिली. त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा दरही निम्म्यावर आला. त्याच काळात पेनशनवर मिळणारा महागाईभत्ता वाढत जाऊन पेनशनच्या रकमेचा आकडा वाढत जाऊन चौपट झाला. त्याच्यापुढे हे व्याज अगदीच क्षुल्लक झाले. पेनशनचीही बाजारातली किंमत कमी झाली असली तरी ती तग धरायला पुरेशी आहे, पण मला ती मिळत नसतीच तर?</p><p>मी जन्मभर खाजगी क्षेत्रात काम केले असते तर मला रिटायरमेंटनंतर पेनशन मिळाली नसती, पण चांगला घसघशीत फंड हातात आला असता आणि त्यावर मिळणारे व्याज त्यावेळी पुरेसे वाटलेही असते. पण गेल्या सतरा वर्षांमध्ये मी मिळेल तेवढे व्याज खात गेलो असतो आणि मुद्दलाची किंमत कमी होत होत फक्त एक चतुर्थांश झाली असती. आता व्याजाचे दरही कमी झाल्यामुळे दरमहा मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेचे मूल्य तर पावपटीपेक्षाही कमी झाले असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास माझी पुरती वाट लागली असती. आज बरेचसे वृद्ध लोक या कारणाने त्रस्त झाले आहेत आणि त्यासाठी सरकारला जबाबदार धरून आगपाखड करत आहेत.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - १४</p><p>कुठल्याही वस्तूचे किंवा पदार्थाचे उत्पादन, वाहतूक आणि वितरण वगैरेवर होणारा खर्च वजा करून ते काम करणाऱ्या लोकांना फायदा झाला आणि ती वस्तू किंवा पदार्थ मिळाल्याने ग्राहकांनाही काही आनंद मिळत असेल तर ती साखळी टिकून राहते व वाढत जाते. पण लोभ हा माणसाचा एक स्वभाव असल्यामुळे आपल्यालाच जास्त फायदा मिळावा, त्यामुळे दुसऱ्याचा तोटा झाला तरी चालेल अशी त्याची प्रवृत्ती असते. मागणी आणि पुरवठा यात असमतोल झाला तर वस्तू महाग किंवा स्वस्त होतात. केंद्र आणि राज्य सरकारे आणि नगरपालिका वगैरे राज्यसंस्था उत्पादन आणि व्यापारावर निर्बंध लावतात, तसेच सगळ्यांच्याकडून कर वसूल करतात. शिवाय महापूर, दुष्काळ, रोगराई, युद्धे, अशांतता अशा कारणांमुळे तुटवडा निर्माण होतो. अशा अनेक कारणांमुळे बाजारभावामध्ये सारखे बदल होत असतात. वस्तू, पदार्थ तसेच सेवा यांचे दर कमी किंवा जास्त होत असतात. पण गेल्या सत्तर वर्षांमध्ये मी असे पाहिले आहे की त्यात सातत्याने वाढच होत आली आहे. एकादा पदार्थ काही काळ स्वस्तात मिळाला, तरी त्यानंतर तोही महाग होत गेला किंवा मिळेनासा झाला असेच होत गेले आहे.</p><p>मला यातले समजायला लागल्यापासून दर वर्षी केंद्र आणि राज्य सरकारची अंदाजपत्रके नेहमी तुटीचीच असत आली आहेत. म्हणजे आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या असा प्रकार असतो. असे करण्यामुळे विकासाची गती वाढते असे म्हंटले जाते. पूर्वी जास्त नोटा छापून सरकार ही तूट भरून काढत असे. आता सगळेच व्यवहार कॅशलेस झाल्यामुळे निव्वळ कागदोपत्रीच होत असतात. सरकार ज्यांना पैसे देते तेंव्हा ते पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात आणि ते लोक ज्यांना पैसे देतात त्यांच्या खात्यांमध्ये ते पैसे ई बँकिंगनेच ट्रान्स्फर करतात. प्रत्यक्ष चलनाची देवघेव कमीच होते. पण पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढते. याला चलनफुगवटा असे म्हणतात आणि त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होतो. हे गेली सत्तर वर्षे होत आले आहे. काही काळात काही कारणांमुळे ही महागाई झपाट्याने वाढत गेली आणि काही काळात हळूहळू वाढली एवढेच.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - १५</p><p>उत्पादन, वाहतूक आणि वितरण करण्यासाठी जे भांडवल लागते त्याचा थोडा भाग ते व्यावसायिक स्वतः घालतात आणि उरलेले पैसे बँकांकडून कर्जाऊ घेतात. त्यावर देण्यात येणारे व्याज हासुद्धा एक महत्वाचा खर्च असतो. तो ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. त्यासाठी त्या वस्तूची किंमत वाढवली जाते. महागाई वाढत गेली तर दुकानदाराकडे असलेल्या मालाची किंमत आपोआप वाढून त्याला त्याचा फायदा मिळू शकतो म्हणून तो साठेबाजी करायला लागतो. अशा वेळी सरकार रिझर्व बँकेतर्फे काही उपाययोजना करते. त्यात बँकेने देण्याच्या कर्जावर बंधने घालणे आणि व्याजाचा दर वाढवणे असे आदेश दिले जातात. व्यापाऱ्यांना कर्ज मिळाले नाही किंवा त्यावर जास्त व्याज द्यायचे असले तर तो साठा कमी करण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी किंमती स्थिर ठेवेल किंवा त्यावर डिस्काउंट देईल असा विचार असतो. बँकेला जास्त व्याज मिळत असेल तर ती डिपॉझिटर्सना अधिक व्याज देऊ शकते. काही मोठ्या कंपन्या स्वतःच जनतेकडून जास्त व्याजावर डिपॉझिट्स घेतात. त्यांच्या स्पर्धेमुळेही बँकांना डिपॉझिट्सवर जास्त दराने व्याज द्यावे लागते. </p><p>मी रिटायर झालो त्या काळात महागाई वाढण्याचा दर सुमारे १०% च्या आसपास होता आणि पोस्ट व बँका दीर्घ मुदतीच्या डिपॉझिट्सवर ८-९ टक्के व्याज देत होत्या. म्हणजे खरे तर तेंव्हाही पैशाची खरी किंमत दर वर्षी कमीकमीच होत होती. गेल्या सहा सात वर्षात महागाईत होणाऱ्या वाढीचा दर सुमारे ५-६ टक्क्यावर आला होता. अशा वेळी घरासाठी किंवा वाहनासाठी कर्ज घेणाऱ्यांच्या सोयीसाठी किंवा त्यांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी आपले कर्ज देण्यावरचे व्याजदर कमी केले होते. ज्या लोकांनी घरासाठी कर्ज घेतले होते त्यांचा ईएमआयचा भार थोडा हलका झाला. पण बँक चालायची असेल तर तिला डिपॉझिटर्सना त्याही पेक्षा कमी दरानेच व्याज द्यावे लागते. यामुळे बँकांच्या ठेवीवरील व्याजाच्या दरात कपात होत गेली होती. पण हे व्याज हेच ज्यांचे मुख्य उत्पन्न असेल अशा पेन्शनर लोकांना मात्र त्याचा जबर फटका बसला. एका बाजूला महागाई तर वाढतच होती आणि उत्पन्न मात्र कमी होत होते अशा दुहेरी कात्रीत ते सापडले. त्यांनी याची कल्पना केली नव्हती.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - १६</p><p>पूर्वीच्या काळी श्रीमंत कुटुंबाचे वर्णन करतांना "त्यांच्या सात पिढ्यांनी बसून खाल्ले तरी चालेल" असे सांगितले जात असे. त्यात अतीशयोक्ती होती, तसेच थोडे तथ्यही होते. माझ्या आजोबांच्या काळात खेड्यांमधल्या सगळ्या खाऊन पिऊन सुखी असलेल्या लोकांच्या मालकीच्या जमीनी होत्या आणि त्यावर त्यांची कुळे काम करून अन्नधान्य पिकवत असत. त्यातून आलेल्या धान्यातला एक हिस्सा कुळांना देऊन बाकीचे धान्य मालकांच्या कोठारात भरले जात असे. हे मालक लोक एका दृष्टीने पाहता 'बसूनच खात' असत. त्यातले काही उद्योगी लोक शेतात बांध बांधणे, विहिरी खणणे, ओसाड जमीन लागवडीखाली आणणे, झाडे लावणे अशा सुधारणा करून आपले उत्पन्न वाढवण्याचे काम करत. काही लोक वाचन, लेखन, पठण, प्रवचन, भजन, कीर्तन अशा कामांमध्ये वेळ सत्कारणी लावत असत, पण ती उत्पन्नाची साधने नव्हती. गावातले सुतार, लोहार, कुंभार, विणकर वगैरे बारा बलुतेदार धान्य घेऊन त्यांच्या सेवा आणि त्यांनी तयार केलेले सामान पुरवत असत. याव्यतिरिक्त त्या काळात इतर कुठले खर्च नव्हतेच. त्यामुळे प्रत्येक पिढीतले एकादे कुटुंब जन्मभर घरात बसून खाऊ शकत असे. एकाद्या घरात कुणी कर्ता पुरुष नसला तरी त्या कुटुंबातले वृद्ध आणि बायकामुले यांच्या अन्नाची तरतूद होत असे.</p><p>माझ्या वडिलांना घरात बसून खायचे नव्हते. त्यांनी कॉलेजात जाऊन शिक्षण घेतले आणि नोकरी धरली. त्यांच्या पिढीमधल्या अनेक लोकांनी हा मार्ग धरला. त्यामुळे शेतातल्या उत्पन्नाशिवाय त्यांचे पगार घरी यायला लागले. पण नोकरीसाठी परगावी रहावे लागल्यामुळे त्याबरोबर त्यांचे खर्चही वाढत गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर 'कूळ कायदा' अंमलात आला आणि "कसेल त्याची जमीन" या तत्वावर मालकांच्या हातातून त्यांच्या शेतजमीनी गेल्या आणि नोकरीत मिळणारा पगार हेच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन झाले. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना 'घरात बसून खायची' सोय राहिली नाही. काही तरी कामधंदा किंवा नोकरी करून पैसे मिळवणे आवश्यक होऊन बसले. पण त्या काळात उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीधंद्यांच्या अनेक नव्या वाटा उपलब्ध झाल्या आणि बहुतेक लोकांनी त्यात चांगला जम बसवून प्रगति केली, आपले जीवनमान सुधारून घेतले. मिळणाऱ्या पगारातूनच चार पैसे वाचवून ते बँकेत ठेवायला लागले. अशा प्रकारे या नव्या जीवनपद्धतीत त्यांचा बँकांशी घनिष्ठ संबंध आला.</p><p><br /></p><p>बँकांचे व्याजदर - १७</p><p>शेतीमधील उत्पन्न मुःख्यतः पावसावर अवलंबून असते, वेळेवर आणि हवा तेवढाच पाऊस पडला तर चांगले भरघोस पीक येते, नाहीतर ते कमी येते.जमीनीचा मालक तरुण आणि सुदृढ असला तरी किंवा तो म्हातारा आणि अशक्त झाला तरी त्याला मिळायचे असेल तेवढेच उत्पन्न मिळते. दुकानदारही वयस्क झाला तरी काही वेळ दुकानदारीमध्ये घालवतो. शेती आणि व्यापार यात वयाचे फारसे बंधन नसते, मालक तो अखेरपर्यंत मालकच राहतो आणि त्याला उत्पन्न मिळत राहते. पण नोकरीमध्ये मात्र बहुतेक ठिकाणी एक वय गाठल्यानंतर सेवानिवृत्तीची वेळ येते. त्यानंतर पगार मिळणे पूर्णपणे थांबून जाते, तरीही त्याला पुढे उरलेले आयुष्यभर घरी बसून खायचे असतेच.</p><p>इंग्रज सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये निवृत्तिवेतनाची सोय करून ठेवली होती आणि केंद्र व राज्य सरकारांनी ती अजूनपर्यंत तरी पुढे चालू ठेवली आहे. पुढे ती बंद होणार असल्याचे समजते. पण आहे तोपर्यंत तिचा बऱ्यापैकी आधार आहे. ज्यांना पेन्शन मिळणारच नसते अशा लोकांना मात्र पुढील आयुष्यासाठी आधीपासून नियोजन करावे लागते. सुरुवातीपासूनच भविष्यासाठी काही बचत करून ते पैसे बँकेमध्ये साठवून ठेवत गेलो तर रिटायर होईपर्यंत खूप मोठी गंगाजळी तयार होईल, शिवाय भविष्यनिर्वाह निधि (प्रॉव्हिडंट फंड) आणि ग्रॅच्युइटी मिळणार असतात ते पैसे बँकेत ठेवले तर त्यावर मिळणाऱ्या व्याजामधून आपण सगळे उर्वरित आयुष्य आरामात घालवू अशी काही लोकांची समजूत असते. काही लोक असे सुखेनैव रहात असल्याचे दिसतेही, पण यात काही अनिश्चिततासुद्धा असते हे आपण मागील भागात पाहिले आहे . </p><p>मी याआधीच्या भागांमध्ये लिहिल्याप्रमाणे वाढती महागाई किंवा इन्फ्लेशनमुळे पैशाची किंमत सारखी कमी कमी होत जाते. आतापर्यंत तरी बँकेत मिळणाऱ्या व्याजाचे दर महागाईमधील दर वर्षी होत आलेल्या वाढीच्या दरांपेक्षा कमीच राहिले आहेत असेही मी पाहिले आहे आणि यात फरक पडेल असे मला वाटत नाही. त्यामुळे बँकेत ठेवलेल्या पैशांना दहा बारा वर्षांनंतर पहिल्याइतकी किंमत रहात नाही. ते पैसे शेअर्समध्ये गुंतवले तर त्यांचे भाव वाढत जाऊन गगनाला भिडण्याचीही शक्यता असते किंवा ते कोसळून शून्यावरही येऊ शकतात. तिथे डोळसपणे गुंतवणूक करणे आणि सतत बाजारावर लक्ष ठेऊन योग्य वेळी ते विकून टाकणे हे ही महत्वाचे असते.</p><p>मेडिकल शास्त्रांमध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे निरनिराळ्या तपासण्या आणि उपचार यामधून आता आयुर्मान वाढत चालले आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य किती असेल आणि त्यातली किती वर्षे आपण धडधाकट राहू हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे नेहमीच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही जोपर्यंत शक्य असेल तोवर काही तरी हालचाल करून चार पैसे मिळवत आणि ते साठवत राहणे शहाणपणाचे असते आणि बरेच लोक ते करतांना दिसतात.</p><p><br /></p><p>(समाप्त)</p><p><br /></p><p>*******************************************************************************</p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p> </p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-19509049724614175162022-09-25T07:56:00.007-07:002023-05-03T23:59:06.400-07:00जमखंडीची देवस्थाने<p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTpNthaIbdA7Frxxbby24El33R1qKgwRl8hZ4nJoWTrZuhm8lvUne81r-HoGL5jq5GbxZ8pJoYX9SFSalHC_UT08NQVIIIFvbo5Hl33EmZGchppZVHjkahQrZRr8Z5RptOFRbniyaiEJlnGffARnQSyVuVKvb6OHLo08XB9M9WrLy-rkEI5qs/s1156/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1156" data-original-width="867" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTpNthaIbdA7Frxxbby24El33R1qKgwRl8hZ4nJoWTrZuhm8lvUne81r-HoGL5jq5GbxZ8pJoYX9SFSalHC_UT08NQVIIIFvbo5Hl33EmZGchppZVHjkahQrZRr8Z5RptOFRbniyaiEJlnGffARnQSyVuVKvb6OHLo08XB9M9WrLy-rkEI5qs/w300-h400/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpeg" width="300" /></a></div><br /><b> आमची जमखंडी</b> हा मुख्य ब्लॉग या पानावर पहा <a href="https://anandghan.blogspot.com/p/blog-page_38.html">आनंदघन: आमची जमखंडी (anandghan.blogspot.com)</a><p></p><p>माझे लहानपण १९४५ ते १९६१ या काळात जमखंडी गावात गेले. ते आधी एक संस्थान होते, स्वातंत्र्य मिळाल्यावर मुंबई इलाख्यात विलीन झाले, राज्यपुर्रचनेनंतर ते मैसूर राज्यात गेले आणि त्या राज्याचे नाव कालांतराने बदलून कर्नाटक असे झाले. माझ्या लहानपणच्या काळातले तिथले वातावरण बरेचसे धार्मिक होते. लहान मुलेसुद्धा भक्तीभावाने देवळात जाऊन देवांच्या पाया पडत असत, साष्टांग नमस्कार आणि प्रदक्षिणा घालीत असत, उत्साहाने भजन करत असत आणि उत्सुकतेने कीर्तन ऐकत असत. त्या काळात घरात कुठलीच करमणुकीची साधने नव्हती, गावात एक सिनेमा थेटर होते, पण मुलांनी सिनेमा पाहणे जवळ जवळ वर्ज्य होते, मी जे दोन चार चित्रपट पाहिले ते सगळे धार्मिक होते. देवळातले भजन, कीर्तन यासारखे कार्यक्रम ही सुद्धा एक प्रकारची मौज वाटत असे आणि मित्रांच्या घोळक्यात रमतगमत देवांच्या जत्रेला जाणे ही आमची पिकनिक असायची. मी ते गाव सोडून आता साठ वर्षे होऊन गेली असली तरी माझ्या काही जुन्या आठवणी ताज्या राहिल्या आहेत आणि मी त्यांच्या आधारानेच हा लेख लिहीत आहे. मात्र इथे दिलेली छायाचित्रे अलीकडच्या काळातली आहेत.</p><p>अर्थातच गावातल्या गल्लीगल्लीमध्ये निरनिराळ्या देवतांची मंदिरे होती आणि सोमवारी शंकराच्या, मंगळवारी देवीच्या, गुरुवारी दत्ताच्या अशा प्रकारे वार आणि तिथीनुसार त्या त्या देवतांच्या देवळांमध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत असे. शिवाय वर्षातल्या ठराविक काळात त्यांचे उत्सव दणक्यात साजरे केले जात असत आणि त्या निमित्याने खास कार्यक्रम ठेवलेले असत. जमखंडीहून पायी चालत जाता येईल एवढ्या अंतरावर असलेल्या काही देवस्थानांच्या ठिकाणी वार्षिक जत्रा भरत, एका ठिकाणी अबूबकरचा उरूसही भरत असे. अशा वेळी त्या त्या जागी आजूबाजूच्या खेड्यांमधले लोकही येऊन गर्दी करत असत.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjuZ2Fq0f94sK7CmGZIIgatV4E75WPY7-QLan87tqMrtrQpUjmUMK7WrQtRzXjGOw92aFwBPTjxdkqoqBZzorkxmDEi5qJYm64t7Z5eHEQJr1OgmZJMSFDVLMiYP9hFSFWOQkhYfewL-5eiltO9DlMr2MeDW-2U-aMjZ-ijHk-untNgMhUkQpQ/s1280/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="961" data-original-width="1280" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjuZ2Fq0f94sK7CmGZIIgatV4E75WPY7-QLan87tqMrtrQpUjmUMK7WrQtRzXjGOw92aFwBPTjxdkqoqBZzorkxmDEi5qJYm64t7Z5eHEQJr1OgmZJMSFDVLMiYP9hFSFWOQkhYfewL-5eiltO9DlMr2MeDW-2U-aMjZ-ijHk-untNgMhUkQpQ/s320/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpeg" width="320" /></a></div><br /><p>जंबुकेश्वर हे जमखंडीतले पुरातन काळातले देवस्थान आहे, ते जागृत समजले जात असे. तिथे काही शतकांपूर्वी संपूर्णपणे दगडांनी बांधलेले शंकराचे अतिप्राचीन देऊळ आहे. त्याचे खांब, तुळया, छत वगैरे सगळे काही दगडांच्या मोठमोठ्या फरशांनी तयार केले आहे. तिथे प्राचीन काळापासूनची शंकराची पिंडी तर आहेच. अलीकडच्या काळात तिथे एक शंकराची भव्य अशी मूर्ती स्थापन केली आहे. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEidv2PP5ekJixyoGeiwrLGs6QKBGqElmPsiUDPUD7pL65BeJJRD5_zoKcJ18YNFp5iJeT4wf7qcAHAhSW9gB-FFjfLEk0JOrw2NUxFgiTuwxI9HjlvpEqKp3UrjW9v4EVGl2jccYhBMwlFeyYxGollMNo2GD9rFuLdFl78igkbvlAcBuIhpqQw/s1500/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1500" data-original-width="1500" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEidv2PP5ekJixyoGeiwrLGs6QKBGqElmPsiUDPUD7pL65BeJJRD5_zoKcJ18YNFp5iJeT4wf7qcAHAhSW9gB-FFjfLEk0JOrw2NUxFgiTuwxI9HjlvpEqKp3UrjW9v4EVGl2jccYhBMwlFeyYxGollMNo2GD9rFuLdFl78igkbvlAcBuIhpqQw/w640-h640/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpg" width="640" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;">जंबुकेश्वराच्या देवळाजवळच शंकरमठाची भव्य वास्तू उभारण्यात येत आहे.</div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiV4gp-Dc77Tx-JO1gKsrSjUYUnv3EPg7h3cCuo9XHsiLVr7b27i1JWv7YHgI-kBKDvhXQZwNCG-jqa_fiY3AmIrGmikz1NQyNr-XH6m0TzSGRRNMvaqI6QRMBW3JVodwYiU9v7QX4TmvK-jZLQ71vV_dLVm6FV5rRsPabp2DJxk_DHmFiCxS0/s1040/Shankat%20Math.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="780" data-original-width="1040" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiV4gp-Dc77Tx-JO1gKsrSjUYUnv3EPg7h3cCuo9XHsiLVr7b27i1JWv7YHgI-kBKDvhXQZwNCG-jqa_fiY3AmIrGmikz1NQyNr-XH6m0TzSGRRNMvaqI6QRMBW3JVodwYiU9v7QX4TmvK-jZLQ71vV_dLVm6FV5rRsPabp2DJxk_DHmFiCxS0/w400-h300/Shankat%20Math.jpg" width="400" /></a></div><br /> </div><br /><p><span style="font-size: large;"><b>उमारामेश्वर मंदिर</b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEikenVrge_U4hBw94GS1Zxn4_577rEKWejSYnJtYDC1NLdkX2uWAIqIVc6ZYlQTgBWB83XxTfJ4aSTBjApwlbmecsg2W5nf9caQIkPJ33BMV_FYnL_Z3VWJLTK3kKzd7Y2YO9Q2tqCPwm453L4-WLn56wlITep7MenCRP-9Q_PKe6Xcj1EUBYk/s1600/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1200" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEikenVrge_U4hBw94GS1Zxn4_577rEKWejSYnJtYDC1NLdkX2uWAIqIVc6ZYlQTgBWB83XxTfJ4aSTBjApwlbmecsg2W5nf9caQIkPJ33BMV_FYnL_Z3VWJLTK3kKzd7Y2YO9Q2tqCPwm453L4-WLn56wlITep7MenCRP-9Q_PKe6Xcj1EUBYk/s320/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpeg" width="240" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg2WjLGH5ZAzP6k1aH7Cj3IPI_zlfrDkR17kF46rLR7ltUtI6eWB37Fai1o_FmkQ9-LA02CDyNDHi2BN18t-_uG1XJ1lNOtPuhiWkY7MSwjjAxRVz88UhFZXdZVbn8aNySjqP7oJYXnHOjbQ5Invpj-wkbWc-3PFzCihEbpltimBI2xYGBZIwA/s1600/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%A8.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg2WjLGH5ZAzP6k1aH7Cj3IPI_zlfrDkR17kF46rLR7ltUtI6eWB37Fai1o_FmkQ9-LA02CDyNDHi2BN18t-_uG1XJ1lNOtPuhiWkY7MSwjjAxRVz88UhFZXdZVbn8aNySjqP7oJYXnHOjbQ5Invpj-wkbWc-3PFzCihEbpltimBI2xYGBZIwA/s320/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%A8.jpeg" width="320" /></a></div><br /><p>उमारामेश्वर नावाचे त्या मानाने आधुनिक, तरीही आता शंभर दीडशे वर्षाहून जुने असे शंकराचे दुसरे मंदिर आहे. माझ्या लहानपणी तर ते खूपच प्रेक्षणीय वाटायचे. हे देऊळ जमखंडीच्या संस्थानिकाने बांधले होते आणि त्याला राजाश्रय होता. त्याची रंगरंगोटी आणि सजावट राजेशाही थाटात होत असे. या देवळाच्या सभागृहात चक्क काचेची मोठमोठी हंड्याझुंबरे टांगलेली होती. देवळाच्या बाहेर कमान, कारंजे आणि प्रशस्त मोकळी जागा होती. जमखंडी संस्थान विलीन झाल्यानंतर राजेसाहेबांच्या खाजगी मालमत्तेची एक कचेरी या देवळाच्या एका भागात होती. जवळच असलेल्या सरकारी कचेरीत मामलेदार आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांची ऑफिसेस होती.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhSH8lZ87wsuM5QWZhARvws8w4fNZnzdK7KDEIxrmfqyQOxezCTL7D4mRDc1-8UCRtaGMaIlzN_MiEADldu7SITQMDd7CMSWhFF97AmCXdNYlCi7HUuo-QGwEMKImfctvugfP2cS8MZkTBLibyRwgd4sH9rFNNvi_osfpYcgjUKDGmXz-0RQIY/s1600/Mahadev%20devasthane.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1300" data-original-width="1600" height="325" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhSH8lZ87wsuM5QWZhARvws8w4fNZnzdK7KDEIxrmfqyQOxezCTL7D4mRDc1-8UCRtaGMaIlzN_MiEADldu7SITQMDd7CMSWhFF97AmCXdNYlCi7HUuo-QGwEMKImfctvugfP2cS8MZkTBLibyRwgd4sH9rFNNvi_osfpYcgjUKDGmXz-0RQIY/w400-h325/Mahadev%20devasthane.jpeg" width="400" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="text-align: left;">आमच्या हायस्कूलच्या पलीकडे एक शंकराची लहानशी घुमटी होती. लहान मुलांनाही वाकून किंवा बसून तिच्या आत जावे लागावे इतका छोटासा दरवाजा होता आणि आत गेल्यावर उभे राहतासुद्धा येत नव्हते. तो रस्ता पुढे एसटी स्टँड आणि पोलो ग्राउंड नावाच्या मैदानाला जातो. आम्ही लोक जाता येता या शंभोला हात जोडून पुढे जात असू. गावाला लागून असलेल्या एका डोंगराच्या शिखरावर मेलगिरीलिंगप्पाची घुमटी होती. तीच आमची पर्वती आणि तेच आमचे माउंट एव्हरेस्ट होते आणि आम्ही मुले मुले मिळून तिथे नेहमी गिर्यारोहण करत असू. याशिवायही गावात आणखी काही शिवालये होती आणि आहेत.</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="text-align: left;"><br /></span></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjM6kACLGtg7jI13p_8FCRcX46F8JlwN8nj0pzYGuJpBNBMyfihKcoe7801Xs5ZZIqlY4Ax4wa4Qy3JAAyfbVYzO7cNsxIcj8GgFeqH0st6g4en6DUyKw2Qd7wCNFWbV7BtOvY2VMw1QqS2BHbippPFQM0XVQV6JobcWr62yl5Fa515_IBZPcY/s1600/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%20%E0%A5%A8.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjM6kACLGtg7jI13p_8FCRcX46F8JlwN8nj0pzYGuJpBNBMyfihKcoe7801Xs5ZZIqlY4Ax4wa4Qy3JAAyfbVYzO7cNsxIcj8GgFeqH0st6g4en6DUyKw2Qd7wCNFWbV7BtOvY2VMw1QqS2BHbippPFQM0XVQV6JobcWr62yl5Fa515_IBZPcY/w400-h300/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%20%E0%A5%A8.jpg" width="400" /></a></div><p>त्या काळातल्या जुन्या गावाच्या मधोमध एक मारुतीचे देऊळ आहे. ते आमच्या अत्यंत आवडीचे ठिकाण होते. रोज संध्याकाळी खेळून परत येतांना आम्ही सगळी मुले मिळून आधी त्या देवळात जाऊन मारुतीरायाचे दर्शन घेत असू आणि नंतर आमची आपापल्या घराच्या दिशेने फाटाफूट होत असे.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgne4xuE3zomfehJv7TkCH_GbVb8etJDB3VnpudX_rT2kjPiOYH0OxE9cuv40QVoo61HSt54NzJ6Wo0ZJmSBS8-8yOyprsVg-WlDhgZj4tyeq5bdZGX2gie2CkROV51TYbHq2M0T5X00_K9vNyTsjR1bMEtM0G4JZFZqXBt5W_r8vJa9WKX3AI/s1600/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%20%E0%A5%AA.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgne4xuE3zomfehJv7TkCH_GbVb8etJDB3VnpudX_rT2kjPiOYH0OxE9cuv40QVoo61HSt54NzJ6Wo0ZJmSBS8-8yOyprsVg-WlDhgZj4tyeq5bdZGX2gie2CkROV51TYbHq2M0T5X00_K9vNyTsjR1bMEtM0G4JZFZqXBt5W_r8vJa9WKX3AI/w400-h300/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%20%E0%A5%AA.jpg" width="400" /></a></div><br /><p> या मारुतीची उभी मूर्ती एका प्रचंड शिलाखंडावर समोरच्या बाजूने कोरलेली आहे आणि पाठीमागचा भाग सपाट आहे. त्याला अगदी खेटून प्रदक्षिणा घालता येण्याएवढी चिंचोळी मोकळी जागा सर्व बाजूंनी ठेवली आहे. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiIxtrYh0418s5B7jtVPR2l4RcEdEcUK5xYtshOyXu3fC9Kt4sAhF19EwonhbeF3XV69irqzZUYrgzB4jqoyDiFlsy9LxBQDmKg6OTLl5BG0zL1fC1Bgr0kc686EvXqUgb6D5NTnrEIleBu0rWkeXHPSEfNlwZ_fE3w0now21fGD2DP-AmfzxE/s1600/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%20%E0%A5%AB.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiIxtrYh0418s5B7jtVPR2l4RcEdEcUK5xYtshOyXu3fC9Kt4sAhF19EwonhbeF3XV69irqzZUYrgzB4jqoyDiFlsy9LxBQDmKg6OTLl5BG0zL1fC1Bgr0kc686EvXqUgb6D5NTnrEIleBu0rWkeXHPSEfNlwZ_fE3w0now21fGD2DP-AmfzxE/w400-h300/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%20%E0%A5%AB.jpg" width="400" /></a></div><br /><p>दर शनिवारी तिथे नारळ फोडणे आणि देवाला तेल वाहणे यासाठी लोक गर्दी करत असत.शेजारच्या दुकानात त्यासाठी नारळांचे ढीग आणि लहान लहान तेलाचे बुधले विकायला मांडून ठेवलेले असत. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWxOGNHFmZyQyKMKDo4_G8josCPCXLiVv1yUxlItb5OFCPa1xW2xA2Vys1y_WoqFAncRd39XPxNtmQpYa5A1R9pYdVN6qhbPXMiaxc87gbmGuIsMv0lZIkh6ECWxeKbxvF4E0B67SLpRgklAAUiYIsrnu0poCybPu0zTkxe8oe-8yrHxO9KW8/s1600/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%20%E0%A5%A9.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWxOGNHFmZyQyKMKDo4_G8josCPCXLiVv1yUxlItb5OFCPa1xW2xA2Vys1y_WoqFAncRd39XPxNtmQpYa5A1R9pYdVN6qhbPXMiaxc87gbmGuIsMv0lZIkh6ECWxeKbxvF4E0B67SLpRgklAAUiYIsrnu0poCybPu0zTkxe8oe-8yrHxO9KW8/w400-h300/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%20%E0%A5%A9.jpg" width="400" /></a></div><br /><p>आता या देवळाचे मूळ स्वरूप तसेच ठेऊन त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे आमि मारुतीरायाची एक भव्य मूर्ती त्याच्या माथ्यावर उभी करण्यात आली आहे.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZphsJhlYbHridA7iOIZ5PxmDYHVpaEUr4O7v_tLMby6FtxSqbdb7r2lh2n1zhKcc5h86rWGARR3GG8bTXFwaYRQdr7WHzA4aQNRQ6GIyzae5-sw-MRcfw364rI1MResv47BJIcCLbywPo76TbySSDl-jTctN3fn9jALWNL7GoJw_-6ExqDDI/s1600/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%20%E0%A5%A7.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZphsJhlYbHridA7iOIZ5PxmDYHVpaEUr4O7v_tLMby6FtxSqbdb7r2lh2n1zhKcc5h86rWGARR3GG8bTXFwaYRQdr7WHzA4aQNRQ6GIyzae5-sw-MRcfw364rI1MResv47BJIcCLbywPo76TbySSDl-jTctN3fn9jALWNL7GoJw_-6ExqDDI/w400-h300/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%20%E0%A5%A7.jpg" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>मारुतीच्या देवळापासून पूर्वेच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर दत्ताचे देऊळ होते. त्याच्या गाभाऱ्यात तीन शिरे सहा हात असलेली दत्तात्रेयाची सुबक मूर्ती होती आणि बाहेर प्रशस्त सभामंटप होता. गाभाऱ्याच्या पाठीमागेही प्रशस्त जागा होती, त्यात एक औदुंबराचा वृक्ष होता. त्या देवळातही भजनकीर्तनाचे कार्यक्रम होत असत. एकदा त्या देवळासमोरच्या रस्त्यावर चक्क पं.भीमसेन जोशी यांचे गायन झाले होते. या देवळात येणाऱ्या लोकात गावातल्या मराठी भाषिक (कोकणस्थ) लोकांची जास्त संख्या असे.</p><p>मारुतीच्या देवळापासून दक्षिणेच्या दिशेने पुढे गेल्यावर एक आडवी गल्ली येत असे. त्या गल्लीत गणपतीचे देऊळ होते. तिथे बसायला भरपूर मोठी जागा होती आणि अनेक धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. ते आमच्या घरापासून ते थोडे दूर असले तरी माझे नेहमी तिथे जाणे होत असे. त्यापेक्षाही दूर एक रामाचे देऊळ होते. तिथे रामनवमीला उन्हाचे चटके खात आम्ही जात असू. द्वारकानाथ नावाचे एक कृष्णाचे देऊळ होते, पण कृष्णजन्मासाठी मध्यरात्री तिथपर्यंत जायची हिंमत होत नव्हती. मी कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो आहे, पण जमखंडीच्या अंबाबाईच्या देवळात गेलो तर मुले चिडवतील म्हणून मी सहसा जात नसे. ते बहुधा महिलावर्गासाठी राखीव होते. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6KHxkvAkuomRSs1F1KDyQ1qb6bGuEK9LrYwVLNxY_HD04ggZqlf3uGjdgMGkldzzsGc3D2xCTVjum_Lt5pRIq4Q8AWPY9yWGSVfFIKdYRTd8o0oK-YTj1Po6sWfMRWDtqBHvEcIxvQ6dAyIjpMMyn4VLhwl3estB-fhsNnuihW1wlEtXDnMs/s1440/ViThoba%20Temple.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1440" data-original-width="1230" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6KHxkvAkuomRSs1F1KDyQ1qb6bGuEK9LrYwVLNxY_HD04ggZqlf3uGjdgMGkldzzsGc3D2xCTVjum_Lt5pRIq4Q8AWPY9yWGSVfFIKdYRTd8o0oK-YTj1Po6sWfMRWDtqBHvEcIxvQ6dAyIjpMMyn4VLhwl3estB-fhsNnuihW1wlEtXDnMs/w341-h400/ViThoba%20Temple.jpg" width="341" /></a></div><br /><p><br /></p><p>आमच्या घराच्या अगदी जवळ एक विठोबाचे देऊळ होते. त्याच्या समोर अप्पासाहेबांची विहिर होती. ज्यांच्या घरी नळाचे कनेक्शन घेतले नव्हते असे आमच्या बोळातले लोक तिथून पाणी भरून आणत असत. या देवळात विठ्ठल आणि रखुमाईच्या सुबक काळ्या दगडातल्या मूर्ती होत्या. सभामंटपात सगळ्या संतांच्या सुंदर तसबिरी लावलेल्या होत्या. माझ्या लहानपणच्या काळात ते गावातले सर्वात जास्त अॅक्टिव्ह देऊळ होते. तिथे नेहमी संध्याकाळी टाळमृदुंगाच्या तालावर भजन होत असे, फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून एकनाथषष्ठीपर्यंत उत्सव असे. त्या वेळी एक भक्त गळ्यात वीणा अडकवून आणि हातात चिपळ्या धरून दिवसभर सतत विठ्ठलाचे नामस्मरण करत असे, भजनांमध्ये भारुडे वगैरे नाचत म्हंटली जात असे. दर आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूर यात्रेसाठी तिथून वारकरी जात असत. दहापंधरा दिवस आधी ते गावातून पालखी घेऊन दिंडी काढत असत.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiwfdSJsdDs6kjlJ63KpRRo7HOMrV_NXNcO2_BCifsPknH-qJGL_fNqpAw1e1tI4W2Wl2sM9oFjBseTG-oS60SCVwd0pLFm28f2EWS5xKlqPuh0m6knyBJ4UEKslV3UuLeBrYO8yfXyUjbUYnsXsM2omy-kSKV_zDw3o2jsRZMml57L6XQcjQY/s1200/jamakhandi1R.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="600" data-original-width="1200" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiwfdSJsdDs6kjlJ63KpRRo7HOMrV_NXNcO2_BCifsPknH-qJGL_fNqpAw1e1tI4W2Wl2sM9oFjBseTG-oS60SCVwd0pLFm28f2EWS5xKlqPuh0m6knyBJ4UEKslV3UuLeBrYO8yfXyUjbUYnsXsM2omy-kSKV_zDw3o2jsRZMml57L6XQcjQY/w400-h200/jamakhandi1R.jpg" width="400" /></a></div><br /><p> जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नसत ते त्या दिंडीतच नाचून आणि गाऊन यात्रेचा आनंद घेत असत. मी शाळेच्या शेवटच्या एक दोन वर्षात असतांना या देवळाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्या काळात माझे वडील नेहमी त्याच कामात गुंतलेले असायचे.</p><p><br /></p><h2 style="text-align: left;">रामतीर्थ</h2><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdVIVC6I_5Gy7lhdT6YkkPvlXlHoS051eAfKgPCAVlxW39Xg6_s9zRkXsYJMeNAN-qzqE0XEvO4v8cRJwIOtQxOwx-qo2M-MCT4OZ-BJeIY9QsljWxdDpjEdAijTOX5lMPJAqchDpWoz6kTEIJqQz9MMQJTcMGvD1Gjjof_FqEHukytMy0P38/s1280/RamTirth%20Rameshwar%20temple.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="972" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdVIVC6I_5Gy7lhdT6YkkPvlXlHoS051eAfKgPCAVlxW39Xg6_s9zRkXsYJMeNAN-qzqE0XEvO4v8cRJwIOtQxOwx-qo2M-MCT4OZ-BJeIY9QsljWxdDpjEdAijTOX5lMPJAqchDpWoz6kTEIJqQz9MMQJTcMGvD1Gjjof_FqEHukytMy0P38/w486-h640/RamTirth%20Rameshwar%20temple.jpeg" width="486" /></a></div><br /><div><br /></div><p>जमखंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रामतीर्थ नावाच्या ठिकाणी थोड्या उंचावर तिथल्या संस्थानिकांचा अत्यंत सुरेख असा राजवाडा होता. त्याच्या परिसरात पण खालच्या पातळीवर रामेश्वराचे सुंदर देऊळ होते. त्यात एक सुबक असा नंदी आणि शंकराची पिंडी होती. त्या देवळाच्या समोर बांधलेल्या पुष्करणीमध्ये नेहमी पाणी भरलेले असे आणि त्यात बरेच मासे असायचे. तिच्या बाजूला रस्त्यातच एक स्फिंक्सचे लहानसे मॉडेल वाटावे असे काहीतरी होते, त्याला धार्मिक महत्व नव्हते. आजूबाजूला आणखीही काही देवळे होती. दर वर्षी श्रावण महिन्यातल्या दर सोमवारी तिथे जत्रा भरत असे. मंदिरातल्या शंकराच्या पिंडीवर बुत्तीपूजी बांधली जात असे. हा प्रघात अजूनही चालू आहे. शेवटच्या सोमवारी शंकराच्या प्रतिमेची रथयात्रा काढली जात असे. आमच्या शाळेलाही सोमवारी दुपारचा अर्धा दिवस सुटी असायची आणि आम्ही सगळी मुले मिळून घोळका करून त्या जत्रेला जात असू. मला त्या जत्रेसाठी एक आणा मिळत असे. सगळे मित्र मिळून काही खाद्यपदार्थ विकत घेऊन आणि एकत्र बसून ते खात असू.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBxxUDDQlnEHGaIsuQtDiC_joIDI1bcOhOwXLyB3XdilMbR0-w1abHAs2Vw1-Xfewadj59dnIIebgx8BfP7yF56oeMqyAZvTSSeo8SbJjOigT3Eo8yXmn6Xjb3VjNARxRxMBqOp6mc2CSZVWRfomtIdh4PmGlYxcHL-nKaISc4Z_YnpCP6ZCI/s1450/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE.png" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="820" data-original-width="1450" height="226" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBxxUDDQlnEHGaIsuQtDiC_joIDI1bcOhOwXLyB3XdilMbR0-w1abHAs2Vw1-Xfewadj59dnIIebgx8BfP7yF56oeMqyAZvTSSeo8SbJjOigT3Eo8yXmn6Xjb3VjNARxRxMBqOp6mc2CSZVWRfomtIdh4PmGlYxcHL-nKaISc4Z_YnpCP6ZCI/w400-h226/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE.png" width="400" /></a></div><br /><p><br /></p><h2 style="text-align: left;">कल्हळ्ळी</h2><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgX-SDqkFohJKrYi57vFAW7YHA1kWw3wg7GEH62tm8k2AoyioykKLQL4irslWF6150PimFDwTcOgEAhVE1lBcikO0I8cSNuME9v2g2FFUtLDY8yh2o6e7pTAQyEMv56gtJcRgufzzMPG9QBcFU-dN5MykZE-VGJhnOXZJpkWRF7qHwv6dV8it0/s1156/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A5%80%20%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%20%E0%A5%A7.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1156" data-original-width="867" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgX-SDqkFohJKrYi57vFAW7YHA1kWw3wg7GEH62tm8k2AoyioykKLQL4irslWF6150PimFDwTcOgEAhVE1lBcikO0I8cSNuME9v2g2FFUtLDY8yh2o6e7pTAQyEMv56gtJcRgufzzMPG9QBcFU-dN5MykZE-VGJhnOXZJpkWRF7qHwv6dV8it0/w300-h400/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A5%80%20%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%20%E0%A5%A7.jpeg" width="300" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><br /><div>हे त्या भागातले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तिरुपतीच्या श्रीव्यंकटेशाने आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी तिथे येणे केले आणि तो तिथेही कायमचा राहिला आहे अशी त्याच्या भक्तांची दृढ श्रद्धा आहे. जमखंडीत तर त्याचे असंख्य भक्त आहेतच, मुंबईपुण्यात स्थायिक झालेले कित्येक लोक दर दोनचार वर्षात एकदा जमले तर सहकुटुंब, नाहीतर एक एकटे तरी जमखंडीमार्गे कल्हळ्ळीला जाऊन देवाच्या पाया पडून येत असतात. मोठ्या रस्त्याने गेल्यास ते स्थान सुमारे आठ किलोमीटरवर आहे, पण आम्ही नेहमी डोंगऱ्यातल्या पायवाटेने चालत जात होतो आणि सव्वा ते दीड तासात पोचत होतो. </div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgo-ln91_3bfMXG3i6chVklGlkzamdET79trSpeMUTygd_VaYXnVj6q9ogqe1VKqnuGOJyuzXr09PeVSnbs8wThGBnh4Cj6ABvBMiUmRRJKdjOpVhWTPuI740DuhjkLPZGUQ_VCmgAjsI0vTu_i03OQ_UVaXJ-LdS5b44UaY9cDRuKoszVZWmU/s1600/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgo-ln91_3bfMXG3i6chVklGlkzamdET79trSpeMUTygd_VaYXnVj6q9ogqe1VKqnuGOJyuzXr09PeVSnbs8wThGBnh4Cj6ABvBMiUmRRJKdjOpVhWTPuI740DuhjkLPZGUQ_VCmgAjsI0vTu_i03OQ_UVaXJ-LdS5b44UaY9cDRuKoszVZWmU/w400-h300/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C.jpeg" width="400" /></a></div><br /><div><br /></div><p>या स्थानाची भौगोलिक रचना काहीशी तिरुपतीसारखी आहे. इथेही उंचवट्याच्या तळाशी सपाट जमीनीवर गोविंदराजाचे देऊळ आहे त्यात शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. त्या देवळाच्या आवारात तीन चार दगड रचून एक लहानसे घर बांधले तर त्या माणसाचे स्वतःचे घर होते असे म्हणत असत म्हणून आम्ही आधी दहा पंधरा मिनिटे तिथे पडलेले गोल किंवा चपटे दगड गोळा करून घरे बांधत असू. </p><p>तिथून पन्नास साठ पायऱ्या चढून वर गेल्यावर एक मोठी कमान आहे. तिच्यातून आत गेल्यावर प्रशस्त अशी सपाट मोकळी जागा आहे. त्यात वेंकटेशाचे मोठे सुबक असे मंदिर आहे. त्याच्या सभामंटपाच्या भिंतींवर त्या काळी पौराणिक कथांच्या गोष्टी चित्रांमधून रंगवलेल्या होत्या. गाभाऱ्यात श्रीव्यंकटेशाची सुबक मबर्ती आहे. तिला नेहमी उंची वस्त्रप्रावरणे आणि अलंकारांनी छान सजवलेले असे. तेंव्हा तिथे विजेचे दिवे नव्हते, मोठमोठ्या समयांच्या प्रकाशातच जेवढे दिसत असेल तेवढे त्याचे दर्शन घडत असे.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgUmiymSTMdKKD1-uTUPfUoUFsMJGGN8zBK5cHLGQheFjtqknb3-t-moN3PZ9TsIEhsb0tL2JDbZcis6c0HfJeyVPYR0RhHfeSU0dfO-1k1hhmESxxmQpxJJxG_06YpTfXg6uLmpWLUc2QwqmNDqPuAUt80EeqJuoAqAggoJjlV9edwczXWVxQ/s1800/Kalhalli%20Temples%201.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1734" data-original-width="1800" height="616" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgUmiymSTMdKKD1-uTUPfUoUFsMJGGN8zBK5cHLGQheFjtqknb3-t-moN3PZ9TsIEhsb0tL2JDbZcis6c0HfJeyVPYR0RhHfeSU0dfO-1k1hhmESxxmQpxJJxG_06YpTfXg6uLmpWLUc2QwqmNDqPuAUt80EeqJuoAqAggoJjlV9edwczXWVxQ/w640-h616/Kalhalli%20Temples%201.jpg" width="640" /></a></div><br /><p> मुख्य देवळाच्या आजूबाजूला इतर देवतांची अनेक मंदिरे आहेत, त्यातले एक वराह अवताराचे आहे. या सगळ्या देवळांना मिळून प्रदक्षिणा घालण्यासाठी एक रुंद रस्ता आहे. दर वर्षी नवरात्रात भरणाऱ्या जत्रेत एका दिवशी व्यंकोबाच्या उत्सवमूर्तीला रथात बसवून त्या रस्त्यावरून पूर्ण प्रदक्षिणा घालून आणत असत. एका लांबलचक दोराला धरून भक्तमंडळीच त्या रथाला ओढून नेत असत. तिरुपतीप्रमाणे इथेही रुक्मिणी रुसून दूर रानात जाऊन बसली आहे. तिथे तिचे पद्मावती नावाने वेगळे मंदिर आहे, पण वेंकटेशाचे सगळे भक्त तिच्या दर्शनाला जात नाहीत. त्यामुळे तिथे गर्दी नसे.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCOIAVfLPpR4yfG6WZ1XRS3Oc32kjAw3485fWbmi5cegNb_ROcAw0O76VFBkiz2ZL8z3Z8o59cSNv__nglbuY_YMMtXImCoXJRbCkVeYIt3FMmlSAkQxKSPcl4CmirrVsBMcvgQFHbEk7cEuLlbpUbjw9bL46C4HCJ3nnHhC3rtXvBS-D6PlU/s1156/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%B0%E0%A4%A5.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1156" data-original-width="867" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCOIAVfLPpR4yfG6WZ1XRS3Oc32kjAw3485fWbmi5cegNb_ROcAw0O76VFBkiz2ZL8z3Z8o59cSNv__nglbuY_YMMtXImCoXJRbCkVeYIt3FMmlSAkQxKSPcl4CmirrVsBMcvgQFHbEk7cEuLlbpUbjw9bL46C4HCJ3nnHhC3rtXvBS-D6PlU/w300-h400/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%B0%E0%A4%A5.jpeg" width="300" /></a></div><br /><p><br /></p><p>नवरात्रात होणाऱ्या उत्सवाच्या काळात तिथे जत्रा भरत असे. काही निष्ठावान भक्त नवरात्रात रोज पहाटे उठून चालत चालत कल्हळ्ळीला जाऊन आधी व्यंकोबाचे दर्शन घेत असत. आम्ही मात्र रथयात्रेच्या मुख्य दिवशी मात्र न चुकता त्या जत्रेला जात असू. त्या दिवशी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणाऱ्यांची गर्दी मुंबईतल्या लोकलपेक्षाही जास्त असायची. त्या काळात तरी तिथे रांग हा प्रकार नव्हता. आम्ही धक्काबुक्की करूनच कसेबसे आत घुसून बाहेर पडेपर्यंत घामाघूम होत असू. पण देवाच्या दर्शनासाठी तेवढे तरी कष्ट करायला हवेतच. कधीकधी त्याशिवाय इतर दिवशीही कल्हळ्ळीला जाऊन यायचा कार्यक्रम ठरवत असू. तेंव्हा निवांतपणे दर्शन घेऊन काही स्तोत्रे किंवा श्लोक म्हणायलाही मिळत असे.</p><p><br /></p><h2 style="text-align: left;">कडपट्टी</h2><p>त्या काळातल्या जमखंडी गावाला लागूनच कडपट्टी नावाचे एक खेडे होते. ते आता जमखंडीतच समाविष्ट झाले आहे. तिथे वर्षातून एकदा जत्रा भरत असे, त्यावेळी गुरांचा मोठा बाजारही भरत असे. तिथे बहुधा बसवेश्वराचे देऊळ होते, पण आम्हाला त्याचे विशेष धार्मिक महत्व वाटत नव्हते. त्यामुळे त्याचे दर्शन घ्यायला किंवा पूजा, उपायना करायला कधी गेल्याचे मला आठवत नाही.</p><p>Kadapatti Rath usav</p><p>ಕಡಪಟ್ಟಿ ಬಸವೇಶ್ವರ ರಥೋತ್ಸವದ ಸರಳವಾಗಿ ಜರುಗಿತು ಪಟಾಕಿ ಸಿಡಿಮದ್ದು ಜಗಮಗಿಸುವ ಲೈಟ್ ಗಳೊಂದಿಗೆ</p><p><a href="https://www.youtube.com/watch?v=zMxYHzgWWao">https://www.youtube.com/watch?v=zMxYHzgWWao</a></p><p><span style="font-size: large;"><b>मधुरखंडी</b></span></p><p><span style="font-size: medium;">जमखंडीहून जवळच कल्हळ्ळीच्या वाटेवर मधुरखंडी नावाचे खेडे आहे. तिथे महालक्ष्मीचे देऊळ आहे.</span></p><p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjbJdb8QHxLjxPG6z9jQU27MV3Pzl0vQWdgTs41ZKut70teWcikOG0FchPHzecCPAeaTQRMCp7JZRUPdVYuztd_rG63pjBPLQOPvsLsdBNfCcGlsFv-9FekytJafA-zwEkGswyLBdGyXPv_EDndQCUpOraC9ObqXBRCmPOODlxpSxIN7PPGy4/s1280/Madhurkhandi%20Devi.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="721" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjbJdb8QHxLjxPG6z9jQU27MV3Pzl0vQWdgTs41ZKut70teWcikOG0FchPHzecCPAeaTQRMCp7JZRUPdVYuztd_rG63pjBPLQOPvsLsdBNfCcGlsFv-9FekytJafA-zwEkGswyLBdGyXPv_EDndQCUpOraC9ObqXBRCmPOODlxpSxIN7PPGy4/w360-h640/Madhurkhandi%20Devi.jpg" width="360" /></a></div><br /><span style="font-size: medium;"><br /></span><p></p><h2 style="text-align: left;">शूरपाली</h2><h2 style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEisl5CzaJnxL2M_aGC_EEHGdbGm_JY2AN5xGMoqMwXgMD6mF-HBOwer2kK-_H63st6qCZHHrII-_i2dlHH64FhKzINz3JGaMBow1IHLROOiZyFkAJ_o_YHze3Tj431_kc_lb8aGqEo_2dBzkZCCFcHG8o9Bah2YXSCFCQsqi4keI7tLCpJlJIM/s1156/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1156" data-original-width="867" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEisl5CzaJnxL2M_aGC_EEHGdbGm_JY2AN5xGMoqMwXgMD6mF-HBOwer2kK-_H63st6qCZHHrII-_i2dlHH64FhKzINz3JGaMBow1IHLROOiZyFkAJ_o_YHze3Tj431_kc_lb8aGqEo_2dBzkZCCFcHG8o9Bah2YXSCFCQsqi4keI7tLCpJlJIM/w300-h400/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0.jpeg" width="300" /></a></h2><div>जमखंडीहून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीकाठी शूरपाली इथे नरसिंहाचे मंदीर आहे. तिथेही वर्षातून एकदा जत्रा भरत असे. पण इतके दूर चालत जाणे येणे माझ्या कुवतीबाहेर होते आणि त्या काळात कुठले सार्वजनिक वाहन उपलब्ध नसायचे. त्यामुळे मी कधी त्या जत्रेला गेलो नाही. मी एकदाच कुणाच्या तरी बरोबर बहुधा बैलगाडीतून तिथे जाऊन दर्शन घेऊन आलो होतो.</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjklyqX8tOM3OUZKIJjWfnDgEyWY69F45Simqzh19m2XnVJi-ovVvixybZKFmNhQgSkGDrSMmmc-YPDD4ba7M1fb8zY175QVNQfOaxWLJb4-EhPy5n3ehjjbzX-whmVPB0YgNA8o839_rapmqy7d-z7yAyNxxlgLq6YfwAMfbs2swYtKBD7vQE/s1600/%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1200" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjklyqX8tOM3OUZKIJjWfnDgEyWY69F45Simqzh19m2XnVJi-ovVvixybZKFmNhQgSkGDrSMmmc-YPDD4ba7M1fb8zY175QVNQfOaxWLJb4-EhPy5n3ehjjbzX-whmVPB0YgNA8o839_rapmqy7d-z7yAyNxxlgLq6YfwAMfbs2swYtKBD7vQE/w480-h640/%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9.jpg" width="480" /></a></div><br /><div><br /></div><p><br /></p><h2 style="text-align: left;">मुत्तूर</h2><p>शूरपालीच्याही पलीकडे मुत्तूर नावाच्या खेड्यात मुत्तूरव्वा या नानाने देवीचे देऊळ आहे. त्याबद्दल मला फारशी माहिती नाही. पण माझ्या मामाच्या कुटुंबातले लोक या देवीचे भक्त होते. मी एकदा त्यांच्याबरोबर वाहनात बसून तिथे जाऊन दर्शन घेऊन आलो होतो. तेंव्हा तिथे मी पहिल्यांदाच दीपमाळ पाहिली होती एवढे माझ्या लक्षात राहिले आहे.</p><p><br /></p><p>मूळचे जमखंडीचे श्री.मधुकर आपटे यांनी या विषयावर लिहिलेला एक लेख खाली दिला आहे. तसेच एक भक्त श्री.दिलीप जोशी यांनी त्यांना आलेल्या प्रचीतीवर आधारलेला एक लेख सोबत जोडला आहे.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi22OrlETvLEX86Z1YBtjmbnoR5NT38qKpd0p-jkf7pe2cFzgZfHm-sI3SQV2ZIAdtOAwbaVVGrTKeWbeVzqUoBZUt0MWGarFwrZV7Gq0sBjpXSkhmoEN7UZ9zg7aqZABXulUA4aSbWDr6Ccm4nBYjhcyQmDDVKv4X9GxWflXbMwgZDFeTBwL4/s1446/Dilip%20on%20Kalhalli%20R.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1446" data-original-width="1006" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi22OrlETvLEX86Z1YBtjmbnoR5NT38qKpd0p-jkf7pe2cFzgZfHm-sI3SQV2ZIAdtOAwbaVVGrTKeWbeVzqUoBZUt0MWGarFwrZV7Gq0sBjpXSkhmoEN7UZ9zg7aqZABXulUA4aSbWDr6Ccm4nBYjhcyQmDDVKv4X9GxWflXbMwgZDFeTBwL4/w446-h640/Dilip%20on%20Kalhalli%20R.jpg" width="446" /></a></div><br /><p><br /></p><p><br /></p><p>. . . आनंद घारे</p><p>------------------------------------------------------------------</p><p>माझ्या आईने केलेल्या दोन काव्यरचना इथे देत आहे.</p><p>१.आमच्या जमखंडी या गावाजवळच कल्हळ्ळी नावाच्या खेड्याजवळील वेदगिरी या डोंगरावर श्री व्यंकटेशाचे पुरातन देऊळ आहे. तिरुपती येथील व्यंकटेश भक्तांसाठी इथे प्रकट झाले आणि राहिले अशी भाविकांची श्रद्धा आहे. </p><p><br /></p><p><b> कल्लहळ्ळी ( कल्हळ्ळी ) व्यंकटेश क्षेत्रावतार</b></p><p>गौरिसुताते नमन करूनी, नमिते मी श्रीगुरुपायी </p><p>श्री हरिचे गुण गान कराया, बुद्धी द्या मज लवलाही ।।१।।</p><p> अंबरिषास्तव शेषशयन प्रभु, नटले की दश अवतारी </p><p> कलि माझारी तोच श्रीहरी, व्यंकटेश हे नाम धरी ।।२।।</p><p>कवण्या भक्तास्तव गिरिधारी, आले व्यंकटगिरीवरी</p><p>प्रियभक्तांची कथा मनोरम, ऐका ऐका हो सारी ।।३।।</p><p> गिरिधारीचा एक भक्तवर, अमरगोळ त्याचे गांवऽ</p><p> 'नागण्णय्या', नाम तयाचे, श्रीहरि चरणी दृढ भावऽ ।।४।।</p><p>नवरात्रोत्सव पहावयास्तव, जात असे की दरसालंऽ</p><p>वृद्ध जाहला, शरीर थकले, प्रभुचरणी निष्ठा अढळऽ ।।५।।</p><p> वृद्धत्वामुळे गिरि चढवेना, तळमळ वाटे बहु भारी </p><p> 'चुकेल माझा नेम' असा हा, ध्यास लागला मनांतरी ।।६।।</p><p>शयनि पहुडता, निद्रा आली, स्वप्नी आला द्विज एकंऽऽ</p><p>काय बोलला "न करी चिंता, मद्वचनाते तू ऐकऽऽ ।।७।।</p><p> जमखंडीहुन द्वय कोसावर, वेदगिरी हा असे पहा</p><p> संनिध कल्हळ्ळी ग्राम असे, तिथे जाउनी स्वस्थ रहा ।।८।। </p><p>द्वय भक्ताते देतिल दर्शन वेदगिरीवर गिरिधारी</p><p>न करी चिंता" ऐसे वदुनी, गुप्त जाहले देव तरी ।।९।।</p><p> सोबत खाशी बघुनि भक्त तो, आला कल्हळ्ळी गांवी</p><p> यल्लम्मा कुलस्वामिनि त्याची, पुजा तियेची नित्य करी ।।१०।।</p><p> 'त्रिमलाचारी', नामे ब्राह्मण, बेलगुप्पिचा रहिवासी</p><p>मनी वासना असे तयाच्या, जावे एकदा गिरीवरी ।।११।।</p><p> साधारण स्थिति असे तयाची, द्रव्य नसे संचित कांही</p><p> कसे गिरीवर घडेल जाणे ? इच्छा मनिची मनि राही ।।१२।।</p><p>हळु हळु द्विज तो द्रव्य सांठवी, करी तयारी जाण्याची</p><p>गिरिवरि जाउनि गिरिधारीचे, रूप मनोहर पहाण्याची ।।१३।।</p><p> सर्व तयारी करूनि निजता, स्वप्नि एक तो द्विज आला</p><p> रूऽऽप मनोहर असे तयाचे, शेला भरजरि पांघरला ।।१४।। </p><p>वदे "सुभक्ता, होतिल श्रम तुज, अवघड गिरि बहु चढण्याला</p><p>वेदगिरीवर जा तु त्वरेने, देतिल दर्शन प्रभु तुजला ।।१५।।</p><p> शुरपाली हे क्षेत्र मनोरम, त्या मार्गाने त्वा जावे</p><p> देव असे नरसिंह तिथे जो, दर्शन त्याचे त्वा घ्यावे" ।।१६।।</p><p>असे कथुनि द्विज गुप्त जाहला, जागृत झाला भक्तवरंऽऽ </p><p> स्वप्नाचा मनि विचार करिता, खेद वाटला मनि फारंऽऽ ।।१७।।</p><p> "गिरिवरि येऊ नको" असे कां, वदले मजला प्रभुरावंऽ ?</p><p> काय मजमुळे पवित्र स्थळ ते, विटाळेल हो तरि कायऽऽ? ।।१८।।</p><p>पतीतपावन नाम तुझे प्रभु, उद्धरिसी जन पापि किती?</p><p>मग कां मजला दूर लोटिशी ? मोडवेना तव वचन परी"।।१९।।</p><p> पत्नीसह द्विज निघे जावया, शुरपाली क्षेत्रावरुनी</p><p> कृष्णेमध्ये स्नान करोनी, नरहरिचे दर्शन घेई ।।२०।।</p><p>वेदगिरीवर त्वरे पातला, मार्गी वृक्ष लता फुलल्या</p><p>नानापरि पशु, पक्षि क्रीडती, अवलोकित त्यांच्या लीला ।।२१।।</p><p> गिरिवरि येता, शब्द ऐकला, "आले, आले भक्तवरंऽऽ"</p><p> ध्वनी परिसता, विस्मित झाला, भये व्यापिले अंतरंऽ ।।२२।।</p><p>नागण्णय्या, पूजा करुनी, बसे देउळी ध्यानस्थंऽऽ </p><p>शब्द तयाच्या श्रवणी पडतां, आला गिरिवरि धांवतऽऽ ।।२३।।</p><p> दंपतीस त्या नयनि पाहता, म्हणे "हेच की यदुरावंऽऽ?" </p><p> नागण्णाला बघुनि द्विजाला, वाटे 'आला हा देव' ।।२४।।</p><p>भक्तवरांच्या भेटि जाहल्या, सांगति आपुला वृत्तांतऽऽ </p><p>दुग्ध शर्करा एक जाहली, ऐसे वाटे चित्तांतऽऽ ।।२५।।</p><p> नागण्णय्या दंपतीस त्या, घेउनिया निज गृहि गेला</p><p> 'कमलाकर कधि देतिल दर्शन?' वेध लागला चित्ताला ।।२६।। </p><p>बहु जन्मांची बहु पुण्याई, उदया येई एक दिनी</p><p>मंगल सुस्वर बहु वाद्यांचा, ध्वनि ये वेदगिरीवरुनी ।।२७।।</p><p> भक्त द्वय सुस्नांत होउनी, बसले देव पुजा करुनी</p><p> अरुणोदय तो असे जाहला, घंटा रव ऐकू येई ।।२८।।</p><p>धावति दोघे तया दिशेने, प्रकाश होईना सहनंऽऽ </p><p>स्थीर राहिले, तोवरि पुढती, प्रगट जाहले भगवानंऽऽ ।।२९।।</p><p> सिंहासन जे जडित हिऱ्यांचे, त्यावरि सुंदर रूऽऽप दिसे</p><p> चहुहस्ती शोभती आयुधे, पीत पितांबर झळकतसे ।।३०।।</p><p>दंडि शोभती बाहु भूषणे, कंठी कौस्तुभ वनमाळा</p><p>वत्सलांछन हृदयि विराजे, मस्तकि रत्नमुकुट दिसला ।।३१।।</p><p> रूऽऽप असे हे नयनि पाहता, भक्त लागती चरणाला </p><p> स्तुती करीती बहू परीने, हर्ष मावेना गगनाला ।।३२।।</p><p>व्यंकटेश प्रभु वदति तयासी, "मागावे हो वरदाना"</p><p>भक्त बोलती, "रहावे येथेऽ, उद्धराया येथील जना" ।।३३।।</p><p> प्रिय भक्तांच्या वचनास्तव प्रभु, स्थीर राहिले त्या ठाया </p><p> कमलावर पदि कमलपुष्प हे अर्पुनि पद कमली नमुया ।।३४।।</p><p>पद्मावति पति पद्मनाभ तव, महिमा न कळे गा मजसीऽऽ</p><p>जोडुनि पाणी मागत लक्ष्मी, ठाव देइ तव चरणासीऽऽ ।।३५।।</p><p><br /></p><p><b>२.आरती तिरुपति व्यंकटेशाची</b></p><p> भक्त वत्सला, व्यंकटेश प्रभु, नमिते तव चरणा,</p><p> देवा, नमिते तव चरणा,</p><p> ओवाळीते आरति तुजला, पद्मावति रमणा ||धृ ||</p><p><br /></p><p> व्यंकट गितिवरि भव्य मंदिरी, शोभे तव मूर्ती,</p><p> देवा, शोभे तव मूर्ती</p><p> ध्वज वज्रांकुश पद कमली तव, नूपुर रुणझुणती |</p><p> देवा, नूपुर रुणझुणती |</p><p> कटीसि शोभे रत्न मेखला, पीताम्बर कसिला,</p><p> कासे, पीताम्बर कसिला,</p><p> नवरत्नांचा मुकुट मस्तकी, कंठी वनमाला (१)</p><p><br /></p><p> कर्णि कुण्डले झळकति दण्डी, वाकि बाजुबंद </p><p> दण्डी, वाकि बाजुबंद |</p><p> ध्यान असे हे हृदयी स्मरता वाटे आनंद</p><p> मनाला, वाटे आनंद |</p><p> भवाब्धि मधुनी पार करी मज, येऊ दे करुणा |</p><p> देवा, येऊ दे करुणा !</p><p> त्रिविध काल-गुण-देहातीता, नमन तुझ्या चरणा (२)</p><p><br /></p><p> शाम सावळे रूप मनोहर, पाहुनिया तुजला</p><p> देवा, पाहुनिया तुजला !</p><p> भुलली पद्मावति तव कण्ठी घाली वरमाला</p><p> देवा, घाली वरमाला</p><p> अष्टैश्वर्ये नटलासी प्रभु, काय वर्णु थाट !</p><p> तुझा प्रभु, काय वर्णु थाट !</p><p> प्रिय भक्तास्तव निर्मिलेस तु गिरिवरि वैकुण्ठ (३)</p><p><br /></p><p> चांदीच्या समयांत तेवती दीपहि ते बहुत</p><p> देवा, दीपहि ते बहुत |</p><p> सुवर्ण शिखरांवरि सोन्याचे कळस झळकतात</p><p> सोन्याचे, कळस झळकतात |</p><p> अपार वैभव, अगम्य लीला वर्णवेन कवणा </p><p> लीला, वर्णवेन कवणा !</p><p> एक मुखे मी काय वर्णु तुज, शरण तुझ्या चरणा</p><p> लक्ष्मी, नमिते तव चरणा (४)</p><p><br /></p><p>भक्त वत्सला, व्यंकटेश प्रभु, नमिते तव चरणा,</p><p> देवा, नमिते तव चरणा,</p><p> ओवाळीते आरति तुजला, पद्मावति रमणा !</p><p> पद्मावति रमणा ! पद्मावति रमणा !!!</p><p>*******************************************************</p><p><br /></p><h2 style="text-align: left;">माझा प्रवास - यात्रा - जमखिंडी</h2><p> <b> - श्री. मधुकर आपटे</b></p><p>आज आपण जमखंडी मधील प्रमुख मंदीरे व ईतर प्रगति पाहु. </p><p>प्रमुख मंदीरे :</p><p>१. जंबूकेश्र्वर :</p><p>या मंदिरामुळे च या गावाला हे नांव पडले असे म्हणतात. अशी आख्यायिका आहे की या जागी जांभळाची बरीच झाडे होती म्हणून जंबु (जामुन) व शिव असे मिळून जंबुकेश्र्वर झाले. हे मंदीर फार जुने आहे जवळ जवळ १५००-२००० वर्षापुर्वी बांधलेले असावे असा अंदाज आहे. मंदीराच्या सभोवताली ४-५ विहरी आहेत व पाण्याच्या टंचाईच्या वेळी या विहरी उपयोगी पडायच्या. असे ऐकले आहे की हल्ली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे.</p><p>या मंदीराच्या आत १९४० साली एक शाळा चालु करण्यात आली. ती शाळा अजुनही कार्यरत आहे. शाळेचे ऑफिशियल नाव नुतन विद्यालय - कन्नड गंडु (बॉईज) मक्कळ स्कुल असले तरी त्याला जंबुकेश्र्वर शाळा म्हणून च ओळखले जाते. </p><p><br /></p><p>२. ऊमारामेश्र्वर :</p><p>हे मंदीर महाराजा पटवर्धन सरकारांनी बांधलेले असुन हे राम तीर्थाटन सारखे नसुन हे महादेवाचे मंदीर आहे. ईथे शिवाची वेगळया रीतीने पुजा केली जात असे. जशी बुत्ती पुजा, मुकुट अलंकार, पुष्प अलंकार वगैरे. मंदिरात प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला सरकारांचे ऑफिस होते जिथे दीवाणसाहेब श्री. बळवंतराव काळे व श्री. गुरुनाथ वाटवे बसुन कारभार पहात असत. </p><p>येथे रोज सकाळी सनई चौघडे वाजत असत. मंदीराच्या प्रांगणात डाव्या हाताला महीला मंडळ चालक असे. </p><p>बाहेर पटांगणात कारंजे होते व डाव्या हाताला सरकारी दवाखाना व उजव्या हाताला मॉंटेसरी जी बहुतेक प्रभाताई आपटे चालवत होत्या. नंतर जवळच भारतीय स्टेट बँक व कचेरी रोड वगैरे. </p><p><br /></p><p>३. मेलगिरी लिंगप्पा :</p><p>हे मंदीर वरच्या रस्त्याने रामतीर्थ ला जाताना वर डोंगरावर स्थित आहे. ईथे पाण्याच्या टाक्या असुन गावाला पाण्याचा पुरवठा केला जातो. हे स्थान ब-याच लोकांच्या सकाळ-संध्याकाळ फिरण्याचे ठीकाण आहे </p><p>डोंगरावर वारे भरपुर असल्याने पतंग उडवण्यास ऊत्तम ठीकाण. </p><p>खाली रस्त्याजवळ एक मोठा तलाव आहे लेक्कनगिरी तलाव. व येथेच डोंगरावर पावसाळ्यात एक झरा वाहतो. </p><p><br /></p><p>४. रामतीर्थ :</p><p> रामतीर्थ येथे महाराजांचा राजवाडा होता व शिवशंकर, दत्तात्रय, गणपती यांची मंदिरे पण आहेत. </p><p>श्रावण महीन्यात प्रत्येक सोमवारी इथे जत्रा भरायची व बुत्ति पुजा (दही भाताची) हरकंगी ह्यांचे कडुन बांधली जायची. शेवटच्या श्रावण सोमवारी रथयात्रा असत असे. </p><p><br /></p><p>वरील प्रमुख मंदीरा शिवाय अन्य म़दीरांचा उल्लेख :</p><p>- श्री रूद्रावधुत मठ</p><p>- श्री खंडोबा मंदीर</p><p>- श्री लक्ष्मी मंदिर</p><p>- परमार्थ मंदीर</p><p>- खरे विठ्ठल मंदिर</p><p>- अप्पासाहेब विठ्ठल मंदिर</p><p>- सज्जी हनुमान मंदिर, ऊमारामेश्र्वर रोड</p><p>- दत्त मंदिर</p><p>- सदानंद मंदिर</p><p>- जुने हनुमान मंदिर</p><p><br /></p><p>जवळपास असलेले देवस्थान म्हणजे कल्हळ्ळी. येथे वेंकटरमण गोविंदाचे (भगवान विष्णू) भव्य मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रात (दसरा) येथे उत्सव साजरा होतो. </p><p><br /></p><p>Kadapatti Rath usav</p><p>ಕಡಪಟ್ಟಿ ಬಸವೇಶ್ವರ ರಥೋತ್ಸವದ ಸರಳವಾಗಿ ಜರುಗಿತು ಪಟಾಕಿ ಸಿಡಿಮದ್ದು ಜಗಮಗಿಸುವ ಲೈಟ್ ಗಳೊಂದಿಗೆ</p><p>https://www.youtube.com/watch?v=zMxYHzgWWao</p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-36299794715209698682022-09-20T05:42:00.000-07:002022-09-20T05:42:30.466-07:00आमची सिंधूताई<p> </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhM0Skz0jnDYRultsvwtgWvrK-30XrDrfzdF185p8NXKMiwckM2YcHhvGihM7jmv9rWyRQaJDeUsinivX3aBlos_WO81Ok_5s7Kx5AkeYEXo-VOaOrR8dCT_os_4k3oNAo93ycP6BlJ9I_cIwgixJQxm1JomzrIQWkVLKGktV9yZXxovR34-eQ/s1280/Sindhutai.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="919" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhM0Skz0jnDYRultsvwtgWvrK-30XrDrfzdF185p8NXKMiwckM2YcHhvGihM7jmv9rWyRQaJDeUsinivX3aBlos_WO81Ok_5s7Kx5AkeYEXo-VOaOrR8dCT_os_4k3oNAo93ycP6BlJ9I_cIwgixJQxm1JomzrIQWkVLKGktV9yZXxovR34-eQ/w460-h640/Sindhutai.jpeg" width="460" /></a></div><br /><p></p><p>सिंधूताई ही माझी सर्वात मोठी बहीण आणि मी तिचा सर्वात धाकटा भाऊ. सिंधूताई आमच्या आईवडिलांचे पहिले अपत्य आणि आजीआजोबांचे पहिले नातवंड. ती गोरी पान, चुणचुणित आणि रूपाने सुरेख, स्वभावानेही गोड आणि लाघवी होती. त्यामुळे तिचे लहानपणी घरात भरपूर लाड आणि कौतुक झाले असणार. ती शाळेत शिकत असतांनाच तिला महादेवरावांनी मागणी घातली आणि ते स्थळ फारच चांगले आहे हे पाहून तिचे थाटात लग्न करून दिले गेले. तेंव्हा माझा जन्मही झाला नव्हता. मला समजायला लागल्यापासून एवढे माहीत झाले होते की त्यांचा गोकाक नावाच्या गावात मोठा वाडा होता आणि निपाणी नावाच्या गावात एक सिनेमाचे थेटर होते. ताई जेंव्हा माहेरपणाला येत असे तेंव्हा घरात खूपच उत्साहाने आणि आनंदीआनंदाने भारलेले वातावरण असायचे.</p><p>सगळे चांगले चालले असतांना एक दिवस सकाळीच तारवाला पोस्टमन एक वाईट बातमी घेऊन आला. तो दिवस मला अजून आठवतो. महादेवरावांना हार्टफेल झाला असे त्या तारेत लिहिले होते. आमची आई तर एकदम पार गळून गेली आणि घरातल्या सगळ्यांची रडारड सुरू झाली. कुणीतरी धावाधाव करून सर्व्हिसची गाडी आणली आणि आईला निपाणीला घेऊन गेले. ती परत येतांना सिंधूताई आणि तिच्या मुलांना आपल्याबरोबर जमखंडीला घेऊन आली. पण या वेळी मात्र सर्व घर शोकाकुल झाले होते.</p><p>हळूहळू ताईने स्वतःला सावरले, शाळेच्या पुस्तकांचा अभ्यास केला आणि एक्स्टर्नल स्टूडंट म्हणून एसएससी परीक्षेचा फॉर्म भरून ती चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झा्ली. त्याबरोबर हिंदीच्या एक दोन परीक्षाही देऊन ती सर्टिफिकिटेही घेतली. त्यानंतर मिरजेला राहून एसटीसी आणि सीपीएड असे दोन कोर्स एकदम केले आणि शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली. मग ती सोडून सोलापूरला दुसरी नोकरी धरली. मी यातली कुठलीच गावे पाहिली नव्हती कारण त्या काळात अत्यावश्यक असेल तरच प्रवास केला जात असे. पण ही मंडळी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जमखंडीला येत असत तेंव्हा बोलण्यात त्या गावांची सगळी माहिती येत असे.</p><p>ताई आमच्याबरोबर असतांना सगळ्यांची खूपच प्रेमाने विचारपूस करत असे, आमच्याशी गप्पा मारत असे, आमची थट्टामस्करी करत असे, आमच्याबरोबर पत्ते खेळत असे, आम्हाला कोडी घालत असे, आमच्याकडून गाणी म्हणवून किंवा नकला वगैरे करवून घेत असे आणि त्यांचे तोंडभर कौतुक करत असे, प्रसंगी समजूत घालत असे, धीर देत असे. काही वेळा वादविवाद किंवा वितंडवादही झाले तरी ती बरीच मोठी असल्यामुळे त्यातून भांडण मात्र कधीच झाले नाही. माझ्या आईवडिलांच्या आणि माझ्या वयात जास्त अंतर असल्याने आमच्यामध्ये थोडा जास्तच जनरेशन गॅप होता. ताई मात्र मनाने माझ्या फारच जवळची झाली होती.</p><p>मी कॉलेजला मुंबईला गेलो तेंव्हा ताई सोलापूरला स्थायिक झाली होती. जमखंडीहून मुंबईला जाण्यासाठी कुडची स्टेशनपर्यंत बसने जाऊन पुढे रेल्वेने जाणे हा मुख्य मार्ग होता आणि मी पहिल्यांदा जातांना तसाच गेलो होतो, पण सुटीसाठी घरी जातांना मात्र वाट थोडी वाकडी करून आधी सोलापूरला ताईला भेटायला गेलो आणि नंतर पुढे विजापूरमार्गे जमखंडीला गेलो. त्या वेळी आईपासून पहिल्यांदाच दूर राहिल्यानंतरही ताईला भेटायची ओढ जास्त प्रबळ होती. त्यानंतरही मी बहुतेक वेळा सुटी लागल्यावर आधी ताईकडे जाऊन थोडे लाड करून घेतल्यानंतर जमखंडीला जात होतो.</p><p>ताईचे सोलापूरचे घर आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. कसबा या गजबजलेल्या भागातल्या मुख्य रस्त्यावर त्या घराचा मोठा दरवाजा होता, पण आत आल्यानंतर लांबलचक पॅसेजमधली तीन दारे पार करून गेल्यानंतर एक लहानसे अंगण होते आणि त्याच्या पलीकडे समोर ताईच्या घराची एक खोली होती. तिच्या डाव्या बाजूला लहानसे स्वयंपाकघर आणि उजव्या बाजूला एक लहानशी खोली होती ती अर्धी सामानाने भरली होती. असे आकाराने छोटे घर असले तरी ताईचे मन खूप मोठे होते. तिने आपुलकीने खूप माणसे जोडून ठेवली होती, त्यामुळे तिच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची बरीच वर्दळ असायची. </p><p>तिच्या परिचयांमधूनच माझ्या दोन मोठ्या भावांची लग्ने जमली आणि सोलापुरात झाली. त्या लग्नाला आलेल्या सगळ्या नातलगांची रहायची सोय ताईने त्या जागेत आणि वाड्यात केली. त्या वाड्याची मालकीण आणि इतर बिऱ्हाडकरू हे सगळेजण नेहमीच ताईच्या मदतीला तयार असत इतके प्रेमाचे संबंध तिने जुळवून ठेवले होते. माझ्या त्या दोन्ही वहिनींच्या माहेरच्या लोकांशी ताईने अगदी निकटचे संबंध जोडले होते, ते पुढच्या पिढीतही टिकून राहिले आहेत. माझ्या वडिलांच्या शेवटच्या आजाराच्या वेळी त्यांना सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये ठेवले होते आणि त्यांनी आशा सोडल्यानंतर त्यांचे अखेरचे दिवस त्याच घरात गेले. तेंव्हाही बरीच नातेवाईक मंडळी तिथे गोळा झाली होती. </p><p>मी नोकरीला लागलो तेंव्हा माझे इतर सहकारी दरवर्षी महिनाभर अर्न्ड लीव्ह घेऊन आपापल्या होमटाउनला आईवडिलांकडे जात असत आणि जिथे ते लहानाचे मोठे झाले त्या त्यांच्या घरी राहून येत असत. आमचे वडील गेल्यानंतर मला असे होमटाउन राहिले नव्हते. वीकएंडला जोडून एकादी सुटी आली की मी पटकन एका झोळ्यात दोन कपडे कोंबून निघत असे आणि सरळ सोलापूरला जाऊन थडकत असे. त्या काळात फोनची सोय नव्हती, त्यामुळे आधीपासून सांगायची किंवा विचारायची सुविधा नव्हतीच. पण वेळी अवेळी केंव्हाही गेलो तरी ताई माझे अत्यंत प्रेमाने स्वागत करत असे. मी अगांतुक गेलो असलो तरी तिच्यासाठी मी पाहुणा नव्हतो, तिने मला तेवढा हक्क दिला होता आणि मी तो निःसंकाचपणे बजावत होतो. पुढे मी लग्न करून संसाराला लागल्यानंतर असे जाणे कमी झाले. पण मला ऑफिसच्या कामासाठी अनेक वेळा हैद्राबादला जावे लागत असे. तिथून परत येतांना वाटेत सोलापूर स्टेशन आले की मी कधीकधी उतरून जात असे आणि ताईला भेटून काही तासांनी दुसऱ्या गाडीने पुढे जात असे. </p><p>एकदा आम्ही एका बारशासाठी पुण्याला गेलो होतो आणि तो कार्यक्रम झाला की लगेच परत जाणार होतो, म्हणून काही कपडे नेले नव्हते. तिथे ताईही आली होती. तिने सांगितले की तिच्या मुलीचा साखरपुडा एक दोन दिवसांनी करायचे ठरले आहे आणि त्याला आम्ही यायलाच हवे. मला तर ऑफिसला दांडी मारणे शक्यच नव्हते, पण पत्नी आणि मुलाला ती आपल्याबरोबर सोलापूरला घेऊन गेली. तिथे गेल्यावर आठवडाभरात लग्नसमारंभ करून टाकायचा असे ठरले. त्या वेळी माझ्याकडे फोनही नव्हता. कसा तरी माझ्यापर्यंत निरोप पोचला आणि मी सर्वांचे कपडे घेऊन तिथे गेलो. </p><p>घाईघाईत ठरलेल्या त्या लग्नासाठी कुठले मंगल कार्यालय मिळाले नव्हते. एक हॉल भाड्याने घेतला आणि आचारी, वाढपी, भटजी, वाजंत्री, भांडीकुंडी, स्वैपाकासाठी लागणारे सामान वगैरे सगळ्यांची व्यवस्था आमच्या कर्तबगार ताईने आणि तिच्या वीसबावीस वर्षाच्या मुलाने न डगमगता शांतपणे फक्त चार पाच दिवसात केली, शिवाय आलेल्या पाहुण्यांचीही सोय केली. आम्ही लोक मदतीला होतो, पण बाहेरगावाहून आलेले लोक अशी किती मदत करू शकणार होतो ? सगळ्यांसाठीच तो एक संस्मरणीय अनुभव होता.</p><p>मुलीचे शिक्षण आणि लग्न झाले आणि मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन तो डॉक्टर झाला. त्यानंतर सोलापूरला रहायचे विशेष प्रयोजन राहिले नाही म्हणून तिने नोकरी आणि ते गाव सोडले आणि ती मुलासह गोकाकला रहायला गेली. मला कामाच्या वाढत्या व्यापामुळे वेळ मिळत नव्हता आणि मुंबईहून गोकाकला जाणे येणे एवढे सोपे नसल्यामुळे तिला वरचेवर भेटायला जाणे मला जमत नव्हते. पण परिवारातल्या कुणाकुणाच्या लग्नसमारंभांमध्ये आमच्या भेटी होत राहिल्या. ताई आता फिरायला मोकळी असल्यामुळे कधी मुलाकडे, कधी मुलीकडे जाऊन रहात असे, तर कधी एकाद्या भावाकडे तिचा चार दिवस मुक्काम असे. </p><p>ती एकदा माझ्याकडेही आली होती आणि दहा बारा दिवस राहिली होती. सतत काम करत रहायची सवय असल्यामुळे तिला स्वस्थ बसून राहणे अस्वस्थ करायचे, पण आजकाल घरातली सगळी कामे सोपी करणारी यंत्रे असल्यामुळे आमच्याच हातांना जास्त काम नव्हते आणि ती यंत्रेही तिच्या ओळखीची नव्हती. फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारीपाजारी जरा दूर दूरच असतात आणि त्यात ते सगळे परभाषिक होते. त्यामुळे नवीन ओळखी करून घेणे कठीण होते. पोथ्यापुस्तके वाचत आणि टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम पहात ती वेळ घालवत होती. पण तेवढ्या दिवसात तिने माझ्या मुलांना मात्र आपला चांगला लळा लावला होता.</p><p>माझ्या मुलाचे लग्न नाशिकला झाले त्यावेळी योगायोगाने ताई नाशिकलाच तिच्या मुलीकडे रहायला आली होती. त्याचा आम्हाला आनंद झालाच, तेंव्हा सर्वांना भेटून तिलाही खूपच आनंद झाला. तिला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली होती म्हणून एक पुष्पगुच्छ देऊन आम्ही तिचा नावापुरता छोटासा सत्कार केला. त्या वेळी तिची तब्येत छानच दिसत होती. ती चांगली हिंडत फिरत होती. ही आमची शेवटची भेट असेल अशी पुसटशी कल्पनाही आली नव्हती. पण नंतर ती गोकाकला मुलाकडे गेली. तिथे असतांना एक दिवस देवासमोर बसून काही प्रार्थना करत असतांना तिने अचानक डोळे मिटले. असा विनासायास अंत होण्यासाठीसुद्धा मोठी पुण्याई लागते म्हणतात. अशा आमच्या प्रेमळ सिंधूताईच्या स्मृतीला शतशः प्रणाम.</p><div><br /></div>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-13214618582357425972022-08-31T22:21:00.004-07:002022-09-07T08:56:00.519-07:00पौराणिक गणपती<p> </p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEju5X9iJ3hs-WetR-WrJ-U8tVk0GtXZRHmjh_Y8Dph5yn5biyp1ih-QKcS8bRNbqyCjZbQggX0QX0ELFTwWwiRPu_t1yX1q0O-BEPhMtSyRlX57Io7wooi5zehQm7_H4DHIbAMD5-UR94ujUqQZHCv8X96VpWoYekQbUsWbSrDwU7WnsnJETyQ/s537/WhatsApp%20Image%202022-08-31%20at%2008.40.52.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="537" data-original-width="400" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEju5X9iJ3hs-WetR-WrJ-U8tVk0GtXZRHmjh_Y8Dph5yn5biyp1ih-QKcS8bRNbqyCjZbQggX0QX0ELFTwWwiRPu_t1yX1q0O-BEPhMtSyRlX57Io7wooi5zehQm7_H4DHIbAMD5-UR94ujUqQZHCv8X96VpWoYekQbUsWbSrDwU7WnsnJETyQ/w298-h400/WhatsApp%20Image%202022-08-31%20at%2008.40.52.jpeg" width="298" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><div class="separator" style="clear: both;">आज गणेशचतुर्थी आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा मी या गणेशोत्सवाच्या काळात श्रीगणेशाला वंदन करून त्याच्या कोटी कोटी रूपांमधल्या मला समजलेल्या काही रूपांविषयी दोन शब्द लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.नऊ वर्षांपूर्वी मी पुराणातल्या गणपतींबद्दल एक लेख लिहिला होता तो खाली दिला आहे. त्यानंतरच्या काळात मला श्रीगणपतीअथर्वशीर्ष आणि गणेशपुराण याविषयी बरीच माहिती माझे बंधू डॉ.धनंजय घारे यांच्याकडून मिळाली. त्याच्या आधारे हा लेख लिहायचे ठरवले आहे. त्यात रोज थोडी भर घालणार आहे.</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">दर वर्षी गणेशचतुर्थीला आपण हत्तीचे तोंड (गजानन) आणि विशाल पोट (लंबोदर) असलेल्या गणपतीची स्थापना करून त्याचा उत्सव करतो. गणपतीचे हे रूपच जास्त प्रचलित आहे आणि जगभरातल्या असंख्य मंदिरांमध्ये त्याच्या मूर्ती दिसतात. तो शंकरपार्वतींचा धाकटा मुलगा अशी त्याची एक मर्यादित ओळख आहे. पण अथर्वशीर्षाच्या सुरुवातीलाच असे म्हंटले आहे की तूच (या विश्वाचा) एकमेव कर्ता, धर्ता आणि हर्ता आहेस. म्हणजे गणपतीच या जगातले सर्व काही निर्माण करतो, चालवतो आणि नष्ट करतो. पुढील भागात “सर्वं जगदिदं त्वत्तो जायते । सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥ सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।” असे म्हणून ही गोष्ट अधिक स्पष्ट केली आहे. या वाक्यांचा अर्थ सारे जग तुझ्यातूनच जन्म घेते, तुझ्यामुळेच उभे राहते (चालते) आणि अखेर तुझ्यातच विलीन होते असा होतो. पुढे जाऊन तर त्याला तूच ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नि, वायू, सूर्य, चंद्र आहेस असेही म्हंटले आहे. जगामधील सर्व गोष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण होतात आणि त्यांच्यात विलीन होतात हे आपण पाहतोच. पण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणजे स्वतः गणपतीच आहे असे “त्वं भूमिरापोऽनलोऽनिलोनभः ।” या वाक्यात म्हंटले आहे. म्हणजे निर्माण करणाराही तूच आहेस आणि तू जे निर्माण केले आहेस तेसुद्धा तूच आहेस. विश्वामध्ये चैतन्याच्या जेवढ्या खुणा आपल्याला दिसतात त्या सर्वांमध्ये गणेश आहे. आपल्याला ज्ञात असलेल्या सगळ्या जागी तर तो आहेच, त्याच्याही पलीकडील अज्ञात अशा प्रदेशातसुध्दा तो आहे असे “त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । या ओळींमध्ये म्हंटले आहे. तो सत्व, रज, तमोगुणांच्या पार आहे, तसेच भूत भविष्य वर्तनमानकाळांच्या पलीकडे अनादी अनंत असा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर त्याची व्याप्ती आपल्या कल्पनाशक्तीच्या खूप पलीकडेपर्यंत पसरलेली आहे. परमेश्वराबद्दल असलेल्या सगळ्या कल्पना म्हणजे गणपतीच आहे. गणेशपुराणात तर असे स्पष्टच सांगितले आहे की गणेशाने अनेक अवतार घेतले, शिवपुत्र, पार्वतीनंदन, गजानन, लंबोदर असा आपल्या ओळखीतला गणपती हा त्यातला एक अवतार आहे. </div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiI_ZVcydlny5Fsf12ZqEYVPdsjcLyoUZLXU1YtNZofUCeSkyLP2B0T3O3akbVXwk_-CMstp_o3O1dvvZtLZSD8uC2CMyqCmhQD8UOCMY96SryxXeUf76ihM9IroTOtyALJYmwqhfuXF9N2koQd_b7yplkrIlOCEM4sdL9nfA_3cugpTPHVnFE/s1700/Shri%20Ganesha%20Sanskrit%20pics%201.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1700" data-original-width="1600" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiI_ZVcydlny5Fsf12ZqEYVPdsjcLyoUZLXU1YtNZofUCeSkyLP2B0T3O3akbVXwk_-CMstp_o3O1dvvZtLZSD8uC2CMyqCmhQD8UOCMY96SryxXeUf76ihM9IroTOtyALJYmwqhfuXF9N2koQd_b7yplkrIlOCEM4sdL9nfA_3cugpTPHVnFE/w602-h640/Shri%20Ganesha%20Sanskrit%20pics%201.jpg" width="602" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both;">या विश्वातल्या चराचरामधील अणुरेणूमध्ये परमेश्वर भरून राहिला आहे अशी एक सर्वमान्य व्याख्या आजकाल रूढ होत आहे. पण अशा अनादि अनंत आणि निर्गुण निराकार रूपाची पूजा करता येत नाही म्हणून तेवढ्यासाठी निरनिराळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मोहक अशा रूपांच्या मूर्ती केल्या जातात असेही सांगितले जाते. पण पुराणांमधल्या गोष्टींमध्ये त्या त्या देवांचेच महत्व सांगितले जाते. वैष्णव लोक ज्याला सर्वोच्च धार्मिक ग्रंथ मानतात त्या भागवत पुराणानुसार श्रीकृष्ण किंवा श्रीविष्णू हाच अनादि असा देव आहे. जेंव्हा काहीही नव्हते तेंव्हाही तो होता आणि त्याच्या इच्छेने त्याने आधी ब्रह्मदेव आणि माया निर्माण केली. त्या मायेमधून पृथ्वी, आप (जल), तेज, वायू आणि आकाश (पोकळी) ही पंचमहाभूते तयार झाली तयार झाली आणि या कच्च्या मालामधून ब्रह्मदेवाने हे सगळे ब्रह्मांड निर्माण केले अशी या विश्वाची उत्पत्ती सांगितली जाते. त्यात गणेशाचा उल्लेख येत नाही. पण गणेशपुराणात या सगळ्या विश्वाची निर्मिती श्रीगणेशानेच केली आहे आणि ब्रह्मा, विष्णू, शिव ही गणेशाची रूपे आहेत असे सांगितले आहे. आपल्या डोळ्यांना दिसते, कानांनी ऐकायला येते, किंबहुना पाच ज्ञानेंद्रियांमधून जेवढे समजते ते सगळे बह्म आहे आणि त्याच्या पलीकडे असलेले जे ज्ञानी लोकांच्या बुद्धीला किंवा मनाला समजते ते आत्मा, परमात्मा वगैरे परब्रह्म असे सांगितले जाते. पण या गोष्टी सामान्य लोकांना समजत नाहीत, फक्त ऋषिमुनी आणि 'ज्ञानी' संत महात्म्यांना त्यांची ओळख पटते असे म्हणतात.</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;"><div class="separator" style="clear: both;">गणेशपुराणाची कथा अशी आहे की व्यासमहर्षींनी अठरा पुराणे आणि महाभारत लिहिल्यानंतरही त्यांचे मन अस्वस्थ होते. आता काय करावे हे विचारण्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले की हे सगळे मी केले असे समजण्यामुळे तुला अहंकार आला आहे. गणेशाला शरण जाऊन त्याने हे सगळे तुझ्याकडून करवून घेतले असे मान्य कर म्हणजे तुला शांति मिळेल. व्यासांचे मन शांत झाल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना गणेशपुराण सांगितले. त्यात अनेक कथा आहेत.</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">पहिल्या कथेत असे सांगितले आहे की मधु आणि कैटभ नावाचे दोन दैत्य ब्रह्मदेवाला त्याचे काम करू देत नव्हते आणि मारायला आले म्हणून तो मदतीसाठी भगवान विष्णूकडे गेला, पण हे दैत्य त्या दोघांनाही आवरत नव्हते. मग त्यांनी श्रीगणेशाची प्रार्थना केली. त्यावर प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना एक युक्ती सांगितली. श्रीविष्णूने त्या दैत्यांची खूप स्तुति करून त्यांना खूष केले आणि मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तुम्हाला हवे ते वरदान मागा असे सांगितले. त्या उन्मत्त राक्षसांनी सांगितले की तू काय आम्हाला वर देणार आहेस, आम्हीच तुला वर देऊ, तुला काय पाहिजे ते माग. त्यावर विष्णूने हळूच असा वर मागितला की तुमचा मृत्यू माझ्या हातून होऊ दे. त्या मूर्ख दैत्यांनी तो देऊन टाकला आणि ते विष्णूच्या सुदर्शन चक्राने मारले गेले. भगवान विष्णूने या प्रसंगी सिद्धटेक येथे गणपतीचे मंदिर बांधले असे म्हणतात. दुसऱ्या एका पुराणात असे सांगितले आहे की त्या वेळी आदिशक्तीने विष्णूला मदत केली .</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">जसे ध्रुव आणि प्रल्हाद हे विष्णूचे परमभक्त होते तसाच बल्लाळ नावाचा एक मुलगा गणेशाचा परमभक्त होता. तो रोज आपल्या मित्रांना घेऊन गावाबाहेर रानात जात असे आणि एका झाडाखाली दगडधोंडे गोळा करून त्यातून गणपतीची पूजा करत असे. त्यांना घरी परतायला उशीर होत असल्यामुळे त्या मित्रांच्या वडिलांनी बल्लाळाच्या बाबांकडे म्हणजे कल्याणाकडे तक्रार केली. कल्याण रागारागात रानात आला, त्याने सगळे दगडधोंडे विस्कटून टाकले, मुलाला झाडाला बांधून चांगला चोप दिला. बल्लाळाने आपल्या बापाला शाप दिला त्यामुळे तो आंधळा, लुळापांगळा होऊन गेला. सगळी मुले घाबरून पळून गेली आणि बल्लाळ रानात एकटाच राहिला होता. त्याने गणपतीचा आर्त मनाने धावा केला. मग गणपती एका ब्राह्मणाच्या रूपाने तिथे आला आणि त्यांना बल्लाळाला सोडवले. त्याने नंतर त्या ठिकाणी बांधलेल्या देवळातल्या गणपतीला बल्लाळेश्वर म्हणतात.</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">गृत्समद नावाच्या ऋषीला आलेल्या शिंकेमधून एक बालक जन्माला आले. त्या ऋषीने त्या बालकाला गणपतीची आराधना करायला शिकवले. मग त्याने अरण्यात जाऊन खूप वर्षे तपश्चर्या केल्यावर त्याला गणेश प्रसन्न झाला आणि त्याने अनेक वरदान केले. त्याचे मरणे जवळजवळ अशक्यप्राय झाले. त्यामधून तो जवळजवळ अमर झाला. त्याला गणेशाने तीन सुंदर शहरे दिली होती ती सारखी आभाळात फिरत असत. त्यांचा अधिपति म्हणून त्याचे नाव त्रिपुरासुर असे पडले. फारच शक्तीशाली झाल्यामुळे त्याला खूप माज आला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ असे त्रैलोक्य जिंकून घेतले. सगळे देव स्वर्ग सोडून पळून भगवान शंकराकडे कैलासावर गेले आणि यातून सोडवण्याची विनंति करायला लागले, पण तो स्वतच भयभीत होऊन अरण्यात लपून आणि गणेशाचे चिंतन करत बसला. त्यामुळे पार्वती आपल्या माहेरी हिमालयाकडे गेली. मग हिमालयाने तिला विनायकाचे व्रत आणि शोडशोपचार पूजाविधि सांगितला. त्याप्रमाणे तिने भक्तीभावपूर्ण व्रताचे आचरण केल्यानंतर विनायक तिला प्रसन्न झाला आणि त्याने शंकराला सहाय्य करायचे आश्वासन दिले. गणेश या गणिताच्या तज्ञाने शंकराला एक असा मुहूर्त काढून दिला ज्या वेळी त्रिपुरासुराच्या तीन्ही नगरी एका सरळ रेषेत येतील. नेमक्या त्या वेळी शंकराने आपल्या महान शिवधनुष्याला एक दिव्य बाण लावला आणि तो सोडून एका बाणात तीन्ही नगरे जाळून भस्म करून टाकली. त्याबरोबर त्रिपुरासुराचाही अंत झाला. गणपतीने केलेल्या या मदतीसाठी शंकराने रांजणगाव इथे महागणपतीचे देऊळ बांधले.</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">कृतयुगामध्ये देवांतक आणि नरांतक नावाचे भाऊभाऊ असलेले दोन भयानक राक्षस जन्माला आले. त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून त्याच्याकडून असे वरदान मागून घेतले की त्यांना कुठल्याही शस्त्राने मृत्यू येणार नाही. त्यामुळे ते खूपच बलिष्ठ झाले आणि त्यांनी तीन्ही लोक जिंकून घेतले. त्यांना मारण्यासाठी गणेशाने कश्यप ऋषी आणि त्याची पत्नी अदिति यांचा मुलगा महोत्कट या नावाने अवतार घेतला. सिंह या वाहनावर बसून तो त्या दैत्यांवर चालून गेला. महाप्रचंड आकाराचे रूप घेतले आणि नरांतकाला अंगठ्याखाली चिरडून मारून टाकले. देवांतकाबरोबर झालेल्या झटापटीत देवांतकाने गजाननाचा एक दात तोडला. तेव्हा त्या दातानेच प्रहार करून त्याने देवांतकाला छिन्नभिन्न करून मारून टाकले. त्यानंतर गजाननाला एकदंत हे नाव मिळाले.</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">त्रेतायुगामध्ये राजा चक्रपाणीच्या राणीला सूर्याच्या कृपेने त्याच्यासारखा तेजस्वी मुलगा झाला, त्याचे लहानपणी त्याला समुद्राने सांभाळले म्हणून त्याचे नाव सिंधू असे पडले. सूर्याने त्याच्या पोटात एक अमृताची कुपी लपवून ठेवली होती. त्यामुळे त्याला कुणीही मारले तरी तो लगेच जीवंत होत होता. त्यानेही तीन्ही लोक जिंकून घेतले आणि आपला राक्षसीपणा सुरू केला. तेंव्हा गणेशाने गजानन अवतार घेतला आणि मोर या वाहनावर बसून सिंधू राक्षसावर हल्ला केला. हातातल्या परशूने आधी त्याच्या पोटातली अमृताची कुपी फोडून टाकली आणि नंतर त्याला ठार मारले. पुण्याजवळ मोरगाव येथे मयूरेश्वर या नावाने त्याचे मंदिर आहे.</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;"><div class="separator" style="clear: both;">द्वापार युगात ब्रह्मदेवाने दिलेल्या जांभईमधून सिंधूर नावाचा लालभडक रंगाचा मुलगा निर्माण झाला, पण तो राक्षसी वृत्तीचा निघाला. तो ज्याला मिठी मारेल त्याला करकचून आवळून मारून टाकेल असे वरदान त्याला मिळाले होते, त्याचा उपयोग करून तोही सर्वांना त्रास द्यायला लागला. इकडे वरेण्य नावाचा राजा आणि त्याची राणी पुष्पावती यांनी गणेशाची आराधना करून त्याला आपला पुत्र होऊ दे असा वर मागितला होता. शंकर आणि पार्वती यांना झालेला वक्रतुंड, गजानन आणि लंबोदर असा विचित्र वाटणारा मुलगा खुद्द विनायकाच्याच सांगण्यावरून त्यांनी नंदीकडून त्या राणीच्या जवळ नेऊन सोडला. तीही त्याला पाहून घाबरली आणि असले 'अपशकुनी' बाळ नको म्हणून तिने त्याला रानात नेऊन सोडले. मग पराशर मुनींनी त्याचा सांभाळ करून त्याला वाढवले. उंदीर होण्याचा शाप मिळालेला एक गंधर्व त्या ऋषीच्या आश्रमात येऊन लुडबुड करत होता. गजाननाचे त्याला वठणीवर आणून आपले वाहन बनवले आणि त्यावर आरूढ होऊन तो सिंधुरासुरावर चालून गेला. त्याने आपला आकार इतका विराट वाढवला की सिंधुरासुर त्याला मिठीच मारू शकत नव्हता. मग गजाननानेच त्याला चिरडून टाकले. </div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">अशा प्रकारच्या अनेक सुरस कथा गणेशपुराणात आहेत. त्या सगळ्या रूपककथा असून त्यात काही गहन अर्थ असावा, पण तो सामान्य लोकांना उलगडणे कठीण आहे.</div></div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;"><br /></div></div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><h2 style="clear: both; text-align: left;">पुराणातला गणपती</h2><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">ॐ गणानाम् त्वाम् गणपतीम् हवामहे कवीम् कवीनाम् उपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजो ब्राह्मणाः ब्रह्मणस्पदआनश्रृण्वन्नीतीभीःसीदसादनम्। साधारणपणे असा एक मंत्र गणपतीच्या आरतीनंतर (मंत्रपुष्पात) म्हणतात. ऋग्वेदामधील या मंत्रात गणपतीची आराधना केली आहे. गणपतीअथर्वशीर्ष हे एक उपनिषद मानले जाते. अनेक पुराणांमध्ये गणपतीसंबंधीची आख्याने आहेत तसेच त्याची स्तोत्रे आहेत. मत्स्य, वायु, भागवत, विष्णू, गरुड, ब्रह्म, नारद, वामन, कुर्म, पद्म, स्कंद, मार्कंडय, शिव, अग्नी, वराह, ब्रम्हांड. ब्रह्मावैवस्वत आणि भविष्य ही अठरा मुख्य पुराणे मानली जातात. त्यामधील मत्स्यपुराण, स्कन्दपुराण, शिवपुराण, वराहपुराण, वामनपुराण, पद्मपुराण या प्रमुख पुराणग्रंथांमध्ये तसेच बृहद्धर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंगपुराण, ब्रह्मांड पुराण, देवीपुराण या गौण पुराणांत आणि महाभारतात गणेशाचे उल्लेख आहेत, शिवाय एक स्वतंत्र गणेश पुराणसुध्दा आहे.</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">शिवपुराण, स्कंदपुराण, बृहद्धर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, पद्मपुराण, लिंगपुराण, वराहपुराण, देवीपुराण, मत्स्यपुराण आणि वामनपुराण या पुराणांमध्ये गणेशजन्माची निरनिराळी आख्याने आहेत. त्यातील बहुतेक कथांमध्ये साधारणपणे एकच गोष्ट आहे. त्यानुसार पार्वतीने शंकराच्या अनुपस्थितीत गणपतीची निर्मिती केली, शंकराला ते ठाऊक नव्हते. तो परत आल्यावर गणपतीने त्याला अडवले. त्यामुळे क्रोधित होऊन शंकराने त्या (उध्दट वाटणाऱ्या) मुलाचे शिर उडवले, ते पाहून पार्वतीने हाहाःकार केला. त्यानंतर शंकराने त्याच्या शरीराला हत्तीचे मुख जोडून जीवंत केले आणि त्याला आपल्या गणांचा प्रमुख बनवले. प्रत्येक पुराणांमधील साधारणपणे अशा अर्थाच्या कथात त्यातील तपशीलात थोडा थोडा फरक फरक आहे. काही पुराणांमध्ये मात्र निराळ्याच गोष्टी आहेत. एकामध्ये गणपतीला जन्मतः मस्तक नव्हते म्हणून त्याला हत्तीचे तोंड लावून दिले अशी कथा आहे, आणखी एकात शंकर आणि पार्वती या दोघांच्या संयोगातून गणपतीचा जन्म झाला आणि एका कथेत तर एकट्या शंकरानेच गणपतीची उत्पत्ती केली असे आहे. ब्रह्मवैवर्त पुराण आणि शिवपुराणात गणपतीच्यासंबंधीच्या इतर काही कथा आहेत. यातली कोणतीच पुराणे मी वाचलेली नाहीत आणि संस्कृतमध्ये असल्यामुळे मला ती वाचून समजणारही नाहीत. वरील माहिती मी विकीपीडियावरून घेतली आहे.</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली तेंव्हा त्यांच्या लेखनिकाचे काम गणपतीने केले असे मी लहानपणीच ऐकले होते. महर्षी व्यासांनी एक एक ओळ किंवा श्लोक सांगायचा आणि गणपतीने ते तत्परतेने लिहून घ्यायचे असे त्यांचे आपसात ठरले. पण हे प्रचंड खंडकाव्य रचता रचता सांगतांना व्यासांनी मध्येच कुठेही थांबायचे नाही अशी अट गणेशाने घातली होती. व्यासमहर्षी थांबले आणि गणेशांनी लेखणी खाली ठेवली की आपले काम तिथेच थांबवून ते लगेच अंतर्धान होणार होते. पण हजारो श्लोक रचून ते सांगतांना व्यासमहर्षींनी कोठेही पळभर विश्रांती घेतली नाही किेवा ते अडखळले नाहीत आणि गणपती ते श्लोक लिहीत राहिले. अशा रीतीने संपूर्ण महाभारताचे एकटाकी लेखन झाले. अशी आख्यायिका आहे. (पण महाभारत हा ग्रंथ निरनिराळ्या काळात होऊन गेलेल्या आणि व्यास हे टोपणनाव धारण केलेल्या अनेक विद्वानांच्या लेखनातून निर्माण झाला असावा असे काही इतिहाससंशोधकांचे सांगणे आहे. शिवाय त्या काळात कुठल्या कागदावर किंवा भूर्जपत्रांवर हे लेखन कसल्या शाईने लिहिले जात होते आणि त्यांचा अखंड पुरवठा कुठून होत होता? अशासारखे प्रश्न पुराणांच्या बाबतीत विचारायचे नसतात.)</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">नारदमुनींनी रचलेले संकट नाशन गणेश स्तोत्र नारद पुराणात आहे. श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र, योगशांतिप्रद स्तोत्र, सिद्धिविनायक स्तोत्र, परब्रह्म रूप कर स्तोत्र आणि श्रीगणेश गीतासार स्तोत्र ही स्तोत्रे मुद्गल पुराणात आहेत. ढुंढि स्वरूप वर्णन नावाचे स्तोत्र गणेश पुराणात आहे. ही स्तोत्रेसुध्दा माझ्या आप्तांकडून मला मिळाली. संकटनाशन स्तोत्र आणि द्वादशनामस्तोत्रांमध्ये गणेशाची बारा नावे देऊन ती नावे रोज वाचली किंवा ऐकली तर सर्व विघ्ने दूर होतील आणि मनातल्या इच्छांची पूर्ती होईल असे आश्वासन दिले आहे. या दोन श्लोकात दिलेल्या प्रत्येकी बारा नावांमधील साम्यस्थळे आणि त्यांच्यामधील फरकांबद्दल मी आधी एका लेखात लिहिले आहे. योगशांतिप्रद स्तोत्रात आधी इतर देवांनी गणेशाचे वर्णन आणि स्तुती केली आहे आणि अखेरच्या श्लोकात श्रीगणेशाने प्रसन्न होऊन हे स्तोत्र वाचणाऱ्या सर्वांना वरदान दिले आहे, श्री सिद्धिविनायक स्तोत्रात विघ्नविनाशक विनायकाची प्रार्थना केली आहे. परब्रह्म रूप गणेशस्तोत्रातील श्लोकांच्या पहिल्या तीन चरणांमध्ये गणेशाच्या विराट विश्वरूपाचे वर्णन करून चौथ्या ओळीत परब्रह्म रूपं गणेशं भजेम असे म्हंटले आहे. हे वाचतांना जगद्गुरू शंकराचार्यांच्या चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम् ची आठवण येते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती हे सर्वांना माहीत आहे. गणेशगीतासार स्तोत्रात प्रत्यक्ष शंकर भगवानांनी गणेशाकडे उपदेश मागितला आणि गणपतीने त्यांना गीतेचा सारांश सांगितला अशा संवादात्मक पध्दतीने हे स्तोत्र लिहिलेले आहे. मूळ गीतेप्रमाणेच यातदेखील बरेच ब्रह्मज्ञान आहे. गणेशपुराणामधील ढुंढिरूपवर्णन स्तोत्रात गण, गज, ऋध्दी, सिध्दी वगैरे शब्दांचे आध्यात्मिक अर्थ देऊन गणपतीचे एक आध्यात्मिक दर्शन घडवले आहे.</div><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both;">पुराणामध्ये अशा त-हेने गणपती या देवतेचे विविध अंगांनी दर्शन घडवले आहे. त्यात सुरस कथा आहेत, गजाननाचे रूप आणि त्याने केलेला साजश्रुंगार, ल्यायलेले दागदागिने वगैरेंची रसभरीत वर्णने आहेत आणि अगम्य असे अध्यात्मही आहे.</div></div><br /><p><br /></p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-79298393097152829492022-08-30T00:54:00.007-07:002022-10-12T06:47:20.282-07:00मी कोण आहे ? - भाग ३<p> </p><p><br /></p><p> 'मी कोण आहे ?' या विषयावर मी फेसबुकवर लिहीत असलेल्या स्फुटलेखमालेतले पहिले ५० लेख एकत्र करून "मी आहे तरी कोण ??? - भाग १ आणि भाग २" मध्ये प्रकाशित केले होते. ते इथे वाचावेत. </p><p>भाग १ : <a href="https://anandghan.blogspot.com/2021/04/blog-post.html">https://anandghan.blogspot.com/2021/04/blog-post.html</a></p><p>भाग २ : <a href="https://anandghan.blogspot.com/2021/12/blog-post.html">https://anandghan.blogspot.com/2021/12/blog-post.html</a></p><p><br /></p><p>मी कोण आहे?</p><p>भाग ५१</p><p>१ ऑगस्ट १९६७. त्या दिवशीपासून आमची प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी (क्लास वन गॅझेटेड ऑफिसर) म्हणून नेमणूक झाली. याचा अर्थ काय हे तेंव्हा आम्हाला माहीत नव्हते. पण काही तरी 'लई भारी' असणार असे मात्र वाटले होते. भारत सरकारतर्फे वेळोवेळा गॅझेट नावाचे कसले तरी पत्रक प्रकाशित जाते, त्यात माझे नाव छापून येणार होते असा त्याचा अर्थ होता. प्रत्यक्षात मला ते गॅझेट कधी वाचायला मिळालेच नाही आणि त्यात नेमके काय छापले होते तेही समजलेच नाही.</p><p>त्या दिवशी सकाळी आमच्या ट्रेनिंग स्कूलमधल्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना बहुधा आमच्या वर्गांमध्येच जाऊन बसायला सांगितले. त्या दिवशी आमचे व्याख्याते न येता अणुशक्ती खात्याच्या प्रशासकीय सेवेतले काही सज्जन आले आणि त्यांनी सर्वांना सायक्लोस्टाइल केलेले काही कागद वाटले. आम्हाला ते कसकसले फॉर्म्स डुप्लिकेट की ट्रिप्लिकेटमध्ये सह्या करून द्यायचे होते. या वेळीही ते पूर्ण वाचून पहायला वेळ नव्हताच. थोडे वरवर चाळून आम्ही खाली सह्या ठोकून दिल्या. आता मात्र माझी हीच सही जन्मभर माझ्याबरोबर राहणार आहे याची जाणीव असल्यामुळे मी नक्कल करायला थोडी कठीण पण वाचता येण्याजोगी अशी एक सही ठरवून आणि घोटवून ठेवली होती.</p><p>त्यानंतर आमच्या गोपनीयतेच्या शपथविधीचा सार्वजनिक कार्यक्रम झाला. तिथे आलेल्या अधिकाऱ्याने एक एक ओळ वाचून दाखवली आणि आम्ही सर्वांनी एक हात वर करून त्याच्यापाठोपाठ ती मोठ्याने म्हंटली. आता आम्ही मनोभावे भारत सरकारची सेवा करण्याठी वचनबद्ध झालो होतो.</p><p><br /></p><p>मी कोण आहे? भाग ५२</p><p>माझी नेमणूक बीएआरसीच्या रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिडन (आरईडी) या विभागात झाली होती. यावर मी बेहद्द खूष होतो. वर्षभर अभ्यास करून आणि परीक्षा देऊन मी कंटाळलो होतो. आता मला माझ्या आवडीचे मशीन डिझाइनचे काम करायला मिळणार असे वाटले होते. आमच्या बॅचमधले आणखी १०-१२जणही माझ्याबरोबर तिथेच नेमले गेले होते. आम्ही सगळेजण ट्राँबेला त्या ऑफीसात जाऊन पोचलो. थोड्याच दिवसांपूर्वी मी तिथे काही दिवस प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेत असतांना पाहिले होते की तिथले इंजिनियर्स आधीच दाटीवाटीने बसत होते. त्यात आणखी दहाबाराजण कसे सामावणार होतो याचेच मला थोडे गूढ वाटत होते. तिथे जाऊन पाहता आमच्या आगमनाची काहीच तयारी केलेली दिसली नाही. पण आम्ही येणार असल्याचे तिथल्या ऑफिसमधल्या लोकांना ठाऊक होते. त्यांनी आम्हाला एका लहानशा कॉन्फरन्सरूममध्ये बसायला सांगितले. </p><p>थोड्या वेळाने त्या विभागाचे प्रमुख (हेड आर ई डी) श्री.विनय मेकोनी यांचे आगमन झाले. अत्यंत मृदुभाषी मेकोनी यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले, आपुलकीने आमची थोडी विचारपूस केली आणि नजिकच्या भविष्यकाळात साकार होणार असलेल्या योजनांची माहिती देऊन आमचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असणार आहे अशी ग्वाही दिली. पण त्यांनी पुढे असे सांगितले की आम्ही ट्रेनिंग स्कूलमध्ये रिअॅक्टर इंजिनियरिंग हा विषय क्लासरूममध्ये शिकलो असलो तरी रिअॅक्टर्सवर प्रत्यक्ष काम करून त्यांच्या सगळ्या यंत्रणांची चांगली जवळून ओळख करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आम्हाला वर्षभर रिअॅक्टर ऑपरेशन्स डिव्हिजनमध्ये फॅमिलियरायझेशन ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. इतके सांगून त्यांनी आम्हाला तिकडे पाठवून दिले. म्हणूनच त्या वेळी आम्हाला बसायला टेबलखुर्च्यांची व्यवस्था केली गेली नव्हती. </p><p><br /></p><p>मी कोण आहे? भाग ५३</p><p>मी परमाणु ऊर्जा विभागाच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल झाल्यापासून तिथले जे जे लोक भेटले ते सगळे डॉ.होमी जहाँगीर भाभा यांचे परमभक्त होते. बहुतेकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाभांच्या हाताखाली काम केले होते आणि त्यांचे बोलणे, वागणे आणि कामाचा झपाटा यांनी ते भारावून गेलेले दिसत होते. जुन्या काळातल्या एकत्र कुटुंबांमध्ये तिथल्या कुटुंबप्रमुखाने उच्चारलेले प्रत्येक वाक्य घरातल्या सर्वांना शिरोधार्य असायचे, इथेही सगळा कारभार "भाभावाक्यम् प्रमाणम्" असे धरून चालत असे. "असे भाभांनी ठरवलंय् किंवा सांगून ठेवलंय्" हे वाक्य मी कितीतरी वेळा ऐकत होतो. </p><p>होमी भाभा हे तोंडात चांदीचा किंवा कदाचित सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले होते. त्यांच्या कुटुंबाकडे गडगंज संपत्ती होती आणि तिच्यात भर घालावी अशी त्यांची वृत्ती नव्हतीच. मी असे ऐकले की ते महिन्याला फक्त एक रुपया सांकेतिक पगार घेऊन रात्रंदिवस झपाटल्यासारखे काम करत होते. त्यांचे पंतप्रधान पं.नेहरूंशी चांगले संबंध होते आणि त्याचा ते आपल्या कामात कुशलतेने उपयोग करून घेत होते. त्यांच्या दूरदृष्टीला तोड नव्हती. त्यांनी परमाणु ऊर्जा विभागाचे मुख्य कार्यालय दिल्लीच्या सचिवालयापासून दूर मुंबईत ठेवले. त्या ऑफीसात काम करणाऱ्या आयसीएस किंवा आयएएस अधिकाऱ्यांनाही आपल्या व्यक्तीमत्वाने भारावून टाकले. त्यांनी भाभांना त्यांच्या नवनिर्मितीच्या कार्यात सहकार्य व सहाय्य दिले. </p><p> त्यांच्या विभागाला अणुशक्तीकेंद्र स्थापन करण्यासाठी मुंबईजवळील तुर्भे इथली सरकारची हजारो एकर ओसाड जमीन दिली गेली. त्यात एक भला मोठा डोंगर आणि त्याचा खाडीपर्यंत जाणारा उतार होता. या खडकाळ भागात रस्ते आणि इमारती बांधून त्यात निरनिराळ्या प्रयोगशाळा उभ्या करायचे आव्हान भाभांनी स्वीकारले, ते काम करण्यासाठी एक स्वतंत्र आणि कार्यक्षम यंत्रणा उभी केली आणि तिच्याकडून हे जागतिक दर्जाचे केंद्र उभारून ते नावारूपाला आणले. कंबाला हिल, शिवाजी पार्क, वांद्रे, चेंबूर, घाटकोपर अशा मुंबईतल्या भागांमधल्या अनेक रहिवासी इमारती ताब्यात घेऊन तिथे या केंद्रातल्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करून दिली, त्यांना तुर्भ्यापर्यंत जाण्यायेण्यासाठी बसेसची सेवा सुरू करून दिली. अशा असंख्य गोष्टी सांगता येतील.</p><p>डॉ.भाभांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनानंतर डॉ.विक्रम साराभाई यांच्यावर अणुशक्तीखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तेसुद्धा गडगंज श्रीमंत अशा एका उद्योगपती कुटुंबातून आले होते. मी अणुशक्तीकेंद्रात नोकरीला लागलो तोपर्यंतच्या काळात तिथल्या अधिकाऱ्यांना अजून डॉ.साराभाई यांच्या कार्यपद्धतीचा विशेष अनुभव आला नव्हता. होमी भाभांचे शिष्य होमी सेठना अणुशक्तीकेंद्राचे संचालक झाले होते आणि मुख्यतः तेच तिथला कारभार भाभांच्या धोरणानुसार चालवत होते. माझी नेमणूक जिथे झाली होती त्या रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनच्या प्रमुखपदी (हेड आरईडी) श्री.विनय मेकोनी हे होते. तेसुद्धा घरंदाज श्रीमंत असावेत, ते मरीन ड्राइव्हवर रहात होते असे ऐकले.</p><p> </p><p>मी कोण आहे ? भाग ५४</p><p>माझ्या आयुष्यातल्या पहिल्या नोकरीतल्या पहिल्या दिवशीची सुरुवात मी श्री.मेकोनी यांना रिपोर्ट करून केली. ते माझे पहिले साहेब होते, पण त्यांनी पहिल्या भेटीतच आम्हा सर्वांना रिअॅक्टर्सवर प्रत्यक्ष काम करून त्यांना चालवण्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी रिअॅक्टर ऑपरेशन्स डिव्हिजनमध्ये पाठवून दिले. त्या वेळी त्या डिव्हिजनचे प्रमुखही श्री.मेकोनीच होते. त्यामुळे तेच आमचे साहेब राहिले होते. हे नुसते स्वयंपाकघरातून माजघरात जाण्यासारखे होते. अजूनही आमच्यावरचे 'ट्रेनी' हे लेबल तसेच राहिले असले तरी आता आम्हाला दरमहा ३०० रुपये स्टायपेंड न मिळता स्केलप्रमाणे पूर्ण पगार मिळणार होता. त्या काळात तो भत्ते धरून पाचशे रुपयांवर जात असला तरी त्यातून फंड, टॅक्सेस वगैरे कापले जाऊन सुमारे साडेचारशे इतका हातात मिळणार होता. पण आता रहायला होस्टेल आणि जेवायला मेस नव्हती. राहण्याची आणि खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आम्हालाच करायची होती.</p><p>आमची क्लास वन गॅझेटेड ऑफीसर (राजपत्रित शासकीय अधिकारी वर्ग १) अशा 'मोठ्या' पदावर नेमणूक झाली होती. गॅझेटेड ऑफीसरला सरकारी ऑफीसात खूप मानाचे स्थान असते असे मी ऐकले होते, पण आमच्याकडे काम करायला ऑफिसही नव्हते, आमचे असे टेबल नव्हते, खुर्ची नव्हती आणि अधिकार गाजवायला हाताखाली कोणीही स्टाफ नव्हता. आम्ही असले फक्त नामधारी ऑफिसर किंवा अधिकारी झालो होतो. गॅझेटेड ऑफीसरला नेमके कुठले खास अधिकार असतात हेही त्यावेळी आम्हाला कुणी सांगितले नाही. शिवाय आमची नेमणूक 'तात्पुरती, पण कायम होण्याची शक्यता असलेली' अशी होती. पण तीन वर्षांचा बाँड लिहून घेतलेला असल्यामुळे तितकी वर्षे तरी काही काळजी नव्हती. </p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ५५</p><p>मेकोनी साहेबांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सगळे त्यांच्या ऑफिसातून निघून चालत चालत सायरस या रिअॅक्टरकडे जायला निघालो. या रिअॅक्टरची एकाद्या भव्य अशा शिवलिंगासारखी अवाढव्य इमारत मी याआधीही बाहेरून पाहिली होती आणि त्याच्या आत काय दडलेले असेल हे पहाण्याची मला खूप उत्सुकता होती. आता आम्हाला वर्षभर तिथेच काम करायचे होते. ते कसे असेल याचा विचार करत करत आम्ही तिकडे जाऊन पोचलो. पण या वर्तुळाकार विशेष इमारतीत जाण्याचा मार्ग त्याच्या समोर असलेल्या चौकोनी इमारतीतूनच जात होता. त्याही इमारतीच्या बाहेरच आम्हाला एका सुरक्षारक्षकाने अडवले. </p><p>बीएआरसीच्या मुख्य गेटमधून आत शिरायच्या आधीच आमची पूर्ण झडती घेतली गेली होती आणि ओळखपत्र पाहूनच आम्हाला आत प्रवेश मिळाला होता. असे असले तरी आतल्या महत्वाच्या भागांमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश नव्हता. सायरसमध्ये जाण्यासाठी वेगळे खास ओळखपत्र असणे जरूरीचे होते. तिथल्या दरवानाने आम्हाला बाहेरच थांबवून कुणाला तरी फोन केला. मग आतून एक अधिकारी बाहेर आले आणि आमच्याशी बोलून त्यांनी आम्हाला आत येण्याची परवानगी दिली.</p><p>त्या इमारतीतल्या अनेक खोल्यांमध्ये निरनिराळी ऑफिसेस होती, तसेच भोजनगृह (कँटीन), स्नानगृहे, लॉकररूम्स वगैरे होती. त्यातच एक लहानसे सभागृह किंबहुना लेक्चररूम होती, तिथे आम्हाला नेऊन बसवले. थोड्या वेळाने यम् रंगनाथराव नावाचे एक अत्यंत गप्पिष्ट असे मध्यमवयाचे गृहस्थ तिथे आले आणि त्यांनी आमचा ताबा घेतला. एक विशिष्ट प्रकारचा दक्षिण भारतीय हेल काढून कुठल्याही विषयावर न थांबता तासन् तास बोलत रहायची किमया त्यांनी साधली होती. उरलेला सगळा वेळ त्यांनीच आमच्याशी गप्पा मारत काढला. त्यामुळे त्या वर्तुळाकार इमारतीत आम्हाला जायला मिळालेच नाही.</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ५६</p><p>आमची सायंटिफिक ऑफीसर या पदावर नेमणूक झाली असली तरी आम्हाला आपले ऑफिस आणि बसायला खुर्ची मिळालीच नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा त्या लेक्चररूममध्ये जाऊन एकमेकांशी बोलत बसलो. सावकाशपणे रंगनाथराव सर आले आणि त्यांनी फळ्यावर काही तरी लिहून शिकवायला सुरुवात केली. पण आम्हाला तर रिअॅक्टर पहायची उत्सुकता होती. आम्ही सगळ्यांनी एकमुखाने त्याची आठवण करून दिली. रंगनाथराव सर हसायला लागले, ते म्हणाले, " जरा दमाने घ्या, इतकी काय घाई आहे? तुम्ही तर तिथे काम करायलाच इथे आला आहात ना?"</p><p>"पण कधी?" एकाने विचारले.</p><p>ते म्हणाले, "त्याचे असे आहे की रिअॅक्टर सुरू असतो तेंव्हा त्यातून अल्फा, बीटा, गॅमा यासारखे डेंजरस किरण बाहेर पडत असतात. त्यामुळे काही आवश्यक काम असल्याशिवाय कुणीच रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये जायचे नसते आणि जे जातात तेही ठराविक वेळेच्या आत लगेच बाहेर परत येतात. त्याची रीतसर नोंद ठेवली जाते".</p><p>"पण रेडिएशनपासून बचावासाठी शील्डिंग दिले असते ना, सर?" कुणी तरी पुस्तकी ज्ञान पाजळले.</p><p>"हो. हे किरण बाहेर येऊ नयेत म्हणून या बिल्डिंगला जाडजूड भिंती बांधल्या आहेत. या इमारतीला कुठलीही खिडकीच काय, पण एकादे लहानसे छिद्रसुद्धा नाही. आतले किरण किंवा हवासुद्धा भिंतीतून बाहेर पडणार नाही याची काळजी घेतली जाते. पण त्यामुळे सूर्यप्रकाश आणि वारासुद्धा आतही जाऊ शकत नाहीत. बाहेर ऊन पाऊस काही असले तरी ते आत समजत नाही. इतकेच काय दिवस चालू आहे की रात्र आहे तेही कळत नाही."</p><p>"बाप रे !"</p><p>"पण जर तुम्हाला जर या भक्कम तटबंदीतून आत जायचे असेल तर आपल्या संरक्षणाची विशेष काळजी घ्यायला हवी. आत गेल्यावर काय करायचे आणि काय करायचे नाही हे नीट समजून घ्यायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे हा दरवाजा उघडून तुम्ही या खोलीत आलात तसे रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये जाता येत नाही. तिथे आत कसे जायचे आणि बाहेर कसे पडायचे याचेच आधी ट्रेनिंग घ्यावे लागते. मी तुम्हाला ते सगळे तपशीलवार शिकवीन आणि जेंव्हा तुम्ही आत जायला सज्ज व्हाल तेंव्हा संधी बघून तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये घेऊन जाईन." </p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ५७</p><p>मग पुढील तीन चार दिवस रंगनाथराव सरांनी आम्हाला त्या सायरस रिअॅक्टरचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे सगळे थोडक्यात शिकवले. तिथले कडक नियम, कायदेकानून वगैरेंची माहिती दिली. जिथे किरणोत्सार होण्याची शक्यता असते अशा जागी काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला सदोदित एक फिल्मबॅज आपल्या शर्टाला लावून ठेवणे आवश्यक असते. दर आठवड्याला त्यातली फिल्म काढून ती तपासणीला दिली जाते आणि तिच्या जागी नवीन फिल्म बसवली जाते. त्या आठवड्यात त्या फिल्मला रेडिएशनचा किती डोस मिळाला याची मोजदाद करून तिची नोंद ठेवली जाते. अशा प्रकारे त्या माणसाला एकंदर किती डोस मिळाला याचा रेकॉर्ड ठेवला जातो. तो रेकॉर्ड जन्मभर ठेवला जातो आणि निदान जितकी वर्षे तो माणूस तिथे कामावर आहे तिथपर्यंत तरी तो उपलब्ध करून दिला जातो. एकाद्या प्रसंगात जर काही कारणामुळे त्याला प्रमाणाबाहेर डोस मिळाला तर त्याला काही काळासाठी त्या कामापासून दूर ठेवले जाते. दर आठवड्याला, एका महिन्यात, तीन महिन्यात आणि बारा महिन्यात जास्तीत जास्त किती डोस घेणे सुरक्षित आहे याचे तक्ते दिले असतात आणि त्यांचे कसोशीने पालन केले जाते. एकदोन दिवसातच आम्हा सर्वांनाही आपापल्या नावाचे फिल्मबॅज मिळाले आणि घरी जाण्यापूर्वी त्यांना अडकवून ठेवण्याच्या बोर्डावर आमच्या नावाच्या जागा मिळाल्या.</p><p>रिअॅक्टर बिल्डिंगमधल्या हवेत असलेले धुळीचे किंवा वाफेचे कण कपड्यांना चिकटून बाहेरच्या जगात शिरण्याची शक्यता असते. ती कमी करण्यासाठी आत जायच्याआधी एक पांढरा ढगळा कोट परिधान केला जातो, तसेच पायातले नेहमीचे बूट काढून वेगळे कॅनव्हासचे जोडे घातले जातात. नंतरच्या काळात एकदा माझा एक मित्र एकदा चुकून नवे कोरे बाटाचे बूट घालून टिकटॉक करत आत जाऊन आला. तिथे कुठेतरी सांडलेल्या पाण्यात त्याचा पाय पडला असेल. बाहेर आल्यावर त्याच्या बुटातून थोडे रेडिएशन बाहेर पडतांना दिसले म्हणून त्यांना जप्त करून क्वारंटाइन केले गेले. त्याला ते अखेरपर्यंत परत मिळालेच नाहीत. असे होऊ नये म्हणून रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये प्रवेश करायच्या आधी ही अशी सगळी पेहेरावाची तयारीही करून घ्यायची असते याची माहिती मिळाली होती. पण माझ्या मित्राला त्याचे विस्मरण झाले आणि नवे कोरे जोडे गमवावे लागले. </p><p>काही कामगार ज्या वेळी प्रत्यक्ष रेडिओअॅक्टिव्ह पदार्थ हाताळतात त्यांना तर सर्वांग झाकणारे चिलखत आणि शिरस्त्राणसुद्धा परिधान करावे लागतात. कोरोनाच्या काळात काही नर्सेस आणि डॉक्टरांनी पीपीई किट घातलेले आपण टीव्हीवर पाहिले. आम्हाला तसे पेहेराव या ट्रेनिंगच्या काळातच पहायला मिळाले होते. पण आम्हाला शिकाऊ लोकांना तसली कामे करावी लागण्याची अपेक्षा नव्हती, त्यामुळे ते प्लॅस्टिक सूट घालावे मात्र लागले नाहीत किंवा घालायला दिले नाहीत.</p><p>"जे काही काम करायचे असेल ते आधी व्यवस्थितपणे लिहून काढावे आणि जसे लिहिले असेल तंतोतंत तसेच ते करावे." असा एक मूलमंत्र आयएसओ सर्टिफिकेशनमध्ये सांगितला जातो. पण आयएसओचा उदय होण्याच्याही आधीपासून जगभरातल्या अणुशक्तीउद्योगांमध्ये तो पाळला जात आला आहे. रेडिओअॅक्टिव्ह जागेत जे काही काम करायचे असेल त्याची बाहेर स्वच्छ वातावरणात पूर्ण पोशाख अंगावर चढवून रंगीत तालीम घेतली जाते. ती आम्ही पाहिली.</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ५८</p><p>वर्तुळाकार रिअॅक्टर बिल्डिंग आणि चौकोनी ऑफीसची इमारत यांना जोडणारा एक लांबुळका चौकोनी बोगदा आहे. त्याला एअरलॉक असे म्हणतात. त्याच्या दोन्ही टोकांना दोन यांत्रिक दरवाजे आहेत, त्यातला एका वेळेस एकच दरवाजा उघडता येऊ शकतो. रिअॅक्टर बिल्डिंगमधील हवेचा बाहेरील वातावरणाशी संपर्क येऊ नये म्हणून अशी व्यवस्था आहे. बाहेरून आत जातांना एक बटन दाबल्यावर आधी एअरलॉकमधील हवेचा दाब आणि बाहेरील वातावरणातला हवेचा दाब समान केला जातो आणि बाहेरचा दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडतो. त्यातून आत गेल्यावर आतले बटन दाबले की तो दरवाजा यंत्राने चांगला घट्ट सीलबंद होतो तसेच लॉक केला जातो. त्यानंतर एअरलॉकमधील हवेचा दाब आणि रिअॅक्टर बिल्डिगमधील हवेचा दाब समान केला जातो. तसे केल्याशिवाय आतला दरवाजा उघडता येत नाही. मग आतील दरवाजाचे बटन दाबल्यावर तो दरवाजा आतल्या बाजूने उघडतो. आत गेलेल्या माणसाने तिथेच थांबून आधी तो दरवाजा बंद करायला हवा आणि त्यानंतरच तिथून आत जायचे असते. आतून बाहेर येतांना याच्या उलट क्रमाने कृती करायची असते. बाहेरचा दरवाजा पूर्णपणे चांगला बंद झाला आहे याची खात्री करून घेऊनच आपल्याला जिथे जायचे असेल तिथे जाता येते. हे सगळे शिकून घेतल्यानंतर आम्हाला एकदाचे आत जायला मिळाले, तेही अनुभवी जाणकाराला सोबत घेऊन.</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ५९</p><p>मी घरी, शाळेत, कॉलेजात, हॉस्टेलमध्ये वगैरे सगळ्या ठिकाणी जेवढे दरवाजे पाहिले होते ते सगळे हातांनीच उघडायचे होते. फक्त अल्लाउद्दीनच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण गोष्टीतल्या गुहेचा दरवाजा तेवढा "खुल जा सिमसिम" अशा मंत्राने उघडत होता. मी आता रोजच लिफ्टचे दार बटन दाबून उघडत असतो, पण पन्नास वर्षांपूर्वी मी तरी तसला अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे सायरस रिअॅक्टरच्या बिल्डिंगमध्ये शिरतांना आपोआप उघडणारा दरवाजा हेसुद्धा एक नवलच वाटले होते. आता आतल्या गुहेमध्ये काय काय अजूबे पहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोचली होती.</p><p>इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असतांना आम्ही पुण्यातल्या काही कारखान्यांना भेटी दिल्या होत्या, दक्षिण भारताच्या शैक्षणिक सहलीमध्ये बंगळूरू आणि चेन्नै इथले काही मोठे कारखाने पाहिले होते, शिवाय आमचे कॉलेजमधले वर्कशॉप तर ओळखीचे होतेच. या सगळ्या ठिकाणी मोठमोठ्या शेड्समध्ये ओळीने मांडून ठेवलेली यंत्रे खडखडाट करत असत त्यांचे आवाज आणि इंधन व वंगणाच्या तेलांचे चमत्कारिक वास भरूव राहिलेले असायचे. आता आपले सगळे आयुष्य या असा वातावरणात जाणार आहे आणि याची सवय करून घ्यावीच लागेल अशी आपल्या मनाची समजूतही घातली होती. पण इथे रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये आत शिरल्यावर खूप शांतता दिसली आणि कसले वासही आले नाहीत.</p><p>रिअॅक्टरच्या पात्राच्या (व्हेसलच्या) सर्व बाजूंनी पाचसहा फूट जाडीच्या भिंती बांधलेल्या असल्यामुळे बाहेरून फक्त एक बुरुजासारखा आकार दिसत होता. त्याच्या आतमध्ये अणूंची केवढी धुमश्चक्री चालली असेल आणि त्यातून किती ऊर्जा व किती प्रकारचे किरण बाहेर पडत असतील याची यत्किंचितही कल्पना बाहेर उभे राहून येत नव्हती. हा रिसर्च रिअॅक्टर होता. संशोधनासाठी अनेक उपकरणे आणि यंत्रे तिथे मांडून ठेवली होती, पण त्यावर कोणीही संशोधक काम करतांना दिसत नव्हता. बहुधा सगळी निरीक्षणे (ऑब्झर्व्हेशन्स) आपोआप रेकॉर्ड होत असतील आणि शास्त्रज्ञ लोक अधून मधून फेरी मारून कमीत कमी वेळात ती पाहून जात असतील. त्या बिल्डिंगच्या तळघरांमध्ये अनेक पंप, व्हॉल्व्ह्ज, व्हेसल्स वगैरे उपकरणे आणि त्यांना जोडणारे नळ यांची दाटी होती. पण कशालाही स्पर्श करायचा नाही आणि कुठेही जास्त वेळ थांबायचे नाही अशी सक्त ताकीद आम्हाला दिलेली असल्यामुळे आमच्या वाटाड्याने धावतपळत एक फेरी मारून आम्हाला त्या जादूई दरवाजातून पुन्हा बाहेर काढले.</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ६०</p><p>रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये शक्यतो कुणी जायचे नाही आणि तिथे फार वेळ थांबायचे नाही असे असले तर त्याचे काम कसे चालते ? आणि त्याला चालवण्यासाठी इतकी माणसे नेमून ठेवली आहेत ते काय काम करतात? असे प्रश्न मनात येत होतेच. तिथले नियंत्रण कक्ष पाहिल्यावर त्यांचा उलगडा झाला. रिअॅक्टर बिल्डिंगच्या बाहेर एका वेगळ्या खोलीत हे कंट्रोल रूम असते. रिअॅक्टरमधली हवा किंवा पाणी यातले काहीही त्या खोलीत येऊ शकणार नाही याची काळजी घेतली जाते. रिअॅक्टर बिल्डिंग आणि कंट्रोल बिल्डिंग यांना जोडणाऱ्या शेकडो तारांमधून संदेशांचे वहन होते. या लांबट आकाराच्या हॉलच्या भिंतींवर अनेक सुबक कंट्रोल पॅनेल्स मांडलेले होते. कारच्या डॅशबोर्डवर जशी काही गोल किंवा चौकोनी उपकरणे बसवली असतात आणि त्यात फिरणाऱ्या सुया निरनिराळे आकडे दाखवत असतात, काही छोटे छोटे दिवे आणि बटने असतात, त्यांच्या तीनचार पट मोठे पॅनेल विमानांच्या कॉकपिटमध्ये असते आणि त्याच्याही चारपाचपट एवढे मोठे पॅनेल त्या रिअॅक्टरच्या नियंत्रणकक्षात होते. मी तोपर्यंत कुठलेही विमान आतून पाहिलेले नव्हते त्यामुळे तिथले ते अद्भुत दृष्य पाहूनच मी चकित झालो. मधोमध एका आकर्षक आणि सुबक रेखाचित्रामध्ये रिअॅक्टरचा आकार दाखवला होता आणि त्यातल्या पाण्याची पातळी वेगळ्या रंगाने दाखवली होती. प्रत्यक्ष रिअॅक्टरमध्ये जेवढी पातळी असेल त्यानुसार त्या चित्रामधली पातळी कमीजास्त होत होती. आजूबाजूला खूप डायल्स, लाल किंवा हिरवे दिवे आणि बटने वगैरे मांडून ठेवलेली होती. काही रेकॉर्डरसुद्धा होते, त्यातल्या कागदांवर सतत निरनिराळ्या प्रकारच्या माहितीचे आरेखन होत होते. पॅनेलच्या समोर मांडून ठेवलेल्या स्टुलांवर बसलेले इंजिनियर आणि ऑपरेटर त्या सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवत होते. </p><p>त्या हॉलच्या एका टोकाला एक प्रशस्त टेबल मांडले होते आणि त्याच्या मागे एक गोल फिरणारी आरामशीर खुर्ची होती. त्या वेळी असलेला शिफ्ट इंजिनियर त्या सिंहासनावर विराजमान झालेला असे. त्याचा रुबाब एकाद्या राजासारखा असे. त्याला बसल्या बसल्या सगळी पॅनेल्स दिसत असत आणि परिस्थिति नियंत्रणात ठेवण्यासाठी काय अॅक्शन घ्यायची हे तो ठरवू शकत असे. नियंत्रणाची बहुतेक कामे कंट्रोल पॅनेलवरची बटने दाबून किंवा फिरवूनच होत असत. काही कारणाने एकादी गोष्ट हवी तशी नाहीच झाली तर रिअॅक्टर बंद केला जात असे किंवा आपोआप बंद होत असे आणि मग प्रशिक्षित कामगार आत जाऊन दुरुस्ती करत असत. शिफ्ट इंजिनियरच्या सहाय्याला दोन तीन अनुभवी आणि दोन तीन शिकाऊ इंजिनियरही असायचे. ते केंव्हा तिथेच ठेवलेल्या खुर्चीवर बसायचे तर केंव्हा लायब्ररीत किंवा ऑफिसात बसून काही वाचन, लेखन वगैरे करत असत. थोड्याच दिवसांनी मी त्यांच्यात सामील झालो.</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ६१</p><p>ट्रेनिंग स्कूलमध्ये शिकत असतांना आम्हाला दिलेल्या हॉस्टेलचे पत्र्याचे का होईना, पण एक छप्पर डोक्यावर होते. तो परिसर तर फारच निसर्गरम्य होता. पण ट्रेनिंग संपल्यावर आम्हाला आपापल्या राहण्याची सोय करावी लागणार होती. जी मुले मुंबईतलीच होती ती तर आता घरी रहायला जाणार म्हणून आनंदात होती. काही मुलांचे सख्खे काका किंवा मामा मुंबईत रहात होते ते त्यांच्याकडे जाणार म्हणत होते. सधन घरातल्या मुलांना खात्री होती की त्यांचे आईबाबा येऊन त्यांची काही ना काही व्यवस्था लावून देतील. अनेक मुले मुंबईच्या बाहेर पोस्टिंग मिळावे यासाठी प्रयत्न करणार होती. मला तेही नको होते, शक्यतो मुंबईतच रहायचे होते. माझ्यासारख्या मुलांना मात्र आता आपले काय होणार याची काळजी लागली होती.</p><p>तशी माझीही एक मोठी चुलत बहीण आणि एक आते बहीण मुंबईत रहात होत्या, पण त्या दोघींचीही घरे मात्र फारच लहान होती. एकेका खोलीच्या घरांमध्ये नवराबायको, मुले आणि कधी कधी येणारा जाणारा एकादा पैपाहुणा असे सगळेजण रहायचे आणि जमीनीवर पथारी पसरून दाटीवाटीने झोपायचे. जेंव्हा जेंव्हा मी त्यांना भेटायला जात असे तेंव्हा त्या अतीशय प्रेमाने माझे स्वागत करत असत, मी त्यांच्यापेक्षा वयाने बराच लहान असल्यामुळे माझे थोडे लाडही करत असत आणि आग्रहाने तसेच हक्काने मला मुक्कामाला थांबवूनही घेत असत. ते एकाददोन दिवसासाठी ठीक असले तरी त्या परिस्थितीत त्यांच्या घरी रहायला जाणे मला शक्यच नव्हते. मी वर्षभरातल्या स्टायपेंडमधून थोडीशी बचत केली असली तरी तेवढ्या भांडवलावर मुंबईत कुठेही एक खोलीसुद्धा भाड्याने मिळत नव्हती असे चौकशी करता समजत होते. त्यासाठी मोठी पागडी किंवा डिपॉझिटतरी देणे आवश्यक होते. </p><p>मी कॉलेजमध्ये असतांनाच माझ्या वडिलांचे निधन झाले होते आणि माझे मोठे भाऊ स्वतःच अजून त्यांच्या आयुष्यात पुरते स्थिरस्थावर झालेले नव्हते, तरीही त्यांनीच माझे शिक्षण पुरे करून दिलेले होते. आता पुन्हा त्यांच्याकडून आणखी मदत मागायलासुद्धा मला लाज वाटत होती आणि त्यांनाही फार काही मदत करता येईल असे मला दिसत नव्हते. त्यामुळे आता आपण हॉस्टेल सोडल्यावर कुठे आसरा घ्यावा हे मला काही केल्या कळत नव्हते.</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ६२</p><p>आमच्या ट्रेनिंगच्या अखेरच्या टप्प्यात आम्हाला प्रात्यक्षिक अनुभवासाठी थोडे दिवस बीएआरसीमध्ये पाठवले गेले. मी त्यासाठी रोज आरईडीमध्ये जात होतो. तिथे साउरकर नावाचा मला दोन वर्षांनी पुढे असलेला मुलगा भेटला आणि आमची मैत्री झाली. त्याच्याशी बोलतांना मला समजले की तो माहीमला कुणाकडे तरी पेइंग गेस्ट म्हणून रहात होता. ते लोक अतीशय सज्जन, समजुतदार आणि मनमिळाऊ होते आणि साउरकर त्याच्या घरी राहतांना एकंदरीत खूष दिसत होता. आमचे ट्रेनिंग चाललेले असतांनाच त्याची कोटा इथे सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामावर बदली झाल्याचा हुकूम आला. त्याला स्वतःला ही बदली हवीच होती म्हणे. त्याने केलेला अर्ज तेंव्हा मंजूर झाला होता. </p><p>आमचे ट्रेनिंग संपल्यावर मला रहाण्याची सोय करायची होतीच आणि साउरकरच्या घरमालकांनाही एक सरळमार्गी चांगला मुलगा असा पेइंग गेस्ट हवा होता. एक दिवस तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. मला ती जागा आणि वातावरण बरे वाटले आणि त्यां लोकांनाही माझा बायोडेटा आणि चेहेरा पसंत पडला. साउरकरच्या जागी मी त्यांच्या घरी रहायला जायचे असे दोन्ही बाजूंनी नक्की केले. त्याप्रमाणे मी ट्रेनिंग स्कूलच्या हॉस्टेलमधला शेवटचा दिवस झाल्यावर लगेच त्यांच्याकडे मुक्काम हलवला.</p><p>ते कुटुंब खरेच चांगले होते आणि मला त्यांच्यात मिसळून रहायला काहीच अडचण आली नाही. माझीही नेमणूक साउरकर जात असलेल्या आरईडीमध्येच झाली होती, त्यामुळे जसे त्याचे रूटीन होते तसेच माझेही असणार असे आम्हाला वाटले होते. पण मला सायरसमध्ये ट्रेनिंगकरता पाठवले गेले आणि काही दिवसांनंतर माझी शिफ्ट ड्यूटी सुरू झाली. पहिली पाळी सकाळी सात ते दुपारी तीन, त्यानंतर दुसरी पाळी रात्री अकरा वाजेपर्यंत आणि तिसरी पाळी रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत असे. त्यामुळे पहिल्या पाळीसाठी भल्या पहाटे उठून निघावे लागायचे तर दुसऱ्या पाळीनंतर घरी पोचेपर्यंत मध्यरात्र उलटलेली असायची. तिसऱ्या पाळीत मला दिवसभर घरी लोळत पडले रहावे लागायचे. हे सगळे त्या कुटुंबालाही त्रासदायकच होते हे मला जाणवत होते. त्यामुळे त्यांनी काही बोलायच्या आधी मीच तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला. </p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ६३</p><p>नेमके आमचे ट्रेनिंग संपायच्या आधीच साउरकरची बदली होते काय, मी त्याच्याबरोबर त्याच्या घरी जातो काय आणि तिथे रहायला जायचे ठरवतो काय ? हे सगळे इतके अचानक होत गेले की मलाही तो एक दैवयोग वाटला होता. हॉस्टेल सोडल्यावर आपले सामान घेऊन कुठे जायचे ? या प्रश्नाने मी तेंव्हा खूप अस्वस्थ झालो होतो, त्यामुळे या योगायोगाने मला जरा हायसे वाटले होते. हे असे तडकाफडकी ठरवायच्या आधी मला माझ्या हॉस्टेलमधल्या घनिष्ठ मित्रांशी काही विचार विनिमय करायला वेळही मिळाला नाही, किंवा कदाचित मी उगाचच घाई केली होती. त्या लोकांचे कोणी ना कोणी जवळचे नातेवाइक मुंबईत रहात असल्यामुळे ते तसे निर्धास्त दिसत होते. पण मी त्यांना न विचारता आपली वेगळी सोय करून घेतल्याचा त्यांना थोडा रागही आला असावा.</p><p>माझ्या एका मित्राचा आत्ते किंवा मामेभाऊ चांगल्या पदावर नोकरीला होता आणि मोठ्या सरकारी जागेत रहात होता. त्याने नुकताच दादरला एक नवा फ्लॅट विकत घेतला होता, पण तो तिथे लगेच रहायला जाणार नव्हता, म्हणून त्याने तो फ्लॅट माझ्या मित्राला रहायला दिला आणि तो मित्र आमच्या बॅचच्याच आणखी तीन मित्रांसह तिथे रहायला गेला. मी घाई केली नसती तर त्या तीघांमध्ये माझा नंबर नक्की लागला असता, पण मी दुसरी सोय केल्यामुळे तिसऱ्याच एका मित्राला त्यांच्यात जागा मिळाली. अशा प्रकारे आपल्या मित्रांच्या संगतीत रहाण्याची माझी संधी हुकली. एवढे करून मला महिनाभरातच माझी जागा पुन्हा सोडायची वेळ आली तेंव्हा मला ही गोष्ट जास्तच अखरली, पण आता त्याला इलाज नव्हता.</p><p>आमच्याबरोबर नोकरीला असलेली काही मुले दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये कॉटबेसिसवर रहात होती. त्यांच्या घरमालकाने त्या भागातल्या अशा सातआठ फ्लॅट्समध्ये वीसपंचवीस मुलांना रहायला ठेवले होते. त्यातला एक मुलगा सोडून जाणार होता असे कळल्यावर मी लगेच खटपट करून तिथे जागा मिळवली. तिथे सगळी मुले मुलेच होती आणि त्यातली बरीचशी बीएआरसीत नोकरी करणारीच होती, त्यामुळे मला त्यांच्या अॅडजस्ट व्हायला वेळ लागला नाही. तिथे सगळेच जण आपापल्या मर्जीप्रमाणे राहू शकत असल्यामुळे कुणीही वेळी अवेळी यायला जायला मोकळा होता. काही महिन्यांनंतर दादरला रहाणाऱ्या चार मित्रांपैकी एकाचे लग्न झाले आणि तो आपल्या घरी रहायला गेला. मग बाकीच्या तीघांनी मला त्यांच्यात रहायला घेतले. तिथे मात्र मी पुढील तीनचार वर्षे मुक्काम केला. </p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ६४</p><p>थोडे दिवस क्लासरूममधले शिकवणे झाल्यावर आम्हाला चार गटांमध्ये विभागले गेले आणि शिफ्टवर कामाला लावले. वीजनिर्मिती किंवा इस्पितळातली सेवा चोवीस तास सुरू ठेवणे आवश्यक असते त्याचप्रमाणे एकादी अणुभट्टी एकदा सुरू झाली की तिच्या कामावर रात्रंदिवस लक्ष ठेवणे अत्यावश्यक असते. त्यासाठी तिथले अभियंते आणि कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये कामावर येतात. मी काम करत होतो त्या काळात पहिली शिफ्ट सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, दुसरी दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत आणि तिसरी रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत असायची. सहा दिवस पहिल्या शिफ्टमध्ये काम केल्यानंतर एक दिवस सुटी घेऊन दुसऱ्या शिफ्टला जायचे, ती सहा दिवस करून दोन दिवस सुटी घ्यायची आणि त्यानंतर सहा दिवस तिसऱ्या पाळीत काम केल्यानंतर तीन दिवस सुटी घ्यायची आणि पुन्हा पहिल्या शिफ्टवर जायचे असे २४ दिवसांचे चक्र असे. त्यात प्रत्येक शिफ्टमध्ये सहा दिवस काम आणि एकंदर सहा सुटीचे दिवस येत. पण त्याशिवाय कधीही कुठलीही सुटी नसे. शनिवार असो की रविवार, दिवाळी असो की होळी, ईद असो की ख्रिसमस आणि स्वातंत्र्यदिन असो की गणतंत्रदिवस असो, त्या दिवशी ठरलेल्या पाळीत कामावर जायलाच हवे. त्यात कुणालाही सूट मिळत नाही. कामावरून परत आल्यानंतर किंवा कामावर जायच्या आधी त्याने आपला सण साजरा करून घ्यायचा. न सांगता दांडी मारणे हा अक्षम्य अपराध समजला जात असे.</p><p>शिफ्टमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम आणि जबाबदारी ठरवून दिलेली असते आणि पुढील शिफ्टमधल्या माणसाने येऊन चार्ज घेतल्याशिवाय आधीच्या शिफ्टमधल्या माणसाला आपली जागा सोडता येत नाही. काही कारणाने पुढच्या शिफ्टमधला माणूस येऊ शकला नाही तर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्याला आपल्या जागेवर थांबून रहावे लागते. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांचे चार गट ठरलेले असतात त्यांना क्र्यू असे म्हणतात. त्यांच्याशिवाय इतरही लोक असतात ते जनरल शिफ्टमध्ये म्हणजे ऑफिसच्या वेळेसारखे काम करतात. तेसुद्धा चांगले प्रशिक्षित असतात. त्यामुळे एकादा कामगार आजारी असला किंवा त्याला रजा घेण्याची गरज असली तर ते लोक त्याच्या जागी बदली काम करू शकतात. मुख्य अधिकारी त्याचे सगळे नियोजन करतात.</p><p>आम्ही लोक ट्रेनी म्हणजे शिकाऊ असल्यामुळे आमच्यावर कुठली जबाबदारी सोपवली जात नव्हती. तरीही आम्हाला या कडक शिस्तीचे पालन करावे लागत होतेच. कदाचित तोसुद्धा आमच्या प्रशिक्षणाचा भाग असावा. </p><p><br /></p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ६५</p><p>माझ्या लहानपणी आमच्या घरात मध्यभागी एक मोठे घड्याळ भिंतीवर लावलेले होते. त्यातला मिनिट काटा बारावर आला की तेंव्हा जितके वाजले असतील तेवढे टोले त्या घड्याळात बडवले जात आणि तो काटा सहावर आला की एक टोला होत असे. हे टोले घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये ऐकू येत असत आणि त्यावरून सगळ्यांना वेळेचा अंदाज येत असे. तसे आमचे त्यावेळचे आयुष्य घड्याळाच्या काट्यांना विशेष बांधलेले नव्हते. पण ते कवितेमधल्या 'आजीच्या घड्याळा'नुसार मात्र बरेचसे चालत असे. पहाटे झुंजूमुंजू उजाडले की घरातली मोठी माणसे जागी होऊन स्वतः उठत असत आणि सूर्य उगवेपर्यंत इतरांनाही उठवत असत. अगदी लहान बाळे सोडून सगळे जण उठून अंथरूणे पांघरुणे वगैरे आवरून ठेवत आणि सकाळच्या कामाला लागत, एकापाठोपाठ एकजण न्हाणीघरात जाऊन आंघोळही करून घेत असत. सर्वांच्या आंघोळी आणि घरातल्या देवांची पूजा झाल्याशिवाय कुणीही काहीही तोंडात टाकायला मनाई होती.</p><p>त्या काळात बेकरी किंवा हॉटेलमधून कुठलाही खाद्यपदार्थ कधीही घरी येत नसे, कोणी पाहुणे आले असले तरच पोहे, शिरा, उप्पिट असा एकादा खास पदार्थ केला जात असे. आमची रोजची न्याहारी म्हणजे चटणी भाकरी किंवा थालिपिठाचे एक दोन चतकोर, फोडणीचा भात अशीच असे. त्याचे दोन घास खाऊन आम्ही कुठलाही डबा बरोबर न घेता शाळेला पळत असू. शाळेतून परत येईपर्यंत चांगली सडकून भूक लागलेली असे आणि दुपारचे जेवण घेतले जाई. त्यानंतर थोडा वेळ टंगळमंगळ करून पुन्हा दुपारची शाळा असे. ती झाल्यावर कधी कधी हातावर एकादा लाडू, वडी किंवा वाटीत चिवडा असे काहीतरी मिळायचे, ते खाऊन खेळायला जायचे ते अंधार पडायच्या आत घरी परत यायलाच पाहिजे असा सक्त नियम होता. रस्त्यावर सगळीकडे अंधारच होत असल्यामुळे तो आपणहूनच पाळला जात असे. मग परवचे, स्तोत्रे वगैरेंचा घोष करून रात्रीची जेवणे आटोपली की जमीनीवर गाद्या अंथरून त्यावर पाठ टेकायची. उन्हाळ्यात सकाळी लवकर सूर्य उगवतो आणि उशीरा मावळतो आणि थंडीच्या दिवसात याच्या उलट होते त्यामुळे दिवस आणि रात्र लहानमोठे होत असले तरी त्या काळात करायची कामे त्याच क्रमाने होत असत. त्यामुळे उठणे, झोपणे, आंघोळ आणि जेवणखाण या सगळ्या गोष्टी नेहमीच ठरावीक वेळी होत असत आणि जगातले सगळे लोक असेच करत असतील असे मी धरून चाललो होतो. पुढे हॉस्टेलमध्येही खाण्यापिण्याच्या वेळा ठरलेल्याच होत्या, पण अभ्यासासाठी कधी रात्री जाग्रण करणे किंवा पहाटे गजर लाऊन उठणे असे प्रकार सुरू झाले.</p><p>शिफ्टमध्ये काम करायला लागल्यावर मात्र सगळ्या गोष्टी पार बदलल्या. पहिल्या पाळीत सात वाजायच्या आधी पोचायचे असल्यामुळे पहाटे साडेपाचलाच घर सोडावे लागे. त्याच्या आधी कसली आंघोळ आणि कुठले खाणे ? एकदम लंचटाइममध्ये जेवण आणि संध्याकाळी घरी गेल्यावर स्नान. दुसरे दिवशी पुन्हा पहाटे लवकर उठायचे असल्यामुळे रात्रीचे भोजन लवकरच घेतले जायचे. दुसऱ्या शिफ्टमध्ये घरी पोचेपर्यंत मध्यरात्र उलटून गेलेली असायची आणि सकाळी उठायची घाई नसल्यांमुळे लोळत पडले जायचे. मग सावकाशपणे आंघोळ, खाणेपिणे वगैरे करायचे. तिसऱ्या पाळीत दिवसभर घरी घालवायचा असायचा त्यातच सगळी कामे, खाणेपिणे आणि झोपही घ्यायची. त्यामुळे कसलाच ताळतंत्र किंवा नियमितपणा नसायचा. शिवाय या पाळ्या दर आठवड्याला बदलत असल्यामुळे शरीराचे घड्याळ किंवा बॉडी क्लॉक असे काही असते हे समजायच्या आधीच ते पार विस्कटले होते.</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ६६</p><p>डॉ.होमी भाभा हे एक महान दृष्टे होते आणि त्यांचा भारतीय वंशाच्या लोकांची बुद्धिमत्ता, कौशल्य व क्रियाशीलता यावर पूर्ण विश्वास होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात इथे अगदी साधी साधी यंत्रसामुग्री किंवा उपकरणेसुद्धा तयार होत नव्हती. शिवाय त्या काळात जगभरातच अणुशक्ती हा विषयही अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय समजला जात होता. त्यासंबंधी साधी माहितीही मिळणे कठीण होते. अशा वेळी डॉ.भाभांनी भारताच्या अणुशक्तीच्या क्षेत्रामधील विकासाचा एक भव्य आराखडा तयार केला होता. त्यात अनेक अणुशक्तीकेंद्रे, त्यासाठी लागणारे इंधन, काही विशिष्ट आधुनिक धातू आणि रसायने, खास प्रकारची यंत्रसामुग्री, उपकरणे वगैरे सर्वांची निर्मिति भारतात करायची योजना होती. यासाठी लागणारे उच्च दर्जाचे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञही इथेच तयार करायचे असा आत्मनिर्भरतेचा मार्ग आखलेला होता. या अत्याधुनिक क्षेत्रात जे यश पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी मिळवले होते ते मिळवणे या देशातल्या लोकांनाही प्रयत्नांती शक्य आहे असा विश्वास भाभांना वाटत होता.</p><p>पण सगळ्याच गोष्टी अगदीच शून्यामधून तयार करणे शक्य नसते किंवा सोयीचे नसते. विकसित पाश्चिमात्य जगाच्या मदतीने सुरुवात करून त्यात भारतीयांनी प्राविण्य मिळवायचे हा मार्ग यंत्रोद्योगाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये अवलंबला जात होता. अगदी नटबोल्टपासून मोटारगाड्यापर्यंत अनेक वस्तू निर्माण करण्याचे कारखाने फॉरेन कोलॅबोरेशनमधून उभे रहात होते. तशाच विचारातून कॅनडा या देशाच्या सहकार्याने भारतातली सायरस ही प्रमुख अणुभट्टी सुरु केली गेली. अमेरिकेतल्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीला तारापूर इथे भारतातले पहिले अणुविद्युतकेंद्र उभारण्याचे काम दिले होते. त्यानंतर राजस्थानमधील रावतभाटा इथे दुसऱ्या प्रकारचे अणुविद्युतकेंद्र बांधायचे काम कॅनडाच्या सहकार्याने केले जाणार होते. मी ट्रेनिंगस्कूलमध्ये प्रवेश केला तेंव्हापर्यंत तारापूरच्या कामात थोडीफार प्रगति झाली होती आणि रावतभाट्याचे काम नुकतेच सुरू झाले होते. पण आपल्यापुढे भरपूर कामांचे डोंगर आहेत याची कल्पना आम्हाला दिली जात होती.</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ६७</p><p>डॉ.भाभांनी आखून दिलेल्या विशाल आराखड्यानुसार पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यायाठी त्यांनी ट्रेनिंगस्कूल सुरू केले होते. त्यात आमच्या बॅचमध्ये थोड्या जास्तच इंजिनियरांना घेतले होते. आमच्या बॅचमधून दोघा जणांना तारापूरला पाठवून दिले, दहा बाराजणांना राजस्थानातील रावतभाटा इकडे पाठवून दिले आणि पंधरासोळा जणांना बीएआरसीमध्ये अणुभट्ट्यांवर काम करण्यासाठी निवडले होते. त्यातले चारजण आरओडी नावाच्या डिव्हिजनमध्ये घेतले गेले होते त्यांना पुढेसुद्धा तिथले रिअॅक्टर चालवायचे होते आणि आम्ही बाकीचे अकरा बाराजण रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये होतो, आम्हाला खरे तर डिझाइनवर काम करायचे होते पण अणुभट्टी कशी असते हे पाहून घेण्यासाठी तिथे पाठवले होते.</p><p>त्यावेळी आरईडीमध्ये आधीपासून काम करणारे वीस पंचवीस लोकच त्यांच्या लहानशा ऑफिसात अत्यंत दाटीवाटीने बसत होते आणि आपला बराचसा वेळ वाचनालयात किंवा लेक्चर्स, सेमिनार, कॉन्फरन्स वगैरेंवर घालवत होते. आणखी अकरा बारा लोकांना तिथे बसायला रिकामी जागाही नव्हती आणि त्यांना लगेच देता येण्यासारखे काही कामही तिथे नव्हते. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास त्या वेळी आम्ही 'बेंच'वर होतो, पण प्रत्यक्ष बसायला तिथे बेंचसुद्धा उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला विभागून देऊन रिअॅक्टर्समध्ये शिफ्टमध्ये काम करायला पाठवून दिले होते. नियमितपणे तिथे काम करणाऱ्या लोकांना खरे तर आम्ही नकोसे होतो, कारण आम्ही तिथे तात्पुरते थोडे दिवस राहून निघून जाणार होतो. त्यामुळे आम्ही तिथले प्रशिक्षण घेण्यात किती मन लावून लक्ष देऊ याबद्दल त्यांना दाट शंका वाटत होती आणि त्यांना आमचा प्रत्यक्ष कामात फारसा उपयोग नव्हताच. कदाचित आमच्या आधीच्या बॅचमधल्या लोकांचा त्यांना तितकासा चांगला अनुभव आला नसेल आणि त्यामुळे ते पूर्वग्रहदूषित झाले असतील. कारण काहीही असले तरी ते आम्हाला मात्र पहिल्या दिवसापासूनच थोडी सापत्न वागणूक देत होते. </p><p>मोटारीचे ड्रायव्हिंग शिकवतांना ती सुरू कशी करायची आणि कशी थांबवायची ते शिकवतात आणि गीअर्स, क्लच, ब्रेक, अॅक्सलरेटर. स्टीअरिंग व्हील वगैरेंची ओळख करून देऊन त्यांचा उपयोग कसा करायचा याची भरपूर प्रॅक्टिस करवून घेतात. ती करून गाडी चालवायचा आत्मविश्वास आल्यानंतर आरटीओ वाले परीक्षा घेऊन ड्रायव्हिंग लायसेन्स देतात. अणुभट्टीमध्ये मोटारीच्या अनेकपट गुंतागुंतीची तऱ्हेतऱ्हेची यंत्रे असल्यामुळे ती चालवणे शिकायला आणि त्याचे लायसेन्स मिळवायला निदान दोन वर्षांचा काळ लागतो. पण आम्हाला तर पुढे तिथे काम करायचे लायसेन्स घ्यायचे नव्हतेच. तिथे कशा प्रकारची यंत्रे असतात आणि ती काय कामे करतात हे आम्हाला फक्त समजून घ्यायचे होते, ती चालवण्याचे कौशल्य मिळवायचे नव्हते. आमची भूमिका ड्रायव्हरची नसून ऑटोमोबाईल इंजिनियरची असायची. त्यामुळे आमचे माहिती मिळवण्यासाठी खोदून खोदून विचारणे तिथल्या सीनियर लोकांना पसंत पडत नसे. त्यांच्या वागण्यात थोडासा तुसडेपणा जाणवत असे. नोकरीच्या सुरुवातीलाच होणारा असा थोडासा अप्रत्यक्ष सासुरवास मला बेचैन करत होता, पण महिनाभरात मीही निर्ढावलो.</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ६८</p><p> सायरस या रिअॅक्टरची काही कॅनडामधून आलेली किंवा तिथे ट्रेनिंगला गेलेल्या भारतीय इंजिनियरांनी लिहिलेली माहितीपूर्ण मॅन्यूअल्स होती आणि फ्लोशीट्सची अनेक ड्रॉइंग्ज होती. त्या रिअॅक्टरसंबंधीची सगळी तांत्रिक माहिती त्यात भरलेली होती. ट्रेनिंग घेणाऱ्या इंजिनियरांनी त्यांचा कसून अभ्यास करायचा होता. तिथल्या प्रत्येक सिस्टिमसाठी वेगळी अशा पंधरावीस चेकलिस्टा होत्या. त्यांमध्ये अनेक मुद्दे आणि किचकट प्रश्न लिहिलेले होते. काही महिने अभ्यास करून झाल्यानंतर एका वरिष्ठ इंजिनियरसमोर एका शिकाऊ इंजिनियरने बसून त्या वरिष्ठाचे पूर्ण समाधान होईपर्यंत एक एक करून त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्यायची आणि एक एक करून सगळ्या चेकलिस्टा क्लीअर करायच्या असत. एक चेकलिस्ट पास केली म्हणजे ती सिस्टिम त्याला पूर्णपणे चांगली समजली असे होते. त्यासाठी त्यामागे असलेली सगळी थिअरी आणि प्रत्यक्ष काम करतांना आलेले अनुभव, पूर्वी कधीकाळी होऊन गेलेल्या घटना किंवा दुर्घटना वगैरे सगळ्यांची माहिती कसून तपासली जात असे. हे इंटरव्ह्यू टप्प्याटप्प्याने अनेक महिने चालत असत. </p><p>आम्ही नोकरीला लागलो तोपर्यंतच्या काळात झेरॉक्सचा शोध लागलेला असला तरी ते मशीन भारतात तरी प्रचारात आले नव्हते. त्यामुळे पुस्तकातल्या पानांची फोटोकॉपी काढून ठेवणे शक्य नव्हते. सुरक्षेच्या कडक नियमानुसार ती माहिती बाहेर नेणे हा तर अक्षम्य असा गुन्हा होता. डुप्लिकेशनची सोयच नसल्यामुळे कुठलाही दस्तऐवज अत्यंत दुर्मिळ समजला जात असे आणि त्याची जिवापाड काळजी घेतली जात असे. त्याची एक एकच प्रत लायब्ररीत ठेवलेली असे आणि ती तिथेच बसून वाचायची होती. आरओडीमधल्या इंजिनियरांना ही सगळी माहिती असणे अत्यावश्यक असल्यामुळे आणि प्रत्यक्ष काम करत असतांनाही त्यांची गरज पडत असल्यामुळे ती डॉक्युमेंट्स देण्यात त्यांना प्राधान्य दिले जात असे. आम्ही आरईडीचे ट्रेनी उपरे समजले जात असल्यामुळे आम्हाला ती कधी सहजासहजी मिळतच नसत. मग आम्ही ती वाचून आत्मसात कशी करणार आणि चेकलिस्टा कशा क्लिअर करणार ? आम्हाला चेकलिस्टसाठी द्यायच्या असलेल्या इंटरव्ह्यूसाठी वरिष्ठांकडून वेळही दिला जात नसे. त्यांना विचारले तर ते म्हणत, "तुम्हाला त्याची काय गरज आहे ? तुम्हाला थोडेच इथे काम करायचे आहे ?" अशा वातावरणात आम्ही मन लावून फारसे सखोल ज्ञान संपादन कसे करणार? दिवसभर तिथे बसून आजूबाजूला काय चालले आहे ते पहात रहायचे आणि शिफ्ट इंजिनियरने काही विशिष्ट लहानसे काम सांगितले तर ते करायचे अशी आमची साधारण दिनचर्या होती.</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? भाग ६९</p><p>मी नोकरीला लागलो त्या काळी म्हणजे १९६७ साली भारतात तरी फारसा दहशतवाद फोफावला नव्हता. अपघातांच्या बातम्या येत असत, पण त्यात सहसा घातपाताची शंका घेतली जात नव्हती. कुठल्याही विमानाचे अपहरण झाले नव्हते. विमानतळावर किंवा कुठेच फारशी कडक 'सुरक्षा जाँच' होत नव्हती. बीएआरसीमध्ये तेंव्हाही त्या मानाने कडक सिक्यूरिटी असली तरी ती आजच्यासारखी नव्हती. तिथून बाहेर जातांना कुणीही कुठलीही वस्तू किंवा गोपनीय माहिती नेऊ नये म्हणून आमच्या बॅगा किंवा थैल्या उघडून दाखवाव्या लागत, कधी कधी तर खिसेसुद्धा चाचपून पाहिले जात असत. कुणाकडेही काही सापडले तर त्याची धडगत नव्हती. त्याची नोकरी तर जाईलच, कदाचित तुरुंगातही जायची वेळ येईल अशी भीती दाखवली जात होती. </p><p>पण कुणीतरी देशद्रोही अतिरेकी आत येऊन घातपात करेल असे मात्र बहुधा कुणाला वाटत नसावे. त्यामुळे आत शिरायच्या वेळी फक्त आयडेंटिटी कार्ड दाखवावे लागत असे. कोणी एकाद्या दिवशी ते आणायला विसरला तरी मोठा प्रॉब्लेम नव्हता. बसमधला दुसरा कोणीही मित्र त्याला आपल्यासोबत आत प्रवेश मिळवून देऊ शकत असे. फक्त गेटवर ठेवलेल्या रजिस्टरमध्ये दोघांनी आपली नावे लिहून सह्या करणे पुरेसे होते. आजकाल आमच्या बिल्डिंगमध्ये कोणी मला भेटायला आला तर त्याला रजिस्टरमध्ये नोंद करावी लागतेच, शिवाय तिथला गार्ड मला फोन करून परवानगी विचारतो. </p><p>त्या काळात बीएआरसी हे एक प्रकारचे प्रेक्षणीय ठिकाणही होते. दर महिन्यातल्या दोन शनिवारी ठराविक वेळेमध्ये बाहेरच्या लोकांना तिथे भेट देण्याची परवानगी होती. मात्र त्यासाठी अणुशक्ती विभागाच्या मुख्य कार्यालयातल्या पब्लिक रिलेशन्स ऑफिसरकडे प्रार्थनापत्र देऊन त्याची आगाऊ अनुमति घेणे आवश्यक होते. फारशा लोकांना ही माहिती नव्हती, पण तरीही त्या वेळेमध्ये काही लहान लहान गट नेहमीच येत असत. त्यांना ते केंद्र दाखवण्याचे काम आम्हाला दिले होते.</p><p><br /></p><p> मी कोण आहे ? भाग ७०</p><p>आज सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण १९६७-६८मध्ये मी जेंव्हा तिथे ट्रेनिंग घेत होतो त्या काळात बीएआरसी हे एक प्रेक्षणीय स्थळ होते आणि अनेक व्हिजिटर्स तिथे फक्त भेट देण्यासाठी येत असत. प्रत्येक महिन्यातल्या दोन शनिवारी त्यांना बीएआरसी पहायला आत येण्याची मुभा होती. त्यासाठी गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या परमाणु ऊर्जा विभागाच्या ऑफिसात जाऊन जनसंपर्क विभागात एक फॉर्म भरून दिला की परवानगी मिळत असे.</p><p>बीएआरसीला जाऊन पोचणे मात्र तितकेसे सोपे नव्हते. आज जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते अस्तित्वातच नव्हते. चेंबूर कॉलनीवरून माहूलमार्गे पुढे जाऊन रिफायनरीज आणि टाटा थर्मल पॉवर स्टेशन ओलांडून गेल्यावर बीएआरसीचे गेट येत होते आणि तिथपर्यंत येणाऱ्या फक्त दोन बसेस होत्या. त्या काळात मुंबईत ऑटोरिक्शा नव्हत्याच आणि टॅक्सीही कमीच होत्या. तो रस्ताही खड्ड्यांनी भरलेला होता. आम्हालाच रोज जाता येता खूप त्रास होत असे.</p><p>बीएआरसीचा परिसर मात्र फारच रम्य होता. एका बाजूला गर्द वनराईने नटलेला भला मोठा डोंगर, त्याला वळसा घालून वळत वळत जाणारा रस्ता आणि दुसऱ्या बाजूला चंद्रभागेसारखा वक्राकार खाडीचा समुद्रकिनारा. त्या किनाऱ्यावर काही समतल जागा होत्या त्यावर थोड्या निरनिराळ्या प्रकारच्या प्रयोगशाळा आणि कार्यशाळा बांधल्या होत्या. आता असलेल्या काही मोठ्या इमारती तेंव्हा अजून बांधल्या जात होत्या. होमी भाभा हे मोठे शास्त्रज्ञ होते तसेच मनाने कलाप्रेमी होते. त्यांनी बहुधा प्रथमच लँडस्केप आर्किटेक्ट असे एक पद निर्माण करून त्यावर एका तज्ञाची नेमणूक केली होती. त्या गृहस्थाने डोंगराच्या उतारावर आणि इतरत्र लक्षावधी झाडे लावून जिकडेतिकडे सुंदर लॉन्स आणि बगीचे तयार केले होते. तिथे सगळीकडे सुंदर मनमोहक तसेच प्रेरणादायक दृष्य होते. मुंबईच्या जवळच इतके रम्य ठिकाण असेल हे मुंबईकरांना माहीतच नव्हते. </p><p>पण तिथे येणारे प्रेक्षक ते पहाण्यासाठी येत नव्हते. किंबहुना तिथे लोकांनी निसर्गरम्य ठिकाणची सहल करावी असा उद्देशच नव्हता आणि तिथे येऊन पिकनिक करायला बंदीच होती. प्रयोगशाळा आणि कार्यशाळांमधल्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून तिथेही कुणाला आत जाण्याची परवानगी नव्हती. बीएआरसीमधल्या सायरस या रिअॅक्टरची मोठा डोम असलेली गोल बिल्डिंग नाविन्यपूर्ण आणि प्रसिद्ध होती, अणुशक्तीच्या संदर्भात अजूनही तिचाच फोटो नेहमी दाखवला जातो. तिच्या आतल्या अलीबाबाच्या गुहेत काय काय दडले असेल याचे लोकांना कुतूहल असे आणि ते पहाण्यासाठी ते तिथे येत असत. </p><p><br /></p><p>भाग ७१</p><p>बीएआरसी पहाण्यासाठी निरनिराळ्या थरातले लोक येत असत. आमदार, खासदार, मोठे सरकारी अधिकारी, पोलिस ऑफिसर्स वगैरे व्ही आय पी लोक येणार असले तर त्याची सूचना आधी मिळालेली असे आणि त्यांची मोटार मेन गेटमधून आत शिरली की सायरसमधले त्या वेळी हजर असलेले सर्वात मोठे अधिकारी खाली उतरून त्यांच्या स्वागतासाठी तयार रहात असत. ते स्वतःच त्यांना आत नेऊन सगळे विभाग दाखवत असत. बीएआरसीमध्ये काम करणारे लोक आपल्या नातेवाइक किंवा मित्रांना घेऊन आले तर ते सायरसमध्ये त्यांच्या ओळखीतले जे कोणी अधिकारी असतील त्यांना येऊन भेटत असत आणि मग तो अधिकारी त्यांची काळजी घेत असे. इतर लोकांना तो रिअॅक्टर दाखवायचे काम आमच्यासारख्या शिकाऊ ट्रेनीजना दिले जात असे. त्यात कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असे. मुंबईतल्या निरनिराळ्या कॉलेजेसमधले विद्यार्थी २०-२५ जणांचा गट करून येत असतच, कधी कधी अहमदाबाद किंवा बडोद्याहूनसुद्धा काही विद्यार्थी मुंबई दर्शन करता करता बीएआरसीत येऊन पोचत असत.</p><p>तेंव्हा आम्ही शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे शनिवारी सकाळी पहिल्या पाळीत कामावर असण्याची शक्यता पंचवीस टक्केच असायची, पण जेंव्हा ती ड्यूटी असेल तेंव्हा मात्र आम्ही लोक पहाटे उठून गुळगुळित दाढी वगैरे करून आणि त्यातल्या त्यात चांगले इस्त्री केलेले कपडे घालून स्वतःला प्रेझेंटेबल करायचा प्रयत्न करत असू. त्या वर्षभरात माझ्या वाट्याला असे चारपाचच शनिवार आले असले तरी त्या आठवणी चांगल्या लक्षात राहिल्या आहेत. त्या काळातल्या मुलांनी ऑटोमॅटिक दरवाजेच आधी कुठे पाहिलेले नसायचे. त्यामुळे तिळा उघड म्हणून बटन दाबताच न कुरकुरता पण सावकाशपणे उघडणारे एअरलॉकचे अजस्त्र दारच त्यांना आश्चर्यचकित करत असे. आत गेल्यावर तिथली यंत्रसामुग्री आणि विशेषतः कंट्रोल रूममधली पॅनेल्स वगैरे पाहून ते भारावून जात असत आणि आपण काही तरी अद्भुत असे पाहिले असल्याची आठवण घेऊन परत जात असत.</p><p>एकदा एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपला मी विखंडनाची (फिशनची) माहिती देत असतांना दोन मुली हट्टच धरून बसल्या की त्यांना रिअॅक्टरच्या वर जाऊन ते दृष्य पहायचेच आहे. फोडणीत मोहऱ्या जशा तडतडतात किंवा पॉपकॉर्न भाजतांना तव्यावर उडतात तसे काहीतरी अणुभट्टीत दिसत असेल अशी त्यांची कल्पना होती. मी त्यांना सांगितले की हे न्यूट्ऱॉन्स कितीतरी कोटी, अब्ज, परार्ध यांच्यापेक्षा जास्त संख्येने असतात, ते या हॉलमध्येही सैरावैरा धावत आहेत आणि आपणा सर्वांच्या आरपार जात आहेत, पण ते आपल्याला कुठे दिसत आहेत का ? ते इतके सूक्ष्म असतात की त्यांना पाहता येईल असे सूक्ष्मदर्शक यंत्र कधी तयार झाले नाही आणि होण्याची शक्यताही नाही.</p><div><div>भाग ७२</div><div><br /></div><div>सायरस हा एक रिसर्च रिअॅक्टर आहे. निरनिराळ्या पदार्थांवर, तसेच उपकरणांवर विकिरणांचा काय परिणाम होतो यावर संशोधन करण्यासाठी निर्माण केलेली ती एक फॅसिलिटी आहे. विकिरणांचे मोजमाप करणे, त्यांच्यापासून संरक्षण करून घेणे आदि कामांचे प्रशिक्षण देण्यासाठीही ती उपयुक्त आहे. अणुशक्तीपासून वीजनिर्मिति करणे हा या अणुभट्टीचा उद्देश नाही आणि त्यासाठी कसलीही यंत्रणा तिथे ठेवलेली नाही.</div><div><br /></div><div>तरीही या अणुभट्टीतसुद्धा विखंडानापासून खूप ऊष्णता निर्माण होत असतेच. तिथल्या इंधनाला थंड ठेवण्यासाठी त्यातून सतत अत्यंत शुद्ध अशा पाण्याचा प्रवाह खेळवत ठेवलेला असतो. ते पाणी उकळून त्याची वाफ होऊ नये यासाठी ते तापलेले पाणी हीटएक्स्चेंजरमधील नळ्यांमधून फिरवले जाते, तिथे समुद्राचे पाणी येऊन त्या शुद्ध पाण्याला निववते. यासाठी समुद्राच्या खाडीमधून पंपाने पाणी उपसून पुरवले जाते आणि ते पुन्हा खाडीत दूरवर नेऊन सोडले जाते. जेट्टी म्हणजे एका प्रकारचा पूल बांधून त्याच्या आधाराने या पाइपलाइनी बसवल्या आहेत. </div><div><br /></div><div>जेट्टीच्या टोकाशी एका केबिनमध्ये पंप्स, व्हॉल्व्ह्ज वगैरे यंत्रसामुग्री आहे. तिच्या देखरेखीसाठी एकादा ऑपरेटर असतोच, पण इंजिनियरांनाही अधूनमधून जावे लागते. शिफ्ट इंजिनियर अशा वेळी एकाद्या शिकाऊ ट्रेनी इंजिनियरलाही सोबत घेऊन जात असे. दोन्ही बाजूंनी समुद्राच्या लाटा उसळत असतांना त्यांच्यामधून एका अरुंद अशा सुनसान रस्त्याने दूरवर चालत जाणे हाही एक मजेदार अनुभव येत असे. त्या काळात तर मोबाईलही नव्हते. तिथे जाऊन परत येईपर्यंत नेहमीच्या बाह्य जगाशी संपर्क तुटलेला असे.</div><div><br /></div><div>जेट्टीच्या अगदी शेवटच्या टोकाला दोन बंदूकधारी शिपाई राखण करत बसलेले असत. त्यांना तिथे असलेल्या यंत्रसामुग्रीचे संरक्षण करायचे असेच, पण त्या मार्गाने कुणीही बीएआरसीत प्रवेश करू नये हे पाहण्यासाठी त्यांना मुख्यतः तिथे ठेवलेले असे. कधीकाळी कुणी असा प्रयत्न केला असे माझ्या ऐकण्यात तरी आले नाही, पण संरक्षणाच्या बाबतीत संपूर्ण काळजी घेणे आवश्यक असते. मात्र मला त्या शिपायांचे कुतुहल आणि कौतुक वाटत असे. एका निर्मनुष्य अशा अगदी लहानशा जागेत काडीचेही काम न करता दिवसरात्र नुसते बसून रहायचे, ही देखील एक प्रकारची योगसाधना असावी. तिथे तर काहीही खायलाप्यायला मिळण्याचीही शक्यता नव्हती. जे काही अन्नपाणी हवे असेल ते तिथे जातांनाच बरोबर घेऊन जायला हवे होते.</div></div><div><br /></div><p>भाग ७३</p><p>आम्ही ट्रेनिंग स्कूलमध्ये शिकत असतांनाच अणुशक्ती विभागाच्या रचनेत काही महत्वाचे बदल होत होते, त्यांचा आम्हाला थांगपत्ताही नव्हता. तेंव्हाचे अध्यक्ष डॉ.विक्रम साराभाई हे एक उच्च दर्जाचे शास्त्रज्ञ होते, तसेच एक यशस्वी उद्योगपतीही होते. संशोधन आणि उद्योगव्यवसाय यासाठी लागणाऱ्या आस्थापनांची त्यांना चांगली जाण असल्याने त्यांनी अणुशक्ती खात्याच्या अंतर्गत असलेले संशोधनकार्य व औद्योगिक काम यांना वेगळे करून त्यांचे व्यवस्थापन त्यानुसार स्वतंत्रपणे करावे या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली होती. हे काम गाजावाजा न करता शांतपणे चाललेले होते. </p><p>कोटा इथे बांधल्या जात असलेल्या अणुविद्युत प्रकल्पासाठी कुलाब्यात आरएपीपीचे वेगळे ऑफिस उघडले होते आणि त्याच्या डिझाइनचे काम पहाण्यासाठी बीएआरसीमधल्या काही वरिष्ठ इंजिनियरांना घेऊन तिथेच एक पीआरडीएस नावाचा तात्पुरता विभाग तयार केला होता. इलेक्टॉनिक्स या त्यावेळी वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानातून निर्माण होणारा उद्योगव्यवसाय सांभाळण्यासाठी हैद्राबादला ईसीआयएल ही सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी उभारली गेली होती, तसेच भावी काळात बांधल्या जाणाऱ्या अणुभट्ट्यांसाठी इंधन तयार करण्यासाठी हैद्राबाद इथेच एनएफसी हा वेगळा प्रकल्प सुरू करण्याची तयारी सुरू झाली होती. रॉकेट्सवर काम करण्यासाठी तर वेगळे डिपार्टमेंट ऑफ स्पेस होणार होते.</p><p>आम्ही सायरसमध्ये ट्रेनिंग घेत असतांनाच अणुशक्तीखात्याच्या थेट नियंत्रणाखाली पीपीईडी नावाचा एक वेगळा विभाग निर्माण करून आरएपीपी व पीआरडीएस यांना त्यात विलीन केले गेले आणि भविष्यकाळात बांधण्यात येणाऱ्या सर्व अणुविद्युतकेंद्रांशी निगडित असलेले सगळे काम त्या ऑफीसला देण्यात आले. त्या वेळी त्यांचे ऑफिस भायखळ्याला आर अँड सी नावाच्या कंपनीच्या इमारतीत होते. </p><p>आमच्या ट्रेनिंगमधले चारपाच महिने झाले असतांना पीपीईडीला गरज होती म्हणून आमच्यातल्या दोघा इलेक्ट्रिकल इंजिनियरांना तिकडे पाठवले गेले. आणखी तीन चार महिन्यांनी आमच्यातल्या तीन मेकॅनिकल इंजिनियरांची अशीच तडकाफडकी बदली झाली. त्यांची निवड कुणी आणि कुठल्या निकषांवर केली होती हे कुणालाच समजले नाही, पण त्यामुळे ते लोक खूष होते, कारण शिफ्टमध्ये न जाता ऑफिसटाइममध्ये नोकरी होती आणि तिथे उपयुक्त असे प्रत्यक्ष काम, जबाबदारी वगैरे मिळणार होते. बसायला हक्काची खुर्ची मिळाली होती. त्यामुळे क्लास वन गॅझेटेड ऑफिसर झाल्याचा फील आला होता. खरे तर मागे राहिलेल्या आम्हाला त्यांचा थोडा हेवा वाटत होता.</p><p> पण काही दिवसांनी अशी बातमी आली की फास्ट रिअॅक्टर प्रॉजेक्टला मंजूरी मिळाली आहे आणि त्या कामाच्या प्रशिक्षणासाठी वीसपंचवीस जणांच्या टीमला फ्रान्सला पाठवले जाणार आहे. त्या वेळी बीएआरसीमध्ये फास्ट रिअॅक्टरवर काम करणारे फक्त चारच लोक होते, त्यामुळे आणखी जे कोणी त्या ग्रुपमध्ये घेतले जाणार होते त्यांचे फ्रान्सचे तिकीट निघाल्यात जमा होते. आता आम्हा सगळ्यांनाच त्यात आपले नाव यायला पाहिजे असे वाटायला लागले.</p><div><br /></div><p>भाग ७४</p><p>ट्रेनिंग स्कूलमधून माझी बीएआरसीच्या आरईडी या खात्यात रीतसर नेमणूक झाली होती. ती ऑर्डर चक्क गॅझेटमध्ये छापून आली होती. मी नोकरीच्या पहिल्या दिवशी तिथले प्रमुख श्री.विनय मेकोनी यांना रिपोर्ट केले होते. त्यांनी आम्हाला तोंडी आदेश देऊन सायरसमध्ये फॅमिलियराझेय़न ट्रेनिंगसाठी पाठवले होते. आम्हाला तशी लेखी ऑर्डर मिळाल्याचे आठवत नाही. आम्ही कागदोपत्री तर मेकोनीसाहेबांच्या हाताखालीच काम करत होतो. </p><p>आमच्या ट्रेनिंगचे दोनतीन आठवडे शिल्लक असतांना एक दिवस साहेबांना आमची आठवण झाली आणि त्यांनी आम्हा सर्वांना तातडीने त्यांच्या ऑफिसात बोलावून घेतले. आधी आमचे कसे काय चालले आहे वगैरे सर्वसाधारण चौकशी करून झाल्यानंतर कुणी किती प्रगति केली याची विचारणा केली. त्या रिअॅक्टरसाठी पंधरावीस चेकलिस्टा होत्या आणि त्यात चारपाचपासून वीसपंचवीसपर्यंत मुद्दे होते. सीनियर शिफ्ट इंजिनियर एकेका मुद्यावर तासभर चर्चा करून त्यांचे समाधान झाले तर तो मुद्दा क्लिअर करत असत. ज्यूनियर शिफ्ट इंजिनियर हे पद मिळवण्यासाठी या सगळ्या चेकलिस्टा यशस्वी रीत्या पूर्ण करणे आवश्यक होते. त्या कामासाठी दोन वर्षे इतका अवधी दिला गेला होता. आम्हाला तर तिथे काम करायचेच नव्हते. त्यामुळे आमच्यावर त्या चेक लिस्टा पूर्ण करण्याची जबाबदारी नव्हती. तरीही आम्ही तो प्रयत्न करत होतो, पण शिफ्ट इंजिनियर्सच आम्हाला त्या इंटरव्ह्यूजसाठी वेळ देत नव्हते, कारण त्यांनाही त्याची गरज वाटत नव्हती.</p><p>मेकोनी सरांनी एकदम विचारल्यावर आम्ही प्रत्येकी किती चेकलिस्टा पूर्ण केल्या होत्या ते सांगितले. बहुतेकजणांनी चारपाच मुद्दे असलेल्या तीन चार सोप्या चेकलिस्टा पास केल्या होत्या पण त्यांचा मुख्य कामाशी विशेष संबंध नव्हता. त्यावर सर आमच्यावर रुष्ट झाले आणि आम्ही वर्षभर काय झोपा काढल्या का? असे विचारले. आम्ही त्यांना सांगितले की आम्ही सगळा अभ्यास करून ठेवला होता, पण आम्हाला इंटरव्ह्यूची संधीच मिळाली नव्हती. मग त्यांनीच सर्वात महत्वाच्या चार पाच सिस्टिम्सची नावे लिहून दिली आणि आम्ही त्या ताबडतोब पूर्ण करायलाच पाहिजे असे सांगितले. त्यासाठी सहकार्य करायच्या आज्ञा शिफ्ट इंजिनियरांनाही केल्या. पुढच्या दोन तीन आठवड्यात आम्ही तीनही शिफ्टमधल्या सीनियरांना गाठून ते टार्गेट पूर्ण केले.</p><p><br /></p><p><b>भाग ७५</b></p><p>CAUTION: Auto translation in English could be erroneous and misleading. Please click on 'Show Original'. This piece is about My memories from my early life.</p><p>ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतांनाच आमच्याकडून तीन वर्षांचा बाँड लिहून घेतला होता. त्यानुसार आम्ही चार वर्षांसाठी 'बंधुआ मजदूर' झालो होतो. ट्रेनिंगच्या कालावधीत मध्येच सोडून जायचे असल्यास तोपर्यंत जेवढा स्टायपेंड मिळाला असेल तेवढा सगळा परत करायचा होता आणि पुढील तीन वर्षांमध्ये नोकरी सोडायची असली तर ३६०० रुपये रोख परत करायचे होते. त्या काळात मिळत असलेल्या पगारातून दर महिना शंभर रुपये शिल्लक टाकले तरी तेवढी रक्कम जमायला तीन वर्षे लागणारच होती. माझ्याकडे इतके पैसे मिळवण्याचा दुसरा श्रोतच नसल्यामुळे आता नोकरी सोडायचा विचार मनात न आणता इथेच शक्य तितकी प्रगति करायची एवढेच मला शक्य होते.</p><p>मीही ट्रेनिंग स्कूलमध्ये सीरियसली अभ्यास करून दुसरा नंबर मिळवला होता आणि त्या जोरावर आरईडीमध्ये प्लेसमेंटही मिळाली होती. पण तिथे गेल्यावर कुठले काम करायचे हे मेकोनीसाहेब ठरवणार होते आणि त्यांनी तो निर्णय वर्षभरासाठी पुढे ढकलला होता. त्या कालावधीत अणुशक्ती खात्यात बरीच पुनर्रचना होत होती आणि नवनवे प्रकल्प सुरू होत होते. त्यामुळे आमचे भवितव्य अनिश्चित राहिले होते. वर्षभर वाट पाहिल्यानंतर एकदाचा तो डी डे उगवला. आम्हा सगळ्या म्हणजे उरलेल्या नऊ मुलांना मेकोनीसाहेबांनी भेटीला बोलावले. कुठल्या उपविभागात आमच्यासाठी किती रिकाम्या जागा वाट पहात आहेत याची काडीमात्र कल्पना आम्हाला नव्हती.</p><p>त्या काळात फास्ट रिअॅक्टरचा नवा प्रकल्प मंजूर झाल्यामुळे तिथे जाणारे सगळेजण ट्रेनिंगसाठी फ्रान्सला जाणार हे ठरलेले होते. स्वतःच्या खर्चाने परदेशी जायचे तर आम्ही स्वप्नातसुद्धा बघू शकत नव्हतो. त्यामुळे सर्व नऊहीजणांनी आपल्याला फास्ट रिअॅक्टर सेक्शनमध्ये घ्यावे अशी पसंति दिली. वर्षभर थर्मल रिअॅक्टरवर काम करूनसुद्धा कुणालाच त्याचे प्रेम वाटू नये हे पाहून मेकोनीसाहेब जरा नाराजही झाले असतील किंवा मनातल्या मनात आम्हाला हसत असतील. </p><p>आमचा ट्रेनिंगस्कूलमधला परफॉर्मन्स आता जुना आणि अर्थहीन झाला होता. त्यामुळे तिथे पहिला आलेला रामकृष्णन आणि दुसरा आलेला मी या दोघांनाही फास्ट रिअॅक्टर ग्रुपमध्ये घेतले गेले नाही. काळे, दीक्षित, सोढी आणि हुंजेन या चार जणांची लॉटरी लागली. माझ्यासह रामकृष्णन, दास आणि व्हगासिया यांना पीपीईडीमध्ये पाठवले आणि कामतची नेमणूक आईडीमधल्या वर्कशॉपमध्ये केली. ही प्लेसमेंट करतांना मेकोनीसाहेबांनी कोणता विचार केला, कोणता निकष लावला हे कुणालाच कधी कळले नाही. दुसरे दिवशी आम्हाला आपापले नेमणूकपत्र दिले गेले आणि ताबडतोब त्या त्या ऑफीसात जाऊन हजर होण्याचा हुकूम मिळाला.</p><p><br /></p><p></p><p>(क्रमशः)</p><p><br /></p><div><br /></div>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-20484515.post-2094995723892678272022-07-27T05:33:00.000-07:002022-07-27T05:33:02.350-07:00एक संस्मरणीय सहल<p> एक संस्मरणीय सहल - भाग १</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgckVHPUqnoEkB7BDvqpjUT3QORcY4eYVbJeCycNycTpbEvpskJaDUc6MK0FVYJIArov5JUCxxuKGgP0kwXu5YOv8NYGf827pdBUHMLU-vybUiZ8Ya573He6XYgeJLmal-YdS5dyJ8lmg8gNnCMtyZ9uxAR-zlazb-0MnUqfZFdG_nE0uoKxHM/s1600/WhatsApp%20Image%202022-06-26%20at%2010.07.08%20AM%20(1).jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="719" data-original-width="1600" height="180" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgckVHPUqnoEkB7BDvqpjUT3QORcY4eYVbJeCycNycTpbEvpskJaDUc6MK0FVYJIArov5JUCxxuKGgP0kwXu5YOv8NYGf827pdBUHMLU-vybUiZ8Ya573He6XYgeJLmal-YdS5dyJ8lmg8gNnCMtyZ9uxAR-zlazb-0MnUqfZFdG_nE0uoKxHM/w400-h180/WhatsApp%20Image%202022-06-26%20at%2010.07.08%20AM%20(1).jpeg" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>अलीकडेच माझा अमेरिकेत रहाणारा मुलगा उदय सहकुटुंब भारतात आला होता. नेहमीप्रमाणेच त्यांना मोजक्या दिवसात बरीच कामे करायची होती. त्यांना गोव्यातल्या एका हॉटेलात ठेवलेल्या मित्रांच्या मेळाव्यात सामील व्हायचे होते, तसेच सर्वांना घेऊन कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जायचे होते. पुण्यातल्या मुलाला (अजयला) उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी एकादे लहानसे आउटिंग करायचे होते. तेंव्हा दोघा मुलांनी मिळून सर्वांची एक लहानशी सहल काढायचे ठरवले आणि इंटरनेटवरूनच चौकशा करून उत्तर गोव्यातल्या अरंबोळ नावाच्या एका अप्रसिद्ध बीचवरील रिसॉर्टवर तीन दिवसांचे बुकिंग करून टाकले. तसेच हवामानाचा विचार करून एक प्रशस्त अशी वातानुकूलित टेंपो ट्रॅव्हेलर ड्रायव्हरसह तीन दिवसांसाठी भाड्याने घेतली. म्हणजे कुणाला ड्रायव्हिंग करायचा ताण येणार नाही आणि सर्वांनाच ती ट्रिप पूर्ण एंजॉय करायला मिळेल.</p><p> पुण्याहून गोव्याला जायच्या प्रवासाला सुमारे आठ तास लागतात हे आम्हाला माहीत होतेच, अगदी इथल्या घरापासून ते त्या रिसॉर्टपर्यंत जायला साडेआठ तास लागतील असे गूगलबाबाने सांगितले. मग दुपारचे जेवण करून निघायचे आणि रात्री समुद्राच्या लाटा पहात पहात गोव्यातल्या सुप्रसिद्ध मत्स्याहारावर ताव मारायचा असा विचार काही जणांनी केला. पण इतक्या सगळ्या लोकांनी तयार होऊन, जेवणखाण आटोपून, घराची आणि सामानाची आवराआवर करायला लागायचा तेवढा वेळ लागलाच आणि निघायला उशीर झाला. शिवाय आम्हाला कुठली ट्रेन किंवा फ्लाइट पकडायची नसल्यामुळे त्याचे प्रेशर नव्हते. त्यामुळे फार घाई न करता लागेल तेवढा वेळ दिला गेला. </p><p>हायवेवरील चांदणी चौकावर एक भला मोठा फ्लायओव्हर बांधायचे जंगी काम चालले आहे, त्यामुळे तो एक कायमचा ट्रॅफिक जॅमचा वीक पॉइंट झाला आहे. तिथे नेमक्या त्याच वेळी एक अवाढव्य ट्रक की ट्रेलर बंद पडला होता आणि वाहतुकीची पुरती कोंडी झाली होती. त्यामुळे हायवेवर पार बाणेर वाकडपर्यंत शेकडो वाहनांची भाऊगर्दी होऊन गेली होती. आमच्या गाडीला त्या ट्रॅफिकजॅममधून हळूहळू वाट काढायलाच चांगला तास दीडतास लागला. पुढे बंगळूरु महामार्गावरही बऱ्यापैकी रहदारी सुरू होती त्यामुळे कोल्हापूरपर्यंत जाता जाताच रात्रीचे आठ वाजायला आले.</p><p>पुढे घाटात चांगले जेवण मिळेल की नाही याची शंका होती म्हणून कोल्हापूरजवळच रस्त्यावर एक बऱ्यापैकी हॉटेल दिसले तिथे प्रवेश केला. सगळेजण हॉलिडे मूडमध्ये होते. आता कुणाला तिथला प्रसिद्ध तांबडा आणि पांढरा रस्सा चाखायचा होता तर कुणाच्या डोक्यातून रात्रीची फिशकरी गेली नव्हती, कुणाला पाश्ता आणि पिझ्जा खायचा होता तर माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना साधा वरण भात किंवा दहीभातच हवा होता. सगळ्यांना हवे ते खायला घालून तृप्त केल्यावर आम्ही गगनबावड्याच्या रस्त्याला लागलो. </p><p>------------------------------</p><p>भाग -२</p><p>गगनबावड्याहून कणकवलीकडे जाणाऱ्या घाटाचा रस्ता हायवेच्या मानाने अरुंद होता. त्यात विभाजकही नव्हते आणि दोन्ही बाजूंनी येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांची रहदारी जोरात सुरू होती. रस्त्यात अधूनमधून लहानमोठे खड्डेही पडलेले होते आणि पावसाच्या सरी येत होत्या. एका ठिकाणी तर इतका मुसळधार पाऊस लागला की समोरचे काहीही दिसत नव्हते आणि त्यातून वळणवळणाचा रस्ता. त्यामुळे थोडा वेळ थांबावे लागले होते. मग एक जीप आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली आणि तिच्या मागे मागे आम्हीही हळूहळू पुढे सरकायला लागलो. घाटातला कठीण रस्ता संपून आम्हाला मुंबई गोवा महामार्ग लागला तेंव्हा मनाला हायसे वाटले. </p><p>आम्हाला वाटेत उशीर झाला होता आणि आमचा प्रवासही हळू हळू होत होता. रिसॉर्टचे बुकिंग करतांना आम्ही दिलेल्या वेळेत तिथे जाऊन पोचणे तर शक्यच नव्हते. म्हणून आम्ही रिसॉर्टला फोन लावला. तेंव्हा तो एका बाप्याने उचलला आणि "काही हरकत नाही" असे सांगितले. नंतरही आम्ही दर तासातासाला फोन करून वेळ वाढवून घेत होतो. मध्यरात्रीच्या सुमाराला एकदा त्याचाच फोन आला आणि त्याने एक विचित्र मागणी केली. त्याला अचानक आम्हा सर्वांची आधार कार्डे लगेच पाहिजे होती म्हणे. तिथे पोचल्यावर आम्ही दाखवू असे सांगितले तरी त्याला धीर धरवत नव्हता. "तुम्ही ही कार्डे बुकिंगच्या वेळीच का मागितली नव्हती ?" असे विचारूनही काही उपयोग झाला नाही. आम्हाला उशीर होत असल्यामुळे आमची बाजू थोडी लंगडी होती आणि त्याने तर हट्टच धरला होता. मग आम्ही गाडी बाजूला थांबवली. पूर्वीच्या अनुभवावरून बहुतेक सर्वांनी आपापली आधार कार्डे जवळ बाळगली होतीच. ती बाहेर काढून त्यांची मोबाइलनेच छायाचित्रे घेतली आणि ती रिसॉर्टला वॉट्सॅपवर पाठवून दिली. आधुनिक तंत्रज्ञानामधील प्रगतीचा वेळप्रसंगी केवढा मोठा उपयोग होत होता याचेच मला कौतुक वाटले. </p><p>गोव्याच्या हद्दीवर गाडी थांबवून ड्रायव्हर खाली उतरला आणि आमच्याकडून बरेचसे पैसे घेऊन तिथल्या ऑफिसात गेला. बहुधा त्याला तिकडचे 'टेंपररी लायसन' काढायचे होते. तिथल्या बॉर्डर फॉर्मॅलिटीज पूर्ण करून तो परत आला तोपर्यंत रात्रीचे दोन वाजून गेलेले होते. आम्ही रिसॉर्टला फोन केला तर आतापर्यंत तो फोनवरचा 'बाप्या' गायब झाला होता आणि त्याच्या ऐवजी एक 'बया' आली होती. आम्हाला तर त्याचे आश्चर्यच वाटले. ती बया आधी तर खूप वेळ फोन उचलतच नव्हती आणि उचलला तरी काहीतरी तुटक आणि असंबद्ध उत्तरे देत होती. दुसऱ्या दिवशी मॅनेजमेंटकडे तिची तक्रार करायलाच हवी होती. </p><p>गोव्याच्या हद्दीत पोचेपर्यंतचा हमरस्ता फारच सुंदर आणि प्रशस्त होता. त्या वेळी त्यावर अगदी तुरळक रहदारी होती, त्यामुळे आमचा प्रवास छान होत होता. पण गोव्यात शिरल्यानंतर लगेचच आम्ही तो मोठा रस्ता सोडला आणि गावातल्या छोट्या रस्त्याला लागलो. आमचा सगळा प्रवास जीपीएसच्या मार्गदर्शनाखालीच चालला होता. ड्रायव्हरही त्या भागात पहिल्यांदाच येत होता आणि रात्रीच्या वेळी रस्त्यात कुणालाही वाट विचारायची तर काही सोयच नव्हती. जीपीएस सांगेल तिथे वळणे घेत आम्ही त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून अर्धा तास फिरत राहिलो. खरे तर तो भाग अत्यंत रमणीय असा होता, पण गडद अंधारात गुडुप झाला होता. </p><p>अखेरीस आमची गाडी एका ठिकाणी जाऊन थांबली आणि "तुम्ही तुमच्या गंतव्य ठिकाणी पोचला आहात" असे जीपीएसवाल्या बाईने सांगितले. तिथे पाहिले तर सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता आणि आमच्या गाडीच्या प्रकाशात जेवढे दिसले तिथे एक पाच फूट चौरस आणि दोन फूट उंच पांढरा कट्टा होता आणि त्यावर पुरुषभर उंचीचा क्रॉस उभा केलेला होता. त्यावर आर आय पी असे लिहिले होते.</p><p>--------------</p><p>भाग - ३</p><p>गोव्यातले एक सी साइड रिसॉर्ट म्हंटल्यावर तिथे रस्त्यावर एक मोठा चकचकीत बोर्ड असेल, एक आकर्षक गेट, आत मोकळ्या जागेत अनेक मोटारगाड्या उभ्या असलेल्या, सगळीकडे दिव्यांचा झगझगाट, आत जाताच एक सुरेख रिसेप्शन लाउंज, रिसेप्शन डेस्कच्या मागे एक स्मार्ट आणि हसतमुख युवक किंवा युवति आणि एक दोन काँप्यूटर्स अशी कल्पना मी केली होती. पण इथे तर त्यातल्या कशाचाही मागमूस दिसत नव्हता. रस्त्यात सगळा गडद अंधार आणि गाडीच्या उजेडात पहिले तर दोन्ही बाजूंना गर्द झाडी आणि त्यातून डोकावणारी लहान लहान घरे होती. त्यात रहाणारी सगळी माणसे दिवे मालवून गाढ झोपी गेलेली होती. आता आम्ही विचारपूस तरी कशी करायची? इंटरनेटवर रिझर्वेशन करणाऱ्या माणसाने आम्हाला गंडा घातला आहे की काय ? अशा प्रश्नाची एक अशुभ पाल मनात चुकचुकून गेली. दूर एका ठिकाणी थोडा उजेड आणि एक माणूस दिसला म्हणून आम्ही हळूहळू गाडी तिकडे नेली तर तो इसम नशेत तर्र झालेला होता आणि तिथला स्थानिक वाटतही नव्हता, तो कुठून तरी आला असावा आणि पिऊन झाल्यावर तिथे हवा खात उभा असावा. आम्हाला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. </p><p>आमचे ठिकाण आले आहे असे जीपीएसने सांगितल्यापासून आम्ही रिसॉर्टला सारखा फोन लावतच होतो, पण कोणीच तो उचलत नव्हते. अखेर त्या बयेने एकदाचे 'हेल्लो' म्हंटले. आम्ही लगेच तिला सांगितले की "तुम्ही दिलेल्या पत्यावर आम्ही आलो आहोत, पण आम्हाला ते रिसॉर्ट तर कुठे सापडत नाही आहे". " आत्ता तुम्ही कुठे आहात ?" असे तिने विचारल्यावर आम्ही तिला तिथल्या कुठल्या झाडाची कसली खूण सांगणार ? त्यापेक्षा तिलाच तिच्या रिसॉर्टची खूण सांगायला आम्ही सांगितले. तिने सांगितले की "तुम्हाला *** रिसॉर्ट दिसलं का? तिथून फुटणाऱ्या गल्लीतून सरळ पुढे या." आमच्या ड्रायव्हरने जागा बघून गाडी रिव्हर्स घेतली आणि हळू हळू चालवत मागे नेल्यावर ते '*** रिसॉर्ट' सापडलं. तिथे बोर्ड होता, उजेड होता, मोकळी जागा होती आणि गेटही होते पण ते बंद होते आणि आतली माणसे दार बंद करून झोपली होती. </p><p>आम्ही पुन्हा फोन करून त्या बयेला विनंति केली की जर त्यांच्या रिसॉर्टचा एकादा माणूस तिथे आला आणि आम्हाला घेऊन गेला तर बरं होईल. तिने नकार देऊन सरळ फोन ठेऊन दिला. आता काय करायचं? मध्यरात्र उलटून गेली असल्यामुळे आमच्या गाडीतले बरेच जण पेंगत पेंगत झोपलेलेच होते. बाहेर काय चाललंय याचा त्यांना पत्ताही नव्हता. मग जागे असलेल्या सर्वांना जागेवरच बसून रहायला सांगून माझे दोघे मुलगे खाली उतरले आणि मोबाईलच्या उजेडात चालत चालत नजरेआड गेले. बराच वेळ ते परत आले नाहीत यामुळे माझ्या जिवाला नसता घोर लागला होता. मी एकाला फोन लावला तर तो एंगेज्ड येत होता. आता या वेळी तो आम्हाला सोडून आणखी कुणाशी कशाला बोलतोय् म्हणून चरफडत मी दुसऱ्या मुलाला फोन लावला. त्याने मात्र लगेच फोन उचलला आणि त्यांना ती जागा सापडली असल्याची मुख्य खुशखबर दिली. </p><p>मग आम्ही आधी गाडी घेऊन ज्या गल्लीत जाऊन परत आलो होतो तिकडेच पुन्हा हळूहळू गेलो. वाटेत माझा मुलगा उभा होता. तो गाडीत चढला आणि वाटाड्या झाला. थोडे पुढे गेल्यावर दोन घरांच्या मध्ये थोडी मोकळी जागा होती. तिथे गाडी घुसवली तर पुढे रिव्हर्स करता येईल का अशी रास्त शंका वाहनचालकाला आली. पण पुढे मोकळी जागा आहे असे म्हणून गाडी आणखी पुढे नेली. तिथे डेड एंड होता, पण गाडीला उलट फिरवायला पुरेशी मोकळी जागा तिथे होती. त्यात उजव्या बाजूला एक गोल आकाराची विहीर होती आणि तिच्या बाजूला 'नो पार्किंग' असे ठळकपणे लिहिलेला एक बोर्ड होता. पण आम्ही त्या बोर्डना न जुमानता त्या वेळी तिथेच गाडी उभी केली आणि सगळेजण खाली उतरलो. डाव्या बाजूच्या बोळकंडीमधून आत घुसल्यावर समोर चक्क एक लहानसा पण सुबक असा स्विमिंग पूल होता. त्याच्या बाजूला असलेल्या बिल्डिंगच्या मागे आणखी एक तीन मजली बिल्डिंग होती. तिच्यात आम्हाला चार खोल्या मिळाल्या होत्या. एकदाचे मुक्कामावर पोचलो म्हणून सर्वांना हुश्श वाटले. </p><p> ------------------------</p><p> भाग - ४</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfcb8r0FMVSrdjLgfwB7E2u8fpn6mOX9oHLabKUgRws-om2ZqjoppwJsghVqdKVlo7CyIZRaGIk1yjCHoE2CXZSx32_PNrg4fndz6cK366f38pVOSqY9qQn6YtQTc34POSmVys0xQm8IxXkiAOhDfpJuEY9GDvq53C9fJKNwSu_TZUDorLaow/s1600/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1200" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfcb8r0FMVSrdjLgfwB7E2u8fpn6mOX9oHLabKUgRws-om2ZqjoppwJsghVqdKVlo7CyIZRaGIk1yjCHoE2CXZSx32_PNrg4fndz6cK366f38pVOSqY9qQn6YtQTc34POSmVys0xQm8IxXkiAOhDfpJuEY9GDvq53C9fJKNwSu_TZUDorLaow/w480-h640/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2.jpeg" width="480" /></a></div><br /><p><br /></p><p>आम्हाला त्या रिसॉर्टमध्ये सलग चार खोल्या मिळाल्या नव्हत्या. दोन खोल्या तळमजल्यावर, एक दुसऱ्या मजल्यावर (फर्स्ट फ्लोअरवर) आणि एक तिसऱ्या मजल्यावर होती. मला तळमजल्यावरच्या खोलीत जागा दिली आणि आमचे सगळ्यांचे सामानही आधी त्या खोलीच्या पडवीत आणून ठेवले. पाचसहा तासांच्या प्रवासातून आल्यामुळे मी आधी बाथरूम गाठले. तिथल्या टाइल्स, बेसिन, कोमोड वगैरे सगळे पांढरे शुभ्र आणि स्वच्छ होते. मी फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत कोणी कोणी कुठकुठल्या खोलीत झोपायचे हे ठरवून सगळे आपापले सामन उचलून नेत होते. आमच्या खोलीत एक अवाढव्य आकाराचा पलंग होता आणि त्यावर फोमची अखंड गादी होती. नवरा बायको आणि दोन लहान मुले अशा कुटुंबाला पुरावी अशी ही सोय केली असावी. त्यामुळे त्यावर तीन माणसे आरामात मावत होती. सगळ्यांची चांगली सोय झाली आहे हे पाहून माझी दोन मुलेही माझ्या खोलीत झोपायला आली. तोपर्यत रात्रीचे साडेतीन वाजले असल्यामुळे ही गप्पा मारत पडायची वेळ नव्हती. </p><p>मी त्यांना एकच प्रश्न विचारला, "ही आडबाजूची जागा त्यांनी कशी शोधून काढली?" उदयने सांगितले "जीपीएस ! आधी आम्ही कारचा जीपाीएस लावला होता त्याने जिथपर्यंत रस्ता होता तिथे बरोबर नेले होते. आत्ता आम्ही पायी चालत जायचा जीपीएस लावला, त्या मुलीला फोन लावला आणि ती जिथे आपली वाट पहात बसली होती तिथपर्यंत येऊन पोचलो." मी जिला 'बया' म्हंटले होते ती प्रत्यक्षात एक लहान मुलगी होती आणि आमची वाट पाहून आम्हाला आमच्या खोल्या सांगायच्या एवढेच छोटेसे काम तिला दिले होते. तेवढे करून ती अंतर्धान पावली. ती आधी आमच्याशी एकाद्या रिसेप्शनिस्टसारखी नीट का बोलत नव्हती याचा उलगडा झाला.</p><p>बहुतेक लोकांनी गाडीतच थोडी झोप काढली होती आणि समुद्रकिनाऱ्यावर जायची ओढ होती यामुळे सगळेजण आठ वाजेपर्यंत उठून तय्यार झाले. आमच्या रूममध्ये नोकराला बोलवायची बेल नव्हती आणि रिसेप्सनला करायला फोनही नव्हता. तिथे या सोयीच अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे कुणालाच मॉर्निंग टी मिळाला नाही, पण आमच्या घरी कुणाचेच त्याशिवाय काही अडतही नाही. पण आता नाश्त्याची काय सोय आहे? याची चौकशी करता सीशोअरवरच एक शॅक असल्याचे समजले. सगळे लगेच तिकडे जायला निघाले. मीही कपडे बदलून बाहेर पडलो तर माझ्यकडे किंवा कुणाकडेच त्या खोलीची किल्ली नव्हती. त्या खोलीच्या दरवाज्याला कडी कोयंडा किंवा लॅचही नव्हते. मग मी माझी बॅग उचलून शेजारच्या खोलीत ठेवली आणि कुलुप लावून आम्ही निघालो. </p><p>आमच्या इमारतीच्या कॉम्पाऊंडला एक पत्र्याचे दार होते. ते उघडल्यावर बाहेरच्या गवतातून एक पायवाट जात होती त्या वाटेने २५-३० पावलावर एका झोपडीत ते शॅक होते आणि त्याच्या पलीकडे लगेच अथांग समुद्र होता.</p><p>----------------</p><p>भाग - ५</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdts9PCPci0nfpEUNYWoaylKrOLtF-oMPOBKIuYLrfnf6FZU1Jk3FWoQBspxuVQJGZYwwtNQJUsA07SOiX-sPFE7wHhhsWgbtlWbjUiikKDXRrj1x2rGrbGyKMAk12ANor7Y6PiB3TjPtTDJoqoM3wtnPxN0CfuHlBwwW7BYEVDW5ckhQseM4/s1024/%E0%A4%B6%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="768" data-original-width="1024" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdts9PCPci0nfpEUNYWoaylKrOLtF-oMPOBKIuYLrfnf6FZU1Jk3FWoQBspxuVQJGZYwwtNQJUsA07SOiX-sPFE7wHhhsWgbtlWbjUiikKDXRrj1x2rGrbGyKMAk12ANor7Y6PiB3TjPtTDJoqoM3wtnPxN0CfuHlBwwW7BYEVDW5ckhQseM4/w400-h300/%E0%A4%B6%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE.jpeg" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>ते शॅक एका मध्यम आकाराच्या शेडमध्ये होते आणि समुद्राच्या बाजूने पूर्णपणे उघडे होते. तिथे बांबूची दोन लांबुळकी आणि दोन लहान टेबले आणि काही प्लॅस्टिकच्या खुर्च्या ठेवल्या होत्या. आम्ही एकंदर दहा माणसे होतो. समुद्राची शोभा पहात लांबुळक्या टेबलांवर एका रांगेत बसून घेतले. तिथे कामाला फक्त दोनच माणसे होती, तेच कुक, वेटर, आचारी, वाढपी काही म्हणा. आम्ही लवकर मिळतील म्हणून सँडविचेस आणि ऑमलेटे मागवली. पण ते लोक फारच सुस्तपणे काम करत होते आणि आम्हाला गप्पा मारत समुद्राच्या लाटा पहायला भरपूर वेळ देत होते. मुले तर वाळूत खेळायला अधीर झाली होती. वीस पंचवीस मिनिटांनी एक एक प्लेट सँडविडचेस आणि ऑमलेट्स यायला लागली ती आधी मुलांनी खाऊन घेतली आणि ती धावत किनाऱ्यावरच्या वाळूत बागडायला गेली. त्यांच्यावर लक्ष ठेवायला दोघेजण गेले. हे चालले असतांना कुणीतरी आणखी काय मिळेल हे विचारले आणि चार प्लेट पोहेही मागवले. आमचे सँडविचेस आणि ऑमलेटे खाऊन चहा पिऊन झाले तरी ते पोहे आलेच नाहीत, पण एकदा दिलेली ऑर्डर कँसल होणार नव्हती म्हणून आम्ही चारजण वाट पहात बसलो. ते पोहे आल्यानंतर मुलांना हाका मारून खायला बोलावून घेतले. ती शॅक म्हणजेच आमच्या रिसॉर्टचे अधिकृत भोजनालय होते आणि समुद्रकिनाऱ्यावर त्याचा बोर्डही होता. साधी झोपडीसारखी कच्ची शेड असली तरी तिथले रेट मात्र भारी होते. बशीभर पोहे आणि एक एक सँडविचच्या किंमती प्रत्येकी शंभर दीडशे रुपये लावल्या होत्या. पण काही म्हणा ते पदार्थ चविष्ट आणि पोट भरण्यासारखे मात्र होते. त्यामुळे आमचे पैसे अगदीच वाया गेले नाहीत.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgar_gDcm9szevIpKIcN4ZhDtW237P0oEujVM9bZgYFx41BoZ71xQ4CNkWH54U0ig-spuPmWJcIJxV4bTQqBcr6Oj4pYzow1pLz4Aje7XQRZdgk5Iv9n579_suUonvqseM0ZUiZQ7XUhF2vnV2f6OslzkNpzVrkTcFsqW3TtE5LaRJTteS7YnQ/s1600/%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A5%A7.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1089" data-original-width="1600" height="272" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgar_gDcm9szevIpKIcN4ZhDtW237P0oEujVM9bZgYFx41BoZ71xQ4CNkWH54U0ig-spuPmWJcIJxV4bTQqBcr6Oj4pYzow1pLz4Aje7XQRZdgk5Iv9n579_suUonvqseM0ZUiZQ7XUhF2vnV2f6OslzkNpzVrkTcFsqW3TtE5LaRJTteS7YnQ/w400-h272/%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A5%A7.jpeg" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>तिथला समुद्र किनारा मात्र अप्रतिम होता आणि कमालीचा स्वच्छ होता. मुख्य म्हणजे एकदीड किलोमीटर लांबीच्या त्या परिसरात त्या वेळी तरी आमच्याशिवाय आणखी कोणीही नव्हते आणि आम्ही पर्यावरणप्रेमी असल्यामुळे किनाऱ्यावर कचरा टाकणारे नव्हतो. आम्ही नाश्ता खात असतांना पंधरावीस कोळी बांधव समुद्रात टाकलेले त्यांचे अवाढव्य जाळे ओढून बाहेर काढत होते. किनाऱ्यावर ठोकलेल्या दहा बारा खुंट्यांना टांगलेले ते जाळे खोल समुद्रापर्यंत त्यांनी कसे पसरवले होते त्यांनाच माहीत. सर्वांनी एकजुटीने 'जोर लगाके हय्या' करत ते किनाऱ्यावरील वाळूत ओढून आणले. त्यात जमा झालेली आपली रुपरी मासोळ्यांची दौलत टोपल्यांमध्ये भरून घेऊन ते निघून गेले, त्यानंतर त्या अफाट किनाऱ्यावर आमचेच राज्य होते. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEt9wUjy6hB1o8wF2f1kq6K8CifrJ994TLmxpQ4WqdkvAYXQrtv2k-f0bceSl6jyFNPbNXR8YvLwDmoY0oYLJB-ZZC9FvYenYVQG9EWpX7xKwLBLMzlSeo8tlfLTrz3Vx9sKmYxQ3axjc1pD1_nPJnJYawP0q1KLqa68fcmner5vv3E8BGLqo/s1600/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1200" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEt9wUjy6hB1o8wF2f1kq6K8CifrJ994TLmxpQ4WqdkvAYXQrtv2k-f0bceSl6jyFNPbNXR8YvLwDmoY0oYLJB-ZZC9FvYenYVQG9EWpX7xKwLBLMzlSeo8tlfLTrz3Vx9sKmYxQ3axjc1pD1_nPJnJYawP0q1KLqa68fcmner5vv3E8BGLqo/w300-h400/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE.jpeg" width="300" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgmlx8Urw7Z8bAxrP9TwA9WMB3vVX6ra8HEWEGsbHW7ye_XHpt5cYz5hFP72GevF30ccsdB4WWKLkbwt1xA9fMhgPZ1b0LhG-urnubuWmtn-JgA2uXeKy3K2ewjm8UXJuVOxgOcHUJBvRbdgpP_ewRc3Fhsf1VhUaUTAn7DtCXi0vKIZJxntds/s1600/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgmlx8Urw7Z8bAxrP9TwA9WMB3vVX6ra8HEWEGsbHW7ye_XHpt5cYz5hFP72GevF30ccsdB4WWKLkbwt1xA9fMhgPZ1b0LhG-urnubuWmtn-JgA2uXeKy3K2ewjm8UXJuVOxgOcHUJBvRbdgpP_ewRc3Fhsf1VhUaUTAn7DtCXi0vKIZJxntds/w400-h300/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE.jpeg" width="400" /></a></div><br /><p>मी भारतातले तसेच परदेशांमधले अनेक समुद्रकिनारे पाहिलेले असले तरी मला समुद्राच्या एकापाठोपाठ एक येत राहणाऱ्या अगणित लाटांकडे पहात रहायचा कधीच कंटाळा येत नाही. प्रत्येक वेळी तिथली वाळू, तिथल्या लाटा यांत काहीतरी नाविन्याचा अनुभव येतो. अरंबोळचा किनारासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण होता आणि गुढघ्याइतक्या पाण्यात जायला तरी चांगला सुरक्षित होता. त्यापेक्षा खोल पाण्यात जायची कुणाला हौस नव्हतीच. पावलांपासून गुढघाभर इतक्या पाण्यातच बसून आणि उभे राहून मुलांची दंगामस्ती चालली होती, एकमेकांवर पाणी उडवणे चालले होते. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.blogger.com/video.g?token=AD6v5dyyJX1zlt9bR_u0XAQH5CSYRdH4pjWbKGd7OPZ5exquqs6AXDhv_Yo6U2w8KOWt6mvQNsuDvZzQMpc' class='b-hbp-video b-uploaded' frameborder='0'></iframe></div><br /><p><br /></p><p>समुद्राची लाट परत जातांना पायाखालची वाळू सरकते आणि तोल सावरला नाही तर धुप्पम्पई व्हायला वेळ लागत नाही. मला तो धोका घ्यायचा नव्हता, म्हणून मी शास्त्रापुरत्या दोन चार लाटा पायावर घेऊन लगेच वाळूवर आलो. मी गोव्याहून परत आल्यानंतर जेमतेम दहा दिवसात घरातच पाय घसरून पडलो आणि आता एक पाय प्लॅस्टरमध्ये घालून अडकून पडलो आहे. तसे काही तिथे झाले असते तर मलाच नाही तर सगळ्यांनाच खूप त्रास झाला असता आणि आमच्या सहलीचा पुरा विचका झाला असतात. त्यामुळे मी या वेळी पाण्यात धांगडधिंगा करायचा मोह आवरला तेच चांगले केले म्हणावे लागेल. </p><p>----------------------</p><p>भाग - ६</p><p> समुद्रकिनाऱ्यावर भटकत वेळ काढताकाढता ऊन वाढत गेलं म्हणून मी आपल्या रूमवर परत गेलो. पायापासून डोक्यापर्यंत सर्वांगाला चिकटलेले रेतीचे बारीक कण धुवून टाकण्यासाठी मी बाथरूममध्ये शिरलो. तिथे गीजरही दिसला नाही आणि गीजरचे बटनही नव्हते. दोन नळ होते पण दोन्हींमधून थंडगार पाणीच येत होते. त्या पाण्याने बादली भरून घेतली आणि आधी हात, पाय, तोंड, डोके वगैरे वेगळेवेगळे स्वच्छ धुवून घेतले आणि मग "हर हर गंगे" म्हणत दोन जग पाणी दोन्ही खांद्यांवर ओतले आणि लगेच टॉवेलने घसाघसा घासून अंगात थोडी ऊब आणली. लहान बाळासारखे आंघोळ करून कपडे बदलून झोपून गेलो. आदले दिवशी जागरण झालेले असल्यामुळे अंथरुणावर पाठ टेकताच झोपही लागली.</p><p>मुले आणि पुन्हा मूल झालेले त्यांचे आईबाबा समुद्रात जलक्रीडा करण्यात रंगून गेले होते. एवढ्यासाठीच तर आम्ही गोव्याच्या किनाऱ्यावर आलो होतो. इथे बाहेरचे कोणी बघायला नसल्यामुळे त्यांना मुक्तपणे दंगामस्ती करायला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते. पूर्ण समाधान झाल्यानंतर ते सावकाशपणे परत आले आणि त्यांनीही लगेच स्नान वगैरे केले. तोपर्यंत कुणाला तरी शोध लागला की आमच्या बाथरूममध्ये असलेल्या दोन नळापैकी दुसऱ्या नळामधून सौर ऊर्जेने तापवलेले कढत पाणी मिळण्याची सोय होती. मात्र नळातून ते गरम पाणी यायला सुरू व्हायच्या आधी एक दोन बादल्या गार पाणी वाहून जावे लागत होते. मी या ज्ञानाचा उपयोग नंतर दोन दिवस करून घेतला.</p><p>दुपारपर्यंत सगळ्यांना सडकून भूक लागली होती. आम्ही अरंबोळ गावात पायीच फिरत फिरत चांगल्या क्षुधाशांतीगृहाचा शोध घेतला. त्या लहानशा खेड्यातसुद्धा 'पंजाबी, चायनीज. मालवणी, गोमंतकी' वगैरे पद्धतीचे "जेवण तयार आहे" असे बोर्ड अनेक ठिकाणी लागलेले होते, पण ते गावठी 'ढाबे' आमच्या 'क्वालिटी'च्या कल्पनेत बसत नव्हते. दहा पंधरा मिनिटांनंतर एका ठिकाणचा अँबियन्स बरा वाटला म्हणून आम्ही तिथे आत शिरलो. ती सुद्धा एक शेडच होती पण ती आकाराने आमच्या रिसॉर्टच्या शेडच्या चौपट मोठी होती. तिच्या अर्ध्या भागात दोनतीन परदेशी आणि चारपाच देशी पर्यटक जेवण करत बसले होते. आम्ही दुसऱ्या अर्ध्या भागात विसावलो. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-HfplmGlpTbpgVp6c2hV8kDITLRNCZbnOFBlJlL2Po_DVWx2xXxy7gOXCRE20eiodeKILzI3XthMOqF_fzvjJ0aDsHR9nZunuHQ_a9DgVnS_zrD2za4X-q_bgwhaAdgHWZlkBZsqWUfOJ-TI3M8ors18ceoB352S7FfvVWg1rrQtslpRYKCs/s2400/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="580" data-original-width="2400" height="154" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-HfplmGlpTbpgVp6c2hV8kDITLRNCZbnOFBlJlL2Po_DVWx2xXxy7gOXCRE20eiodeKILzI3XthMOqF_fzvjJ0aDsHR9nZunuHQ_a9DgVnS_zrD2za4X-q_bgwhaAdgHWZlkBZsqWUfOJ-TI3M8ors18ceoB352S7FfvVWg1rrQtslpRYKCs/w640-h154/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8.jpg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p>एका वेटरने तत्परतेने तीन चार छापील मेनूकार्डे आणून दिली. ती इंग्लिशमध्ये होती आणि तिथल्या बहुतेक खाद्यपेय पदार्थांची नावेही इंग्रजी, पोर्च्युगीज, स्पॅनिश, इटालियन वगैरे वाटत होती. एक ओझरती नजर टाकून मी माझ्या हातातले मेनूकार्ड कुणाला तरी देऊन टाकले. माझी मुले, सुना, नातवंडे वगैरे लोक इंग्लंड अमेरिकेत काही काळ राहिलेली असल्यामुळे काही नावे त्यांच्या ओळखीची असावीत. त्यांनी एकमेकांशी चर्चा करून तीन चार अजीबोगरीब पेये आणि पाचसहा अनोळखी खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली. "तुम्हाला काय पाहिजे ?" असे मला विचारताच "मी चार घास वरणभात, खिचडी असे काहीतरी खाईन आणि तुमच्या पदार्थांमधला एक एक घास चाखून पाहीन" असे सांगितले. त्यानुसार माझ्यासाठी एका प्रकारचा पुलाव मागवला गेला. अर्थातच तोही आम्ही वाटून घेतला.</p><p>तिथला वेटर चेहेऱ्यावरूनच ईशान्य भारतातला किंवा तिबेटी दिसत होता आणि त्याचा सहाय्यकही तसाच नकटा आणि मिचिमिची डोळ्यांचा होता, पण ते दोघेही अतीशय नम्र आणि तत्पर होते. आम्ही मागवलेले सगळे निरनिराळे पदार्थ त्यांनी काही चूक न करता रीझनेबल वेळात आणले आणि अदबीने वाढले. तिथली चवही सगळ्यांना पसंत पडली आणि खिशाला मानवली.</p><p>---------------</p><p>भाग - ७</p><p>मी १९६१ साली शाळा सोडली, १९६३ साली सायन्स कॉलेज आणि १९६६ साली इंजिनियरिंग कॉलेज सोडले. त्या काळात कुठलीच संपर्कसाधने उपलब्ध नसल्यामुळे माझ्या तिथल्या मित्रांशी नंतर माझा कसलाही संपर्क राहू शकला नव्हता. माझी मुले त्या बाबतीत सुदैवी आहेत आणि आजही त्यांच्या शाळेतल्या काही मित्रांच्या संपर्कात आहेत. उदयच्या शाळेतले बरेचसे मित्र परदेशात स्थायिक झाले आहेत, पण त्यातले काहीजण भारतात परत आले किंवा इथेच राहिले आहेत. ते मुख्यतः मुंबई, पुणे किंवा बेंगळूरूला असल्याने त्या सर्वांनी गोवा या मध्यवर्ती ठिकाणी भेटायचे ठरवले आणि तिथल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये एका ग्रँड रियुनियन पार्टीचे आयोजन केले होते. योगायोगाने उदय यावेळी भारतात आलेला असल्यामुळे त्याला त्या पार्टीत सामील होणे शक्य होते आणि तिथे जाणे हेच आमच्या गोवा ट्रिपचे एक कारण होते. ती जागा आमच्या रिसॉर्टपासून बरीच दूर होती. उदय आणि शिल्पा गाडी घेऊन संध्याकाळी त्या पार्टीला गेले. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcjJHKgNO03ujlMx26IYQPUOK5mMFZhBYZPgDSqmqDRNVY2JbJpFkXV_TM1S6QvtyiyFLcSQfdpSZ4z5vIWu-ekGQAl8hhfNMCVieDvLZJTmwSAAf5nqst-Uxh77IaWXw2HzA45FBdMGT3tn2XAnpO8mnpjEVb_-P19_2QWnu03h_XYBBTfKY/s756/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="520" data-original-width="756" height="275" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcjJHKgNO03ujlMx26IYQPUOK5mMFZhBYZPgDSqmqDRNVY2JbJpFkXV_TM1S6QvtyiyFLcSQfdpSZ4z5vIWu-ekGQAl8hhfNMCVieDvLZJTmwSAAf5nqst-Uxh77IaWXw2HzA45FBdMGT3tn2XAnpO8mnpjEVb_-P19_2QWnu03h_XYBBTfKY/w400-h275/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2.jpg" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>सगळी मंडळी सकाळी समुद्रात खेळून थोडी दमली होती आणि दुपारी छान पेटपूजा झाल्याने सुस्तावली होती. बाहेर थोडा थोडा पाऊसही पडत होता आणि वातावरण थोडे कुंद झाले होते. त्यामुळे आम्ही संध्याकाळचा कुठला कार्यक्रम ठरवला नाही. रिसॉर्टच्या अंगणातच फिरून आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य न्याहाळून घेतले. ज्येष्ठ नागरिकांसाठी शॅकमधून रूमवरच एक हंडी खिचडी मागवली आणि तिथेच बसून खाल्ली. रात्रीच्या क्षुधाशांतीसाठी तेवढे जेवण पुरेसे होते. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjFdsCOd2VywewGhNlZj6V_0wDWGFCrQNlkvSKiPy9Q6UpIQrx7YamXzOyli4YaFqSP9yxXU1N-uLB47sTsQ4T1sH5Cw86SX7fhYla7Nvp56z_P3iknpk9SnqDrlONMxug6S4IQ0JKR2UvlFbMnHlAsRjCr46OU4HAg6jbmYT9zTvhNcbvu8T0/s1067/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%20%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="800" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjFdsCOd2VywewGhNlZj6V_0wDWGFCrQNlkvSKiPy9Q6UpIQrx7YamXzOyli4YaFqSP9yxXU1N-uLB47sTsQ4T1sH5Cw86SX7fhYla7Nvp56z_P3iknpk9SnqDrlONMxug6S4IQ0JKR2UvlFbMnHlAsRjCr46OU4HAg6jbmYT9zTvhNcbvu8T0/w300-h400/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%20%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE.jpg" width="300" /></a></div><br /><p><br /></p><p>दुसऱ्या दिवशी दूधसागरचा प्रसिद्ध धबधबा पहायला जायचा विचार आम्ही केला होता. चेन्नै एक्सप्रेसमध्ये तिथले सीन पाहिल्यानंतर आमची उत्सुकता वाढली होती. आम्ही चार वर्षांपूर्वी गोव्याला गेलो होतो तेंव्हा आम्हाला तो पहायला वेळ मिळाला नव्हता. या वेळी आम्ही त्यासाठी एक पूर्ण दिवस ठेवला होता आणि आमचे स्वतंत्र वाहन आणले होते. पण ड्रायव्हरला तिकडे गाडी न्यायला सांगितले तर त्याने स्पष्ट नकार दिला आणि आपली गाडी तिथे जाऊ शकत नाही असे सांगितले. आमच्यासाठी हा एक लहानसा धक्काच होता. इंटरनेटवर थोडी चौकशी केल्यावर असे कळले की फक्त गोवा टूरिझमने आयोजित केलेल्या सहलीतून तिथे जाता येते. बहुतेक टूरिस्ट कंपन्या अगोदरपासून हे रिझर्व्हेशन घेऊन ठेवतात. तिथे असे आयत्या वेळी ठरवून जाता येत नाही. त्यामुळे आणखी काय पहाता येईल हे गूगलवरच शोधले. मंगेशी, शांतादुर्गा, ऑल्ड गोव्यामधले जुने कॅथेड्रल, दोना पावला, मीरामार, फोर्ट अॅग्वाडा वगैरे नेहमीच्या जागा आम्ही सगळ्यांनीच पाहिलेल्या असल्यामुळे त्यांचे जास्त आकर्षण नव्हते. त्यापेक्षा वेगळी अशी नवी जागा पहायचे आम्ही ठरवले. त्याचे नाव होते रीस मागोस फोर्ट. </p><p>------------------------</p><p>भाग - ८</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjmRdoZtNZ5FEVWvN93X2H6UsTFhauJlU2rPKAsFdqd4sfO4AGhegRMvh4kBk2cenffV3lBnoSYRhM50FlJ1S1Q9QjcQ3ApoJVymLJP1OMAOS530dZXkjiix8V1rVn7-nbbRFNSSIDaJOrLES1f22GUhT3yYWSdFUBIopVLwHLtq0Dh77rP72Y/s1410/%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%20%E0%A5%A7.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="555" data-original-width="1410" height="252" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjmRdoZtNZ5FEVWvN93X2H6UsTFhauJlU2rPKAsFdqd4sfO4AGhegRMvh4kBk2cenffV3lBnoSYRhM50FlJ1S1Q9QjcQ3ApoJVymLJP1OMAOS530dZXkjiix8V1rVn7-nbbRFNSSIDaJOrLES1f22GUhT3yYWSdFUBIopVLwHLtq0Dh77rP72Y/w640-h252/%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%20%E0%A5%A7.jpg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p>जीपीएस वर 'रीस मॅगोट फोर्ट' असे 'गंतव्य स्थान' टाकून आम्ही गाडी सुरु केली. उत्तर गोव्याच्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांवरून आमचा प्रवास चालला होता. हा भाग तर अतीशय रमणीय होता ही निसर्गाची देणगी आणि रस्तेही चांगले होते ही गोवा शासनाची कृपा. काय ते डोंगार? काय ती झाडी? काय ती हिरवाळ? काय त्या खाड्या? सगळं एकदम ओक्केमधीच व्हतं की! त्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आम्ही त्या किल्ल्यापर्यंत जाऊन पोचलो, पण तिथे आत जायला प्रवेश कुठून आहे हे बहुधा जीपीएसला माहीत नसावे. एका बाजूला रम्य मांडवी नदी आणि दुसऱ्या बाजूला त्या किल्ल्याची तटबंदी पहात पुढे जातांना आम्हाला शंका आली म्हणून थांबून चौकशी केली तेंव्हा आम्ही थोडेसे पुढे आल्याचे समजले. मागे जाऊन शोध घेतल्यावर एकाद्या खेड्यातल्या पोस्ट ऑफीस किंवा चावडीसारखे एक पिटुकले ऑफीस दिसले. त्यावेळी तर तिथे कोणीच व्हिजिटरही नव्हते. नुसताच एक रिकामा काउंटर होता. कदाचित यामुळेच ते ऑफिस आधी आमच्या लक्षात आले नव्हते.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjSoxsdr7bAuTN5EraPBORQKUIN-qVwXT54RRNBOOFkWJLH3T0bDHaTRohrjA3QQdD25yr6NBvtPoX-bOsrzfoIKjcs13a89T6XVgm5ULBMjz6XYwoXUIMORX5hk1llENxXy2GA5EZAIDMkizGOhVBiSbnyFTYbuwEFkjVPhQbh613c0_BBUPg/s1540/%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%20%E0%A5%A8.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="640" data-original-width="1540" height="266" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjSoxsdr7bAuTN5EraPBORQKUIN-qVwXT54RRNBOOFkWJLH3T0bDHaTRohrjA3QQdD25yr6NBvtPoX-bOsrzfoIKjcs13a89T6XVgm5ULBMjz6XYwoXUIMORX5hk1llENxXy2GA5EZAIDMkizGOhVBiSbnyFTYbuwEFkjVPhQbh613c0_BBUPg/w640-h266/%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%20%E0%A5%A8.jpg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p>पुन्हा थोडे पुढे जाऊन नदीकाठी गाडी पार्क केली आणि ऑफिसात गेलो. त्यांनी सांगितले की किल्ला पहायचा असेल तर 'मास्क जरूरी ' आहे. त्या वेळी गोव्यात सगळे बिनामास्कचे हिंडत असले तरी आम्ही आमच्याबरोबर मास्क आणले होते. तसे ते ऑफिससमोरच्या चहाच्या टपरीवरही मिळत होते. आम्ही दोन तीन पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि तिकीटे काढून दुर्गदर्शनाला सुरुवात केली.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5dg4KTdPi0QmN0QfJBgYu1xrEvigSTKOknyEdmMTLS5S-7yGE87zq0_oby5-zUsU5W5v75e7hf_X4jTc8ngW-GoNPX_tFlcgoDBTzqLKmU6rYrZNnb714fz0044pzKl_VCuAsN0DieiQQwpqzj_zU-9R-s_DxFWOluv8YDlFhM6K8exENw7U/s1431/%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%20%E0%A5%A9.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="1431" height="242" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5dg4KTdPi0QmN0QfJBgYu1xrEvigSTKOknyEdmMTLS5S-7yGE87zq0_oby5-zUsU5W5v75e7hf_X4jTc8ngW-GoNPX_tFlcgoDBTzqLKmU6rYrZNnb714fz0044pzKl_VCuAsN0DieiQQwpqzj_zU-9R-s_DxFWOluv8YDlFhM6K8exENw7U/w640-h242/%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%20%E0%A5%A9.jpeg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p>पंधराव्या शतकात जेंव्हा आदिलशहा बहामनी साम्राज्यात सरदार होता तेंव्हा त्याने गोवा जिंकून या डोंगरावर एक किल्ला बांधला होता. पुढे आदिलशाही वेगळी झाल्यावर हा भाग त्यांच्या राज्यात आला. पोर्तुगीजांनी गोव्यात जम बसवल्यावर या किल्ल्याला आणखी मजबूत केले. पुढे छत्रपती संभाजी राजांनी आपल्या गोमंतकाच्या मोहिमेत हा किल्लाही जिंकून घेतला, मोंगल शिरजोर झाल्यावर त्यांनीही हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यांनी दक्षिणेचा नाद सोडून दिल्यावर पोर्तुगीजांनी पुन्हा गोवा जिंकून घेतले आणि ते भारताने स्वतंत्र करेपर्यंत आपल्या ताब्यात ठेवले. हा सगळा चित्रमय इतिहास दाखवणारे एक माहितीपूर्ण प्रदर्शन या रीस मागोस किल्ल्यावरच आहे.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpa1rBppmqcxpw08qff0f36ZAEujV_stUUvukYy_dhjJzMoWcnMQCmX4hB0XaW4ZrHlS-cCtLKAXRPf8-2VC6JfA-cd19CLpI4nHKE7pY8laTG3Q2nzAHZir4xv9-sUaikXGWGDSy6frvTu5JclB4v9nlv8lxKvfmdWh3XfPaYAzmSq9oTuJM/s1024/WhatsApp%20Image%202022-06-19%20at%202.39.55%20PM.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1024" data-original-width="768" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpa1rBppmqcxpw08qff0f36ZAEujV_stUUvukYy_dhjJzMoWcnMQCmX4hB0XaW4ZrHlS-cCtLKAXRPf8-2VC6JfA-cd19CLpI4nHKE7pY8laTG3Q2nzAHZir4xv9-sUaikXGWGDSy6frvTu5JclB4v9nlv8lxKvfmdWh3XfPaYAzmSq9oTuJM/s320/WhatsApp%20Image%202022-06-19%20at%202.39.55%20PM.jpeg" width="240" /></a></div><br /><p><br /></p><p>तिथे सुरुवातीला एक चढाव असलेला फरशा बसवलेला रस्ताआहे.अर्धा टप्पा चढून वर गेल्यावर एका पुरातन कालीन वटवृक्षाखाली बसून विसाला घ्यायला जागा आहे. त्यानंतर पुढे पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो. इथे एक माणूस तिकीटे पाहून आत सोडतो. तसा हा किल्ला आकाराने लहानसा आहे, पण सगळीकडे फरशा बसवल्या आहेत. आधी पोर्तुगीजांच्या संरक्षण खात्याने आणि नंतर गोवा राज्याच्या पुरातत्व खात्याने त्याची इतकी उत्तम डागडुजी केलेली आहे की कुठेही एकही दगड ढळलेला आहे किंवा सैल झाला आहे असे दिसले नाही. सगळ्या फरशा आणि भिती कोकणातल्या लाल दगडांनी सुबकपणे बांधलेल्या आहेत. या किल्ल्यावर सात आठ कोठड्या आणि तळघरे आहेत. पूर्वीच्या काळी त्यात खजिना किंवा दारूगोळा वगैरे साठवून ठेवत असत. गोवामुक्तीच्या लढ्यात कैद केलेल्या देशभक्तांनाही इथल्या अंधारकोठड्यांमध्ये कोंडून ठेवले जात असे. किल्ल्याच्या माथ्यावर दोन मोठी दालने आहेत. एका दालनात गोव्याचा अथपासून इतिपर्यंत इतिहास दाखवणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन आहे, तर दुसऱ्या दालनात सुप्रसिद्ध गोमंतकीय व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा याच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन आहे. हा माझासुद्धा आवडता व्यंगचित्रकार आहे आणि त्याची अनेक कारटून्स माझ्या संग्रहात आहेत. यामुळे मी हे प्रदर्शनही आवडीने पाहून घेतले. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEge6NN9K6av3U8zJie4mBapdN16WvOB6-p8_9QJR64tP-PqpyI-jXvd_M2YzPB7ZwRMgMp1MHiM3mLRhdIzbbc1Tv-UU8k3FlETcjGu-wGuIsKH35S06-PdnmPHwKoZ9M7zQ9Hto6pkYWeGERPfYPGt5nprzHzcRuyC6WEYjJgDbuhztm2NDIs/s1024/WhatsApp%20Image%202022-06-19%20at%202.40.07%20PM.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1024" data-original-width="768" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEge6NN9K6av3U8zJie4mBapdN16WvOB6-p8_9QJR64tP-PqpyI-jXvd_M2YzPB7ZwRMgMp1MHiM3mLRhdIzbbc1Tv-UU8k3FlETcjGu-wGuIsKH35S06-PdnmPHwKoZ9M7zQ9Hto6pkYWeGERPfYPGt5nprzHzcRuyC6WEYjJgDbuhztm2NDIs/w300-h400/WhatsApp%20Image%202022-06-19%20at%202.40.07%20PM.jpeg" width="300" /></a></div><br /><p><br /></p><p>या किल्ल्यावर चढतांना तसेच चढून वर गेल्यावर ठिकठिकाणाहून खाली वहात असलेल्या मांडवी नदीचे सुंदर दृष्य दिसते. एकंदरीत हा किल्ला पहायला मजा आली.</p><p><br /></p><p>---------------</p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p>भाग - ९</p><p>रीस मॅगोस किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यातल्या विजेच्या सगळ्या खांबांवर गोवा म्यूजियमच्या आकर्षक जाहिराती लावलेल्या होत्या. त्या पाहून आम्हालाही ते वस्तुसंग्रहालय जवळच असले तर पाहून घ्यावे असे वाटायला लागले. किल्ल्यावर जातांना बराच वेळ उन्हात चढउतार केली होती. आता सावलीत बसून जेवण करावे आणि सावलीतच म्यूजियममध्ये वेळ घालवावा असा विचार केला. पण ते म्यूजियम जवळ म्हंटले तरी वळणावळणाच्या रस्त्याने तिथपर्यंत पोचायला बराच वेळ लागला. तिथे आजूबाजूला कुठे क्षुधाशांतीचीही काही सोय दिसली नाही. चौकशी केल्यावर असे समजले की ते म्यूजियम त्या इमारतीच्या तीन मजल्यांवर पसरले आहे आणि ते पहाण्यासाठी माणशी तीनचारशेहे रुपये इतके तिकीट आहे. सगळ्यांना भूकही लागली होती. त्यामुळे त्या वेळी कुणाला वस्तुसंग्रहालय पहाण्यात रुचि नव्हती.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTwa9y8Tu_23PG0lO6uXb9yCKN_TwkR-54TvAhfLnDdJOvTyMaa7SR5iaCvdG92eaIG65q22CBI0dL_6ERHZl4Sej5IYrzQU0suUCVaK-5tZXP0EfFBcIekVcg7CwpXrdF4L_xZe6uIe2nxGqchWZ6gHNbGFZsgz1ryDCWQtfztUe3qDm4sGw/s362/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B8%20%E0%A4%91%E0%A4%AB%20%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="250" data-original-width="362" height="221" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTwa9y8Tu_23PG0lO6uXb9yCKN_TwkR-54TvAhfLnDdJOvTyMaa7SR5iaCvdG92eaIG65q22CBI0dL_6ERHZl4Sej5IYrzQU0suUCVaK-5tZXP0EfFBcIekVcg7CwpXrdF4L_xZe6uIe2nxGqchWZ6gHNbGFZsgz1ryDCWQtfztUe3qDm4sGw/s320/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B8%20%E0%A4%91%E0%A4%AB%20%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8.jpg" width="320" /></a></div><br /><p><br /></p><p>गूगलवर शोध केल्यावर हाउस ऑफ लॉइड्स नावाचे रेस्टॉरेंट सर्वात जवळ दिसले. तिथल्या इंडस्ट्रियल एरियातले अनेक लहान लहान कारखाने आणि गोडाउन्समधून वाट काढत काढत दोन तीन किलोमीटर गेल्यावर ती जागा एकदाची सापडली. एका जुन्या बंगल्यामध्ये हे हॉटेल थाटले होते. त्यामुळे ते बाहेरून गोवन स्टाइलचे 'हाउस'च वाटत होते. गेटमधून आत जाताच थोडी फुलझाडे होती, बंगल्यात शिरताच पोर्चमध्ये जॉनी वॉकरचा सात आठ फूट उंच पुतळा स्टाइलमध्ये उभा होता. तांब्यापितळेसारखे दिसणारे मातीचे मोठमोठे माठ शोभेसाठी मांडून ठेवले होते. आतमध्ये सुद्धा असेच एथ्निक डेकोरेशन होते. काचेच्या कपाटांमध्ये निरनिराळ्या मद्यांच्या बाटल्या भरल्या होत्या. हॉटेलात इतका मंद प्रकाश होता की आम्हाला उन्हातून आत आल्यावर आधी तर ते हॉटेल सुरू आहे की नाही अशीच शंका आली. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlZeCA2jhEqjdPnWrIvvv7mO4Nr82DJDNxFc8KnvIKVFFVx-C8w_sPp_m3QmJgVkb4CI_5ivrtU7ut28xbolQxgRYfd-S-Jdwl7W1Jvr6pox4d5ksiZoN-BZRPBkKf8pdJIZzEUf-0NeF3PTL2JSQlmwKw4sNE5uvpM3PcZ0EK6GTzveCFjo4/s1024/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B0.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1024" data-original-width="768" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlZeCA2jhEqjdPnWrIvvv7mO4Nr82DJDNxFc8KnvIKVFFVx-C8w_sPp_m3QmJgVkb4CI_5ivrtU7ut28xbolQxgRYfd-S-Jdwl7W1Jvr6pox4d5ksiZoN-BZRPBkKf8pdJIZzEUf-0NeF3PTL2JSQlmwKw4sNE5uvpM3PcZ0EK6GTzveCFjo4/w300-h400/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B0.jpeg" width="300" /></a></div><br /><p><br /></p><p>टेबलावर बसताच मेनूकार्ड आले. इथेही मी एक पान उलगडून पाहिले, पण त्यात कुठलाच माझ्या ओळखीचा पदार्थ नसल्यामुळे ते मुलाला देऊन टाकले. मात्र इथे पदार्थांच्या किंमती अवाच्या सव्वा आहेत एवढे माझ्याही लक्षात आले. आम्ही सुरुवातीला काही ड्रिन्क्स आणि स्टार्टर्स मागवू अशा अपेक्षेने त्यांनी लहान प्लेट्स मांडायला सुरुवात केली होती, पण किंमती पाहता आम्ही एकदम मेन कोर्सवरच आलो आणि विचित्र युरोपियन नावे असलेले चार पाच पदार्थ मागवले. मग वेटर्सनी आधी ठेवलेल्या प्लेट्स उचलून नेल्या आणि मोठ्या प्लेट्स आणल्या. भरपूर बटर आणि चीज वगैरे घातले असल्यामुळे ते पदार्थ रुचकर होते आणि आम्ही चाटून पुसून फस्त केले. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiDUJbW93MApNKW8lgGbKP4V_R6wya4bIGtVyiNgWCwsg9aObHGRM4-1K0yoy5s_FKJZi6y286bwkAtwkrD8LCnwjaary6e4qL4YUT0BwcZQwCXK0jnL22YWnoyPLKv7Crw70Nga5SXpiHd1kORHSZ9j8ELhaVmNOGGgO3YPdFM4tON3KbijGo/s1024/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="768" data-original-width="1024" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiDUJbW93MApNKW8lgGbKP4V_R6wya4bIGtVyiNgWCwsg9aObHGRM4-1K0yoy5s_FKJZi6y286bwkAtwkrD8LCnwjaary6e4qL4YUT0BwcZQwCXK0jnL22YWnoyPLKv7Crw70Nga5SXpiHd1kORHSZ9j8ELhaVmNOGGgO3YPdFM4tON3KbijGo/w640-h480/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8.jpeg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p>------- </p><p>भाग - १०</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUb7QDxVc890q3Dt8V7iDKuZsUztAaIXL8lg9mRWIilYE8Ghc682nbQELegSsBQwsGbLCzpDEff5oUoNA1c7SuTfv43bEakfiM25EB4MmSYYuNpjfMZmkzf4kB0ZLTgQfiZYErAb-ACrG1c5k2pk6z8jkye3nBi5f0zxVshrHxCjUL8ZlzD7M/s2000/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="817" data-original-width="2000" height="262" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUb7QDxVc890q3Dt8V7iDKuZsUztAaIXL8lg9mRWIilYE8Ghc682nbQELegSsBQwsGbLCzpDEff5oUoNA1c7SuTfv43bEakfiM25EB4MmSYYuNpjfMZmkzf4kB0ZLTgQfiZYErAb-ACrG1c5k2pk6z8jkye3nBi5f0zxVshrHxCjUL8ZlzD7M/w640-h262/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87.jpg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p>आम्ही त्या रिसॉर्टमध्ये अपरात्री जाऊन पोचलो होतो तेंव्हा कुठल्याही चेकइन फॉर्मॅलिटीज झाल्या नव्हत्याच, नंतरही त्या झाल्या नाहीत. मला तरी तिथे रिसेप्शन ऑफिस दिसले नाही. दुसरे दिवशी सकाळी एक माणूस उंच काठीला बांधलेल्या केरसुणीने आमच्या इमारतीचे अंगण झाडतांना दिसला. तोच तिथला रखवालदारही होता आणि बहुधा केअरटेकरही असावा. गोव्यात कुठे तरी त्याच्या कंपनीचे ऑफिस आहे असे त्यानेच सांगितले. तिथे येणाऱ्या प्रवाशांच्या बुकिंगचे रेकॉर्ड्स तिथे ठेवत असतील. पैशाचे व्यवहार तर इलेक्ट्रॉनिकलीच होत होते. आमच्या इमारतीवर कसलाच बोर्ड नव्हता. या रिसॉर्टच्या नावाखाली अशा आणखी किती इमारती असतील ? या इमारतींच्या इतर खोल्यांमध्ये कोण उतरले असेल ? त्या मालकाकडे किंवा मॅनेजमेंटकडे अशी किती रिसॉर्ट्स असतील ? कोण जाणे ! अरंबोळ बीचवर तर पर्यटकांची काहीच गर्दी दिसत नव्हती. झोपायला वातानुकूलित बेडरूम्स, त्यात गुबगुबीत गाद्यांसह प्रशस्त पलंग, स्वच्छ स्वच्छतागृहे आणि हाकेच्या अंतरावर सागरकिनारा या आमच्या प्राथमिक गरजा इथे भागवल्या गेल्या होत्या, शिवाय वाय फाय उपलब्ध होते, मग हाक मारताच किंवा बेल वाजवताच धावून येणारे नोकर चाकर नसले तरी त्यांच्यावाचून आमचे काही अडले नाही. सुरुवातीला पत्ता शोधायला झालेला त्रास सोडला तर नंतर आम्हाला सुदैवाने इतर काही प्रॉब्लेम आला नाही.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVuqe4_TtsHXfIVf8VnXWSGTVeiCLCHROgM6xbvrwEwfV6cJCKZQpLQtial76sTB-FuRBBOzjTBXEY6Kxw2pGEKMucuPCmKswYZ7XB9wQmnU0nGDdYX7Cu0Emiti524mH_yhqBB6BEfwULgUo0P7qkaesIyQJZtbB1eDindB3CILQGfiCfwpg/s1024/WhatsApp%20Image%202022-06-19%20at%202.39.56%20PM.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1024" data-original-width="768" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVuqe4_TtsHXfIVf8VnXWSGTVeiCLCHROgM6xbvrwEwfV6cJCKZQpLQtial76sTB-FuRBBOzjTBXEY6Kxw2pGEKMucuPCmKswYZ7XB9wQmnU0nGDdYX7Cu0Emiti524mH_yhqBB6BEfwULgUo0P7qkaesIyQJZtbB1eDindB3CILQGfiCfwpg/w300-h400/WhatsApp%20Image%202022-06-19%20at%202.39.56%20PM.jpeg" width="300" /></a></div><br /><p><br /></p><p>आम्ही ज्या हॉटेलात जेवायला जात होतो तिथे पहिल्याच दिवशी मला दाढी आणि अस्ताव्यस्त जटा वाढवलेला एक कळकट माणूस एका कोपऱ्यात बसलेला दिसला. त्याने अंगात तोकडी आणि मळलेली भगवी कफनी घातली होती आणि गळ्यात रुद्राक्षासारख्या दिसणाऱ्या जाडजूड माळा घातल्या होत्या. प्रथमदर्शनी मला तो एक संन्याशी वाटला आणि इथे काय करतोय् याचे नवल वाटले. पण थोड्याच वेळात तो उठला, त्याने तोंडात एक सिगरेट ऐटीत धरून लायटरने शिलगावली आणि झुरके मारत तो इतर दोन परदेशी नागरिकांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायला लागला. तेंव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तो हिमालयातला तपस्वी संन्यासी नसून फॅशनेबल विदेशी, कदाचित हिप्पी होता.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjbStcm-jP-yLzIFwuPiOEZqOr66TnutM6-j7Mz8-lUqaxAyeFXdeMtYk-m4zkB_pHBBMfVWlw1Oj1ljpqIZhB5nrLRoaRyhPuNdfO1QhQMj63KszLVwFLqGMBILwF6KobpilbQwaMRxHf4upoeyPbkGw9qtHujfcZk_lJK4ywbjt4zYfJxKm0/s1024/WhatsApp%20Image%202022-06-19%20at%202.39.57%20PM.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="768" data-original-width="1024" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjbStcm-jP-yLzIFwuPiOEZqOr66TnutM6-j7Mz8-lUqaxAyeFXdeMtYk-m4zkB_pHBBMfVWlw1Oj1ljpqIZhB5nrLRoaRyhPuNdfO1QhQMj63KszLVwFLqGMBILwF6KobpilbQwaMRxHf4upoeyPbkGw9qtHujfcZk_lJK4ywbjt4zYfJxKm0/w400-h300/WhatsApp%20Image%202022-06-19%20at%202.39.57%20PM.jpeg" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>गोव्याला जाणारे बहुतेक सगळे पर्यटक तिथले जगप्रसिद्ध समुद्रकिनारे, मंदिरे, चर्चेस, किल्ले आणि सिनेमांमध्ये दाखवलेली प्रेक्षणीय स्थळे पाहून येतात. मीसुद्धा पहिल्या एक दोन ट्रिप्समध्ये हेच केले होते. पण तिथे जास्त दिवस राहणे आपल्या खिशाला परवडत नाही आणि दोन तीन दिवसात हे सगळे पहाण्यात खूप धावपळ आणि दमणूक होते. त्यात नुसतेच या त्या भोज्ज्याला शिवणे होते, "आम्ही पण हे पाहिले आहे" असे लोकांना सांगायची सोय होते, पण कुठेतरी त्यातली मजा हरवते असे मला अलीकडे वाटायला लागले आहे. मला आता वयपरत्वे दमणूक सोसत नाही आणि इतरांनीही या सगळ्या जागा पाहिलेल्या होत्या. त्यामुळे या वेळी कसलेही टेन्शन न घेता दोन दिवस अगदी आरामात काढायचे असे आम्ही ठरवले होते आणि जो बीच निवडला होता तो मुंबईपुण्याच्या गजबजाटापासून तर दूर होताच, पण पणजी किंवा मडगावसारख्या गोव्यातल्या बाजारपेठांपासूनही दूर विजनवासात होता. आम्ही जेवढ्या भागातून फिरून आलो तो सगळा निसर्गसौंदर्याने नटलेला पूर्णपणे ग्रामीण भाग होता. अशी आमची ही एक जराशा वेगळ्या प्रकारची गोव्याची सहल झाली.</p><p>------------------------------ </p><p>भाग - ११</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgJANHLf7HPowTsytU1MO6LFlpDar1Uh9dDDvtKkHeJz-AF_Fk5o8bJKXNe9Hlm5TfWdt_lWqDKrDldYnzfN6mBfa5AyYtMrD6xZgY6AYd6N-4q8Ho8kGLSGZwGi88ggSqdOaJbe9iMqmAS7Y6_jR2dtYmD3sudR7ijLbXiehGWhiEJkpqeGww/s362/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AB%E0%A5%87%20%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9F%20%E0%A5%AC%E0%A5%AC.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="250" data-original-width="362" height="276" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgJANHLf7HPowTsytU1MO6LFlpDar1Uh9dDDvtKkHeJz-AF_Fk5o8bJKXNe9Hlm5TfWdt_lWqDKrDldYnzfN6mBfa5AyYtMrD6xZgY6AYd6N-4q8Ho8kGLSGZwGi88ggSqdOaJbe9iMqmAS7Y6_jR2dtYmD3sudR7ijLbXiehGWhiEJkpqeGww/w400-h276/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AB%E0%A5%87%20%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9F%20%E0%A5%AC%E0%A5%AC.jpg" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>गोव्याहून परत येतांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन यायचे हे आधीपासून ठरलेलेच होते. त्याप्रमाणे आम्ही सगळे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून तयार झालो आणि परतीच्या वाटेला लागलो. गोव्यातला आणि तळकोकणातला रम्य निसर्ग आमच्या साथीला होताच. दोन तीन तास मजेत मार्गक्रमण केल्यानंतर न्याहारीची आठवण झाली. मुंबई गोवा महामार्गावरच असलेल्या एका बऱ्यापैकी खाद्यालयाला भेट देऊन इडली, दोसा, उत्तप्पा, उपमा वगैरे शुद्ध सात्विक शाकाहारी पदार्थांनी भरपूर उदरभरण करून घेतले.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgN0d6nFOHijOa2eZR5xbtPVDHB5wSYJg7KPaQ1wh-2mw4bNVOG07yGTphYW3W4yIxMSB1T7HsjJT4X5-qmf8BSqsMBtlJ2RPgwB3gmE-0zony81xxHh14_ZogjLxLF_jsThy9ulnxfI3oGPR3vYHwyP9XaM12L9Qnj3hc8Eyxg9oMNo1oLeVc/s1600/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="1600" height="288" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgN0d6nFOHijOa2eZR5xbtPVDHB5wSYJg7KPaQ1wh-2mw4bNVOG07yGTphYW3W4yIxMSB1T7HsjJT4X5-qmf8BSqsMBtlJ2RPgwB3gmE-0zony81xxHh14_ZogjLxLF_jsThy9ulnxfI3oGPR3vYHwyP9XaM12L9Qnj3hc8Eyxg9oMNo1oLeVc/w640-h288/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE.jpeg" width="640" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="text-align: left;"><br /></span></div><div style="clear: both; text-align: center;"><span style="text-align: left;">आम्ही कोल्हापूरवरून गोव्याला जातांना सगळा घाटातला प्रवास रात्री झाला होता. त्यावेळी सह्याद्रीच्या कुशीतल्या सगळ्या वृक्षवल्ली काळोखात लपल्या होत्या. परतीचा प्रवास मात्र उजेडात असल्यमुळे आम्हाला कणकवली ते गगनबावड्यापर्यतच्या घाटातले सगळे अद्भुत निसर्गसौंदर्य पहायला मिळाले. मुंबई, पुणे, सातारा इकडल्या भागातले डोंगर उघडे बोडके वाटतात, तसे तिथे नव्हते. अधून मधून धुक्याचे झूँघट सावरत तिथली गर्द वनराई डोळ्यांना सुखावत होती. सह्याद्रीचे ते वैभव नजरेचे पारणे फेडत होते. आणखी दक्षिणेला कारवार जिल्ह्यात तर दिवसासुद्धा अंधारगुडुप वाटेल इतकी घनदाट झाडी असते. कोल्हापूर जवळ यायला लागले तसे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाचे मळे दिसायला लागले आणि पुढेही कऱ्हाड येऊन जाईपर्यंत ते दिसत राहिले. </span></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizbcxSwmfi9szDrVrVP_lchLOI8Ql5WLokUzlV1xo0Zix9kqofdieUYUszY0h_Y9yd3zki4b61KsaLKD8kmHtqOyeMTyGJKEEXgN8IaHwX-O9Pq4SKeL3YVTvKutTdggev7LaxECWwAmBza5OQUGyK7UlKOeKHPSgAh2APQskJMSz2hF_kIBw/s4608/Mahalaxmi_Temple,_Kolhapur.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3456" data-original-width="4608" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizbcxSwmfi9szDrVrVP_lchLOI8Ql5WLokUzlV1xo0Zix9kqofdieUYUszY0h_Y9yd3zki4b61KsaLKD8kmHtqOyeMTyGJKEEXgN8IaHwX-O9Pq4SKeL3YVTvKutTdggev7LaxECWwAmBza5OQUGyK7UlKOeKHPSgAh2APQskJMSz2hF_kIBw/w400-h300/Mahalaxmi_Temple,_Kolhapur.jpg" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>रंकाळ्याच्या बाजूने आम्ही आमची गाडी सरळ अंबाबाईच्या देवळाकडे नेली. पण दोन चौक आधीच ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि प्रवासी वाहनांना तिथून पुढे जायला बंदी असल्याचे सांगितले. त्या चौकात गाडी वळवून त्याने ती पार्क करायला नेली. पुढची दहा मिनिटे आम्ही पदयात्रेचे थोडेसे पुण्य मिळवले. दुपारची वेळ असल्यामुळे देवळात फारशी गर्दी नव्हती. आधी एका ठिकाणच्या पायऱ्या चढून काही लोक आत जात असल्याचे बघून आम्ही तिकडे गेलो, पण तिथे लांबून मुखदर्शन होत होते म्हणून खाली उतरून पुढच्या भागात लागलेल्या लहानशा रांगेकडे गेलो. पंधरा वीस मिनिटात आम्ही देवी अंबाबाईच्या समोर जाऊन पोचलोही आणि आम्हाला त्या मानाने निवांत दर्शन घडले. यापूर्वी मी जितक्या वेळी तिथे गेलो आहे तेंव्हा सरासरी एक तास तरी रांगेत उभे रहावे लागले होते.</p><p>दर्शन घेऊन झाल्यावर मी आणि मुले देवळाच्या कडेला असलेल्या पायऱ्यांवर सावली बघून बसून राहिलो आणि महिलामंडळ खरेदीच्या कार्यक्रमाला लागले. गोव्यात आम्हाला कुठलेच मोठे शहर न लागल्यामुळे तिथे त्यांची खरेदीची हौस भागली नव्हतीच. महालक्ष्मीच्या देवळाच्या आवारातच खूप दुकाने आहेत आणि बाहेरूनही विविध प्रकारच्या दुकानांनी गराडा घातलेला आहे. विशेषतः अमेरिकेत राहून आलेल्या आणि नेहमी तिकडच्या मॉल्समध्ये खरेदी करणाऱ्यांना अशा प्रकारच्या बाजारात खरेदी करण्यात जास्तच गंमत वाटते.</p><p>सगळ्यांची मनसोक्त खरेदी करून झाल्यावर आम्ही पुन्हा दोन चौक ओलांडून खुणेच्या जागी आलो, ड्रायव्हरदादाला बोलावून घेतले आणि पुण्याच्या मार्गाला लागलो.</p><p>-----------------------</p><p>भाग - १२</p><p>या सहलीच्या निमित्याने मला काही गोष्टी समजल्या किंवा त्या माझ्या नव्याने लक्षात आल्या.</p><p>१. आम्ही पुण्याहून गोव्याला आठ तासात पोचून जाऊ हा आमचा भ्रम होता. किंवा गूगलवर ठेवलेला अनाठायी विश्वास होता. आम्हाला जातांना आणि येतांना दोन्ही वेळा सुमारे बारा तास लागले. मोठा ग्रुप आणि मोठी गाडी असेल तर सावधपणे जायला इतका वेळ लागणार हे आधीपासून धरून चालायला हवे होते. </p><p>२. जीपीएसवर विसंबून राहिल्यामुळे त्याने किंवा तिने आपल्याला कसे चुकीच्या किंवा निर्जन जागी नेऊन सोडले याचे खूप विनोदी किस्से मी ऐकले होते, पूर्वी तसा अनुभवही घेतला होता. विशेषतः नो एंट्री, वन वे वगैरेंचे सतत बदलत जाणारे नियम त्या सिस्टमला माहीत होत नसल्याने होणारा गोंधळही मी पाहिला होता. त्यामुळे माझा जीपीएसवर पूर्ण विश्वास नव्हता. या वेळी जेंव्हा आम्हाला एका उभ्या क्रॉसपाशी आणून "तुमची गंतव्य जागा आली आहे" असे त्या बाईने अत्यंत मंजुळ आवाजात सांगितले तेंव्हा मला हसावे की रडावे ते समजेना आणि म्हणावेसे वाटले की, "बाई गं, आमचे फायनल डेस्टिनेशन कुठल्या तरी वैकुंठधामात असेल, पण आम्हाला त्याची एवढी घाई नाही आहे." पण त्यानंतर पायी चालत जाता तिनेच अपरात्रीच्या अंधारात आम्हाला विश्रांतिस्थानापर्यत बरोबर नेऊन पोचवलेही होते. त्यामुळे संभाव्य वेळ सोडला तर अचूकतेच्या बाबतीत जीपीएसला आता तोड नाही असेच म्हणावे लागेल.</p><p>३. दूधसागर धबधब्यासंबंधी आवश्यक ती माहिती आम्ही आधी घेतली नव्हती. आपल्याकडे गाडी असेल तर जीपीएस लावून आपण कुठेही जाऊ शकतो हा आमचा आणखी एक भ्रम होता हे अगदी शेवटच्या क्षणी समजले. त्यामुळे आम्हाला हे निसर्गाचे आश्चर्य पहाता आले नाही, पण एक मानवनिर्मित सुरेख तरीही अप्रसिद्ध असा किल्ला पहायला मिळाल्याने थोडी आंशिक भरपाई झाली. </p><p>४. समुद्रकिनाऱ्यावरले एकादे रिसॉर्ट कसे असावे याबद्दल मी पूर्वीच्या अनुभवावरून जी कल्पना केली होती आणि जसे रिसॉर्ट आमच्या पदरात पडले त्यात जमीन अस्मानाचा फरक होता. तिथे एक साधा बोर्ड नव्हता, कोणी मॅनेजर नव्हता की कुठलीही सेवा उपलब्ध नव्हती. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये असेही उदाहरण असू शकेल यावर मी विश्वास ठेवला नसता. कदाचित या काळात एवढ्या पैशात इतक्याच सोयी मिळत असतील असेही असेल. त्यामुळे आमचे बरेचसे पैसे वाचलेही असतील. </p><p>५. मी जेंव्हा जेंव्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात जातो तेंव्हा तेंव्हा मला त्या देवळाचे आर्किटेक्चर जास्तच गूढ वाटत जाते. हे देऊळ बांधण्यासाठी इतके जाडजूड आणि एकमेकांच्या इतके जवळ जवळ असंख्य असे खांब का दाटीवाटीने उभे केले असतील याचा मला नेहमीच अचंभा वाटत आला आहे. मला तरी दुसऱ्या कुठल्याही देवळात इतके खांब पाहिल्याचे आठवत नाही. मी लहानपणी अशी एक दंतकथा ऐकली होती की कुणीतरी या देवळातले खांब मोजण्याचा प्रयत्न केला आणि तो आंधळा झाला म्हणे. त्यामुळे मी ते खांब मोजण्याचा कधीच प्रयत्नही केला नाही, पण पुरातत्व विभागाकडे ही माहिती उपलब्ध असावी अशी माझी कल्पना आहे. </p><p>६. कोल्हापूरजवळील काणेरी येथील सिद्धगिरी मठामधील ग्रामजीवन वॅक्स म्यूजियमबद्दल मी खूप वर्णन ऐकले असल्यामुळे ते पहाण्याची उत्सुकता होती. तेवढ्यासाठी मुद्दाम तिथपर्यंत जाणे शक्य नाही. पण या वेळेस वेळेचे योग्य नियोजन करून ते ही पाहता आले असते असे नंतर वाटून गेले. पण अलीकडे एका दिवशी एकच काम पण नीटपणे करायचे असा नियमही मी स्वतःला घालून घेतला आहे. तो मोडला असता.</p><p> </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLitejKOkPizi2eBKBzjpTgjf_mUWFen2hrZ6WygG9kJprwwtkUCTWSfoBOM0mYu1nGSBWG6duyKPtMQbOt3MwMIdX6vFaBJps18NHZAovWF1SFUckdqLdW7qj1xKtpSedkWA5AEigqIIvrO2RLy3sGTwnzEi5nTaxn9maqvihKoCEufYLCco/s920/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE.png" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="580" data-original-width="920" height="253" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLitejKOkPizi2eBKBzjpTgjf_mUWFen2hrZ6WygG9kJprwwtkUCTWSfoBOM0mYu1nGSBWG6duyKPtMQbOt3MwMIdX6vFaBJps18NHZAovWF1SFUckdqLdW7qj1xKtpSedkWA5AEigqIIvrO2RLy3sGTwnzEi5nTaxn9maqvihKoCEufYLCco/w400-h253/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE.png" width="400" /></a></div><br /><p></p><p>७. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' असलेला माझ्या खिशातला मोबाईल चक्क माझ्यावर हेरगिरी करत होता आणि गूगलने मलाच मेल पाठवून मी कुठे कुठे फिरून आलो याचा नकाशासह साद्यंत वृत्तांत पाठवून दिला. पण त्याने मी काढलेले फोटो न दाखवता त्याच्या स्टॉकमधले काही फोटो दिले होते. ते पाहतांना "अरे, आपण ही जागा तर पाहिलीच नाही !" असेही वाटून गेले.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWg-oIPX8X-jILSRrzYdEWajqIq23PXXZawk-UgqGgniaJwYqqtNeGVCDHtq2ZxVSwEdm90X7Zh7MHEMaW3oAlf69CPscdSDRHoysgDDFQ45HkFb6RAgldzInMWXl_R5eeZZ-fapykAKsAyPHmkJdSIFm1LsZGssaEdjRpJQkq4OtmJ7DptI0/s756/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%20%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="520" data-original-width="756" height="440" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWg-oIPX8X-jILSRrzYdEWajqIq23PXXZawk-UgqGgniaJwYqqtNeGVCDHtq2ZxVSwEdm90X7Zh7MHEMaW3oAlf69CPscdSDRHoysgDDFQ45HkFb6RAgldzInMWXl_R5eeZZ-fapykAKsAyPHmkJdSIFm1LsZGssaEdjRpJQkq4OtmJ7DptI0/w640-h440/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%20%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A.jpg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p>(समाप्त)</p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-20484515.post-87792698106302244922022-06-10T05:18:00.000-07:002022-06-10T05:18:00.603-07:00व्यक्तीस्वातंत्र्य की बेशिस्त वर्तन ?<p> </p><p>दोन वर्षांपूर्वी अचानक आलेल्या कोरोनाच्या साथीने जगभर हाहाःकार पसरवला होता. चीनमधून निघालेली ही साथ इटली, इराण, इंग्लंड, फ्रान्स करत भारतात आणि रशियाअमेरिकेतही जाऊन अत्यंत वेगाने फैलावत होती. तिला कसा प्रतिबंध घालावा हे कुणालाच धड समजतही नव्हते किंवा नक्की सांगता येत नव्हते. 'जागतिक आरोग्य संस्था' या नावाने काही तथाकथित तज्ञ मंडळी भलभलती भीषण चित्रे रंगवून जगाला भीती दाखवत होती आणि उलटसुलट सल्ले देत होती. युरोपातील बहुतेक देशांनी लॉकडाउन डिक्लेअर करून कडक संचारबंदी लागू केली होती. भारताच्या माननीय पंतप्रधानांनीही एका संध्याकाळी दूरदर्शनवर भाषण देऊन वीस दिवसासाठी सगळ्या देशाला घरी बसवून ठेवले. तरीही ती साथ वेगाने पसरतच राहिल्यामुळे त्याच्या मुदतीत वाढ होत गेली. या सगळ्या गोष्टी सर्वांच्या स्मरणात पक्क्या रुतून बसल्या असतील.</p><p>त्या काळात बहुतेक सगळे उद्योगव्यवसाय बंद पडल्यामुळे बहुसंख्य लोकांचे आर्थिक नुकसान झाले होते आणि त्यामुळे त्यांच्या मनात कडवटपणाही निर्माण झाला होता, तरीसुद्धा भारतातल्या बहुसंख्य लोकांनी कदाचित स्वतःच्याच काळजीपोटी सगळी बंधने स्वीकारली होती आणि रस्त्यात सगळीकडे शुकशुकाट दिसत होता. मात्र काही दिवसांनी अमेरिकेच्या काही भागातल्या लोकांनी सगळे निर्बंध झुगारून देऊन रस्त्यावर येऊन निदर्शने सुरू केली. त्यावर मी फेसबुकवर एक स्फुट लिहून असे भाष्य केले होते.</p><p>"अमेरिकेतील लोक रस्त्यावर येतात आणि संचार - नियमनाचा निषेध करतात. मास्क घालत नाहीत. वावर संहिता पाळत नाहीत. काही युरोपियन लोक पण तसेच करतात, रस्त्यावर येतात असे आपण टी व्हीवरील बातम्यांवर पाहतो. ते असे का वागत असतील?</p><p>यावर एक मत असे आहे, "त्यांना स्वातंत्र्याची किमत कळते, स्वातंत्र्य म्हणजे काय ते जाणतात . ते प्रश्न विचारतात. आम्हाला पिढ्यानपिढ्या फक्त आज्ञापालनच शिकविले आहे. आज्ञा चुकीची असो, बरोबर असो, आपण प्रश्न करतच नाही." यावर उदाहरण म्हणून त्याने रामायणातले दाखले देऊन तशीच शिकवण आपल्याला दिली गेली आहे असे प्रतिपादन केले आहे. आणि "अशा वातावरणात शास्त्रीय दृष्टिकोन कुठून रुजणार ? आणि लोकशाही कशी रुजणार?" असे विचारले आहे.</p><p>यावर मला असे वाटते की "आज्ञापालन असे हाडीमासी रुजले आहे" हे काही लोकांच्या बाबतीत खरे असेलही. पण मला भेटलेले बहुतेक लोक तर सरकारने कुठलाही नवा नियम केला की तो पाळला नाही तर काय होणार आहे? त्यातून कोणत्या पळवाटा काढता येतील? असाच विचार आधी करतांना दिसतात. कर भरण्याचे किंवा वाहतुकीचे नियम जितक्या सूज्ञपणे पाश्चिमात्य देशात पाळले जातात त्याच्या एक शतांश भागसुद्धा पुण्यातही पाळले जात नाहीत. इतर गावांमध्ये तर विचारायलाच नको. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग शिकवला होता म्हणून लोकांच्या या गैरशिस्त वागण्याचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडणारेही मी पाहिले आहेत. युरोप अमेरिकेत सध्या चालत असलेली निदर्शने त्यांच्या या बाबतीतल्या तीव्र भावना दाखवतात, तिथेही भोळ्या लोकांची माथी भडकवणारे राजकीय पुढारी आहेत. पण त्याला 'आचारस्वातंत्र्य', 'शास्त्रीय दृष्टिकोन' वगैरे नावाने गौरवण्याचे कारण नाही. त्यांचे आताचे वागणे चूकच आहे आणि शिस्त हाच त्यांचा खरा स्थायी भाव आहे असे मला तरी वाटते. यावर तुमचे काय मत आहे?"</p><p>यावर व्यक्तीस्वातंत्र्याचा भोक्ता असलेल्या एका मित्राने असे उत्तर दिले, "शिस्त हा त्यांचा स्थायी भाव आहे . पण सरकारच्या चुकीच्या निर्णयाला ते जाब विचारतात . अमेरिकेत ८०-९० % ठिकाणी शांततापूर्ण निदर्शने चालू आहेत . पोलिसाने एका कृष्णवर्णीयाचा सरळ सरळ खून केला . म्हणून काही वेळ ही निदर्शने हिंसक झाली . आता ती युरोपमध्ये पण पसरत आहेत ."</p><p>मला ते उदाहरण पटले नाही म्हणून मी लिहिले, "एका पोलिस अधिकाऱ्याने केलेले चुकीचे आणि निर्घृण कृत्य हे सरकारचा चुकीचा निर्णय कसे ठरते? माझ्या माहितीप्रमाणे त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. खून झालेला माणूस कोणी मोठा लोकप्रिय संत महात्मा नव्हता, त्यामुळे त्याच्यावर झालेल्या अन्यायाने सगळ्यांनी एवढे चिडून जायचे काय कारण आहे? त्यांनी इतर निष्पाप लोकांवर अत्याचार करणे किंवा दुकानांची लुटालूट करणे तर मुळीच समर्थनीय ठरत नाही."</p><p>माझ्या दुसऱ्या मित्राने असे मत दिले होते, "जेव्हां जेव्हां कोणत्याही सरकारी संस्थेच्या कृत्याला वर्णभेद, जातिभेद, वर्गभेद, लिंगभेद, धर्मभेद असे रंग असतात तेव्हां झालेले कृत्य हे एका व्यक्ति विरुद्ध झालेले रहात नाही. अशा परिस्थितीत अन्यायाच्या विरुद्ध संपूर्ण सचेत समाजातून त्यांच्या भावनांचा प्रतिध्वनी उठतोच.</p><p>पाश्चिमात्य देशांत शिस्त, ही तेथील कडक कायदा पालन व तडकाफडकी बेशिस्त वागणाऱ्या बद्दल करण्यात येणारी अति तीव्र आर्थिक किंवा इतर शिक्षा, हे आहे. हे बऱ्याच काळा पासून सातत्याने करण्यात येत असल्याने प्रथम दर्शनी शिस्त हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे असे वाटते, पण ते बरोबर नाही. इतर देशीय व्यक्ति देखील तेथे गेल्यावर एकदम शिस्तबद्ध होतात.</p><p>"आपण प्रश्र्न करीतच नाही", हे विधान चुकीचे आहे. संपूर्ण भारतीय दर्शन हे प्रश्न व त्याचे उत्तर / समाधान, ह्या धर्तीवर उभे आहे. संपूर्ण भग्वदगीता अशाच संकल्पनेवर रचलेली आहे.</p><p>मात्र, राजा म्हणजे देव ही भावना खोलवर रुजली असल्याने, राजाज्ञा पाळणे हा आपल्या येथील समाजाचा स्वभाव आहे / होता. आता नवीन पिढ्या त्याला फूस लावत आहे."</p><p>दोन वर्षांनंतर मी तीच पोस्ट पुन्हा एकदा फेसबुकवर टाकली. यावेळी दोन निराळ्या मित्रांनी त्याला प्रतिसाद दिला. </p><p>१. ज्ञान व अज्ञान हे सर्वत्र असते.म्हणून संत वचन आहे की ज्ञानीयाचा सल्ला ऐकणे हितकारक आहे. पण अज्ञानाने चुकीचे निर्णय स्वातंत्र्याच्या नावे अवलंबणे हे हानी कारकच आहे. अमेरिकेत अशा अज्ञानी लोकांना कोव्हिडचा चांगलाच अनुभव आला आहे. मास्क न वापरणे लस न घेणें याला स्वातंत्र्य म्हणणे उचित नाहीच .</p><p>२.Being irresponsible is not a right reserved for any particular nation! I am going to say their intent to keep their personal freedom is admirable but their discriminating skills as to recognizing its limitations for the general good and exercising the self control is lacking. in simple words it's very smart people behaving very irresponsibly. </p><p>या सगळ्यावरून असे दिसते की हे कोरोनाचे सरकरी निर्बंध न पाळण्याचे अशा प्रकारचे व्यक्तीस्वातंत्र्य एकादा अपवाद सोडता बहुतेक सूज्ञ लोकांना समर्थनीय वाटत नाही. या वर्षी तर बेजबाबदार लोकांनी केलेल्या बेछूट गोळीबाराच्या अनेक घटना अमेरिकेत घडल्या आहेत. तिथे असे कायदे आहेत असे म्हणतात की कुणाला साधी डोकेदुखीची गोळी घेण्यासाठी डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन लागते पण बंदुका आणि त्यांच्या गोळ्या सहजपणे बाजारात मिळतात म्हणे. आपल्याला हवे ते शस्त्र बाळगण्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याबद्दल तिथले काही लोक आग्रही आहेत. हा व्यवसाय करणाऱ्या लोकांचीच एक प्रभावी लॉबी आहे. इतक्या दुर्दैवी घटना घडून गेल्यानंतर आता तिथे याबद्दल नुसते विचारमंथन सुरू झाले आहे.</p><p>अरण्यात रहाणाऱ्या एकट्यादुकट्या आदिमानवाला कुणीही विचारणारा नव्हता त्यामुळे त्याला मनाला वाटेल तसे वागण्याचे पूर्ण व्यक्तीस्वातंत्र्य होते. पण समाजात राहणाऱ्या आजच्या माणसाला अनेक नियम, कायदेकानून यांच्या बंधनातच रहावे लागते. यात त्याचे व्यक्तीस्वातंत्र्य किती प्रमाणात धोक्यात येते याबद्दल थेट राज्यघटनेतील कलमांचे उल्लेख करून वादविवाद घातले जात आहेत हे आपण रोजच्या बातम्यांमध्ये पहात आहोत. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह करून जो मार्ग दाखवला त्याचे उदाहरण देऊन कोणीही उठतो आणि "मी अमूक कायदा मोडणार" असे जाहीरपणे सांगतो. बेशिस्त वृत्तीचे असे उदात्तीकरण धोकादायक आहे. </p><p>---------------------------------------------------------</p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-42263642305008428312022-05-14T22:26:00.000-07:002022-05-14T22:26:09.040-07:00माझे मिसळपाववरील पहिले वर्ष<p> </p><p>आपले लाडके श्री.तात्या अभ्यंकर यांना आपल्यातून जाऊन तीन वर्षे झाली तरी त्यांच्या आठवणी अजून मनात ताज्याच आहेत, इतक्या त्या खोल रुजल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर मी केलेला श्रद्धांजलींचा एक संग्रह या स्थळावर दिला आहे. <a href="https://anandghare.wordpress.com/2019/05/16/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d/">https://anandghare.wordpress.com/2019/05/16/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d/</a></p><p> त्यांच्या मिसळपाव या संकेतस्थळाबद्दल मी दहाबारा वर्षांपूर्वी लिहिलेला एक लेख त्यांच्या स्मरणार्थ खाली देत आहे. या ब्लॉगच्या वाचकांपैकी काही जुने मिपाकर असतील तर त्यांना ते कदचित दिवस आठवत असतील. तात्यांनी मिसळपावमधून अंग काढून घेतल्यानंतर मीही मिसळपावला भेट दिलेली नाही. त्यामुळे आज तिथे काय काय चालते याची मला माहिती नाही. या लेखात फक्त खूप जुन्या आठवणी आहेत..... आनंद घारे</p><p><br /></p><h2 style="text-align: left;">मिसळपाववरील पहिले वर्ष</h2><p>एक वर्षापूर्वी मी मिसळपावच्या हॉटेलात पहिले पाऊल ठेवले. ते कोण चालवत असे याची त्या वेळी मला कांही कल्पना नव्हती. पण आंत आल्या आल्या तात्यासाहेबांनी जुनी ओळख दाखवून मोठ्या अगत्याने "या, बसा." असे म्हणत माझ्याकडे खुर्ची सरकवली. आजूबाजूला बसलेल्या लोकांत कांही ओळखीचे चेहेरे आणि मुखवटे पाहून मलाही आपल्या माणसांत आल्यासारखे वाटले. काउंटरवर जाऊन मी थाळी भरून घेतली. जेवण तर मस्तच होते. तेंव्हापासून मी इकडे येत राहिलो. मधील काळात कधी मला तर कधी माझ्या संगणकाला विषाणूंची बाधा झाली, कधी मी परगांवी गेलो वगैरे कारणांमुळे मला अवकाशाशी जडलेले नाते राखता आले नाही. ते पुन्हा जुळेपर्यंत पोस्टाच्या पेटीत पत्रांचा ढिगारा सांचलेला असायचा. माझ्या ढाब्यावरसुध्दा पूर्वी चार माणसे यायची, त्यांची संख्या आता पांच सहा (आंकड्या)वर गेली आहे. त्यांना काय हवे नको ते पहायचे असते. त्या व्यापातून वेळ काढून अगदी रोजच्या रोज मिसळपाववर यायला जमले नाही आणि त्यामुळे कांही छान पदार्थांची ताजी चव घेता आली नाही. पण आपल्याला जे मिळाले नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे मिळाले त्याची कदर करावी, असे मी नेहमीच स्वतःला आणि कधी एकादा ऐकणारा भेटला तर त्याला सांगत असतो.</p><p>"तुम्हाला वाचनातून काय मिळतं हो?" असा प्रश्न आपण दहा लोकांना विचारला तर त्याची निदान वीस तरी उत्तरे मिळतील, पण त्या सर्वांची गोळाबेरीज बहुधा माहिती आणि मनोरंजन यात होईल. पुढे त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात उन्नती झाली, अनेक प्रकारचा आनंद मिळाला वगैरे त्याचे कित्येक फायदे त्यातून निघतील. मी मात्र एकादी गोष्ट समजून घेत असतांना त्या क्रियेत तल्लीन होऊन जातो आणि देहभान हरपवून टाकणारा एकादा कलाविष्कार पहात किंवा ऐकत असतांनासुध्दा त्यातून कसला तरी शोध बोध मनातल्या मनात चाललेला असतो. माहिती आणि मनोरंजन या गोष्टी मला एकमेकींपासून वेगळ्या करता येत नाहीत. मिसळपाववर मला त्या दोन्हीही मिळाल्या असे सांगता येईल. </p><p>मिपावरच्या मेनूकार्डात कांही मुख्य विभाग आहेत. त्यातल्या प्रत्येक पदार्थाला लेखनविषय आणि लेखनप्रकार यांची लेबले लावावी लागतात. अशा चौकटी आंखून त्यात बसतील असे शब्द लिहायला मला जमत नाही. तापलेल्या तव्यावर फोडून टाकलेल्या अंड्याप्रमाणे माझे लिखाण अस्ताव्यस्त पसरत जाते. त्यामुळे मुळात मला लिहायला तरी कुठे येते? असा प्रश्न कांही लोक विचारतात, तसा तो मलाही पडतो. पण मी त्याला नजरेआड खुंटीला टांगून ठेवतो आणि सुचेल तसे कीबोर्डवर बडवून घेतो. अर्थातच इतर लोकांच्या लेखनाच्या लेबलांकडे माझे लक्ष जात नाही. मी सरळ खाली लिहिलेले वाचायला सुरुवात करून देतो.</p><p>मिपाच्या सर्व विभागात 'जनातलं, मनातलं' हे माझे मुख्य खाद्य आहे. अनेक छान छान कथा, अनुभव, प्रवासवर्णने, व्यक्तीचित्रे वगैरे मला त्या विभागात वाचायला मिळाली. कांही कथा काळजाला भिडणार्या होत्या तर कांही गुदगुल्या करणार्या, कांही क्षणाक्षणाला रहस्य वाढवत नेणार्या तर कांही शेवटच्या एका वाक्यातच दणका देणार्या अशा नाना तर्हा त्यात होत्या. कधी कधी कल्पितापेक्षा वास्तव जास्त अद्भुत किंवा भयानक असते याचे अनुभव कोणी लिहिले, तर कोणी आपले मजेदार किस्से सांगितले. कोणी गौरवशाली भूतकाळातली एकादी गोष्ट सांगितली तर कोणी नजिकच्या भविष्यकाळात काय घडू शकते याचा अंदाज वर्तवला. वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनांवरील लेखांचा प्रवाह तर धोधो वहात असतो. वर्तमानपत्रात छापून येण्यापूर्वीच एकादी महत्वाची बातमी मला मिपावर वाचायला मिळाली असेही अनेक वेळा घडले, इतके इथले सदस्य सजग आणि तत्पर आहेत. समुद्रकिनारा ते बर्फाच्छादित पर्वतशिखरे, प्राचीन वाडे ते आलीशान पॅलेसेस, तसेच मंदिरे, चर्च, म्यूजियम वगैरे कांही निसर्गसौंदर्याने नटलेल्या तर कांही मानवाची किमया दाखवणार्या अशा अनेक स्थळांची सचित्र वर्णने वाचायला आणि पहायला मिळाली. कांही लेखातून मधुर गायनाचे दुवे मिळाले. अशा प्रकारे हे सदर वाचणे ही एक मेजवानी असायची. कांही चित्रकारांच्या कुंचल्यातील अप्रतिम जादू आणि छायाचित्रकारांच्या कौशल्याची कमाल वेगळ्या कलादालनात पहायला मिळाली.</p><p>काथ्याकूट या सदरात होणार्या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी संयोजकांची इच्छा आहे! त्यानुसार कधी कधी एकाद्या विषयावर मुद्देसूद चर्चा घडते. त्यातून त्या विषयाचे आपल्याला आधी माहीत नसलेले पैलू समोर येतात. "वादे वादे जायते तत्वबोधः।" या उक्तीनुसार आपल्या मनातल्या कांही अस्पष्ट संकल्पनांना आकार येतात, त्याचे रेखाचित्र असेल तर त्यात रंग भरले जातात, चित्र असेल तर त्याला उठाव येतो. पण कांही वेळा मुळात टाकलेल्या काथ्याकडे दुर्लक्ष होते आणि लोक आपापल्या सुतळ्या, दोरखंड, काड्या वगैरे त्यात घालून कुटत बसतात. अशा काथ्याकुटासाठी काथ्यांचे वेगवेगळे धागे न टाकता एक खलबत्ताउखळमुसळ यंत्र अखंड चालत ठेवले आणि ज्यांना जे पाहिजे ते जितके हवे तितके बारीक किंवा भरड कुटू दिले तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र त्याचा खाट सहन होत नसेल तर हातातला उंदीर तिकडे जाण्यासाठी चुळबुळ करायला लागला की आधी कीबोर्डाचे कनेक्शन काढून ठेवणे बरे असते अशी सावधगिरी बाळगण्याची सूचना करावी असे वाटते.</p><p>आजची खादाडी हा तर मिसळपावचा लाडका विषय असायलाच पाहिजे. मुखपृष्ठावरच मुळी इतके छान छान फोटो टाकलेले असतात की ते पाहतांना तोंडाला पाणी सुटते. इतर विभागातले लाक्षणिक अर्थाने 'पदार्थ' वाचून मन तृप्त होते, पण पाककृती मात्र प्रत्यक्ष करून आणि जिभेने चाखून पहाव्याशा वाटतात. आमच्या किचनलँडचा फक्त टूरिस्ट व्हिसा मला मिळालेला असल्यामुळे तिथे गेल्यावर लुडबूड करता येत नाही. शिवाय गोड, तिखट, खारट, आंबट, तेलकट, तुपकट वगैरे सगळ्या चविष्ट पदार्थांच्या आणि उत्तेजक पेयांच्या सेवनावर नतद्रष्ट डॉक्टरांनी नियंत्रण घालून ठेवले आहे. इंटरनेटमधून जशी छान चित्रे पहायला मिळतात, सुरेल संगीत ऐकायला मिळते त्याचप्रमणे खाद्यपदार्थ तयार होतांना पसरणारा घमघमाट आणि तयार झाल्यावर त्याला आलेली चव यांचा आस्वाद दुरून घेता येण्याची सोय कधी तरी होईल असे मनातले मांडे मी मनात खात असतो.</p><p>"जे न देखे रवी ते देखे कवी" असे म्हणतात. त्याप्रमाणे जिथे सूर्याचा प्रवेश होत नाही अशा आभाळात हे महानुभाव आपल्या कल्पकतेचे पंख लावून स्वैर भ्रमण करत असतात. त्यांचे शेपूट धरून त्यांच्याबरोबर जायला मिळाले तर आपल्याला सुध्दा त्याचे नेत्रदीपक दर्शन घडू शकते. पण कधी कधी जे कवीला दिसते ते पाहण्याइतकी क्षमता आपल्या दृष्टीत नसते किंवा आपल्या पंखातले बळ कमी पडते आणि आपण जमीनीवरच खुरडत राहतो. कधी तर आपण त्यांच्या सोबतीने आकाशात उडण्याऐवजी पार पाताळात जाऊन पोचलो आणि कवीला न दिसलेले आपल्याला दिसायला लागले तर पंचाईत होते. अशा अमूर्त अगम्य गोष्टींविषयी मला फारसे आकर्षण वाटत नसल्यामुळे त्या प्रांतात मी क्वचितच जातो. त्यातला विडंबन हा प्रकार समजायला सोपा आणि मजेदार वाटतो. मूळ कविता आपल्या ओळखीची असेल, त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे विडंबन करणार्याला ती पूर्ण समजली असेल, त्यातले वृत्त, छंद वगैरे व्यवस्थितपणे सांभाळले गेले असेल आणि मूळ कवितेची आठवण करून देणारे महत्वाचे शब्द किंवा ते ध्वनित करणारे तत्सम शब्द वारंवार येत राहिले तर ते विडंबन मस्त वाटते. नुसतेच एका गाण्याच्या चालीवर दुसरे गाणे रचले तर ते विडंबन न वाटता एक स्वतंत्र काव्य होते आणि त्यातल्या काव्यगुणांप्रमाणे त्याचे मूल्यमापन होते.</p><p>प्रत्यक्षातील बहुतेक हॉटेलांत ग्राहकांनी मागवलेले पदार्थ वेटर आणून देतो तर बर्याचशा कँटीन, कॅफेटेरिया वगैरेंमध्ये स्वयंसेवा असते. मिसळपावच्या हॉटेलात वाढपी तर नाहीतच, स्वैपाकीसुध्दा नाहीत. एक अद्ययावत साधनांनी युक्त असे स्वयंपाकघर आहे. इथे येणारे ग्राहकच आपापला शिधा घेऊन येतात, वाटल्यास इतर ग्राहकांकडून कांही वस्तू मागून घेतात किंवा ढापतात आणि पाकसिध्दी करून पदार्थ तयार झाल्यावर ते काउंटरवर आणून ठेवतात. इतर सदस्य आणि पाहुणे त्याचा मुक्तपणे आस्वाद घेतात. कांही ग्राहकांचे इतरांवर बारीक लक्ष असते आणि ते त्यांना परोपरीने मदत करत असतात. माझ्यासारख्या नवशिक्याने केलेला पदार्थ धांदरटपणामुळे अर्धाकच्चा राहिला तर तो खरपूस भाजून देतात, त्यात ढेकळे राहिली तर ती फोडून त्यांचा चकणाचूर करतात, दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या कांही एक्स्पर्ट लोकांना चुकून आलेले खडे आणि न शिजलेले गणंग पटकन दिसतात, कांही सज्जन खोवलेला नारळ, चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव वगैरे त्यावर पसरतात आणि बाजूला लिंबाची फोड, टोमॅटोचे काप वगैरे ठेऊन छान सजवून देतात. इथली संचालक मंडळीसुध्दा जसा पदार्थ असेल त्याप्रमाणे त्यावर खमंग फोडणी देऊन, तुपाची धार धरून किंवा पिठीसाखर पसरून त्याची गोडी वाढवतात. अधून मधून ते ग्राहकाचा वेष धारण करून येतात आणि ठेवणीतले चमचमीत पदार्थ तयार करून हॉटेलाचे स्टँडर्ड उंचावतात. </p><p>चितळे बंधूंची आंबा बर्फी किंवा बाकरवडी, हलदीरामची सोनपापडी, आलू भुजिया यासारखे सुप्रसिध्द खाद्यपदार्थ किंवा घरी भेट म्हणून आलेले मिठाईचे पुडे इकडे घेऊन यावे असेही कोणाला वाटते. कांही लोक दुसर्या चांगल्या हॉटेलातून तिथल्या खाद्यपदार्थांचे पार्सल बांधून आणण्याचा विचार करतात. हे सारे पदार्थ चविष्ट असले तरी मिपाच्या योग्य अशा धोरणाप्रमाणे बाहेरचे खाद्यपदार्थ इथे आणणे वर्ज्य आहे. तसा रीतसर बोर्डसुध्दा लावलेला आहे. पण उत्साहाच्या भरात तिकडे लक्ष न गेल्यामुळे किंवा ते न दिल्यामुळे क्वचित कांही लोक तसे करतात. ते उघडकीला आल्यावर कांही लोक सौम्य शब्दात त्याची जाणीव करून देतात, तर कांही लोक "परवा आम्हाला नाही म्हंटलं होते, आज यांनी केलेलं कसं चालतं ?" वगैरे अवघड प्रश्न विचारून त्यावर वाद घालतात. माझ्यासारखे कांही सदस्य आपापले वेगळे ठेलेसुद्धा चालवतात. त्यात एकादा चांगला पदार्थ बनून गेला तर त्याची चव इतर लोकांनी चाखून पहावी यासाठी कधी कधी ते सदस्य तो पदार्थ इथे तसेच दुसर्या कांही ठिकाणीसुध्दा मांडतात. स्वतः तयार केलेला पदार्थ इथे आणून मांडायला इथल्या नियमांप्रमाणे परवानगी आहे आणि मला त्यात कांही गैर वाटत नाही. पण "आपले उष्टे खरकटे पदार्थ इथे आणून ठेवायला या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत ?" असा ओरडा जेंव्हा आंतल्या गोटातून एकदा झाला तेंव्हा मात्र मी चपापलो. त्यानंतर त्याचा ऑफीशिअली खुलासा झाला असला तरी त्यावरून समजायचे ते समजून घेऊन मी आपल्यापुरता एक निर्णय मनाशी घेतला होता. पण ती कांही भीष्मप्रतिज्ञा नव्हती की ते जाहीर आश्वासन नव्हते, त्यामुळे नंतर ते विसरून गेलो. आज सिंहावलोकन करतांना त्याची आठवण झाली. हा लेख मात्र खास मिसळपावासाठीच लिहिला गेला आहे याची ग्वाही द्यायला हरकत नाही. </p><p>बहुतेक उडप्यांच्या हॉटेलात दारापाशीच एका चांदीच्या चकाकणार्या देव्हार्यात एक सुंदर मूर्ती ठेवलेली असते किंवा एका स्वामीचा फोटो लावून त्याला ताज्या फुलांचा हार भक्तीभावाने घातलेला दिसतो. मिसळपावच्या मुखपृष्ठावर सुध्दा आराध्य दैवतांची किंवा साधुसंतांची सुंदर चित्रे लावून ते मंगलमय केलेले असते. पण मधूनच कोणी भाबडा (वाटणारा) भक्त एका जगद्वंद्य महात्म्याचा फोटो एका भिंतीला चिकटवून त्याला उदबत्ती ओवाळतो. त्यानंतर दोघेतीघे येतात आणि हिरव्या मिरचीची चटणी, चिंचेचा घोळ, हॉट अँड सॉवर सॉस वगैरेमध्ये बुडवलेली बोटे त्या चित्राला पुसतात. ते पहायलाही कांही लोकांना मजा वाटते. "पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" असे म्हणतात ना!</p><p>मिसळपावाच्या हॉटेलातल्या ग्राहकांना एकेक खण देऊन ठेवले आहेत. एकादा खास पदार्थ करून त्यातल्या कोणाच्याही खणात ठेवलेल्या बशीत घालायची सोय केलेली आहे. कांही ग्राहक त्याचा फायदा रोज घेत असतात. मध्यंतरी एकदा एका सदस्याने भरून ठेवलेल्या अमृतकुंभाचे रेखाचित्र दुसर्या एका ग्राहकाने त्याला न विचारता काढले, त्यातल्या अ या अक्षरावर फुली मारली आणि त्याच्या चारी बाजूंना काळ्या रंगाची चौकट काढून ते चित्र आपल्या खणात लावून ठेवले. ते पाहून पहिल्या सदस्याच्या अंगाचा तिळपापड झाला आणि या दोन सदस्यात कांही तिखट व कडू पदार्थांची देवाणघेवाण झाली म्हणे. त्याची कुणकुण कानावर आल्यामुळे अशा प्रकारच्या समांतर चर्चा इथे चालतात हे मला समजले. आपल्या बशीत पडलेले पण न आवडलेले पदार्थ काढून कचर्याच्या पेटीत टाकायची सोय आहे. "आज आपण आपली बशी साफ केलीत कां?" अशी आठवण एक सन्मान्य सदस्य सर्वांना रोज करून देत असतो. काउंटरवर ठेवलेले सगळे सुग्रास पदार्थ घ्यायलाच मला वेळ पुरत नाही. त्यामुळे इतर कोणाचे बंद खण उघडून त्यातल्या बशांत काय पडले आहे हे पहाण्याचा प्रयत्न मी कधी करत नाही. </p><p>जिवश्चकंठश्च मैत्री असलेले कांही ग्राहक एकमेकांना भेटण्यासाठी या हॉटेलात नेहमी येतात. अर्थातच त्यांच्या गप्पागोष्टी, थट्टामस्करी, उखाळ्यापाखाळ्या वगैरे मस्त रंगतात. या गुजगोष्टी आपापसात करण्यासाठी स्पेशल फॅमिली रूम नसल्यामुळे ते सर्वांसमक्षच चालते. जुन्या काळातल्या इंग्रजी किंवा हिंदी सिनेमातला एक सीन ते पाहतांना माझ्या डोळ्यासमोर येतो. एक जंगी पार्टी चाललेली असते, सारी माणसे छान छान पोशाख करून तिथे आलेली असतात, अचानक त्यातला एकजण हातातला केक दुसर्याच्या तोंडावर मारतो, ते पाहून तिसरा चौथ्याकडे फेकतो, पण तो हा हल्ला चुकवतो त्यामुळे तो पांचव्याला लागतो. त्यानंतर सहावा, सातवा, आठवा असे करत पार्टीतले सारेच लोक या खेळात सामील होतात. मधूनच एकादा चार्ली चॅपलिन किंवा राजेंद्रनाथ गालाला लागलेले क्रीम बोटांनी पुसून चाटून घेतो. ते दृष्य पाहतांना सर्व प्रेक्षकांची हंसून हंसून मुरकुंडी वळते.</p><p>अशा अनेक गंमतीजंमती मिपावर चाललेल्या असतात. तिथे आज आलेला लेख उद्या इतिहासकाळात जातो आणि परवा तो मुद्दाम शोधून काढावा लागतो इतक्या प्रचंड गतीने ते येत असतात. त्यातले सारेच वाचणे जमत नाही. पण आपल्या आवडीनुसार हवे ते निवडता येते. एकंदरीत पाहता मला हे स्थळ आवडले, शक्य तितक्या वेळा इथे यावे असे वाटले आणि पुढेसुध्दा मी इथे येत रहाणारच आहे असे म्हणतो.</p><p>- आनंद घारे</p><p>मी हा लेख तीन वर्षांपूर्वी तात्या चालवत असलेल्या शिळोप्याच्या ओसरीवर दिला असावा. त्यावेळी आलेला एक प्रतिसाद.</p><p>नरेंद्र गोळे </p><p>मनोगत डॉट कॉमवर आंतरजालीय, अनिर्बंध सत्वर प्रतिसाद चर्चा, देवनागरीत प्रथमच शक्य झाली होती. त्याचा आनंद आम्ही सारेच घेत होतो. क्वचित स्वातंत्र्याचा गैरवापरही व्यक्तिगत टीकेकरता होऊ लागला. मग तेथील प्रशासक श्री. महेश वेलणकर ह्यांनी प्रत्येक नोंदीवर प्रकाशनपूर्व निर्बंध घातले. त्याचा निषेध करण्यासाठी मग मनोगत कट्टा झाला. आयोजकांत एक होते तात्या. मी त्यांना म्हटले की प्रशासकांवर टीका करण्यापेक्षा ’मनोगता’ला उत्तर देण्याकरता तुम्ही ’जनोगत’ काढा आणि चालवून दाखवा ना! त्याला तात्यांनी मिसळपाव डॉट कॉम काढून उत्तर दिले. त्या सर्व जालसंजीवित आठवणींचा गुच्छच ह्या फोटोत दडलेला आहे. मात्र तात्या आज नाहीत. काल होते. आज नाहीत. तात्यांना ईश्वर सद्गती देवो.</p><div><br /></div>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-25902946974516990192022-04-01T07:47:00.005-07:002022-04-13T04:29:34.425-07:00रावणाची सोन्याची लंका<p> माझ्या लहानपणी अजून टीव्ही आला नव्हता, आमच्या घरी तर रेडिओसुद्धा नव्हता. त्या काळात इंटरनेट, फेसबुक, वॉट्सॅप अशासारख्या गोष्टींची कुणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. दिवेलगणी झाली की कंदिलाच्या मंद उजेडात घरातल्या सगळ्यांची जेवणे उरकून घेतली जायची, पण लगेच झोप येत नसे. अशा वेळी माझी आई घरातल्या मुलांना एकत्र गोळा करून रामायण, महाभारत, भागवत वगैरेंमधल्या सुरस गोष्टी छान रंगवून सांगत असे. आमच्यासाठी यातूनच मनोरंजन, ज्ञान आणि भारतीय संस्कृतीची ओळख होत होती.</p><p>लहान मुलांना मारुतीच्या कथा फार आवडत असत. त्याने एकदा कुठल्याशा पर्वताच्या माथ्यावरून उड्डाण केले आणि थेट लंका गाठली. तिथे एक अक्राळविक्राळ राक्षसीण आ वासून त्याला गिळायला उभी होती. मारुतीने तिच्या तोंडातून तिच्या शरीरात प्रवेश केला आणि एकदम सूक्ष्म रूप धारण करून तो हळूच तिच्या कानातून की नाकातून तिच्या नकळत बाहेरही पडला. मग आकाशातून लंकेभोवती घिरट्या घालतांना त्याला अशोकवाटिकेत एका झाडाखाली बसलेली सीतामाई दिसली. </p><p>मारुतीने तिला लगेच ओळखले आणि रामाने दिलेली खुणेची अंगठी दाखवून तिला आपली ओळख पटवून दिली. मारुती तर लगेचच सीतामाईला आपल्या खांद्यावर बसवून घेऊन रामाकडे न्यायला तयार होता, पण सीतेनेच त्याला नकार दिला आणि प्रभू श्रीरामांनी स्वतः तिथे यावे, रावणाला शिक्षा करावी आणि तिला सन्मानाने अयोध्येला घेऊन जावे असे सांगितले. एवढे मोठे उड्डाण करून आल्यामुळे मारुतीला जबरदस्त भूक लागली होती पण तिथे सीतामाई त्याला काय खायला देणार होती? तिने मारुतीला सांगितले की या बागेतल्या झाडांवर खूप फळे लागली आहेत, पण त्यांना स्पर्श न करता जेवढी फळे भूमीवर पडली असतील ती खाऊन त्याने आपली भूक भागवावी. मग मारुतीने तिथली सगळी झाडे गदगदा हलवली आणि त्यांच्यावरची फळे खाली पाडून त्यांचा यथेच्छ फराळ केला. </p><p>मारुतीने केलेला विध्वंस पाहून तिथले रक्षक धावून आले आणि त्यांनी मारुतीला दोरखंडांनी बांधून रावणाच्या दरबारात हजर केले. मारुतीलाही एकदा रावणाला पहायचे होतेच, म्हणून विशेष प्रतिकार न करता तो त्या रक्षकांच्या बरोबर दरबारात जाऊन दाखल झाला. तो श्रीरामाचा दूत आहे आणि महाबली आहे हे काही तिथल्या कुणाला ठाऊकही नव्हते. एक उद्दाम वानर बागेत शिरला आणि त्याने झाडांना नुकसान पोचवले एवढेच त्यांना कळले होते. त्याची चांगली खोड मोडावी म्हणून रावणाने असा हुकूम केला की त्याच्या शेपटीला आग लावा आणि मग तो कसा तडफडतो याची मजा पहा.</p><p>आता शेपटीला आग कशी लावणार ? असे म्हणून त्या सेवकांनी भरपूर चिंध्या गोळा करून त्यांना मारुतीच्या शेपटाला गुंडाळले आणि त्यावर भरपूर तेल ओतून आग लावली. आग चांगली भडकलेली बघताच मारुतीने आपली शेपूट उचलली आणि थेट रावणाच्या तोंडांवरून फिरवली. त्याच्या दहाही तोंडांवरील दाढ्यांनी पेट घेतला. तो अरे अरे अरे, त्याला आवरा असे म्हणेपर्यंत मारुतीने त्याला बांधलेले दोर तटतटा तोडून टाकले आणि उड्डाण घेऊन तो लंकेतल्या एका इमारतीवर जाऊन बसला. त्या इमारतीने पेट घेताच त्यांने दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या घराला आग लावण्याचा सपाटा चालवला आणि कंटाळा आल्यावर समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आपली शेपटी समुद्रात बुडवून विझवली.</p><p>रावणाची ही लंका सोन्याची होती असेही म्हणतात. आधी देवांचा खजिनदार कुबेर याने ती स्वतःसाठी बांधून घेतली होती, त्याच्याकडे सोन्याचा काही तुटवडा तर नव्हताच आणि त्या काळातला सर्वश्रेष्ठ अभियंता असलेल्या मयासुराने आपले सगळे कौशल्य वापरून तिची उभारणी केली होती. पुढे कुबेराचा सावत्र भाऊ असलेल्या रावणाने त्याला तिथून हुसकून लावले आणि आयत्या बिळात नागोबा होऊन ती सोन्याची लंका बळकावली. रावण हासुद्धा महापराक्रमी होता, तसेच विद्वानही होता. त्याने खडतर तपश्चर्या करून श्रीशंकराला प्रसन्न करून त्याच्याकडून अनेक वरदान घेतले होते. देवादिकांचा पराभव करून त्यांना आपल्या राजवाड्यात नोकर चाकर म्हणून ठेवले होते. एकंदरीत पाहता त्याची प्रजा सुखात रहात असावी असे दिसते. मारुतीने लावलेल्या आगीनंतरसुद्धा ती सोन्याची लंका वैभवसंपन्नच राहिली होती. श्रीरामाने रावणकुंभकर्णांचा वध करून ही लंका जिंकून घेतल्यानंतर त्याने असे उद्गार काढले आहेत, "अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥" ही लंका जरी सोन्याची असली तर मला तिच्यात स्वारस्य नाही, आपली मातृभूमी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. म्हणून श्रीरामाने बिभीषणाला लंकेचे राज्य देऊन टाकले आणि तो अयोध्येला परत गेला.</p><p>रामायणावर काढलेल्या एका मराठी चित्रपटात "रम्य ही स्वर्गाहुनि लंका । जिच्या कीर्तिचा सागरलहरी वाजविती डंका ।।" अशा शब्दांमध्ये प्रत्यक्ष रावणानेच लंकेचे सुरेख वर्णन केले आहे. अशा प्रकारे लहानपणापासूनच गोष्टी, महाकाव्ये, कविता, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमधून लंकेचे एक अद्भुत असे चित्र मनात तयार झाले होते. ती प्रत्यक्षात कशी निसर्गरम्य आहे याची प्रवासवर्णनेही मी वाचली होती. भारतातल्या लोकांना ती इतकी आकर्षक वाटते तर तिथले लोक तर तिच्यावर किती फिदा असतील? तिथल्या लोकांच्या रावणाबद्दल काय भावना असतील? तो त्यांचा कथानायक असेल का ? असे विचार मनात येत होते.</p><p>महिनाभरापूर्वी माझा एक गिर्यारोहक मित्र श्रीलंकेचा दौरा करून आला. हा मित्र इतर पर्यटकांप्रमाणे गाइडेड टूरमध्ये जाऊन आणि हॉटेलांमध्ये राहून तिकडचा भाग वरवर पाहून येत नाही. तो जिथे जातो त्या देशातल्या सर्वसामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून राहतो आणि पायी चालत चालत आपली गिरिशिखरांमधली भ्रमंति करतो. त्यामुळे त्याला आलेले अनुभव खूप खरे असतात आणि प्रसारमाध्यमांमध्ये छापून येणाऱ्या ठोकळेबाज लेखांपेक्षा वेगळे असतात.</p><p>तर त्याला असे दिसून आले की सर्वसामान्य सिंहली लोकांच्या संस्कृतीत रामायणाला काही स्थानच नाही. ते सगळे बौद्ध धर्मीय असल्यामुळे रामाची उपासना करतच नाहीत, तशी रावणाचीही करत नाहीत. तिकडे आजकाल 'रामायणा टूर' नावाची सहल काढली जाते, त्यात सगळे भारतीय पर्यटक येतात आणि भरपूर पैसे खर्च करतात. त्यामुळे सिंहली लोक त्याच्याकडे फक्त उत्पन्नाचे एक साधन म्हणूनच पाहतात. त्यांच्या मनातून राम, लक्ष्मण, रावण, कुंभकर्ण, बिभीषण वगैरेंबद्दल काहीच भावनांचे बंध नसतात. कोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्रावर गदा आल्यामुळे त्यांचे खूप आर्थिक नुकसन झाले आहे. तिथल्या सरकारच्या काही आर्थिक धोरणांचाही फटका तिथल्या अर्थव्यवस्थेला बसून त्राही त्राही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे विदारक चित्र भारतातल्या प्रसारमाध्यमांमध्ये रंगवले जात आहे. त्याबद्दल बोलतांनाही त्याने सांगितले की त्याला तरी सर्वसामान्य लोक तसे ठीक दिसले. तो जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याला खायलाप्यायला मिळत गेले. काही गोष्टींचा तुटवडा असला तरी तिथले लोक शिस्त पाळून रांगा लावून त्या गोष्टी मिळवत आहेत. अर्थातच इतिहासकाळातही ती कधीच सोन्याची लंका नव्हती आणि आताही नाही, पण दक्षिण आशियातल्या इतर देशांच्या माने तिची परिस्थिति फार बिकट आहे असे त्याला तरी शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागात दिसले नाही. कोरावर वाचलेल्या काही प्रतिक्रियाही तशाच दिसतात.</p><p>. . . </p><p>श्रीलंकेतल्या लोकांना रावणाविषयी काय वाटत असेल याची मला उत्सुकता होती, पण तो तर त्यांच्या खिजगणतीत नाहीच हे ऐकून थोडे आश्चर्य वाटले. पण भारतातले, त्यातही महाराष्ट्रातले काही विद्वान लोक रावणाचे भक्त आहेत हे समजल्यावर मात्र महदाश्चर्य वाटले. शरद तांदळे नावाच्या लेखकाने 'रावण राजा राक्षसांचा' या नावाची कादंबरी लिहिली आहे. साम्यवाद, समाजवाद वगैरेंच्या प्रसाराबरोबर साहित्यात बदल होत गेले. समाजातील उपेक्षित, वंचित, दलित, दीनदुबळे वगैरे लोकांवर उच्चभ्रू समाजाकडून कसे आणि किती अन्याय केले गेले याचे दारुण वर्णन करणारी पुस्तके हा मराठी साहित्याचा मोठा भाग झाला. ही एक तशीच कादंबरी दिसते. रावण हा असाच एक उपेक्षित बिचारा होता असा शोध या लेखकाने लावला आहे. कारण काय तर त्याची आई अनार्यकुळातली असल्यामुळे आर्यांनी त्याला आपल्यात घेतले नाही. बापानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आर्य आईच्या पोटी जन्माला आलेल्या त्याच्या सावत्र भावाला म्हणजे कुबेराला महत्व दिले. मग यामुळे दुखावलेल्या रावणाने प्रखर तपश्चर्या करून प्रचंड सामर्थ्य प्राप्त केले आणि कुबेराला लंकेमधून हुसकून लावून तो लंकाधीश झाला. त्याने तिथे आदर्श अशी राजवट स्थापन केली, तिला समृद्ध करून सोन्याने मढवली. प्रजाजनांना अत्यंत सुखात ठेवले. अर्थातच रावणाचे साथी असलेले सगळे राक्षस कसे सद्गुणाचे पुतळे होते आणि त्याच्यावर जुलूम करणारे आर्य कसे स्वार्थी, मतलबी, कपटी, दगाबाज होते याचे रसभरीत वर्णन या कादंबरीत केले आहे. रावणाचा भाऊ बिभीषणाने केलेल्या फितुरीमुळे त्याचा घात झाला तरीही त्याने आपल्या या दगलबाज भावाला शिक्षा केली नाही यावरून तो किती उदार आणि क्षमाशील होता हे दिसून येते वगैरे दाखवले आहे. हजारो वर्षांनंतर कुणीतरी रावणालाही महानायक ठरवले आहे. </p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-77526050887089167872022-02-14T03:51:00.004-08:002022-03-06T23:52:58.326-08:00मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गीय<p> </p><p>मराठी भाषेत या शब्दांचा प्रयोग कुणी आणि कधी सुरू केला हे मला माहीत नाही. पण लहानपणी आमच्या लहान गावात हे शब्द ऐकल्याचे मला आठवत नाही. पुण्यामुंबईला आल्यावर मात्र 'मध्यमवर्गीय' हा शिक्का माझ्या कपाळावर बसला आणि तो अजूनही कायम आहे अशी माझी समजूत आहे. पण आता एका माझ्यासारख्याच मध्यमवर्गीय मित्राने फेसबुकवर असे विधान केले आहे की हा वर्ग मोडीत निघाला आहे. मी गूगलवर शोधत असता मला एक ब्लॉग वाचायला मिळाला. त्यात त्या लेखकानेही असेच काहीसे सूतोवाच केले आहे.</p><p>पन्नाससाठ वर्षांपूर्वी मराठीतल्या कथा, कादंबऱ्या आणि सामजिक चित्रपटांमधले जे वातावरण दाखवले जात असे ते बहुधा मध्यमवर्गाचे असे. ते लोक एकदोन खोल्यांच्या लहान घरात रहायचे, कुठल्यातरी ऑफीसात (किंवा शाळेत) नोकरी करायचे, मुंबईत असले तर लोकलने आणि पुण्यात असले तर सायकलने नोकरीवर जायचे. त्यांना दोन वेळा पोटभर जेवण मिळत असे, पण ते जास्त चैन करू शकत नसत. खिशात पैसेच खुळखुळत नसल्यामुळे त्यांना साधेपणे राहणे क्रमप्राप्त होते. पण 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' यावर त्यांचा भर असायचा. त्यांना वाचनाचा दांडगा व्यासंग असायचा आणि सगळे जुने लेखक, कवी वगैरे माहीत असायचे. या वर्गाची काही परंपरागत मूल्ये होती, त्यांचे आदर्श होते. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट काटकसर. कुठलीही वस्तू वाया घालवायची नाहीच. तिचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा. काही झाले तरी कर्ज काढायचे नाही हे दुसरे तत्व. 'ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत' हे चार्वाकाचे सांगणे त्यांना मान्य नव्हते. आधी काटकसरीने वागून थोडी बचत करायची. थोडी रक्कम जमा झाल्यानंतर त्यातली थोडीच खर्च करून नवी वस्तू विकत आणायची अशा रीतीने ते लोक काडीकाडीने संसार उभा करत असत. या वर्गातले लोक प्रामाणिक आणि सरळमार्गी असायचे. बहुतेक लोकांची विचारसरणी मात्र थोडी पुरोगामी होती. ते आपल्याला समाजाचे काँन्शन्सकीपर समजत असत. त्यांच्याबद्दल समाजाला आदर वाटत असे.</p><p>प्राचीन काळातल्या भारतातली समाजरचना चातुर्वर्णावर आधारलेली असावी असे सांगितले जाते. पुढे त्याचे रूपांतर जातीभेदांमध्ये झाले. खेड्यांमध्ये एकेका जातीचे लोक शक्यतो एका भागात आणि एकमेकांसोबत रहात असत. युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर मोठा कामगारवर्ग तयार झाला. मजूरांचे शोषण करून मालकवर्ग अधिकाधिक श्रीमंत झाला आणि मजूर गरीबच राहिले. जे लोक मालकांसारखे खूप श्रीमंत नाहीत आणि कामगारांसारखे गरीबही नाहीत अशा लोकांना मिड्ल् क्लास म्हंटले गेले. मजूरांचे हातावर पोट असल्यामुळे त्यांना रिकामा वेळच नसे आणि श्रीमंत लोक ऐशोआराम करण्यात सगळा वेळ घालवत. त्यामुळे बहुतेक विचारवंत, साहित्यिक, कलाकार वगैरे लोक मध्यम वर्गात तयार झाले आणि त्यांनी समाजाचे मार्गदर्शन केले. </p><p>इंग्रजांच्या राज्यात भारतातसुद्धा सरकारी काम, रेल्वे, पोस्ट, बँका आणि खाजगी कंपन्या वगैरेमध्ये काम करणारा एक पगारी नोकरवर्ग तयार झाला, तो मुख्यतः शहरांमध्ये रहात होता. तिथे उत्पन्नावर आधारलेली नवी समाजरचना होत गेली. गिरणीत आणि कारखान्यांमध्ये कष्टाचे काम करणारे कामगार हा गरीब वर्ग आणि मालक किंवा व्यापारी, सावकार वगैरे श्रीमंत लोक सोडून उरलेल्या लोकांचा समावेश मध्यमवर्गात होत गेला. यातले बहुतेक लोक खेड्यातल्या एकत्र कुटुंबातून बाहेर पडून नोकरीच्या जागी वेगळे रहायला लागले आणि तिथे देशाच्या निरनिराळ्या भागातून आणि बँकग्राउंडमधून आलेले लोक एकमेकांच्या शेजारी रहायला लागल्यामुळे त्यांचा दृष्टीकोन रुंदावत गेला. इंग्रजी भाषेतल्या साहित्याच्या वाचनाचाही त्यांच्यावर परिणाम झाला. यातून इथला बहुतांश मध्यमवर्ग जरासा पुरोगामी विचारांचा झाला, पण त्यांनी लहानपणी झालेले संस्कारही जपून ठेवले. मी पन्नाससाठ वर्षांपूर्वी जेंव्हा शहरात रहायला आलो तेंव्हा मला अशी परिस्थिति दिसली. पुढे त्यात बदल होत गेले.</p><p>संघटित कामगारांनी एकजूट करून मालक आणि सरकारांवर दबाव आणला आणि ते आपल्या उत्पन्नांमध्ये वाढ करून घेत गेले. शिक्षणाचे प्रमाण वाढून त्यांच्या मुलांना अधिक चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत गेल्या. कुटुंबनियोजनावर भर दिला जाऊ लागला. मोठ्या प्रमाणात महिलावर्ग नोकरी करायला लागला. या सगळ्यांमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या उत्पन्नात भर पडत गेली. आधीच्या काळात एका माणसाच्या तुटपुंज्या पगारावर घरातली आठदहा माणसे अवलंबून असत, त्याऐवजी घरात दोघे कमावणारे आणि खाणारी फक्त तीनचार तोंडे असे झाल्यानंतर त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होत गेली. </p><p>वाढत्या महागाईमुळे खर्चाचा ताणही वाढत गेला असला तरीही या मध्यमवर्गीयांचे राहणीमान सुधारतच गेले. सायकलवरून जाणाऱ्यांच्या मुलांनी स्कूटर किंवा मोटारसायकली घेतल्या आणि स्कूटरवाल्यांनी चारचाकी मोटारगाड्या घेतल्या. चाळीत राहणारे लोक हाउसिंग सोसायट्यांमधल्या फ्लॅटमध्ये रहायला गेले, एक दोन खोल्यांमध्ये रहाणारे काही लोक तीनचार खोल्यांच्या प्रशस्त ब्लॉकमध्ये रहायला लागले. पण असे झाले तरी ते सगळे लोक मध्यमवर्गीयच राहिले कारण श्रीमंत उद्योगपतींची श्रीमंती जास्तच वेगाने वाढत गेली. शहरांची वाढ होत असतांना आजूबाजूच्या गावांमधील जमीनमालकांना अव्वाच्या सव्वा भाव मिळाला आणि त्यामधून नवश्रीमंतांचा एक नवा वर्ग उदयाला आला. सिनेकलाकार, खेळाडू, राजकारणी वगैरे वर्गामधलेही अनेक लोक एकदम श्रीमंत झाले. सरळमार्गी मध्यमवर्गाची सुबत्ता आटोक्यात राहिली.</p><p>लोकसंख्येत झालेली भरमसाट वाढ आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे खेड्यापाड्यांमधून शहरात येणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली. शालेय आणि कॉलेजचे शिक्षण घेतलेल्या मुलांना शेतातली किंवा रानावनातली कष्टाची कामे करायची नव्हती. शेतीचेही यांत्रिकीकरण होत गेल्यामुळे शेतमजूरांना वर्षभर पुरेसे काम उरले नाही. त्यामुळे ती मुले ऑफिसमध्ये काम करण्यासाठी मोठ्या गावांमध्ये किंवा शहरात आली. त्यातल्या बऱ्याचशा लोकांची भर मध्यमवर्गामध्ये पडत गेली. वर लिहिल्याप्रमाणे शहरांमधल्या काही गरीब लोकांची आर्थिक परिस्थिति सुधारली आणि त्यांचीही भर मध्यमवर्गामध्ये पडली, पण ज्यांना ते जमले नाही, त्यांची परिस्थिती मात्र अधिकच वाईट झाली. चाळीतही जागा न मिळाल्यामुळे कित्येक लोक रस्त्यावर आले, झोपडपट्ट्यांची अमर्याद वाढ झाली. थोडक्यात सांगायचे झाल्यास अतिश्रीमंत आणि अत्यंत गरीब यांच्यामधील विषमतेची दरी वाढत गेली. देशाची एकंदर लोकसंख्याच वाढत जाऊन तिप्पटचौपट झाली. पण त्यातले मध्यमवर्गीयांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत गेले. </p><p>माझ्या पहाण्यात म्हणजे गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये देशातल्या सगळ्याच समाजांमध्ये खूप बदल झाले. त्यात मध्यमवर्गीयांमधले बदल जरा जास्तच प्रमाणात झाले असावेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजा म्हंटल्या तर या तीनही बाबतीत माझ्या लहानपणी मी जसे जेवण करत होतो, जसे कपडे घालत होतो आणि जशा घरात रहात होतो त्यातले काहीच आज मी तशा पद्धतीने करत नाही, तरीही मी मध्यमवर्गीयच आहे कारण इतर माझ्या संपर्कातल्या सगळ्या इतर लोकांचीही राहणी तशीच बदलली आहे.</p><p>या काळात तंत्रज्ञानात झालेला बदल लक्षणीय आहे. आम्ही शेणाने जमीन सारवलेल्या मातीच्या घरात रहात होतो आणि जमीनीवरच फतकल मारून बसत होतो. फक्त जेवायच्या वेळी बसायला पाट घेत होतो आणि कोणी पाहुणा आला तर त्याला बसायला चटई किंवा जाजम अंथरत होतो. घरातला सगळा स्वयंपाक चुलीवर होत असे आणि त्यात लाकडे जाळून अग्नि पेटवला जात असे. स्वयंपाकघरात एकही यंत्र नव्हते आणि ते चालवण्यासाठी घरात वीजही नव्हती. आता हे सगळे चित्र पार बदलले आहे. घरांच्या भिंती सिमेंटकाँक्रीटच्या आणि जमीनीवर गुळगुळित लाद्या असतात, घरोघरी बसायला खुर्च्या, सोफा किंवा पलंग असतात आणि स्वयंपाकघरात गॅसची शेगडी आणि विजेवर चालणारे मिक्सर, फूड प्रोसेसर, ओव्हन वगैरे अनेक साधने असतात. त्यावर केले जाणारे खाद्यपदार्थही बदलले आहेत. आता परंपरागत मराठी खाद्य प्रकार कमी झाले आहेत आणि गुजराथी, पंजाबी, मद्रासी, चिनी, इटालियन, मेक्सिकन वगैरेंची भर पडली आहे. पू्वी फक्त धान्ये, भाज्या, फळे वगैरे शेतात पिकणारा कच्चा माल तेवढाच बाहेरून घरी येत असे. आता निरनिराळ्या प्रकारचे सरळ तोंडात टाकायचे तयार पदार्थ किंवा पटकन तयार करता येण्याजोगे सेमिकुक्ड पदार्थ आकर्षक आवरणातून आणले जात असतात आणि त्यांचा अन्नात समावेश होतो.</p><p>संगणक क्रांतीमुळे गेल्या वीस पंचवीस वर्षात प्रचंड ढवळाढवळ झाली आहे. पूर्वी अस्तित्वातच नसलेल्या असंख्य नव्या नोकऱ्या तयार झाल्या आणि त्यात काम करण्यासाठी वेगळ्या प्रकारची कौशल्ये शिकून घ्यावी लागली. मध्यम वर्गातल्या पुढल्या पिढ्यांमधल्या मुलामुलींनी हे आव्हान यशस्वी रीतीने पेलले. या लोकांतल्या बहुतेक जणांना कामानिमित्याने परदेशी जावे लागत होते. या काळात विमानवाहतूक स्वस्त आणि सोयिस्कर होत गेली. त्यामुळे परदेशी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या खूप वाढली. माझ्या संपूर्ण शालेय जीवनात माझ्या गावातून एकही माणूस परदेशी गेला नव्हता. वीस पंचवीस वर्षांपूर्वी परदेशी जाऊन आलेल्या आणि नंतर पुण्यात स्थायिक झालेल्या एका माणसाचे केवढे कौतुक होत होते. आता माझ्या पिढीतले बहुतेक सगळे लोक ते गाव सोडून शहरांमध्ये गेले आहेत, पण त्यातल्या निम्म्याहून जास्त लोकांची मुले परदेशभ्रमण करून परत आली आहेत किंवा तिकडेच रहात आहेत. पाश्चिमात्य जगाशी होत असलेल्या या वाढत्या संपर्कातून होणाऱ्या देवाणघेवाणीमुळेही आमची जीवनशैली पार बदलली आहे.</p><p>आधीच्या पिढीमध्ये देवधर्म, पूजापाठ, व्रतेवैकल्ये, नवससायास, भजन कीर्तन, नामस्मरण, तीर्थयात्रा वगैरेंना खूप जास्त महत्व असायचे. त्यांचे जीवनच एका प्रकारे त्याभोवती गुंफलेले असायचे. आमच्या पिढीपासून त्यांचे महत्व कमी होत गेले. आता वाहतुकीच्या साधनांमध्ये भरपूर सुधारणा झाल्यामुळे तीर्थयात्रा करणे सुलभ झाले आहे आणि ते तुलनेने कदाचित वाढलेही असेल, पण मनातला भक्तीभाव कमी आणि पर्यटनाची हौस जास्त असे त्याचे स्वरूप झाले आहे. </p><p>संगणकक्रांति आणि तिच्या पाठोपाठ आलेली मोबाईल क्रांति यांच्यामुळे आता मध्यमवर्गातल्या मुलांचे पुस्तकांचे वाचन मात्र फार कमी झाले आहे. कुठलीही माहिती क्षणार्धात बसल्या जागी मिळायची सोय झाल्यामुळे व्यासंग नावाची वृत्तीच नामशेष झाली असावी असे वाटते. काही पूर्वीच्या व्यासंगी लोकांना आम्ही पाहिले आहे किंवा त्यांच्याबद्दल ऐकले तरी आहे. पुढच्या पिढ्यामधल्या लोकांना ते साांगितले तरी त्यांना ते समजतही नाही किंवा त्याचे फारसे महत्व वाटत नाही.</p><p>आर्थिक दृष्ट्या जे फार गडगंज श्रीमंतही नाहीत आणि अगदी भुकेकंगालही नाहीत अशा मध्यमवर्गाची संख्या आता अमाप फुगली आहे आणि त्यांच्यातल्याच कमी किंवा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांमधली दरीही खूप वाढली आहे. पण एक ठराविक पारंपारिक संस्कृति जगणाऱ्या आणि जपणाऱ्या जुन्या काळातल्या मध्यमवर्गाची मात्र झपाट्याने पीछेहाट झाली आहे किंवा तो लयाला गेला आहे असेही म्हणता येईल. </p><p>. . . </p><p>नवी भर दि. ०७-०३-२०२२</p><p><br /></p><p>गेल्या काही दशकांमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या काही पटींने वाढली आहे आणि या वर्गातच निरनिराळे स्तर निर्माण झाले असून त्यांच्यातली विषमता वाढली आहे असे मी या पानावर काही दिवसांपूर्वी लिहिले होते. त्याचे एक उदाहरण आता पुढे आले आहे. युक्रेन या देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूपपणे परत मायदेशी आणणे चालले आहे. ही बहुतेक सगळी मुले सधन मध्यमवर्गीयातली असावीत असे दिसते. अतीश्रीमंत मुलांना शिक्षणाची गरज नसते आणि ते हौसेसाठी जगातल्या कुठल्याही प्रगत देशात जाऊन त्यांना हवे ते शिक्षण घेत असतात. श्रीमंत वर्गातल्या मुलांना डॉक्टर व्हायचे असेल तर ते देशातल्या महागड्या खाजगी मेडिकल कॉलेजांची फी भरू शकतात. युक्रेनसारख्या देशात जाऊन ४०-५० लाख रुपये खर्च करणे गरीबांना परवडण्यासारखे नसतेच. त्यामुळे सधन मध्यम वर्गातले लोकच असा प्रयत्न करू शकत असणार. युद्धपरिस्थिती जिवावरच बेतल्यामुळे ती मुले आपला जीव वाचवून कशीबशी घरी परतत असली तरी पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर दीर्घकाळ रहाणार आहे. </p><p>सध्या कित्येक लाख भारतीय विद्यार्थी जगातल्या निरनिराळ्या देशांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यातले बहुतेक जण या सधन मध्यमवर्गातलेच असणार. त्यांच्या मनातही चलबिचल चालली असेल, असुरक्षिततेची भावना असेल, पण ते इकडे परत येऊन तरी काय करणार?</p><p><br /></p><p><br /></p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-82234945857099974012022-01-21T06:34:00.007-08:002022-01-21T06:34:55.131-08:00भागवत पुराण<p> </p><p>माझ्या लहानपणी घरातल्या मोठ्या लोकांचे जे बोलणे माझ्या कानावर पडले असेल त्यावरून माझी अशी समजूत झाली होती की भागवत हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा धर्मग्रंथ आहे. तसे पाहता वेद म्हणजे सगळ्या ज्ञानाचे भांडार, पण ते समुद्रासारखे महाविशाल असल्यामुळे पोथी किंवा पुस्तकांमध्ये मावणारे नव्हते असे मला सांगितले गेले होते. रामायण आणि महाभारत ही तर महाकाव्ये; रामलक्ष्मण आणि पांडवकौरव यांची चरित्रे त्यात दिली आहेत असे समजले. म्हणून भागवत जास्त महत्वाचे असे मला वाटत होते आणि ते अगदीच चुकीचे नसावे. "गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे।" असे संतांचे वर्णन असलेला तुकाराम महाराजांचा अभंग मी ऐकला होता. त्यामुळे भागवतही गीतेसारखेच तत्वज्ञानाने भरलेले असावे असे मला वाटत होते. ते एक पुराण आहे हेही मला ठाऊक नव्हते आणि खरे तर "पुराणातली वांगी" हा वाक्प्रचारच तेवढा मला माहीत होता. पुराणांमध्ये त्या वांग्यांशिवाय आणखी काय काय भरलेले असते ते पण मला माहीत नव्हते. भागवत हा वैष्णव संप्रदायाचा धर्मग्रंथ आहे एवढी आणखी जास्तीची माहिती मला नंतरच्या पन्नास वर्षांमध्ये मिळाली.</p><p>मी लहानपणीच भागवताचे नाव अनेक वेळा ऐकले होते, पण आमच्या घरी ती पोथी नव्हती. गावात कुणाकडे तरी ती होती आणि अधूनमधून तिची सार्वजनिक पारायणे केली जात असत. त्याला 'भागवताचा सप्ता' म्हणत असत. माझी आई भक्तीभावाने तिथे जाऊन त्या पोथीला आणि ती वाचणाऱ्याला नमस्कार करून आणि प्रसाद घेऊन येत असे, पण तिने मला कधी तिच्याबरोबर नेले नाही. तिथे गेल्यावर मी उनाडपणा करून काही विघ्न किंवा लाज आणेन असे कदाचित तिला वाटले असेल, त्यामुळे मला लहानपणी कधी त्या पोथीचे दर्शन झाले नाही किंवा भागवतातला एक शब्दही माझ्या कानावर पडला नाही. </p><p>मोठा होत असतांना भागवत हे नाव अनेक वेळा माझ्या कानावर आले. आमच्या कॉलेजमध्ये भागवत आडनावाचा एक मुलगा होता आणि याच आडनावाचा दुसरा एक मुलगा आमच्या ऑफीसमध्ये नोकरीला लागला होता आणि रिटायर होईपर्यंत टिकून होता. भागवत हे पहिले नाव असलेला एक दक्षिण भारतीय मुलगाही मला माहीत होता. आमच्या वसाहतीत माझ्या ओळखीची भागवत नावाची तीन कुटुंबे रहात होती. याशिवाय भा.रा.भागवत, दुर्गा भागवत, वीणा भागवत, नीला भागवत, लीना भागवत, मोहन भागवत वगैरे अनेक व्यक्ती प्रसिद्ध आहेत. पण या सर्वांचा भागवत या ग्रंथाशी काही संबंध बहुधा नसावा. पूर्वी भागवत हे नाव भगवंताची भक्ती करण्यावरून पडले असेल.</p><p>माझी फारशी धार्मिक किंवा आध्यात्मिक वृत्ती नाही. त्यामुळे मला भागवताबद्दल कुतूहल वाटत असले तरी तो ग्रंथ हातात घेऊन वाचण्याचा प्रयत्नही मी कधी केला नाही. अलीकडे यू ट्यूब नावाच्या क्रांतिकारक सोयीमुळे काहीही कष्ट न घेता हातातल्या मोबाईलवर वाटेल त्या विषयावरील व्याख्याने घरबसल्या आणि फुकट ऐकायची संधी उपलब्ध झाली आहे. तिचा लाभ घेऊन मी अधून मधून भागवतावरील व्याख्याने ऐकायचा प्रयत्न करायला लागलो आहे. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEj6MLPIilX1guEXuCMs0RZeKasK0HIFKX4HMW32mUvZ2uxiajYAQ54srYiiNJCUaLF0npjABk-bohn8QLfM3OmDrEBOU50cp2UWbQt2r_031Zc5Upx2H9W17kmK266W8a0fRWTv_R1Q8SXaR8jgI0HHUeQaE88BYHYp5MecR-AUdZyYzNsmdSs=s480" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="360" data-original-width="480" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEj6MLPIilX1guEXuCMs0RZeKasK0HIFKX4HMW32mUvZ2uxiajYAQ54srYiiNJCUaLF0npjABk-bohn8QLfM3OmDrEBOU50cp2UWbQt2r_031Zc5Upx2H9W17kmK266W8a0fRWTv_R1Q8SXaR8jgI0HHUeQaE88BYHYp5MecR-AUdZyYzNsmdSs=w400-h300" width="400" /></a></div><br /><p><br /></p><p>माझ्या आईने सांगितलेली भागवताची सुरस कथा मात्र अजूनही माझ्या लक्षात राहिली आहे. पांडवांनी जेंव्हा संसारातून निवृत्त व्हायचे ठरवले तेंव्हा अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षित हा त्यांच्या कुळातला एकमेव वारस होता. पांडवांनी त्याचा राज्याभिषेक करून आपल्या साम्राज्याचा सगळा राज्यकारभार त्याच्यावर सोपवला आणि ते पायी चालत हिमालयात निघून गेले. परीक्षित हा पराक्रमी तसेच पुण्यशील राजा होता. त्याने आपल्या राज्याचा विस्तारही केला आणि सगळ्या प्रजेची आपल्या मुलासारखी चांगली काळजी घेतली. पण त्याच्या कारकीर्दीतच द्वापार युग संपून कलियुग सुरू झाले. कलीने गुप्तपणे त्याच्या राज्यात प्रवेश करून तो थेट राजाच्या मुकुटात जाऊन बसला. एकदा राजा परीक्षित शिकार करायला गेलेला असतांना तहान लागली म्हणून रानातल्या एका ऋषीच्या आश्रमात गेला. त्यावेळी ते ऋषि ध्यानस्थ होऊन बसले होते, त्यामुळे त्यांना राजा तिथे आल्याचे समजलेही नाही आणि त्याने राजाकडे लक्ष दिले नाही. मुकुटातल्या कलीने ही संधी साधून राजाच्या बुद्धीवर परिणाम केला. त्यामुळे तो सारासार विवेक विसरला. त्या वेळी या ऋषीने आपला अपमान केला आहे असे वाटून राजा परीक्षित संतापला आणि त्याने रागाच्या भरात एक मेलेला साप त्या ऋषीच्या गळ्यात अडकवला. </p><p>घरी येऊन डोक्यावरला मुकुट काढताच राजा भानावर आला आणि त्याने केलेल्या कर्माचा त्याला पश्चात्ताप झाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. राजा गेल्यावर लगेच त्या ऋषीचा मुलगा असलेला दुसरा ऋषी घरी आला आणि आपल्या वडिलांच्या गळ्यातला मेलेला साप पाहून तो त्या राजानेच ठेवला आहे हे त्याला अंतर्ज्ञानाने समजले. त्यामुळे त्यालाही खूप राग आला आणि त्याने परीक्षिताला असा शाप दिला की सातव्या दिवशी सर्पांचा राजा तक्षक याच्या दंशाने परीक्षिताचा मृत्यू होईल. ही बातमीही लगेच परीक्षिताला समजली. त्या काळात कुणाचाही शाप खरा ठरणारच असे होते. त्यामुळे आपले उरलेले सात दिवस परमेश्वराच्या भक्तीत घालवायचे असे त्या राजाने ठरवले आणि तो तीर्थक्षेत्राला गेला. त्याच वेळी व्यासमहर्षींचे सुपुत्र शुकदेव तिथे प्रगट झाले आणि पुढील सात दिवस त्यांनी परीक्षिताला श्रीमद्भागवतपुराण सांगितले अशी या ग्रंथाची जन्मकथा आहे. </p><p>मी लहानपणी असेही ऐकले होते की तक्षकाला आपल्या राज्यात प्रवेशच करू द्यायचा नाही असा कडक बंदोबस्त राज्याच्या पहारेकऱ्यांनी केला होता. पण तक्षकाने सूक्ष्म अळीचे रूप घेतले आणि तो राजाकडे नेल्या जात असलेल्या फळांच्या टोपलीतल्या एका बोरात शिरून राजापाशी गेला आणि भागवताचे सुरस पारायण ऐकत बसला. ते संपल्यानंतर तो बोरातून बाहेर पडला आणि त्याने परीक्षिताला दंश केला. या गोष्टीमुळे मला किडक्या बोरांची खूप भीती वाटत होती. </p><p>अठरा पुराणांमध्ये भागवत हे अव्वल क्रमांकाचे समजले जाते. प्रत्येकी अनेक अध्याय असलेल्या बारा स्कंधांमध्ये मिळून अठरा हजार श्लोक या ग्रंथात आहेत. शुकदेवांनी हे पुराण परीक्षित राजाला सात दिवस सांगितले होते. भागवताचे सप्तेही सलग सात दिवस चालत असत. दोन निरनिराळ्या विद्वानांनी भागवतावर हिंदीत दिलेली पन्नास साठ प्रवचने यू ट्यूबवर उपलब्ध आहेत, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी मराठीत दिलेली प्रवचनेही आहेत. ही सगळी प्रवचने प्रत्येकी एक ते तीन तासांची असावीत. इतका वेळ सलगपणे लक्ष देऊन ती ऐकण्यासाठी मनात खरोखरच भक्तीभाव असणे गरजेचे आहे. माझ्या मनात तो उत्पन्न न झाल्यामुळे मला थोड्या वेळातच कंटाळा येतो किंवा झोप लागून जाते. त्यामुळे मी तुटक तुटक असे काही भाग पहात आहे. पण त्यावरून मला एक सर्वसाधारण अंदाज आला.</p><p>व्यासांनी रचलेले हे भागवतपुराण शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितले, पण तो तर मरून जाणार होता मग त्यानंतर ते लोकांना कसे कळणार ? म्हणून शुकदेवांनी त्याच्या आणखी काही शिष्यांनाही ऐकायला बसवले. त्यातल्या सूत मुनींनी ते पुढे शौनकादिक मुनींना सांगितले आणि त्यानंतरही अनेक जणांनी इतर अनेकजणांना सांगितले. त्यातला प्रत्येक अध्याय "अमुक उवाच" असे म्हणून तिसऱ्याच कुणीतरी आणखी कुणाला तरी सांगितलेला आहे. हे संपूर्ण पुराण अमूक तमूक ऋषींनी अमूकतमूक मुनीला किंवा राजाला असे असे सांगितले, त्या श्रवण करणाऱ्याने अनेक प्रश्न विचारले आणि सांगणाऱ्याने त्यांची समर्पक उत्तरे दिली अशा संवादात्मक पद्धतीने रचलेले आहे. त्यात अनेक कथानके आणि उपकथानके आहेत, अनेक लोकांनी भगवंताची केलेली अपरंपार स्तुति आणि प्रार्थना आहेत. आत्मा, परमात्मा, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, इहलोक, परलोक यांच्याविषयीचे तत्वज्ञान आहे, भक्तीमार्गाची महती सांगितली आहे, माणसाने आपल्या सगळ्या इंद्रियांवर ताबा ठेवावा, अहंकार सोडून द्यावा आणि परमेश्वराला बिनशर्त शरण जावे वगैरे उपदेश आहे. तसेच या विश्वाची निर्मिती व रचना याबद्दल अनेक अचाट अशी विधाने आहेत, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवापासून त्याने निर्माण केलेले अनेक ऋषी आणि प्रजापती वगैरेंच्या वाढत गेलेल्या वंशांच्या लांबलचक वंशावळी दिल्या आहेत.</p><p>भागवतपुराण हे मुख्यत्वे भगवान विष्णूने घेतलेल्या दशावतारांच्या कथांसंबंधी आहे. त्यात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह वगैरे अवतारांच्या समग्र कथा तर आहेतच, सगळे रामायण आणि बरेचसे महाभारतही संक्षिप्त स्वरूपात येते. श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्याचे गोकुळातले बालपण, रुक्मिणीस्वयंवर, अनेक असुरांचा नाश, द्वारकेला प्रयाण, पांडवांना दिलेली साथ आणि अखेर यादवांचा नाश या सर्वांचे रसभरित वर्णन आहे. त्याशिवाय प्राचीन भारतातल्या सूर्यवंश, चंद्रवंश आणि त्यांच्यामधून निघालेले कुरुवंश, यदुवंश यासारख्या प्रसिद्ध वंशांमध्ये होऊन गेलेल्या इतर कित्येक राजांच्या कथा त्यात येतात. ध्रुव, प्रह्लाद, दुष्यंत शकुंतला, ययाति देवयानी शर्मिष्ठा, सगर भगिरथ, हरिश्चंद्र तारामती यासारख्या मी ऐकलेल्या बहुतेक सगळ्याच पौराणिक कथा मुळात भागवतातून आल्या आहेत हे मला माहीत नव्हते. आपल्या माहितीत क्वचित एकादा शतायुषी माणूस असतो, पण पुराणकाळातली पात्रे अपार दीर्घायुषी होती. सगळे देव तर अमृत पिऊन अजरामर झालेले असतातच, पण भागवतातले बहुतेक ऋषी आणि अनेक दानवसुद्धा हजारो वर्षे तपश्चर्या करून अद्भुत असे वर मिळवतात आणि काही सम्राट हजारो वर्षे पूर्ण पृथ्वीवर राज्य करतात, शिवाय ते देवांच्या ताब्यातले स्वर्ग आणि असुरांकडले पाताळ हे प्रदेशही जिंकून घेतात. सर्वात खाली सात पाताळे, मध्ये जमीन, वरती आकाशात सात स्वर्ग, चोवीस नरक, यक्ष आणि गंधर्वांचे लोक, शिवाय ब्रह्मा, विष्णू व शंकराची निरनिराळी निवासस्थाने असे हे भागवतात सांगितलेले विखुरलेले विश्व आहे. प्रत्येकी लक्षावधी वर्षे असलेली चार युगे एकानंतर एक अशी पुन्हापुन्हा अनेक वेळा येत असतात, त्यातून अनेक कल्प आणि मन्वंतरे होत असतात वगैरे वगैरे भागवतात लिहिले आहे. भाविक लोक तिला 'शास्त्रीय माहिती' मानतात. भागवतात सगळी सविस्तर माहिती दिलेली असतांना हे (मूर्ख) शास्त्रज्ञ लोक अब्जावधी डॉलर खर्च करून आकाशात दुर्बिणी कशाला पाठवतात ? असे एका भाविकाने मला विचारले होते.</p><p>काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू म्हणजे माणसाचे सहा शत्रू आहेत असे मला लहानपणीच शिकवले गेले होते. त्यावेळी 'काम' या शब्दाचा अभिप्रेत अर्थ मला माहीत नसल्यामुळे सांगितलेले काम करायचे टाळण्यासाठी हे एक बरे कारण मिळाले होते. "विषय सर्वथा नावडो" या श्लोकाबद्दलही असाच गोंधळ होता. या षड्रिपूंबद्दल बहुतेक सुशिक्षित लोकांनाही लहानपणीच शिकवले गेले असेल. खरे तर या सगळ्या नैसर्गिक मानवी भावना आहेत आणि वेळोवेळी सगळ्यांच्याच मनात त्या उठत असतात, पण सुजाण लोक प्रयत्नाने आपले मन ताब्यात ठेवत असतात. जर या सहा शत्रूंच्या प्रभावाखाली माणसाचा संयम सुटला किंवा त्याचा तोल गेला तर त्याच्याकडून चुका किंवा वाईट कृत्ये घडू शकतात. हे आपण नेहमीच अनुभवतो. कधी त्याचे गंभीर परिणाम होतात, कुणाकुणाला त्यासाठी शिक्षाही मिळते, तर कधी ''माणूस आहे, तेंव्हा चुका होणारच'' असे म्हणून कुणाला सोडून दिले जाते. हे सगळे दुर्गुण फक्त माणसांमध्येच असतात आणि तेही या कलियुगात आले आहेत असेही भाविकांचे सांगणे असते. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगातली सगळी माणसे जणू काही पूर्णपणे सात्विक आणि सद्वर्तनीच होती !</p><p>भागवतातली अनेक पात्रे देव, यक्ष, गंधर्व किंवा ऋषीमुनी वगैरे उच्च श्रेणीतली मंडळी आहेत आणि ती निरनिराळ्या युगांमधली आहेत. पण त्यातल्या बहुतेक कथांमध्ये हे दुर्गुण त्यांच्यातही दिसतात. कुणाचा तरी क्रोध अनिवार होऊन तो सरळ दुसऱ्यावर शस्त्र चालवतो किंवा त्याला भयंकर असा शाप देतो अशीच गोष्ट बऱ्याचशा कथांमध्ये आहे. भगवान परशुराम आणि जमदग्नि, दुर्वास यासारखे ऋषी तर कोपिष्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. याशिवाय कधी कुणाला लोभ सुटतो, मोह होतो, माज चढतो, असूया वाटते, कामवासना प्रबळ होते अशा गोष्टीही आहेत. देवांचा राजा इंद्र यालाच यातल्या सगळ्या बाधा होतात असे निरनिराळ्या कथांमध्ये दाखवले आहे. कामवासना हा विषय आपण अश्लील मानतो, त्याबद्दल उघडपणे बोलत नाही. पण हरेकृष्ण संप्रदायातल्या स्वामींनी हिंदीमध्ये दिलेल्या प्रवचनांमध्ये या विषयाशी संबंधित असलेल्या कथा इतक्या रंगवून सांगितल्या आहेत की त्यांना सेन्सॉरकडून ए सर्टिफिकेट मिळावे. कदाचित म्हणूनच लहानपणी माझ्या आईने मला भागवत पुराण ऐकू दिले नसेल असेही वाटते. यामुळे मला असा प्रश्न पडतो की देवांना हे सगळे मानवी विकार कसे असतील? ऋषीमुनींना आपल्या क्रोधावर किंवा मनावर ताबा ठेवता येत नसेल का ? मग सामान्य माणूस आणि हे ऋषीमुनी किंवा देव यांच्यात काय फरक राहिला ? "देवदानवा नरे निर्मिले हे मत लोका कवळू द्या।" हे केशवसुतांचे वचन आठवते.</p><p>प्रभू रामचंद्रांचा अपवाद वगळला तर पुराणकाळात एकपत्नीव्रत रूढ नसावे. भागवतातल्या बहुतेक सगळ्या राजांनाच नव्हे तर ऋषीमुनींनाही अनेक पत्नी असायच्या. शिवाय त्यांचा अप्सरांशी संबंध असायचा आणि दुसऱ्यांच्या बायकांवरही डोळा असायचा असे या पुराणातल्या काही गोष्टींमध्ये आहे. काही काही पात्रांनी तर घाऊकमध्ये वीसपंचवीसपासून शेदोनशे किंवा हजारो मुलींशी लग्ने केली आहेत आणि शेकडो किंवा हजारो मुलामुलींना जन्म दिले आहेत. सगर राजाला साठ हजार मुलगे होते आणि एका उग्र ऋषीच्या नुसत्या कटाक्षाने ते सगळे एकदम भस्मसात झाले. पुढे भगीरथाने आणलेल्या गंगेच्या ओघाने ते सगळे पुन्हा जीवंत झाले आणि स्वेच्छेने स्वर्गात गेले. कश्यप ऋषींनी निरनिराळ्या पत्नींपासून राक्षस, पशू, पक्षी, साप, कीटक वगैरे प्रजा निर्माण केली म्हणे. भागवतात अशा अनेक अद्भुत कथा आहेत. त्या सगळ्या रूपककथा आहेत असे मानले तरी एकेकाला अनेक पत्नी आणि ढीगभर संतती अशी पुरुषप्रधान विचारसरणी त्यातून दिसते. </p><p>अलीकडे मी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांची काही प्रवचने ऐकली. त्यांनी मात्र कामुकतेच्या अश्लील कथा सांगितल्याच नाहीत. त्यांच्या प्रवचनांमध्ये भागवतपुराणातल्या कथानकांपेक्षा प्रखर राष्ट्रभक्ती, महान प्राचीन संस्कृती, महान विचार, महान परंपरा, आजकाल त्यात येत असलेल्या विकृती, लोकांची बिघडत असलेली जीवनशैली, ढासळत असलेली नीतीमत्ता वगैरेंवरील उपदेशपूर्ण बौद्धिकांवरच जास्त भर होता. पण त्यांनी सौम्य करून सांगितलेल्या कथांमधल्या पात्रांमध्येही हे सहाही अवगुण दिसतातच.</p><p>निर्गुण, निराकार असा एकच परमेश्वर अणूरेणूंमध्ये भरलेला आहे असे अनेक विद्वान सांगतात आणि त्यासाठी उपनिषदांपासून आदि शंकराचार्यांपर्यंत अनेकांच्या वचनांचे दाखले देतात. पण सामान्य माणसांना उपासना करायला सोयीचे जावे म्हणून त्याने अनेक सगुण रूपे घेतली आहेत. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही कामे करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि शिव अशी त्रिमूर्ती करून कामांची वाटणी केली आहे वगैरेही सांगितले जाते. पण भागवतामधल्या कथांमध्ये हे तीघेही आपापल्या कामाशिवाय इतरांची कामेही करतांना दिसतात. ब्रह्मदेव आणि शंकर भगवान तपश्चर्या करणाऱ्या दानवांना वरदान देतात आणि भगवान विष्णू अवतार घेऊन त्यांचा संहार करतात. </p><p>चंद्र, सूर्य, पृथ्वी, गुरु, शुक्र हे अवकाशात फिरणारे एकाच सूर्यमालिकेतले निर्जीव गोल आहेत हे आता विज्ञानामधून निर्विवादपणे सिद्ध झालेले आहे. ध्रुव, सप्तर्षी, रोहिणी नक्षत्र वगैरे अंतराळात खूप दूरवर असलेले तारे आहेत हेसुद्धा सर्वांना माहीत आहे. पण भागवतामधल्या कथांमध्ये ही सगळी माणसासारखी वागणारी पात्रे आहेत. ते बोलतात, रुसतात, रागावतात, भांडतात, कृती करतात. त्यांना स्वभाव आणि चरित्रे दिली आहेत. हे ग्रह तारेच नव्हे तर समुद्र, वारा आणि पाऊस वगैरेसुद्धा मनुष्यरूपात वावरतात, लग्ने करतात आणि मुलांना जन्म देतात. अर्थातच या सगळ्या रूपककथा किंवा बोधकथा असणार. पण हे सगळे खरोखर अगदी असेच घडून गेले आहे. व्यासमहर्षी किंवा शुकदेवमुनी काल्पनिक खोटे कशाला सांगतील ? असा वाद घालणारे लोक आपल्यामध्ये आहेत. </p><p>या अद्भुत कथा सोडल्या तर मला जसे लहानपणापासून वाटत आले होते त्याप्रमाणे भागवतामधला बराच मोठा भाग धर्मशास्त्रांवर आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला होता तशाच प्रकारचा उपदेश भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला केला आहे. त्यात ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग आहेत, चातुर्वण्यातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्तव्ये, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास या चार आश्रमात माणसांनी काय करावे हे सांगितले आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांबद्दल सांगितले आहे, सत्व, रज आणि तमोगुण यांचे विवेचन केले आहे. सर्व विश्व व्यापून राहिलेल्या परमेश्वराचे वर्णन आहे. याशिवाय अनेक ऋषिमुनी, राजेमहाराजे, देव, दानव, गंधर्व वगैरेंच्यामधल्या निरनिराळ्या संवादांमधून हिंदू धर्माची सगळी मूलतत्वे पुन्हापुन्हा सांगितली गेली आहेत. म्हणून त्याला धार्मिक ग्रंथ म्हंटले जात असावे. हजारो वर्षांपूर्वी कुणी कुणी कुणाकुणाला तोंडी सांगितलेले अठरा हजार श्लोक रचायला त्यांना किती काळ लागला असेल, ते कुणीकुणी आणि कशावर लिहून ठेवले, त्याच्या पुन्हा पुन्हा अचूक प्रती काढून त्या जपून ठेवल्या आणि काळाच्या ओघात तसेच विध्वंसक आक्रमकांपासून त्या इतकी वर्षे टिकून कशा राहिल्या असतील या सगळ्याचेच मला आश्चर्य वाटते. </p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20484515.post-25883274041036822402021-12-08T05:34:00.003-08:002021-12-09T07:53:59.688-08:00शाकाहार आणि मांसाहार<p> शाकाहार मांसाहार</p><p>माणसाने शाकाहार करावा की मांसाहार करावा ? आपल्याकडे या विषयावर अधूनमधून चर्चा, वादविवाद वगैरे होत असतात. युरोप, अमेरिका किंवा चीनजपानमधले सगळेच लोक जन्मजात पक्के मांसाहारी असतात. मांसाहार हा त्यांच्या रोजच्या जीवनातला भाग असतो. तिकडच्या रेस्तरांमध्ये 'व्हेजिटेरियन' म्हणून विचारले तर ते वेटरना समजतही नाही असा माझा आणि माझ्या मित्रांचा अनुभव आहे. आजकाल तिकडचे काही तुरळक लोक मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून स्वखुशीने शाकाहार करायला लागले आहेत. काही लोक तर 'व्हेगन' झाले आहेत, ते दूध आणि दुग्धजन्य पदार्थसुद्धा वर्ज्य मानतात. पण ती त्यांची वैयक्तिक निवड असते.</p><p><br /></p><p>भारतातल्या काही विशिष्ट जातीजमाती, समाजांमध्ये गेल्या कित्येक पिढ्यांपासून शाकाहार पाळला जात आला आहे. काही लोक मासे खातात, पण मटण चिकन खात नाहीत, काही लोकांना अंडे चालते. असे लोक सोडल्यास इतर बहुजनसमाजाला मांसाहार चालतो किंवा आवडतो, पण इथे रोजच्या जेवणात मांसाहार घेणे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासाखे नाही. त्यामुळे इथली बहुसंख्य जनता मुख्यतः शाकाहारी आहे आणि रुचिपालट किंवा चैन म्हणून कधी तरी मांसाहार घेते. पण ते मांसाहारीच समजले जातात. हे अंशतः मांसाहारी आणि शुद्ध शाकाहारी यांच्यातच झाले तर थोडेसे वादविवाद होतात. भारतातही काही राज्यांमध्ये गोहत्येवर बंदी आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या हत्येलाही सगळीकडे बंदी आहे. काही धर्मांचे लोक डुकराचे मांस खात नाहीत आणि इतरांनाही ते फारसे आवडत नाही. त्यामुळे बीफ आणि पोर्क हे अमेरिकेत सर्वात जास्त खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ भारतात सहसा कुठे विकले जात नाहीत. पूर्वी मटण हा इथला मुख्य मांसाहार होता, पण आता त्या मानाने चिकन स्वस्त मिळत असल्यामुळे चिकनवर जास्त भर दिला जातो. </p><p><br /></p><p>शाकाहारी लोकांचे असे म्हणणे असते की माणसाच्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक द्रव्ये शाकाहारातून मिळतात हे पिढ्या न् पिढ्यांच्या अनुभवावरून सिद्ध झालेले आहे. मग त्यासाठी मुक्या प्राण्यांची हत्या करायची काय गरज आहे ? ते पाप आहे. "पापाय परपीडनम्।, अहिंसा परमो धर्मः।" यासारखी संस्कृत वचने ते सांगतात. तर मांसाहार करणाऱ्या लोकांच्या मते काही अपवाद वगळता निसर्गातले सगळेच पशू, पक्षी, कीटक वगैरे जीव इतर जीवांना खाऊन त्यावर जगतात. "जीवो जीवस्य जीवनम्। " अशी एक संस्कृत श्लोकातली ओळ तेही दाखवतात. शिवाय ते असेही म्हणतात की वनस्पतीसुद्धा सजीवच असतात, मग त्यांना मारण्यामध्ये सुद्धा हत्या होतच असते. त्यामुळे तसे पाहता शाकाहारही अहिंसक नाहीच, त्यातही वनस्पतींना पीडा तर होतेच, काहींचा जीवही जातो.</p><p><br /></p><p>निसर्गाने जी योजना केलेली आहे त्यात कुठलाही प्राणी फक्त दगडमाती, हवापाणी यावर जास्त काळ जगू शकत नाही. वनस्पती मात्र त्यांच्यापासून स्वतः अन्न तयार करतात आणि ते साठवून ठेवतात. असे वनस्पतींनी तयार केलेले अन्न शाकाहारी प्राणी खातात आणि हिंस्र पशू त्या प्राण्यांना मारून खातात. भागवतपुराणासारख्या धार्मिक ग्रंथात असे सांगितले आहे. </p><p>अहस्तानि सहस्तानाम् अपदानि चतुष्पदाम् |</p><p>फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम् ||भागवत-1/13/46||</p><p>हात नसलेले जीव हात असलेल्यांना (माणसांना), पाय नसलेले (न चालणारे किंवा वनस्पती) चार पायांच्या प्राण्यांना, लहान जीव मोठ्या जीवांना जगवतात. यात "खातात" असे स्पष्टपणे सांगितले नसले तरी तसा अर्थ त्यातून काढला जातो.</p><p><br /></p><p>दगडमाती हे अचेतन पदार्थ असतात, वनस्पती सचेतन म्हणजे जीवंत असल्या तरी त्या अचर असतात, एका जागी खिळलेल्या असतात. असे त्यांचे वेगळे वर्गीकरण केले आहे. भागवतामध्ये माणसाला सहस्त म्हणजे हात असलेला असे म्हंटले आहे. निसर्गाने माणसाचे वेगळे वर्गीकरण केलेले नाही. त्याचा समावेश पाठीचा कणा असलेल्या सस्तन प्राण्यांमध्ये होतो. उत्क्रांती होत असतांना माणसाला ज्या प्रकारचे दात मिळाले त्यांनी तो पाने, फळे, मुळे, मांस वगैरे निरनिराळ्या प्रकारचे अन्न खाऊ शकतो आणि त्याची पचनसंस्था या सगळ्यांना पचवू शकते. यामुळे आदिमानव त्याला यातले जे मिळेल ते खात होता. राक्षस किंवा नरभक्षक लोक तर इतर माणसांनाही मारून खात असत. पण माणूस हा एक समूह करून राहणारा प्राणी आहे. संरक्षणासाठी ते सोयीचे किंबहुना आवश्यक होते. कदाचित त्यामुळे त्यांनी एकमेकांना खाणे बंद केले.</p><p><br /></p><p>अन्नाच्या शोधात रानावनात भटकत राहणारा माणूस शेती करायला लागला, घर बांधून रहायला लागला, आगीचा उपयोग करून घ्यायला लागला. त्यानंतर त्याचे जीवन सर्वांगाने बदलत गेले. तो आता कच्चे मांस तर खात नाहीच, धान्य आणि पालेभाज्यासुद्धा शक्यतो भाजून किंवा शिजवून खातो. त्याअर्थी तो निसर्गापासून दूरच गेलेला आहे. त्याने भाषा निर्माण केल्या आणि मनात आलेले विचार सांगायची तसेच लिहायची सोय करून घेतली. त्यातून काव्य आणि साहित्य निर्माण झाले. प्राचीन काळातल्या विद्वान आणि विचारवंत ऋषीमुनींनी सर्व लोकांच्या कल्याणासाठी निरनिराळे नीतीनियम सांगितले. गीता, भागवत, उपनिषदे यासारख्या वाङमयातून त्यांचा प्रचार केला गेला. संस्कृतमधल्या या ग्रंथांमधला मजकूर आधी प्रत्यक्ष देवानेच सांगितला आहे असेही समजले जाते आणि त्याला आव्हान देण्याचे धाडस सहसा कुणी करत नाही. </p><p><br /></p><p>प्राचीन काळात कदाचित सर्व लोक मांसाहार करत असतील. पण त्या काळातल्या भारतातल्या लोकजीवनात गायीला खूप महत्व होते. तिला साक्षात देवतेचा आणि मातेचा दर्जा दिला गेला होता. त्यामुळे गायीला मारून खाणे हे खूप मोठे पाप मानले गेले आणि हिंदू धर्मीयांमध्ये त्यावर बंदी आली. इतर पशूंनाही चैनीसाठी मारण्याला आळा बसावा म्हणून फक्त यज्ञासाठी किंवा देवाला बळी दिलेल्या पशूंचेच मांस खावे असेही सांगितले गेले. धार्मिक कृत्ये करणाऱ्या वर्गाला पशूहत्या हे पापकर्म वाटायला लागले असेल आणि म्हणून त्यांनी मांसाहार करणे सोडले असेल किंवा त्यांचे वेगळेपण टिकवण्यासाठी त्यांना तसे सांगितले गेले असेल. त्या वर्गाला पूर्वीच्या काळी जास्त मान दिला जात असे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत तो मान नाहीसा झाल्यानंतर त्यासाठी शाकाहारी राहण्याची गरज उरली नाही. </p><p><br /></p><p>हिंदू धर्मामधील शास्त्रांमध्ये, मुख्यतः गीतेमध्ये कर्मसिध्दांत आणि पुनर्जन्म याबद्दल असे सांगितले आहे की माणसाने त्याच्या आयुष्यात केलेली पापे आणि कमावलेले पुण्य यांची फळे त्याला या जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावीच लागतात. पुढचा जन्म कुठल्या योनीमध्ये मिळेल हेसुद्धा या जन्मातल्या पापपुण्यावर ठरते. प्राण्यांची हत्या करणे हे पाप आहे म्हंटले तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील अशी भीती दाखवली जाते. शाकाहारी जातीच्या कुटुंबातल्या एकाद्या माणसाने मांसाहार केला तर त्याला घरातून बाहेर काढणे, त्याच्या कुटुंबावरच त्या जातीच्या इतर लोकांनी बहिष्कार टाकणे अशा प्रकारची कठोर उपाययोजना केली जात असे. या कारणांमुळे या जातींमधले लोक पिढ्यान् पिढ्या शुद्ध शाकाहार करत राहिले. पण गेल्या साठ सत्तर वर्षात सामाजिक जीवनात अनेक बदल झाले आहेत. शिक्षण, नोकरी, धंदा वगैरेंसाठी अनेक लोक आपण होऊनच घर सोडून परगावी, परप्रांतात किंवा परदेशी गेले आणि तिथल्या वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. एकत्र कुटुंबपद्धत राहिली नाही. प्रत्येकजण स्वतंत्र रहायला लागला. त्यामुळे समाजाची किंवा कौटुंबिक बंधने शिथील झाली. पुनर्जन्म, परलोक वगैरेंवर लोकांचा विश्वास राहिला नाही. यामुळे पुढल्या पिढ्यांमधले अनेक लोक आता मांसाहार वाईट मानत नाहीत आणि हौसेने करतात. पण त्या लोकांनाही स्वतःच्या हाताने एकाद्या प्राण्याला मारणे शक्य नसते. ते लोक प्रत्यक्ष हत्या करत नाहीत. त्यामुळे त्यांचा मांसाहार थोडा सौम्य म्हणता येईल.</p><p><br /></p><p>जैन धर्मामधील शास्त्रांमध्ये सजीवांचे वर्गीकरण असे केले आहे.</p><p>एकेंद्रिय जीव - याना फक्त स्पर्शेंद्रिय असते . ( यात वनस्पती आल्या . ) </p><p>दोन इंद्रिय असलेले जीव - यांना स्पर्श आणि चव अशी दोन इंद्रिये असतात .</p><p>तीन इंद्रिये असलेले जीव - यांना वासाचे आणखी एक इंद्रिय असते .</p><p>चार इंद्रिये असलेले जीव - यांना चक्षू ही असतात .</p><p>पांच इंद्रिये असलेले जीव - यांना कान ही असतात </p><p>आणि </p><p>माणूस - पंचेंद्रिये असलेला आणि खूप विकसित मन असलेला .</p><p>मग साधकाचा सर्वात उत्तम आहार कोणता ? एकेंद्रिय जीवांचा आहार घेतल्याशिवाय सुटका नाही आणि थोडीफार हिंसा अटळ आहे. एकेंद्रिय जीवच आपला सर्वोत्तम आहार आहे . एकेंद्रिय जीव हे त्रस जीव ( ज्याना त्रास / यातना होतो असे जीव ) नाहीत. झाडालाही भावना असल्या तरी त्यांचे रडणे, ओरडणे आपल्याला समजत नाही. हे जीव खाण्यात कमीतकमी हिंसा आहे. त्यामुळे जे काही थोडेसे पाप लागेल त्याची भरपाई माणसाच्या इतर पुण्यकर्मातून होईल.</p><p>जैन धर्मामध्ये अहिंसेवर जास्त भर असल्यामुळे अन्नपदार्थ गोळा करतांनाही हिंसा होऊ नये म्हणून ते लोक जमीनीखाली लागणारे कांदा, लसूण, बटाटे वगैरे पदार्थही खात नाहीत. शिक्षण आणि सुबत्ता यांचा त्यांच्या विचारसरणीवर कमी प्रभाव पडला असावा. आजकाल खास 'जैन फूड' नावाचा खाद्यपदार्थांचा वेगळा विभाग निघाला आहे.</p><p><br /></p><p>मी एकदा एका लग्नाला गेलो होतो. एका काउंटरवरून मी काही विशिष्ट खाद्यपदार्थ वाढून घेतले, वरण भात, भाजी, चपाती वगैरे मिळणाऱ्या जनरल काउंटरवर खूप गर्दी होती, पण एक काउंटर रिकामा दिसत होता म्हणून मी तिथे गेलो. तिथल्या सेवकाने मला सांगितले "हा जैन फूड काउंटर आहे." मी म्हंटले "मला चालेल". पण माझ्या प्लेटमधले पदार्थ पाहून तो म्हणाला, "तुम्ही हे खात असाल तर तुम्ही जैन नाही. हा काउंटर फक्त जैनांसाठी ठेवला आहे. चला निघा इथून."</p><p><br /></p><p>माझा एक शाकाहारी मित्र एका कॉन्फरन्ससाठी जपानला गेला होता. तिथे पोचल्यावर संध्याकाळच्या भोजनासाठी एका रेस्तराँमध्ये गेला. तिथले मेनूकार्ड पूर्णपणे जपानी भाषेत होते. तिथल्या वेटरला 'व्हेजिटेरियन' हा शब्द समजला नाही. मग त्याने सांगितले, "नो चिकन, नो मटन, नो बीफ, नो पोर्क, नो फिश". वेटरने त्याला एक डिश आणून दिली. त्याने चाखून पाहिली. ती चंव थोडी विचित्र वाटली. कुतूहल म्हणून त्याने त्या पदार्थाचे जपानी भाषेतले नाव लिहून द्यायला वेटरला सांगितले. दुसरे दिवशी कॉन्फरन्समध्ये भेटलेल्या एका इंग्लिश बोलणाऱ्या जपानी माणसाला दाखवून हे काय आहे असे विचारले. तो म्हणाला, "ऑक्टोपस." </p><p>अलीकडच्या काळात शाकाहाराचा पुरस्कार करण्यासाठी एक नवा मुद्दा मांडला जात आहे. कुठल्या कामासाठी किती ऊर्जा खर्च केली जाते याचा कुणीतरी अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की पाळीव पशुपक्ष्यांना अन्नपाणी खायला देऊन नंतर त्यांना मारून खाण्यामध्ये खूप जास्त ऊर्जा खर्च होते, त्याऐवजी माणसांना अन्नपाणी दिले तर तितक्या ऊर्जेत किती तरी जास्त मणसांचे पोट भरेल. त्यामुळे मांसाहार करण्यामुळे पर्यावरणाचा जास्त ऱ्हास होत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाकाहार उपकारक आहे. आता किती लोक याचा विचार करून शाकाहाराकडे वळतील याची मला शंकाच वाटते.</p><p>अशा प्रकारे शाकाहार- मांसाहाराला अनेक बाजू आहेत. त्या थोडक्यात दाखायचा हा एक प्रयत्न आहे.</p><p><br /></p><p>माझे मित्र श्री. श्यामसुंदर केळकर यांनी या विषयावर लिहिलेले लेख मी या ठिकाणी दिले आहेत. <a href="https://anandghare.wordpress.com/2021/12/06/%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0/">https://anandghare.wordpress.com/2021/12/06/%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0/</a></p><p> </p><p> </p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-23986552591546072652021-12-04T06:17:00.004-08:002021-12-04T08:29:34.458-08:00मी आहे तरी कोण ??? - भाग २<p> 'मी कोण आहे ?' या विषयावर मी फेसबुकवर लिहीत असलेल्या स्फुटलेखमालेतले पहिले २५ लेख एकत्र करून "मी आहे तरी कोण ??? - भाग १ " मध्ये प्रकाशित केले होते. ते इथे वाचावेत. </p><p><a href="https://anandghan.blogspot.com/2021/04/blog-post.html">https://anandghan.blogspot.com/2021/04/blog-post.html</a></p><p>पुढील २५ भाग एकत्र करून मी या भागात देत आहे.</p><p><br /></p><p>मी कोण आहे?</p><p>भाग २६</p><p>ट्रेनिंग स्कूलमधले आमचे शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशनसारखेच होते, पण आम्हाला शिकवण्यासाठी एकदोन अपवाद सोडता कुठल्याही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमधले तज्ज्ञ अनुभवी प्रोफेसर येत नव्हते. आम्हाला कुठला लिखित स्वरूपातला असा अभ्यासक्रम (करिक्युलम) दिलेला नव्हता आणि काही अपवाद वगळता त्यासाठी छापील पाठ्यपुस्तके उपलब्ध नव्हती. त्याकाळात इंटरनेटवर जाऊन शोधाशोध करायची सोयही नव्हती. आम्हाला कुठल्या कुठल्या विषयातले कुठलेकुठले टॉपिक्स शिकवायचे ते अणुशक्तीखात्यातील उच्चपदावरील सायंटिस्ट्स आणि इंजिनियर लोकांची एक समिती ठरवीत असे आणि कुठल्या डिव्हिजन किंवा सेक्शनमधल्या लोकांनी ते शिकवायचे याची जबाबदारी त्या त्या विभागाकडे देत असे.</p><p>तिथे आधीपासून काम करत असलेले अधिकारी ते काम वाटून घेत असत आणि एक एक जण पाळीपाळीने येऊन चार पाच लेक्चर देऊन जात असे. ते लोक आधी त्या विषयाचा चांगला अभ्यास करून नोट्स काढून आणत असत आणि त्यांचे सायक्लोस्टाइल केलेले दोनतीन कागद सगळ्या मुलांना वाटत असत. या बहुतेक लोकांना ५-१० वर्षांचा नोकरीतला अनुभव असे. त्या काळात त्या लोकांनी स्वतः केलेला अभ्यास आणि प्रयोगशाळेत किंवा ऑफिसात केलेले काम यावरून ते आपापल्या नोट्स तयार करत असत. कदाचित पुढील काळात यामध्ये बदल झाला असेल आणि काही स्टँडर्डाइज्ड नोट्स तयार केल्या गेल्या असतीलही, पण पन्नास वर्षांपूर्वी मी ट्रेनिंग घेत असतांना तसे काही नव्हते. लेक्चर द्यायला येणाऱ्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि पद्धती होत्या. </p><p>तेंव्हा भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) असे नाव दिले नव्हते. त्या केंद्राचे नाव अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्राँबे (AEET) असे होते. हे व्याख्याते मुंबईत जिथे कुठे रहात असतील तिथून ते आधी ट्राँबेला जात आणि तिथून जीपने मरीन लाइन्सला येत असत. ट्राँबेला जाण्यासाठी चेंबूर कँपवरून पुढे सगळ्या रिफायनरीजला वळसे घालत टाटांच्या पॉवरस्टेशनवरून जाणारा एकच रस्ता होता आणि त्याची परिस्थिती नेहमी दयनीय असायची. चेंबूर ते सायनला येणारा रस्ताही खड्ड्यांनी भरलेला असे. त्यामुळे आम्हाला शिकवायला तिथपर्यंत येणे हेच त्यांच्यासाठी एक दिव्य असे आणि ते त्यात दमून जात असत. पश्चिम किंवा दक्षिण मुंबईत राहणारे काही हुषार लोक मात्र घरातून निघून रेल्वे किंवा बसने थेट येऊन पोचत असत. त्यांना त्यासाठी भत्ता मिळत नसे, पण कष्ट वाचत असत. </p><p>----</p><p><br /></p><p>मी कोण आहे?</p><p>भाग २७</p><p>अणुशक्तीखात्यातले एक वरिष्ठ शास्त्रज्ञ आमच्या ट्रेनिंग स्कूलचे मुख्य (हेड) होते. आम्ही या गृहस्थांना प्रत्यक्ष पहायच्या आधीच त्यांच्या तापट आणि जराशा तिरसट स्वभावाबद्दल ऐकले होते. ते शिस्तीचे भोक्ते होते आणि आधीच्या कुठल्याशा बॅचमधल्या दोघातीघांना त्यांनी तडकाफडकी काढून टाकले होते म्हणे. त्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता. आमचे हे हेडमास्तर रोज शाळेत येत नसत आणि ते एका दृष्टीने चांगलेच होते. आम्हाला शिकवायला येणारे कोणतेच 'सर' किंवा 'मॅडम' त्यांच्या हाताखाली काम करत नसत. किंबहुना त्यांचा एकमेकांशी कधी संबंधही येत नसे. हेड सरांनी रोज शाळेत यायचे काही कारणही नव्हते. ते कधीतरी धूमकेतूसारखे अचानक प्रकट होत आणि कुणाला फैलावर घेऊन तर कुणावर गुरगुरून दम भरत असत. त्यांनी कधी प्रेमाने जवळ येऊन आमची किंवा आमचे प्रशिक्षण कसे चालले आहे याची चौकशी केल्याचे मला तरी आठवत नाही. त्यांना भेटून आपल्या काही अडचणी सांगायचे किंवा सूचना करायचे धाडस तर कुणीच करत नव्हते. </p><p>आमच्या ट्रेनिंग स्कूलच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी अणुशक्तीखात्यातल्याच एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडे दिलेली होती. हे गृहस्थ सरकारी कामकाजात पक्के मुरलेले होते आणि त्यांच्या चेहेऱ्यावरच बिलंदरपणाची झाक दिसायची. कधी कुणाशी वर वर गोड आणि गुळमुळित बोलून झुलवत ठेवायचे आणि कधी कुठल्या तरी सरकारी नियमावर बोट ठेवून तोंडाला पाने पुसायची याचे तंत्र त्यांना उत्तम अवगत होते. हे सद्गृहस्थसुद्धा प्रत्यक्षात क्वचितच आमच्या बाजूला फिरकत असत. ते कधी आले तरी त्यांच्या ऑफिसात बसून कागदपत्रे पहात आणि सह्या वगैरे करून परत जात असत.</p><p>आम्हाला चार पाच वर्षांनी सीनियर असलेल्या एका सायंटिफिक ऑफीसरशी आमचा नेहमी संपर्क यायचा. ते मात्र अत्यंत मनमिळाऊ आणि उमद्या स्वभावाचे होते. ते आमच्यात मिळून मिसळून मोकळेपणे गप्पा मारायचे, हास्यविनोद करायचे इतकेच नव्हे तर हिंदी सिनेमातली गाणी पण म्हणून ऐकवायचे. अणुशक्तीकेंद्रातले शास्त्रीय संशोधनकार्य करायचे सोडून ते इथे काय करत आहेत असा प्रश्नही आम्हाला पडत असे. कदाचित त्यांना तात्पुरते इकडे पाठवले असेल असे वाटले होते, पण मला दहा वर्षांनंतर समजले की ते अजूनही ट्रेनिंगस्कूलमध्येच जात होते. </p><p>प्रशासनातल्या एका अगदी बुटक्या अशा कनिष्ठ कर्मचाऱ्याशी आमची रोजच गाठ पडत असे. हा डेढफुट्या' मात्र कमालीचा तत्पर आणि कार्यक्षम तर होताच, पण नेहमी हसतमुख असायचा आणि सगळ्यांशी अदबीने बोलत असे.</p><p>---</p><p>मी कोण आहे?</p><p>भाग २८</p><p>मी सायन्स कॉलेजमध्ये जे काही धडे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये शिकलो होतो त्यांचा प्रचंड विस्तार होऊन त्यातून निघालेले स्टॅटिक्स, डायनॅमिक्स, हैड्रॉलिक्स, थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, मटीरियल सायन्स, मेटॅलर्जी यासारखे अनेक विषय पुढे इंजिनियरिंग करतांना शिकलो होतो. ट्रेनिंग स्कूलमध्ये सुरुवातीला त्यांची थोडी झटपट उजळणी करत असतांनाच अणुशक्तीशी संबंधित असलेल्या विशेष विषयांचा अभ्यास सुरू झाला. त्यात अॅटॉमिक फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, रिअॅक्टर फिजिक्स असे फिजिक्समधलेच एकाहून एक जटिल विषय होते, युरेनियम, थोरियम, झर्कोनियमसारखे अनोळखी धातू, हीलियम, आर्गॉन आणि झेनॉनसारखे उदासीन वायू आणि अनेक अनोळखी रसायने, निरनिराळ्या रासायनिक क्रिया, त्यांच्यासाठी लागणारी उपकरणे, विविध कारखान्यांमधली यंत्रे आणि संयंत्रे वगैरेचा अभ्यास होता. थोडक्यात सांगायचे तर आम्हाला सर्वज्ञ बनवायचा प्रयत्न होता.</p><p> मला इंजिनियरिंग कॉलेजमधले उच्च गणितच भारी किचकट वाटत होते, इथे तर त्याच्या वरताण काहीच्या काहीच शिकवले जात होते. त्यासाठी आय आय टी मधून एक ज्येष्ठ प्राध्यापक येत होते. त्यांनी संशोधनामधला एक काल्पनिक प्रॉब्लेम आणला आणि तो सोडवण्यासाठी चोवीस सायमल्टेनियस इक्वेशन्स मांडली. ती सगळी समीकरणे सोडवता आली की त्यामधून चोवीस अज्ञात गुणधर्मांची मूल्ये मिळतील म्हणे. पण एवढी प्रचंड आकडेमोड सामान्य माणूस तर करू शकणारच नाही, त्या काळात त्यांनाच उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक संगणकाला ते शक्य होते म्हणे. शास्त्रज्ञांना सुपरकाँप्यूटर कशासाठी लागतात याचा मला त्यातून थोडा बोध झाला आणि आजच्या काळात मोठा शास्त्रज्ञ होणे कसे अवघड झाले आहे तेही समजले. </p><p>आम्हाला या सगळ्यापेक्षा अगदी वेगळा असा एक विषय होता तो म्हणजे रशीयन भाषा. या भाषेची लिपीही वेगळी आहे. त्यातल्या काही अक्षरांचे आकारच वेगळे आहेत आणि काही अक्षरे रोमन लिपीमधली असली तरी त्यांचे उच्चार निराळे आहेत. उदाहरणार्थ त्या काळात त्यांचा देश USSR या नावाने जगात प्रसिद्ध होता, पण ते नाव CCCP असे लिहिले जात असे आणि त्याचा उच्चार एसेसेर असा होत असे. त्यांची एबीसीडीसारखी आबेव्हेद्ये अक्षरे शिकण्यापासून पुढे शब्द, वाक्यरचना वगैरे शिकणे कठीण काम होते आणि इतर सगळा अभ्यास सांभाळून ते करणे अशक्य होते. कुणाला लगेच तिकडे पाठवतील अशीही काही शक्यता दिसत नसल्यामुळे कुणालाच ती भाषा शिकायची इच्छा नव्हती. पण हा विषय शिकवायला येणारे उपाध्याय गुरूजी मात्र लाखात एक होते. वर्गात कुणीही लक्ष देऊन ऐकत नसतांनाही ते इतक्या तन्मयतेने, प्रेमाने आणि शांतपणे शिकवत असत आणि हास्यविनोद करून वातावरण खेळकर ठेवत असत याची दाद द्यायला हवी. हे काम एकादा योगीच करू शकेल. </p><p>-----</p><p>मी कोण आहे?</p><p>भाग २९</p><p>आमची शाळा बहुतेक दिवशी सकाळी ११ वाजता सुरू होत असे. एक एक तासाचे दोन तास झाल्यावर तासभर जेवणाची सुटी घेऊन दुपारी आणखी २-३ तास असत. एकदा आम्ही रोजच्याप्रमाणे सकाळची कामे आणि नाष्टा आटोपून धावतपळत हरचंदरायहाऊसपर्यंत जाऊन पोचलो, पण जिन्याने वर चढून क्लासरूमपर्यंत गेल्यावर समजले की आज काही कारणाने आमचे पहिल्या क्लासचे सर येऊ शकणार नाहीत. </p><p>तिथे नुसते बसून काय करायचे असे म्हणत आम्ही दोघेतीघेजण खाली उतरून आजूबाजूचा भाग पहात फिरत फिरत लिबर्टी सिनेमा थेटरपर्यंत गेलो. तिथे मॅटिनीशोला राजकपूरचा एक खूप गाजलेला जुना सिनेमा लागला होता. माझ्या लहानपणी आमच्या गावात एक जुने थेटर होते, पण तिथे बऱ्याच वेळा एकादा कन्नड किंवा गल्लाभरू हिंदी सिनेमा लागायचा. कधीकधी एकादा चांगला चित्रपट लागला तरी "सिनेमामुळे बालकांच्या मनावर वाईट परिणाम होऊन ती बिघडतात" असे घरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचे ठाम मत असल्यामुळे मुलांना ते पहायची परवानगी नव्हती. त्यामुळे सिनेमाचा सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या पन्नाशीतले सिनेमे मला त्या काळात पहायला मिळाले नव्हते. मीही कॉलेजमध्ये गेल्यावर सिनेमे पहायला सुरुवात केली होती आणि तत्कालीन सिनेमांच्या बाबतीत माझे सामान्यज्ञान वाढवले होते. काही गाजलेले जुने सिनेमेही पाहिले होते आणि काही राहून गेले होते.</p><p>त्यातलाच एक प्रसिद्ध सिनेमा पहायची ही संधी आयती चालून आली होती. आमचा पहिला क्लास तर रद्द झाला होताच, दुसरा तितकासा महत्वाचा नव्हता आणि नंतर लंचटाइम होता असा विचार करून आम्ही तिकीट काढले आणि आत जाऊन बसलो. चित्रपट संपल्यावर पटकन चार घास खाऊन वेळेवर वर्गात हजर झालो. आमची अनुपस्थिति तिथे कुणालाच खटकली नसावी आणि आम्हाला कुणीच काही बोलले नाही. नंतरच्या काळातही आमच्या व्याख्यात्यांना ट्राँबेहून मरीनलाइन्सपर्यंत येऊन पोचण्यात काही वेळा अडचणी येत गेल्यामुळे पहिला क्लास रद्द झाला. त्यामुळे कधी कधी या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आणि माझा जुन्या काळातल्या न पाहिलेल्या सिनेमांचा थोडा बॅकलॉग भरून निघाला. इतर मित्रांप्रमाणे मीसुद्धा दिलिपकुमार, राजकपूर आणि देवआनंद यांच्यावर बिनधास्त बोलायला शिकलो.</p><p>----</p><p><br /></p><p>मी कोण आहे?</p><p>भाग ३०</p><p>पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये पाच मेसेस होत्या आणि त्यांमध्ये मराठी, कानडी, गुजराथी, मारवाडी, पंजाबी, मुसलमानी वगैरे विविध पद्धतींचे भोजन मिळत असे. ते चविष्ट खाणे खाऊन माझी जीभ चटावलेली होती. अणुशक्तीखात्याच्या ट्रेनिंग स्कूलच्या होस्टेलमध्ये आमच्या काळात एकच कॉमन मेस होती. आम्ही निवडून दिलेली चार मुलेच तिचे संचालन करीत होती. त्यातले दोघे उत्तर भारतीय आणि दोघे दक्षिण भारतीय होते. ते आळीपाळीने मेन्यू ठरवत असत. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये सर्वानुमते ब्रेडबटरऑमलेट असायचेच, त्याला पर्याय म्हणून पुरीभाजी किंवा इडली दोसा असा एकादा पदार्थ असायचा त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. रात्रीच्या जेवणात मात्र ताटात काय वाढले जाणार आहे याचा नेहमी सस्पेन्स असायचा. मेन्यूमध्ये काहीही नाव लिहिले असले तरी ते पदार्थ कसे करायचे हे तर किचनमधले कर्मचारी त्यांच्या समजुती आणि आवाक्याप्रमाणे काहीतरी ठरवून तशी पाकसिद्धी करत असत. त्यांचे याबाबतीतले नैपुण्य यथातथाच होते. त्यामुळे वाटीतला पदार्थ हा 'दाल' असला किंवा 'सांभार' असला तरी तो तितकाच बेचव असायचा, भाजी तेलकट असली तर ती पंजाबी समजायची आणि पांचट असली की मद्रासी. पण दोघांनाही ती पसंत पडत नसे. पण आमच्या पोटात सडकून भूक लागलेली असायची आणि "अन्नाला नावे ठेवू नयेत" अशी लहानपणपासूनची शिकवण असल्यामुळे आम्ही पानात वाढलेले सगळे 'अन्न हे पूर्णब्रह्म' असे म्हणत त्याच्या 'उदरभरणाचे' 'पुण्यकर्म' करत असू. स्वच्छता आणि हाायजिनची पुरेशी काळजी तेवढी घेतली जात असावी. त्यामुळे ते अन्न खाऊन सहसा कुणी आजारी पडत नव्हते.</p><p>त्या काळात ट्रेनिंग स्कूलमध्ये कँटीनच नव्हते. ज्याने त्याने आपापल्या आवडीचे दुपारचे जेवण खायला पूर्ण मुभा होती. फक्त ते वेळेत मिळावे आणि खिशाला परवडावे असे दोन बारकेसे निर्बंध होते. त्या हरचंदरायहाऊसमध्येच नव्हे तर त्या रस्त्यावरसुद्धा आजूबाजूला कुठलेही क्षुधाशांतिगृह नव्हते. धोबीतलावपर्यंत चालत आल्यावर मेट्रो आणि लिबर्टी सिनेमाथिएटरांच्या आसपास काही लहान लहान खाद्यगृहे होती. त्यातल्या एकात फुटबॉलसारखा गरगरीत भटूरा आणि लज्जतदार गरमगरम छोले मिळत, तसे मी जगात इतर कुठेही पाहिले नाहीत, कुठे मस्तपैकी भेळपुरी मिळायची तर कुठे छानसा खिमापाव. आणखी पुढे क्रॉफर्ड मार्केट दिशेने चालत गेल्यावर एक दोन चांगली उडुपी हॉटेले होती. वाटेतच लोकमान्य टिळकांमुळे प्रसिद्ध झालेले सरदारगृह होते. तिथे एक जिना चढून वर गेल्यावर चटणीकोशिंबीर आमटी भाजी वगैरेंसह साग्रसंगीत मराठी भोजन मिळत असे, त्याबरोबर श्रीखंड किंवा बासुंदीसारखे पक्वानही असे, आणि तेही मध्यमवर्गाला परवडेल अशा माफक किंमतीत मिळत असे.</p><p>या सगळ्यांचा अनुभव घेत असतांना आम्ही मरीन लाइन्सपुरते मर्यादित न राहता आजूबाजूच्या रेल्वेस्टेशन्सच्या भागांचीही पहाणी करत होतोच. चर्चगेट रेल्वेस्टेशनच्या बाहेरच एक अप्रतिम उडुपी हॉटेल होते. तिथे येणाऱ्या ग्राहकांची प्रचंड गर्दी असायची, तरीही तिथला अत्यंत कार्यक्षम नोकरवर्ग त्या सर्वांना जेवण पुरवीत असे. ग्राहक खुर्चीवर बसला रे बसला की लगेच त्याच्या समोर भरलेली राइसप्लेट येई आणि तो उठून बिल भरेपर्यंत ते टेबल स्वच्छ पुसून पुढल्या ग्राहकासाठी सज्ज होत असे. जेवणही बऱ्यापैकी रुचकर असायचे. त्याशिवाय पंजाबी, गुजराथी आणि यूपीच्या भय्यांची विशिष्ट खाद्यालये होतीच, त्यातली काही थोडी महागडी होती, पण अधून मधून त्यांना एकादी भेट देणे शक्य होते. काही दिवस तर आम्ही तीन चार मराठी मुले चर्नी रोडला जाऊन गिरगावमधल्या कोना रेस्टॉरंटमध्ये जेवण घेत होतो. त्याच बिल्डिंगशी माझा पुढील आयुष्यात काही संबंध जुळून येणार होता हे मात्र मला तेंव्हा माहीत नव्हते.</p><p>---- </p><p><br /></p><p>मी कोण आहे ? </p><p> भाग ३१</p><p>"ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्रात आहे, पण या एनडीएमध्ये महाराष्ट्र कुठे आहे?" असे उद्गार माननीय यशवंतराव चव्हाण यांनी खडकवासल्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीला भेट दिली होती तेंव्हा काढले होते असे म्हणतात. १९६६-६७ च्या त्या काळात मार्मिकच्या तोफा जोरात धडधडत होत्या. वांद्र्यातच रहात असलेले पूजनीय बाळासाहेब जर आमच्या हॉस्टेलमध्ये आले असते आणि त्यांनी तिथल्या एकूण मुलांच्या संख्येच्या मानाने मराठी मुलांची संख्या पाहिली असती तर तिथले चित्र पाहून त्यांनी कोणते उद्गार काढले असते कोण जाणे. पहायला गेल्यास त्या काळातल्या भारतातच्या एकूण लोकसंख्येत मराठी भाषिकांचा जो काही टक्का असेल तितपत मराठी मुले तिथे असावीत, पण त्यातली अर्धीनिम्मी मुले कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा इतर राज्यांमधून आली होती आणि मूळच्या इथल्या भूमीपुत्रांचे प्रमाण तसे पाहता कमी होते. आमच्या बॅचमध्ये चार मुलीही होत्या, पण त्या होस्टेलमध्ये न राहता आपापल्या किंवा नातेवाइकांच्या घरी रहात होत्या. त्यांच्यातल्या दोन म्हणजे पन्नास टक्के मुली मात्र महाराष्ट्रातल्या मराठीभाषी होत्या. सँपलसाइझ कमी असला की स्टॅटिस्टक्समधून असे विसंगत आकडे येऊ शकतात.</p><p> मी स्वतः पुढे अनेक वर्षे निवडसमीतीवर काम केले असल्यामुळे यात कसलाही गैरव्यवहार नसतो हे मला चांगले माहीत आहे. आमच्याच बॅचच्या काळात माझे बरेचसे हुषार मित्र तिथे यायला तयारच नव्हते आणि त्यांनी अर्जच केले नव्हते कारण त्या सगळ्यांना एक तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचे होते नाहीतर अमेरिकेला तरी जायचे होते. तरीही आमच्या पुण्याच्या होस्टेलमधल्या ज्या थोड्या मुलांनी इंटरव्ह्यू दिला होता, त्यातल्या तीघांची निवड झाली होती. त्यातल्याही एकाला दुसरा चांगला जॉब मिळाल्याने तो महिनाभरातच सोडून गेला होता. सांगलीच्या कॉलेजमधून कदाचित 'चुकून' आलेल्या एका मुलाने अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि त्याची प्रगति असमाधानकारक दिसल्यामुळे त्याला ट्रेनिंग स्कूल सोडावे लागले होते.</p><p>रोजचे हिंदीतून बोलणे उत्तर भारतामधून आलेल्या मराठी मुलांच्याही चांगले अंगवळणी पडलेले होते आणि ज्यांनी मुंबई किंवा नागपूरमध्ये शिक्षण घेतले होते त्यांमुलांनाही हिंदीतून बोलायची बरीच सवय झाली होती. असे करता करता ज्याला ते जमत किंवा आवडत नव्हते असा एकाददुसराच उरला असेल. आमच्यातला कुणीच विशेष कडवा मराठीभक्त नव्हता. किंबहुना कुणालाच मराठी भाषा, साहित्य, वाङमय वगैरेंचीही मनापासून खूप आवड नव्हती. मराठी भाषेतले कवी, काव्य, लेखक, कथाकादंबऱ्या असले गहन विषय आमच्या गप्पागोष्टींमध्ये सहसा कधी येत नसत. </p><p>मराठी गाण्यांचे मात्र बहुतेक सर्वांनाच वेड होते. स्व.बाबूजी, हृदयनाथ, श्रीनिवास खळे आणि तीन वसंत यांनी दिलेल्या एकाहून एक सुरेल गाण्यांनी सजवलेला तो मराठी सुगमसंगीताचा सुवर्णकाळ होता. जोडीला अजरामर असे नाट्यसंगीतही होतेच. मराठी श्रोत्यांसाठी दर सोमवारी रात्रीची 'आपली आवड' बुधवारच्या 'बिनाका' गीतमालेइतकीय चटक लावणारी होती. त्यामुळे मराठी गाणी ऐकणे, गाणे, गुणगुणणे आणि त्यांवर चर्चा करणे वगैरे मात्र अनेक वेळा होत असे.</p><p>----</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? </p><p> भाग ३२</p><p>A man is known by the company he keeps. अशी एक इंग्रजी म्हण आहे. समजा एकादा माणूस मला ओळखत नसेल, खरं तर मला सगळ्यांनी ओळखावे असा मी कोणी नाहीच. जर त्या माणसाला कळले की मी बऱ्याच वेळा अमक्यातमक्याबरोबर असतो, तर त्यानुसार त्याच्या मनात माझी एक अस्पष्ट प्रतिमा तयार होईल. कारण सोबत रहाणारे लोक एकमेकांकडून काही शिकत असतात, एकमेकांचे अनुकरण करत असत आणि काही गुण अवगुण घेत असतात. "ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला" असे म्हणतात ना ! "समानशीले व्यसनेषु सख्यम्।" असे एक सुवचन आहे. सारखे कॅरेक्टर असणाऱ्यांचे चांगले जमते आणि समान संकट आले तर ते मिळून त्याचा सामना करतात म्हणून त्यांचे सख्य असते. मराठीतले 'व्यसन' लागले असले तर त्यातून मिळत असलेली धुंदी त्यांना एकत्र आणते.</p><p>मी कॉलेजमध्ये असतांना आणि ट्रेनिंग स्कूलमध्ये गेल्यावर कुणाच्या संगतीत रहात असे? त्यांच्यामुळे माझी कोणती ओळख तयार होत असे? मेकॅनिकल इंजिनियरिंगचे विद्यार्थी एका क्लासरूममध्ये बसत असत आणि एकच लेक्चर ऐकत असत. काही मुलांना ते चांगले समजायचे, काहीजणांना ते तितकेसे समजत नसे, त्यामुळे त्यांच्या मनात शंका असायच्या त्या ते कुणा मित्राला विचारायचे. प्रॅक्टिकल्स करणे, त्यांची जर्नल्स लिहिणे वगैरे कामे सामूहिकपणे चालत असत. अशा कारणामुळे माझी मेकॅनिकलच्या काही विद्यार्थ्यांशी जास्त जवळीक निर्माण झाली होती.</p><p>होस्टेलमधला रूमपार्टनर तर दिवसरात्र नजरेसमोर असायचा, निरनिराळ्या कारणाने आणि विषयांवर त्याच्याशी बोलणे होतच असायचे. कधी वादविवाद, भांडण झाले तरी आपल्याला वर्षभर त्याच्यासोबत रहायचे आहे याची दोघांनाही जाणीव असल्यामुळे लवकरच समेटही व्हायचा. शेजारच्या खोल्यांमध्ये रहाणारी मुलेही एकमेकांकडे जाऊन बसत असत, त्यांच्याशीही दोस्ती होत असे. </p><p>भाषा आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध आहे. एक भाषा बोलणाऱ्या लोकांच्या रीतीभातींमध्ये बरेच साम्य असते आणि ते आपले विचार किंवा भावना वगैरे आपल्या मातृभाषेमध्ये चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात. कदाचित यामुळेही आमच्या होस्टेलमध्ये पंजाबी, तामिळ, बांगला वगैरे भाषिकांचे गट तयार झाले होते, तसेच मराठी मुलांचाही एक गट होताच. आम्ही एकमेकांकडे जमून गप्पा मारत असू किंवा मिळून बाजारात किंवा भटकायला जात असू.</p><p>माझा बंगाली रूममेट मेकॅनिकलला होता, तर शेजारी रहाणारा इलेक्ट्रिकल ट्रेनी मराठी होता आणि दुसरीकडे रहात असलेले पण मेकॅनिकल शिकणारे मराठी मित्रही होते. असे दुहेरी कनेक्शन्सही होते. त्याशिवाय मित्रांचे शेजारी, शेजाऱ्यांचे मित्र वगैरेंमध्ये समानशील लोक सापडतच होते. मी आळीपाळीने या निरनिराळ्या मित्रांच्या संगतीत रहात होतो. त्यामधून माझी कोणती प्रतिमा निर्माण होत असेल ? काही सांगता येत नाही. कुणी माझ्या एकाद्या सिन्सियर मित्राला ओळखत असेल तर मलाही तसा समजत असेल आणि कुणी एकाद्या भांडखोर मित्राला ओळखत असेल तर तो माझ्यापासूनही चार हात दूर रहात असेल.</p><p>--- </p><p><br /></p><p>मी कोण आहे ? </p><p> भाग ३३</p><p>बँडस्टँडवरील आमच्या झोपडीमधून बाहेर आले की पश्चिमेला अथांग समुद्राचे दर्शन होत असेच. त्या भागात कसले कारखानेही नव्हते आणि रस्त्यावरून धूर ओकणारी फारशी वाहतूकही नव्हती. त्यामुळे हवा छान शुद्ध असायची. त्या छान वातावरणात समुद्रकिनाऱ्यावरून फिरायला खूप मजा वाटायची आणि भेटतील त्या दोन तीन मित्रांबरोबर मीही नेहमी त्याचा आनंद घेत होतो.</p><p>त्या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्यांची संख्या फार जास्त नसली तरी त्यात बाबागाडीत बसून इकडे तिकडे टुकुटुकु बघणाऱ्या गोंडस बालकांपासून ते व्हीलचेअरमध्ये आरामात बसून हातातल्या पॅकेटमधून काही तरी तोंडात टाकत मजेत फिरणाऱ्या सुखवस्तू वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक असत. तो भागच गडगंज श्रीमंत लोकांच्या वस्तीचा असल्यामुळे बहुतेक लोकांच्या अंगावर सुरेख आणि फॅशनेबल कपडे दिसत. कधी समुद्रातल्या फेसाळत येऊन खडकांवर आदळणाऱ्या लाटा पहात आणि कधी त्या पहायला आलेल्या नमूनेदार माणसांकडे पहात वेळ छान जात असे.</p><p>तिथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक वेळा तिथे सिनेमाचे शूटिंग चालत असे. तेंव्हा मात्र किनाऱ्यावरची पाचपन्नास माणसे गोळा होऊन तिथे थोडी गर्दी करत असत. त्यावरूनच ते दुरूनही लगेच ओळखू येत असे. शिवाय रिफ्लेक्टर्स, लाउडस्पीकर्स वगैरे दिसायचेच. तिथे कुठला फिल्मस्टार किंवा कुठली सिनेतारका आली असेल ते पहायच्या उत्सुकतेने आम्हीही त्यात सामील होत असू. सुरुवातीला मी एक शुटिंग पहात थोडा वेळ उभा राहिलो होतो. एका लहान गल्लीमधून एक मुलगी धावत धावत येते. ज्याक्षणी ती मुख्य रस्त्यावर येऊन पोचते त्याच क्षणी तिथे एक मोटारगाडी थांबते, तिचा दरवाजा उघडतो, ती मुलगी आत बसते आणि ती गाडी लगेच पुढे निघून जाते असे तो सीन असावा.</p><p>सिनेमामध्ये हे सगळे दहाबारा सेकंदामध्ये घडलेले दाखवले असेल, पण शूटिंग करतांना त्यांचे टाइमिंग काही केल्या जमत नव्हते. एका वेळी ती मुलगी आधी येऊन पोचायची तर दुसऱ्या वेळी ती गाडी आधी यायची किंवा त्या ठरलेल्या पॉइंटला नेमक्या ठिकाणी थांबायचीच नाही. त्यामुळे त्यांचे कितीतरी वेळा रीटेकवर रीटेक चालले होते. ते पाहून शेवटी मलाच कंटाळा आला. मी म्हणतो ती मुलगी किंवा ती गाडी दोन सेकंद थांबली असती तर काय फरक पडला असता? तेवढेही त्यांना एडिटिंगमध्ये अॅडजस्ट करता आले नसते का? त्यानंतर मी मात्र पुन्हा कधी तसला कंटाळवाणा प्रकार पहात थांबलो नाही. </p><p>----</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? </p><p> भाग ३४</p><p>आधीच्या काळात जगभरात बहुतेक सगळीकडे राजेमहाराजांचे राज्य होते, पण विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे माझ्या लहानपणच्या काळापर्यंत सगळीकडे लोकशाही, हुकुमशाही, साम्यवाद वगैरे प्रकारच्या राजवटी आल्या होत्या. इंग्लंडसारख्या काही देशांमध्ये फक्त नावापुरते किंवा शोभेसाठी राजे, राण्या उरल्या होत्या. मात्र त्या काळात घरोघरी चार राजे आणि चार राण्या असायच्याच, इस्पिक, बदाम, चौकट आणि किलवरच्या ! तेंव्हा पत्त्याचा जोड ही एक आवश्यक वस्तू असायची आणि पत्ते खेळणे हा लहानमोठ्या सगळ्यांचा आवडता विरंगुळा होता. मी तर मला कळायला लागल्यापासून भिकार-सावकार, पास्तींदोन, ३०४, बदाम७, झब्बू वगैरे खेळतच लहानाचा मोठा झालो. कॉलेजमध्ये गेल्यावर ब्रिजचा खेळ शिकलो.</p><p>त्या टीव्हीच्या आधीच्या काळात आमच्या ट्रेनिंग स्कूलच्या हॉस्टेलमध्येसुद्धा पत्ते कुटणे हा टाइमपासचा पॉप्युलर मार्ग होता. आता बदाम सात किंवा झब्बू वगैरे खेळ जरा बालिश वाटायला लागले होते. पण ब्रिज खेळण्यासाठी चार सराईत खेळाडू हवेत आणि एका वेळी फक्त चारजणच तो खेळू शकत. त्यापेक्षा रमी हा खेळ कितीही मुले खेळू शकत असल्यामुळे तोच जास्त खेळला जात असे.</p><p>"द्यूतामध्ये पांडव हरले" वरून झालेल्या महाभारतापासून बोध घेत "कध्धी कध्धी जुगार खेळू नये" हे माझ्या बालमनावर इतके ठसवले गेले होते की मी तोपर्यंत कधी एक पैसाही जुगारावर लावला नव्हता. त्यामुळे पैसे लावून रमी खेळायला मी तयार होत नव्हतो, पण आमच्या ग्रुपमधल्या लीडरच्या मते कोणीही आणि कधीही फुकट रमी खेळत नसतो. तसे केले तर खेळणारे लक्ष देणार नाहीत, कुणीच पॅक करणार नाही, सगळेजण खेळत राहतील, त्यामुळे कुणालाच हवी असलेली पाने मिळणार नाहीत आणि खेळ कंटाळवाणा होईल. त्याचे म्हणणे बरोबर वाटत असले तरी तोच सर्वात चलाख आणि हुशार असल्यामुळे तो नेहमी आपल्याला लुटेल असे वाटून काही मित्रांनी माझी बाजू घेतली. शेवटी अशी तडजोड करण्यात आली की अगदी कमी स्टेकवर खेळायचे आणि कुणीही तिथल्या तिथे रोख पैसे द्यायचे घ्यायचे नाहीत. सगळा हिशोब मांडून ठेवायचा आणि जितकी टोटल होईल ती सगळ्यांनी मिळून हॉटेलात जाऊन खाण्यापिण्यात खर्च करायची. त्यानंतर आमच्या कित्येक संध्याकाळी आणि रात्री रमी खेळण्यात आणि पार्टी करण्यात रंगल्या.</p><p>-----</p><p><br /></p><p>मी कोण आहे ? </p><p> भाग ३५ (अ)</p><p>ट्रेनिंग स्कूलच्या होस्टेलमधला माझा रूम पार्टनर होता मानबेंद्र दास. तो दार्जिलिंगच्या वाटेवर लागणाऱ्या शिलिगुडी, जलपैगुरी वगैरेसारख्या भागातून आला होता. तिकडे त्यांचे चहाचे मळे होते म्हणे. पण हिंदी सिनेमातल्या चायबागानचे मालक जसे अतीश्रीमंत, ऊर्मट आणि निष्ठूर दाखवतात तसा तो अजीबात नव्हता. तो शांत, प्रेमळ, मनमिळाऊ आणि समजूतदार स्वभावाचा होता. त्याच्या राहणीत कुठेही ऐयाशी दिसत नव्हती. तिथल्या बंगाली मुलांचे एक टोळके तयार झाले होते त्यात तो होताच, त्याच्या घनिष्ठ मित्राचे आडनावच 'मित्रा' होते. त्याला बंगाली मुले 'मित्रो' म्हणायचे आणि मानबेंद्राला 'मानोबदा'. त्यांच्याशिवाय सेनगुप्ता, मुखोपाध्याय, बासू, बसाक वगैरे आणखी काही जण होते. त्यातला मानबेंद्र सुरुवातीपासून अखेरपर्यंत माझ्या जोडीला माझ्याच ऑफीसात राहिला. मित्रा तीन वर्षांनंतर नोकरी सोडून परदेशी गेला, सेनगुप्ता आणि मुखोपाध्याय काही वर्षांनंतर अधून मधून अणुशक्तीनगरमध्ये दिसायचे, इतर मुले मात्र ट्रेनिंग संपल्यानंतर मला पुन्हा कधी भेटली नाहीत. </p><p>माझे बालपण कर्नाटकात गेले, तत्वज्ञान विद्यापीठात गुजरात्यांचे प्राधान्य होते, इंजिनियरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये काही सिंधी, पंजाबी, तामीळ, तेलुगू मुलेही होती, पण मला मुंबईत किंवा पुण्याला कोणी बंगाली मुलगा किंवा माणूस कधीच भेटला नव्हता. ट्रेनिंग स्कूलमध्येच ती मुले पहिल्यांदा माझ्या सहवासात आली. पु.ल.देशपांड्यांच्या एका लेखात मी वाचले होते की दोन्ही गालात दोन रसगुल्ले ठेऊन तोंडाचा चंबू करून शोनुला मोनुला असे काहीतरी लहान बाळांशी बोलावे तशी बंगाली भाषा गोड असते. कदाचित त्यांना शांतिनिकेतनमध्ये भेटलेल्या गोड बंगाली मुली तसे गोड बोलत असतील, पण इथले माझे बंगाली मित्र मात्र एकत्र जमले की नाकातोंडातून सिगरेटचा धूर सोडत आणि आग ओकल्यासारखे तावातावात एकमेकांवर कचाकचा किंचाळत असत. मला काही दिवसांनी त्याचीही सवय झाली आणि ते कशावरून वादावादी करत आहेत याचा अंदाजही यायला लागला. त्यांच्यात कसलीच दुष्मनी नव्हती, ती त्यांची स्टाइल होती हे लक्षात आले. </p><p>माझ्यात आणि मानबेंद्रामध्ये मात्र कधीच आणि कुठल्याच बाबतीत वाद झाले नाहीत. आम्ही दोघेही एकमेकांना पूर्ण आचारविचारस्वातंत्र्य देत होतो आणि समजूतदारपणा दाखवत होतो. कोलकात्याला मुंबईच्या मानाने तासभर आधी सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. त्यामुळे बंगाली लोक लवकर निजून लवकर उठत असतील असे कुणाला वाटेल. पण माझा मित्र तरी त्याच्या विरुद्ध वागायचा. तो रात्री उशीरापर्यंत जागायचा आणि सकाळी मी सगळी कामे आटोपून नाश्ता करून आलो तरी हा गादीवर लोळत पडलेला असायचा. मग तो घाईघाईत तयार होऊन कसाबसा क्लासमध्ये येऊन पोचायचा असे नेहमीच होत असे.</p><p>पण नंतर मात्र दिवसभर तो उत्साहाने भरलेला चैतन्यमूर्ती असायचा आणि सगळ्या बाबतीत पुढाकार घ्यायचा. तो मला थोडे बांगला शिकवायचा आणि माझ्याकडून मराठी भाषेचे धडे घ्यायचा. होस्टेलच्या गॅदरिंगमध्ये गाण्यासाठी त्याने मुद्दाम मराठी मित्रांना एक बंगाली गीत शिकवले होते. "बोलो बोलो बोलो शोबे, गीत बीना बेनू रोबे" असे काहीसे त्याचे बोल मला पन्नास वर्षांनी अजून आठवतात. </p><p>मी कोण आहे ? </p><div><div> भाग ३५ (आ)</div><div><br /></div><div>मानबेद्रला भेटायला येणाऱ्या बंगाली मुलांशी माझीही हळूहळू मैत्री झाली आणि तो तर माझ्या मराठी मित्रांचा जिगरी दोस्त होऊन गेला. या सगळ्या मित्रांनी एकदा पिकनिकला जायची टूम काढली. 'आमचे झोपडे' समुद्रकिनाऱ्यावरच असल्यामुळे कुणालाच दुसऱ्या एकाद्या बीचवर जायचे आकर्षण नव्हते, त्यापेक्षा आरे कॉलनीच्या जंगलात जायचे ठरले. तीनचार लोकांनी 'आरे' हे नाव तरी ऐकले होते, बाकीच्यांनी ते ऐकलेसुद्धा नव्हते. फक्त मीच शाळेत असतांना एकदा तिथे रहाणाऱ्या नातलगाला भेटायला गेलो होतो तेंव्हा तो रम्य परिसर पाहिला होता आणि तेंव्हा तो माझ्या मनात भरला होता. एवढ्या अनुभवावर मी आमच्या टोळक्याचा मार्गदर्शक झालो.</div><div><br /></div><div>त्यात आम्ही दहाबारा मित्र होतो आणि आमच्या बॅचमधल्या दोन मैत्रिणीही यायला तयार झाल्या. त्या होस्टेलवर रहात नव्हत्या म्हणून आम्ही बांद्रा स्टेशनवर एकत्र जमलो. त्या काळात आरे कॉलनीच्या आरपार जाणारी बससेवा नव्हती, कदाचित तसा रस्ताही नसेल, पण गोरेगाव स्टेशनवरून तिथे जाता येते हे मला पक्के आठवत होते. आम्ही सगळे लोकलने गोरेगावला गेलो आणि तिथून आरे कॉलनीला जाणारी बस घेतली. त्या अवाढव्य पसरलेल्या रानात आपण नेमके कुठे जायचे हे तर मलाही माहीत नव्हते. जिथपर्यंत बस जाते तिथपर्यंत जाऊन बघू असा विचार आधी केला, पण नंतर कंडक्टरलाच विचारले. त्याने आम्हाला वाटेतल्या एका स्टॉपवर उतरवून दिले. </div><div><br /></div><div>तिथून जवळच लहान मुलांसाठी घसरगुंड्या, झोपाळे, सीसॉ वगैरे खेळाची साधने दिसली, पण आम्ही तिथे पोचलो तेंव्हा कुणी मुले आली नव्हती. ती बहुधा संध्याकाळी येत असतील. मग आमच्या प्रत्येकाच्यात दडलेले 'मूल' जागे झाले आणि त्यांनी यथेच्छ हुंदडून घेतले. तिथे खूप प्रशस्त असे लॉनसारखे काही तरी होते. म्हणजे उंचसखल जमीनीवर अस्ताव्यस्त गवत वाढलेले होते. त्यात चारपाच किंवा सातआठजणांची दोनतीन टोळकी दूर दूर फतकल मारून बसली होती. ते बहुधा फॅमिलीवाले असावेत, त्यात लहान बाळांपासून आजीआजोबांपर्यंत सगळ्या वयोगटांचे लोक दिसत होते. त्या लोकांनी बसायला चटया किंवा तरटाची बसकुरे आणि मोठमोठे डबे भरून फराळ आणला होता.</div><div><br /></div><div>आम्हीही एक त्यातल्या त्यात सपाट मोकळी जागा पाहून तिथे रिंगण करून बसून घेतले. यापूर्वी मी कधीच अशा प्रकारच्या पिकनिकला गेलेलो नव्हतो. हा माझा पहिलाच अनुभव होता. आमच्यातली गिरगावात राहणारी मैत्रिण अनुभवी होती आणि थोडी तयारी करून आली होती. तिने सगळी सूत्रे हातात घेतली आणि काही पार्टी गेम्स खेळवले. त्या निमित्याने कुणाला गाणी गायला, कुणाला नाच करायला, कुणाला जोक सांगायला तर कुणाला नकला करायला लावले. </div><div><br /></div><div>तास दीड तास खेळल्यानंतर सगळ्यांना भुका लागल्या, पण आम्ही तर हात हलवतच गेलो होतो. मग एक कँटीन शोधून काढले आणि क्षुधाशांती झाल्यावर तिथला प्लँटही पाहिला. कन्व्हेयर बेल्टवरून रिकाम्या बाटल्या सरकत सरकत पुढे जातात. एका ठिकाणी तोटीने त्यांच्यात अर्धा लीटर दूध भरले जाते, त्यांना टोपण लावून सीलबंद केले जाते आणि त्या पुन्हा पुढेपुढे सरकत जातात हे पहायला तर कुणालाही गंमत वाटेल. आम्ही इंजिनियर असल्याने ती यंत्रे कशी चालतात हेही पाहून घेतले आणि लोकलना संध्याकाळची गर्दी व्हायच्या आत परत फिरलो. </div><div><br /></div><div>-----</div></div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ३६</div><div><br /></div><div>शोले या चित्रपटात एक असा प्रसंग दाखवला आहे. त्यात तुरुंगातून सुटलेले जय आणि वीरू ठाकुरच्या हवेलीत येताच त्यांच्यावर तीन चार धटिंगण हल्ला करतात. त्यांना लोळवून आत गेल्यावर "हे असले कसले स्वागत?" असे ते विचारतात तेंव्हा ठाकूर म्हणतो की तुमच्यातली रग अजून शिल्लक आहे का हे मी आजमावत होतो. </div><div><br /></div><div>आम्ही ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल झाल्यावर आमचीही थोडी अशीच गत झाली होती. उन्हाने भयंकर तापणाऱ्या पत्र्याच्या झोपडीत रहायचे, टेकडी चढून मेसमध्ये गेल्यावर तिथे पानात काय वाढून ठेवले असेल कोण जाणे, मुंबईच्या लोकलमधल्या गर्दीत घुसून मरीन लाईन्स स्टेशनवर उतरल्यावर दोन तीन जिने चढून क्लासरूममध्ये जायचे आणि अॅटॉमिक फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, रिअॅक्टर फिजिक्स यासारख्या एकापेक्षा एक रुक्ष आणि जटिल विषयांवरची भाषणे ऐकायची. ती देणारेही कोणी अनुभवी प्राध्यापक नसायचे. बहुतेक वेळा मुलांना शिकवण्याचा किंवा समजावून सांगण्याचा विशेष अनुभव नसलेले आमच्याहून जेमतेम चारपाचच वर्षांनी मोठे असलेले कुणी सायंटिफिक ऑफीसर तीनचार पानांच्या नोट्स काढून आणत आणि त्या वाचून दाखवत असत. </div><div><br /></div><div>आमचे इंजिनियरिंगचे बहुतेक सगळे विषय मुळात फिजिक्समधूनच निघालेले असले तरी मूलभूत पदार्थविज्ञान हा विषय तेंव्हा आम्हाला नव्हता. आता ते विषय शिकणे जरा जड जात होते. लेक्चर देणाऱ्यांचे मल्याळी किंवा बंगाली अशा कुठल्याशा अनोळख्या अॅक्सेंटमधले उच्चारच आधी पटकन नीट समजायचे नाहीत आणि फिजिक्सच्या परिभाषेतले काही विशिष्ट शब्द समजले तरी ते आमच्या ओळखीचे नसायचे. यामुळे बरेचसे व्याख्यान डोक्यावरून जात असे आणि डोक्यात शिरलेले तिथे जास्त वेळ रहात नसे. "हे सगळे आपल्याला झेपणे कठीण आहे" असे म्हणून काही मुलांनी पहिल्या महिन्यातच रामराम ठोकला. त्यांना दुसरी एकादी सोपी वाटणारी किंवा जास्त चांगली नोकरी मिळालीही असेल. आम्हला मिळालेल्या नोट्सचा चिकाटीने अभ्यास करून मी परीक्षेतून कशीतरी सुटका करून घेतली, पण आम्हाला ते गहन विषय तेंव्हा नीट समजले होते असे मला छातीवर हात ठेऊन सांगता येणार नाही. </div><div><br /></div><div>पण त्यामुळे निदान मला तरी पुढील आयुष्यात काहीच समस्या आली नाही. अणूभट्टीच्या रचनेपासून पुढे तिला सुरक्षितपणे चालवत ठेवण्यात फिजिक्सचा खूप महत्वाचा वाटा असत असला तरी त्यासाठी काही तज्ज्ञ आमच्या ऑफीसात तसेच प्रत्येक अणुशक्तीकेंद्रांमध्ये नियुक्त केलेले असत आणि तेच सगळे विश्लेषण करून निर्णय घेत असत. त्यांच्या कामात असेही महत्वाचे काहीतरी असते एवढे आम्हा इंजिनियरांना माहीत असावे एवढाच आम्हाला हे विषय शिकवण्यामागचा उद्देश असावा.</div><div><br /></div><div>----</div></div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ३७</div><div><br /></div><div>उच्च गणिताचा अवघड घाट चढून आणि उच्च भौतिकशास्त्राचे अंधारी बोगदे पार करून आमच्या प्रशिक्षणाची गाडी पठारावर आली तेंव्हा मी एक लहानसा सुटकेचा निःश्वास टाकला. समोर आलेले हे रिअॅक्टर इंजिनियरिंगचे पठार खूपच नयनरम्य होते. हा इटरेस्टिंग विषय शिकवण्यासाठी आम्हाला एस आर परांजपे नावाचे एक महापंडित लाभले होते. ते आमच्याहून जवळ जवळ पंधरा वर्षांनी मोठे आणि अनुभवी तर होतेच, बुद्धीमान आणि अभ्यासू वृत्तीचे होते, त्यांनी खूप जग पाहिलेही होते. त्या काळात अणुशक्ती हा फारच गोपनीय विषय समजला जात असे, सगळ्याच देशांनी त्याबद्दल आळीमिळी गुपचिळी धरलेली होती. तशातसुद्धा परदेशातली काही पुस्तके, मॅगेझिन्स, रिपोर्ट्स वगैरेंमधून जेवढी माहिती झिरपत होती ती सगळी या सरांनी टिपून घेतली होती. कुठकुठल्या देशांमध्ये कुठकुठल्या प्रकारच्या प्रायोजिक अणुभट्ट्या (रिसर्च रिअॅक्टर्स) आणि अणुविद्युतकेंद्रे (न्यूक्तियर पॉवर स्टेशन्स) उभारली गेली आहेत किंवा उभारली जात आहेत यांची यच्चयावत माहिती त्यांनी डोक्यात साठवली होती हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होते. </div><div> </div><div>ते इतके सीनियर आणि ज्ञानी असले तरी त्यांच्या वागण्यात मुळीसुद्धा ताठा नव्हता. ते आमच्यात मिसळून अत्यंत प्रेमाने सगळे काही छान हसत खेळत समजावून सांगत असत आणि विचारलेल्या कुठल्याही शंकेचे शांतपणे सविस्तर उत्तर देत असत. फक्त ते बोलत असतांना मध्येच एकाद्या अक्षरावर अडखळायचे आणि न्नन्नन्नन्न असे काहीतरी पुटपुटायचे. म्हणून काही उनाड मुलांनी त्यांना 'न्नन्नन्नन्न' असे टोपणनाव ठेवले होते, पण त्यांनाही मनातून परांजपे सरांबद्दल खूप आदर वाटत होता. त्यांनी रिअॅक्टर इंजिनियरिंगचा अर्धा भाग शिकवून संपवल्यानंतर त्यांचेच सहकारी दिवेकर सर आले. तेसुद्धा हुषार आणि माहीतगार होते, शिवाय स्मार्ट होते. वर्गाला चांगल्या प्रकारे सांभाळत होते. या दोघांनी मिळून आमच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्वाच्या या विषयाचा भक्कम पाया घातला आणि तो पुढे मला तरी खूपच उपयोगी पडला.</div><div><br /></div><div>श्री.परांजपे हे तेंव्हा अणुशक्तीकेंद्रामधील 'रिअॅक्टर इंजिनियरिंग' याच नावाच्या विभागातल्या 'फास्ट रिअॅक्टर' नावाच्या उपविभागाचे प्रमुख होते आणि श्री.दिवेकर उपप्रमुख होते. त्यांच्या हाताखाली आणखी काही सहाय्यक इंजिनियर काम करत होते. पण तोपर्यंत भारतात कुठेच अशा प्रकारचा रिअॅक्टर कार्यरत नव्हता किंवा उभारलाही जात नव्हता. पण लवकरच तो उभारण्याचे आराखडे आणि त्याची पूर्वतयारी करण्याचे काम हे लोक करत होते. ते बहुतेक सगळे काम ऑफिसात किंवा लायब्ररीत बसूनच होत असावे. त्या वेळी भारतातल्या इतर प्रकारच्या प्रायोजिक अणुभट्ट्या काम करत होत्या आणि दोन अणुविद्युतकेंद्रे उभारण्याचे काम सुरू होते आणि अनेक लोक त्यावर प्रत्यक्ष काम करण्यात व्यस्त होते. कदाचित म्हणूनच या दोघा वरिष्ठ लोकांना आम्हाला शिकवण्यासाठी पाठवले गेले असेल. पण ते आमच्यासाठी फायद्याचे होते. </div><div><br /></div><div>एकदा आमच्या हॉस्टेलमध्ये ठेवलेल्या मेजवानीला आमच्या काही व्याख्यात्यांना निमंत्रित केले होते, त्यात परांजपे सर आले होते. साहजीकच त्यांच्याभोवती विद्यार्थ्यांचा कोंडाळा जमा झाला. सरांनी आमच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. एका विद्यार्थ्याने त्यांना धिटाईने विचारले, "सर ट्रेनिंग झाल्यावर तुम्ही मला आपल्या सेक्शनमध्ये घ्याल का?" त्यावर त्यांनी हसत हसत मिश्किलपणे विचारले, "अरे, पण तुला चेस आणि ब्रिज खेळायला येतं का?" </div><div><br /></div><div>ट्रेनिंग संपून आम्ही नोकरीला लागल्यानंतर काही महिन्यांमध्येच अशी बातमी आली की फ्रान्सच्या सहकार्याने भारतात पहिला फास्ट रिअॅक्टर उभारायला सरकारची मंजूरी मिळाली आहे आणि त्यासाठी एका टीमला फ्रान्सला पाठवायचे ठरत आहे. आता सगळ्यांनाच परांजप्यांच्या सेक्शनमध्ये जायचे होते. त्यासाठी काही अनुभवी लोकांची निवड झाली आणि आमच्या बॅचच्या पाच मुलांनाही घेतले गेले. त्यांना आता एकदम इतके काम आले की चेस आणि ब्रिज खेळायला फुरसतच राहिली नाही. त्या पाचजणात माझे नाव आले नाही म्हणून मी काही काळ खट्टू झालो होतो, पण मला पुढे मिळालेले काम आणि संधी पाहता झाले तेच बरे झाले असे नंतर वाटले. </div><div><br /></div><div>-----</div></div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ३८</div><div><br /></div><div>उच्च गणिताचा अवघड घाट चढून आणि उच्च भौतिकशास्त्राचे अंधारी बोगदे पार करून आमच्या प्रशिक्षणाची गाडी रिअॅक्टर इंजिनियरिंगच्या नयनरम्य पठारावर आली तेंव्हा मलाही त्या प्रशिक्षणात मजा वाटायला लागली. त्या काळात म्हणजे सन १९६६-६७मध्ये युरोप आणि अमेरिकेतील प्रगत देशांमध्ये चार पाच प्रकारच्या अणुभट्ट्यांमधून प्रत्यक्ष वीजनिर्मिती होत होती आणि इतर चार पाच प्रकारच्या रिअॅक्टर्सवर प्रयोग चालले होते. आमच्या परांजपे आणि दिवेकर सरांनी यातल्या बहुतेक सगळ्यांची सविस्तर माहिती इतक्या छान प्रकारे रंगवून सांगितली की त्यांनी त्या सगळ्या रिअॅक्टर्सवर काम केले असावे असेच वाटत होते. ते दोघे तेंव्हा अणुशक्तीकेंद्रामधील 'रिअॅक्टर इंजिनियरिंग ' याच नावाच्या विभागात कामाला होते आणि तिथे रिअॅक्टर डिझाइन केले जातात असे सांगत. या सगळ्या प्रकारांच्या अनेक अणुभट्ट्यांचे डिझाइन तिथे चालले असेल अशी आमची भाबडी समजूत झाली. जेवणात कधी पुलाव, कधी रस्सा, तर कधी पुरीभाजी असावी त्याप्रमाणे हे लोक आलटून पालटून या किंवा त्या रिअॅक्टरचे काम करत असतील असेही वाटून गेले. ट्रेनिंग संपल्यावर आपण तर रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्येच जायचे हे मी मनोमन ठरवूनही टाकले आणि आपला चॉइस मिळवण्यासाठी परिक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवायच्या कामाला लागलो.</div><div><br /></div><div>रिअॅक्टर ही फक्त एक भट्टी असते आणि तिच्यात प्रचंड प्रमाणात ऊष्णता निर्माण होत असते, पण त्या ऊष्णतेचा उपयोग करून घेण्यासाठी आधी तिच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले जाते आणि तिचे विजेत रूपांतर केले जाते. त्यासाठी इतर अनेक उपकरणांची आवश्यकता असते. एक उदाहरण द्यायचे झाले तर प्रत्येक इंजिनमध्ये अशी व्यवस्था केली असते की एका वेळी पेट्रोलचे फक्त चारपाच थेंबच सिलिंडरमध्ये जातात, त्यांच्या ज्वलनामधून निघालेल्या ऊर्जेमुळे पिस्टन जोरात बाहेर ढकलला जातो, तो एका चक्राला फिरवतो आणि ते चक्रच पिस्टनला पुन्हा सिलिंडरच्या आत नेते. अशा प्रकारे तो पिस्टन पुढे मागे होत रहातो आणि ते चक्र फिरत राहते. पण त्या फिरत्या चाकाला मोटारीची चाके जोडून ती चालवायची असेल तर त्यासाठी इंजिनाशिवाय कार्ब्युरेटर, अॅक्सलरेटर, ब्रेक्स, स्टीअरिंग व्हील, गिअरबॉक्स, अॅक्सल रॉड, बॅटरी यासारखी कितीतरी साधने जोडावी लागतात. इंजिन हा जसा मोटारीचा फक्त एक सर्वाधिक महत्वाचा पण लहानसा भाग असतो, त्याचप्रमाणे अणुविद्युतकेंद्राच्या अवाढव्य पसाऱ्यात रिअॅक्टर हा सर्वाधिक महत्वाचा पण फक्त एक भाग असतो. इतर संयंत्रांची माहिती शिकणेही आवश्यक असते. </div><div><br /></div><div>----</div></div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ३९</div><div><br /></div><div>पणतीमधल्या तेलाचे सूक्ष्म कण भिजलेल्या वातीमधून वर चढून ज्योतीपर्यंत येतात आणि त्यांच्या ज्वलनामधून प्रकाश पडतो. मोटारीच्या टाकीतले पेट्रोल एका बारीक नळीनधून हळूहळू इंजिनात येते आणि लहानसे स्फोट करून इंजिनाला धडधडत ठेवते. बॉयलरच्या भट्टीत सतत थोडा थोडा कोळसा टाकला जातो, तो जळून निघालेल्या धगीमुळे पाण्याची वाफ होते. या सगळ्या उदाहरणांमध्ये थोडे थोडे इंधन जळून खाक होते आणि जाताजाता ऊष्णता देऊन जाते. जळत असलेल्या इंधनातला प्रत्येक कण जवळच्या दुसऱ्या कणांना पेटवतो आणि ती आग भडकत राहते. </div><div><br /></div><div>अणुभट्टीमध्येसुद्धा एका वेळी अगदी थोड्याच अणूंचे विखंडन किंवा भंजन होते आणि त्यातून खूप ऊष्णता बाहेर पडते, पण या भट्टीत कणाकणाने इंधन टाकून ते जाळता येत नाही. एका अणूच्या विखंडनामधून तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात आणि प्रकाशकिरणांसारख्या प्रचंड वेगाने ते तीन दिशांना फेकले जातात. हजारो अणूंच्या आरपार जात किंवा त्यांना धडकत धडकत इकडे तिकडे जात असतांना त्यातले दोन नाहीसे होतात आणि उरलेला एक न्यूट्रॉन भट्टीमधील इंधनाच्या दुसऱ्या एका अणूचे विखंडन करतो. तो दुसरा अणू पहिल्या अणूपासून दूर कुठेतरी असू शकतो. त्यामुळे ही साखळी चालू रहाण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात इंधन ठेवलेले असणे आवश्यक असते. हे इंधन कधीच जळून पूर्णपणे नाहीसे होत नाही. फक्त त्यातल्या थोड्या अणूंचे विखंडन होते पण ती इंधनाची कांडी जशीच्या तशीच राहते. विखंडनशील अणूंची संख्या कमी झाल्यानंतर इंधनाची ती कांडी अणूभट्टीच्या बाहेर काढून तिच्या जागेत नवी कांडी ठेवावी लागते. </div><div><br /></div><div>प्रत्येक अणूभट्टीचे डिझाइन करतांनाच त्यात किती इंधन ठेवायचे हे ठरलेले असते आणि तितके सगळे इंधन भरल्याशिवाय ती सुरूच होत नाही. बहुतेक सगळ्या अणुभट्ट्या एकदा सुरू झाल्यावर वर्ष दीड वर्ष पूर्ण क्षमतेनुसार काम करत रहातात. त्या काळात त्यांना आणखी इंधन द्यावे लागत नाही. एका प्रकारच्या अणुभट्टीला मात्र दर रोज दोन घास भरवावे लागतात, पण गरज पडल्यास तीसुद्धा महिनाभर उपाशीपोटी काम करत राहू शकते. हे सगळे थोडे आश्चर्यकारक वाटले तरी खरे आहे. जगातील सर्व अणूभट्ट्या याच तत्वावर चालत आल्या आहेत. अणूंच्या विखंडनानंतर ते इंधन रेडिओअॅक्टिव्ह होत असल्यामुळे त्याला अणूभट्टीच्या बाहेर काढण्यासाठी आणि त्यानंतरही विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी विशेष प्रकारची यंत्रणा उभी केली जाते. </div><div><br /></div><div>-----</div></div><div><br /></div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ४०</div><div><br /></div><div>पेटलेल्या निखाऱ्यांवर पाणी टाकले की ते विझतात, उन्हामुळे जमीन तापते पण नदीतले पाणी थंड राहते अशा अनुभवावरून पाणी आणि अग्नि ही एकमेकांविरुद्ध तत्वे आहेत किंवा शीतलता हा पाण्याचा धर्म आहे असे समजले जाते, पण पाण्याला तापत ठेवले की ते अग्नीशी दोस्ती करून स्वतःही तापत जाते आणि चटके देते. उकळून वाफ झाल्यावर तर त्यात एक वेगळीच भन्नाट अशी शक्ती येते. बंद डब्यात कोंडून ठेवलेली वाफ त्या डब्याला फोडून बाहेर येऊ पाहते. तीनशे वर्षांपूर्वी न्यूकॉम, जेम्स वॉट आदि मंडळींनी वाफेच्या शक्तीवर चालणारी स्टीमइंजिने तयार केली आणि वाफेच्या शक्तीचा उपयोग करून घेण्याची सुरुवात केली तेंव्हा जगातली औद्योगिक क्रांती सुरू झाली. आणखी दीड दोनशे वर्षांनंतर एडिसन आणि टेसला यांनी विजेची निर्मिती करून तिला घराघरात आणि कारखान्यांपर्यंत पोचवल्यावर औद्योगिक क्रांतीला तुफान वेग आला, तिने माणसाचे जीवनच पार बदलून टाकले.</div><div><br /></div><div>विजेपासून ऊष्णता निर्माण करणे अगदी सोपे आहे. विजेच्या प्रवाहाला विरोध करणाऱ्या धातूच्या तारेमधून विजेचा प्रवाह नुसता नेला तरी ऊष्णता आपोआप बाहेर पडते. दिवे, हीटर, गीजर वगैरेंमधून हे काम घरोघरी रोज केले जाते. पण मोठ्या प्रमाणातल्या ऊष्णतेचे थेट विजेत रूपांतर करण्याची किमया अजून तरी साध्य झालेली नाही. बहुतेक सगळ्या औष्णिक वीजनिर्मितिकेंद्रांमध्ये इंधन जाळून निर्माण होणाऱ्या ऊष्णतेपासून आधी पाण्याची वाफ तयार करतात आणि वाफेच्या शक्तीवर अजस्त्र अशी यंत्रे चालवून वीज तयार करतात. अणुशक्तीमधूनसुद्धा ऊष्णताच बाहेर पडते आणि तिचे विजेत रूपांतर करण्यासाठी हेच सगळे केले जाते. यासाठी त्या केंद्रांमध्ये अनेक प्रकारची यंत्रे बसवलेली असतात.</div><div><br /></div><div>इतर इंधनांवर पाणी शिंपडले तर असलेली आग विझते, पण अणुभट्टीमधल्या इंधनांना पाण्यात बुडवून ठेवले तर तिथले पाणी मात्र त्यांना ऊष्णता निर्माण करायला मदत करते अशी यात आणखी एक गंमत आहे. ते पाणी मदतही करते, पण त्यात ते स्वतःही तापते, त्यामुळे त्याला सतत रिअॅक्टरच्या आतबाहेर खेळवत ठेवावे लागते. यासाठी एक खूप मोठी यंत्रणा सज्ज केलेली असते. ट्रेनिंग स्कूलमध्ये आम्हाला या सगळ्यांची ओळख एका वेगळ्या विषयामध्ये करून देण्यात आली. </div><div><br /></div><div>---- </div></div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ४१</div><div><br /></div><div>निरनिराळ्या प्रकारच्या अणुभट्ट्यांची रचना आणि इतर माहिती आम्ही रिअॅक्टर इंजिनियरिंग या विषयात शिकत होतोच. अणुभट्टीमध्ये उत्पन्न होत असलेल्या ऊष्णतेचे विजेत रूपांतर करण्यासाठी जी इतर अनेक उपकरणे (इक्विपमेंट) लागतात त्यांची माहिती आम्हाला पॉवर प्लँट इंजिनियरिंग नावाच्या वेगळ्या विषयात शिकवली गेली. यातल्या काही उपकरणांचा अभ्यास आम्ही इंजिनियरिंग कॉलेमध्ये केला होता, त्याची उजळणी तर झालीच, पण खूप काही नवेही शिकायला मिळाले. कॉलेजमधले शिक्षण उपकरणांच्या माहितीसाठी होते तर इथले प्रशिक्षण त्यांच्या प्रत्यक्ष वापराशी संबंधित होते. </div><div><br /></div><div>१९६६-६७मध्ये मी जेंव्हा ट्रेनिंगस्कूलमधले प्रशिक्षण घेत होतो तोपर्यंत भारतात एकही अणुविद्युतकेंद्र (न्यूक्लियर पॉवर स्टेशन) काम करत नव्हते, पण महाराष्ट्रात तारापूर इथे पहिल्या अशा प्रकारच्या अणुभट्टीची उभारणी केली जात होती आणि राजस्थानमधील रावतभाटाजवळ दुसऱ्या प्रकारच्या अणुभट्टीचे काम नुकतेच सुरू झाले होते. यामुळे या दोन्हींसंबंधी तांत्रिक माहिती मिळायला लागली होती. तुर्भे येथील अनुसंधान केंद्रात ज्या प्रायोगिक अणुभट्ट्या (रिसर्च रिअॅक्टर्स) काम करत होत्या त्यातून निर्माण होणाऱ्या ऊष्णतेचे विजेत रूपांतर होत नसले तरी तिला समुद्राच्या पाण्यात नेऊन टाकण्याची मोठी यंत्रणा होतीच त्यातसुद्धा अनेक पंप, व्हॉल्हज, हीट एक्स्चेंजर्स, आयन एक्सेंजर्स वगैरे उपकरणे होती. त्यांच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव तिथे काम करणाऱ्या इंजिनियरांना होता. हे सगळे ज्ञानही रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्येच काम करत असलेल्या अभियंत्यांना होते. त्यातल्या काही लोकांनी येऊन आम्हाला त्या विषयावर व्याख्याने दिली. </div><div> </div><div>---- </div></div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ४२</div><div><br /></div><div>मी इंजिनियरिंग कॉलेजातले शिक्षण पूर्ण करून ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल झालो तेंव्हा वीस वर्षांचा होतो. माझ्या वर्गातली बरीचशी इतर मुलेसुद्धा माझ्यासारखीच वीस एकवीस वर्षांची असतील. पण काही मुलांनी उशीरा शाळेत जायला सुरुवात केली होती, काही जणांनी आधी बी एस सी करून नंतर इंजिनियरिंग केले होते आणि काहीजणांनी इथे येण्याआधी बाहेर १-२ वर्षे नोकरी केली होती. त्यांची वये आमच्याहून २-३ वर्षांनी जास्त होती. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा वयोगट २० ते २४ पर्यंत होता. यूपी बिहारमधल्या एकदोघांची तर लग्नेही झाली होती आणि त्यांना आपल्या कुटुंबाला घरी ठेऊन इथे हॉस्टेलमध्ये रहावे लागत होते.</div><div><br /></div><div>अणुशक्ती विभागात पाचदहा वर्षे काम करून तिथे रुजलेले काही अधिकारी आम्हाला निरनिराळे विषय शिकवायला येत असत ते वयानेही पाचदहा वर्षांनी आमच्याहून मोठे आणि जरा प्रौढ दिसत असत. एके दिवशी साधारणपणे आमच्याच वयोगटातले वाटणारे एक तरुण प्राध्यापक आम्हाला लेक्चर द्यायला आले. त्यांना पाहून वर्गातल्या मुलांना आधी जरासे आश्चर्य वाटले, पण कुशाग्र बुद्धीमत्ता, अपार ज्ञान आणि दांडगा आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी आपल्या पहिल्याच व्याख्यानात सर्वांवर गडद छाप पाडली आणि सर्वांची मने जिंकून घेतली. या उमद्या सरांचे नाव "अनिल काकोडकर" आहे असे समजल्यावर तर आमचा आनंद गगनात मावेना कारण आम्ही त्यांची कीर्ती ऐकली होती. ते व्हीजेटीआय या त्या काळातल्या सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंग कॉलेजचे टॉपर होतेच, बीएआरसी ट्रेनिंगस्कूलच्या त्यांच्या बॅचचेही टॉपर होते. ते पुढे जाऊन किती मोठमोठ्या पदांवर विराजमान होणार आहेत याची मात्र तेंव्हा आम्हाला कल्पना नव्हती.</div><div><br /></div><div> 'अणुशक्तीकेंद्रांमधली यंत्रसामुग्री' हा त्यांचा विषय तसा नाविन्यपूर्ण होता आणि त्यांनी तो अत्यंत मनोरंजक पद्धतीने चांगला समजाऊन सांगितला. त्यांनी दिलेल्या नोट्स पाहून तर आम्ही चकीतच झालो. १९६६ सालच्या त्या काळात फोटोकॉपीइंगचे तंत्र भारतातल्या बाजारात अजून आलेही नव्हते. तोपर्यंत मी तरी झेरॉक्स केलेला एक कागदसुद्धा पाहिला नव्हता किंवा असे काही तंत्रज्ञान अस्तित्वात आहे हेदेखील मी कधी ऐकले नव्हते. आमचे बाकीचे सगळे लेक्चरर सायक्लोस्टाईल केलेले करड्या रंगाचे खरखरीत कागद वाटत होते. त्यामुळे काकोडकरांनी दिलेल्या पांढऱ्याशुभ्र आणि गुळगुळीत कागदांवर सुबक अक्षरांमध्ये छापलेल्या सचित्र नोट्स पाहून सर्वांनाच त्याचे मोठे अप्रूप वाटले. त्या काळात बीएआरसीसारख्या उच्च दर्जाच्या संशोधन संस्थेत झेरॉक्सचे एकादे यंत्र नवीनच आणले गेले असेल आणि तिथेही अगदी निवडक लोकांनाच ते उपलब्ध होत असेल. श्री.काकोडकरांनी मुद्दाम प्रयत्न करून आमच्यासाठी त्या सुबक कॉपीज काढवून घेतल्या असणार.</div><div><br /></div><div>---- </div></div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ४३ </div><div><br /></div><div>यंत्रे तयार करतांनाच त्यांच्या कामावर चांगले नियंत्रण ठेवण्याची तजवीजही केली तरच त्यांचा उपयोग करता येतो. मोटारीला नुसतीच चाके आणि इंजिन बसवून ते सुरू केले तर ती मोटार चालेल पण कुठेही जाऊन धडकेल. तिच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अॅक्सेलरेटर, ब्रेक्स, क्लच, गीअर्स वगैरे आणि तिला योग्य मार्गावरून नेण्यासाठी स्टीअरिंग व्हील यासारखी अनेक उपकरणे जोडतात आणि ती चालकाला बसल्या जागेवरून सहजपणे वापरता येतील अशा बेताने त्याच्या हातापायांच्या जवळ बसवतात म्हणून तो माणूस मोटार चालवू शकतो. चालकाचे काम सोपे आणि अचूक व्हावे यासाठी या सर्वांमध्ये खूप सुधारणा होत गेल्या आणि आज तर चालकाशिवाय चालणारी मोटारगाडीही तयार झाली आहे. अशी विनापायलट उडणारी छोटी विमाने पूर्वीच तयार केली गेली होती. मोठ्या प्रमाणावर मोटारींचे एकसारखे भाग एकापाठोपाठ तयार करणारी ऑटोमॅटिक यंत्रे मी कॉलेजात शिकत असतांनाच कारखान्यांमध्ये काम करत होती. रासायनिक कारखान्यांमध्ये अनेक द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थांचे तापमान, दाब, प्रवाह इत्यादींवर सतत काटेकोर नियंत्रण ठेवावे लागते. ते साधण्यासाठी स्वयंचलित यंत्रणाच करावी लागते. अणुभट्टीची रचना साधारणपणे रासायनिक कारखान्यांसारखीच असते. त्यातले शीतनक, मंदयक वगैरेंचे तापमान, दाब, प्रवाह वगैरेंवर काटेकोर नियंत्रण ठेवायचे असतेच. शिवाय अणुविखंडनाची प्रक्रिया नियंत्रणात ठेवणे हे मुख्य काम असते. </div><div><br /></div><div>आपल्या टॉयलेटमधल्या फ्लश टँकची साखळी ओढताच किंवा बटन दाबताच त्यातले पाणी खाली वाहून तो रिकामा होतो, पण लगेच आपोआप एक नळ सुरू होऊन तो टँक पाण्याने भरला जातो आणि तो भरला की नळ आपोआप बंद होतो. ही आपल्या ओळखीची सोपी नियंत्रण क्रिया असते. मोठ्या इमारतींच्या तळाशी एक मोठी भूमिगत टाकी असते. महापालिकेकडून नळामधून येणारे पाणी त्या टाकीत पडत जाते. तिथून पंपाने ते गच्चीवरल्या टाकीत चढवले जाते आणि तिथून ते निरनिराळ्या घरांमध्ये पुरवले जाते. या दोन्ही किंवा अशा अनेक टाक्यांमधील पाण्याची पातळी पहाणे आणि त्यानुसार पंप सुरू किंवा बंद करणे कुणालाही कठीण आहे. एकटा माणूस ते करू शकणार नाही. म्हणून यासाठी एक स्वयंचलित व्यवस्था केली जाते. सोसायटीचा वॉचमन त्यावर फक्त लक्ष ठेवतो.</div><div><br /></div><div>हे पंप दिवसातून एक दोन वेळाच सुरू आणि बंद करावे लागतात. आपल्या रेफ्रिजरेटरमधले तापमान कमाल मर्यादेवर आले की त्याचा काँप्रेसर आपोआप सुरू होतो आणि ते किमान मर्यादेवर येताच तो बंद होतो असे दिवसरात्र चाललेले असते. अशा प्रकारच्या नियंत्रणाला 'ऑन ऑफ कंट्रोल' म्हणतात. बॉयलरमध्ये एका बाजूने सतत पाणी आत येत असते आणि दुसऱ्या बाजूने वाफ बाहेर पडत असते. त्यांचे नियंत्रण करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे कंट्रोल असतात. कंट्रोल इंजिनियरिंग या नावाचे एक मोठे शास्त्रच विकसित झाले आहे. याच नावाच्या एका वेगळ्या विषयात आम्हाला त्या शास्त्राची ओळख करून देण्यात आली. या नियंत्रणामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा फार महत्वाचा सहभाग असतो म्हणून आम्हाला अगदी मुळापासून तो विषयही शिकवला गेला. या विषयाची थोडी जुजबी ओळख इंजिनियरिंग कॉलेजात झाली असली तरी ती तेवढ्यात कालबाह्य झाली होती. त्यामुळे आम्हाला पुन्हा नव्याने शिकावी लागली. </div></div><div>-----</div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ४४ </div><div><br /></div><div>अणुशक्ती या विषयाबद्दल जगभरात अगदी सुरुवातीपासून कमालीची गुप्तता बाळगलेली होती. आज आपल्याला गूगलवरून शोधल्यास खूप माहिती मिळते, पण पन्नास वर्षांपूर्वी तशी परिस्थिति नव्हती. अशा विषयावर भारतात कुणी पुस्तके लिहून ती प्रकाशित करणे तर शक्यच नव्हते. परदेशातले लेखकसुद्धा जरा जपूनच लिहित असत आणि ती पुस्तके भारतातले दुकानदार कुणासाठी आणणार? त्यामुळे जे लोक परदेशात जाऊन आलेले असत त्यांनी आणलेली माहिती आणि अणुशक्ती विभागासारख्या सरकारी संस्थांना त्यांच्या सूत्रांकडून मिळणारी माहिती यावरच सगळा भर होता.</div><div><br /></div><div>जिथे माहितीसुद्धा सहजपणे मिळत नव्हती, तिथे यासाठी लागणारे विशिष्ट पदार्थ कसे मिळणार ? ते खुल्या बाजारात विक्रीला ठेवलेले नसत. यामुळे अगदी सुरुवातीपासून सगळ्या बाबतीत आत्मनिर्भरतेवर भर दिला जात होता. युरेनियम, थोरियम, झर्कोनियम यासारखे काही विशिष्ट धातू भूगर्भात कुठे दडलेले आहेत हे शोधणे, त्यांची खनिजे बाहेर काढून त्यांचे शुद्धीकरण करणे, त्या धातूंना किंवा त्यांच्या संयुगांना हवा तसा आकार देऊन त्यांना उपयोगात आणणे अशासारख्या विषयांवरही आमच्या प्रयोगशाळांमध्ये संशोधन चालले होते आणि त्यात लक्षणीय अशी प्रगति झाली होती. या कामांसाठी काही लहान कारखानेसुद्धा उभारले जात होते. ट्रेनिंग झाल्यानंतर आमच्यातला कोण कुठल्या विभागात काम करायला जाणार आहे हे माहीत नसल्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांना थोडे प्रशिक्षण देऊन तयार केले जात होते. यासाठी धातुशास्त्र (मेटॅलर्जी) आणि रासायनिक अभियांत्रिकी (केमिकल इंजिनियरिंग) अशासारखे काही विषयही आम्हाला शिकवले गेले.</div><div><br /></div><div>----- </div></div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ४५ </div><div><br /></div><div>आमचे क्लासरूममध्ये बसून शिकायचे शिक्षण संपत आल्यावर आम्हाला प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासाठी बी.ए.आर.सी मध्ये पाठवण्यात आले. मेटॅलर्जी, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल इंजिनियरिंग यासारख्या शाखांमधल्या प्रशिक्षणार्थींना तशा प्रकारचे काम ज्या विभागांमध्ये केले जात होते तिकडे पाठवले गेले. मेकॅनिकलचे विद्यार्थी संख्येने जास्त होते आणि त्या नावाची कुठली डिव्हिजन तिथे नव्हती. काही मुलांना सेंट्रल वर्कशॉपमध्ये तर काही जणांना रिअॅक्टर ऑपरेशन्स डिव्हिजनमध्ये काम करायला पाठवले. मला आणखी सातआठ मुलांबरोबर इंजिनियरिंग हॉल क्र.३, रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये पाठवले गेले. </div><div><br /></div><div>श्री.परांजपे, श्री.दिवेकर, श्री.काकोडकर, श्री.वेंकटराज वगैरे आम्हाला शिकवायला येऊन गेलेले बरेचसे सर त्या काळात या हॉल नंबर ३ मध्ये काम करत होते. आमच्यावर त्यांचा मोठा प्रभाव पडलेला होता. मी तर ट्रेनिंग संपल्यावर संधी मिळाली त्यांच्याबरोबरच काम करायचे असे ठरवून टाकले होते. त्यामुळे आम्हालाही त्यांची डिव्हिजन पहाण्याची उत्सुकता होती. आम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी तिथे जायचे आहे हे समजल्यावर मला खूप आनंद झाला.</div><div><br /></div><div>त्या हॉलमध्ये एका बाजूला तीन मजल्यांवर एका ओळीत अनेक लहान खोल्या होत्या आणि त्या खोल्यांमध्ये टेबलांनाच ठोकलेली पाच फुटी पार्टीशन्स घालून खूपच छोट्या केबिन्स तयार केल्या होत्या. तिथे बसून हे लोक काम करत असत. मुख्य हॉलमध्ये अनेक लहानमोठे लूप होते. प्रत्येक लूपमध्ये पंप, व्हॉल्व्हज, व्हेसल्स आणि गुंतागुंतीचे पाइपिंग व अनेक प्रकारची इन्स्ट्रुमेन्ट्स लावलेली होती. त्यातले थोडेच लूप तेंव्हा काम करत होते आणि बाकीचे अजून अपूर्ण होते, त्यांच्यासाठी काही उपकरणे अजून यायची होती. जे लूप पूर्ण झालेले होते तेसुद्धा विशिष्ट प्रयोग करण्यासाठी कधी तरी थोडा वेळच चालवले जात असत. यामुळे आम्हाला रोज उभे राहून काही प्रत्यक्ष काम करण्यासारखे तिथे काही कामच नव्हते. आम्ही एकेका इंजिनियरला जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा गाठून त्यांच्याकडून त्यांच्या लूपची माहिती विचारून घेतली. त्यात कसले प्रयोग करणार आहेत आणि त्यातून कोणती नवी माहिती मिळवायची आहे वगैरे त्यांनी अगदी त्रोटकपणे सांगितले. हे बहुतेक सगळे इंजिनियर दिवसभर आपापल्या केबिनमध्ये बसून नव्या रिअॅक्टर्सच्या डिझाइनच्या संबंधित काम करत होते, त्यातला काही भाग गोपनीय होता आणि काही इतका क्लिष्ट होता की तो नवख्या मुलांना समजावून सांगता येण्यासारखा नव्हता. त्यांच्या इवल्याशा केबिनमध्ये बसायला जागाही नव्हती. त्यांना आमच्या मदतीची गरज नव्हती आणि आमचा उपयोगही नव्हता असे दिसत होते. त्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव असा मिळाला नाही पण प्रशिक्षणाचा भाग म्हणून आम्हालाही काहीतरी करायचे होते. तिथल्या कॉन्फरन्स रूममध्ये बसून थोडे वाचन आणि त्यावर चर्चा करत आम्ही ते प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण केले. मात्र या काळात तिथल्या महत्वाच्या लोकांच्या ओळखी झाल्या त्याचा पुढे उपयोग झाला.</div></div><div><br /></div><div>-----</div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ४६</div><div><br /></div><div>ट्रेनिंग स्कूलमध्ये आम्हाला दरमहा ३०० रुपये स्टायपेंड मिळत होता. खोलीचे भाडे आणि आरोग्य सेवा यासाठी त्यातले थोडे पैसे कापून घेऊन उरलेली रोख रक्कम एक तारखेला आमच्या हातात मिळत असे. त्या दिवशी सगळे जण "खुश है जमाना आज पहली तारीख है।" म्हणत चांगल्या मूडमध्ये असत. आमच्या खात्याचे खजिनदार ज्या खोलीत हे वाटप करीत त्याच खोलीत बाजूला दोन खुर्च्या आणि टेबले मांडून आमचे मेस सेक्रेटरी व कल्चरल सेक्रेटरी बसलेले असत. पगारातले जवळजवळ अर्धे पैसे महिनाभराच्या मेसमधल्या जेवणाखाण्याचे बिल देण्यात जात आणि क्रीडा व सांस्कृतिक कार्यासाठी पाच दहा रुपये दक्षिणा देऊन उरलेले सव्वा ते दीडशे रुपये पाकिटात ठेवल्यावर खिसा गरम झाल्यासारखे वाटायचे. इंजिनियरिग कॉलेजमध्ये शिकत असतांना माझे महिन्याचे पूर्ण अंदाजपत्रकच शंभर रुपयांच्या आत असायचे, त्या मानाने हे पैसे जास्तच होते. मुख्य म्हणजे हे सर्वस्वी माझ्या कमाईचे होते, त्यातून बचत करून काही पैसे घरी पाठवण्याची जबाबदारीही माझ्यावर नव्हती आणि ते मी मनासारखे खर्च करू शकत होतो, कुणाला त्याचा हिशोब देण्याची गरज नव्हती, यातला आनंद सर्वात जास्त होता.</div><div><br /></div><div>ट्रेनिंग स्कूलमधले माझे सगळे मित्र मध्यमवर्गीयच होते. जे माझ्यासारखे ओढाताणीच्या परिस्थितीतून आले होते ते आनंदात होते आणि बऱ्या परिस्थितीतून आलेले थोडी कुरकुर करत होते, पण जमवून घेत होते. दोन चार 'बडे बापके बेटे' आपापल्या पिताश्रींकडून पैसे आणून मजेत रहात होते, पण ते माझे मित्र नव्हते.</div><div><br /></div><div>वांद्र्यातल्या हॉस्टेलपासून मरीन लाइन्स इथल्या क्लासरूमपर्यंत जाण्यायेण्याची आणि दुपारच्या भोजनाची सोय मला या पैशातूनच करायची होती. काटकसरीने वागून ते शक्य होत होते, पण चैन करण्यासाठी फारसा वाव नव्हता. त्या काळात सिनेमा पाहणे आणि भेळपुरी, शीतपेय किंवा आइसक्रीम एवढीच आमचीही चैनीची मर्यादा होती आणि तेवढी चैन मी करून घेऊ शकत होतो. चर्चगेटपासून मुंबई सेंट्रल पर्यंतच्या भागातच मुंबईतली सगळी मुख्य थिएटरे होती आणि तिथे लागलेले बहुतेक सगळे चांगले सिनेमे आम्ही पहात होतो. त्या काळात एकदा पिक्चर लागला की तो रौप्यमहोत्सव केल्याशिवाय निघत नसे आणि एकच सिनेमा पुन्हा पुन्हा पाहण्याची हौस मला कधीच नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षात या सगळ्या थिएटरांना मी वर्षभरातून एक दोनच भेटी दिल्या असणार. त्याशिवाय दहा पंधरा वर्षांपूर्वीपासून लागून गाजलेले बरेचसे सिनेमे मी आधी पाहू शकलो नव्हते, ते मॅटिनी शोजमध्ये पाहून मी माझा अनुशेष (बॅकलॉग) भरून काढला. आता मीसुद्धा दिलीपकुमार, देव आनंद, राजकपूर, अशोककुमार वगैरेंवर धडाधड बोलू शकत होतो. माझ्या त्याआधीच्या आयुष्यात मी एकंदर जितके सिनेमे पाहिले होते त्याहून जास्त मी या एका वर्षात पाहिले आणि त्यानंतर पुन्हा कुठल्याही वर्षात मी तितके चित्रपट पाहिले नाहीत. </div><div><br /></div><div> -----</div></div><div><br /></div><div><div><br /></div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ४७</div><div><br /></div><div>ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यायच्या वेळी आमच्याकडून एक बाँड लिहून घेतला होता. त्यानुसार एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर वैज्ञानिक अधिकारी म्हणून तीन वर्षे नोकरी करणे आम्हाला बंधनकारक होते. पण सरकारवर कुठलेच बंधन नव्हते. ते आम्हाला कधीही डच्चू देऊ शकत होते. असा एकतर्फी करार कायद्याला धरून नाही असे कोणा कायदेतज्ञाचे मत आहे असे मला काही वर्षांनंतर समजले. पण बाँडवर सही केल्याशिवाय प्रवेशच मिळणार नसल्यामुळे त्या वेळी तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी त्यावर राजीखुशीने सह्या केल्या होत्या.</div><div><br /></div><div>ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला सरकारी नियमांप्रमाणे आचारसंहिता पाळायची होती. त्यात शिस्त आणि गोपनीयता यांना खूप महत्व होते. आमचे हेडमास्तर फारच कडक शिस्तीचे भोक्ते होते. आधीच्या कुठल्याशा बॅचमधल्या दोन तीन मुलांनी त्यांच्याशी वितंडवाद घातला एवढ्या कारणावरून शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना तडकाफडकी हाकलून दिले गेले होते अशी अफवा प्रशासनातल्या लोकांनीच पसरवून दिली होती, यामुळे सगळी मुले या हेडमास्तरांना टरकून होती. हे ऑफिसमधले लोक आमच्यावर हेरगिरी करतात की काय असा दाट संशयही आम्हाला सुरुवातीला वाटायचा. पण ते लोक चांगले आणि मनमिळाऊ होते, त्यांनी कुणाची चुगली केल्याचे दिसले नाही हे पाहिल्यावर आमची त्यांच्याशी दोस्ती झाली.</div><div><br /></div><div>सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा आणि परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवावेत अशी अपेक्षा होती. वर्षभराच्या सगळ्या परीक्षांमध्ये मिळून अमूक इतके टक्के मार्क मिळाले तर एस सी टू ही ग्रेड मिळणार होती आणि कमी पडले तर एस सी वन ही. या दोन्ही श्रेणींची सुरुवात ४०० रुपयांवरच होत होती, पण वार्षिक पगारवाढीत थोडा फरक होता आणि पुढील बढतीच्या संधींमध्ये जास्तच फरक पडणार होता. कुणाला फारच कमी मार्क पडले तर त्याला यातली कुठलीच ग्रेड मिळणार नव्हती. पण त्यासाठी ते वर्षभर थांबले नाहीत. पहिल्या तीनचार महिन्यांमध्ये झालेल्या परीक्षांमधील असमाधानकारक कामगिरीवरूनच तीन चार मुलांना घरी पाठवण्यात आले. त्यात माझाही एक मित्र होता.</div><div><br /></div><div>तो बहुधा टेक्निकल स्कूलमधून पॉलिटेक्निकला आणि डिप्लोमा करून इंजिनियरिंगला आला होता. त्यामुळे त्याचा विज्ञानशाखेतल्या विषयांचा पाया कच्चा राहिला होता आणि त्यातले बरेचसे फंडे त्याला माहीत नव्हते. सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि तिच्याभोवती चंद्र, याप्रमाणे कल्पना करून त्याने पेपरात अणूची रचना दाखवतांना मधोमध एक न्यूट्रॉन, त्याच्याभोवती फिरणारा एक प्रोटॉन आणि त्याभोवती एक इलेक्ट्रॉन असे चित्र काढले होते. ट्रेनिंगच्या सुरुवातीलाच असलेले बीएससी किंवा एमएससी लेव्हलचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित हे विषय त्याला नीट समजत नव्हते आणि त्याने ते समजून घ्यायचा विशेष प्रयत्नही केला नव्हता. पण त्याचा असा परिणाम होईल अशी कदाचित त्याला कल्पना नव्हती. एका मुलीने मात्र बहुधा मुद्दामच कमी गुण मिळवून बाँडमधून सुटका करू घेतली असावी. ती लग्न करून नवऱ्यासोबत अमेरिकेला चालली गेली असे त्यानंतर काही महिन्यांमध्येच आमच्या कानावर आले. </div><div><br /></div><div>------</div></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ४८</div><div><br /></div><div> ट्रेनिंग स्कूलमध्ये दर शनिवारी एक दोन विषयांचे पेपर द्यायचे होते. त्याआधी झालेल्या दहा बारा व्याख्यानांमधून जेवढे शिकवले गेले असेल तेवढ्याच पोर्शनवर प्रश्न येत असत. सगळे व्याख्याते दोन चार पानांच्या नोट्स वाटत असत आणि त्याशिवाय मी काही महत्वाचे मुद्दे, फॉर्म्यूले वगैरे नोटबुकामध्ये लिहून घेत असे. लक्ष देऊन सगळे ऐकले आणि समजले असले तर या गोष्टी एकदा नजरेखाली घालणे पुरेसे असायचे. मी तरी त्याशिवाय रात्री उशीरापर्यंत जागून किंवा भल्या पहाटे उठून काही तयारी केली नाही. आम्ही रमी खेळण्यात रात्री जागवल्या असतील, पण अभ्यासासाठी कधीच नाही. तरीही मला ७०-७५टक्के मार्क मिळत होते. </div><div><br /></div><div>मी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असतांनाच्या काळात आमच्या पुणे विद्यापीठात ६०% गुण मिळाल्यावर पहिला वर्ग मिळत असे आणि ६६% मार्कांवर विशेष गुणवत्ता (डिस्टिंक्शन) मिळत असे ती फारच थोड्या मुलांना मिळत असे. कुणाला ७०% मार्क मिळाले असे आम्ही कधी ऐकले नाही. त्यामुळे ट्रेनिंग स्कूलमध्ये मिळत असलेल्या मार्कांवर मी खूष होतो. आमच्या वर्गातल्या आणखी आठ दहा मुलांनाही माझ्यासारखे गुण मिळत होते. बरीचशी मुले साठीमध्ये असत. इंजिनियरिंग स्ट्रीममध्ये एस सी टू ग्रेड मिळवणे सहज सोपे होते. अपवादास्पद एक दोन मुलांनाच ती मिळाली नाही. सायन्स स्ट्रीममधल्या परीक्षा जास्त कठीण असाव्यात. ती मुले थोड्या टेन्शनमध्ये दिसत असत आणि बऱ्याच मुलांना एस सी वन ग्रेड मिळाली असे कानावर आले.</div><div><br /></div><div>आमच्या मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या बॅचमध्ये रामकृष्णन नावाचा एक अत्यंत कुशाग्र बुद्धीचा पण अबोल आणि शांत मुलगा होता. त्याने वर्गात कधीही आपली जास्त हुषारी दाखवली नाही किंवा तो कुठल्याही तात्विक वादावादीत भाग घेत नव्हता. इतर काही मुले तावातावात आपली बाजू मांडत असत, पण या मुलाने आवाज चढवून बोललेले मी कधीच ऐकले नाही. पण या पठ्ठ्याने सुरुवातीपासूनच ८०-८५ टक्क्यांच्याही वर मार्क्स मिळवायला सुरुवात केली आणि त्याचाही कधीच बोलण्यात उल्लेख केला नाही. दुसऱ्या चौकस मुलांनीच त्याची दखल घेतली तोपर्यंत त्याने इतरांवर प्रचंड आघाडी घेतली होती आणि ती शेवटपर्यंत टिकवून धरली. यामुळे पहिला नंबर तोच पटकावणार यात काही शंकाच नव्हती आणि दुसरा कोणी स्पर्धक त्याच्या जवळपासही नव्हता.</div><div><br /></div><div>पहिल्या क्रमांकाच्या मुलांना होमी भाभांच्या नावाने एक लहानसे बक्षिस ठेवले होते आणि ट्रेनिंग संपल्यावर त्यांना हव्या असेल त्या विभागात नोकरीची जागा मिळणार होती. पण तिथे रौप्य किंवा कांस्यपदक ठेवलेलेच नव्हते. दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर येणारा आणि सर्वात शेवटी येणारा हे सगळे एकसारखेच होते. आम्हाला ट्रेनिंग स्कूलमधील कामगिरीसाठी कसलेही प्रमाणपत्र किंवा मार्कशीटसुद्धा मिळणार नव्हते आणि मिळालेही नाही. मी ट्रेनिंगस्कूलचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असे दाखवणारा कुठलाही कागदोपत्री पुरावा मला कधीच मिळाला नाही. </div><div><br /></div><div>------</div></div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ४९</div><div><br /></div><div>मी इंजिनियरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होतो तेंव्हाच भारताचे एक थोर शास्त्रज्ञ डॉ.होमी जहांगीर भाभा यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले अशी एक धक्कादायक बातमी आली. त्यावेळी डॉ.भाभा आणि अणुशक्ती यांच्याबद्दल वर्तमानपत्रांमध्ये बरेच काही छापून आले होते, पण पुढे माझा त्यांच्याशी जन्मभराचा संबंध जुळणार आहे याची पुसटशी कल्पना मला नव्हती त्यामुळे मी ते जास्त लक्ष देऊन वाचले नव्हते आणि ते मला फारसे समजले नव्हते. मी ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र तिथला जो भेटेल तो डॉ.भाभांची प्रचंड स्तुति करत होता. रोजच या ना त्या विषयावरून त्यांचा उल्लेख केला जात होता.</div><div><br /></div><div>ते श्रीमंत घराण्यात जन्माला आले होते. शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि तिथे राहून शास्त्रीय संशोधन करायला लागले. त्यांनी नक्की कसले शोध लावले हे मला समजेल अशा भाषेत मला कोणी सांगितले नाही, पण मोठमोठ्या जगप्रसिद्ध अशा शास्त्रज्ञांबरोबर त्यांच्या ओळखी झालेल्या होत्या. भारतात परत आल्यावर त्यांनी टाटांच्या मदतीने बंगळूरु आणि मुंबई इथे संशोधनसंस्था स्थापन केल्या. तिथे विज्ञानावर मूलभूत संशोधन सुरू झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी थेट प्रधानमंत्री पं.नेहरू यांच्याशी मैत्री केली आणि त्यांच्या सहाय्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीतच अॅटॉमिक एनर्जी कमिशन सुरू केले. अणुशक्तीविषयीचे विज्ञान तसेच तंत्रज्ञान यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या आयोगामार्फत अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्राँबे (ए ई ई टी) ही मोठी संस्था स्थापन केली गेली. या एईईटीच्या ट्रेनिंग स्कूलमध्येच आम्ही प्रशिक्षण घेत होतो. </div><div><br /></div><div>जानेवारी १९६७मध्ये एक दिवस आम्हा सर्वांना ट्राँबेला नेण्यात आले. तिथे काम करत असलेले बहुतेक सगळे लोक एक मोठ्या लॉनमध्ये जमले होते. व्यासपीठावर डॉ.साराभाई, डॉ.सेठना, डॉ.रामण्णा वगैरे मोठी माणसे होतीच, त्यावेळच्या प्रधानमंत्री माननीय इंदिरा गांधी प्रमुख पाहुण्या होत्या. मी या सर्वांना तेंव्हा पहिल्यांदाच पहात होतो. सर्वांनी डॉ.होमी भाभा यांच्या आठवणी काढून त्यांना आदरांजलि वाहिली आणि एईईटीचे नामांतर बीएआरसी असे केले आहे असे जाहीर केले. मग आमचे ट्रेनिंग स्कूलही 'बीएआरसी ट्रेनिंग स्कूल' झाले.</div></div><div><br /></div><div>------</div><div><br /></div><div><br /></div><div><div>मी कोण आहे ? </div><div> भाग ५०</div><div><br /></div><div>ट्रेनिंग स्कूलमध्ये वर्षभर प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि त्या काळात असंख्य चाचण्या किंवा परीक्षांना तोंड दिल्यावर शेवटी निकालाचा दिवस आला. आम्हाला निरनिराळ्या पेपरांमध्ये मिळालेले गुण त्यापूर्वीच सर्वांना माहीत झालेले होते आणि त्या सर्वांचा एकत्र असा परिणाम औपचारिक रीत्या देण्याचीही काही योजना नव्हती. त्यामुळे तो परीक्षेचा निकाल नव्हता, एक ऑगस्टपासून कोण कुठे नोकरीला लागणार आहे हे या निकालाच्या दिवशी ठरणार होते. </div><div><br /></div><div>त्याच्या आधीच आपल्याला कुठे कुठे पाठवले जाण्याची शक्यता आहे याची माहिती सगळ्यांनी मिळवली होती. त्या सुमाराला राजस्थानमधील कोटा या शहरापासून काही अंतरावर नवे अणुविद्युत केंद्र उभारण्याच्या कामाला सुरुवात होऊन त्या कामाला वेग आला होता. त्यासाठी जितके मिळतील तितके इंजिनियर हवेच होते असे कळले. हे ऐकून सगळ्या उत्तर भारतीय मुलांना लॉटरी लागल्यासारखा आनंद झाला. सगळ्याच मुलांना आईवडिलांच्या शक्य तितक्या जवळ रहायची इच्छा तर होतीच. म्हणजे त्यांना वरचेवर घरी जाणे येणे शक्य होणार होते. त्या काळात मुंबईहून उत्तर भारतात जाण्यासाठी फार कमी रेल्वेगाड्या होत्या आणि त्यांमध्ये स्लीपरचे डबेही अगदी थोडे असायचे. त्यामुळे त्यात आरक्षण मिळवणे हे एक मोठे दिव्य असायचे. कोट्यापासून पुढे जाणे त्या मानाने सोयीचे असेल असे त्यांना वाटत होते. त्याशिवाय मुंबईत रहाण्याच्या जागेचा मोठा प्रॉब्लेम होता. प्रॉजेक्ट साइटवर काम करणाऱ्या सगळ्यांच्या रहाण्याची व्यवस्था करणे ही सरकारची जबाबदारी होती. तो प्रश्नच नव्हता. यामुळे सगळ्या हिंदी आणि पंजाबी भाषिक मुलांनी कोट्याला जायचे ठरवून टाकले. त्यासाठी तिथे जाऊन रखरखत्या उन्हात काम करायची त्यांची तयारी होती.</div><div><br /></div><div>केरळमधल्या थुंबा नावाच्या खेड्यात एक लहानसे रॉकेट लाँचिंग स्टेशन होते. तिथे असे किती इंजिनियर हवे असणार ? असे म्हणून इतर राज्यातल्या मुलांनी तिकडे लक्षही दिले नाही. केरळमधून आलेल्या दोन्ही मुलांना मात्र आपल्या घरापासून जवळ म्हणून तिथे जायचे होते. त्या वेळी कल्पकम हे नावही कुणी ऐकले नव्हते आणि तिथे काही मोठे प्रकल्प होणार आहेत याचीही कुणाला माहिती नव्हती. तिथे जाण्याचा पर्याय उपलब्ध नव्हताच. दक्षिण भारतीय किंवा बंगाली मुलांना कोट्यासारख्या ठिकाणाहून आपल्या घरी जाण्यासाठी थेट रेल्वेगाड्या नव्हत्या. त्यांनाही त्यापेक्षा मुंबई बरी वाटत होती. </div><div><br /></div><div>निकालाच्या दिवशी आम्ही सगळे अणुशक्तीखात्याच्या मुख्य कार्यालयात गेलो. तिथल्या एका मोठ्या खोलीत खात्यातल्या सर्व विभागांच्या प्रमुखपदी असलेले दहापंधरा मोठे अधिकारी बसले होते. आम्ही बाहेरच एका हॉलमध्ये थांबलो होतो आणि इकडेतिकडे फेऱ्या मारत होतो. एका वेळी एकाच मुलाला आत पाठवत होते आणि त्याला एकच प्रश्न विचारत होते, "तुला कुठे जायचे आहे?" त्याला तिथे का जायचे आहे? तिथे जाऊन काय काम करायचे आहे? त्या मुलाची तिथे जाऊन तिथले काम करायची पात्रता आहे का? वगैरे चौकशी करायला कुणालाच वेळ नव्हता. त्यांना दोन अडीच तासात शंभर सव्वाशे मुलांचा 'निकाल' लावायचा होता. प्रत्येक डिसिप्लिनमधल्या टॉपरला हवी ती प्लेसमेंट मिळणार होती. बाकीच्यांना सस्पेन्स होता. पण त्या लोकांनाही शक्यतोवर त्यांनी मागितलेली डिव्हिजन दिली गेली. कोट्याला जाऊ इच्छिणाऱ्या बहुतेक सगळ्या मुलांना आरएपीपीसाइटवर जागा मिळाली. त्यात आमच्या मेकॅनिकलच्या बॅचमधले आठदहाजण होते. दोघांना वर्कशॉपमध्ये घेतले, तीन चार जणांना रिअॅक्टर ऑपरेशन्समध्ये आणि आठदहा जणांना रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये जागा मिळाली. बहुतेक सर्वजण समाधानी होते. क्वचित एकाददुसऱ्याला त्याने मागितलेला विभाग मिळाला नाही. कदाचित त्याचा चेहेरा त्या विभागप्रमुखाला आवडला नसेल किंवा दुसऱ्या एकाद्या विभागप्रमुखाला तो जास्त आवडला असेल. पण ते कळायला मार्ग नव्हता.</div><div><br /></div><div>मला कामगारांवर अरेरावी करायची हौस नव्हती आणि त्यांच्या युनियनशी संघर्ष नको होते, दिवसभर एकाद्या यंत्रासमोर उभे रहायचेही नव्हते, शांतपणे बसून अभ्यास, डिझाइन, अॅनॅलिसिस यासारख्या डोके चालवण्याच्या गोष्टींवर काम करायचे होते. तसे काम आरईडीमध्ये होते असे ऐकले होते आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगच्या वेळी पाहिले होते. त्यामुळे मी तीच डिव्हिजन मागितली आणि मला ती मिळाली.</div><div><br /></div><div>(क्रमशः) </div></div><div><br /></div><div><br /></div><div><br /></div>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-7865772281856766992021-09-22T05:28:00.004-07:002021-09-29T09:05:40.270-07:00स्वामी विवेकानंदांची अमेरिकेतली भाषणे<p> </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibWswjpFEv8wSM7x_D-CF9fRyuV_PQ015S32NUCW2menjvLtszE20jaUeX5m_zueomzb7KOw8UhjD5Tjh9pW9wYDjOLjqISfZIu2PD505RVt4DMx2sXz7zuTEtmRM9EMOZ4KxGUw/s1596/%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A8%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A6.jpeg" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1596" data-original-width="577" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibWswjpFEv8wSM7x_D-CF9fRyuV_PQ015S32NUCW2menjvLtszE20jaUeX5m_zueomzb7KOw8UhjD5Tjh9pW9wYDjOLjqISfZIu2PD505RVt4DMx2sXz7zuTEtmRM9EMOZ4KxGUw/w232-h640/%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A8%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A6.jpeg" width="232" /></a></div><p></p><p>स्वामी विवेकानंदांची अमेरिकेतली भाषणे</p><p><br /></p><p>स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन कुठल्या तरी ठिकाणी एक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात "माझ्या अमेरिकेतील बंधूभगिनींनो " अशी करून एकदम सगळ्या जगाचे मन जिंकून घेतले असे मी शाळेत असतांनापासून ऐकत आलो आहे. लहानपणी मलाही त्याचे खूप कौतुक वाटले होते, पण समज यायला लागल्यानंतर त्याबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न यायला लागले होते. पण त्याची उत्तरे मिळत नव्हती. उदाहरणार्थ १८९३साली वृत्तपत्रे सोडून इतर कुठलीही प्रसारमाध्यमे नव्हती, विमानेही नव्हती आणि साक्षरता फार कमी होती त्यामुळे वर्तमानपत्रांचा प्रसारही मर्यादितच असणार. मग या भाषणाला प्रसिद्धी तरी कशी मिळाली असेल? या वर्षी मला ते भाषण वाचायला मिळाले तरी त्यातही एवढे खास काय होते ते समजले नाही. आज मला या विषयावरील प्रा.शिवाजीराव भोसले यांचा एक अप्रतिम व्हीडिओ यू ट्यूबवर ऐकायला मिळाला. त्यात मात्र खूप नव्या गोष्टी समजल्या. </p><p>स्वामी विवेकानंदांना अमेरिकेतल्या लोकांनी कुठल्याशा मोठ्या जागतिक परिषदेला येण्यासाठी सन्मानाने आमंत्रण दिले, त्यांची जाण्यायेण्याची सगळी व्यवस्था करून त्यांचे खूप थाटात स्वागत केले, ते एकाद्या सम्राटासारखे ऐटीत तिथे गेले, बोलले आणि जिंकले असे काही झाले असले तर ते कशामुळे झाले असेल? भारतासारख्या पारतंत्रातल्या देशातल्या एका युवकाला अमेरिकेत कुणी कसे ओळखत असेल आणि त्याची निवड कशी झाली असेल? याचेच मला मुख्य गूढ वाटत होते. आज समजले की तसे काहीही झालेच नव्हते. मुळात ज्या धर्मपरिषदेला ते गेले होते तोच कुठला मुख्य कार्यक्रम नव्हता. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला या घटनेचा चारशे वर्षे झाली या घटनेच्या निमित्याने शिकागो इथे एक जंगी जत्रा भरवण्याचे ठरवले गेले आणि अमेरिकेने केलेल्या सर्वांगीण प्रगतीचे प्रदर्शन मांडून सगळ्या जगाचे अमेरिकेकडे लक्ष वेधण्याचा बेत होता. त्याचा भाग म्हणून तिथे वीस परिषदा भरवण्यात आल्या होत्या. त्यातच एक धर्मपरिषद भरवायची आणि जगभरातल्या लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार करायचा असे ठरवले गेले होते. जगामधील इतर धर्मांच्या लोकांनीही त्यात भाग घ्यावा आणि ख्रिस्ती धर्माची महती ऐकून व तो धर्म स्वीकारून आपापल्या देशांमध्ये त्याचा प्रसार करावा या हेतूने त्याला 'जागतिक धर्मपरिषद' असे नुसते नाव दिले होते. </p><p>त्यावेळी स्वामी विवेकानंदांचे भारतभ्रमण चालले होते. सद्गुरु रामकृष्ण परमहंसांच्या आज्ञेवरून त्यांनी ते सुरू केले होते. देशभरातल्या निरनिराळ्या ठिकाणी जाऊन तिथे काही दिवस मुक्काम ठोकायचा आणि तिथले जनजीवन जवळून पहायचे त्यांनी ठरवले होते. ते करत असतांना ते देशामधील जनतेची तसेच हिंदू धर्माची दैन्यावस्था पहात होते. त्यांच्यामध्ये नवीन चैतन्य आणण्याची गरज आहे हे त्यांनी जाणले आणि हे काम आपणच करायचा निश्चय केला. या काळातच अमेरिकेतल्या या धर्मपरिषदेची बातमी त्यांना कळली, पण संन्याशाचे जीवन जगत असलेल्या विवेकानंदांना त्या बातमीचा काहीच उपयोग नव्हता आणि त्यांची तिथे जायची इच्छाही नव्हती. ते देशाचे भ्रमण करत असतांना ठिकठिकाणी भाषणे देत, धर्मावर तसेच इतर महत्वाच्या विषयांवर विद्वानांशी चर्चा करत यातून त्यांचे अनेक चाहते तयार झाले होते. या परिषदेत भाग घेण्यासाठी जो कोणी माणूस जाईल त्याचे इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व असायला हवे तसेच त्याचा धर्मशास्त्राचा दांडगा अभ्यासही हवा. त्या काळात हे दोन्ही गुण असणारे लोक फारच दुर्मिळ होते, त्यात विवेकानंद हे होते. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे मन वळवले, काही राजेमहाराजे यांच्याकडून देणग्या किंवा वर्गणी गोळा करून त्यांच्या अमेरिकेच्या प्रवासाला लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था केली आणि त्यांना बोटीत बसवून पाठवून दिले. </p><p>ते कसेबसे शिकागोला जाऊन पोचले, पण तिथले आयोजक त्यांना त्या धर्मपरिषदेत भाग घेऊ द्यायलाच तयार नव्हते. "तुम्ही कोण? कुठले? तुम्हाला इथे कुणी पाठवले? भारताचे किंवा हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करायचा तुम्हाला कोणता अधिकार आहे?" असल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला त्यांच्याकडे कसलीही कागदपत्रे नव्हती. त्यांनी आधीपासून त्यासाठी काही तयारीही केली नव्हती. ते भारतात असतांनाही कुठले पीठाधीश वगैरे नव्हतेच. गावोगाव आणि रानोमाळ भटकत फिरणारे आणि कुठलीही खास ओळख नसलेले संन्यासी होते. त्या काळातल्या संन्याशांना भारतात कुठेही धर्मशाळा किंवा देवळांमध्ये कसेतरी राहता येणे शक्य असे आणि स्थानिक लोक त्याच्या जेवणाखाण्याची सोय करत. पण अमेरिकेसारख्या परमुलुखात ते तर शक्य नव्हतेच आणि मायदेशी परत येण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. </p><p>पण आपल्याला या कामगिरीवर पाठवण्यात देवाची काही योजना आहे आणि ती पार पाडायची शक्तीही तो देईल यावर त्यांचा मनोमन विश्वास होता. त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रभावी व्यक्तीमत्व, आत्मविश्वास आणि अथांग विद्वत्ता हे दुर्मिळ गुण होतेच. त्यांना अमेरिकेतही काही विद्वान, गुणग्राहक आणि परोपकारी असे लोक भेटले आणि त्यांनी प्रयत्न करून विवेकानंदांना धर्मपरिषदेत प्रवेश मिळवून दिला. त्यांना अशा मोठ्या संमेलनाचा पूर्वानुभव नव्हताच आणि आपण नेमके काय बोलायचे याची त्यांनी जास्त पूर्वतयारीही केलेली नव्हती. आधी बोललेल्या वक्त्यांची भाषणे ऐकता ऐकताच त्यांनी आपले मुद्दे ठरवले आणि उत्स्फूर्तपणे ठासून मांडले. परिषदेच्या उद्घाटन समारंभात झालेले त्यांचे ते पहिले भाषण जेमतेम पाच मिनिटांचे होते, पण त्यात त्यांनी आपली छाप पाडली. ते संमेलन पंधरा वीस दिवस चालले होते त्यात त्यांना आणखी तीन चार वेळा सविस्तरपणे बोलायच्या संधी मिळत गेल्या. </p><p>जगातले निरनिराळे धर्म या एकाच परमेश्वराकडे जाणाऱ्या वाटा आहेत यावर भर देऊन जगामधील लोकांनी सर्व धर्मांमधील चांगल्या गोष्टी घ्याव्यात असे त्यांनी बहुतेक वेळा सागितले. ते सांगत असतांना हिंदू धर्मामध्ये सांगितलेले तत्वज्ञान ते मांडत राहिले. समारोपाच्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की इथे रोज आम्हाला ख्रिस्ती धर्माची महती वारंवार सांगितली जात आहे आणि त्या धर्माचा स्वीकार करण्याचा आग्रह केला जात आहे. युरोपअमेरिकेतल्या लोकांनी केलेल्या प्रचंड प्रगतीचे कारण त्यांचा धर्म आहे असेही सांगितले जात आहे. पण जगभरात, विशेषतः अमेरिकेत आलेल्या लोकांनी स्थानिक रहिवाशांच्या कत्तली केल्या, इस्लामचा प्रसारही तलवारीच्या जोरावर झाला, तसे काहीही हिंदू धर्मीयांनी कधीही केले नाही. आमचा धर्म हा प्रेमावर आधारलेला आहे. तुम्ही आमचा धर्म स्वीकारावा असेही मी सांगणार नाही, पण आमच्या धर्मातली मूल्ये घेऊन स्वतःचा विकास करावा अशी माझी सूचना आहे. </p><p>त्या भाषणानंतरसुद्धा विवेकानंदांनी एकदम सगळे जग जिंकले असे काही झालेले दिसत नाही. अमेरिकेतही त्यांचे अनेक चाहते निर्माण झाले आणि त्यांना निरनिराळ्या शहरांमध्ये व्याख्याने देण्याच्या संधी मिळाल्या तसेच खर्च भागवण्यासाठी थोडी पैशापाण्याची व्यवस्था झाली. पण त्याचबरोबर असूयेपोटी त्यांचे काही शत्रूही निर्माण झाले आणि त्यांच्यावर गलिच्छ आरोप केले गेले. काही श्रीमंत युवति त्यांच्या रूपाकडे आकर्षित झाल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्यावर भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. पावन मनाच्या योगी वृत्तीच्या विवेकानंदांनी यातल्या कशाचे शिंतोडे आपल्या चारित्र्यावर उडू दिले नाहीत. भारतातील जनता आणि हिंदू धर्म यांचे उत्थान करणे हे त्यांचे ध्येय ठरलेले होते. पण ते कार्य करण्यसाठी त्यांना आर्थिक सहाय्याची गरज होती आणि ते धनिक पाश्चात्यांकडून मिळेल असे वाटल्यामुळे आणखी तीन वर्षे अमेरिकेत व इंग्लंडमध्ये राहून आणि स्वतःचे एक जागतिक पातळीवर गुडविल निर्माण करून ते भारतात परत आले आणि आपल्या पूर्वनियोजित कामाला लागले. </p><p>-----</p><p><b><span style="font-size: large;">मन आणि त्याची शक्ती</span></b></p><p>मी काल 'मन आणि त्याची शक्ती' या विषयावर एक यूट्यूबवरील भाषण ऐकले. <a href="https://www.youtube.com/watch?v=OJG46tW2VAE">https://www.youtube.com/watch?v=OJG46tW2VAE</a> तो स्वामी विवेकानंदांनी सव्वाशे वर्षांपूर्वी परदेशात केलेल्या एका भाषणाचा मराठी अनुवाद होता म्हणे. मनामध्ये इतकी मोठी शक्ती असते की त्या शक्तीच्या जोरावर अनेक अद्भुत कामे केली जाऊ शकतात. योगसाधनेने ही शक्ती अमर्याद वाढवता येते. कदाचित या कारणाने आपल्या पूर्वजांनी त्या दृष्टीने जास्त प्रयत्न करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या आणि विज्ञानाकडे तितकेसे लक्ष दिले नसावे अशा रोखाने काही गोष्टी त्यात सांगितल्या आहेत. </p><p>विवेकानंदांनी सव्वाशे वर्षांपूर्वी केलेल्या भाषणात असे सांगितले होते की जगातल्या सगळ्या लोकांची (कदाचित सगळ्या जीवांची) मने (अदृष्य अशा धाग्यांनी) एकमेकांशी जोडलेली असतात आणि एका मनातले विचार, भावना, कल्पना वगैरे आपोआप दुसऱ्या मनाला परस्पर कळू शकतात. या जगात आज आपल्याला ठाऊक नसलेली काही अदृष्य अशी प्रसारमाध्यमे असू शकतात.</p><p>असे असले तरी भौतिक आणि रसायनशास्त्राचे आज ठाऊक असलेले नियमही मोडता येणे शक्य नाही यावर मात्र माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाला न जुमानता हवेत तरंगणे किंवा शून्यातून वस्तू निर्माण करणे अशा प्रकारच्या चमत्कारांवर मी विश्वास ठेऊ शकत नाही. </p><p>. . . . . . . . . . . </p><p><span style="font-size: large;"><b>आत्मा आणि परमेश्वर</b></span></p><p>स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन ठिकठिकाणी भाषणे दिली हे वाचल्यावर त्यांनी तिथल्या लोकांना काय सांगितले असेल याचे मला कुतुहल वाटत होते. तिकडे त्यांनी दिलेल्या काही भाषणांची हिंदी मराठी भाषांतरे आजकाल यू ट्यूबवर सहजपणे उपलब्ध आहेत. ती तासभर लांबीची असली तरी बिछान्यावर पडल्यापडल्या मोबाइल फोनवर ऐकता येण्याची सोय आहे. त्यामुळे मी हल्ली काही व्याख्याने ऐकली. लहानपणी आपले आईवडील, शिक्षक आणि साधुसंतांचे वाङमय यांच्या सांगण्यामुळे आपल्या मनात आत्मा, परमात्मा यांच्या काही संकल्पना रुतून बसलेल्या असतात, पण तशी काही पार्श्वभूमी नसलेल्या परदेशातल्या लोकांना त्यांच्याबद्दल सांगतांना विवेकानंदांनी ते केवळ तर्काच्या आधाराने समजाऊन सांगितले किंवा तसा प्रयत्न केला एवढे मला समजले. </p><p>माणसाने कपडे बदलावेत तसे आत्मा शरीरे बदलत असतो ही गीतेतली संकल्पना सुप्रसिद्ध आहे, पण विवेकानंद म्हणाले की शरीर वेगळे आणि त्यात जाऊन बसलेला आत्मा वेगळा असे नसते. शरीर आणि आत्मा ही एकाच तत्वाची दोन रूपे आहेत. माणसाला त्याच्या ज्ञानेंद्रियामधून या विश्वाचे जेवढे आकलन होते त्यानुसारच त्याचे विश्व असू शकते, त्यामुळे आपला देव हासुद्धा एक असंख्यपटीने मोठा असा माणूस असतो आणि तोही माणसांप्रमाणे वागतो अथवा त्याने वागावे असे आपण समजून चालतो. पण आपल्याला माहीत आहे की हे विश्व खूप विशाल आहे आणि आपल्याला ज्यांचे आकलनही होऊ शकत नाही अशा असंख्य गोष्टी (उदाहरणार्थ चुंबकीय लहरी) त्यात भरलेल्या असण्याची शक्यता आहे. मग तो देव कसा आहे?</p><p>परमेश्वराने या विश्वाची निर्मिती केली असे आपण समजतो याचा अर्थ परमेश्वर वेगळा आणि त्याने निर्माण केलेले जग वेगळे असा होतो. पण भारतीय ऋषीमुनींनी यावर सखोल विचार करून कुठल्याशा उपनिषदामध्ये असे सांगितले आहे की या दोन वेगळ्या गोष्टी नाहीतच. दृष्य व अदृष्य असे विश्व आणि परमेश्वर हे दोन्ही एकच आहेत. यालाच काही लोक अद्वैत म्हणतात. त्यामुळे आपल्याला बाहेर कुठे देव दिसणार नाहीच, पण अंतरात्म्याला त्याची ओळख पटू शकते. त्यासाठी माणसाने अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करावे. एकदाका मी म्हणजेच देव आणि सगळे विश्व हे लक्षात आले की आपण कुणाशी वाईट वागणार नाही. </p><p>विवेकानंदांनी हे विचार सव्वाशे वर्षांपूर्वी मांडले होते. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या हिंदू धर्मपंडितांना तरी ते कितपत पटले होते माहीत नाही. कर्मकांड म्हणजेच धर्म असे समजले जात असतांना धर्माचा इतका खोल विचार कोण करत असेल?</p><div>***************************************</div><p>कृपया या स्थळालाही भेट द्या. <a href="https://anandghare.wordpress.com/2021/09/22/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6/"> स्वामी विवेकानंद</a> <a href="https://anandghare.wordpress.com/2021/09/22/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6/">https://anandghare.wordpress.com/2021/09/22/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6/</a></p><div><br /></div>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-70317134244388328122021-08-04T09:09:00.000-07:002021-08-04T09:09:30.208-07:00महाभारतातला एक प्रसंग<p> </p><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9m_kcjf1PUg4AU6YfQrcHhdhI2LM2Kl4nZkBjqwVmcuVGS2yhUmAF3tpxdqmSdG69O6-Ns2rkK_4_OAICgmL-HsNPGdN6eZKr-dOrzx0ufMEVo-DiIMqwKdFCxr0VKoD3eGo9mg/s271/Krishna+arjuna+Dusshansana.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="186" data-original-width="271" height="275" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9m_kcjf1PUg4AU6YfQrcHhdhI2LM2Kl4nZkBjqwVmcuVGS2yhUmAF3tpxdqmSdG69O6-Ns2rkK_4_OAICgmL-HsNPGdN6eZKr-dOrzx0ufMEVo-DiIMqwKdFCxr0VKoD3eGo9mg/w400-h275/Krishna+arjuna+Dusshansana.jpg" width="400" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><p></p><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">माझी आई मला पुराणातल्या अनेक गोष्टी छान रंगवून सांगत असे. त्यातल्या काही गोष्टी मला अजून आठवतात. कधी कधी मीही त्या लक्ष देऊन ऐकत असावा. त्यातलीच ही एक गोष्ट, किंबहुना एक फक्त प्रसंग. जेंव्हा कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध होणारच असे निश्चित झाले तेंव्हा दोन्ही पक्षांनी देशातल्या इतर राजांना त्या युद्धात आपल्या बाजूने उतरण्याचे आवाहन करायला सुरुवात केली. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण याला आपल्या बाजूला वळवण्यासाठी कौरवांचा राजा दुर्योधन आणि पांडवांच्या बाजूने अर्जुन हे दोघेही एकाच दिवशी त्याच्या घरी जाऊन पोचले. त्यावेळी कृष्ण मंचकावर गाढ झोपला होता. तिथे दुर्योधन आधी जाऊन पोचला, पण कृष्णाला झोपेतून जागे केले तर कदाचित तो रागावेल आणि मग तो आपल्या बाजूला येणार नाही असा विचार करून तो कृष्णाच्या जागे होण्याची वाट पहात त्याच्या उशाशी बसून राहिला. थोड्या वेळाने अर्जुनही आला आणि तो मात्र कृष्णाच्या पायाजवळ बसला.</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><div class="separator" style="clear: both;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">कृष्णाने डोळे उघडल्याबरोबर त्याला समोर बसलेला अर्जुन दिसला. त्याला पाहून उठून बसत कृष्णाने बोलायला सुरुवात केली, "अरे अर्जुना, तू केंव्हा आलास ? घरी सगळे ठीक आहेत ना ?" वगैरे.</div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">दुर्योधन एकदम उसळून बोलला, "हा तर आत्ता इथे आलाय्, मी केंव्हापासून इथे येऊन बसलो आहे. तुम्ही युद्धामध्ये आमच्या बाजूने लढावे अशी विनंति करायला मी आधी आलो आहे." </div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">अर्जुन म्हणाला, "मीसुद्धा त्याच कामासाठी इथे आलो आहे, तुम्ही आमच्याच बाजूला यावे अशी माझी विनंति आहे."</div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">त्यावर कृष्ण म्हणाला, "तुम्ही दोघेही माझे अतिथि आहात, त्यामुळे मला तुम्हा दोघांचाही विचार करायला हवा. म्हणून मी असे करतो, मी एकाला माझी सर्व सेना देईन आणि दुसऱ्याकडे मी एकटा आणि तोही निःशस्त्र येईन. आता मी आधी अर्जुनाला पाहिले म्हणून यातले निवडायची पहिली संधी मी त्याला देतो."</div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">दुर्योधनाने असा विचार केला की अर्जुनाने सेना मागितली तर कृष्णाकडचे सगळे रथ, हत्ती, घोडे, सैनिक आणि त्यांची सगळी शस्त्रास्त्रे त्याला मिळतील, मग मी या निःशस्त्र कृष्णाला घेऊन काय करू? पण अर्जुन म्हणाला, "हे कृष्णा, तू मला वेळोवेळी सहाय्य करून सगळ्या संकटांपासून वाचवले आहेस, तेंव्हा माझी अशी विनंति आहे की तू या युद्धाच्या प्रसंगीही माझ्यासोबतच रहावेस. पण तू निःशस्त्र असा युद्धभूमीवर येऊन काय करणार आहेस?" </div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">कृष्ण म्हणाला, "मी तुझा सारथी होऊन तिथे येईन आणि युद्धभूमीवर तुझा रथ चालवेन."</div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">हे संभाषण ऐकून दुर्योधन खूष झाला. तो म्हणाला, "याचा अर्थ तुमची सगळी सेना माझ्या बाजूने युद्धात लढेल असेच ना?"</div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">कृष्ण म्हणाला, "हो. मी तुला वचन देतो की माझी सगळी सेना तुझ्या गोटात येईल आणि तुझा सेनापति जी आज्ञा करेल ती मानेल."</div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">कृष्णाने अशा प्रकारे अर्जुन आणि दुर्योधन या दोघांचेही समाधान केले.</div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">अशी ही गोष्ट. यात दुर्योधन आणि अर्जुन तेंव्हा कुठेकुठे रहात होते ? आणि ते दोघे कुठल्या वाहनांमध्ये बसून कृष्णाकडे एका वेळीच कसे जाऊन पोचले असतील ? त्यांना थेट कृष्णाच्या शयनकक्षात कसे जाऊ दिले असेल ? असले प्रश्न मला लहानपणी पडलेच नाहीत कारण आमचे घर, शाळा आणि आजूबाजूच्या तीन चार गल्ल्या एवढेच विश्व मी तोपर्यंत पाहिले होते. त्याप्रमाणे हे लोकसुद्धा असे जवळपासच रहात असणार आणि बेधडक कृष्णाच्या झोपायच्या खोलीपर्यंत जाऊन पोचले असणार ! मोठा झाल्यावर मला समजले की पुराणातल्या गोष्टींवर असले फालतू प्रश्न विचारायचेच नसतात. </div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">पण तरीही एक गोष्ट मला समजत नव्हती. दुर्योधन किती दुष्ट कपटी आहे हे कृष्णाला माहीत होतेच, मग त्याने त्याला सरळ सरळ नकार का दिला नसेल ? उलट त्याला युद्धात मदत का केली असेल ? "ही सगळी देवाची अगाध लीला आहे आणि त्याने ती तशी का केली हे आपल्या समजण्याच्या पलीकडले आहे." असे ठराविक उत्तर देऊन भक्त लोक तो विषय संपवून टाकतात. पण व्यासमहर्षींनीच महाभारताची कथा सांगत असतांना अनेक ठिकाणी काही ना काही कार्यकारणभाव दाखवला आहे, स्पष्टीकरण दिले आहे. </div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">महाभारतामध्ये या प्रसंगावरच एक असा श्लोक आहे. </div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">प्रवारणं तु बालानां पूर्वं कार्यमिति श्रुतिः।</div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">तस्मात् प्रवारणं पूर्वमर्हः पार्थो धनंजयः ॥</div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">याचा अर्थ असा आहे. लहानांचे समाधान आधी करावे असे सांगितले आणि ऐकले जाते. म्हणून मी आधी अर्जुनाला काय पाहिजे ते ऐकणार आहे. असे श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितले. या श्लोकात दिलेले हे कारण मी वर दिलेल्या कारणापेक्षा वेगळे आहे. अर्जुनाच्या आयुष्यात त्यापूर्वी येऊन गेलेल्या सगळ्या प्रसंगांची यादी आणि त्यांचा कालावधी पाहता त्याचे वय या वेळी ऐंशीच्या घरात असावे असे मी नुकतेच कुठे तरी वाचले. दुर्योधन त्याच्यापेक्षाही मोठा होता म्हणून अर्जुन या 'लहान' बाळाला कृष्णाने आधी मागायची संधी दिली. पण दुर्योधनाला कसलीही मदतच का केली? या बाबतीत व्यासांनी काय लिहिले आहे हे समजून घेण्याची मला अजूनही उत्सुकता आहे.</div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">मी हा प्रश्न काही मित्रांना विचारला, त्यांनी निरनिराळी कारणे दिली. कुणाला वाटले की आपण पक्षपात करत नाही असे कृष्णाला दाखवायचे होते, कुणी म्हंटले की पांडवांचा पक्ष कमजोर असूनसुद्धा ते जिंकले तरच धर्माचा विजय होतो (यतो धर्मस्ततो जयः) असे सिद्ध होणार होते. पांडवांचीच बाजू बलवान असती तर तो "बळी तो कानपिळी"चा प्रकार झाला असता. कुणी म्हणाला 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' हे दाखवायचे होते म्हणून कृष्णाने "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तिच्या चार" असा पवित्रा घेतला. काही झाले तरी "यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनंजयः। तत्र श्रीर्विजयो भूति धृवा नीतिर्मती मम।।" हे तर होणारच होते असे गीतेत सांगितले आहे. थोडक्यात म्हणजे कृष्णाने काही वावगे केले नाही असेच सर्वांचे विचार होते किंवा तसे सगळ्यांना सांगायचे होते. </div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">यावर 'कोरा'वर झालेली एक चर्चा वाचली. त्यात एकाने कौरव व पांडव यांच्या सेना तुल्यबळ व्हाव्यात म्हणून कृष्णाने असे केले असे उत्तर दिले, पण ते बरोबर नव्हते कारण पांडवांकडे फक्त सात अक्षौहिणी सेना होती तर कौरवांकडे अकरा अक्षौहिणी सेना होती, यातली किती सेना कृष्णाची होती कोण जाणे. कुणी असे सांगितले की द्वापार युग संपायच्या आधी सगळ्या यादवांचा नाश तर व्हायचाच होता, तो या युद्धात अर्जुन करू शकेल असे कृष्णाला वाटले. आणखी कुणी असेही म्हणाला की कृष्णाच्या सेनेतले यादव फार माजले होते आणि त्यांना शिक्षा व्हायला हवी होती, एकाने तर असेही लिहिले की त्या सैनिकांनाही दुर्योधनच आवडत होता. </div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">महर्षी व्यासांनी महाभारताची इतकी प्रचंड गुंतागुंतीची कथा मांडतांना त्यात काही धक्कादायक प्रसंग आणि अगम्य प्रश्न ठेवले आहेत एवढे मात्र नक्की. </div><div><br /></div></div><p><br /></p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-9510631991936297232021-07-28T06:27:00.001-07:002021-07-28T06:39:15.577-07:00जुन्या काळातले वाडे<p> </p><p>माझे लहानपण जमखंडी नावाच्या गावातल्या 'घारेवाड्या'मध्ये गेले. माझे शाळेतले मित्र, गावातले नातलग आणि इतर बहुतेक सगळी ओळखीची मंडळी आपापल्या लहान मोठ्या वाड्यांमध्येच रहात होती. आमच्या पत्त्याच्या वहीमधल्या सगळ्या पत्त्यांमध्ये नातेवाईकाच्या नावानंतर 'अमूक तमूक वाडा' अशीच दुसरी ओळ असायची. त्या काळात मुंबई सोडून बहुतेक सगळीकडे 'वाडा संस्कृति' होती. मुंबईत मात्र 'चाळ संस्कृति' होती.</p><p>श्रीमंत लोकांच्या वाड्यांमध्ये गेल्यावर आधी समोर आंगण असायचे, त्यात फुलझाडे आणि वेली, तुळस वगैरे लहान झाडे लावलेली असत. त्याच्या एका बाजूला गुरांसाठी गोठा असे. पुढे गेल्यावर ओसरी किंवा पडवी, मग सोपा आणि आतमध्ये माजघर, देवघर, स्वयंपाकघर, कोठारे वगैरे अनेक खोल्या असायच्या. घरात राहणारे लोक आणि भेटायला येणारे आप्तेष्ट, मित्र आणि सन्माननीय पाहुणे एवढे लोकच पायऱ्या चढून सोप्यावर येत असत, इतर सगळ्या लोकांनी फक्त पडवीपर्यंतच यायचे आणि घरातल्या लोकांनी तिथे येऊन त्यांच्याशी बोलायचे असा पद्धत त्या काळी होती. काही वाड्यांमधले न्हाणीघर मागच्या बाजूला असे. त्याच्या पलीकडे मागची पडवी आणि तिच्या पलीकडे 'परस' नावाची मोठी बाग असायची, त्यात पालेभाज्या, फळभाज्या वगैरे पिकवत असत आणि फळांची झाडे लावलेली असत. न्हाणीघर आणि मोऱ्यांमधले सांडपाणी वहात जाऊन त्यातून या झाडांचे सिंचन करण्याची सोय केलेली असे. काही जास्त मोठ्या 'चौसोपी' वाड्यांमध्ये दरवाजातून आत गेल्यानंतर मधोमध एक चौक ठेऊन त्याच्या चारी बाजूंना सोपे बांधलेले असत. सरदार, जहागिरदार वगेरेंच्या जंगी वाड्यांमध्ये दिवाणखाना, जामदारखाना, खलबतखाना, मुदपाकखाना, हमामखाना असली निरनिराळी दालने असत.</p><p>माझ्या आजोबांनी सावळगी नावाच्या खेड्यात बांधलेल्या वाड्यात समोरच्या बाजूला आंगण, गोठा आणि पडवी होती. आंगणात एक लहानशी विहीरही होती. आत गेल्यावर फक्त सोपा, माजघर आणि स्वैपाकघर होते. आमच्या जमखंडीच्या घरात नळाने पाणी येत असल्यामुळे विहीर नव्हती आणि गावाजवळ शेत नसल्यामुळे गुरांचा गोठाही नव्हता. आमचे ते प्रशस्त घर दोन हजार चौरस फुटांपेक्षाही मोठे होते, पण बीएचकेच्या हिशोबात ते शून्य बीएचके होते कारण त्या घरात बेडरूम या नावाची एकही खोली नव्हती. आम्ही सगळे जण कधी सोप्यात तर कधी माडीवर किंवा गच्चीवर जमीनीवरच अंथरूण पसरून त्यावर झोपत होतो. चांगला लांबरुंद पाच खणी सोपा हा त्या घराचा मुख्य भाग होता. तिथल्या भिंतीवर ओळीने पंधरावीस फ्रेम केलेल्या तसबिरी खिळ्यांना टांगल्या होत्या. मधोमध एक लाकडी झोपाळा होता तो आढ्याला लोखंडी कड्यांच्या साखळीने टांगला होता. गरज पडली तर तो पाच मिनिटात काढून ठेवला जात असे आणि सोप्यात पंधरावीस पाट मांडून जेवणाची पंगत घातली जात असे. आम्ही मुले कधी झोपाळ्यावर नाहीतर जिन्याच्या पायरीवर बसत होतो, पण बहुतेक वेळा जमीनीवरच एकादे तरटाचे बसकूर पसरून त्यावर फतकल मारून बसत होतो. जास्त लोकांना बसण्यासाठी जमीनीवर चटई, सतरंजी किंवा जाजम अंथरले जात असे. ते मळू नयेत म्हणून त्यांच्या खाली एक काथ्याचे मॅटिंग घातले जायचे.</p><p>सोप्यापेक्षाही मोठे आतले स्वैपाकघर होते. सोप्यामधून तिथे जाण्यासाठी दोन दरवाजे होते. डाव्या बाजूच्या दाराने आत गेल्यावर लगेच एक मोठे उघडे कपाट होते. त्यातल्या देव्हाऱ्यात सगळे देव मांडून ठेवलेले असत. बाजूच्या भिंतीवरल्या खुंटीला एक मुटका (सोवळे) टांगून ठेवलेला असे. आंघोळ झाल्यावर तो मुटका नेसून पाटावर बसायचे, देवांना ताम्हनात घ्यायचे, त्यांना स्नान घालून पुसून देव्हाऱ्यात ठेवायचे आणि पूजा करायची. कधीकधी देवासमोर पाटावर बसून कोणी तरी एकादी पोथी वाचत असे आणि बाजूला दोन तीन पाट मांडून ती ऐकणारे बसतील एवढी मोकळी जागा तिथे होती. त्याच्या पलीकडे भिंतीत केलेल्या पोकळीत तीन चार चुली मांडल्या होत्या. त्यांच्यावर असलेल्या उंचच्या उंच धुराड्यातून सगळा धूर थेट छप्पराच्या बाहेर सोडला जाई. भिंतींमध्ये अनेक कप्प्यांची कपाटे आणि कोनाडे होते. त्यात स्वयंपाकाला लागणारे पदार्थ आणि भांडीकुंडी ठेवली जात असत. भिंतीला लागूनच दोन तीन मोठे तांब्याचे हंडे आणि घागरींमध्ये पिण्याचे पाणी भरून ठेवलेले असे. दिवसातून फक्त एकदाच आणि थोडा वेळच नळाला पाणी येत असल्यामुळे ते भरून आणि साठवून ठेवावे लागत असे आणि संपून जाऊ नये म्हणून जपूनच वापरावे लागत असे. </p><p>दुसऱ्या दारातून आत जाताच एका बाजूला लहानशी मोरी होती आणि त्यात पिण्याच्या पाण्याचा नळ होता. रोज नळाला पाणी आले की लगेच तिथे कळशी आणि बिंदगीमध्ये पाणी भरून ते हंड्यामध्ये ओतायचे काम असायचे. दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या रॅक्समध्ये पत्र्याच्या मोठमोठ्या चौकोनी डब्यांमध्ये धान्ये भरून ठेवलेली असत. त्या काळात सगळ्या धान्यांची वर्षभराची साठवण करून ठेवली जात असे. एका कोपऱ्यात एक भक्कम कोठी होती. महत्वाचे दस्तऐवज आणि चांदीची भांडी वगैरे तिच्यात सुरक्षितपणे ठेवले जात असत. जमीनीतच एक मोठे दगडाचे उखळ बसवून ठेवले होते, तसेच एक पाटा वरवंटा आणि जातेही होते. कुटणे, कांडणे, ठेचणे, वाटणे वगैरे कामे हा रोजच्या स्वयंपाकाचा भाग होता आणि त्यासाठी कसलेही यंत्र नव्हते. स्वयंपाकघरात या सगळ्या वस्तू मांडून ठेऊनसुद्धा एका वेळी सातआठ माणसे पाट मांडून जेवायला बसू शकतील एवढी मोकळी जागा तिथे होती. </p><p>सोप्यामध्ये समोरच्या बाजूला लहान लहान चौकोनी दगडी चौथऱ्यांवर चौकोनी लाकडाचे खांब उभे केले होते. दुसऱ्या बाजूचे खांब भिंतीतच गाडलेले होते. त्या खांबांवर मोठ्या आडव्या तुळया ठेवलेल्या होत्या. त्याच्यावर बांबूचे जंते आणि त्यांच्यावर वेळूच्या चिवाट्या अगदी जवळजवळ एकमेकींना चिकटून रांगेने मांडून त्यावर विटा मांडून मातीचा पातळसा थर पसरवला होता. वर माडी असल्यामुळे तिथे पावसाचे पाणी यायची भीती नव्हती. इतर भागांच्या तुळया, जंते आणि चिवाट्यांवर मातीचा जाड थर देऊन धाब्याचे छत तयार केले होते. त्याच्यावर सिमेंटचा थर घालून वॉटरप्रूफ गच्ची बांधली होती. तिला पुरेसा उतार दिला असल्यामुळे सगळे पाणी एका कोपऱ्यात गोळा होऊन पन्हळीतून खाली पडत असे. </p><p>जेवढा मोठा सोपा होता तेवढीच मोठी माडी त्यावर होती. माडीवर जायचा लाकडी जिना दोन भागात होता. सातआठ पायऱ्या चढून गेल्यावर एक प्रशस्त असा मधला अट्टा होता. तिथून उलट दिशेने आणखी सातआठ पायऱ्या चढून गेल्यावर ऐसपैस माडी होती. तिच्या दुसऱ्या टोकाला एका लोखंडी पट्ट्यांच्या पलंगावर घरातल्या सगळ्या गाद्या, सतरंज्या, चादरी, कांबळी आणि पांघरुणे रचून ठेवलेली असायची. त्याच्या बाजूला एक लाकडी टेबल आणि लोखंडाच्या खुर्च्या होत्या. त्यावर बसून आम्ही लेखन वाचन वगैरे अभ्यास करत होतो. तिथूनच गच्चीला जायचा दरवाजा होता. सोपा सोडून उरलेल्या भागावर सिमेंटची गच्ची होती, तिला तीन बाजूंनी उंच कुंभ्या होत्या. त्यातल्या एका कुंभीवर आणि गच्चीवर पंधरावीस कुंड्या ठेवल्या होत्या. त्यांमध्ये गुलाब, मोगरा यासारखी फुलझाडे आणि तुळस, ओवा, कोरफड यासारख्या औषधी वनस्पती लावल्या होत्या. ते आमचे 'टेरेस गार्डन' होते. रोज दोन बादल्या पाणी दोन जिने चढून वर नेऊन त्या झाडांना घालायचे हे एक आम्हा मुलांचे काम असायचे. माडीच्या डोक्यावर कॉरुगेटेड जी आय शीट पत्र्यांचे तिरपे छप्पर होते. त्यावर पडणाऱ्या पावसाचा खूप जोराचा आवाज होत असे. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी एक अर्धगोलाकार पन्हळ होती आणि तिला एक मोठा पाइप जोडून ते पाणी खाली सोडले जात होते.</p><p>स्वयंपाकघराच्या काही भागावरसुद्धा एक माडी होती. पण तिथे पुरेसा उजेड आणि वारा येत नसल्यामुळे तिचा उपयोग अडगळीचे सामान ठेवण्यासाठीच होत होता. घराच्या मुख्य मोठ्या दरवाजातून आत येताच उजव्या बाजूला एक खोली होती. तिचा उपयोग मुख्यतः बाहेरच्या लोकांसाठी किंवा पाहुण्यांसाठीच केला जात असे. डाव्या बाजूला 'नळाची मोरी ' होती. तिथे एक मोठा नळ होता आणि वापरायचे बरेचसे पाणी तिथून भरले जात असे. मोरीच्या बाजूला न्हाणीघर होते. त्यात एक तांब्याचा बंब होता, तसेच एका मोठ्या चुलखंडावर एक अगडबंब आकाराचा पाणी तापवण्याचा हंडा ठेवला होता. तो धुराने इतका काळा झाला होता की मुळात कुठल्या धातूचा आहे ते दिसतच नव्हते. जवळच एका खोल अट्ट्यावर जळाऊ लाकडे ठेवलेली असत. आंघोळीसाठी आम्ही पितळेच्या बारड्यांमध्ये (बादलीला तिथे बारडी म्हणत असत.) ऊन पाणी काढून घेत होतो आणि पितळेच्या तांब्यानेच ते अंगावर घेत होतो.</p><p>न्हाणीघराला लागूनच एक दगडी हौद होता. तो पाण्याने भरून ठेवला जात असे. मोठ्या दरवाजातून आत आल्यावर तिथेच पायातल्या चपला काढून ठेवायच्या, तांब्याने हौदातले पाणी घेऊन पाय धुवायचे, ते पायपुसण्यावर पुसून नंतर एक पायरी चढून सोप्यात यायचे असे नियम होता. हौदाच्या बाजूला एक भलामोठा कपडे धुवायचा दगड होता. त्यावर आपटून आणि घासून आमचे कपडे धुतले जात असत. त्या सगळ्या भागातल्या जमीनीवर फरश्या बसवलेल्या होत्या. तिथल्या भिंतीच्या कडेने आणि जिन्याखाली लाकडे, कोळसे, गोवऱ्या, भुसा, रद्दी, केराची टोपली वगैरे गोष्टी ठेवल्या जात असत. घराच्या बाहेरच्या बाजूला पायखाना होता. तिथे जाण्यासाठी मोठ्या दरवाजातून बाहेर जावे लागत असे आणि जातांना टमरेलात पाणी घेऊन जावे लागत असे. परत आल्यावर पाय धुण्यासाठी तांब्याभर पाणी आधीच काढून ठेवायचे, त्याने पाय स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करायचा असा नियम होता. </p><p>आमच्या घरातल्या दगडमातीच्या सगळ्याच भिंती दोनतीन फूट जाडीच्या होत्या आणि त्यात ठिकठिकाणी कोनाडे आणि कपाटे केलेली होती. घरातल्या सगळ्या वस्तू त्यातच ठेवलेल्या असायच्या. त्याशिवाय फक्त स्वयंपाकघरामध्ये दूधदुभते ठेवण्यासाठी एक जाळीचे फडताळे होते. मांजरांपासून रक्षण करण्यासाठी त्याची गरज होती आणि माडीवर पुस्तके ठेवण्यासाठी एक शेल्फ होते. घरात ठिकठिकाणी भिंतींध्ये मोठ्या लाकडी खुंट्या ठोकलेल्या होत्या आणि त्यांना छत्र्या, टोप्या किंवा पिशव्या टांगून ठेवलेल्या असत.</p><p>मुंबईपुण्यातल्या एक/ दोन/ तीन बीएचके सेल्फकंटेन्ड फ्लॅटमध्ये वाढलेल्या मुलांनी अशी घरेच पाहिली नसतील तर या लेखात दिलेल्या तिथल्या जागा आणि वस्तूंची नावे तरी त्यांना कशी माहीत असणार? माझ्या लहानपणी आमच्या रोजच्या बोलण्यात येणारे हे शब्द आता माझ्याही बोलण्यात कधी येतच नाहीत. त्यामुळे नव्या पिठीतल्या मुलांना हा लेख तरी किती समजणार आहे हा ही एक प्रश्न आहे. </p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20484515.post-82639507296548141982021-07-18T08:29:00.004-07:002021-07-19T01:12:05.294-07:00माझे आजोबा<p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9cZhpYPJItZN7PDP5BsCmZzksd0A-pCf_92hnlMrcB3-D-nWXjs_9kwnCJvXmGQ9sl2K2NcMzFM910_XphDPIuY4MCwDa0FythoQnECQlWUG7WnkKK5pIK85r65WVp5H7hzn2DA/s470/%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="470" data-original-width="455" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9cZhpYPJItZN7PDP5BsCmZzksd0A-pCf_92hnlMrcB3-D-nWXjs_9kwnCJvXmGQ9sl2K2NcMzFM910_XphDPIuY4MCwDa0FythoQnECQlWUG7WnkKK5pIK85r65WVp5H7hzn2DA/s320/%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE.jpg" /></a></div><p>माझे पणजोबा कुठे रहात होते आणि आपला उदरनिर्वाह कसा करत होते याची कणभरही माहिती मला कधीच मिळाली नाही. माझ्या लहानपणीच्या मित्रांमधल्या कुणाच्याच घरी त्यांचे पणजोबा रहात नव्हते. कदाचित 'पणजोबा' हा शब्दच सहसा माझ्या कानावर पडत नसावा. त्यामुळे तेंव्हा मला त्यांच्याबद्दल काही कुतूहलही वाटत नव्हते. माझे आईवडील, काकू, आत्या वगैरे घरातली मोठी माणसे बोलत असतांना त्यांनीही माझ्या पणजोबांबद्दल काही बोललेले ऐकल्यासारखे मला तरी आठवत नाही. पण ते अनेक वेळा माझ्या आजी आणि आजोबांविषयी मात्र भरभरून बोलत असत आणि आम्हालाही वेळोवेळी सांगत असत. त्यावरून माझे आजोबा हे एक सौम्य प्रवृत्तीचे, शांत, सोज्जवळ, हुशार, धोरणी, परोपकारी, कर्तव्यदक्ष आणि अत्यंत आदरणीय व्यक्ती होते अशी त्यांची एक दिव्य प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. माझ्या आजोबांना सगळे तात्या म्हणत असत. माझ्या जन्माच्या आधीच तात्या निवर्तले होते आणि माझी आजी तर त्यांच्याही आधी देवाघरी गेली होती. त्यामुळे मला त्या दोघांचेही प्रत्यक्ष दर्शन झालेच नाही. आमच्या घरात एक जुना फॅमिली फोटो होता त्यातच मी त्यांना पाहिले आहे. यामुळे तात्यांबद्दल जी काही माहिती माझ्या आठवणींमध्ये साठून राहिली आहे ती मी घरातल्या वडीलधारी लोकांकडून ऐकलेली आहे.</p><p>माझे पणजोबा किंवा खापरपणजोबा यांनी पुढील काही पिढ्या बसून खातील अशी गडगंज मालमत्ता जमा करून ठेवली नव्हती. तात्यानी स्वतःच जन्मभर आपली विद्या आणि अक्कलहुषारी वापरून आणि अपार कष्ट करून जे काही कमावले तेच त्यांच्याकडे होते असे मी लहानपणी ऐकत होतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ते जमखंडी संस्थानामधल्या सावळगी नावाच्या खेड्यात स्थायिक झाले होते. ते तिथले शाळामास्तरही होते आणि पोस्टमास्तरही होते. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळात भारतातल्या सगळ्या खेड्यांमधली बहुतेक जनता निरक्षरच होती. त्यामुळे तिथल्या शाळेतही अगदी थोडी मुले येत असणार. त्या काळात बैलगाडीखेरिज वाहतुकीची साधने नव्हती. त्यामुळे बहुतेक लोकांचे सगळे नातेवाईकही त्याच गावात किंवा आजूबाजूच्या खेड्यांमध्ये रहात असत आणि टपाल तरी या गावाहून त्या गावाकडे कसे आणि किती दिवसांनी जात होते कोण जाणे. त्यामुळे त्या काळी पोस्टखात्यालाही ग्रामीण भागात फारसे काम पडत नसावे. हे पाहता दोन्ही हुद्दे सांभाळतांना तात्यांवर कामाचा खूप मोठा भार पडत असेल असे वाटत नाही. सावळगी हे त्या भागातले जरा मोठे खेडे होते म्हणून संस्थानच्या दयाळू सरकारने त्या भागातल्या लोकांसाठी त्या गावात महिन्याला पाच रुपये पगारावर एक शाळामास्तर आणि पोस्टमास्तर नेमला होता. त्या जागेवर माझ्या आजोबांची नेमणूक झाली होती.</p><p>सावळगीपासून तीन मैल अंतरावरील तुंगळ नावाच्या खेड्याला जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी एक पडीक जमीन विकत घेऊन तिचा विकास केला होता. त्यावर वाढलेली रानटी झुडुपे तोडून आणि उपटून टाकली, थोडी थोडी जमीन खणून तिथले दगडधोंडे बाजूला काढून टाकले, खणलेली माती पसरून सपाट केली आणि खत वगैरे टाकून तिला लागवड करण्यायोग्य केली. तिथे दोन विहिरी खणून पाण्याची सोय केली होती म्हणून आम्ही तिला 'मळा' असे म्हणत होतो. त्या काळात कसली यंत्रे नव्हतीच. हे सगळे काम कुदळ आणि फावडे वापरून मजूरच करत असत. त्यमुळे तात्यांना त्यासाठी वर्षानुवर्षे चिकाटीने मेहनत करून ती सगळी कामे करून घेत रहावे लागले असणार. त्यांचा मळा जसजसा तयार होत गेला, तसतशी त्यावर ते शेती सुरू करत गेले. अगदी माझ्या लहानपणापर्यंत जोंधळ्याची भाकरी हे त्या भागातल्या लोकांचे मुख्य अन्न होते. त्यामुळे ज्वारी हेच तिथले मुख्य पीक असायचे. त्याशिवाय कडधान्ये, भुईमूग, रताळी वगैरेंची लागवड ते करीत असत. त्यांनी मळ्यात अनेक प्रकारची झाडे लावली होती, त्यात आंब्याची झाडेही होती. आमच्या मळ्यात काम करणाऱ्या कुळांना त्यांचा वाटा देऊन झाल्यावरही भरपूर धान्य घरी येत असे. त्यामधून तात्यांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेसे अन्न मिळत असे तसेच त्यातून सुतार, लोहार, कुंभार आदि बलुतेदारांनाही धान्य दिले जात असे.</p><p>त्या काळातल्या ग्रामीण भागातल्या 'कॅशलेस सिस्टम'मध्ये शेतात पिकणाऱ्या आणि खेड्यात तयार होणाऱ्या नेहमी लागणाऱ्या पदार्थांची किंमत आणि सेवांचा मोबदला बहुतेक वेळा धान्याच्या रूपात दिला जात असे. कापडचोपड. भांडीकुंडी, सोनेचांदी यासारख्या कधीतरी घेण्याच्या वस्तूंसाठी रोकड पैसे मोजत असत. काही वेळा गरजू लोकांकडे त्यासाठी पुरेसे पैसे नसले तर ते थोडीशी रक्कम तात्यांच्याकडून उसनी घेत आणि सुगीच्या काळात व्याजासकट तिची परतफेड करत असत. या लहानशा सावकारीच्या व्यवहारातूनही तात्यांची थोडी कमाई होत असे. मवाळ आणि प्रेमळ स्वभावामुळे ते स्वतः तर कुणाला जास्त तगादा करू शकत नव्हतेच आणि पैशांच्या वसूलीसाठी त्यांनी कुणा पठाणाला किंवा रामोशाला पदरी ठेवले नव्हते. त्यांनी कुणावरही कधी जप्ती आणली नाही. त्यांचे बहुतेक कर्जदार उसने घेतलेले पैसे आपणहूनच आणून देत असत आणि एकाद्याने कधी बुडवले तरी ते त्याला दान केले असे म्हणून ते त्या पैशांवर पाणी सोडत असत. आपण कुणाच्या तरी अडीअडचणीत त्याला मदत केल्याचे समाधानच त्यांना महत्वाचे वाटायचे.</p><p>एकंदरीत पाहता तात्यांचे जीवन सुरळीतपणे चालले होते. त्यांची गणना गावातल्या 'खाऊन पिऊन सुखी' कुटुंबांमध्ये होत होती. त्यांनी आपल्या कर्तबगारीने त्या गावात एक प्रशस्त घर बांधले होते. मी लहानपणी ते घर पाहिले आहे. त्या घराच्या अंगणामध्ये एक लहानशी विहीर आणि बाजूला गुरांचा गोठा होता, म्हणजे त्यात गुरेढोरेही बांधलेली असणार. त्या खेडेगावातले एक सुशिक्षित, सुजाण आणि माहीतगार सद्गृहस्थ म्हणून त्यांना मानाचे स्थान होते. काही लोक आपल्या अडचणी घेऊन त्यांचा सल्ला घ्यायला त्यांच्याकडे येत असत आणि त्यांच्या अडचणी शांतपणे समजून घेऊन तात्या त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असत.</p><p>माझ्या वडिलांचा जन्म १९०३ साली झाला, त्यानंतरच्या १०-१५ वर्षांमध्ये त्यांची लहान भावंडे जन्माला आली असावीत. म्हणजे तात्यांचा काळ हा सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या आजूबाजूचा काळ होता. तात्या स्वतःच शाळामास्तर असल्यामुळे त्यांनीच सगळ्या मुलांना लिहायला वाचायला शिकवले. त्या काळात मराठीसारख्या भारतीय भाषांमधल्या शाळांना 'व्हर्नाक्युलर स्कूल' म्हणत आणि त्यात पहिली ते सातवी इयत्तेपर्यंतचे शिक्षण दिले जात असे. सातवीच्या परीक्षेला 'व्हर्नाक्युलर फायनल' असे नाव होते. ती दिली की बहुतेक सगळ्या मुलांचे शिक्षण संपत असे, पण बरीचशी मुले त्याच्याही आधीच शाळा सोडून जात असत. त्याशिवाय त्या काळात काही ठिकाणी "इंग्रजी शाळा" असायच्या. मराठी शाळेच्या चार इयत्ता पास झाल्यानंतर इंग्रजी शाळेत प्रवेश मिळत असे आणि तिथले शिक्षण मॅट्रिकपर्यंत चालत असे. तेंव्हा मॅट्रिक परीक्षा बरीच कठीण समजली जात असे आणि 'मॅट्रिक पास' होणे ही एक मोठी बहुमानाची गोष्ट असायची. कित्येक लोक 'नॉनमॅट्रिक' रहात असत. सावळगीला इंग्रजी शाळा नव्हती. जमखंडीच्या संस्थानिकांनी जमखंडी इथे 'परशुरामभाऊ हायस्कूल' नावाची एक उत्तम संस्था उभी केली होती. तात्यांनी माझ्या वडिलांना म्हणजे आमच्या दादांना त्या शाळेत शिक्षणासाठी पाठवून दिले.</p><p>सावळगी गाव जमखंडीपासून बारा मैल दूर आहे आणि दोन्हींच्या मधून कृष्णा नदी वाहते. त्यामुळे सात मैल चालत किंवा बैलगाडीतून गेल्यावर नावेतून नदी ओलांडायची आणि पुन्हा पुढे पाच मैल चालत जायचे असा खडतर प्रवास करावा लागत असे. नदीला पूर आला तर ती पार करणे अशक्य होऊन इकडे लोक इकडे आणि तिकडचे लोक तिकडे राहून जायचे अशी अवस्था होत असे. त्यामुळे आमचे दादा हायस्कूल शिक्षणासाठी जमखंडीला कोणा नातेवाइकांकडे रहात असत आणि जमेल तेंव्हा सावळगीला घरी जाऊन येत असत. ते शाळेतले हुषार विद्यार्थी होते आणि चांगले मार्क घेऊन मॅट्रिक परीक्षा पास झाले. </p><p>१९२०च्या सुमारासच्या त्या काळात फार थोड्या शहरांमध्येच कॉलेजे उघडली गेली होती. तिथे जाऊन रहायचे हे खर्चाचे काम होते. तात्यांचे कुटुंब घरात खाऊन पिऊन सुखी असले तरी रोख पैसे उचलून देणे त्या काळात थोडे अवघड होते. पण दादांच्या बहिणींनी तात्यांकडे हट्टच धरला की "वाटले तर आम्हाला एक वेळा जेवायला द्या, पण आमच्या दादाला शिकायला पाठवून द्या." ही गोष्ट मी प्रत्यक्ष दादांच्या तोंडून ऐकली आहे आणि त्या वेळीही त्यांच्या डोळ्यात तरळलेले पाणी मी कधी विसरू शकणार नाही. तेसुद्धा आयुष्यभरात आलेल्या बऱ्यावाईट काळामध्ये सतत आपल्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.</p><p>तात्यांनी काही ना काही करून खर्चाची व्यवस्था केली आणि दादा सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये शिकून बी.ए.ची डिग्री घेऊन आले. त्यानंतर मात्र इकडे तिकडे कुठेही न जाता त्यांनी सरळ जमखंडी संस्थानाच्या कचेरीत नोकरी धरली आणि ते संस्थान भारतात विलीन होईपर्यंत तिथे काम केले. पण त्यासाठी त्यांना सावळगी सोडून जमखंडीला मात्र यावे लागले म्हणून त्यांनी जमखंडीला आपले बिऱ्हाड थाटले. आता तात्या आणि आजी कधी सावळगीला तर कधी जमखंडीला असे रहायला लागले. त्यांच्या दोन मुलींना म्हणजे माझ्या दोन आत्यांनाही जमखंडीतच सासर मिळाले. त्यामुळे जमखंडीत येऊन रहायचे आकर्षण वाढत गेले.</p><p>मधल्या काळात तात्यांच्या कुटुंबावर मोठ्या विपत्ती आल्या. तात्यांचा धाकटा मुलगा म्हणजे माझे काका यांनी मला वाटते फारसे उच्च शिक्षण न घेता नोकरी धरली होती. त्यांचे लग्न होऊन त्यांना दोन मुली झाल्या होत्या. पण त्या अजून अगदी लहान असतांनाच अचानक काकांना देवाज्ञा झाली. त्याच सुमाराला आमच्या सर्वात लहान आत्यांचे यजमानही अकस्मात देवाघरी गेले. तरुण मुलगा आणि जावई यांच्या आकस्मकपणे जाण्याचे जबर धक्के तात्यांना सहन करावे लागले. पण त्यांनी सगळ्यांना धीर दिला. मुलीला आपल्या घरी आणले आणि तिची समजूत घालून काही काळानंतर तिला जमखंडीच्या मुलींच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी लावून दिली. ऐंशी वर्षांपूर्वीच्या सामाजिक परिस्थितीत त्याला विरोधही झाला असेल, पण तात्यांनी त्याला खंबीरपणे तोंड दिले.</p><p>पण तात्या आणि आजी या दोघांच्याही प्रकृतीवर अशा तीव्र मानसिक धक्क्यांचे परिणाम झाले असणार. आजींना दम्याचा त्रास व्हायला लागला होता. त्या काळात जी काही औषधोपचारांची सोय होती तिने थोडा आराम पडायचा आणि नंतर हवामानात फरक पडला की तो परत उसळी मारायचा. ज्या वेळी दम्यामुळे त्यांचा श्वास कोंडला जायचा तेंव्हा "आता मी काही यातून वाचणार नाही." असेही त्या कधी कधी म्हणत असत आणि नंतर बऱ्याही होत असत. पण एकदा त्यांनी असे म्हंटले आणि "बरं बाई." असे काही तरी शब्द अनवधानाने तात्यांच्या तोंडून निघाले. पण त्या दिवशी मात्र त्या चालता बोलता अचानक खरोखरीच चालल्या गेल्या. ही गोष्ट तात्यांच्या मनाला फार लागून राहिली आणि वर्षादोन वर्षातच त्यांनीही शांतपणे या जगाचा निरोप घेतला.</p><p>त्या काळातल्या आणि त्यांच्या पिढीमधल्या इतर लोकांशी तुलना करता तात्या एक समाधानकारक जीवन जगले होते. त्यांनी आपल्या सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या होत्या. सर्व मुलामुलींची लग्ने करून देऊन सुना आणि जावई आणले होते. अनेक नातवंडाना मांडीवर खेळवले होते. त्यात माझा समावेश झाला नव्हता हे माझे दुर्दैव. पण तात्यांच्या आयुष्याचे सोने झाले असेच त्या वेळी बहुतेक लोकांनी म्हंटले असेल. "अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनम्। देहान्ते तव सायुज्यम् देहि मे परमेश्वर ।।" अशी एक प्रार्थना पूर्वीचे लोक नेहमी देवापुढे करत असत. देवाने तात्यांची प्रार्थना ऐकली असणार असे वाटते.</p><p><br /></p>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-20484515.post-34761971344657869282021-07-15T23:50:00.018-07:002021-09-10T01:17:49.243-07:00श्री विनायकाची उपासना, गणेशपुराण<p> माझ्या एका भाविक सुहृदाने श्री गणपतिअथर्वशीर्षाचे मराठीत लिहिलेले ओवीबद्ध रूपांतर मी मागच्या वर्षी या ब्लॉगवर दिले होते. </p><p><a href="https://anandghan.blogspot.com/2020/08/blog-post.html">https://anandghan.blogspot.com/2020/08/blog-post.html</a></p><p>विविध रूपांमधून प्रकट झालेल्या श्रीविनायकाच्या उपासनेवर त्यांनी लिहिलेल्या ओवीबद्ध रचना, अष्टविनायकांची आरती आणि मुद्गलपुराणातला काही भाग व स्तोत्रे या पानावर देत आहे. क्रमक्रमाने ओवीबद्ध अति संक्षिप्त भावार्थपूरित मराठी भाषा अनुवादित गणेश पुराण देत आहे. गणेशभक्तांनी त्यांचा लाभ घ्यावा.</p><p>. . . . . . . . </p><p>श्रीगणेशपुराणाच्या उपासनाखंडाचे अतिसंक्षिप्त ओवीबद्ध रूपांतर सहा अध्यायात पूर्ण केले आहे. दि.२७-०८-२०२१</p><p>श्रीगणेशपुराणाच्या क्रीडाखंडाचे अतिसंक्षिप्त ओवीबद्ध रूपांतर तीन अध्यायांमध्ये पूर्ण केले आहे. दि.०९-०९-२०२१ </p><p><b>अनुक्रमणिका</b></p><p>१. श्रीगणेश स्तुति</p><p>२. आरती अष्ट विनायकांची</p><p>३. मुद्गल पुराण </p><p>४. <span>नारद आणि मुद्गल पुराणामधील गणपतीस्तोत्रे (८ स्तोत्रे)</span></p><p>५. गणेशपुराणामधील गणपतीस्तोत्रे (३ स्तोत्रे)</p><p>६. गणेश पुराण - उपासनाखंड (६ अध्याय)</p><p>७. गणेश पुराण - क्रीडा खंड (३ अध्याय)</p><p>------------------------------------------------------------------</p><p><span style="font-size: medium;">१. श्रीगणेश स्तुति</span></p><p>ॐ श्री गणेशाय नम: |</p><p><br /></p><p>ॐ नमो जी श्रीगणेशा । आद्य वन्द्य तु सुरवरेश्वरा । ॐकार_शुण्डा, शूर्प_कर्णा । ब्रह्माण्ड_उदरा, लम्बोदरा (१)</p><p>उत्पत्ति, स्थिति, लय कधी ? कसा ?। का ? कुणाचा ? या गणितांच्या । 'समीकरण'रूपी तव 'पाशा'। हस्ती धरुनी क्रीडसी मोदे (२)</p><p>तव सु'स्वरूप', लीलादिका । वर्णावे ऐशी मम इच्छा । पूर्ण करावी हीच प्रार्थना । तव चरणी मी करीतसे (३)</p><p>तव लीला_'अवतार' कथा । व्रते, पूजा विधि विधाना । गणेश, मुद्गल पुराणी वर्णिल्या । व्यासावतारी नारायणाने (४)</p><p>त्यातील काही वेचक माहिती । 'मराठी' भाषेत करण्यास 'उक्ति' । द्यावी मजला बौद्धिक शक्ति । ऐशी विनवणी तव चरणी (५)</p><p>'कृत'युगी अदिति-कश्यप पुत्र । अवतरलास तु 'महोत्कट' । मारावयास नरांतक देवांतक । लीला विनोदे मांडिली (६)</p><p>'त्रेता' युगी तु गिरिजात्मज । नामे 'गुणेश', 'मयूरेश्वर' । मारिलास 'सिंधु' दैत्येश्वर । भक्त संरक्षणाप्रीत्यर्थ (७)</p><p>'द्वापर' युगी ब्रह्मदेवे । देता जांभई 'सिन्दूर' उद्भवे । वरेण्य पुत्र 'गजानन' रूपे । चिरडून 'सिन्दूर'_वर्ण तव झाला (८)</p><p>'कलि' युगी तु युगांत समयी । 'धर्म' पुन: प्रस्थापण्यासी। 'धुम्रकेतु' नामावतारी। प्रगट होशील भविष्यात (९)</p><p>अवस्थेतली चतुर्थावस्था । जिला नाम 'तुरीया' वा 'तुर्या' । तीच स्वानंदे 'सहज' साध्य होता । तव सालोक्य मुक्तिचा लाभ (१०)</p><p>चारही पुरुषार्थाञ्चा दाता । चारही सं_कष्टांचा हर्ता । विघ्न कर्ता धर्ता हर्ता । अनाकलनीय या तुझ्या लीला (११)</p><p>तुझे चतुर्थी तिथी_व्रत । शुक्ल, कृष्ण दोनही पक्षांत । 'विनायकी', 'संकष्टी' नामे प्रसिद्ध । प्रिय सर्व गाणेश भक्तासी (१२)</p><p>शुक्ल पक्षात चंद्रोदय । दिवसा सूर्योदयानंतर । मेळविण्यास चारही पुरुषार्थ । ज्ञान_सूर्य उजेडात मानसीच्या (१३)</p><p>कृष्ण पक्षात चंद्रोदय । रात्री सूर्यास्ता नंतर । रात्री अंधार अज्ञान तिमिर । त्यावरी सं_कष्टांचा मारा (१४)</p><p>जेथे मानवी शक्ती, युक्ती । अपुरी पडे ऐशिया समयी । गणेशा तुझी कृपा दैवी । मागावया संकष्टी व्रताचरण (१५)</p><p>गणेशा तुझी आद्य वंदना । मान्य सर्व वैदिक जना । शैव, शाक्त, सौर, वैष्णवा । 'गाणेश' तर तुझेच अनुयायी (१६)</p><p>अवैदिक बौद्ध, जैन, शीख । वीरशैवादिक पंथ अनंत । तेही तुला मानिती अत्यंत । सर्वमान्य तु जगद्वंद्या (१७)</p><p>वार_व्रत तव मंगळवारी । भौम, भूमिपुत्र ग्रहाचे वारी । येता 'चतुर्थी' त्याच वारी । 'अंगारकी' योग तव वरदाने (१८)</p><p>ऐशी 'अंगारकी' विनायकी । तैशीच 'अंगारकी' "संकष्ट_चतुर्थी" । जे जे भक्तीने आचरिती । 'पुण्यार्जन' त्यांस अधिक होई (१८)</p><p>व्रताचरणार्थ 'उपवास'। पूजा, अर्चना करुनी 'विशेष' । गाती जे तुझी स्तोत्रे सतत । त्यांवरी 'प्रसन्न' होसी तु (१९)</p><p>अदिती, पार्वती, लक्ष्मी देवीन्नी । ऐसेच तुजसी सुप्रसन्न करुनी । 'वरदानार्थ' तव मातृत्व मागुनी । अवतार तुजसी घडविले (२०)</p><p>अदितीपुत्र 'महोत्कट'। पार्वतीपुत्र 'गिरिजात्मज' । लक्ष्मीपुत्र 'ढुंढिराज'। अवतार तुझे ऐसे नाना (२१)</p><p><br /></p><p>----------------------- =============== ------------------------</p><p><br /></p><p>२. आरती अष्ट विनायकांची</p><p>------------------------</p><p><br /></p><p>जय देव, जय देव, जय श्रीविनायका</p><p>अष्ट विनायक तीर्थ क्षेत्री स्मरू तुला ।</p><p>जय देव, जय देव (धृ)</p><p><br /></p><p>मोरगावि 'मयुरेश्वर' सुंदर मूर्ति तुझी</p><p>'सिद्धिविनायक' रूपे सिद्धटेकि वससी ।</p><p>'पालि'स 'बल्लाळेशर' तू अवतरलासी</p><p>भक्ता 'वरद_विनायक' तू महाड क्षेत्री (१)</p><p>जय देव, जय देव</p><p><br /></p><p>'कदम्ब_नगरी' 'थेउर' क्षेत्री 'चिन्तामणी'</p><p>'गिरिजात्मज' लेण्याद्रिस तू गिरिजेसाठी ।</p><p>ओझरला 'विघ्नेश्वर' विघ्नराज वससी</p><p>'महागणपती' भक्त प्रिय रांजणगावी (२)</p><p>जय देव, जय देव</p><p><br /></p><p>गणेश, मुद्गल पुराणि वर्णित कथानका</p><p>अनुरूप अशा'स्वयम्भू' मूर्त्या स्थापुनिया</p><p>गाणेश भक्त श्रद्धेने करिती यात्रा</p><p>पूजा, अर्चा, जप, तप गाणेश व्रतान्ना (३)</p><p>जय देव, जय देव</p><p><br /></p><p>मत्सरासुरा शमवण्या 'वक्रतुण्ड' झाला</p><p>मदासुरा शमवण्या 'एकदन्त' अवतार</p><p>मोहासुरा शमवण्या 'महोदर'ख्यात:</p><p>लोभासुर शमवाया 'गजानन' तु झाला (४)</p><p>जय देव, जय देव</p><p><br /></p><p>क्रोधसुरा शमवण्या 'लम्बोदर' होसी</p><p>कामासुरा शमवण्या 'विकट' रूप धरिसी</p><p>'विघ्नराज' रूपे तु 'ममतासुर' शमिसी</p><p>'धूम्रवर्ण' अभिमानासुर नाशक होसी (५)</p><p>जय देव, जय देव</p><p><br /></p><p><br /></p><p>---------------- ================ --------------------</p><p><b>३. मुद्गल पुराण</b> : (२० : ५-१२) (Spiritual significance of विनायक incarnations)</p><p><br /></p><p>वक्रतुण्डावतारश्च देहानाम ब्रह्मधारक:</p><p>मत्सरासुर हंता स सिंहवाहनग: स्मृत: (१)</p><p>एकदन्तावतारो वै देहिनाम ब्रह्मधारक:</p><p>मदासुरस्य हंता स आखुवाहनग: स्मृत: (२)</p><p>'महोदर' इति ख्यात: 'ज्ञान_ब्रह्म' प्रकाशक:</p><p>मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनग: स्मृत: (३)</p><p>'गजानन:' स विज्ञेय: सांख्येभ्य: सिद्धि दायक:</p><p>लोभासुर प्रहर्ता वै आखुगश्च प्रकीर्तित: (४)</p><p>लम्बोदरावतारो वै क्रोधसुर निबर्हण:</p><p>शक्तिब्रह्माखुग: सत यत तस्य धारक उच्यते (५)</p><p>'विकटो' नाम विख्यात: कामासुर विदाहक:</p><p>मयूरवाहनश्च अयम 'सौर_ब्रह्म'धर स्मृत: (६)</p><p>विघ्नराजावतारश्च शेष वाहन उच्यते</p><p>'ममतासुर' हंता स विष्णु_ब्रह्मेति वाचक: (७)</p><p>धूम्रवर्णावतारश्चाभिमानासुर नाशक:</p><p>आखुवाहन एवासौ शिवात्मा तु स उच्यते (८)</p><p>-----------------</p><p><b><span style="font-size: medium;">४. नारद आणि मुद्गलपुराणामधील गणपतीस्तोत्रे</span></b></p><p><b>१ संकट नाशन गणेश स्तोत्र</b></p><p>(नारद पुराण, नारद विरचित)</p><p>|| ॐ श्री गणेशाय नम: ||</p><p>नारद उवाच ||</p><p>प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं |</p><p>भक्तावासं स्मरेत् नित्यं आयु: कामार्थ सिद्धये ||१||</p><p>प्रथमं वक्रतुण्डं च एकदंतं द्वितीयकं |</p><p>तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं ||२||</p><p>लंबोदरं पञ्चमं च षष्ठमं विकटमेव च |</p><p>सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णम् तथाष्टकं ||३||</p><p>नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं |</p><p>एकादशं गणपतिम् द्वादशं तु गजाननं ||४||</p><p>द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेत् नर: |</p><p>न च विघ्नभयं तस्य सर्व सिद्धिकरं भवेत् ||५||</p><p>विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं |</p><p>पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ||६||</p><p>जपेत् गणपति स्तोत्रं षड्भि: मासै: फ़लं लभेत् |</p><p>संवत्सरेण सिद्धिम् च लभते नात्र संशय: ||७||</p><p>अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्र्च लिखित्वा य: समर्पयेत |</p><p>तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत: ||८||</p><p><br /></p><p>|| इति श्री नारद पुराणे नारद विरचितं</p><p>“संकटनाशनं” नाम श्रीगणेश स्तोत्रं संपूर्णम् ||</p><p>शुभं भवतु | शुभं भवतु | शुभं भवतु |</p><div>----</div><div><div>|| ॐ श्री गजानन प्रसन्न ||</div><div>|| ॐ गं गणपतये नम: ||</div><div><br /></div><div><b>२ श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र (मुद्गल पुराण )</b></div><div><b><br /></b></div><div>|| ॐ श्री गणेशाय नम: ||</div><div>शुक्लाम्बर धरं देवं शशिवर्णम् चतुर्भुजं |</div><div>प्रसन्न वदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशांतये ||१|</div><div>अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम् पूजितो य: सुरासुरै: |</div><div>सर्व विघ्नहर: तस्मै गणाधिपतये नम: ||२||</div><div>गणानां अधिप: चण्डो गजवक्त्र: त्रिलोचन: |</div><div>प्रसन्नो भव मे नित्यं वरदात: विनायक: ||३||</div><div>सुमुख: एकदंतश्र्च कपिलो गजकर्णक: |</div><div>लंबोदरश्र्च विकट: विघ्ननाशो विनायक: ||४||</div><div>धूम्रकेतु: गणाध्यक्ष: भालचन्द्र: गजानन: |</div><div>द्वादश एतानि नामानि गणाध्यक्षश्र्च य: पठेत् ||५||</div><div>विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं |</div><div>इष्टकामं तु कामार्थी धर्मार्थी मोक्षं अक्षयं ||६||</div><div>विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा |</div><div>संग्रामे संकटे चैव विघ्न: तस्य न जायते ||७||</div><div><br /></div><div>|| इति श्री मुद्गल पुराणोक्तं श्रीगणेश द्वादश नाम स्तोत्रं संपूर्णम् ||</div><div>शुभं भवतु | शुभं भवतु | शुभं भवतु |</div><div><br /></div><div>------------</div></div><div><div><br /></div><div><b>३ योगशांतिप्रद स्तोत्र (मुद्गल पुराण )</b></div><div><br /></div><div>|| ॐ श्री गणेशाय नम: ||</div><div>|| ॐ श्री गणेशाय नम: ||</div><div><br /></div><div>देवा ऊचु: ||</div><div>गजाननाय पूर्णाय 'सांख्य'रूपमयाय च |</div><div>विदेहेन च सर्वत्र संस्थिताय नमो नम: ||१||</div><div>अमेयाय च हेरम्ब परशू धारकाय ते |</div><div>मूषक वाहनायैव विश्र्वेशाय नमो नम: ||२||</div><div>अनंत विभवायैव परेषां पर रूपिणे |</div><div>शिवपुत्राय देवाय गुहाग्रजाय ते नम: ||३||</div><div>पार्वतीनन्दनायैव देवानां पालकाय ते |</div><div>सर्वेषां पूज्य देहाय गणेशाय नमो नम: ||४||</div><div>स्वानंद वासिने तुभ्यं शिवस्य कुलदैवतं |</div><div>विष्ण्वादीनां विशेषेण कुलदेवाय ते नम: ||५||</div><div>योगाकाराय सर्वेषां 'योगशांति' प्रदाय च |</div><div>ब्रह्मेषाय नमस्तुभ्यं ब्रह्मभूत प्रदाय ते ||६||</div><div>सिद्धि-बुद्धि पते नाथ सिद्धिबुद्धि प्रदायिने |</div><div>मायिने मायिकेभ्यश्र्च मोहदाय नमो नम: ||७||</div><div>लम्बोदराय वै तुभ्यं सर्वोदरगताय च |</div><div>अमायिने च मायाया: आधाराय नमो नम: ||८||</div><div>'गज:' सर्वस्य 'बीजं' यत् तेन चिह्नेन विघ्नप |</div><div>योगिन: त्वां प्रजानंति तदाकारा भवंति ते ||९||</div><div>तेन त्वं गजवक्त्रश्र्च किं स्तुम: त्वं गजानन |</div><div>वेदादयो विकुण्ठाश्र्च शंकराद्याश्र्च देवपा:||१०||</div><div>शुक्रादयश्र्च शेषाद्या: स्तोतुं शक्ता: भवंति न |</div><div>तथापि संस्तुतोऽसि त्वं स्फ़ूर्त्या त्वत् दर्शनात्मना ||११||</div><div>एवं उक्त्वा प्रणेमु: तं गजाननं शिवादय: |</div><div>स तान् उवाच प्रीतात्मा भक्तिभावेन तोषित: ||१२||</div><div><br /></div><div>|| श्री गजानन उवाच ||</div><div>भवत् कृतं इदं स्तोत्रं मदीयं सर्वदं भवेत् |</div><div>पठते श्रृण्वते चैव 'ब्रह्मभूत' प्रदायकं ||१३||</div><div>||ॐ इति श्री मुद्गल पुराणे 'ब्रह्मभूत' प्रदायक गजानन स्तोत्रं संपूर्णम् ||</div></div><div><br /></div><div>-----</div><div><div><div><br /></div><div><b>४ ब्रह्म भूत प्रदायक स्तोत्र (मुद्गल पुराण )</b></div><div><b><br /></b></div><div> || ॐ श्री गणेशाय नम: ||</div><div>देवा ऊचु: ||</div><div>गजाननाय पूर्णाय 'सांख्य'रूपमयाय च |</div><div>विदेहेन च सर्वत्र संस्थिताय नमो नम: ||१||</div><div>अमेयाय च हेरम्ब परशू धारकाय ते |</div><div>मूषक वाहनायैव विश्र्वेशाय नमो नम: ||२||</div><div>अनंत विभवायैव परेषां पर रूपणे |</div><div>शिवपुत्राय देवाय गुहाग्रजाय ते नम: ||३||</div><div>पार्वतीननदनायैव देवानां पालकाय ते |</div><div>सर्वेषां पूज्य देहाय गणेशाय नमो नम: ||४||</div><div><br /></div><div>स्वानदं वासिने तुभ्यं शिवस्य कुलदैवतं |</div><div>विष्ण्वादीनां विशेषेण कुलदेवाय ते नम: ||५||</div><div>योगाकाराय सवेषां 'योगशांति' पदाय च |</div><div>ब्रह्मेषाय नमस्तुभ्यं ब्रह्मभूत पदाय ते ||६||</div><div>सिद्धि-बुद्धि पते नाथ सिद्धि-बुद्धि प्रदायिने |</div><div>मायिने मायिकेभ्यश्च मोहदाय नमो नम: ||७||</div><div>लम्बोदराय वै तुभ्यं सर्वोदरगताय च |</div><div>अमायिने च मायाया: आधाराय नमो नम: ||८||</div><div>'गज:' सर्वस्य 'बीजं' यत् तेन चिन्हेन विघ्नप |</div><div>योगिन: त्वां प्रजानंति तदाकारा भवंति ते ||९||</div><div>तेन त्वं गजवक्त्रश्च किं स्तुम: त्वं गजानन |</div><div>वेदादयो विकुण्ठाश्च शंकराद्याश देवपा:||१०||</div><div>शुक्राद्यश्च शेषाद्या: स्तोतुं शक्ता: भवंति न |</div><div>तथापि संस्तुतोऽसि त्वं स्फ़ूर्त्या त्वत् दर्शनात्मना ||११||</div><div>एवं उक्त्वा प्रणेमु: तं गजाननं शिवादय: |</div><div>स तान् उवाच प्रीतात्मा भक्तिभावेन तोषित: ||१२||</div><div>|| शी गजानन उवाच ||</div><div>भवत् कृतं इदं स्तोत्रं मदीयं सर्रदं भवेत् |</div><div>पठते शृणवते चैव 'बहभूत' पदायकं ||१३||</div><div>||ॐ इति श्री मुद्गल पुराणे 'ब्रह्मभूत' प्रदायक गजानन स्तोत्रं संपूर्णम् ||</div></div><div><br /></div><div><br /></div><div><b>५ सिद्धिविनायक स्तोत्र (मुद्गल पुराण)</b></div><div><br /></div><div>|| ॐ श्री गणेशाय नम: ||</div><div>विघ्नेश विघ्नचय ख़ंडन नामधेय |</div><div>श्री शंकरात्मज सुराधिप वंद्य पाद ||</div><div>दुर्गा महाव्रत फ़लाखिल मङ्गलात्मन् |</div><div>विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||१||</div><div>सत्पद्मराग मणिवर्ण शरीर कांति: |</div><div>श्री सिद्धि-बुद्धि परिचर्चित कुंकुमश्री ||</div><div>दक्षस्तने वलयिताति मनोज्ञ शुण्डो |</div><div>विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||२||</div><div>पाशांकुशाब्ज परशूंश्र्च दधत् चतुर्भि: |</div><div>दोर्भि: च शोण कुसुमस्रग् उमाङ्ग जात: ||</div><div>सिन्दूर शोभित ललाट विधु प्रकाश: |</div><div>विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||३||</div><div>कार्येषु विघ्नचय भीत विरञ्चि मुख़्यै: |</div><div>संपूजित: सुरवरै: अपि मोदकाद्यै: ||</div><div>सर्वेषु च प्रथममेव सुरेषु पूज्यो |</div><div>विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||४||</div><div>शीघ्रांचनस्खलन तुङ्गरवोर्ध्व कण्ठ |</div><div>स्थूलोन्दु रुद्र वण हासित देवसंघ: ||</div><div>शूर्प श्रुतिश्र्च पृथु वर्तुल तुङ्ग तुन्दो |</div><div>विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||५||</div><div>यज्ञोपवीत पदलंभित नागराजो |</div><div>मासादि पुण्यद दृशीकृत ऋक्षराज: |</div><div>भक्ताभयप्रद दयालय विघ्नराज |</div><div>विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||६||</div><div>सद्रत्नसारततिराजित सत्किरीट: |</div><div>कौसुम्भ चारु वसनद्वय ऊर्जितश्री: ||</div><div>सर्वत्र मङ्गलकर स्मरण प्रतापो |</div><div>विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||७||</div><div>देवान्तकाद्यसुर भीत सुरार्ति हर्ता |</div><div>विज्ञान बोधन वरेण तमोऽपहर्ता |</div><div>आनंदित त्रिभुवनेश कुमार बन्धो |</div><div>विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||८||</div><div><br /></div><div>|| ॐ इति श्रीमुद्गल पुराणोक्त श्री सिद्धिविनायक स्तोत्रं संपूर्णम् ||</div></div><div>------</div><div><br /></div><div><div><b>६ परब्रह्म रूप कर स्तोत्र (मुद्गल पुराण )</b></div><div><br /></div><div>|| ॐ श्री गणेशाय नम: ||</div><div>अजं निर्विकल्पं निराकारमेकं |</div><div>चिदानंदमानंदमद्वैत पूर्णम् ||</div><div>परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं |</div><div>परब्रह्म रूपं गणेशं भजेम ||१||</div><div>गुणातीतमाद्यं चिदानंद रूपं |</div><div>चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यं ||</div><div>मुनिध्येयमाकाश रूपं परेशं |</div><div>परब्रह्म रूपं गणेशं भजेम ||२||</div><div>जगत् कारणं कारण ज्ञान रूपं |</div><div>सुरादिं सुखादिं युगादिम् गणेशं ||</div><div>जगद्व्यापिनं विश्र्ववंद्यं सुरेशं |</div><div>परब्रह्म रूपं गणेशं भजेम ||३||</div><div>रजोयोगतो ब्रह्मरूपं श्रुतिज्ञं |</div><div>सदा कार्यसक्तं हृदाऽचिन्त्य रूपं ||</div><div>जगत् कारणं सर्व विद्या निदानं |</div><div>परब्रह्म रूपं गणेशं नता: स्म: ||४||</div><div>सदा सत्ययोगं मुदा क्रीडमानं |</div><div>सुरारीन् हरन्तं जगत् पालयन्तं ||</div><div>अनेकावतारं निजज्ञान हारं |</div><div>सदा विश्र्व रूपं गणेशं नमाम: ||५||</div><div>तमोयोगिनं रुद्र रूपं त्रिनेत्रं |</div><div>जगत् धारकं तारकं ज्ञान हेतुं ||</div><div>अनेकागमै: स्वं जनं बोधयंतं |</div><div>सदा शर्व रूपं गणेशं नमाम: ||६||</div><div>नम: स्तोमहारं जनाज्ञानहारं |</div><div>त्रयी वेदसारं परब्रह्मपारं ||</div><div>मुनि ज्ञानकारं विदूरे विकारं |</div><div>सदा ब्रह्म रूपं गणेशं नमाम: ||७||</div><div>निजैरोषधी: तर्पयन्तं कराद्यै: |</div><div>सुरौघान् कलाभि: सुधास्राविणीभि: ||</div><div>दिनेशांशु संतापहारं द्विजेशं |</div><div>शशांक स्वरूपं गणेशं नमाम: ||८||</div><div>प्रकाश स्वरूपं नमो वायु रूपं |</div><div>विकारादि हेतुं कलाभार भूतं ||</div><div>अनेक क्रियानेक शक्ति स्वरूपं |</div><div>सदा शक्ति रूपं गणेशं नमाम: ||९||</div><div>प्रधान स्वरूपं महत् तत्त्वरूपं |</div><div>धराचारि रूपं दिगीशादि रूपं ||</div><div>असत् सत् स्वरूपं जगत् हेतु भूतं |</div><div>सदा विश्र्व रूपं गणेशं नता: स्म: ||१०||</div><div>त्वदीये मन: स्थापयेत् अंघ्रि युग्मे |</div><div>जनो विघ्नसंघात् न पीडां लभेत ||</div><div>लसत् सूर्यबिम्बे विशाले स्थितोऽयं |</div><div>जनो ध्वान्तपीडां कथं वा लभेत ||११||</div><div>वयं भ्रामिता: सर्वथाऽज्ञान योगात् |</div><div>अलब्धा: तवांघ्रिम् बहून् वर्ष पूगान् ||</div><div>इदानीम् अवाप्ता: तवैव प्रसादात् |</div><div>प्रपन्नान् सदा पाहि विश्र्वंभराद्य ||१२||</div><div>इदं य: पठेत् प्रातरुत्थाय धीमान् | त्रिसन्ध्यं सदा भक्तियुक्तो विशुद्ध: ||</div><div>सुपुत्रान् श्रियं सर्वकामान् लभेत | परब्रह्म रूपो भवेत् अंतकाले ||१३||</div><div><br /></div><div>||इति परब्रह्म रूप कर श्रीगणेश स्तव: सम्पूर्ण: ||</div><div><br /></div><div>---------</div></div><div><br /></div><div><div><b>७ श्रीगणेश गीतासार स्तोत्र (मुद्गल पुराण)</b></div><div><br /></div><div>|| ॐ श्री गणेशाय नम: ||</div><div>|| शिव उवाच ||</div><div>गणेश वचनं श्रृत्वा प्रणत: भक्ति भावत: |</div><div>प्रपच्छु: तं पुन: शांता ज्ञानं ब्रूहि गजानन ||१||</div><div><br /></div><div>|| श्री गणेश उवाच ||</div><div>देह: चतुर्विध: प्रोक्त: त्वं पदं ब्रह्म भिन्नत: |</div><div>सोऽहं देही चतुर्धा तत् पदं ब्रह्म सदैकत: ||२||</div><div>संयोग उभयो: यत् च असिपदं ब्रह्म कथ्यते |</div><div>स्वत उत्थानकं देवा विकल्प करणात् त्रिधा ||३||</div><div>सदा स्वसुखनिष्ठं यद् ब्रह्म सांख्यं प्रकीर्तितं |</div><div>परत: चोत्थानकं तत् क्रीडाहीनतया परं ||४||</div><div>स्वत: परत उत्थान हीनं यद् ब्रह्म कथ्यते |</div><div>स्वानंद: सकलाभेद रूप: संयॊग कारक: ||५||</div><div>तदेव पंचधा जातं तन्निबोधत ईश्र्वरा: |</div><div>स्वतश्र्च परतो ब्रह्मोत्थानं तत् त्रिविधं स्मृतं ||६||</div><div>ब्रह्मणो नाम तद् वेदे कथ्यते भिन्न भावत: |</div><div>तयो: अनुभवो यश्र्च योगिनां हृदि जायते ||७||</div><div>रूपं तदेव ज्ञातव्यं असत् वेदेषु कथ्यते |</div><div>सा शक्ति: इयं आख्याता ब्रह्मरूपा हि असन्मयी ||८||</div><div>तत्र अमृतमय आधार: सूर्य आत्मा प्रकथ्यते |</div><div>शक्ति सूर्यमयो विष्णु: चिदानन्दात्मको हि स: ||९||</div><div>त्रिविधेषु तदाकार: तत् क्रियाहीन रूपक: |</div><div>नेति शिव: चतुर्थोऽयं त्रिनेति कारकात्पर: ||१०||</div><div>त्रिविधं मोहमात्रं यत् निर्मोह: तु सदाशिव: |</div><div>तेषां अभेदे यद् ब्रह्म स्वानन्द: सर्व योगक: ||११||</div><div>पञ्चानां ब्रह्मणां यत् च बिम्बं मायामयं स्मृतं |</div><div>ब्रह्मा तदेव विज्ञेय: सर्वादि: सर्वभावत: ||१२||</div><div>बिम्बेन सकलं सृष्टं तेनायं प्रपितामह: |</div><div>असत् सत् सदसत् चेति स्वानंद रूपा वयं स्मृता: ||१३||</div><div>स्वानंदात् यत् परं ब्रह्म यॊगाख्यं ब्रह्मणां भवेत् |</div><div>केषां अपि प्रवेशो न तत्र तस्यापि कुत्रचित् ||१४||</div><div>मदीयं दर्शनं तत्र योगेन योगिनां भवेत् |</div><div>स्वानंदे दर्शनं प्राप्तं स्वसंवेद्यात्मकं च ये ||१५||</div><div>तेन स्वानंद आसीनं वेदेषु प्रवदंति मां |</div><div>चतुर्णाम् ब्रह्मणां योगात् संयोगाभेद योगत: ||१६||</div><div>संयोगश्र्च हि अयोगश्र्च तयो: परतयो: मत: |</div><div>पूर्णशांतिप्रद: योग: चित्त वृत्ति निरोधत: ||१७||</div><div>क्षिप्तं मूढं च विक्षिप्तं एकाग्रं च निरोधकं |</div><div>पञ्च भूमिमयं चित्तं तत्र चिन्तामणि स्थित: ||१८||</div><div>पञ्च भूत निरोधेन प्राप्यते योगिभि: हृदि |</div><div>शांतिरूपात्म योगेन तत: शांति: मदात्मिका ||१९||</div><div>एतद् योगात्मकं ज्ञानं गाणेशं कथितं मया |</div><div>नित्यं युञ्जंत योगेन नैव मोहं प्रगच्छत ||२०||</div><div>चित्तरूपा स्वयं बुद्धि: सिद्धि: मोहमयी स्मृता |</div><div>नानाब्रह्म विभेदेन ताभ्यां क्रीडति तत् पति: ||२१||</div><div>त्यक्त्वा चिन्ताभिमानं ये "गणेशोऽहं" समाधिना |</div><div>भविष्यथ भवंतोऽपि मद् रूपा मोह वर्जिता: ||२२||</div><div><br /></div><div>|| श्री शिव उवाच ||</div><div>इत्युक्त्वा विररामाथ गणेशो भक्त वत्सल: |</div><div>तेऽपि भेदं परित्यज्य शांति प्राप्ताश्र्च तत् क्षणात् ||२३||</div><div>एकविंशति श्र्लोकै: तै: गणेशेन प्रकीर्तितं |</div><div>गीतासारं सुशान्तेभ्य: शांतिदं योग साधनै: ||२४||</div><div>गणेशगीतासारं च य: ठिष्यति भावत: |</div><div>श्रॊष्यति श्रद्धधानश्र्चेद् ब्रह्मभूत समो भवेत् ||२५||</div><div>इह भुक्त्वा अखिलान् भोगान् अन्ते योगमयो भवेत् |</div><div>दर्शनात् तस्य लोकानां सर्व पापं लयं व्रजेत् ||२६||</div><div><br /></div><div>|| इति श्री मुद्गल पुराणोक्तं गणेशगीतासार स्तोत्रं संपूर्णम् ||</div><div><br /></div><div>-------------</div></div><div><br /></div><div><div><b>८ ढुंढि स्वरूप वर्णन स्तोत्र (गणेश पुराण)</b></div><div><br /></div><div>|| ॐ श्री गणेशाय नम: ||</div><div> जैमिनी उवाच ||</div><div>न वक्तुं शक्यते राजन् केनाऽपि तत् स्वरूपकं |</div><div>नोपाधिन युतं ढुढिम् वदामि श्रृणु तत्वत: ||१||</div><div>अहं पुरा सुशांत्यर्थम् व्यासस्य शरणं गत: |</div><div>मह्यं संकथितं तेन साक्षात् नारायणेन च ||२||</div><div>तदेव त्वां वदिष्यामि स्वशिष्यं च निबोध मे |</div><div>यदि तं भजसि ह्यद्य सर्वसिद्धि प्रदायकं ||३||</div><div>देहि देहमयं सर्वम् 'ग'काराक्षर वाचकं |</div><div>संयोगायोग रूपं यद् ब्रह्म् 'ण'कार वाचकं ||४||</div><div>तयो: स्वामी गणेशश्र्च पश्य वेदे महामते |</div><div>चित्ते निवासकत्वाद्वै 'चिन्तामणि' स कथ्यते ||५||</div><div>चित्तरूपा स्वयं बुद्धि: भ्रान्ति रूपा महीपते |</div><div>सिद्धि: तत्र तयो: योगे प्रलभेत तयो: पति: ||६||</div><div><br /></div><div>|| द्विज उवाच ||</div><div>शृणु राजन् गणेशस्य स्वरूपं योगदं परं |</div><div>भुक्ति मुक्ति प्रदं पूर्णम् धारितं चेत् नरेण वै ||७||</div><div>चित्ते 'चिन्तामणि:' साक्षात् पंच चित्त प्रचालक: |</div><div>पंच वृत्ति निरोधेन प्राप्यते योग सेवया ||८||</div><div>'असंप्रज्ञात' संस्थश्र्च 'गज'शब्दो महामते |</div><div>तदेव मस्तकं यस्य देह: सर्वात्मकोऽभवत् ||९||</div><div>भ्रान्ति रूपा महामाया सिद्धि: वामाङ्ग संश्रिता |</div><div>भ्रांतिधारक रूपा सा बुद्धिश्र्च दक्षिणाङ्गके ||१०||</div><div>तयो: स्वामी गणेशश्र्च मायाभ्यां खेलते सदा |</div><div>संभजस्व विधानेन सदा संलभसे नृप ||११||</div><div><br /></div><div>|| ॐ इति श्री ढुण्ढि स्वरूप वर्णन स्तोत्रं संपूर्णम् ||</div><div><br /></div><div>-------------</div><div><br /></div><div>|| ॐ श्री गजानन प्रसन्न || || ॐ गं गणपतये नम: ||</div><div>|| ॐ श्री गजानन प्रसन्न || || ॐ गं गणपतये नम: ||</div><div>|| ॐ श्री गजानन प्रसन्न || || ॐ गं गणपतये नम: ||</div><div>|| ॐ श्री गजानन प्रसन्न || || ॐ गं गणपतये नम: ||</div><div>|| ॐ श्री गजानन प्रसन्न || || ॐ गं गणपतये नम: ||</div><div><br /></div><div>***********************</div><h3 style="text-align: left;">५. श्री गणेशपुराणातील गणपतिस्तोत्रे</h3><div><div>१. ॐ अथ <b>गणेश स्तवराज स्तोत्रं </b>: (गणेश पुराण उपासना खंड अध्याय १३)</div><div><br /></div><div>त्रिदेवा: ऊचु:</div><div>अजं निर्विकल्पं निराकारमेकं | निरानंदमानंदं अद्वैत पूर्णम् |</div><div>परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं | परब्रह्म रूपं गणेशं भजेम (ग.पु.१३.३)</div><div><br /></div><div>गुणातीतमाद्यं चिदानंदरूपं | चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यं |</div><div>मुनिध्येयमाकाश रूपं परेशं | परब्रह्म रूपं गणेशं भजेम (ग.पु.१३.४)</div><div><br /></div><div>जगत् कारणं कारणज्ञान रूपं | सुरादिम् सुखादिम् युगादिम् गणेशं |</div><div>जगद्वापिनं विश्ववंद्यं सुरेशं | परब्रह्म रूपं गणेशं भजेम (ग.पु.१३.५)</div><div><br /></div><div>रजो_योगतो ब्रह्मरूपं श्रुतिज्ञं | सदा कार्यसक्तं हृदाऽचिन्त्य रूपं |</div><div>जगत् कारणं सर्वविद्या निदानं | परब्रह्म रूपं गणेशं नता: स्म: (ग.पु.१३.६)</div><div><br /></div><div>सदा सत्य_योगं, मुदा क्रीडमानं | सुरारीन् हरन् तं जगत् पालयंतं |</div><div>अनेकावतारं, निजज्ञाऩहारं | सदा विश्व रूपं गणेशं नमाम: (ग.पु.१३.७)</div><div><br /></div><div>तमो_योगिनं रुद्ररूपं त्रिनेत्रं | जगत् धारकं तारकं ज्ञान_हेतुं |</div><div>अनेकागमै: स्वं जनं बोधयन् तं | सदा शर्व_रूपं गणेशं नमाम: (ग.पु.१३.८)</div><div><br /></div><div>नम: स्तोम हारं, जनाज्ञाऩ हारं | त्रयी_वेद सारं, परब्रह्म_पारं |</div><div>मुनि ज्ञानकारं, विदूरे विकारं | सदा ब्रह्म_रूपं गणेशं नमाम: (ग.पु.१३.९)</div><div><br /></div><div>निजै: औषधि: तर्पयन् तं कराद्यै: | सुरौघान् कलाभि: सुधा स्राविणीभि: |</div><div>दिनेशांशु संतापहारं द्विजेशं | शशांक स्वरूपं गणेशं नमाम: (ग.पु.१३.१०)</div><div><br /></div><div>प्रकाश स्वरूपं, न वायु रूपं | विकारादि हेतुं, कलाभार भूतं |</div><div>अनेक क्रियानेक् शक्ति स्वरूपं | सदा शक्ति_रूपं गणेशं नमाम: (ग.पु.१३.११)</div><div><br /></div><div>प्रधान स्वरूपं, महत् तत्व रूपं | धराचारि रूपं दिगीशादि रूपं |</div><div>असत्-सत् स्वरूपं | जगद्-हेतुभूतं | सदा विश्व रूपं गणेशं नता: स्म: (ग.पु.१३.१२)</div><div><br /></div><div>त्वदीये मन: स्थापयेद् अंघ्रि युग्मे | जनो विघ्न_संघान् न पीडां लभेत |</div><div>लसत् सूर्य बिम्बे विशाले स्थितोऽयं | जनो ध्वान्त पीडां कथं वा लभेत (ग.पु.१३.१३)</div><div><br /></div><div>वयं भ्रामिता: सर्वथाऽज्ञान योगात् | अलब्धा: तवांघ्रिम् बहुन् वर्षपूगान् |</div><div>इदानीम् अवाप्ता:, तवैव प्रसादात् | प्रपन्नान् सदा पाहि विश्वंभराद्य: (ग.पु.१३.१४)</div><div><br /></div><div>इदं य: पठेत् प्रातरुत्थाय धीमान् | त्रिसंध्यं सदा भक्ति युक्तो विशुद्ध: |</div><div>सुपुत्रान् श्रियं सर्व कामान् लभेत | परब्रह्म रूपो भवेत् अंतकाले (ग.पु.१३.--)</div><div><br /></div><div>|| इति श्री गणेश पुराणे त्रिदेवै: कृतं अनंत कोटि ब्रह्माण्डोदर_विश्वरूप तथा कारण_ब्रह्म स्वरूप श्री गणेश स्तवराज स्तोत्रं संपुर्णम् </div><div><br /></div><div>----------------------- =============== ------------------------</div><div><br /></div><div>२. ॐ अथ<b> श्री गणेशाष्टकम्</b></div><div><br /></div><div>ॐ श्री गणेशाय नम: |</div><div><br /></div><div>सर्वे देवा: ऊचु:</div><div>यतोऽनंत शक्ते: अनंताश्च जीवा | यतो निर्गुणात् अप्रमेया गुणास्ते |</div><div>यतो भाति सर्वम् त्रिधा भेद भिन्नम् | सदा तं गणेशं नमामो भजाम: (१)</div><div><br /></div><div>यतश्चाविरासीत् जगत् सर्वमेतत् | तथाब्जासनो विश्वगो विश्वगोप्ता |</div><div>तथेन्द्रादयो देवसंघा: मनुष्या: | सदा तं गणेशं नमामो भजाम: (२)</div><div><br /></div><div>यतो वह्नि भानू, भवो भुर्जलं च | यत: सागराश्चंद्रमा व्योम वायु: |</div><div>यत: स्थावरा, जंगमा वृक्षसंघा: | सदा तं गणेशं नमामो भजाम: (३)</div><div><br /></div><div>यतो दानवा: किन्नरा: यक्षसंघा: | यतश्चारणा: वारणा: श्वापदाश्च |</div><div>यत: पक्षिकीटा: यतो वीरुधश्च | सदा तं गणेशं नमामो भजाम: (४)</div><div><br /></div><div>यतो बुद्धि: अज्ञाननाशो मुमुक्षो: | यत: संपदो भक्त संतोषिका: स्यु: |</div><div>यतो विघ्न नाशो यतो कार्यसिद्धि: | सदा तं गणेशं नमामो भजाम: (५)</div><div><br /></div><div>यत: पुत्र संपद् यतो वांछितार्थो | यतो भक्तविघ्ना: तथाऽनेकरूपा: |</div><div>यत: शोकमोहौ यत: काम एव | सदा तं गणेशं नमामो भजाम: (६)</div><div><br /></div><div>यतोऽनंत शक्ति: स शेषो बभूव | धराधारणेऽनेकरूपश्च शक्त: |</div><div>यतोऽनेकधा स्वर्ग लोका: हि नाना | सदा तं गणेशं नमामो भजाम: (७)</div><div><br /></div><div>यतो वेद वाचो विकुंठा मनोभि: | सदा नेतिनेतीति यत् तां गृणन्ति |</div><div>परब्रह्मरूपम् चिदानंदभूतम् | सदा तं गणेशं नमामो भजाम: (८)</div><div><br /></div><div>पुनरूचे गणाधीश: "स्तोत्रमेतत् पठेन्नर: |</div><div>त्रिसन्ध्यम् त्रिदिनम् तस्य सर्वम् कार्यम् भविष्यति (९)</div><div><br /></div><div>यो जपेत् अष्टदिवसं श्लोकाष्टकम् इदं शुभम् |</div><div>अष्टवारं चतुर्थ्याम् तु सोऽष्टसिद्धिम् अवाप्नुयात् (१०)</div><div><br /></div><div>य: पठेत् मासमात्रं तु, दशवारं दिने दिने |</div><div>स मोचयेत् बंधगतम् राजवध्यम् न संशय: (११)</div><div><br /></div><div>विद्याकामो लभेत् विद्यां पुत्रार्थी पुत्रमाप्नुयात् |</div><div>वांछितान् लभते सर्वान् एकविंशति वारत : (१२)</div><div><br /></div><div>यो जपेत् परया भक्त्या गजाननपरो नर:" |</div><div>एवं उक्त्वा ततो देव: चांतर्धानम् गत: प्रभु: (१३)</div><div><br /></div><div>|| इति श्री गणेश पुराणे उपासना खण्डे सर्व देवै: कृतं श्री गणेशाष्टक स्तोत्रम् संपूर्णम् ||</div><div><br /></div><div>------------------------</div><div><br /></div><div>३. ॐ अथ श्री गणेश पुराणे <b>मयूरेश्वर स्तोत्रम्</b> ||</div><div><br /></div><div>ॐ श्री गणेशाय नम: |</div><div>परब्रह्मरूपम् चिदानंदरूपम् | परेशं सुरेशं गुणाब्धिम् गुणेशम् |</div><div>गुणातीतमीशं मयूरेश वंद्यं | नता: स्मो, नता: स्मो , नता: स्मो, नता: स्म: (१)</div><div><br /></div><div>जगद्वंद्यमेकं पराकामेकं | गुणानां परं कारणं निर्विकल्पं |</div><div>जगत्पालकं हारकं तारकं तं | मयूरेश वंद्यं नता: स्मो, नता: स्म: (२)</div><div><br /></div><div>महादेवसूनुं महादैत्यनाशं | महापूरुषं सर्वदा विघ्ननाशं |</div><div>सदा भक्तपोषं परं ज्ञानकोषं | मयूरेश वंद्यं नता: स्मो, नता: स्म: (३)</div><div><br /></div><div>अनादिम् गुणादिम् सुरादिम् शिवाया: | महातोषदं सर्वदा सर्ववंद्यं |</div><div>सुरार्यन्तकं भुक्ति मुक्तिप्रदं तं | मयूरेश वंद्यं नता: स्मो, नता: स्म: (४)</div><div><br /></div><div>परं मायिनम् मायिनां अप्यगम्यं | मुनिध्येयमाकाशकल्पं जनेशम् |</div><div>असंख्यावतारं निजाज्ञाननाशं | मयूरेश वंद्यं नता: स्मो, नता: स्म: (५)</div><div><br /></div><div>अनेक क्रियाकारकं श्रुत्यगम्यं | त्रयी बोधितानेक कर्मादि बीजं |</div><div>क्रियासिद्धिहेतुं सुरेन्द्रादि सेव्यम् | मयूरेश वंद्यं नता: स्मो, नता: स्म: (६)</div><div><br /></div><div>महाकालरूपं निमेषादिरूपं | कलाकल्परूपं सदागम्यरूपं |</div><div>जन ज्ञानहेतुं नृणाम् सिद्धिदं तं | मयूरेश वंद्यं नता: स्मो, नता: स्म: (७)</div><div><br /></div><div>महेशादि देवै: सदाध्येयपादं | सदा रक्षकं तत्पदानाम् हतारिम् |</div><div>मुदा कामरूपं कृपावारिधिम् तं | मयूरेश वंद्यं नता: स्मो, नता: स्म: (८)</div><div><br /></div><div>सदा भक्तिम् नाथे, प्रणय परमानंद सुखदो |</div><div>यतस्त्वं लोकानां परम करुणां आशु तनुषे |</div><div><br /></div><div>षडूर्मीनां वेगं सुरवर विनाशं नय विभो |</div><div>ततो भक्ति: श्लाघ्या तव भजनतोऽनन्य सुखदात् (९)</div><div><br /></div><div>किमस्माभि: स्तोत्रं सकल सुरता पालक विभो |</div><div>विधेयं विश्वात्मन् अगणित गुणानां अधिपते |</div><div><br /></div><div>न संख्याता भूमि: तव गुणगणानाम् त्रिभुवने |</div><div>न रूपाणां देव प्रगटय कृपां नोऽसुरहते (१०)</div><div><br /></div><div>मयूरेशं नमस्कृत्य ततो देवऽब्रवीत् च तान् |</div><div>य इदं पठते स्तोत्रं स कामान् लभतेऽखिलान् (११)</div><div><br /></div><div>सर्वत्र जयं आप्नोति मानवायु: श्रियं पराम् |</div><div>पुत्रवान् धनसंपन्न: वश्यतां अखिलं नयेत् (१२)</div><div><br /></div><div>सहस्रावर्तनात् कारागृहस्थं मोचयेत् जनं |</div><div>नियुतावर्तनात् मर्त्यो साध्यं यत् साधयेत् क्षणात् (१३)</div><div><br /></div><div>|| इति श्री गणेश पुराणे मयूरेश्वर स्तोत्रम् संपूर्णम् ||</div><div><br /></div><div>----------------------- =============== ------------------------</div><div><br /></div></div><div><br /></div><div><br /></div><div><br /></div><div>----------------------- =============== ------------------------</div></div><p><span style="font-size: medium;"><b>६. श्री गणेश पुराण</b></span></p><p>श्री अति संक्षिप्त भावार्थपूरित मराठी भाषा अनुवादित गणेश पुराण :</p><p><b>अध्याय १</b></p><p>ॐ श्री गणेशाय नम: | ॐ श्री सरस्वत्यै नम्: | ॐ श्री ब्रह्मा, हरि, हराय नम: | ॐ श्री गुरु दत्तात्रेयाय नम: |</p><p>ॐ श्री शचि पुरंदराभ्याम् नम: | ॐ श्री आपाग्नि सोमार्क वायवे नम: | ॐ श्री सकल इष्ट, कुल, ग्राम, वास्तु देवताभ्यो नम: |</p><p>ॐ श्री महर्षी व्यासाय नम: | ॐ श्री ज्ञानदेवादिक सकल साधु संतादिकाभ्याम् नम: |</p><p>सर्वेभ्यो देवेभ्यो नम: | सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: ||</p><p>ॐ श्रीमन् महागणाधिपतये नम: | अविघ्नम् अस्तु |</p><p>एक अति संक्षिप्त गणेश पुराण । जे दोन तासातच होईल वाचुनं । प्रति मासी वा वारि होउ शके पठण । दर विनायकी, संकष्टी, मंगळवारी वा (१.१)</p><p>ऐसे सार निवडून निवडुनं । परम_अर्थ सांभाळून । लिहवून घेई गजानन । मम हस्ते हे पुण्य भाग्य माझे (१.२)</p><p>उप_पुराणात पहिले पुराण 'गणेश'। त्या ग्रंथी असती खंड दोन । पहिल्याचे 'उपासना' ऐसे नाम । अध्याय संख्या त्यांत त्र्याण्णऊ (१.३)</p><p>दुसरा 'क्रीडा' नामक खण्ड । अध्याय एकशे पंचावन्न । गणेश लीलावतार वर्णुन । "गणेश_गीता" उक्त त्यांत (१.४)</p><p>गणेशोपासनेस मार्गदर्शक । ऐशिया प्रथम खण्डात प्रथम । शौनकादिक ऋषीन्नी मांडिला 'यज्ञ'। पूर्वी एकदा कधी काळी (१.५)</p><p>यज्ञ यागादिकी भाग घेण्यास्तव । लोटती हजारो ऋषि मुनिवरांचे पुर । त्यांत एक 'सूत' नामे सुप्रसिद्ध । व्यास शिष्य थोर, पातला तेथे (१.६)</p><p>शौनकादिकान्नी त्यास ओळखोनी । पूजोनि बैसवला उच्च सुस्थानी । "दुर्मिळ_ज्ञान" सांगावे म्हणोनी । विनंती चरणी अर्पण केली (१.७)</p><p>सूत मग सांगती शौनकादिकासी । पूर्वी जे कथिले व्यासान्नी भृगूसी । त्यान्नी जे शिकविले सोमकांतासी । ते "गणेश पुराण" मी सांगतो ऐका (१.८)</p><p>सौराष्ट्र देशी 'सोमकांत' राजा । त्याची सुंदर राणी 'सुधर्मा' । राजपुत्र 'हेमकंठ' नामे ज्यान्ना । प्रजापालन उत्तम करीत होते (१.९)</p><p>त्यांचे होते मंत्री पांच । नामे विद्याधीश, रुद्रवान । क्षेमंकर, सुबल, ज्ञानगम्य । अति चतुर आपापुल्या कार्यी (१.१०)</p><p>सर्व प्रजा सुखी असता । एकाएकीच सोमकांता । 'गलित_कुष्ठ' नाम व्याधीने ग्रासिता । आकांत दैवी ओढवला (१.११)</p><p>राजवैद्यांच्या औषधोपचारे । ज्योतिषादिकांच्या मंत्रोपचारे । राजा_राणींच्या व्रतोपचारे । व्याधी काहीही हटेचना (१.१२)</p><p>मग हेमकंठास सिंहासनी । बैसवोनि राजा आणि राणी । दोन प्रधान सोबतीस घेउनी । 'वानप्रस्थाश्रम' स्वीकारिती (१.१३)</p><p>अरण्यांत एका सरोवरा कांठी । राजा_राणी विश्रांति घेती । तोच भृगुपुत्र 'च्यवन' ऋषी । सुदैवे तेथे पातला (१.१४)</p><p>तो म्हणे "मी भृगु_पुलोत्तमा पुत्र । आमुचा आश्रम आहे जवळच । तेथे येउनी मम पित्यास । भेटावे आपण ऐशी विनंती " (१.१५)</p><p>च्यवन ऋषी समवेत राजा । राणी, प्रधाना सोबत निघाला । 'भृगु' ऋषींच्या पाया पडला । पुसे व्याधिमुक्तीचा उपाय (१.१६)</p><p>ऋषी म्हणती राजयासी । "तव पूर्व जन्मीच्या पापराशी । 'व्याधि' रूपे छळती तुजसी । दु:ख भोग दैवी न्यायाने हा (१.१७)</p><p>पूर्वी विन्ध्याद्रिच्या 'कोल्हार' ग्रामी । 'चिद्रूप_सुभगा' वैश्य पतिपत्नी । त्यांचा पुत्र तु 'कामंदा' नामी । अति लाडांनी बिघडलास (१.१८)</p><p>होउनी दुराचारी, पापराशी । गो_ब्राह्मण_स्त्री हत्या करिसी । मद्यपान, वेश्यागमन, निन्दा, चोरी । तारुण्यी मदांधे करिसी नित्य (१.१९)</p><p>परी पुढे 'वार्धक्य’ प्राप्त होता । नाना व्याधिन्नी तुज ग्रासता । 'वैराग्य’, 'अनुताप’ हृदयी उपजता । तव 'चित्त’ प्रायश्चित्त करू पाहे (१.२०)</p><p>मग तु 'दानधर्म’ करू पाहसी । परी कोणीही 'योग्य सत्पात्र' व्यक्ती । पापार्जित धनराशीतिल कवडीही । स्वीकारण्यास नाकारिती (१.२१)</p><p>तेंव्हा त्या धन संचयोपयोगे । 'गणेश_मंदिर' तु जीर्णोद्धारिले । त्या पुण्याच्या फलप्राप्तीने । या जन्मी 'राजा’ झालास तु (१.२२)</p><p>परि आता 'पुण्या’चा संचय संपला । मग 'पाप' संचयांच्या फल_प्राप्तीला । हा व्याधींचा उगम जाहला । उपाय 'पाप_क्षालन'च त्यासी" (१.२३)</p><p>हे ऐकोनि सोमकांते । 'भृगु' ऋषींचे चरण धरले । "वाचवा मला !" ऐसे विनविले । मग दया उपजली ऋषींच्या मनी (१.२४)</p><p>'गणेश_मंत्रांनी' अभिमंत्रिलेले । तीर्थ राजावर प्रोक्षण केले । 'पाप_पुरुषास' बाहेर काढिले । भस्मही केले तात्काळ (१.२५)</p><p>'पुण्य' संपादुनी करण्यास संचय । आवश्यकच शरीराचे सहाय्य । त्याविना धर्माचरण अशक्यप्राय | शरीरम् आद्यम् खलु धर्म साधनम् (१.२६)</p><p>म्हणोनि प्रथम सोमकांताची । व्याधी ऋषींनी शमन करुनी । पुढे 'पुण्योपार्जनाचे' विधी । त्याच्या स्वहस्ते करविले (१.२७)</p><p>एकाक्षरी, षडाक्षरी इत्यादिक । गणेशाचे नाना मंत्र । 'गणेश_गायत्री' अत्यद्भुत । जप त्यांचे करविले रायासि (१.२८)</p><p>गणेशाची नाना स्तोत्रे । 'अथर्वशीर्ष' आदिक सूक्ते । नित्य पठण त्यांचे करविले । पापक्षालन व पुण्यार्जनासी (१.२९)</p><p>अर्थावरी 'लक्ष' केंद्रित करुनी । भाव_भक्तिने उच्चारिता ध्वनी । पापे शीघ्र जाती जळोनी । पोपटपंचीने निष्फळ प्रयत्न (१.३०)</p><p>गणेश_व्रतास उपवास । पारण्यास मोदकांचा नैवेद्य । दिसेल त्या प्रत्येक वस्तुमात्रात । गणेश_विश्वरूप_दर्शन 'योग' (१.३१)</p><p>जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी । पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणी। आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्यी । अध, ऊर्ध्वी पाहणे श्रीगणेशासची (१.३२)</p><p>ऐसा अभ्यास मनास घडविता । ध्यानी_मनी श्री गणेशास चिंतिता । गणेश 'सालोक्य' मुक्ति ये हाता । सोमकांतास 'भृगु' ऋषी उपदेशिती (१.३३)</p><p>श्वास घेता "श्री गणेशाय नम:”। अंत: कुम्भकी "श्री गणेशाय नम:”। उछ्वासीही "श्री गणेशाय नम:”। "श्री गणेशाय नम:” बाह्य कुम्भकीही (१.३४)</p><p>त्रिकरणे "काया_वाचा_मन”। अथवा "ज्ञानेन्द्रिये, कर्मेन्द्रिये, मन”। सर्व क्रिया करिता 'गणेश’ चिंतन । हा अभ्यास मनी मुरवायला हवा(१.३५)</p><p>गुरु उपदेशानुसार राजा । हा 'गणेश_योग' अभ्यासू लागला । सोबतचे राणी, प्रधानही सर्वथा । अनुकरण रायाचे करते जाहले (१.३६)</p><p>त्या सर्वान्ची सात्विक वृत्ती | सात्विक ज्ञानार्जनाची प्रवृत्ती | यांची पटवून घेऊन खात्री | भृगुंनी उचलले पाऊल पुढचे (१.३७)</p><p>राजास म्हणती "उद्या पासुनी | प्रातर्विधी सर्वही आटोपल्यावरी | ‘शुचिर्भूत’ होऊन या मजपाशी | 'गणेश_ पुराण' श्रवण करण्या (१.३८)</p><p>श्रवणं, कीर्तनं, स्मरणं, चिन्तनं | पादसेवनं, अर्चनं, वंदनं | दास्यं तथा आत्म_निवेदनम् | ‘गणेश_भक्ती' च्या पाय-या जाणाव्या (१.३९)</p><p>मार्ग 'ज्ञान’, 'कर्म’, 'राज' योगांचे | “दुरून डोंगर साजिरे” समान ते | आकर्षक पण दुर्गम नि कठिणसे | “भक्ति_मार्ग” सोपान सर्वात सोपा (१.४०)</p><p>‘भक्ति’ म्हणजे 'चिकटून_राहणे’| ‘श्रद्धा’ म्हणजे 'विश्वास्_ठेवणे’ | ‘निष्ठा’ म्हणजे कुत्र्या प्रमाणे | अंमल बजावणी हुकुमांची (१.४१)</p><p>राजा सर्वही मार्ग आध्यात्मिक | नेतात एकाच ध्येया समीपत | सर्वही मार्ग अवलंबीत | प्रगती आपापुली साधावी “(१.४२)</p><p>'भक्तियोग' मार्गे गणेशाला | त्रिकरण योगे चिकटून राहता | 'सामिप्य_मोक्ष' जणु येतसे हाता "| सोमकांता सागती भृगु ऋषी (१.४३)</p><p>याप्रमाणे नित्य सकाळी | 'गणेश_ पुराण' गुरू निरूपिती | शिष्य सर्वही श्रवण करिती | एकचित्त ‘श्रद्धा’, ‘भक्ति’ समन्वित (१.४४)</p><p>ऋषी म्हणती "तु ऐकरे राजा | पावन 'गणेश_ पुराण' कथानका | ज्या योगे प्राप्त् होईल तुजला | 'गणेश_लोकी ' स्थिर स्थान (१.४५)</p><p>मरणा नंतर कोण जाईल कोठे | हे सुनिश्चित कोण सांगे ? | 'विश्वासार्हता'ही त्याची किती ते | पडताळून पाहणे अशक्यप्राय (१.४६)</p><p>परी ऐकोनि 'गणेश_ पुराण' पूर्ण | नीट संपूर्ण् ध्यान देऊन | कथा त्यातील पुन: पुन: आठवुन | गणेश_सालोक्यता येथेच मिळते (१.४७)</p><p>पूर्वी व्यास महर्षीन्नी | वेद विभाजन कार्य आटपुनी | पुराणे अठरा रचून लिहुनी | महाभारतही पूर्ण लिहवले (१.४८)</p><p>महाभारताचा लेखनिक 'गणेश' | जैसे जैसे रचिती व्यास | समजून उमजून नंतरच नीट | लिहिण्याची 'अट'ही पूर्ण पाळी (१.४९)</p><p>एवढे कार्य संपल्यानंतर | व्यासांची मती अचानक सुन्न | कुंठित, दिङ्मूढशा अवस्थेत | ब्रह्मदेवाला पृच्छा करिती (१.५०)</p><p>"एवढे कार्य हे जे मी केले | मानवी आयुष्य वाचण्यास अपुरे | त्या मला आज हे काय हो झाले ? | सुन्नतेने ग्रासिले मम मतिस का ?" (१.५१)</p><p>हासोनि ब्रह्मा देई उत्तर |" व्यासा तुज बाधतोय 'दुरहंकार' | 'मी हे केले !' हा तुझा 'गर्व' | भ्रमिष्ट, दुर्बुद्धी, भ्रांति_बाधा (१.५२)</p><p>'कर्ता, करविता श्रीगणेश' | तव हृदयी निवसुनी करवितो सर्व | हे ज्ञात असुनही विसरुनी 'ज्ञेय' | थारा दिलास 'गर्व_दुरहंकारा'? (१.५३)</p><p>आता तु शीघ्र गणेशाला | शरण जाऊनी, प्रार्थ रे त्याला | त्याच्या 'गणेश_ पुराण' ग्रंथाला | लिहिण्यास् 'बुद्धि' तुज द्यावी ऐसे (१.५४)</p><p>मग तो 'बुद्धिपति' श्रीगणेश | सुबुद्धि, सद्बुद्धि तुज देईल | कार्य ते सिद्धीस तोच नेईल | दया उपजोनिया त्याचे मनी “ (१.५५)</p><p>ब्रह्मदेव उपदेशानुसार व्यासे | 'ॐ'कार जपे तप केले | गणेशाचे 'वरदान' मिळवले | 'गणेश_ पुराण' लेखनासी (१.५६)</p><p>|| इति भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, उपासना खण्डे, सोमकांत भृगु संवादे नानाविधा गणेश_उपासनाभ्याम् तथा विविध गणेश_योग विधे: अभ्यास तथा व्यास_गर्व_निरसनम् नाम प्रथमोध्याय: ||</p><p><br /></p><p>------</p><p><b>अध्याय २</b></p><p>|| अथ सिद्धिविनायक, बल्लाळेश्वरादिक त्रीणि गणेश मंदिर स्थापना तथा जीर्णोद्धारण नाम द्वितीयोध्याय: ||</p><p>ॐ श्री गणेशाय नम: |</p><p>भृगु सांगती सोमकांतासी | पुढे कथा वर्तली ऐसी | मंत्राबद्दल 'ॐ' एकाक्षरी | व्यास मनी 'औत्सुक्य’ दाट वाटे (२.१)</p><p>"सर्व मंत्रांचे जे आदि अक्षर | तोच गणेशाचा मंत्र एकाक्षर | सर्व प्रथम जपला कुणी 'ॐ'कार ? | त्यांना त्याने लाभ काय झाला ?” (२.२)</p><p>ब्रह्मदेवा ऐसे पुसता व्यासे | ब्रह्मा म्हणे व्यासा "मीच तो जपतसे | सृष्टि सृजनाचे कार्य मम कठिण हे | निर्विघ्न साधतेय त्यामुळेच मजला (२.३)</p><p>प्रत्येक सृष्टिच्या सृजनारम्भी | विश्वव्यापी तमांधकारी | निर्गुण_निराकार तत्व एकची | त्रिकालातीतसे निवसे सदैव (२.४)</p><p>त्या निर्गुण वास्तव्याचे मानसी | सगुण सृष्टिच्या पुन:सृजनाची | 'इच्छा' उद्भवताच, जणु त्याच क्षणी | 'सगुण' प्रगटले 'ॐ'कार स्वरूपे (२.५)</p><p>आद्य_त्रिगुण 'सगुण’ म्हणजे | मी ब्रह्मा, हरि, हर हे तीघे | उत्पत्ति, स्थिति, लय ही कार्ये | जी नैसर्गिक प्रति_ब्रह्माण्डी (२.६)</p><p>प्राकृतिक काल_गणन गणिताने | त्यास अनुकूल अशाच वेगाने | म्हणूनच जणु गणेशाच्या आदेशे | वर्तत राहतॊ आम्ही त्रिदेवही (२.७)</p><p>ब्रह्माण्डातील आमच्या कार्यातिल | काही थोडीशीच ज्ञानेन्द्रियास | अथवा शास्त्रीय उपकरणास | 'गम्य' होतात 'दक्ष' जे त्यासी (२.८)</p><p>‘कार्य’ तर दिसते परि 'कर्ता’ मात्र न दिसे | म्हणॊनि आह्मास 'परब्रह्म’ ऐसे | वेदोपनिषदी गणलेले दिसे | तीघेही आम्ही 'परब्रह्म’ रूप (२.९)</p><p>आम्हा तीघासही जो 'पर_गणितज्ञ’ | 'निर्देश' देतॊ "कधी कार्य काय !” | त्यास 'ब्रह्मणस्पति ’ ऐसे नाम | वेदोपनिषदी दिलेले आहे (२.१०)</p><p>'निर्गुणा' पासोनि 'सगुण’ उत्पत्तिच्या | कार्यारम्भी जो स्वयम्भू प्रगटला | त्या 'ब्रह्मणस्पति’च्या ॐ मंत्रा | आम्ही त्रिमूर्तिही सतत जणु जपतो (२.११)</p><p>या ब्रह्माण्डोत्पत्तिच्या कार्यारम्भी | आमुची कार्ये करण्याच्या 'विधी’ | आम्ही पुसता ब्रह्मणस्पतिसी | त्याने आह्मास निर्देशिले (२.१२)</p><p>“अनंत ब्रह्माण्डे पुर्वी निर्मिलेली | माझ्या उदरात सदैवच निवसती | म्हणोनि घुसुनी मम ब्रह्माण्डोदरी | निरीक्षण करुनी शिका” ऐसे (२.१३)</p><p>त्याप्रमाणे आम्ही तिघांनी | शिकोनि कार्यास सुरवात केली | तेंव्हा 'मधु’ आणि 'कैटभ’ ऐशी | दैत्य द्वयीनी आम्हास केले 'विघ्न’ (२.१४)</p><p>मी जी जी काही करे उत्पत्ति | त्याच्या 'आयु’ अनुरूपशी त्याची 'स्थिति’ | सांभाळण्याची जबाबदारी | ‘विष्णु'सी होती म्हणुनी त्याने (२.१५)</p><p>'मधु’ आणि 'कैटभ’ दोघां बरोबर | माण्डिले युद्ध महा घनघोर | परी ते दोघेही अति प्रबळ, शूर | नाटोपती त्यास काही केल्या (२.१६)</p><p>मग ‘विष्णु’ने 'ॐ’ जपतपाचरणे | श्रीगणेशास प्रसन्न केले | “उपाय काय ?” ऐसे विचारले | तेंव्हा गजानने कथिली 'युक्ती’ (२.१७)</p><p>‘विष्णु’ने मग केली दोघांचीही स्तुती | म्हणे "मी तुष्टलो पाहूनि तुमची | प्रचण्ड शक्ति आणि कौशल्यही | मागा काहीहि 'वरदान’ मजला” (२.१८)</p><p>परि ते 'अहंकारी_मूर्ख’दैत्य | उत्तर देती ‘विष्णु’ला "ऐक | आम्हीही जाहलॊय तुज संतुष्ट | माग तूच ‘वरदान’ आम्हापाशी” (२.१९)</p><p>‘विष्णु’ने तात्काळ मागितला ‘वर’ | “मम हस्ते यावे तुम्हासि मरण”| ऐसे शब्दांत त्यास पकडून | वधिले मूर्खद्वय श्री‘विष्णु’ने (२.२०)</p><p>जेथे 'मधु_कैटभ’ मर्दनाची | 'युक्ती’ गणेशे सुचवली विष्णुसी | तेथे 'श्रीसिद्धिविनायकाची’ | मुर्ति स्थापिली श्रीहरीने (२.२१)</p><p>"अष्ट_विनायक" मंदिरा मधले | हे पहिले मंदिर ‘विष्णु’ने स्थापिले | जे 'सिद्धिविनायक' ऐशिया नामे | सुप्रसिद्ध झालेय तीर्थ_क्षेत्र (२.२२)</p><p><br /></p><p>विदर्भ देशांतिल कौण्डिण्य पुरीत | भीमपराक्रमी राजा 'भीम’ | राणी ‘चारुहासिनी’ नाम | पुत्र संतती विना होते दु:खी (२.२३)</p><p>शास्त्र पारंगत मंत्री दोघे | ‘सुमंत’, 'मनोरंजन’ त्यांची नामे | त्यास राज्याचे सांभाळकर्ते | नेमुनी 'विश्वामित्र’ आश्रमा गेले (२.२४)</p><p>'विश्वामित्र’ सांगती 'भीम’ राजाला | ‘भीम’ नामेच एका तव पूर्वजाला | एक मुका, लंगडा, अंध व कुबडा | पुत्र जन्मला दैवयोगे (२.२५)</p><p>पुत्रास नाम ठेविले 'दक्ष्’ | पूर्व जन्मीचा जो शापग्रस्त | सिंधु देशीच्या 'पल्ली' गावांत | 'कल्याण’ नामे वैश्य होता (२.२६)</p><p>त्याच्या सुपुत्राचे नाम बल्लाळ | जैसा हरिभक्त् ध्रुव् वा प्रह्लाद | अथवा शिव भक्त उपमन्यू, श्रीकर | तैसाच तो बालभक्त श्रीगणेशाचा (२.२७)</p><p>नित्य मेळवुनि सवंगड्यांना | खेळ् तो मांडे गणेश पूजेचा | मांडूनि शिळा, दगड नी खड्यांना | पत्र, पुष्पे, दुर्वार्पण करीती सारे (२.२८)</p><p>मुलांच्या 'गणेश' जयघोषाने | पीडित कोणी नास्तिकाने | तक्रार केली आकांड तांडवे | 'कल्याण’ वैश्य पितयापाशी (२.२९)</p><p>ग्राहकांना होता त्रास | आपुल्या धंद्याचा होईल -हास | ऐशा विचारे खवळोनि वैश्य | पातला बल्लाळ क्रीडांगणी (२.३०)</p><p>'गणेश_प्रिय' शमी वृक्षा पाशी | पूजा मांडोनि दगड_धोण्ड्यांची | ‘ध्यानस्थ’ बसलेल्या पुत्रास पाहुनी | क्रोधे नष्ट्बुद्धि वैश्य झाला (२.३१)</p><p>कुमारास बांधोनिया वृक्षाला | लाठीने चांगला झोडपून काढला | उधळून दिली सारी पूजा | पायदळी तुडवी दगड_धोण्डे (२.३२)</p><p>ज्या दगड_धोण्ड्यांमधे बल्लाळ | पाही श्रद्धा_भक्तिने 'गणेश' | त्यांचा अपमान केलेला पाहुनं | शाप घोर वदली त्याची वाणी (२.३३)</p><p>“पुढच्या जन्मी तु लुळा, पांगळा | अंध, मुका व्याधिग्रस्तसा | जन्म घेऊन भोगशिल दु:खा | त्यागील पिता तुज अरण्यातं” (२.३४)</p><p>भक्तोद्धारासाठी गणेश | धरोनिया ब्राह्मणाचा वेष | सोडवी त्याच्या दोर बंधनास | कुरवाळोनि लावी मलम अंगासी (२.३५)</p><p>जेथे पूजा उधळली होती | तेथेच स्वयम्भू मुर्ति प्रगटली | सुंदर मंदिर इमारत प्रगटली | बल्लाळ् नाचे आनंदाने (२.३६)</p><p>‘बल्लाळेश्वर_गणेशाचे’ | ते मूळ मंदिर 'सिन्धु’ देशातले | पाकिस्तानात आता असे वा नसे | महाराष्टांत पाली क्षेत्री आहे (२.३७)</p><p>सिन्धुतट म्हणजे समुद्रतटाका | पालीहुन वायव्येस अलीबागला | अथवा नैऋत्येस दिवेआगराला | फार दूर म्हणता येणार नाही (२.३८)</p><p>विश्वामित्र सांगती भीम राजासी | तव पूर्वजाने त्या पुत्रासी | उपचार करविले नाना तरीही | राजपुत्र आरोग्य सुधारेना (२.३९)</p><p>वैद्यकी, यज्ञ, याग, जप, तप | व्रते, यात्रा, पूजा, अभिषेक | काहीही केले तरी पूर्ण व्यर्थ | कंटाळून गेला अगदी पुरता (२.४०)</p><p>मग राजाने केला त्रागा | ‘दक्ष’ व त्याची माता 'कमला’ | दोघांचाही त्याग केला | घोर अरण्य़ांत ठेवविले त्यांना (२.४१)</p><p>अरण्य़ांत उपाशी हिण्डून थकली | सुदैवे एका गणेश मंदिरी | आसरा पाहून थोडी सुखावली | दर्शन करुनी प्रार्थिती त्याला (२.४२)</p><p>"देवा गणेशा मागच्या जन्मी | केल्या आम्ही चुका ज्या काही | क्षमा त्यासाठी करुनि आम्हासी | मृत्यू शीघ्र तु दे आम्हाला (२.४३)</p><p>गणेश स्तोत्रे, मंत्र जप करुनी | प्रांगणात विसाव्यास दोघे विसावली | निद्रा लागली असता दोघांसही | आश्चर्य अघटित एक घडले (२.४४)</p><p>गणेश_भक्त मुद्गल ऋषी | दर्शनास आले मंदिरासी | वायूची झुळुक त्यांच्यावरुनी | स्पर्शून शिवली दक्षालाही (२.४५)</p><p>त्या झुळुकेच्या पुण्य स्पर्शे | पावन झाली सर्वही गात्रे | जागा होऊन पहात आहे | आरोग्य शरीरी पूर्ण आहे (२.४६)</p><p>उठवून सांगतसे मातेला | पहा गणेशे उपकार केला | चमत्कार दैवी या स्थळी झाला | तीर्थ क्षेत्र हे अलौकिक आहे (२.४७)</p><p>गणेश अष्टाक्षरी मंत्र कैसा | "ॐ श्री गणेशाय नम:” ऐसा | जपत सातत्ये दक्ष करि तपा | तेणे संतोषला गजानन (२.४८)</p><p>दर्शन देऊन सांगितले त्यासी | जवळच राहतोय मुद्गल ऋषी | जाऊन त्यांचे चरण धरी | त्यांच्या उपदेशे तु होशील धन्य (२.४९)</p><p>दक्षाने गणेश आज्ञेनुसार | शोधून काढिला ऋषी आश्रम | पत्करून त्यांचे शिष्यत्व पण | ‘गणेश_विद्या’ शिकला पूर्ण (२.५०)</p><p>ऋषी मग वदले दक्षालागी | संपली तुझी शाप_भोग भोगणी | आता यापुढे तुज याच जन्मी | राज्यप्राप्ती होईल बाळा" (२.५१)</p><p>आश्रम सोडून मग दक्ष, कमला | हिंडत पातले 'कौण्डिण्य’ पुरा | पाहून एका गणेश मंदिरा | राहिले तेथे विसाव्यासी (२.५२)</p><p>तोच त्या नगरीच्या राजाला | मरण आले निपुत्रिकच असता | दहना पुर्वीच राज्याभिषेका | हत्तीण फिरविती नगरांत (२.५३)</p><p>‘दक्ष’ समाधिस्थ गणेश मंदिरी | असता हत्तीण हुडकत आली | माळ गळ्यांत त्याच्याच घातली | तटस्थ पाहती जन समस्त (२.५४)</p><p>दक्षास बसविले राज_सिंहासनी | त्याने सुखविले अवघ्या प्रजेसी | जीर्णॊद्धार केला मंदिरासी | जेथे त्यास आरोग्य_प्राप्ती झाली (२.५५)</p><p><br /></p><p>|| इति भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, उपासना खण्डे, सोमकांत भृगु संवादे सिद्धिविनायक, , बल्लाळेश्वरादिक त्रीणि गणेश मंदिर स्थापना तथा जीर्णोद्धारण नाम द्वितीयोध्याय: ||</p><p><br /></p><p>------------</p><p><b>अध्याय ३</b></p><p>|| अथ चिंतामणि_गणेश आदिक गणेश मंदिर स्थापना तथा जीर्णोद्धारण नाम तृतीयोध्याय: ||</p><p>ॐ श्री गणेशाय नम: |</p><p>भृगु सांगती सोमकांता | विश्वामित्रे मग कथिले भीमा | शीघ्र त्वा जावे त्या देवस्थाना | जे दक्षाने बांधिले होते (३.१)</p><p>तव पूर्वजांच्या त्या मोक्ष स्थळी | करशील गणेशाराधना तीव्रशी | तरी गणेश प्रसादे तुजशी | पुत्रप्राप्ती खचितची होईल राजा (३.२)</p><p>विश्वामित्रोपदेशानुसारे | भीम राजाने तप आचरिले | गजाननाच्या कृपा प्रसादे | पुत्र ‘रुक्मांगद’ जन्मा आला (३.३)</p><p>राजबिण्डा ‘रुक्मांगद’| होता देखणा तरुण हुशार | सात्विक धार्मिक शूर धीर | सुशील, ज्ञानी प्रजाप्रिय नेता (३.४)</p><p>एकदा 'रुक्मांगद’ अरण्यात | मृगया करुनी थकल्यावर | वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात | पोचला तृषार्त दैवयोगे (३.५)</p><p>ऋषींची पत्नी 'मुकुंदा’ नामे | भाळली त्याच्या व्यक्तित्वाने | “मम कामवासना तुवा पुरविणे”| ऐशी विनंती करती झाली (३.६)</p><p>‘रुक्मांगद’ तिच्या निर्लज्जपणाने | स्तिमित पावून तिज निर्भत्सिले | असह्य अपमान वाटूनिया तिने | शाप दिधला राजपुत्रासी (३.७)</p><p>“कुष्ठ रोगाने तव शरीर | लावण्य, तारुण्य हरपून टाकिल”| त्या दारुण शापाने तात्काळ | ‘रुक्मांगद’ कळाहीन कुष्ठी झाला (३.८)</p><p>"ऐशिया व्याधिग्रस्त शरीरी जगणे | त्याहून चांगले येथेच मरणे" | ऐशा विचारे रुक्मांगदाने | वट वृक्षातळी मांडिला ठाव (३.९)</p><p>घोर तप करी बसल्या ठिकाणी | स्तोत्र पारायणे, मंत्र जप करी | व्रतोपवासे तनुस झिजवी | मनी निरंतर गणेश स्मरण (३.१०)</p><p>नारद मुनींनी प्रगटोनि तेथे | उपदेश त्यास करते जाहले | "विदर्भ देशी 'कदंब’ ग्रामिचे | ‘चिंतामणी’ तीर्थ गाठ वेगी (३.११)</p><p>तेथील ‘चिंतामणि_गणेश’ मंदिरी | दर्शन घेऊन पूजा करुनी | सरोवर तेथे जे ‘चिंतामणी’| स्नान त्यात तु करावे रे (३.१२)</p><p>पुर्वी इन्द्राने अहल्येला | फसवून पातिव्रत्य भंग केला | गौतम ऋषींच्या शापे त्याला | सहस्र भग, क्षते झाली शरीरी (३.१३)</p><p>लज्जेने इन्द्र व्याकुळ होउनी | लपला कमल पुष्पाच्या देठी | स्वर्ग भुवनीच्या सिंहासनी | रिक्ततेने आकांत प्रवर्तला (३.१४)</p><p>सर्व देवांनी गौतम ऋषीला | गळ घातली उ:शाप द्यावया | मुनी म्हणे "इंद्रे प्रायश्चित्तार्था | गणेशाराधना करावी उग्र (३.१५)</p><p>प्रसन्न होईल श्रीगणेश | तेंव्हा प्रगटतील क्षतात 'अक्ष' | इन्द्र होईल 'सहस्राक्ष’| ऐसा मम निरोप पोचवा त्यासी" (३.१६)</p><p>बृहस्पतीने मग इंद्राला | गौतम उ:शाप निरोप पोचविला | इंद्राने करून तपश्चर्येला | प्रसन्न केले विनायकासी (३.१७)</p><p>गणेश म्हणे "या मम ‘चिंतामणि’ तीर्थी | स्नान करिताच भगि 'नेत्र’ प्रगटुनी | शापा पासूनि तुज मिळेल मुक्ती | त्रिजगी सुप्रसिद्ध हे तीर्थ_क्षेत्र होईल " (३.१८)</p><p>इंद्रे प्रस्थापित ‘चिंतामणि’ क्षेत्री | जावे रुक्मांगदा तु झडकरी | शापापासूनि तुजला मुक्ती | देईल ‘चिंतामणि_श्रीगणेश’ “ (३.१९)</p><p>नारदोपदेशे रुक्मांगदाने | गजाननाला प्रसन्न केले | माता पित्यासह सह परिवारे | गणेश_लोकी केले गमन (३.२०)</p><p>इकडे 'मुकुंदा’ काम विव्हल | एकांत स्थळी असता व्याकुळ | इंद्राने धरून रुक्मांगद रूप | वासना पूर्ण केली तिची (३.२१)</p><p>त्यायोगे तिज जो जाहला पुत्र | नाम त्याचे ऋषी 'गृत्समद’| एकदा ऋषींच्या सभेत वाद | करिता अत्रींनी अडविले त्याला (३.२२)</p><p>अत्री म्हणती गृत्समदाला | "व्यभिचारे तव जन्म जाहला | या सभेत शास्त्रार्थ करावयाला | अधिकार, पात्रता नाही तुजसी" (३.२३)</p><p>अत्रि वचन ऐकूनि गृत्समद कोपे | परतुनी मातेसि भर्त्सिले शापे | “काटेरी बोर_वृक्ष होउनि तु निवसे | तव फल 'अखाद्य' होईल” (३.२४)</p><p>मुकुंदे परतोनि शापिले पुत्रा | "तुला पुत्र होईल राक्षसी प्रवृत्तिचा | त्रिभुवनी हाहा:कार माजेल त्याचा “| गृत्समद मनी खिन्न होई (३.२५)</p><p>जड अंत:करणे गृत्समदाने | 'पुष्पक' वनांत उग्र तप केले | प्रसन्न करुनी गणेशाते | वरदाने 'ब्रह्मज्ञान' प्राप्ती केली (३.२६)</p><p>“गणानां त्वा” या वेद मन्त्राचा ऋषी | ऐशी मान्यता, ख्याती मिळवली | जेथे पावला त्याला 'गणपती’| क्षेत्र ते सुप्रसिद्ध झाले त्रिजगी (३.२७)</p><p>'कृत' युगी म्हणती 'पुष्य_क्षेत्र’| त्रेता युगी म्हणती त्यास 'मणिपुर’| द्वापरी 'भद्रक’ नामे प्रसिद्ध | ब्रह्मत्व प्राप्ति गृत्समदास झाली तेथे (३.२८)</p><p>पुढे एकदा गृत्समद जोरात शिंकला | त्यातून एक बालक जन्मासि आला | त्याने उग्र तपाने गणेश तोषविला | वरदान मागितले 'त्रैलोक्य_विजय’ (३.२९)</p><p>जेथे त्रिपुरास वर देण्यास्तव | प्रगट जाहला विनायक | त्यास्थळी त्याने बान्धले एक | भव्य मंदिर गणेशाचे (३.३०)</p><p>वंग देशी, भव्य गणेश मुर्ति | रंग जिचा लाल लाल_काष्मिरी | 'गणेश_नगर' वसविले सभोवती | गाणेश भक्तांची वस्ती तेथे (३.३१)</p><p>लोह, सुवर्ण, रजत धातुंची | तीन पुरांची केली उत्पत्ती | विमाना समान सतत जी फिरती | स्वर्गिच्या सुख सोयी सर्वही ज्यांत (३.३२)</p><p>गणेश म्हणे "हे असुरश्रेष्ठा | निवास कर तु या 'त्रिपुर’ स्थला | 'त्रिपुरासुर' नामेच तुजला | प्रसिद्धी त्रिजगती मिळेल (३.३३)</p><p>शंकरा वाचूनि दुसरा कुणीही | तुजला जिंकू शकणार नाही |” ऐसे वरदान त्याने मिळवुनी | जिंकिले त्रैलोक्य साम्राज्य (३.३४)</p><p>स्वर्ग, मृत्यु, पाताळ लोक | तीनही लोकीन्चे आधिपत्यत्व | जिंकून बसविला सर्वत्र धाक |गांजले प्रजाजन त्रैलोक्यीचे (३.३५)</p><p>'ब्रह्मा' पळे 'सत्य'लोक सोडुनी | 'विष्णु' पळाला वैकुंठातुनी | त्रिपुर कैलासासही हालवी | म्हणुनि शिव 'मंदार' गिरिवरी निवसे (३.३६)</p><p>मग नारदांच्या सूचने प्रमाणे | ॐकार एकाक्ष्ररी मंत्राने | आणिक ‘संकट_नाशन’ स्तोत्राने | सर्व देव स्तविती गजाननासी (३.३७)</p><p>विनायकाने प्रसन्न होउनी | आश्वासन दिधले सर्वासही | “त्रिपुराचे विघ्न टाळावयासी | उपाय काहि मी करीन ऐसे” (३.३८)</p><p>गणेशाने तदनंतर | घेतला अवतार, नाम 'कलाधर’| भेटला त्रिपुरास जाऊनि सत्व्रर | मायावी चेष्टा नाना दावी (३.३९)</p><p>तेणे सुप्रसन्न त्रिपुरासुर | म्हणे "धन्य तव कला 'कलाधर’| तुष्टलो आहे रे मी तुजवर | माग वरदान काहीतरी” (३.४०)</p><p>'कलाधर’ म्हणे त्रिपुरासुरासी | “मज आणुनी दे गणेश_मुर्ति | जिचे नाम असे ‘चिन्तामणी’| शंकरा जवळ ती आहे आता" (३.४१)</p><p>त्रिपुरे पाठवुनिया दूतासी | मागविली ‘चिन्तामणी’ची मुर्ति | शिवे नाकारिताच त्याची विनंती | युद्ध जाहलॆ उभयतांत (३.४२)</p><p>शिवास न कळे त्रिपुरासुराची | तीनही पुरे एकाच बाणी | वेधावी कैसी वेळ साधुनी | म्हणोनि स्तविले गणेशाते (३.४३)</p><p>गणेशाने ते क्लिष्ट गणित | सोडवुनि सांगितले गूज कानांत | तेणे शिवाने सुमुहुर्त साधत | त्रिपुरासुराचा नाश केला (३.४४)</p><p>मेरूचा केला धनु पिनाक | त्यांवर 'विष्णु’चा केला 'शर’ | ऐसे सांकेतिक शरसंधान | ‘सुमुहुर्त’ साधुनी मिळविली 'सिद्धि’ (३.४५)</p><p>कार्तिकी बहुली पोर्णिमा दिनी | शंकरे वधिले त्रिपुरासि म्हणुनी | 'त्रिपुरी पोर्णिमा' ऐशी प्रसिद्धी | दीपोत्सव भक्तगण करिती सारे (३.४६)</p><p>ज्या स्थळी शंकरास प्रसन्न होउनी | गणेशाने सांगितली त्रिपुर_वध युक्ती | तेथे शिवाने स्थापुनी मुर्ति | विनायक_मंदिर संस्थापिले (३.४७)</p><p>बंगलादेशा पलिकडे 'त्रिपुरा’ | ‘वंग’ प्रदेश ऐतिहासिक रीत्या | तेथे हे मंदिर असेल का आता ? | चौकशी करिता सापडेल (३.४८)</p><p>आगरतळात वा आसपासच | संगमरवरी मुर्ति लाल लाल | असेल पुरातन गणेश मंदिर | गणेश_पुराणी नोंद ज्याची (३.४९)</p><p>विदर्भातल्या 'कदम्ब_नगरी'तही | 'चिंतामणि' मुर्ति असायला हवी | पौराणिक सनातन मंदिरे ऐशी | 'चिंतामणि' चीच नाना ठायी (३.५०)</p><p>अष्ट_विनायकांत एक ‘चिन्तामणी’ | पुण्या समीपच 'कदम्ब_नगरी' | 'थेऊर' क्षेत्री आहे ऐशी | श्रद्धा भक्ति सर्व गाणेशास (३.५१)</p><p>‘चिंतन’ करिता येण्याची जी | ‘शक्ति’ निवसते 'बुद्धि_पति’ अशी | तोच आध्यात्मिक 'चिंतामणि' | सर्व हृदयी गुप्त, नमूया त्यासी (३.५२)</p><p>|| इति भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, उपासना खण्डे, सोमकांत भृगु संवादे चिंतामणि_गणेश आदिक गणेश मंदिर स्थापना तथा जीर्णोद्धारण नाम तृतीयोध्याय: ||</p><p>. . . . . . . . . . . .. . ..</p><p><br /></p><p>----------------------- =============== ------------------------</p><h3 style="text-align: left;">अध्याय ४</h3><p>|| ॐ अथ भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, उपासना खण्डे, सोमकांत भृगु संवादे गणेश आराधना, व्रत, पूजा, उपवास, उद्यापनादिक नाम चतुर्थोध्याय: ||</p><p><br /></p><p>ॐ श्री गणेशाय नम: |</p><p>भृगु पुढे सांगती सोमकांतासी | त्रिपुर हलवी, हदरवी कैलासासी | म्हणुनि तो वरदानार्थ देउनी त्यासची | शिव_शिवा वसती मंदराद्रिवरी (४.१)</p><p>कलाधराची ऐकुनी 'मागणी’ | त्रिपुरासुर मागवी मुर्ति 'चिंतामणि' | शिवे नकार देताच खवळुनी | त्रिपुरे सुरू केले युद्ध (४.२)</p><p>शन्कर, शिवगण जाता युद्धासी | पार्वती गेली माहेरासी | पिता हिमालय सुचवी तिजसी | गणेश_आराधना करावया (४.३)</p><p>शंकरासि प्राप्त व्हावा 'विजय’ | घडावा त्रिपुरासुराचा संहार | ऐसे 'वरदान’ मिळवण्यास्तव | 'सिद्धिपति' गणपतिस प्रार्थी गिरिजा (४.४)</p><p>गणेश_आराधनांचे प्रकार | विधि, विधान त्यांचे सविस्तर | व्रतोपवास, उद्यापन आदिक | पिता हिमवंत शिकवी उमेला (४.५)</p><p>'तिथि' व्रतात 'चतुर्थी' तिथि | अति प्रिय वाटे श्रीगणेशासी | शुक्ल 'चतुर्थी'स म्हणती 'विनायकी' | चत्वारि पुरुषार्थ_दात्री शुभा (४.६)</p><p>धर्म, अर्थ, काम, मोक्ष | हे चार 'पुरुषार्थ' सुप्रसिद्ध | सर्वान्नी करावे जीवनात साध्य | स्त्री_पुरुषादि भेद त्यांत नाही (४.७)</p><p>सडा, संमार्जन, गुढ्या, तोरणादिकी | गृह वा मंदिर सुशोभवोनी | स्वदेहासही शौच, स्नानादिकांनी | शुचिर्भूत करावे (४.८)</p><p>देश, काल, वंश, जातकादिक विधीने | संकल्प करावा व्रतकर्त्याने | स्थापित मुर्तिसच राउळी सगळे | पूजाविधी समर्पावे (४.९)</p><p>अथवा स्वगृही, सर, नदीतीरी | अंगणी, प्रांगणी, सामाजिक स्थळी | समुद्र तटाकी वा वृक्षाखाली | पूजनास योग्यशी 'मुर्ति' निवडावी (४.१०)</p><p>मृण्मय स्वहस्ते निर्मित मुर्ति | सर्वात श्रेष्ठ मानिती तरीही | ते शक्य नसल्यास करावी खरेदी | स्वेच्छा, द्रव्यादिक अनुकूलतेने (४.११)</p><p>स्वहस्ते 'मुर्ति' निर्मिती करण्या | निवडावी मऊ, स्वच्छ, स्निग्ध मृत्तिका | बारीकशी घ्या वा चाळुनी घ्या | रक्त, पीत वा जी मिळेल ती (४.१२)</p><p>वारुळातली वा पायवाटेतली | खेळत्या मुलांच्या पटांगणातली | माती पापी, वर्ज समजावी | शहरात विकतच घेणे उत्तम (४.१३)</p><p>संमर्दावे जल प्रोक्षण करोनि | मळावे, चुरावे, बडवावे प्रोक्षुनी | मिळून येण्यास डिन्क, खळ योजुनी | तासभर गोळा झाकून ठेवावा (४.१४)</p><p>नंतर पुन: नीट संमर्दुनी | बनवावी मुर्ति योग्य प्रमाणांची | 'व्रती'च्या कौशल्य, अभ्यासानुसारी | सुंदर, देखणी वा यथास्थित (४.१५)</p><p>मुर्ति_संख्या भक्ति_श्रद्धे प्रमाणे | एक, दोन, तीन, चार, पंचादिके | एकवीस वा सहस्र, वा लक्षादिके | हळहळ, असमाधान नुरावे मानसी (४.१६)</p><p>मुर्तिला सोण्ड उजवी वा डावी ? | मुखान्ची संख्या किती असावी ?| 'व्रती'च्या श्रद्धेनुसार ही सगळी | योजना करावी ऐपतीनुसार (४.१७)</p><p>संकल्प केलेल्या क्षणा पासुनी | मनात, पुटपुटत वा मोठ्ठ्यानी | नाम उच्चारण व्हावे वदनी | गणेश, गजानन, हेरम्बादिक (४.१८)</p><p>उठता, बसता, खाता, पीता | कार्य करिता, विश्रान्ती घेता | ‘नाम_स्मरण’ मुखी चालू राहता | पुण्य संचय, पाप_क्षय (४.१९)</p><p>'व्रत' निमित्ताने ही सवय जडली | नंतर पुढेही चालूच राहिली | तर मग बंधने तुटतील सारी | स्वानन्द सालोक्य येइल हाता (४.२०)</p><p>भाकरी, पोळी भाजता वा उलथता | चुकुन जरि हाताला तापलेला तवा | लागेल तेथे बसणारच चटका | नैसर्गिक नियम हा अटळ आहे (४.२१)</p><p>तद्वतच ‘नाम_स्मरण’ मुखि येता | हरि, हर, गणेश, कुठलीही देवता | पाप_संचय क्षय घडवीलच भक्ता | नैसर्गिक नियम हाहि अटळच आहे (४.२२)</p><p>व्रत पूजेस्तव 'मुर्ति’ची व्यवस्था | न जमली तर 'चित्र' च काढा | कागदावर वा वाळूत, मातीत वा | मनो मंदिरी काल्पनिकच उत्तमसे (४.२३)</p><p>अथवा मिळेल तो दगड, धोन्डा, खडा | स्वच्छ चांगला धुवून घ्यावा | निराकार ब्रह्मास साकारी कल्पावा | भाविकास भावना जैसी तैसा (४.२४)</p><p>जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी | सातत्याने निवसतच जो राही | 'ज्ञान' वा ‘भावना’ जैसी चित्ती | तैसाच व्यक्त वा अ_व्यक्त देव (४.२५)</p><p>असो ऐशिया परी निवडलेली | पूज्य वस्तु, प्रतिमा वा मुर्ति | स्थापुनी पाट, चौरंगादिकावरी | तिचे द्वारा 'गणेशास’ पूजावे (४.२६)</p><p><br /></p><p>* (गिरिजा कृत "षोडशोपचार गणेश पूजा विधि" स्तोत्र : गणेश पुराण १.४९.२१ → १.४९.६९)</p><p><br /></p><p>मम नाम अमुक गोत्र अमुक | अमुक माता पित्यांचा मी सुत | अमुक गावी, अमुक देशात | पूजू इच्छितो तुज गणेशा (४.२७)</p><p>आज अमुक संवत्सरी | अमुक शके अमुक अयनी | अमुक मासी अमुक पक्षी | अमुक तिथी वार अमुक (४.२८)</p><p>अमुक वेळी, अमुक स्थळी | अमुक जळी, काष्ठी, पाषाणी | अथवा स्वहस्ते बनवली मी मूर्ति | तिच्यांत तु प्रविष्ट हो रे बाबा (४.२९)</p><p>तुझी ब्रह्माण्डोदर काया | अशक्य मजला जरी पहावया | या मूर्तित वा या खड्यांत या | पूजा घडवाया मम हस्ते (४.३०)</p><p>लम्बोदरा, शूर्पकर्णा | मूषक वाहना, वक्रतुण्डा | रक्त वर्णा रक्त वसना | ‘ध्यान’ हे मम ध्यानी राहो स्थिर (४.३१)</p><p>येथे मी ठेविलेले जे हे आसन | मानावे तुवा ते 'रत्नसिंहासन’ | बैसावे त्यावरी मांडी ठोकुन | स्वीकारण्यास माझे पूजोपचार (४.३२)</p><p>गंगा, यमुना, गोदा, कृष्णा | कावेरी, नर्मदा, सिन्धु, ब्रह्मपुत्रा | जगातल्या सर्वही पावन नद्या | प्रगटा मम पंचपात्रातल्या जळी (४.३३)</p><p>एक थेम्ब वा पळीभर पाणी | घ्या श्री गणेशा 'पाद्य’ समजुनी | गंधाक्षता पुष्प सहितची ही पळी | ‘अर्घ्य’ हे माझे स्वीकारावे (४.३४)</p><p>या पंचपात्रातल्या जली | मिसळोनि कर्पूर, गुलाबाची कळी | केवडा, मोगरादिक सुगंधी | ‘आचमन’ तुम्ही स्वीकारावे (४.३५)</p><p>आता २१ दुर्वान्च्या जुडीने | उडवितो शिम्पडितो मी पाणी हे | त्याने आपणास 'स्नान’ घडावे | ऐशी विनंती चरणी तुमच्या (४.३६)</p><p>दूध, दही, तूप, साखर, मध | पंच अमृते मृत्यु लोकात लब्ध | त्यांनी तुम्हास करवितो 'स्नान’| स्वीकारण्याची कृपा करावी (४.३७)</p><p>आता पंचोपचारास्तव | धूप, दीप, गंध, पुष्प, नैवेद्य | अर्पोनि ऐसे ‘पूर्वाराधन’| 'निर्माल्य_विसर्जन’ मी करितो (४.३८)</p><p>आता ‘महा_अभिषेक’ स्नानास्तव | दुर्वान्नी पाणी मी उडवी तुम्हांवर | मुखे ‘अथर्वशीर्ष’ म्हणत वा वाचत | सेवा ही माझी स्वीकारावी (४.३९)</p><p>पुसोनि 'मुर्ति’स हलक्या हातांनी | कार्पास_वस्त्र_युग्म त्यावर गुंडाळुनी | ‘यज्ञोपवीत’ मी अडकवितो गळी | सेवा ही माझी स्वीकारावी (४.४०)</p><p>आता 'नाना_अलंकारणार्थ' | जे जे काही मज आहे 'संप्राप्त’| ते ते अर्पितो मी तुम्हास | अथवा 'अक्षता’च तन्निमित्ते (४.४१)</p><p>आता 'नाना_परिमल' द्रव्ये | हरिद्रा, कुंकुम, सिन्दूर्, बुक्कादि जे | अर्पण करितो ते स्वीकारणे | ऐशी विनंती चरणी तुमच्या (४.४२)</p><p>आता 'नाना_पुष्पांची माला' | अर्पण करितो ती स्वीकारा | नंतर २१ दुर्वान्च्या जुड्या | देईन तितुक्या स्वीकाराव्या (४.४३)</p><p>आता धूपास्तव 'अगरबत्ती’ | गुलाब, मोगरा, केवडा आदि जी | आज उपलब्ध माझ्यापाशी | ती मी अर्पण करितो तुजला (४.४४)</p><p>आता दीपास्तव ही समई | ‘महा_नैवेद्य’ पंच_पक्वान्नी | लाडू, मोदक आदिकास्तव मी | जे अर्पितो ते गोड मानावे (४.४५)</p><p>आता पंचारती साठी | नीरांजनांनी तुज ओवाळुनी | गातो आरत्या प्रेमाने मी | सेवा ही माझी स्वीकारावी (४.४६)</p><p>आता भोजन जाहल्यावर | विडा_दक्षिणा ताम्बूलार्पण | मग प्रदक्षिणा घालुनी सत्वर | दंडवत प्रणाम मम स्वीकारावा (४.४७)</p><p>आता 'प्रार्थना' मम ऐकावी | मी तर आहे मूर्ख, अडाणी | उपचारांत जे झाले असे कमी | त्यासाठी 'क्षमा’ असो द्यावी (४.४८)</p><p>कळत नकळत चुका करणे | स्वार्थी विचार मनात येणे | यांच्या पासोनि मजला राखणे | कृपा करोनि देवराया (४.४९)</p><p>सतत घडो तव नाम_स्मरण | मंत्रोच्चारण, स्तोत्र गायन | जे जे दृष्टीस पडे त्यांमधून | तव स्वरूप मज दावी देवा (४.५०)</p><p>जे जे कार्य मी घेईन हाती | त्यात माझ्या कौशल्याची | पराकाष्ठेची व्हावी प्रतीची | यश कार्य_सिद्धि व्हावी देवा" (४.५१)</p><p>गिरिजेने पित्याच्या उपदेशा प्रमाणे | व्रत उपवास पूजादिकाने | प्रसन्न गणेशास करुनि 'मागणे’ | मागितले "शिवासी 'विजय’ व्हावा (४.५२)</p><p>त्रिपुराच्या त्रासास कंटाळून | ‘कैलास’ त्यालाच केला अर्पण | तरीही त्याचे 'समाधान’ | नाही जाहले पूर्ण पणे (४.५३)</p><p>आता मागतॊय मुर्ति 'चिंतामणि' | नंतर मागेल आणखिन काहिही | म्हणोनि शिवाने मांडलेल्या युद्धि | शिवास जयाची प्राप्ति व्हावी" (४.५४)</p><p>गणेशाने दिले 'तथास्तु’ वरदान | तेणे गिरिजा प्रसन्नांत:करण | विजय वार्ता मग शिवाची ऐकुन | भेटती जाहली भ्रताराला (४.५५)</p><p><br /></p><p>|| इति भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, उपासना खण्डे, सोमकांत भृगु संवादे गणेश आराधना, व्रत, पूजा, उपवास, उद्यापनादिक नाम चतुर्थोध्याय: ||</p><p><br /></p><p>----------------------- =============== -------------------</p><p><br /></p><h3>अध्याय ५</h3><div><div>|| ॐ अथ भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, उपासना खण्डे, सोमकांत भृगु संवादे श्रीगणेश व्रताचरण माहात्म्य कथा_उपकथा नाम पंचमोध्याय: ||</div><div><br /></div><div>ॐ श्री गणेशाय नम: |</div><div>भृगु सांगती सोमकांतासी | जे हिमवंते कथिले पार्वतीसी | श्रद्धा_भक्ति भाव विवर्धनासी | व्रत_कथा, उपाख्यानादिक (५.१)</div><div>पुण्यश्लोक राजा चक्रवर्ती | नल पूर्वजन्मी क्षत्रिय दरिद्री | त्याने गुरु केला कौशिक ऋषी | उपदेश घेतला गणेशाराधनांचा (५.२)</div><div>श्रावण शुक्ल चतुर्थी पासुनी | भाद्रपद विनायकी पर्यन्त वरी | मास_व्रत गणेश पूजा करी | मृत्तिका मुर्ति निर्मुनी स्वहस्ते (५.३)</div><div>सतत मासभर गणेश पूजा | नाम स्मरणाचा निदिध्यास लागला | चित्ती एकाग्रता, मनी भक्ति_भावना | तेणे सुप्रसन्न गजानन (५.४)</div><div>पूर्व जन्मिच्या त्या पुण्याइने | नल 'चक्रवर्ती सम्राट' पद भोगे | स्वयंवरी वरिला दमयंतीने | राजहंस मुखे ऐकोनि कीर्ती (५.५)</div><div>तत्समच इतिहास 'कर्दम’ राजाचा | पूर्वजन्मी दरिद्री क्षत्रिय असता | उपदेश घेउनी सौभरी ऋषीन्चा | गणेश आराधना केल्या नाना (५.६)</div><div>त्या पुण्य संचये पुढच्या जन्मी | अखिल भूमंडलाचा सम्राट बनुनी | गणेशाराधना आजन्म करुनी | अंती गणेश सालोक्यता प्राप्त केली (५.७)</div><div>‘मालव’ देशिचा राजा 'चन्द्रांगद’ | त्याची पत्नी 'इन्दुमती’ सुंदर | अरण्यी मृगया करिता थोर | वनराक्षसांनी वेढले त्याला (५.८)</div><div>राजसैनिक पळाले सैरावैरा | एका राक्षसीने राजाला पकडला | पण हळुच चुकवुनी तिचा डोळा | जवळच्याच तळ्यांत लपला राजा (५.९)</div><div>तोच तेथे आल्या नागकन्या | भाळून त्याच्या रुपाला देखण्या | त्यांनी नेले पाताळी त्याला | "विवाह करुनि तु रहा येथेच" म्हणती (५.१०)</div><div>त्याने नाकारिताच प्रस्ताव त्यांचा | क्रोधे संतप्त झाल्या सगळ्या | बांधून मुसक्या, ठोकून बेड्या | बंदिस्त केला कारागृहात (५.११)</div><div>इकडे इन्दुमतीस नारद देवर्षी | गणेश व्रताराधना उपदेशिती | बारा वर्षे तिने खडतर केली | व्रते, पुरश्चरणे, तपाराधना (५.१२)</div><div>तेणे संतृप्त गणेशाने | नागकन्यांच्या बुद्धीस प्रेरले | दयेचे अंकुर मनी प्रगटविले | मग सुटला 'चन्द्रांगद’ अटकेतुनी (५.१३)</div><div>बारा वर्षान्नी 'चन्द्रांगद’ राजा | पाताळातून परतून आला | "आनंद गगनात मावेना"सा झाला | प्रजाजनासह 'इन्दुमती’ला (५.१४)</div><div>"गणेशा तव व्रत पुण्याईने | मम पति परतला सुखरूपपणे | अशीच तव कृपा सदैव राखणे | प्रार्थना तव चरणी हीच" म्हणती (५.१५)</div><div>मध्य देशी सहस्रपुर नगरी | तेथे 'शूरसेन' राज्य करी | ‘पुण्यशालिनी’ त्याची राणी | लावण्यखाणी त्रिभुवनात (५.१६)</div><div>एकदा देवेन्द्राचे विमान | उडत असता त्या प्रदेशा वरून | कुणा पाप्याची 'कुदृष्टि’ बाधुन | स्तंभित होऊन आले खाली (५.१७)</div><div>इन्द्र करी शूरसेनास विनंती | "शोधावी तुझ्या प्रजेतील व्यक्ति | जी करि व्रत 'गणेश_संकष्ट_चतुर्थी’| या विमानास वर उठविण्यास्तव (५.१८)</div><div>त्याने एक वर्षाचे 'व्रत_पुण्य' | दिधले आम्हास 'दान’ समर्पण | तर त्या पुण्य प्रभावे करून | विमान हे गगनी उडू शकेल (५.१९)</div><div>पूर्वी 'कृतवीर्य' नामे राजा | त्याच्या राणीचे नाम 'सुगंधा’ | 'गणेश_व्रत' पुण्याने त्यांना | पुत्र जन्मला 'कार्तवीर्यार्जुन’ (५.२०)</div><div>याच व्रत प्रभावे पार्वतीला | पुत्र 'कार्तिकेय’ प्राप्त जाहला | शंबरासुरे पळविता 'प्रद्युम्ना’ला | परत तो मिळाला 'रुक्मिणी’स”(५.२१)</div><div>शूरसेनाने चौकशी करिता | दूत सांगती त्यास वार्ता | एका चांडाळिणीस आजच न कळता | घडले आहे हे व्रत पुण्यकारक (५.२२)</div><div>त्या पुण्ये चांडाळिण विमानी उडाली | तिची 'दृष्टि’ इन्द्र_विमानी पडली | तत्क्षणीच विमान उडाले गगनी | इन्द्र परतला 'स्वर्ग’ लोकी (५.२३)</div><div>एकदा 'दंडकारण्य’ प्रदेशी | ‘नामा’ नाम धीवर महा आळशी | आपुला प्रपंच चालविण्यासाठी | करी दांडगाई लूटमार (५.२४)</div><div>फळे, शुष्क_लाकडे न करी गोळा | वाटसरूंवर चढवी निर्दयी हल्ला | त्यांच्या वस्तूंवर मारोनि डल्ला | उदर निर्वहण करी स्व_कुटुम्बाचे (५.२५)</div><div>एकदा त्या मार्गे 'मुद्गल’ ऋषी | जाताना नाम्याने पाहून संधी | उगारले शस्त्र वार करण्यासी | तो स्तंभित जाहला हस्त त्याचा (५.२६)</div><div>तलवार गळून पडली हातातुनी | हात न घेता येई खालती | आश्चर्य चकित होऊनि मग तो कोळी | शरण गेला ऋषीश्वरासी (५.२७)</div><div>शरण येऊनिया कृपा भाकिता | मुद्गले जाणुनिया त्याची अवस्था | उपदेशूनी त्यास गणेश_मंत्रा | उद्धार केला धीवराचा (५.२८)</div><div>गणेश_मंत्र "श्री_गणेशाय_नम:” | सांगितले सतत जपावयाला | ध्यानी मनी स्वप्नी स्मरण करावया | मानसिक मुर्ती श्री_गणेशाची (५.२९)</div><div>वाल्मिकी प्रमाणेच नामा कोळी | स्वस्थ स्थिर बैसुनी एकाच जागी | मंत्रोच्चारण करीत राही | एकाग्र चित्ते करूनिया (५.३०)</div><div>रोमांचित जाहली सर्व काया | ‘भृ’ मध्यभागी प्रगटली शुण्डा | नाम्याचा 'भृशुंडी’ ऋषी जाहला | गणेशे मग दर्शन दिधले त्यासी (५.३१)</div><div>‘नापलक्षेत्र’ नाम त्या क्षेत्रा | पवित्र तीर्थ_स्थल गाणेश भक्ता | आश्रम बांधुनी करिती तपा | 'भृशुंडी’ ऋषी तये स्थानी (५.३२)</div><div>एकदा 'भृशुंडी’ ऋषीन्चे पितरात्मे | देवर्षी नारदे नरकांत पाहिले | भृशुंडीन्ना ते वृत्त कळविले | सुचविले उपाय काही करावा (५.३३)</div><div>'भृशुंडी’ ऋषीन्नी मिटुनी डोळे | पुण्य एका संकष्ट_चतुर्थी’चे | आपुल्या पितरांना अर्पण केले | तेणे उद्धरले सर्वही ते (५.३४)</div><div>एकदा भारद्वाज मुनिवर | स्नान करिता क्षिप्रा नदीत | एका अप्सरेस पाहूनि सुन्दर | वीर्य स्खलन जाहले त्यांचे (५.३५)</div><div>ते वीर्य पृथ्वीने केले जतन | त्यातून प्रगटला दिव्य कुमार | ज्याचा लाल, तप्त 'अंगार’सम वर्ण | पित्याने 'गणेश मंत्र' त्यास उपदेशिला (५.३६)</div><div>गणेश व्रते, मंत्र_जप तपे | सहस्र वर्षे केली त्या बालके | प्रसन्न होऊनि गणनायके | स्वर्गात नवग्रही दिधले 'स्थान’ (५.३७)</div><div>"वार तुझा 'मंगळवार’ | गणेशाराधनेस तो 'श्रेष्ठ' दिन | येता 'चतुर्थी’ मंगळवारीच | ‘अंगारकी’ योग तो अधिक प्रिय मजला (५.३८)</div><div>ज्या माघ शुक्ल चतुर्थीला | दर्शन दिलेय रे मी मंगला तुजला | त्या दिनी केलेल्या चतुर्थी व्रताला | अधिक पुण्य लाभ घडेल भक्तासी" (५.३९)</div><div>ऐसा 'वर' पावुनी 'मंगल' ग्रह | भूमि_पुत्र म्हणुनी 'भौम’ म्हणति ज्यास | संतोष परिपूर्ण पावुनी मनात | गजानन मंदिर स्थापिता जाहला (५.४०)</div><div>ज्या स्थली दर्शन घडले तेथे | दशभुजा विनायक मुर्तीस स्थापिले | ‘मंगल_मुर्ति’ असे नामकरण केले | मग ग्रह_मंडली स्वस्थानी जाता जाहला (५.४१)</div><div>एकदा कळलाव्या नारदाने | शंकरास एकच फल अर्पिले | ते कुणा द्यावे हे त्यास न कळे | म्हणोनि विचारले ब्रह्मदेवाला (५.४२)</div><div>ब्रह्मा वदे द्यावे ते कार्तिकेयासी | मग कोप आला गणेशासी | क्रोधे जाऊनि सत्य लोकासी | दावी वाकुल्या, खाजवी नाक (५.४३)</div><div>पाहोनिया त्या 'मर्कट_चेष्टा’ | चन्द्र विनोदे हासे खदखदा | ऐकूनि गणेश क्रोधाचा पारा | गगनात मावेनासा झाला (५.४४)</div><div>आधीच पेटलेल्या क्रोध_वणव्यात | चन्द्राने खदखदा हसुन ओतले तेल | त्याची आग आपुल्यालाच जाळील | हा विवेक त्याला सुचलाच नाही (५.४५)</div><div>गणेशे गर्जून दिधला शाप | “चन्द्रा तु झालास फार उन्मत्त | ‘मी फार सुन्दर देखणा’ हा मद | घमेन्डीत चूर तु वर्ततोसी (५.४६)</div><div>पर्ंतु रात्रीच्या सुन्दर चान्दण्यात | सत्कृत्ये कमी, दुष्कृत्येच जास्त | चोरट्या जारकर्मान्चा तर कळस | पापात्मेच बहु लाभ घेती रे तुझा (५.४७)</div><div>म्हणुनि जे जॆ घेतील तुझे दर्शन | त्यांच्यावरी आळ घालतील जन | न केल्या पापांचे लांछन दूषण | भोगावे लागेल सज्जनांनाही" (५.४८)</div><div>शाप ऐकोनि चन्द्र झाला 'सुन्न' | ‘खिन्नतेने’ घायाळ होवोनिया मन | लपवी आपुले कोमेजलेले वदन | हाहा:कार माजला त्रिभुवनात (५.४९)</div><div>इन्द्रादिक सर्व देवतांनी जमुनी | केली गणेशाची आळवणी विनवणी | क्रोध मावळुन दया उपजोनिया मनी | उ:शाप वाणी मग वदता जाहला (५.५०)</div><div>म्हणे "फक्त भाद्रपद चतुर्थीच्याच दिवशी | मम शाप_बाधा बाधेल जनासी | उरलेल्या इतर सगळ्या दिवशी | शाप न बाधेल कोणास माझा" (५.५१)</div><div>‘उ:शाप’ तो ऐकुनी चन्द्र आनन्दला | म्हणे ‘धन्य झालो आज मी गणेशा’| गाणेश भक्त मी होईन आता | करीन मी तपस्या घोर थोर (५.५२)</div><div>गंगेच्या दक्षिण तीरावर बैसुनी | गणेश मंत्र_जप, व्रत आराधनांनी | बारा वर्षे तपाचरण करुनी | चन्द्राने तोषविले गजाननासी (५.५३)</div><div>गणेशाने मग प्रसन्न होउनी | दर्शन देउन वदे वर_वाणी | “भाळी मिरवीन तव कोर रे मी | ‘भालचन्द्र’ हेहि मम नाम होईल (५.५४)</div><div>मम संकष्ट_चतुर्थी व्रत सांगतेला | तव दर्शन पूजनेच होईल पूर्तता | भाद्रपद मासीही शुक्ल द्वितीयेला | घेतील दर्शन जे जे तुझे (५.५५)</div><div>त्या सर्वान्ना शुक्ल चतुर्थीला | न होईल चन्द्र_दर्शन दोष_बाधा|” ऐकोनिया या वरदान वाणिला | चन्द्र संतुष्टला पूर्ण पणे (५.५६)</div><div>गंगेच्या दक्षिण तीरावरती | चन्द्राने स्थापिली 'भालचन्द्र’ मुर्ती | मंदिर बांधोनिया सभोवती | मग चन्द्र लोकी गमन केले (५.५७)</div><div>|| इति भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, उपासना खण्डे, सोमकांत भृगु संवादे श्रीगणेश व्रताचरण माहात्म्य कथा_उपकथा नाम पंचमोध्याय: ||</div><div><br /></div><div>----------------------- =============== --------------------</div></div><div><br /></div><p><b>अध्याय ६</b></p><p> ॐ अथ भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, उपासना खण्डे, सोमकांत भृगु संवादे गणेश प्रिय दुर्वादिक माहात्म्य वर्णनं नाम षष्ठोध्याय: ||</p><p>ॐ श्री गणेशाय नम: |</p><p>भृगु सांगती सोमकांतासी | जे ब्रह्मदेवाने कथिले होते व्यासासी | वा नारदाने इन्द्रादिकासी | गणेश_व्रत_कथा, उपाख्यानादिक (६.१)</p><p>एकदा तिलोत्तमा नृत्य करिताना | पाहूनि धर्मराज मोहित झाला | यम_तिलोत्तमा पुत्र जन्मा आला | नाम त्याचे 'अनलासुर’ (६.२)</p><p>अनलासुराच्या नेत्रातुनी | भयानक अग्नि_ज्वाला निघती | हाहा:कार माजला त्रिजगती | त्रिदेवही पळती, स्वस्थाने सोडुनी (६.३)</p><p>समस्त देवता, ऋषी मुनि गण | गणेशास गेले शरण | तोच अनलासुरहि त्यांच्या मागुन | पातला गणेश लोक जाळावया (६.४)</p><p>अनलासुर आलेला पाहुनी | पळू लागले सर्व सुर,मुनि | पण गणेशाने मोठ्ठा 'आ’जबडा फाकुनी | गिळूनच टाकले त्या दैत्याला (६.५)</p><p>परंतु असुर तो जाताच जठरी | पोटात थोर ‘जळजळ’ उद्भवली | 'दाह'ही सर्वान्गाचाच होई | न कळे औषध काय त्यास ? (६.६)</p><p>विष्णुने दिधले हातात 'कमळ’ | करदोटा शेषाचा बांधी शंकर | वरुण सर्वान्गी प्रोक्षी शीत_जल | परि दाह तो थोडाही शमेचना (६.७)</p><p>वायु देवता वाहे झुळुका सुशीतल | इन्द्र, चन्द्र, यम, सूर्य, कुबेर | धन्वतरी पाजिती गणेशास अमृत | परि दाह तो काहीच शमेना (६.८)</p><p>अठ्ठ्याऐंशी सहस्र मुनींनी | आश्चर्य एक आणले घड्वुनी | एकवीस दुर्वान्च्या जुड्या बांधुनी | अर्पण केल्या गणेशासी (६.९)</p><p>दुर्वान्च्या त्या जुड्या खाउनी | मस्तकावरी धारण करुनी | पूर्ण शांत झाला जठराग्नी | सर्वान्गीचा दाहही शमला (६.१०)</p><p>तेंव्हा पासुनी गणेशाला | दुर्वान्कुर अति प्रिय जाहला | एकवीस दुर्वान्च्या जुड्या वाहता | सुप्रसन्न गजानन भक्तांवरी (६.११)</p><p>नंतर सर्व देवता, मुनिजनांनी | अनलासुर गणेशे गिळला त्या स्थळी | सुन्दर गणेश मुर्ति प्रस्थापुनी | सभोवती प्रासाद भव्यसा बांधला (६.१२)</p><p>'कालानल_प्रशमन विनायक' | ऐशिया नामे ते गणेश_मंदिर | त्रिभुवनात जाहले प्रसिद्ध थोर | ‘विघहर_गणपति’ ही म्हणती त्यासची (६.१३)</p><p><br /></p><p>एकदा नारद सांगती वार्ता | फुशारकी मिरवितो जनक राजा | जो जो याचक भेटतो तया | इच्छाभोजन घालितो त्यासी (६.१४)</p><p>ते ऐकूनिया गजाननाने | धरिले रूप ब्राह्मणाचे | 'पोटभर जेवण' पुरवावे ऐसे | याचिले राजा जनकासी (६.१५)</p><p>जनक राजाने राज्यात त्याच्या | होते नव्हते ते वाढिले अन्ना | परी तो सर्व ते फस्त करुनिया | म्हणे वाढ रे मला आणखी काही (६.१६)</p><p>लज्जित होउनि जनक राजा | हात जोडूनि मागे क्षमा | म्हणे "हे ब्रम्हाण्डोदर गजानना | तुझी भूक शमविणे अशक्य मजलागी" (६.१७)</p><p>मग गजानन तेथूनि उठला | भक्त दम्पती विरोचन_त्रिशिरा | अतिथि रूपे गृही जाउनी त्यांच्या | म्हणे "कृपया शमवा भूक माझी" | (६.१८)</p><p>दम्पती म्हणती "अहो देवाधिदेवा | भाग्य आज आमुचे आले हो फळा | एक 'दुर्वान्कुर’ आम्ही अर्पितो हो तुम्हा | गोड मानूनि व्हा संतुष्ट प्रसन्न" (६.१९)</p><p>गजाननाने चवीने खाउनि 'दुर्वान्कुर' | दिधली पूर्ण संतृप्तीची ढेकर | भक्तांच्या मन:शांति, संतोषा खातर | निज स्वरूप त्यासी दावियेले (६.२०)</p><p><br /></p><p>कौण्डिण्य ऋषिपत्नी 'आश्रया’ एकदा | स्वर्गात देवेन्द्रास दाखवुन दुर्वान्कुरा | म्हणे या एका दुर्वेच्या भारा | इतुके तरी सुवर्ण आहे का स्वर्गी ? (६.२१)</p><p>पाहुनी ते इवलेसे दुर्वेचे त्रिदल | इन्द्रास ते वाटले क्षुल्लक 'आव्हान’ | सुरू केले दुर्वेचे तुला_भरण | सुवर्णाभरणे ओतली अप्सराची सारी (६.२२)</p><p>शची, रोहिणी, इत्यादिकान्चे | घातले सगळे दागदागिने | कुबेराचे संपूर्ण कोठार ओतले | तरीही दुर्वाभार तुलला जाइना (६.२३)</p><p>स्वर्गीच्या सर्व देव, देवी, देवता | हार मानुनी गाती 'दुर्वा' स्तुति_स्तोत्रा | गणेश_प्रिया ही असे सर्व श्रेष्ठा | हिच्या तोलाचे त्रिभुवनांत नाही कुणीही (६.२४)</p><p><br /></p><p>कृतवीर्य राजाने मागच्या जन्मी | ब्रह्म्_हत्यादिक पापे केली | म्हणोनि त्याला संतान प्राप्ति | होत नव्हती खूप वर्षे (६.२५)</p><p>त्याच्या नि:संतान अवस्थेने | स्वर्गिचे पितर दु:खी जाहले | म्हणुनि ब्रह्मयाच्या सल्ल्याने | स्वप्नी पित्याने दिला सल्ला (६.२६)</p><p>“पुत्रा तव 'कष्ट’ निवारणास्तव | आचर ‘संकष्ट_चतुर्थी’चे व्रत | जेणे संतोषोनि विनायक | संतान प्राप्ति सुख देईल तुजला" (६.२७)</p><p>कृतवीर्याने पित्याचा मानुनी ‘उपदेश’ | व्रत आचरिले भक्ति पूर्वक | त्या पुण्याने त्याला एक | पुत्र जन्मला विचित्र ऐसा (६.२८)</p><p>जन्मत: तो राजपुत्र | सुन्दर धडावर सुंदरसे मुख | परि हातपाया विहीन शरीर | हाडामांसाचा देखणा गोळा (६.२९)</p><p>पिता_पुत्रान्च्या सुदैवाने | दत्तात्रेय तेथे भिक्षेस पातले | गणेश_मंत्रोपदेश करिते जाहले | राजपुत्रावर दया उपजोनिया (६.३०)</p><p>राजपुत्राने आज्ञा देउनी | स्वत:स ठेवून घेतले अरण्यी | तेथे केवळ 'वायु’ भक्षुनी | ‘गजानन’ महामंत्र जप केला (६.३१)</p><p>बारा वर्षे तपासि होता | गजानने दिधले दर्शन त्याला | सहस्र_बाहू प्रगटले धडाला | चरणहि मिळाले विचरणासी (६.३२)</p><p>सहस्र_बाहू कार्तवीर्यार्जुने | जेथे त्याला दर्शन घडले | तेथे गणेश_मंदिर बांधले | मुर्ति प्रस्थापिली प्रवाळाची (६.३३)</p><p>‘प्रवाळ_गणपति’ नामे प्रसिद्धि | मिळाली त्या मंदिरासी | ग़ाणेश तीर्थ क्षेत्रात गणती | जागृत स्थान गणेशाचे (६.३४)</p><p>सहस्रार्जुनाने पराक्रमाने | अखंड भूमंडली राज्य प्रस्थापिले | परंतु त्या स्वशक्तिच्या बळे | उन्मत्तता व्याधी जडली त्याला (६.३५)</p><p>एकदा ससैन्य अरण्यात | क्रीडता पोचला ऋषी आश्रमात | जमदग्नी_रेणुका करिती स्वागत | भोजन यथेष्ट घातले सर्वासी (६.३६)</p><p>राजा पुसे "हे कैसे केले ?”| “ हे शक्य झाले ‘कामधेनु’मुळे" | उत्तर ऐकुनी स्वशक्ती बळे | कामधेनूलाच नेऊ पाहे (६.३७)</p><p>कामधेनूने कोप पावुनी | प्रगट केले सैन्य पराक्रमी | सहस्रार्जुनाचा पराभव ज्यांनी | करुनि तत्क्षणी गुप्त झाले सैन्य (६.३८)</p><p>संतापाने सहस्रार्जुनाने | जमदग्नी_रेणुकेस ठार केले | २१ बाण मारून केले | दुष्कृत्य घृणास्पद ऐसे (६.३९)</p><p>रेणुकेने मरण्यापूर्वी | पुत्र 'रामास’ ती घटना कथिली | म्हणुनि रामाने २१ वेळा पृथ्वी | नि:क्षत्रीय केली दंडनार्थ (६.४०)</p><p>प्रथम शंकरास प्रसन्न करुनी | ‘शिवधनुष्य’ मिळविले त्याचे कडुनी | मग गणेश व्रताराधना करुनी | ‘परशू’ मिळवला वरदानाने (६.४१)</p><p>त्या 'परशू'नेच परशूरामाने | सहस्रार्जुनाचे हात तोडून टाकिले | ‘मयूरेश्वर’ विनायकाचे | मंदिर स्थापिले सुप्रसिद्ध (६.४२)</p><p><br /></p><p>एकदा 'गौड' देशी 'गौड_शाकिनी’ | ब्राह्मण दंपती रहात होती | त्यांचा पुत्र अति दुराचारी | वधिले माता_पिता, स्त्रीसही त्याने (६.४३)</p><p>सदा मद्यपान, वेश्यागमन | बलात्कार व्यभिचार करी दारुण | ‘कालभी’ पत्नीने शाप देउन | कुष्ठी जन्मोजन्मी केले त्यासी (६.४४)</p><p>त्या कुष्ठ्याच्याच कुदृष्टीने | इन्द्राचे विमान खुंटले होते | परि शूरसेनाच्या प्रजेत त्याचे | वास्तव्य होते सुदैवाने (६.४५)</p><p>शूरसेनाचेही विमान उडेना | म्हणूनि त्याने कर्णी कुष्ठ्याच्या | ‘गजानन’ मंत्र तीनदा सांगता | सुदेही जाहला देह त्याचा (६.४६)</p><p>शूरसेन सर्व प्रजेसहित | गणेश लोकास गेला त्वरित | गाणेश व्रत मंत्रांचे माहात्म्य | घोर पापीही उद्धरुनि जाती (६.४७)</p><p><br /></p><p>एकदा तारकासुरे त्रैलोक्य जिन्किले | त्याचे मरण फक्त 'शिव_पुत्र’ हस्ते | म्हणोनि मदनाने इन्द्राज्ञेने | समाधीभंग केला शिवाचा (६.४८)</p><p>कोपोनि उघडोनि तिसरा डोळा | शिवे मदनाचा देह जाळला | ‘अनंग’ अस्तित्व मग देऊन त्याला | सशरीर केला 'प्रद्युम्न’ जन्मी (६.४९)</p><p>हिमगिरि कन्या 'गिरिजे’ सह | संपन्न जाहला 'शिव_विवाह’ | शिव_पार्वती क्रीडा करीत | वर्षे हजारो लोटली (६.५०)</p><p>परि ब्रह्म शापे अपर्णेला | गर्भ_धारणा होईचना | मग इन्द्राने देऊन आज्ञा | पाठविले अग्नीस क्रीडा स्थली (६.५१)</p><p>अग्नीने 'भिक्षा’ याचिली म्हणुनी | उमेने 'शिव_वीर्य’ ओतले ओन्जळी | हस्ती न धरवे अग्नीस म्हणोनि | पिउनिया गरोदर अग्नि झाला | (६.५२)</p><p>पोटात दाह सहन होइना | म्हणुन अग्नीने गर्भ गंगेत टाकिला | कृत्तिका सहा आल्या होत्या स्नाना | गर्भ_धारणा त्या सर्वान्ना झाली (६.५३)</p><p>लज्जित होउनि त्या षड् कृत्तिकान्नी | गंगा तीरावरी परतून येउनी | गर्भ त्यागताच ते एकत्र येउनी | जन्म पावला 'षड्_आनन' (६.५४)</p><p>शिवोपदेशे षडाननाने | व्रत तप केले गणेशाचे | ‘मयूर’ वाहन नि कार्यसिद्धिचे | मिळविले स्कंदाने वरदान (६.५५)</p><p>मग इंद्रे मेळवुनी देवसेनेला | अधिपति नेमिले षडाननाला | सुरांनी जोरदार चढवुनी हल्ला | 'तारकासुर' वधिला कार्तिकेयाने (६.५६)</p><p>लक्ष वर्षे युद्ध करुनी | तारकासुराला वधिले म्हणुनी | ‘लक्ष_विनायक’ मंन्दिर स्थापुनी | विजयोत्सव केला षडाननाने (६.५७)</p><p>इकडे रति_मदन दम्पतीने | मंत्र जप तप व्रताचरणाने | प्रसन्न केला गणेशाते | अनंगत्व संकट निवारणास्तव (६.५८)</p><p>जेथे मदनास वरदान द्यावया | गणेश साक्षात् प्रगट जाहला | तेथे 'मदोत्कट_विनायक’ मंदिरा स्थापन केले मदनाने (६.५९)</p><p><br /></p><p>एकदा शेष शिव मस्तकी | बसला असता घालूनि वेटोळी | विचार दुष्ट अहंकारी | बाधला मनासी शेषाच्या (६.६०)</p><p>त्रैलोक्य ज्याचे चरण चुरी | त्या शिवाच्याहि मस्तकावरी | बैसतो मी उच्च स्थानी | भूभारही शिरावरी हा माझ्या (६.६१)</p><p>इतुके गर्विष्ठ विचार उमटती | तोच उठले पार्वतीचे पती | शेष हापटला धरणी वरती | विव्हळे असह्य वेदनांनी (६.६२)</p><p>तोच नारद मुनींनी येउनी | उपदेश केला मंत्र षडाक्षरी | ‘नमो_गणेशाय’ ऐशिया परी | तपाचरण शेष करिता जाहला (६.६३)</p><p>सहस्र वर्षे घडता तपाला | गजानन पूर्ण संतुष्ट जाहला | शेषाची करुनी मौन्जी_मेखला | धारण केली ब्रह्माण्डोदरावरी (६.६४)</p><p>जेथे शेषास्तव गणेश प्रगटला | तेथे शेषाने मुर्ति स्थापोनिया | सुन्दर प्रासाद उभा केला | ‘धरणीधर_विनायक’ मन्दिराचा (६.६५)</p><p><br /></p><p>जवळ जवळ शंभर टक्के | कथा उपकथा सामावल्या इथे | चुकूनही न घडो अधिक उणे असे | प्रार्थिले गणेशास वेळोवेळा (६.६६)</p><p>एकात एक कथान्चा गुंता उकलुनी | स्मृति_सुलभ त्यांची मांडणी मांडुनी | अति संक्षिप्त त्यांचा आकार साधुनी | श्री गणेश कृपेने कथिले येथे (६.६७)</p><p>अशा प्रकारे श्री गणेशाचे | व्रत, आराधना पूजा विधीन्चे | मन्त्र जप, तपादिक अनुष्ठानान्चे | माहात्म्य या 'उपासना’ खंडात आहे (६.६८)</p><p>हरि, हर, ब्रह्मादिका पासुनी | ही व्रताराधने केली कुणी कुणी | मंदिरे स्थापिली कुणी, कुठे, कधी | हीही सविस्तर माहिती येथे (६.६९)</p><p>|| इति भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, उपासना खण्डे, सोमकांत भृगु संवादे गणेश प्रिय दुर्वादिक माहात्म्य वर्णनं नाम षष्ठोध्याय: ||</p><p><br /></p><p>----------------------- =============== ------------------------</p><p><br /></p><h1 style="text-align: left;">श्रीगणेशपुराण, द्वितीय क्रीडाखण्ड </h1><p><span style="font-size: large;">अध्याय - १</span></p><p>|| ॐ अथ भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, द्वितीय क्रीडा खण्डे, सोमकांत भृगु संवादे अदिति पुत्र महोत्कट चरित्रम् तथा गणेश प्रिय शमी मंदार माहात्म्य वर्णनम् नाम प्रथमोध्याय: ||</p><p><br /></p><p>ॐ श्री गणेशाय नम: |</p><p>शौनकादिक म्हणती 'सूत’ मुनीन्ना | “विविध श्रीगणेश उपासना विधीन्ना | सविस्तर कथिले तुम्ही आम्हाला | धन्यवाद धन्यवाद धन्यवाद (२.१.१)”</p><p>आता श्रीगणेश अवतार क्रीडा | दुष्ट निर्दालना, धर्म संरक्षणा | प्रमुख प्रमुखशा तरी सर्व लीला | निवेदाव्या आम्हासी ही विनंती" (२.१.२)</p><p>सूत म्हणती शौनकादिका | " धन्य धन्य तुमची भक्ति, श्रद्धा | ज्ञान पिपासा, औत्सुक्य, जिज्ञासा | मज 'कीर्तन’कारा आनन्दवी अपार” (२.१.३)</p><p>भृगु सांगती सोमकांताला | जे पुर्वी ब्रह्मदेवे कथिले व्यासा | तेच मी सांगतो तुम्हा सकळिका | श्रीगणेश अवतार क्रीडा लीला (२.१.४)</p><p>कृत युगी सिऩ्हारूढ दशभुज गणेश | त्रेता युगी षड्भुज मयूर वाहन | द्वापरी चतुर्भुज मूषक वाहन | धूम्रकेतु अश्वारूढ कलि युगांती (२.१.५)</p><p>कृत युगी अंग देशी 'रौद्रकेतु’ नाम | द्विज महा विद्वान वेद शास्त्रादिकात | भार्या त्याची 'शारदा' नामक | प्रसवली जुळी पुत्रद्वय युग्मासी (२.१.६)</p><p>दोऩही बालके अत्यंत तेजस्वी | घेउनी ज्योतिषाचार्यान्ची अनुमति | नामे 'देवान्तक', 'नरान्तक' ऐशी | ठेविली पित्याने विधिपूर्वक (२.१.७)</p><p>नारदेही कीर्ति ऐकुनी तयांची | भेटोनि उपदेशिला मन्त्र शिव_पञ्चाक्षरी | उग्र तपाचरणे बंधुद्वयांनी | सुप्रसन्न केले सदाशिवाला (२.१.८)</p><p>वरदान मिळवले 'त्रैलोक्य_साम्राज्य' | "जिन्कावे समस्त सुरासुर गणास | अस्त्रशस्त्रादिके न व्हावे मरण" | 'तथास्तु' म्हणाला साम्ब शिव भोळा (२.१.९)</p><p>शिव_वरदान मिळताच द्विज बंधुंनी | तोषविले विप्रास यज्ञ यागादिनी | त्यान्चेही आशीर्वाद शुभेच्छा मिळवुनी | जोडिले सैन्यही चतुरंग मोठ्ठे (२.१.१०)</p><p>नरान्तके जिन्किले भू_पाताल | देवान्तके जिन्किले सप्त_स्वर्गास | ऐसे त्रैलोक्यी स्थापुनी साम्राज्य | 'विजयोत्सव' सोहळा थोर केला (२.१.११)</p><p>गिरिकन्दिरी लपले देव गन्धर्व | नव_नाग, अप्सरा, यक्ष किन्नर गण | हरि हर सोडुनी वैकुण्ठ, कैलास | आराधिती विघ्नहर_गणेश सारे (२.१.१२)</p><p>स्वपुत्र_पौत्रान्च्या दैन्यावस्था | पाहुनी देवमाता पावली व्यथा | 'उपाय' विचारुनी पति ऋषी कश्यपा | श्रीगणेश आराधना आरम्भिली (२.१.१३)</p><p>देवमाता अदितीने | शंभर वर्षे उग्र तप केले | तेन्व्हा गणेशे 'दर्शन' दिधले | दशभुज_परशुधर विनायक रूपे (२.१.१४</p><p>अदिति म्हणे "हे वरद_विनायका | मम पुत्र रूपे जन्म घेऊनिया | सोडवा संकटातुनी मम पुत्रादिका | करावा अंत या दुष्ट_बंधुंचा" (२.१.१५)</p><p>'तथास्तु' म्हणुनी जाहला गुप्त | साधु_संरक्षण दुष्ट_दमनार्थ | अवतार 'महोत्कट' जाहला प्रगट | अदिति_पुत्र रूपे, कश्यपाश्रमी (२.१.१६)</p><p>भागवती व्यासांनी वर्णिल्या | द्वापरी रम्यशा कृष्ण_लीला | तत्समच नाना बाल_लीला | महोत्कटे केल्या कृत युगीच (२.१.१७)</p><p>'विरजा' नामे धूर्त राक्षसी | 'उद्धत', 'धुन्धुर' दैत्य 'शुक'रूपी | शापित गन्धर्व 'नक्र' मायावी | महोत्कटे सर्वान्ना मुक्त केले (२.१.१८)</p><p>पाचव्या वर्षी महोत्कटाचा | 'व्रत_बंध' संस्कार कश्यपे केला | पाच राक्षस त्या समारम्भाला | पातले कपटी ब्राह्मण_वेषाने (२.१.१९)</p><p>'विघात', 'पिङ्गाक्ष', 'विशाल', 'पिङ्गल' | 'चपल' ऐसे कपटी दैत्य पन्चक | अभिमंत्रित 'मन्त्राक्षता' मारुनी तयांवर | महोत्कटे वध केला त्यान्चा (२.१.२०)</p><p>जमदग्नी_पत्नी परशुराम_माता | रेणुकेने येउनी उपनयन संस्कारा | 'परशू' बटूच्या करी दिधला | 'सिंह' वाहनही अर्पण केले (२.१.२१)</p><p>देवेन्दे अंकुश नि कल्पवृक्ष | वरुणाने दिली पुष्पांची माळ | शिवे डमरू आणिक त्रिशूल | ब्रह्मदेवे 'पद्म' पुष्प दिधले (२.१.२२)</p><p>ऐशिया परी सर्व देवता | महोत्कट बटूला देती उपहारा | पूर्ण जाहला उपनयन सोहळा | महोत्कटे वेदाध्ययन प्रारम्भिले (२.१.२३)</p><p>चार वेद, चारी उपवेद | शास्त्र, कला, संगीत, नाट्य | कर्म_काण्ड, प्रायश्चित्तादिक | ज्ञाता, प्रवीण, सर्व विद्यान्चा (२.१.२४)</p><p>काशी नरेशे स्वपुत्राचा | विवाह सोहळा करविण्या करिता | कश्यप ऋषीना आमंत्रण द्यावया | स्वयेचि आला कश्यपाश्रमासी (२.१.२५)</p><p>कश्यप म्हणती "हे महाराजा | भेटून तुजला आनंद जाहला | युवराज विवाह शुभ कार्य सोहळा | गणेश कृपेने होईलच सिद्ध (२.१.२६)</p><p>सध्या माझिया या आश्रमी | कार्यक्रमान्ची आहे गर्दी | म्हणुनि तु तुझ्या या कार्यासाठी | महोत्कटास नेई पौरोहित्यास्तव (२.१.२७)</p><p>याची ही चुणचुणित छोटी मुर्ति | आहे दिव्य अन् अति तेजस्वी | तुझ्या कार्यातिल निर्विघ्न सिद्धी | निश्चितच होईल याचे योगे" (२.१.२८)</p><p>कश्यप ऋषीन्च्या सल्ल्यानुसार | निघाला काशी नरेश काशीस | महोत्कटास घेउनी बरोबर | मुलाच्या विवाह सोहळ्यास्तव (२.१.२९)</p><p>महोत्कटे काशीस जाता जाता | वाटेतच मारिले अनेक दैत्या | नरान्तक देवान्तक यान्चा काका | 'धूम्राक्ष' त्यातील प्रमुखसा एक (२.१.३०)</p><p>काशीपुरीतील स्वागत सभेमधे | 'विघण्ट', 'दन्तुर' दैत्यही घुसले | त्यान्चे दुरुद्देश जाणुनि विनायके | आलिङ्गुनी चिरडले दोघांनाही (२.१.३१)</p><p>गज, गर्दभादिक नाना रुपांनी | दैत्य महोत्कटास मारू पाहती | परंतु त्या सर्वान्ची करुनी फजीती | यमसदनास पाठवी महोत्कटच त्यांना (२.१.३२)</p><p>'व्याघ्रमुख', 'ज्वालामुख', 'दारुण' | 'धूम्राक्ष_पत्नी' जृम्भा राक्षसीण | इत्यादिकान्चे केले निर्दालन | लीलया बाल महोत्कटाने (२.१.३३)</p><p>दंडकारण्यी महर्षी भृशुण्डी ऋषी | गणेश व्रत, जप, तपाचरणे करी | त्यासही काशीस बोलावुनी आणुनी | 'दर्शन_सुख' घडविले महोत्कटाने (२.१.३४)</p><p>'शुक्ल' नामे तपस्वी दरिद्री ब्राह्मण | 'विद्रुमा' त्याची पत्नी सुजाण | महोत्कटे त्यान्चे घरी जाउन | भोजन केले अत्यानन्दे (२.१.३५)</p><p>ऐसेचि जे जे भक्त काशीत | रूपे तितुकी धरुनी अनंत | महोत्कट रोजच पोटभर जेवत | पुरविण्यास त्यान्ची मनोकामना (२.१.३६)</p><p>सनक, सनंदन ऋषी द्वयीन्नी | लीला महिमा हा प्रत्यक्ष पाहुनी | स्तुती केली, स्थापिली मुर्ती | सभोवती मन्दिरही बांधले (२.१.३७)</p><p>नरान्तकाने सैन्य घेउनी | काशी नगरीवर आक्रमण करी | महोत्कटानेही सैन्य निर्मुनी | 'कालपुरुष' सेनानी नेमिला त्याचा (२.१.३८)</p><p>'कालपुरुष' व त्याच्या सैन्याने | नरान्तकाच्या सैन्यास हरविले | नरान्तकाने मग येउनी स्वये | युद्ध केले महोत्कटाशी (२.१.३९)</p><p>अस्त्र_शस्त्रांनी शिर कापता | नव नवे प्रगटे नरान्तक_देहा | म्हणुनी 'विराट' स्वरूप धरूनिया | अंगठ्याने चिरडिला महोत्कटाने (२.१.४०)</p><p>ते वृत्त ऐकुनी देवान्तकाने | युद्ध आरम्भिले महोत्कटासंगे | निर्मुनी मायावी 'अदिती' कपटाने | महोत्कटावरी करविले प्रहार (२.१.४१)</p><p>महोत्कटे जाणुनी आसुरी माया | उष:काली देवान्तकास भूमीवर पाडला | दातानेच ठेच ठेचूनिया त्याचे शिरा | चूर्ण चूर्ण केले मस्तकच त्याचे (२.१.४२)</p><p>नरान्तक_ देवान्तक बन्धु द्वयीचा | सर्व नाश ऐसा करोनिया पुरता | विवाह आटपोनि युवराजाचा | महोत्कट परतला कश्यपाश्रमासी (२.१.४३)</p><p>माता पित्यान्चे चरणी नमुनी | बोले " 'मम अवतार_कार्य' संपवोनी | परत मी जातो 'गणेश_धामी' | निरोप आशीर्वाद द्यावा मजला" (२.१.४४)</p><p>दशरथाने 'त्रेता' युगी | पुत्र_प्राप्तिस्तव आराधना केली | वसिष्ठांनी प्राण_प्रतिष्ठा केली | 'वरद_गणपति' मुर्तीची त्या (२.१.४५)</p><p>पुढे 'साम्ब' नामे एक पापी राजा | संत्रस्त केली ज्याने प्रजा | 'दुष्ट_बुद्धी' प्रधान ज्याचा | माता व्यभिचारी 'प्रमदा' नामे (२.१.४६)</p><p>एकदा तो दुराचारी | प्रधानासह शिकार करुनी | परतताना अरण्यातुनी | दैवयोगेच त्या मन्दिरी आला (२.१.४७)</p><p>देखोनि वसिष्ठ स्थापित मुर्ति | दशरथे जी पूजिली होती | भक्ति_भावना जागुनी चित्ती | पूजा केली त्या गणेशाची (२.१.४८)</p><p>पुढे यम_यातना साहोनि नरकी | झाला व्याध एका जन्मी | हुडकत शिकार भटकता अरण्यी | देखे क्रूर ब्रह्म_राक्षस (२.१.४९)</p><p>भिऊनि लपण्यासाठी चढला | वृक्षा वरती काटेरीच एका | खुडुनी टाकी पत्री शाखा | जागा लपण्यास करण्यासाठी (२.१.५०)</p><p>तोच तो राक्षस आला तेथे | झाड गदगदा हलवीतसे | तेणेही पत्री शाखा झडे | त्या शमीच्या वृक्षाची (२.१.५१)</p><p>दैव योगे त्या वृक्षाचे तळासी | वामन_स्थापित गणेशाची मुर्ति | शमी_पूजा नकळतच घडोनि ऐशी | उद्धरले व्याध_राक्षस दोघेही (२.१.५२)</p><p>विष्णुने कश्यप_पुत्र वामनावतारी | विदर्भ देशांत रम्य निर्जन स्थली | षडक्षर गणेश_मन्त्र जपोनी | प्रसन्न केले श्रीगणेशा (२.१.५३)</p><p>जेथे गणेशाने दिधले दर्शन | तेथेच काश्मिरी पाषाण उपयोगून | वामनाने गणेश मुर्ति स्थापुन | पूजा पुर्वी केली होती (२.१.५४)</p><p>वितिक्षेत्र नगरीत नामे 'औरस’ | ब्राह्मण होता वेद, शास्त्र संपन्न | त्याची पत्नी 'सुमेधा' नाम | पुत्री एक 'शमिका’ झाली त्यांना (२.१.५५)</p><p>धौम्य ऋषी पुत्र नामे 'मंदार' | त्याला अर्पिली 'शमिका’ सुन्दर | दंपतीची जोडी ती तरुण नी गोड | विनोदे सुखे काल क्रमित होती (२.१.५६)</p><p>अचानकच एके दिनी | आश्रमी पातले भृ_शुण्डी मुनी | हसू नावरे त्यास पाहुनी | युवा 'मंदार_शमिका' युगुला (२.१.५७)</p><p>भृ_मध्यभागी उमटली शुण्डा | ऐसे न पाहिले होते कवणा | आजारच काही तरी हा नवा | ऐसे समजले अविवेकीपणाने (२.१.५८)</p><p>गुलाब_फूल समज़ूनी लाल निखारा | हाती धरला अन् हात भाजला | तैसेच जाहले त्या जोडप्याला | 'शाप' बाधला कोपाचा (२.१.५९)</p><p>"यौवन_मदे उन्मत्त होउनी | हसलात माझे तोण्ड पाहुनी | तात्काळ पावा वृक्ष योनी" | भृशुण्डी वदले क्रोधाने (२.१.६०)</p><p>शौनकास कळताच हा वृत्तांत | 'औरस’ संगे मांडिले उग्र तप | प्रसन्न करण्यास गजाननास | 'कुजन्म_नाशन' स्तोत्र रचले (२.१.६१)</p><p>गजानन म्हणे शौनकाला | 'शाप' परतवणे अशक्य मजला | परि वर देईन मी या जोडप्याला| मम पूजेत होईल सदुपयोग यान्चा (२.१.६२)</p><p>'मंदार' पुष्पे तथा पुष्पमाला | गाणेश योजितील मम पूजेला | निवास माझा 'मंदार' वृक्षतला | शमी पत्री मज प्रिय होतील" (२.१.६३)</p><p>कर्नाटक देशी 'मंदार' वृक्षतळी | श्रीरामचन्द्रांनी स्थापिली मुर्ती | नाम त्याचे 'वक्रतुण्ड_गणपती' | शमी_पत्र पूजा त्याची प्रसिद्ध (२.१.६४)</p><p>पुर्वी 'प्रियव्रत' नाम राजाला | 'कीर्ति', 'प्रभा' नामे दोन राण्या | प्रभेला पुत्र 'पद्मनाभ' जाहला | मत्सर ती 'कीर्ति'चा करि अपार (२.१.६५)</p><p>सवती मत्सरे प्रेरित होउनी | एकदा तर तिने राजभवनातुनी | 'कीर्ति'स दिधले बाहेर हाकलुनी | तिने केली आराधना विघ्नराजाची (२.१.६६)</p><p>'दैवत' नामे राज_पुरोहित | त्याने केला तिजसि उपदेश | 'मंदार' काष्ठांत मुर्ति नित्य एक | कोरूनि पूजिले श्रीगणेशाला (२.१.६७)</p><p>एकदा तिला पूजेस न मिळे दुर्वा | म्हणोनि केली शमि_पत्रि पूजा | तेणे प्रसन्नता वाटून गणेशा | दर्शन तिज दिधले स्वप्नांत त्याने (२.१.६८)</p><p>गणेश कृपा होताच 'कीर्ति'ला | महारोग जडला 'प्रभा' राणीला | राजाने मग जवळ केले 'कीर्ति'ला | पुत्र तिज जन्मला 'क्षिप्र_प्रसादन' (२.१.६९)</p><p>प्रभेने मत्सरे 'क्षिप्र_प्रसादना' | विष प्राशविले आणि तो मेला | 'कीर्ति'ने पुत्र शोके आकान्त माण्डिला | तोच गृत्समद ऋषी पातले तेथे (२.१.७०)</p><p>ऋषी वदती माता 'कीर्ति'ला | गणेश कृपेने हा पुत्र तुज जन्मला | अपमृत्यु त्याचा टाळावयाला | उपाय एक भला आहे (२.१.७१)</p><p>एकदा गणेश आराधना करिता | केली होतीस तु शमी_पत्रि_पूजा | त्या पूजेचे 'पुण्य' तु आज या | 'क्षिप्र_प्रसादनाला' दान देई झणी (२.१.७२)</p><p>गृत्समद ऋषीन्च्या सल्ल्यानुसार | 'कीर्ति'ने पुण्याचे दिधले 'दान' | त्या योगे पुत्र 'क्षिप्र_प्रसादन' | पुनरुज्जीवित जाहला तत्क्षणी (२.१.७३)</p><p>एकदा सत्यलोकी ब्रह्मयज्ञास्तव | जमले होते देव यक्ष गंधर्व | सावित्री होती गृहकृत्यी चूर | तो ब्रह्मदेवे तिज उपेक्षिले (२.१.७४)</p><p>फक्त गायत्री समवेत याग विधीला | ब्रह्मयाने सुरुवात केली असता | सावित्रीने कोपुनी 'शाप' दिधला | सहभागी झालेल्या देवतांना (२.१.७५)</p><p>"तुम्ही सर्वही देवतादिकांनी | अज्ञाने अनादर माझा करोनी | 'यज्ञ' समारम्भ प्रारम्भिला म्हणुनी | 'जड_जल' स्वरूप व्हाल सारे" (२.१.७६)</p><p>या "शाप_संकट' विमोचनार्थ | ब्रह्मदेव आराधी वक्रतुण्डास | जेथे तो प्रगटला त्या क्षेत्रात | 'हेरम्ब_विनायक' मुर्ती प्रस्थापिली (२.१.७७)</p><p>भस्मासुराचा मुलगा 'दुरासद’ | शिव पञ्चाक्षरी जपुनी करी तप | प्रसन्न होताच साम्ब सदाशिव | वरदान मिळविले अद्भुत ऐसे (२.१.७८)</p><p>"देव, दानव, यक्ष, राक्षसादिकी | मन्त्र, तन्त्र वा अस्त्र, शस्त्रादिकी | दिवसा, रात्री वा सन्ध्या समयिही | मरण न यावे मजला देवा" (२.१.७९)</p><p>वरदान मिळताच दुरासने | त्रैलोक्य जिन्कुनी राज्य प्रस्थापिले | शिवासहित सर्व काशीत लपले | तेथेही राक्षसे चढवला हल्ला (२.१.८०)</p><p>सर्व देव, दानव, यक्ष, गंधर्वादिकी | प्रार्थिला संकष्ट निवारक गणपति | क्रोधे सन्तप्त शिवा पार्वती | मुखातुनी क्रोधाग्निच्या प्रगटती ज्वाला (२.१.८१)</p><p>त्या ज्वालातुनी प्रगटली मुर्ति | 'वक्रतुण्ड' विनायक गणपतीची | सिंह_वाहन महोत्कटाची | विराट विश्वव्यापी व्याप्ती ज्याची (२.१.८२)</p><p>दुरासदाला मल्ल_युद्धात | चित् करोनी उत्ताणा पाडित | उरावरी पद ठेवून तिष्ठत | उभा राहिला श्री व्हिघ्नहर्ता (२.१.८३)</p><p>दुरासद म्हणे "हे देवाधिदेवा | शरण मी आलोय तुझ्या या चरणा | मम उरावरी तव पद ठेवूनिया | कृपया उभा रहा सतत सर्वकाळ" (२.१.८४)</p><p>शरणागतांचा पालन कर्ता | वदला "'तथाऽस्तु', राहतो मी उभा" | त्या गणेश मन्दिरात काशी समीपच्या | गाणेश दर्शन घेती त्याचे (२.१.८५)</p><p>गणेशे अवतार घेतला 'ढुण्ढी' | कथा त्याची असे महा_विनोदी | 'बुद्धि'पतीने बनुनी 'ज्योतिषी' | 'बुद्ध' अवतारात मदत केली 'हरि'ला (२.१.८६)</p><p>सोमवंशात एक राजा 'दिवोदास' | आचरण त्याचे धार्मिक, स्मृतिसंमत | वेदोपासक, प्रजाहितदक्ष | राज्ञी 'सुशीला' ही रत पुण्यकर्मी | (२.१.८७)</p><p>त्यान्च्या उत्तम कार्यक्रमांनी | ब्रह्मदेवाने सुप्रसन्न होउनी | नेमिले त्याला काशी पुराधिपती | काशीत सुख शान्ति नान्दण्यास्तव (२.१.८८)</p><p>इकडे शिव शिवा कैलास सोडुनी | रहात होते मंदार पर्वती | तेथेही गमेना चित्तास म्हणुनी | काशीत येण्याची करिती मनिषा (२.१.८९)</p><p>काशीतुन 'दिवोदास' उच्चाटनार्थ | हर, हरि, गणेश रचिती कट | 'ढुण्ढी' 'ज्योतिषी' बनुनी गुणेश | जिन्किले मानस रहिवाशान्चे (२.१.९०)</p><p>ऐकोनिया कीर्ति 'ढुण्ढी' ज्योतिषाची | 'दिवोदास' त्याचा सत्कार करी | 'ढुण्ढी' म्हणे लवकरच एक संन्यासी | मार्ग दर्शवील उत्तम तुजला (२.१.९१)</p><p>मग 'हरि' घेउनी 'बुद्ध' अवतार | काशीत आला 'धर्मोद्धारक' | धार्मिक_अधार्मिक कार्याबद्दल | गोन्धळ जनमानसी उपजवी पुरता (२.१.९२)</p><p>'दिवोदास' त्याच्या शब्दान्च्या गोन्धळी | अडकोनि त्याने सोडिली काशी | मग शिवे देउनी हरिला टाळी | आगमन काशीपुरीत केले (२.१.९३)</p><p>ऐशा या सांकेतिक विनोदी कथा | भावार्थ त्यान्चा अवघड नि गूढसा | समजून घेण्यास्तव चिन्तन नि चर्चा | नितांत आवश्यक असे आज (२.१.९४)</p><p>'क्रीडा' खंडातिल प्रमुख आख्याने | संक्षेपे समाविष्ट केली येथे | नाना उपकथा उपाख्याने | वगळली 'स्थूलत्व' टाळण्यासाठी (२.१.९५)</p><p>|| इति भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, द्वितीय क्रीडा खण्डे, सोमकांत भृगु संवादे अदिति पुत्र महोत्कट चरित्रम् तथा गणेश प्रिय शमी मंदार माहात्म्य नाम प्रथमोध्याय: ||</p><p>---------------------- =============== ------------------------</p><p><span style="font-size: large;">अध्याय २</span></p><p>|| ॐ अथ भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, द्वितीय क्रीडा खण्डे, सोमकांत भृगु संवादे पार्वति नंदन मयुरेश गुणेश अवतार चरित्रं नाम द्वितीयोध्याय: ||</p><p><br /></p><p>ॐ श्री गणेशाय नम: |</p><p>सोमकान्ताने केली पृच्छा | 'कृत' युगी 'महोत्कट' अवतार लीला | ऐकुनी चुटपुट लागली मम मनाला | पुढच्या युगी गणेशे काय काय केले ?” (२.२.०१)</p><p>ऐकुनी सोमकान्ताचा प्रश्न | भृगुंना सुनवण्यास येई उल्हास | म्हणती "पुढच्या 'त्रेता' युगात | गणेशे 'मयूरेश' अवतार धरला (२.२.०२)</p><p>‘गंडकी’ नाम महानगरीत | राजा 'चक्रपाणि’ महा धार्मिक | राणी साध्वी 'उग्रा’ नाम | मन्त्री द्वय साम्ब, सुबोधन नामे (२.२.०३)</p><p>राजा, प्रजाजन वर्तती सुखाने | आचरण धार्मिक नित्य नेमाने | नव्हती दुष्काळादिक विघ्ने | परि चिन्ता एक लागली 'पुत्र’ प्राप्तीची (२.२.०४)</p><p>गुरु शौनकान्च्या सल्ल्यानुसार | राज_दम्पत्ये करिती 'उपाय' | सूर्योपासना उग्र घोर | युवराज शूर वीर उपजण्यासाठी (२.२.०५)</p><p>सूर्य_नमस्कार, सन्ध्यावन्दन | व्रते, मन्त्र_जप, याग, यज्ञ | लक्ष ब्राह्मण भोजन संतर्पण | नानाविधा उपासना करिती दोघेही (२.२.०६)</p><p>सूर्य नारायणे सुप्रसन्न होउनी | स्वप्नात उग्रेला दिधली रती | पुत्र जन्मला अति तेजस्वी | त्रिनेत्रधारी रक्तवर्ण (२.२.०७)</p><p>ज्योतिष शास्त्रान्वये जन्म वेळ नक्षत्र | पाहुनिया 'सिन्धु’ नाम सुचविती विप्र | उग्रेचा पुत्र म्हणुन नाम 'उग्रेक्षण’ | ‘विप्र_प्रसादन’ म्हणति नगरवासी (२.२.०८)</p><p>'सिन्धु’ने बालपणिच गुरुपदेश घेउनी | सुर्योपासना उग्र सुरु केली | स्वपुत्र मोहे सहस्रांशुही | सुप्रसन्न जाहला लवकरच त्याला (२.२.०९)</p><p>‘त्रैलोक्य_विजय' वरदानात देउनी | अमृत_कुम्भ ठेविला कंठात लपवुनी | अमरत्वा समान दीर्घायुष्य देउनी | अन्तर्धान पावला सूर्यदेव (२.२.१०)</p><p>आधीच धष्ट_पुष्ट शूर वीराग्रणी | सूर्य वरदाने निष्चिन्त होउनी | थोर चतुरंग सेना उभारुनी | 'सिन्धु’ त्रैलोक्याचा अधिपती जाहला (२.२.११)</p><p>वैकुंठ, कैलास सोडोनि हरि, हर | इन्द्र, चन्द्र, वरुण, वायु, कुबेर | गिरिकन्दरी लपुनी आराधिती गणेश | 'सिन्धु’ रूपी संकट निवारण्यासाठी (२.२.१२)</p><p>त्रिदेव, त्रिदेवी सहित सुरगणांच्या | सप्तर्षी, दिक्पालक, गंधर्वादिकान्च्या | आराधना सहित आर्त हाका | ऐकोनि प्रगटला विनायक (२.२.१३)</p><p>सिंहारूढ दशभुज गजमुख आकृती | रक्तवर्ण आकर्षक देखणी मुर्ती | आश्वासिती जाहली "लौकरच अगदी | अवतार मम 'मयूरेश’ प्रगट होईल" (२.२.१४)</p><p>कैलास सोडुनी 'त्रिसन्ध्या’ क्षेत्री | निवसत होती शंकर_पार्वती | एकाक्षरी गणेश_मन्त्र जप करिती | संकष्टहर_चतुर्थी व्रतोपवासादिकऽ (२.२.१५)</p><p>जेथे गणेशाने दिधले 'दर्शन’ | तेथे गिरिजेने बांधिले मन्दिर | मुर्ती प्रस्थापिली 'गिरिजात्मज’ नामक | ‘सिद्धि_क्षेत्र’ नामही त्याच क्षेत्राला (२.२.१६)</p><p>भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिनी | सोमवारी, स्वाती नक्षत्री | सिंह लग्नी षोडशोपचारी | पूजा विधी संपविली पार्वतीने (२.२.१७)</p><p>मिटल्या नेत्री सांगतेचा | नमस्कार करुनी उघडिता नेत्रा | पुढे देखिले विराट स्वरूपा | विश्व_व्यापक श्रीगणेशाचे (२.२.१८)</p><p>म्हणे "हे माते मम वरदानानुसार | तव पुत्र रूपे मी धरला अवतार" | माता म्हणे "व्हावे तु छोटा सुकुमार | बाल_लीला मज तुझ्या बघु दे" (२.२.१९)</p><p>मग गणेशे षड्भुज त्रिनयन शिशूचे | रूप धरुनी क्रीडा करितसे | ऋषि_मुनि गणांनी पाहुनी जातके | नाम बाळाचे ठेविले 'गुणेश’ (२.२.२०)</p><p>हिमनगाने येउनी पाहिले नातवाला | भेट_वस्तु नाना अर्पुनी बालका | नाम 'हेरम्ब’ हे ठेविले त्याला | नातू बहु लाडका 'उमापुत्र' (२.२.२१)</p><p>एकदा हेरम्ब अंगणी खेळताना | गृध्ररूपी दैत्याने उचलला त्याला | मुष्टि_प्रहारे त्या दैत्याचा | संहार केला गुणेशाने (२.२.२२)</p><p>पुढे 'व्योमासुर’ व त्याची भगिनी | ‘शतमाहिषा’ नाम दुष्ट राक्षसी | अन्यही दैत्यगण दुंदुभी आदिकांनी | हेरम्ब वधाचा प्रयत्न केला (२.२.२३)</p><p>कूट, मत्स्य, शैल, खड्ग | शलभ, अजगर, शैल, चंचल | ऐसे नाना राक्षस भयानक | लीलया हेरम्बे वधिले बाल्यी (२.२.२४)</p><p>एकदा 'विश्वकर्मा’ आला भेटावया | अङ्कुश, परशू, पाश, पद्म या | भेट_वस्तू अर्पिल्या बालका | स्वीकारुनी धारण करी प्रीतीने (२.२.२५)</p><p>सातव्या वर्षी गुणेशाचा | ‘उपनयन’ संस्कार शिवाने केला | वेदाध्ययनास मग प्रारम्भ केला | अति आदराने हेरम्बाने (२.२.२६)</p><p>एकदा पक्ष्यान्ची माता 'विनता’ | अंडे सांभाळुनी उबवीत असता | गुणेशाने ते फोडुनी त्यातल्या | ‘मयूरावर’ लीलया झाला स्वार (२.२.२७)</p><p>विनतेने ओळखुनी गणेश_स्वरूप | केली स्तुती त्याची गाउनी स्तोत्र | प्रार्थनाही करी "सोडवी लौकर | मम सुतांना नाग_पाशांमधूनी" (२.२.२८)</p><p>नागराज वासुकीच्या कन्यांनी | मयूरेश नेला पाताळी प्रेमानी | गुणेशाने तेथे वासुकीस उचलुनी | ‘यज्ञोपवीत’ त्याचे धारण केले (२.२.२९)</p><p>शेषाचे मौञ्जी_बंधन कटीला | संपाती, जटायू, आदि वैनतेया | मुक्त केले सोडुनी पाशा | विनता खुशीने करी नमन (२.२.३०)</p><p>सिन्धुचा एक प्रमुख सरदार | नाम त्याचे होते 'कमलासुर’ | धावून आला तो गुणेशावर | सवे दैत्य सैन्य घेउनी मोठ्ठे (२.२.३१)</p><p>मयूरेशे अनंत रूपे धरोनी | वेढले त्यालाच चहूबाजुंनी | सर्व कडे मयूरेशच मयूरेश पाहुनी | दिग्भ्रांत झाला कमलासुरऽ (२.२.३२)</p><p>मयूरेशाने त्रिशूलाने | कमलासुराचे मस्तक उडविले | भीमेच्या दक्षिण तटावर ते पडले | विश्वकर्म्याने बांधले मंदिर तेथे (२.२.३३)</p><p>ब्रह्मदेवाने सिद्धि, बुद्धि नामक | दोन कन्या केल्या गुणेशास अर्पित | वरात निघाली वाजत गाजत | गंडकी नगराच्या समीप क्षेत्रातुनी (२.२.३४)</p><p>गंडकी राजधानी सिन्धूची | तेथुनी निघाली फ़ौज दैत्यान्ची | नंदी, षडानन, वीरभद्रादिकी | शिवगणांनी पराभूत केले त्यांना (२.२.३५)</p><p>मग सिन्धू स्वत:च लढण्यास आला | सवे घेउनी मोठ्ठ्या सैन्याला | धर्म व अधर्म नाम सिन्धु पुत्रांना | षडाननाने ठार केले (२.२.३६)</p><p>शोके उद्विग्न, क्रोधे संतप्त | सिन्धु करी नाना अस्त्र शस्त्राघात | मयूरेशे देउनी उत्तरे समर्पक | सिन्धुला केले भ्रमित दिग्भ्रान्त (२.२.३७)</p><p>मयूरेशे मग चालवुनी परशू | अमृत_कुम्भ फोडिला अन् मारिला सिन्धू | दैत्य सैन्यात माजला आकांतु | सैरा वैरा पळती दैत्य (२.२.३८)</p><p>देव सैन्य गर्जे "जय जय मयुरेशा” | “जय जय शिव, षडानन, "जय जय मयुरेशा”| पुष्पे वर्षती गंधर्व अप्सरा | विजयोत्सव सोहळा त्रैलोक्यात गाजे (२.२.३९)</p><p>अवतरण 'उद्देश’ जाहला पुरता | म्हणुनि षडाननाला देउनी मयूरा | गुणेश आपुल्या स्वधामास परतला | गणेश लोकी, स्वानन्द क्षेत्री (२.२.४०)</p><p><br /></p><p>|| इति भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, द्वितीय क्रीडा खण्डे, सोमकांत भृगु संवादे पार्वति नंदन मयुरेश गुणेश अवतार चरित्रं नाम द्वितीयोध्याय: ||</p><p><br /></p><p></p><p>----------------------- =============== ------------------------</p><h2 style="text-align: left;">अध्याय ३</h2><div><div>|| ॐ अथ भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, द्वितीय क्रीडा खण्डे, सोमकांत भृगु संवादे पार्वति_पुत्र, वरेण्य_निधान, वत्सला_नंदन गजानन अवतार चरित्रं नाम तृतीयोध्याय: ||</div><div><br /></div><div>ॐ श्री गणेशाय नम: |</div><div>ब्रह्मदेवे जे कथिले व्यासासी | भृगू ऋषी तेच सांगती सोमकान्तासी | ऐशी कथेतिल कथेतिल कथान्ची गुंफणी | उलगडुनि संक्षिप्तार्थ समजुनी घेऊ (२.३.०१)</div><div><br /></div><div>'कृत’ युगी 'महोत्कट' अवतार जाहला | 'त्रेता' युगी गुणेश्_मयूरेश जाहला | द्वापरी तो ‘गजानन’ रूपे प्रगटला | गणेश, गणपति वा ब्रह्मणस्पती (२.३.०२)</div><div><br /></div><div>एकदा ब्रह्मदेव निद्रिस्त असता | सदाशिव अचानक आले सत्यलोका | गडबडित झोपेतुन उठता उठता | जांभई आली ब्रह्मदेवाला (२.३.०३)</div><div><br /></div><div>त्या जाम्भईतुनी एक आकृती | प्रगटुनी गर्जना करू लागली | “द्यावे मज नाम काम शीघ्र काहीतरी | हे मम पितया ब्रह्मदेवा !” (२.३.०४)</div><div><br /></div><div>ऐकुनी त्याच्या आर्त दीर्घ हाका | ब्रह्मदेव ह्मणे "हे मम सुपुत्रा | तुझ्या या सुन्दर रक्त_कांतीला | ‘सिन्दूर’ हे नाम मी देतो आता (२.३.०५)</div><div><br /></div><div>तुझे अति देखणे मोहक स्वरूप | शरीर सौष्ठव, धैर्य, उत्साह | शौर्य, साहस, शक्ती, मति, धाडस | पाहुनी संतोष जाहला मजसी (२.३.०६)</div><div><br /></div><div>ज्याला ज्याला तु देशील आलिन्गन | त्यांच्या देहांचे होईल रे चूर्ण | त्रैलोक्य हे तवाधीन होइल संपूर्ण | जा शीघ्र कार्यरत होई तु बाळा" (२.३.०७)</div><div><br /></div><div>अति पुत्र_मोहे गाफिलपणाने | ब्रह्मदेवे देऊन टाकिली 'वरदाने' | ऐकोनिया 'सिन्दूर' माथा डोलवे | म्हणे यान्ची प्रचीती पहावीच आता (२.३.०८)</div><div><br /></div><div>लगेचच भुजा दोनही पसरुनी | वरदात्यासच पहावे नीट आलिन्गुनी | ऐशिया आसुरी विचारे झपाटुनी | सिन्दूर चालला ब्रह्मदेवाकडॆ (२.३.०९)</div><div><br /></div><div>पुत्राचा 'दुरुद्देश' लक्षात येता | ठणकला ब्रह्मदेवाचा माथा | बैल गेल्यावरी केला झोपा | म्हणुनि शाप वदला ब्रह्मदेव (२.३.१०)</div><div><br /></div><div>“ 'सिन्दूर' नव्हेस तु अससी 'सिन्दुरासुर’ | लौकरच उमेचा पुत्र 'गजानन’ | करील रे तुझा नाश संपूर्ण | मुर्खा घातकी पातकी जीवा" | (२.३.११)</div><div><br /></div><div>'शाप' हा देउनी सिन्दुरासुराला | ब्रह्मदेव वैकुण्ठाकडे धाविन्नला | सिन्दूर हरिलाही मिठी मारायला | येताच हरि करी 'स्तुती’ त्याची (२.३.१२)</div><div><br /></div><div>“सिन्दूरा, तुझे शौर्य आहे अफाट | शक्तीत तर तू फारच बलिष्ठ | आम्ही दोघेही फारच 'दुर्बल’ | अशक्तासी युद्ध करुनि फायदा नाही (२.३.१३)</div><div><br /></div><div>कैलासी राहतॊ शिव ‘महाबळेश्वर’ | तुझ्या सामर्थ्याच्या तोलाचा वीर | त्यांना त्वा जिन्किता सर्व सुर गन्धर्व | शरण येतील रे तुज क्षणार्धी (२.३.१४)</div><div><br /></div><div>ऐकोनिया हरिच्या स्तुतीच्या बोला | सिन्दूर म्हणे "वाहवा, धन्य तुझा सल्ला" | असुर तो कैलासाकडे धाविन्नला | हरि, ब्रह्मदेवास दुर्लक्षोनी (२.३.१५)</div><div><br /></div><div>जेथे न चले 'शक्ती’, नियोजावी 'युक्ती’ | अदृश्य गणेशाच्या प्रेरणेची नांदी | ‘युक्तिवाद’ परशू आडवा घालोनी | गणेशानेच रक्षिले ब्रह्मा, चक्रपाणिना (२.३.१६)</div><div><br /></div><div>सिन्दूर कैलासावरी पातता | देखिला 'शंकर' तर ध्यानस्थ बैसला | जवळच पाहुनी सुन्दर उमेला | म्हणे ही मम भार्या व्हायला योग्य (२.३.१७)</div><div><br /></div><div>शिवेने करिता आरडा ओरडा | ध्यान तुटुनि सदाशिव उभा राहिला | सिन्दूरास विचारी "तू कोण कोठला ? | सोड मम भार्येला ” मुकाट्याने (२.३.१८)</div><div><br /></div><div>सिन्दूर उत्तरे "हे गोसावड्या | तुजला नाक धरुनि स्वस्थ बैसावया | हवीच कशाला ही सुन्दरान्गा ?” | तोच गुणेश प्रगटे ब्राह्मण वेषाने (२.३.१९)</div><div><br /></div><div>गुणेश ह्मणे "तुम्ही दोघाही वीरांनी | करावे द्वन्द्व_युद्ध, जिन्केल जो कोणी रणी | त्यास मी समर्पिन ही त्रिभुवन_सुन्दरी | गौरी, उमा, पार्वती, गिरिजा, शिवेला (२.३.२०)</div><div><br /></div><div>मानूनिया हा ब्राह्मणाचा सल्ला | अमोरा समोरच उभे राहूनिया | सिद्ध झाले वीर युद्ध खेळावया | सिन्दूरे पसरिल्या भुजा त्याच्या दोऩही (२.३.२१)</div><div><br /></div><div>शिवाने तत्क्षणी मारला त्रिशूळ | गुणेशानेही केला गुप्त परशु प्रहार | घायाल होउनी विव्हळे सिन्दूर | गुणेशे अर्पिली शिवाला शिवेला (२.३.२२)</div><div><br /></div><div>कैलासाहुनी परत येउनी | सिन्दूरे सेना चतुरन्गी बनवुनी | योग्य सेनानीन्ना अधिपती स्थापुनी | त्रैलोक्य विजयाचा पाया घातला | (२.३.२३)</div><div><br /></div><div>भू, स्वर्ग, पाताल, सत्य, वैकुण्ठ | जिन्कुनी स्थापिले सिन्दूर साम्राज्य | देव, यक्ष, गंधर्व, नाग, सिद्ध, चारण | निर्वासित जाहले हरि, ब्रह्माहि (२.३.२४)</div><div><br /></div><div>सर्वान्ना बृहस्पतीने दिला एक सल्ला | संकट विघ्न विनाशक गणेशास आळवा | व्रते, जप, तपाचरण, स्तोत्र गायन करा | उमापुत्र 'गजानन’ अवतार शीघ्र घडवा (२.३.२५)</div><div><br /></div><div>सर्व देवी, देवता ऋषी मुनि जनान्ची | ऐकुनी प्रार्थना संकट मोचनाची | गणेशाने दर्शन देउनी तयासी | आश्वासन दिधले संकट मोचनाचे (२.३.२६)</div><div><br /></div><div>माहिष्मतीच्या राजा वरेण्ये | राणी पुष्पिका सहित तप केले | वरदान मिळविले की गणेशे स्वये | पुत्र रूपे त्यान्च्या प्रगट व्हावे (२.३.२७)</div><div><br /></div><div>पुष्पिका राणी गरोदर राहिली | प्रसूतिच्या वेदनांनी शुद्ध हरपली | जन्मल्या बाळाला पळवि एक राक्षसी | यशोदेसमच स्थिती होती तियेची (२.३.२८)</div><div><br /></div><div>कैलासी गिरिजेला पुत्र जन्मला | चतुर्बाहु, गज_आनन पाहुनी तयाला | शिवाने ओळखुनी नमस्कार केला | पार्वतीस नावडले रूप ते त्याचे (२.३.२९)</div><div><br /></div><div>बाल गणेशाने विनविले शिवाला | "शीघ्र मज नन्दीद्वारे माहिष्मतिस पोचवा" | नंदीने तात्काल मुखी त्यास धरला | ठेविला पुष्पिकेच्या कुशीमध्ये (२.३.३०)</div><div><br /></div><div>पुष्पिकेला शुद्ध आल्यावरती | कुशीतल्या बाळाला पाहुनी घाबरली | वरेण्याने जमविले वैद्य, ज्योतिर्विदासी | नाकळे हे अनाकलनीय जाहले काय ! (२.३.३१)</div><div><br /></div><div>सर्वान्चा राजाला एकच मूर्ख सल्ला | टाकूनि द्या, दूर या, "अशुभ" अर्भकाला | मन्त्री गणांचाही घेउनी सल्ला | वरेण्ये पुत्राला ठेवविले अरण्यी (२.३.३२)</div><div><br /></div><div>जवळच होता पराशर आश्रम | अर्भक रुदन ऐकुनी पातले पराशर | अंतर्ज्ञानाने सर्वही जाणुनी 'अविचार’ | म्हणती भाग्य माझे फळा आले (२.३.३३)</div><div><br /></div><div>नेउनिया आश्रमी देती वत्सलेला | गजानन चतुर्भुज हा साक्षात् परमात्मा | दैव योगे याच्या संवर्धनाला | याने सुवर्णसंधी आम्हासि दिधली (२.३.३४)</div><div><br /></div><div>तिकडे सिन्दूर पुन: पोचला कैलासा | उमेच्या कुशित एक बालक बघितला | पळवुनी त्याला आणता आणता | भार त्याचा त्याला जाहला असह्य (२.३.३५)</div><div><br /></div><div>वाटेतच नर्मदेत पटकता बालक | उडोनिया गेला तो आकाशात उन्च | म्हणे "मूर्खा तुझा मृत्यू जो 'गजानन' | वाढतोय अन्यत्र सुखे वेगे" (२.३.३६)</div><div><br /></div><div>एकदा इन्द्रसभेत होता समारम्भ | हळुच त्यातुनी पळे 'क्रौञ्च’ नाम गंधर्व | गडबडित वामदेवा झाला पद_स्पर्श | भडकुनी वामदेवे 'शाप’ दिधला त्याला (२.३.३७)</div><div><br /></div><div>“भरल्या सभेतून चोरा सारिखा | बेसावध पळतोस उंदरा सारिखा | मूषक योनीतच तु घे जन्म भूतला” | तो मूषक पातला पराशर आश्रमी (२.३.३८)</div><div><br /></div><div>त्या मूषकाने करिता बहु गडबड | गजानने टाकुनी पाश त्याच्यावर | बान्धुनी ओढिता होइ शरणागत | गजानन मग स्वार जाहला त्यावरती (२.३.३९)</div><div><br /></div><div>पराशर्_वत्सला नंदन गजानने | पाश, अंकुश, पद्म, परशू करि धरिले | मूषक वाहनावरी आरूढ जाहले | मग दिले आव्हान सिन्दुरास द्वन्द्वाचे (२.३.४०)</div><div><br /></div><div>सिन्दुरासुर स्वत: रणांगणी येता | गजानने धरिले "विश्वरुप” स्वरूपा | आलिन्गन त्या रुपास सिन्दुर देणार कसा ? | गजाननेच कंठास आवळली मूठ (२.३.४१)</div><div><br /></div><div>कोण्डुनी श्वास रक्त ओकीत | सिन्दूर जाहला गतप्राण मृत | सर्वान्गी रक्त ते फासुनिया घेत | सिन्दूर वदन जेता गजानन शोभला (२.३.४२)</div><div><br /></div><div>सर्व सुर, मुनि, ऋषि गण करीती प्रशंसा | त्यांत वरेण्य राजाही सामील जाहला | ओळखुनी पुत्राला मागितली क्षमा | म्हणे हे पुरुषोत्तमा 'ज्ञान' दे मजसी (२.३.४३)</div><div><br /></div><div>गजाननाने वरेण्यास सांगितली 'गीता’ | गणेश_गीतेत या अध्याय अकरा | सांख्य, बुद्धि, भक्ति, कर्म, राज योग युक्ता | विश्वरूप, उपासना उपदेश सारांशा (२.३.४४)</div><div><br /></div><div>धन, दारा, पुत्र, कीर्ती गृहादिक | ज्या ज्या योगाने ही लभ्य होतात | वा शिव, विष्णु, शक्ति, लोक प्राप्त होत | ते योग सारे दुय्यम दर्जाचे (२.३.४५)</div><div><br /></div><div>पंच दैवते वा पंच महाभूते | या सर्व व्यक्तातुन अव्यक्त जे वसते | ते व्यक्त_अव्यक्त ज्ञात ज्यात होते | तो सांख्य_ज्ञान_योग सर्वोत्तम जाणावा (२.३.४६)</div><div><br /></div><div>त्यागुनी अहंता, ईर्षा, ममत्वा | काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ, दम्भा | योग्य कर्म करणे, योग्यशा समयाला | 'नैपुण्य' पणाला लावुनीया (२.३.४७)</div><div><br /></div><div>कर्म, अकर्म, कुकर्म, विकर्म | इत्यादिकान्चे जाणुनिया मर्म | वैश्विक ब्रह्म_यज्ञात माझे हे अनुदान | या ब्रह्मार्पण भावे करावी कर्मे (२.३.४८)</div><div><br /></div><div>अन्यास न दुखविताच, स्वत:स सुखवी | अथवा स्वत:सह अन्यासही सुखवी | जागतिक सुख, शान्ती, प्रगती वाढवी | ऐशा पुण्य_कर्मात रमवावे चित्त (२.३.४९)</div><div><br /></div><div>यम, नियम, आसन, प्राणायाम क्रिया | प्रत्याहार, धारणा, ध्यान साधोनिया | समाधिस्थ स्थितित जे रमती पूर्णतया | ते राजयोगी कर्म_संन्यस्त (२.३.५०)</div><div><br /></div><div>फलाशा, शत्रुत्व, वा अभिलाषा धरोनी | ज्वरादिके संत्रस्त असता शरीरी | त्यागावी कर्मे ती, सदोषसी ऐशी | न_कळताच घडता हळहळ नसावी (२.३.५१)</div><div><br /></div><div>अव्यक्तातुनीच व्यक्त जन्मते | पुन: कधी अव्यक्ती विलीनही होते | या विश्व उत्पत्ती, स्थिति, लय विलयाचे | सद्बुद्धिने जाणुनी घ्यावे वर्म, मर्म (२.३.५२)</div><div><br /></div><div>बुद्धीस आकलन ज्यास होत नाही | त्यांनी करावी किमान सत्श्रद्धया भक्ती | जे काही दैवत 'प्रिय’ वाटे त्याची | आराधना करावी, गावी स्तुति_स्तोत्रे (२.३.५३)</div><div><br /></div><div>पूजा, अर्चना, व्रतोपवास करावे | तीर्थाटने, यात्रा, दिण्ड्यात रमावे | सत्संग, भजने, कीर्तनी रंगावे | अनन्य शरणागति योग_योगे (२.३.५४)</div><div><br /></div><div>जे जे ज्ञात होते ज्ञानेन्द्रिय मार्गे | दिसते भासते जरी निरनिराळे | तरी ते सर्वही एकाच दिव्य_शक्तिचे | तत्क्षणिक वास्तव्य तसतसे आहे (२.३.५७)</div><div><br /></div><div>ज्याला मुळिच नाही आदि, मध्य, अंत | सदैवच वसते ते वास्तव्य अविरत | त्यालाच गणेश, गुणेश आदि नामे स्मरत | काल घालवावा स्वानन्दी सुखाने (२.३.५८)</div><div><br /></div><div>सात्विक, राजसिक. तामसिक प्रवृत्ती | ओळखोनि त्यान्चे निरोधन करोनि | सात्विक संवर्धुनी, तामसिक घटवुनी | सद्बुद्धि_योग हा सतत आचरावा (२.३.५९)</div><div><br /></div><div>कायिक, वाचिक, मानसिक तपाचरणे | सर्वही करणे सात्विक वृत्ति नीतिने | सत्पात्री दान_धर्म, अतिथि सत्पूजणे | युक्ताचार, युक्ताहार, संयुक्तिक योग हा (२.३.६०)</div><div><br /></div><div>स्वधर्म, स्वभाव, वय, आरोग्य_स्थिती | आजार, उपचार सल्ला जो वैद्यकी | सांभाळुनि हे सर्व, पावित्र्य सुसंगती | आचरण शारीरिक, मानसि भक्ती_रती (२.३.६१)</div><div><br /></div><div>गणेश_गीतेतील ज्ञानाचा भावार्थ | अति_संक्षिप्तसा वर्णियेला येथ | गणेश_तत्वाशी घालणे सांगड | गणेश_योग 'सालोक्यता' तीच जाणावी (२.३.६२)</div><div><br /></div><div>जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी | सजीवी, निर्जीवी, व्यक्ती, अव्यक्ती | अणू रेणूतुनी, अंडी, पिण्डी, ब्रह्माण्डी | जे जे घडे ते सर्व नियमानुसार (२.३.६३)</div><div><br /></div><div>या सर्व नियमान्चा प्राकृतिक जाणता | नियमानुसारच गणन गणितांचा कर्ता | ज्ञात्या, करवित्या अस्तित्वाला | गणेश वा गणपति हे नामाभिधान (२.३.६४)</div><div><br /></div><div>वेदोपनिषदिक वाङ्मय कर्त्यान्नी | नामाभिधाने ही जी जी दिधली | शब्दार्थ, व्याकरण त्यांचे समजुनी | घेतल्यासच समजेल ही तात्विक चर्चा (२.३.६५)</div><div><br /></div><div>या चर्चा वा वाद_विवादा | रुक्ष, किचकट, अवघड, अरुचिकरा | स्मृति_सुलभ, रुचकर, आकर्षक बनविण्या | सांकेतिक कथानके रचली कवीन्नी (२.३.६६)</div><div><br /></div><div>व्यास, वाल्मिकी हे त्यांत प्रमुख | जैमिनी, वैशंपायन वगैरे शिष्य | वाङ्मयी यज्ञ_याग रूपी सत्कार्य | करिते जाहले जन कल्याणासाठी (२.३.६७)</div><div><br /></div><div>त्यांचे उपलब्ध ग्रंथ वाचण्यासाठी | ज्या भाविकांना सवड पुरेशी नाही | त्यांना संक्षिप्तात सुलभ भाषेतली | कृती ही सहाय्यक बनू दे देवा (२.३.६८)</div><div><br /></div><div>ऐशी प्रार्थना गणेशाचे चरणी | करुनिया थांबवितो माझी ही लेखणी | गणेशेच प्रेरुनी माझी कुडी बुद्धी | कार्य हे संपन्न केले आज || (२.३.६९)</div><div><br /></div><div>शालिवाहन शके एकोणिसशे त्रेचाळिसी | 'प्लव' नाम संवत्सरी | भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिनी | गणेश कृपेने कार्यसिद्धि झाली || (२.३.७०)</div><div><br /></div><div><br /></div><div>|| इति भावार्थानुवादित (अति संक्षिप्त) श्रीगणेश_पुराणे, द्वितीय क्रीडा खण्डे, सोमकांत भृगु संवादे पार्वति_पुत्र, वरेण्य_निधान, वत्सला_नंदन गजानन अवतार चरित्रं नाम तृतीयोध्याय: ||</div><div><br /></div><div>----------------------- =============== ------------------------</div></div>Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com0