<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-20484515</id><updated>2012-02-20T04:20:36.047-08:00</updated><category term='Festival'/><title type='text'>Anandghan</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><link rel='next' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default?start-index=101&amp;max-results=100'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>754</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-970209129892816405</id><published>2012-02-16T01:32:00.000-08:00</published><updated>2012-02-16T01:32:48.050-08:00</updated><title type='text'>माधवन नायर</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-zwCKkVjXsj4/TzzNIKlPO_I/AAAAAAAABNs/oLPW5brfY1M/s1600/APJwithNair.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-zwCKkVjXsj4/TzzNIKlPO_I/AAAAAAAABNs/oLPW5brfY1M/s1600/APJwithNair.jpg" yda="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;दुसरे महायुध्द चालले असतांना मुंबईच्या रक्षणासाठी किंवा इथे बंडाळी झाली तर ती मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने फौजेच्या काही तुकड्या तैनात केल्या होत्या आणि त्यांच्या राहण्यासाठी राहुट्या बांधल्या होत्या. बांद्र्याच्या बँडस्टँडजवळ अरबी समुद्रात घुसलेल्या जमीनीच्या एका लहानशा सुळक्यावर अशीच एक तात्पुरती छावणी उभारली होती. युध्द संपल्यानंतरही त्या झोपड्या (निसान हट्स) रिकाम्या पडलेल्या होत्या. अणुशक्ती विभागात प्रशिक्षण घेण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यात केली गेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रशिक्षण प्रशालेमध्ये (ट्रेनिंग स्कूल) माझी निवड झाल्यावर मीही तिथे रहायला गेलो. आमच्या बॅचमध्ये काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते आसामपर्यंत पसरलेल्या भारताच्या सर्व भागांमधून मुले आली होती. हजर होऊन नेमणूक पत्र आणि प्रमाणपत्रे वगैरे दाखवली की लगेच खोलीचा क्रमांक मिळत असे. ते आधीपासून ठरवले होते की क्रमानुसार जो जो येत गेला त्याला त्याला देत होते वगैरेची काही चौकशी न करता मिळालेल्या खोलीत मी जाऊन आपले सामान ठेवले. माझा सहरहिवासी (रूममेट) बंगाली होता. आजूबाजूच्या इतर खोल्यांमधूनसुध्दा निरनिराळ्या राज्यातून आलेल्या आणि निरनिराळ्या भाषा बोलणा-या मुलांच्याच जोड्या तयार झाल्या होत्या. मात्र आमच्या शेजारच्या एका खोलीत दोन्ही केरळीय मुले होती. ती थेट केरळपासून एकमेकांसोबत येऊन एकत्रच दाखल झाल्यामुळे आपोआप एका खोलीत आली होती की त्यांनी त्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले होते कोण जाणे. त्या काळातले आमचे प्राचार्य केरळीय होते आणि त्या काळात मुंबईत सगळीकडेच मोठ्या संख्येने मल्याळी स्टेनो असायचे, तसे ते ट्रेनिंग स्कूलमध्येही असावेत. त्यामुळे कदाचित त्यांची मदत झाली असेल असे बोलले जात होते. &lt;br /&gt;मराठी आणि कानडी या दोन भाषा मी लहानपणी घरातच शिकलो होतो, शालेय शिक्षणात हिंदी व इंग्रजी आल्या, सायन्स कॉलेजात असतांना मुख्यत्वे गुजराथी भाषिकांचा भरणा असलेल्या हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे ती भाषा अवगत झाली होती. इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये काही पंजाबी मुले होती, काही तामीळ किंवा तेलुगूभाषीसुध्दा होती. सत्यजित रे, मृणाल सेन वगैरेंचे बंगाली सिनेमे पाहणे ही त्या काळातली फॅशन असल्यामुळे त्या भाषेतले शब्द कानावर पडत होते. या सगळ्या भाषा समजत नसल्या तरी मला त्या ओळखता येत होत्या. मल्याळी भाषा मात्र मी पहिल्यांदा ऐकत होतो. आमच्या केरळी शेजा-यांकडे नेहमी त्यांचे आणखी काही मित्र येत आणि त्यांचे वाद, विवाद, संवाद वगैरे जोरजोराने चालत असे. लयबद्ध आणि सुरांना हेलकावे देत बोलली जाणारी ही भाषा ऐकायला मजेदार वाटत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या दोघांपैकी उन्नीकृष्णकार्ता मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या म्हणजे माझ्याच वर्गात होता आणि दुसरा माधवन नायर इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये होता. दोन्ही वर्गांना काही समाईक विषय होते, त्या क्लासला आम्ही एकत्र बसत असू. त्या काळात भारतात फारशी कारखानदारी नसल्यामुळे इंजिनियरांना कमी मागणी होती. परदेशी जाणे फार कठीण होते. अणुशक्तीखात्याचे जबरदस्त आकर्षण असल्यामुळे हजारोंनी अर्ज येत असत. त्यांच्यामधून निवडले गेलेले आमचे बहुतेक सगळेच ट्रेनी ए प्लस दर्जाचे होते. तरीसुध्दा प्रशिक्षण सुरू असतांना दर आठवड्यात होणा-या परीक्षांमध्ये त्यांना मिळणा-या मार्कांत खूप तफावत दिसत असे. फारच कमी गुण मिळवणा-या मुलांना एकादी ताकीद देऊन काढून टाकले जात असे. काही मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असे किंवा ही नोकरी करण्याची इच्छा नसे. बाँडमधून सुटका करून घेण्यासाठी अशी मुले मुद्दाम नापास होत असत. उन्नी आणि नायर हे दोघेही टॉप रँकिंगमध्येही येत नसत किंवा तळाशी जात नसत. वर्गाच्या सरासरीच्या जवळपास असत. ते दोघेही बोलण्यात स्मार्ट होते, पण अभ्यासावर फार जास्त मेहनत करण्याची त्यांना गरज वाटत नसावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ट्रेनिंग संपल्यावर प्रशिक्षणार्थींनी नियुक्तीसाठी विभाग निवडायचा असे आणि गुणवत्तेनुसार जो उपलब्ध असेल तो दिला जात असे. त्या वेळी तारापूर आणि रावतभाटा येथे अणुऊर्जाकेंद्रांच्या उभारणीचे काम सुरू झाले होते आणि त्यांचे बरेचसे काम मुंबईच्या हेडऑफीसमधून केले जात असे. प्रकल्पाच्या जागी किंवा मुख्य कार्यालयात नेमणूक होण्याची प्रत्येकाला इच्छा असे. थुंबा इक्विटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन नावाची अणुशक्ती खात्याची एक लहानशी शाखा केरळमधील थुंबा नावाच्या गावात स्थापन होत होती. तिथे नेमके काय काम आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. टेलीव्हिजन नसल्यामुळे वर्तमानपत्रे हाच माहिती मिळण्याचा एकमेव स्त्रोत होता आणि अग्निबाण, कृत्रिम उपग्रह वगैरेबद्दल कोणालाच विशेष माहिती नव्हती. अमेरिका, रशीया वगैरे देशातच असले काही काम चालते असे कधीतरी छापून आले तर आले. भारताकडे असल्या गोष्टी नव्हत्या. गरम वायूने भरलेले फुगे आभाळात उडवून विरळ वातावरणाचा अभ्यास करणे अशा प्रकारचे संशोधन त्या काळी थुंबा येथे चालते असे ऐकीवात होते. त्यामुळे कोणताही इंजिनियर तिथे जाण्यासाठी उत्सुक नव्हता. आमच्या केरळी मित्रांना काही खास माहिती समजली होती का हे माहीत नाही, पण घराशेजारी राहता येईल या उद्देशाने त्यांनी तिथे पोस्टिंग मागून घेतले. त्या काळात कोकण रेल्वे नव्हती आणि मुंबईहून केरळला जाणारी थेट रेल्वे गाडीसुध्दा नव्हती. मद्रास (चेन्नाई) मार्गे जावे लागत असे आणि चांगले दोन तीन दिवस प्रवासात जात. त्यामुळे त्यांना नोकरीसाठीच केरळला जाण्याचे किती आकर्षण वाटत असेल हे समजण्यासारखे होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतरच्या काळात परिस्थिती आश्चर्यकारक झपाट्याने बदलत गेली. भारत सरकारचा स्वतंत्र अवकाश विभाग (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) स्थापन झाला. स्पेस कमिशन अस्तित्वात आले आणि प्रचंड वेगाने त्याचा विस्तार झाला. माझे दोन्ही मित्र त्या विभागातल्या पहिल्या वहिल्या मोजक्या अधिकारीवर्गात असल्यामुळे जसजसा त्यांच्या खात्याचा विस्तार होत गेला तसतशी त्यांना एकाहून एक चांगली अधिकारीपदे मिळत गेली. अणुशक्ती खात्यात आम्ही रुजू होण्यापूर्वीच हजारावर माणसे होती. आम्हाला त्यांच्या मागेमागे राहूनच प्रवास करायचा होता. त्यांच्यातले जे लोक होमी भाभांच्या काळापासून होते त्यांचीसुध्दा अशीच झपाट्याने प्रगती होत गेली होती असे फक्त ऐकले होते. आम्हाला ती संधी मिळण्याची शक्यता नव्हती. तिकडे विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांच्या अधिपत्याखाली नव्या अवकाश विभागाचा पाया घातला गेला आणि अब्दुल कलामसारख्यांचे सारथ्य मिळाल्यावर त्या इवल्याशा रोपाचा वेलू गगनावरी गेला. त्याबरोबर त्या वृक्षांच्या शीर्षस्थानावर असलेल्या व्यक्तींची उंची देखील वाढत गेली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;डिपार्टमेंट ऑफ स्पेस निराळे झाल्यानंतर आमचा त्याच्याशी कसलाही संपर्क राहिला नाही आणि तिकडे काय चालले आहे याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. आमची नोकरी सुरू झाल्यानंतर पंधरासोळा वर्षांनी तिस-याच एका कारखान्यात अचानकपणे उन्नीकृष्णकार्ता भेटला. त्या वेळी मी माझ्या तिस-या बढतीची अजून अपेक्षा करत होतो. उन्नी आणि माधवन दोघांनाही चार चार प्रमोशन्स मिळून गेल्याचे त्याच्याकडून कळले आणि चाटच पडलो. माधवन तर एका संस्थेचा डायरेक्टर झाला होता असे त्याच्याकडून समजले. त्यांच्या प्रगतीच्या मार्गात तेच सर्वात पुढे असल्यामुळे जितक्या वेगाने त्यांना धावणे शक्य होते त्यानुसार तिचा वेग त्यांनीच ठरवायचा होता. या बाबतीत माधवनने आघाडी घेतली आणि सातत्याने ती सांभाळली. इस्रो आणि स्पेस कमिशनच्या अध्यक्षपदापर्यंत तो जाऊन पोचला आणि पद्मविभूषण पुरस्काराचा सन्मानही त्याला मिळाला. प्रशिक्षणाच्या काळात आमच्या शेजारच्या झोपडीत रहात असलेला हा आमच्यातलाच काहीसा अबोल आणि सामान्य वाटणारा मुलगा पुढे इतकी उंच भरारी घेणार आहे असे तेंव्हा कोणालाही वाटले नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माधवन स्पेस कमिशनचा अध्यक्ष असतांनाच चंद्रयानाचे यशस्वी उड्डाण झाल्याने तो प्रखर अशा प्रकाशाच्या झोतात आला. त्याच्या सचित्र मुलाखती वर्तमानपत्रात आणि टेलीव्हिजनवर झळकू लागल्या. इतर व्हीआयपीजप्रमाणे तोसुध्दा जागोजागी व्याख्याने देऊ लागला, बक्षिससमारंभांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून दिसू लागला. त्याचा उल्लेख ज्येष्ठ शास्त्रज्ञ असा होऊ लागला. हे वाचतांना गंमत वाटत असे आणि अभिमानसुध्दा वाटत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही दिवसांपूर्वी त्याचाही उल्लेख एका घोटाळ्याच्या संदर्भात आला. मग त्यावर त्याची आणि त्याच्यावर आरोप करणा-याची प्रतिक्रिया आली. त्या घोटाळ्याचे स्वरूप नीटपणे समजलेही नाही. त्यात अनियमितता दिसत असली तरी त्यामुळे कोणाला किती लाभ झाला असे काही छापून आले नाही. एका कंपनीबरोबर काही करार झाला होता, पण त्याची अंमलबजावणी न होताच तो रद्दबातल करण्यात आला असे काहीसे झाले असावे. स्पेस कमिशनच्या कारभारात सरकारी लाल फितीला अर्धचंद्र दिला आहे, निर्णयाची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक केली आहे असे ऐकले होते. त्यांचे उदाहरण इतरांना दिले जात होते. त्या फास्ट ट्रॅक प्रक्रियेमध्ये कदाचित काही रूढ पध्दतींना फाटा दिला असेल आणि हेच नडले असेल अशीही शक्यता आहे. याबद्दल कसलीच माहिती नसल्यामुळे तर्क करण्यात अर्थ नाही. पण माधवनचा वर वर जात असलेला पतंग एका झटक्यात खाली कोसळला याचे वाईट वाटले. सरकारी कारभाराबद्दल तितकेसे चांगले जनमत नसले तरी अवकाश खात्याची प्रतिमा उज्ज्वल होती, ती मलीन झाल्याचे जास्तच खटकले.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-970209129892816405?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/970209129892816405/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=970209129892816405' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/970209129892816405'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/970209129892816405'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2012/02/blog-post_16.html' title='माधवन नायर'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-zwCKkVjXsj4/TzzNIKlPO_I/AAAAAAAABNs/oLPW5brfY1M/s72-c/APJwithNair.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-2028865307188016603</id><published>2012-02-13T00:53:00.000-08:00</published><updated>2012-02-13T00:53:37.740-08:00</updated><title type='text'>तेथे कर माझे जुळती - ९ श्री.दा.रा.खडके</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;एकोणीसशे सत्तरच्या सुमाराला देवनारजवळ अणुशक्तीनगर या वसाहतीची उभारणी सुरू झाली, तसेच मुंबई दूरदर्शनच्या प्रसारणाला सुरुवात झाली आणि अस्मादिकांचे शुभमंगल झाले. माझ्या जीवनावर सखोल प्रभाव करणा-या या तीन्ही गोष्टींचा एकमेकींशी काहीही संबंध नसला तरी त्यांचे जे एकत्रित चांगले परिणाम झाले त्यातूनच श्री.डी.आर.खडके या अफलातून गृहस्थाशी माझा परिचय झाला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ख्याल गायकीची विलंबित लयीमधील आलापांमधून होणारी सुरुवात नवख्यांसाठी कंटाळवाणी असते. त्यामुळे लग्नाच्या आधी मी सहसा त्या संगीताच्या वाटेला जात नसे. पण अलकाला संगीताची उपजतच विलक्षण आवड असल्यामुळे तिला शास्त्रीय संगीताचे जबरदस्त आकर्षण वाटते. मुंबई दूरदर्शनाच्या सुरुवातीच्या काळात पं.विजय राघव राव आणि सुहासिनी मुळगावकर हे निर्माते शास्त्रीय संगीताचे उत्तमोत्तम कार्यक्रम अत्यंत मनोरंजक पध्दतीने सादर करीत असत. ते सारे कार्यक्रम अलका न चुकता आणि तल्लीन होऊन पहात असे. त्यामुळे मलासुध्दा सूर, ताल, लय, राग वगैरेंची थोडी समज आली आणि शास्त्रीय संगीत ऐकण्यात गोडी निर्माण झाली. अणुशक्तीनगरमध्ये आम्ही रहायला गेलो त्या काळात के.एस.सोनी नावाचे एक सद्गृहस्थ तिथे रहात होते. त्यांनी स्वतःला शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला वाहून घेतले होते. त्यात रुचि असणा-या लोकांना त्यांनी घरोघरी जाऊन शोधून काढले आणि त्यांना एकत्र आणून स्वरमंडल नावाची सार्वजनिक संस्था सुरू केली. थोडासा निधी गोळा करून आधी स्वतःच्या घरी आणि नंतर शाळेच्या हॉलमध्ये उदयोन्मुख गायक वादकांचे कार्यक्रम ठेवले. प्रतिष्ठित मंडळींना या कार्यक्रमाला आमंत्रित केले. एक उत्साही तरुण कार्यकर्ता म्हणून मी ही संगीताव्यतिरिक्त इतर किरकोळ कामे करून त्यात सहभाग घेत असे. अशाच एका कार्यक्रमात श्री.खडके हे सन्मान्य अतिथी म्हणून आले असतांना माझी त्यांच्याशी भेट झाली. ते एक रिटायर झालेले सी.आय.डी.चे मोठे अधिकारी आहेत आणि आता संगीताच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे एवढेच तेंव्हा समजले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या काळातले नाट्यसंगीतामधले सुपरस्टार श्री.रामदास कामत हे सुध्दा पोलिस अधिकारी असल्याचे ऐकले होते. रंगभूमीवर मत्स्यगंधेला "नको विसरू संकेत मीलनाचा" असे म्हणत तिची आर्जवे करणे आणि "रेडच्या टायमाला फोर्स घेऊन तिथं पोचायचंच" असे हाताखालच्या अधिका-याला दरडावून सांगणे या दोन्ही गोष्टी ते करत असत. श्री.खडके यांचे नाव मात्र मी संगीत किंवा नाटकाच्या कार्यक्रमात किंवा टीव्हीवर कुठेच ऐकले नव्हते. कॉलेजचे शिक्षण घेत असतांना त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता, पण पोलिसखात्यात रुजू झाल्यानंतर सर्व लक्ष तिकडेच पुरवले. अनेक उत्तमोत्तम कामगि-या यशस्वी रीतीने बजावून पदोन्नती तसेच पदके मिळवली. त्यात इंडियन पोलिस पदक आणि राष्ट्रपती पदक यांचा समावेश आहे. खुद्द माननीय यशवंतराव चव्हाण आणि&amp;nbsp;इंदिरा गांधी&amp;nbsp; यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.&lt;br /&gt;नोकरीच्या काळात संगीताची श्रवणभक्तीच करणे त्यांना शक्य होते, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सारी कसर भरून काढली. पं.वामनराव सडोलीकर या जयपूर घराण्याच्या सुप्रसिध्द गायकांचे शिष्य होऊन बावीस वर्षे त्यांचे मार्गदर्शन घेतले. शंभर दीडशे श्रोत्यांसमोर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे सादर केला. पण गायक म्हणून मैफल गाजवणे हा त्यांचा उद्देश नव्हताच. शास्त्रीय संगीताचा स्वर्गीय आनंद स्वतः मिळवणे आणि अधिकाधिक लोकांना तो मिळवून देणे हे त्यांनी आपले जीवितकार्य ठरवले होते. चेंबूर येथील त्यांच्या राहत्या घराचा दिवाणखाना त्यांनी या कामासाठी उपयोगाला दिला. दर बुधवारी संध्याकाळी तिथे एक बैठक होत असे. कोणत्याही गायक किंवा वादकाने यावे आणि आपला कार्यक्रम त्यात सादर करावा अशी मुभा होती. असंख्य नवोदित कलाकारांना यामुळे एक मंच मिळाला. त्याशिवाय दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एकाद्या मुरलेल्या कलाकाराला ते आमंत्रित करत असत आणि त्यांच्या गायन वादनाचा आस्वाद रसिक श्रोत्यांना घेता येत असे. हे सर्व पूर्णपणे निःशुल्क असे. कलाकाराला किंवा श्रोत्याला त्यासाठी मूल्य देण्याची आवश्यकता नसे. &lt;br /&gt;जयपूर अत्रौली घराण्याचे मूळ पुरुष पै.अल्लादियाखाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्य एक संगीत सभा भरवण्याचे खडके काकांनी १९७६ साली ठरवले आणि आतापर्यंत ३६ वर्षे हा उत्सव चालवला. सुरुवातीच्या काळात पं.वामनराव सडोलीकर आणि त्यांच्या कन्यका श्रुति यांच्या मुख्य आधारावर हा कार्यक्रम चालत असे. खडके काका दरवाज्यापाशी एका खुर्चीत बसून येणा-यांचे आगत स्वागत करताहेत आणि मंचावरील सर्व व्यवस्था, आयोजन, निवेदन वगैरे बाजू श्रुति समर्थपणे सांभाळते आहे असेच चित्र अनेक वर्षे मी पहात होतो. स्व.वामनराव आणि श्रुति यांचे गायन हा या उत्सवातला एक परमोच्च बिंदू असे. पुढे श्रुति सडोलीकर काटकर हिने संगीताच्या क्षेत्रात स्वतःचे असे खास आणि उच्च स्थान निर्माण केल्यानंतर तिला इतर कामांसाठी वेळ मिळणे कठीण होत गेले असणार. हळूहळू ती अदृष्य होत गेली. चेंबूर येथील बालविकास संघाच्या हॉलमध्ये गुढी पाडवा किंवा गुड फ्रायडे या सुमारास हा कार्यक्रम होत आला आहे. पहिली कित्येक वर्षे तो सलग चोवीस तास चालायचा. त्यामुळे दिवसाच्या आठही प्रहरांमधील रागांचा समावेश त्यात होत असे. कालांतराने सरकारी नियमांप्रमाणे तो वेळेत संपवणे आवश्यक झाले. हल्ली तो तीन दिवस संध्याकाळी आणि अखेरच्या (रविवारच्या) दिवशी सकाळी असा चार दिवस असतो. स्व.भीमसेन जोशी, स्व.कुमार गंधर्व, स्व.मल्लिकार्जुन मनसूर, स्व.गंगूबाई हंगल, पं.जसराज, श्रीमती किशोरी आमोणकर, श्री.यशवंत देव यासारख्या बहुतेक सर्व आजी माजी मोठ्या कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. हा कार्यक्रमसुध्दा विनामूल्य असतो. श्रोत्यांनी स्वेच्छा दिलेल्या देणग्या स्वीकारण्याची व्यवस्था असते. त्यातूनच पुरेसा निधी बहुधा जमत असावा. या समारंभातले कार्यक्रम इतक्या उच्च दर्जाचे असतात की ते ऐकल्यानंतर कोणाचाही हात खिशात जावा आणि सढळ हाताने देणगी दिली जावी असे होते. ज्या मोठ्या नामवंत कलाकारांना टाटा थिएटर किंवा नेहरू सेंटरसारख्या ठिकाणी खूप दुरून पहावे लागत असे अशा दिग्गजांच्या अगदी पुढ्यात बसून त्यांचे गायन ऐकण्याची संधी या महोत्सवात मिळाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दर वर्षी होणा-या अल्लादियाखाँ संगीत समारोहामध्ये श्री.खडके यांचे थोडा वेळ भाषण असे. श्रेष्ट भारतीय संगीत, महान संगीतकार, त्यांचे गुरू, कार्यक्रमात भाग घेणारे कलाकार, रसिक श्रोते वगैरेंचे गुणगान करून झाल्यानंतर ते आपले मनोगत व्यक्त करत असत. आता आपले वय झाल्यामुळे तरुण लोकांनी पुढे येऊन या कार्यक्रमाची धुरा सांभाळावी असे आवाहन त्यात असे. हे मी निदान वीस पंचवीस वर्षांपासून ऐकत आलो आहे. पण त्या काळापासूनसुध्दा सगळे तत्कालीन तरुण लोक आपल्या उदरनिर्वाहाच्या कामातच इतके गुरफटलेले असायचे की त्यांच्या प्रापंचिक कामासाठीसुध्दा वेळ काढणे त्यांना कठीण व्हायचे. उतार वयाकडे झुकलेले अनेक लोक सहाय्य करतांना दिसत, पण ते दीर्घ काळ टिकत नसावेत. खडके काकांच्या अपेक्षांची पूर्ती करणे सोपे नसणार. या समारोहाची कायम स्वरूपाची काही व्यवस्था खडके काका करू शकले की नाही याबद्दल संदिग्धताच राहिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांनी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केली त्यावेळी त्यांचा सातारा या त्यांच्या गावी जाहीर सत्कार केला गेला होता, त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी त्यांच्या लहानपणात घडलेल्या अनेक गोष्टींबद्दल सविस्तर सांगितले होते. अखेरपर्यंत त्यांची स्मरणशक्ती चांगली होती. नोकरी आणि कार्य या निमित्याने असंख्य माणसे त्यांच्या सहवासात आली असतील. तरीही समोरच्या माणसाची ओळख पटताच ते त्याच्याशी सुसंगत असे बोलत असत. काही महिन्यांपूर्वीच माझ्या एका मित्राच्या घरी झालेल्या संगीताच्या बैठकीला ते आले होते. वयोमानानुसार आलेला अशक्तपणा आणि मंद झालेली दृष्टी यामुळे कोणाच्या आधाराची शारीरीक गरज त्यांना भासत होती, पण त्या जोरावर ते हिंडत फिरत होते, तसेच सर्वांबरोबर बोलत होते. मागल्या वर्षीपर्यंत ते अल्लादियाखाँ पुण्यतिथी समारंभात उपस्थित होऊन शक्य तेवढा सहभाग घेतच होते. त्यामुळे ते शऱदांचे शतक झळकवणार असे वाटले होते. पण तसे झाले नाही. ते आम्हाला सोडून गेल्याची बातमी अचानक येऊन थडकली. त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-2028865307188016603?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/2028865307188016603/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=2028865307188016603' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/2028865307188016603'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/2028865307188016603'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2012/02/blog-post_13.html' title='तेथे कर माझे जुळती - ९ श्री.दा.रा.खडके'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-2956452229453520793</id><published>2012-02-02T01:19:00.000-08:00</published><updated>2012-02-02T01:19:06.372-08:00</updated><title type='text'>मदत</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;आजकाल आपण आपली बहुतेक सगळी महत्वाची कामे कोणा ना कोणाच्या सहाय्याने करत असतो. इतर लोकांनी त्यांची स्वतःची गरज, कर्तव्य किंवा त्यांना मिळणारा लाभ वगैरे गोष्टी पाहून आपल्याला सहाय्य करणे काही वेळा अपेक्षितच असते, त्यामुळे त्याचे विशेष वाटतही नाही. आधी आवळा देऊन पुढे कोहळा काढायचा किंवा परोपकार करून पुण्यसंचय आणि पापक्षालन करायचा हेतू काही लोकांच्या मनात असतो. कोणालाही मदत करतांना त्या माणसाचा आपल्याला काही उपयोग आहे का असा विचार बहुतेक लोक करतात. तशा प्रकारे केलेली मदत ही एका प्रकारची गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) असते, त्यातून पुढे मागे काही फायदा मिळण्याची शक्यता असते. एकाद्या माणसाने केलेल्या मदतीची लगेच दुस-या रूपात परतफेड मागितली तर तो सौदा ठरतो. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन निव्वळ माणुसकीच्य़ा भावनेनेसुध्दा इतरांना मदत करणारेसुध्दा अनेक लोक आढळतात. किंबहुना सगळेच लोक ते करत असतात. आपण दुस-याला मदत केली, तर तो तिस-याला, तो चौथ्याला अशी साखळी निर्माण होऊन एक चांगले सामाजिक वातावरण निर्माण होते आणि वेळप्रसंगी त्याचा आपल्यालासुध्दा फायदा होतो अशी मनोधारणा त्याच्या मागे असते. हे माणसांच्या अंतःप्रेरणेमधून घडते की त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे याबद्दल नक्की सांगता येणार नाही. पण त्यामुळे त्यांना जमेल तेवढे ते दुस-यांच्यासाठी करत असतात. सहाय्य किंवा मदत या शब्दांचा आर्थिक आधार असा संकुचित अर्थ यात अभिप्रेत नाही. इतर अगणित प्रकारे आपण इतरांच्या उपयोगी पडू शकतो आणि पडतही असतो. दुस-याच्या कामाला हातभार लावणे, त्याला आवश्यक किंवा महत्वाची माहिती देणे, न समजलेले समजावून सांगणे वगैरेंपासून त्याला फक्त सोबत करणे किंवा त्याचे बोलणे ऐकून घेऊन त्याला आपले मन मोकळे करून देणे अशासारख्या लहान लहान गोष्टींची त्याला मदत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;व्यक्तीगत जीवन आणि व्यावसायिक जीवन यांना वेगळे ठेवावे आणि एकाचा उपसर्ग दुस-याला होऊ देवू नये असे बिझिनेस स्कूल्समध्ये शिकवले जाते. आपली व्यक्तीगत सुखदुःखे, राग, लोभ, चिंता वगैरेंचा परिणाम व्यावसायिक जीवनात घेतल्या जाणा-या निर्णयांवर होता कामा नये आणि ते घेतांना दया-माया, प्रेम-द्वेष वगैरेंना थारा न देता वस्तुनिष्ट विचार करायचा असतो. अर्थातच कामाच्या निमित्याने भेटणा-या माणसांशी कामापुरतेच संबंध ठेवायचे असतात. त्यांच्यात गुंतायचे नसते. पण प्रत्यक्षात मनाचे दरवाजे असे पाहिजे तेंव्हा उघडता किंवा मिटता येत नाहीत. निदान मला तरी तसे जमले नाही. ऑफीसात इतर चकाट्या पिटायच्या नाहीत हे पथ्य जरी मी कसोशीने पाळायचा प्रयत्न केला असला तरी न बोलून दाखवता सुध्दा आपुलकीचे बंध निर्माण होतच राहिले आणि निरोपसमारंभाच्या भाषणानंतर ते काही एकदम तुटले नाहीत. पूर्वी रोज भेटणारी माणसे भेटण्याची जागाच त्यानंतर राहिली नाही आणि एकंदरीतच त्यांच्या भेटीगाठी कमी कमी होत गेल्या, तसतसे ते बंध विरत गेले. माझ्या आधीपासून ऑफीसात असलेले ज्येष्ठ सहकारी तर आधीच सेवा निवृत्त झाले होते, माझ्या बरोबरीचे तसेच कनिष्ठ सहकारीसुध्दा एक एक करून निवृत्त झाले. माझ्याबरोबर प्रत्यक्ष काम करणारे कोणीच शिल्लक उरले नव्हते. त्यांच्या पुढच्या पिढीकडे सारी सूत्रे गेली होती आणि माझा त्यांच्याशी कधीच थेट संपर्क जुळला नव्हता. आमच्या बरोबर एका वसाहतीमध्ये राहणारे लोक पांगत गेले होते, कोणी दूरच्या उपनगरात रहायला गेले, कोणी परगावी किंवा परदेशी गेले आणि काही परलोकवासी झाले. टेलीफोन आणि इंटरनेटमुळे संपर्क साधणे शक्य असूनसुध्दा सगळेच जण संपर्कात राहिले नाहीत. जे ऑफीसात होत होते तेच काही प्रमाणात व्यक्तीगत जीवनातसुध्दा घडत गेले. मागली पिढी काळाआड गेली, पुढच्या पिढीमधील अनेक मंडळी परप्रांतात किंवा परदेशात चालली गेली आणि मुंबईत राहणा-या निकटच्या आप्तांची संख्या रोडावत गेली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मागच्या आठवड्यात अलकाला बरे वाटत नव्हते म्हणून आमच्या इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात घेऊन गेलो. काही तपासणी करून झाल्यावर तिला उपचारासाठी अतिदक्षताविभागात (आयसीयू मध्ये) दाखल करावे लागले. पूर्वी केलेल्या काही चांचण्यांचे रिपोर्ट्स डॉक्टरांना हवे होते, पण ते घरी ठेवलेले होते. घरी जाऊन ते घेऊन येण्यासाठी निदान दोन तास वेळ लागला असता, पण आयसीयू मध्ये पेशंट असला तर त्याच्या जवळच्या आप्ताने बाहेर थांबणेही आवश्यक असते. या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालायचा? आमच्या घरात त्यावेळी तिसरे कोणी नव्हतेच. बोलावल्याबरोबर पटकन येऊ शकेल असे जवळ राहणारेही कोणी नव्हते. त्यामुळे जवळ राहणा-या अलकाच्या दोन मैत्रिणींना विचारले. त्या तयार झाल्या आणि त्यातली एक लगेच धावत आली. तिच्याशी बोलून मी घरी जायच्या तयारीत होतो, तेवढ्यात दुरूनच मला पाहून एक जुना मित्र प्रसाद तिथे आला. तोसुध्दा नुकताच निवृत्त होऊन खारघरला रहायला गेला होता, शिवाय त्याची नव्वदीला आलेली आई त्याच्याकडे असल्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी तिच्यासोबत राहणे त्याला आवश्यक होते. त्यामुळे इच्छा असूनसुध्दा मला मदत करणे त्या वेळी त्याला शक्य नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"रात्री काय करणार आहेस?" या त्याच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते. दिवसभराच्या दगदगीनंतर मीसुध्दा थकून गेलो होतो आणि रात्रभर थांबून राहण्याएवढे त्राण आणणे मला कठीण होते. पण रिपोर्ट्स आणून दिल्यानंतरच मी त्यासाठी काही करू शकत होतो, ते सुध्दा हॉस्पिटलमध्येच राहून फोनवरच करायला हवे होते, त्यासाठी कोणाला जाऊन प्रत्यक्ष भेटणेही मला शक्य नव्हते. "तोपर्यंत मी थोडे प्रयत्न करतो" असे सांगून प्रसाद त्याच्या घराकडे गेला. तो नुकताच सेवानिवृत्त झालेला असल्यामुळे या वेळी ऑफीसात कोणत्या हुद्द्यावर कोण आहे हे त्याला ठाऊक होते. एक दोघांशी फोनवरच बोलून मला मदत हवी असल्याचे त्याने त्या मित्रांना सांगितले.&lt;br /&gt;रिपोर्ट्स घेऊन मी हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत भरत, जयपाल आणि त्यागी तिथे हजर होते आणि माझी वाट पहात उभे होते. तीघेही मला दहा ते पंधरा वर्षांनी कनिष्ठ असल्यामुळे ते कधीच माझ्या थेट संपर्कात आले नसले तरी कामाची चर्चा करतांना त्यात सहभागी होत होते. तेवढ्या सहवासामध्ये त्यांनी जे काही अनुभवले असेल आणि त्यांच्या वरिष्ठांकडून माझ्याबद्दल जे ऐकले असेल तेवढाच आमच्यातला दुवा होता. पण त्यांनी अत्यंत आपुलकीने अलकाची आणि माझी विचारपूस केली आणि मला स्वतःला विश्रांती घेणेसुध्दा किती आवश्यक आहे हे सांगितले. हॉस्पिटलजवळच वसाहतीत राहणा-या एका आप्तांकडे मी जाऊन झोप घ्यायची आणि भरतच्या खात्यातला कोणी युवक येऊन त्याने रात्रभर माझ्याऐवजी हॉस्पिटलमध्ये राहायचे असे ठरले. अलकाची प्रकृती तशी ठीकच असल्यामुळे रात्री कसली गरज पडायची शक्यता नव्हतीच, पण तशी वेळ आलीच तर हॉस्पिटलमध्ये राहणारा मला लगेच बोलावून आणू शकत होता. भरत आणि त्याच्या साथीदारांनी तिथल्या तिथे एकमेकांशी बोलून नितिनकुमारची निवड केली आणि त्याला बोलावून घेतले. मी सेवा निवृत्त होऊन गेल्यानंतर तो नोकरीला लागला होता. त्यामुळे आम्ही कधी एकमेकांना पाहिलेसुध्दा नव्हते. पण भरतने सांगताच यत्किंचित कुरकुर न करता किंवा आढेवेढे न घेता यावेळी तो माझ्या मदतीला आला. आम्ही दोघांनी एकमेकांचे मोबाईल फोन नंबर घेतले आणि हॉस्पिटलमध्ये भेटायची वेळ ठरवली.&lt;br /&gt;ठरलेल्या वेळी नितिन तयारी करून आला आणि रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसून राहिला. रात्रभर झोप झाल्याने ताजे तवाने होऊन सकाळी मी हॉस्पिटलला गेलो. नितिनचे आभार मानून त्याला मोकळे केले आणि घरी पाठवून दिले. पुढे दिवसभर मी हॉस्पिटलमध्ये राहिलो होतो, पण इतर कोणी कोणी मध्ये येऊन मला सोबत करत किंवा थोडा वेळ सुटी देत राहिले. पुण्याहून उदय यायला निघाला होता, पण त्याला काही अनपेक्षित अडचणी आल्या. तोपर्यंत दुसरी रात्र आली. भरत माझ्या संपर्कात होताच. त्याने दुस-या रात्रीची व्यवस्थासुध्दा केली. नितिनच्याच वयाचा, त्याच्याप्रमाणेच माझी ओळख नसलेला संदीप त्या रात्री आला आणि रात्रभर हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी बसून राहिला. तिसरे दिवशी सकाळी उदय येऊन पोचल्यानंतर आम्हाला बाहेरच्यांच्या मदतीची आवश्यकता उरली नाही.&lt;br /&gt;पण जेंव्हा मला मदतीची आवश्यकता होती आणि ती कोठून मिळेल हे देखील ठाऊक नव्हते, तेंव्हा दोन अनोळखी तरुण पुढे आले आणि कसलाही आविर्भाव न आणता मला हवी असलेली मदत करून गेले हे विशेष! &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-2956452229453520793?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/2956452229453520793/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=2956452229453520793' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/2956452229453520793'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/2956452229453520793'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2012/02/blog-post.html' title='मदत'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-5442448290368538010</id><published>2012-01-22T01:39:00.000-08:00</published><updated>2012-01-22T05:15:46.318-08:00</updated><title type='text'>दिसणे आणि असणे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;"दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं" अशी म्हण आहे. तिचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येत असतो. हे स्वतःचे वेगळे दिसणे कोणी मुद्दाम करत असला तर त्याच्याबद्दल "हत्तीचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात" हे उदाहरण दिले जाते. 'चकाकणारे सगळेच सोने नसते', 'दुरून डोंगर साजिरे' वगैरे म्हणीसुध्दा आहेत. पण 'दिसते तसे नसणे' हे बहुधा अपवादच असतात. बहुतेक वेळा आपली नजर फसत नाही. काही गायी शिंगे मोडून वासरात शिरण्याचा प्रयत्न करतात आणि काही बुढ्ढ्या घोड्या लाल लगाम लावून मिरवतांना पाहून हंसू येते. याचे कारण त्या जशा आहेत त्यांपेक्षा कोणी वेगळे असल्याचा आव आणतात, पण त्यांचा तो प्रयत्न फसतो. त्यामुळे त्या जशा असतात तशाच पाहणा-याला दिसतात. एकंदरीत पाहता बहुतेक वेळा 'चक्षुर्वै सत्यम्' असाच अनुभव येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीकधी दिसणे आणि असणे यात काही विसंगती नसली तरी ते व्यक्त करण्यातून फरक पडतो. दिसणे आणि असणे या दोनच क्रियापदांच्या उपयोगातून कशा वेगळ्या छटा निर्माण होतात याचा एक अनुभव सांगतो. एकदा आमचे घरकाम करणारी एक कामवाली बाई काम सोडून गेली. जातांना तिने तिच्या बदल्यात कोणाला आणूनही दिले नाही. त्यामुळे आमच्या गृहमंत्र्यांनी नवी बाई शोधायची मोहीम सुरू केली. किंबहुना ती मुद्दाम करावी लागली नाही. कामवाल्या बाईशिवाय आपले जीवन कसे असह्य होत चालले आहे हे रोजच्या फोनाफोनीमध्ये मैत्रिणींना सांगताक्षणीच सर्वांनी त्यातून मार्ग काढण्यासाठी हातभार लावला आणि त्यांच्या माहितीमधल्या निरनिराळ्या कामवाल्या बायांना त्या आमच्याकडे पाठवून द्यायल्या लागल्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या उमेदवारांचा एकंदर अवतार आणि त्यांच्या बोलण्यातून जे काही इम्प्रेशन पडेल त्यावरूनच नवी बाई ठरवायची होती. याबद्दलचे सर्वाधिकार सौ.कडेच होते, कारण तिलाच त्या बाईकडून रोज घरकाम करून घ्यायचे होते आणि त्याचा अनुभव होता. त्या बायका भेटायला आल्यावेळी मी घरी असलो तर माझ्या नजरेलाही त्या क्षणभर पडत असत. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त पत्नीचाच आहे असे असले आणि तिला हे माहीत असले तरी ती माझा सल्ला विचारायची. म्हणजे उद्या काही प्रॉब्लेम आला तर मग माझ्यावर त्याची जबाबदारी ढकलणे तिला सोयीचे झाले असते. कोठल्याही बाईबद्दल माझे अगदीच वाईट मत झाले नसेल तर मी आपला गुळमुळीत उत्तर देत असे, "ही तशी बरी दिसते आहे, नाही का?" आपण उगाच तिच्यातले दोष कशाला काढायचे? मला तरी क्षणभरात ते कसे कळणार होते? आणि ते दिसले तरी मला त्याच्याशी काय देणे घेणे आहे? शिवाय दिसणे आणि असणे यात किती तरी फरक असू शकतो. तेंव्हा सावधपणे बोललेले बरे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अहो, असं काय करताय्?, तुम्ही हे पाहिलंत का?, ते पाहिलंत का?" किंवा "नुसती बरी दिसते आहे की चांगली वाटते आहे?" वगैरे प्रश्नांवर मी आपला नंदीबैलासारखी मान हलवीत असे. त्याचा तिला हवा तो अर्थ काढायचे तिला पूर्ण स्वातंत्र्य होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा मात्र "ही बाई बरी दिसते आहे" म्हणण्याऐवजी चुकून मी "ही बाई दिसायला बरी आहे" असे म्हणून गेलो. पुढे काय झाले ते सांगायची गरज आहे का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;'दिसणे' आणि 'असणे' हे दोनच शब्द पण त्याचे अर्थ किती निराळे होतात? पहिल्या उदाहरणातले तिचे 'दिसणे' म्हणजे तिचे 'सभ्य किंवा असभ्य वागणे', 'सरळ किंवा तिरकस बोलणे', 'नीटनेटकेपणा किंवा वेंधळेपणा', 'स्वच्छता किंवा गलिच्छपणा', 'प्रामाणिकपणा' किंवा 'लबाडपणा', 'विनय किंवा ऊर्मटपणा', 'सालस किंवा चवचाल वृत्ती', 'विश्वसनीयता किंवा बिनभरोसा' वगैरे गुणांचा त्यात समावेश होतो. फक्त चेहरा पाहून आणि एकादे वाक्य ऐकून आपल्याला त्यात किती गोष्टी दिसतात? या गुणांमुळे ती आपले घरकाम कसे करेल हे ठरणार होते. त्याच्या पुढे आलेल्या 'आहे' या शब्दाला फक्त व्याकरणापुरताच अर्थ असतो. कदाचित ती जशी दिसते तशी नसण्याची शक्यता त्यात दडली असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुस-या उदाहरणातले 'दिसणे' म्हणजे मात्र फक्त तिचे 'रूप' असाच अर्थ बहुधा काढला जातो. त्याचा घरकामाशी काही संबंध नाही. आणि 'आहे' याचा अर्थ निश्चितपणे 'सकारार्थी' असाच होतो, किंवा तसे माझे मत आहे असे त्यातून दिसते. एकाद्या परस्त्रीबद्दल मी असे उद्गार (पत्नीसमोर) काढणे म्हणजे ते अगदी ताळतंत्र सोडून देणे झाले. त्यातून नको ते अर्थ निघण्याची शक्यता होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तात्पर्य काय तर कोणत्याही भाषेमधल्या सुट्या शब्दांचा अर्थ माहीत असणे पुरेसे नसते, ते शब्द थोडे मागे पुढे झाले तरी कधी कधी संदर्भ बदलतात आणि अर्थाचे अनर्थ होतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-5442448290368538010?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/5442448290368538010/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=5442448290368538010' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/5442448290368538010'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/5442448290368538010'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2012/01/blog-post_22.html' title='दिसणे आणि असणे'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-3172840755380690503</id><published>2012-01-15T05:28:00.000-08:00</published><updated>2012-02-17T05:41:40.035-08:00</updated><title type='text'>मकरसंक्रमण</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-FQNEiGbL7BU/TxLUgQuRWMI/AAAAAAAABNY/07ylGWaf_QU/s1600/SankrantiGreeting.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="180" kba="true" src="http://1.bp.blogspot.com/-FQNEiGbL7BU/TxLUgQuRWMI/AAAAAAAABNY/07ylGWaf_QU/s320/SankrantiGreeting.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;आज मकरसंक्रांत आहे. म्हणजे काय आहे हे सांगणारे लेख बहुतेक वर्तमानपत्रात आले आहेतच. माझ्या लहानपणी आमच्या घरात टिळक पंचांगाचा उपयोग केला जात असे. हे पंचांग वापरणारे फारच थोडे लोक गावात रहात असल्यामुळे ते मुद्दाम पुण्याहून मागवले जात असे. त्या काळात टिळकपंचांगातली संक्रांत दरवर्षी १० जानेवारीला येत असे. वर्षभरातले बाकीचे सारे सण तिथीनुसार येतात आणि दरवर्षी ते वेगळ्या तारखांना येतात, पण ही संक्रांत तेवढी इंग्रजी तारखेनुसार कशी येते याचे आश्चर्य वाटायचेच, शिवाय इतर पंचांगात ती १४ तारखेला येत असतांना टिळक पंचांगात चार दिवस आधी का येते याचे एक वेगळे गूढ वाटत असे. कदाचित देशभक्त टिळकांवर इंग्रजांचा राग असल्यामुळे ते लोक संक्रांतीला त्यांच्याकडे आधीच पाठवत असावेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-kLAXT18EfB4/Tz5ZAYMSwdI/AAAAAAAABN0/6MwxGRMCYxo/s1600/sankrant+vahan.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="221" src="http://1.bp.blogspot.com/-kLAXT18EfB4/Tz5ZAYMSwdI/AAAAAAAABN0/6MwxGRMCYxo/s320/sankrant+vahan.jpg" width="320" yda="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून तिच्या फलाचे वाचन केले जात असे. घरातील सर्वांनी एकत्र बसून ते ऐकण्याची प्रथा होती. गणपतीचे वाहन उंदीर, शंकराचे नंदी याप्रमाणे सर्व देवदेवतांची वाहने ठरलेली आहेत, पण ही संक्रांत मात्र दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असे, शिवाय तिचे एक उपवाहन असे. ती कुठल्यातरी दिशेकडून येत असे आणि कुठल्यातरी दिशेला जात असे. शिवाय तिचे मुख तिसरीकडे असे आणि दृष्टी चौथ्या दिशेला. त्या सर्व दिशांना राहणा-या लोकांना त्यानुसार फळ मिळते अशी धारणा होती. या सर्व दिशा कोणत्या केंद्रबिंदूच्या सापेक्ष आहेत ते दिले नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावायला मोकळा होता. या सगळ्यातून काय अर्थ निघणे अपेक्षित आहे याचा मला आजपर्यंत पत्ता लागलेला नाही. &lt;br /&gt;एकाद्यावर संक्रांत आली म्हणजे त्याचा आता विनाश किंवा निदान नुकसान तरी होणार असे समजले जाते. तिचा स्वभाव विध्वंसक आहे असे यात गृहीत धरले आहे. संक्रांतीची गणना दैत्य, राक्षस, असुर अशा वर्गात होत नाही तरीही असे का असावे कुणास ठाउक. तिला खूष करून आपला बचाव करून घेण्यासाठी तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो की स्वतः बलवान होऊन येऊ घातलेल्या संकटांना सामोरी होण्यासाठी तो खाल्ला जातो हे ही स्पष्ट होत नाही. तिळातली स्निग्धता आणि गुळातला गोडवा यांच्यामुळे तो चविष्ट असतोच, शिवाय त्यात अनेक प्रकारचे शक्तीवर्धक गुण असल्यामुळे तो खाणे हे माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितकारक आहे याचे वर्णन करणारे लेख आता नियतकालिकांमध्ये वाचायला मिळतील. पण असे असेल ते बाराही महिने खायला काय हरकत आहे? थंडीच्या दिवसात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते असे असले तरी निदान महिनाभर आधीपासून थंडी पडायला लागलेली असते तेंव्हापासून तरी खायला सुरू करावे. पुणे मुंबई दरम्यान प्रवास करणारे लोक मात्र वाटेत लोणावळ्याची चिक्की खाऊन वर्षभर संक्रांत साजरी करत असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो. आभाळात सर्वांना दिसणारा सूर्य एकच असतो आणि स्पष्टपणे न दिसणा-या राशीसुध्दा समानच असाव्यात. असे असतांना टिळक पंचांगवाल्यांचा सूर्य चार दिवस आधीच मकरसंक्रमण कसे करत असेल असा प्रश्न मला लहानपणी पडत असे. धनू आणि मकर राशींमधल्या सीमारेषा काही आभाळात कोणी आंखून ठेवलेल्या नाहीत. सूर्य या राशीमधून त्या राशीत गेला ही गोष्ट प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही. काही निरीक्षणे आणि प्रचंड आकडेमोड करून गणिताच्या आधाराने ती ठरवली जाते. गणिताची पध्दत परंपरेनुसार ठरत गेली असल्यामुळे त्यात मतभेद असू शकतात. पूर्वीच्या काळात पंचांग तयार करणा-या ज्या विद्वानांबद्दल आदर वाटत असे किंवा त्यांच्या पध्दतीवर ज्यांचा विश्वास असे त्यानुसार लोक आपापली पंचांगे ठरवत असत. आजच्या राहणीमध्ये या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.&lt;br /&gt;मकरसंक्रांतीच्या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते असे सांगितले जाते. हजार वर्षांपूर्वी कदाचित तसे होत असेल. मकरसंक्रांत माझ्या बालपणी इतर पंचांगांमध्ये १४ जानेवारीला येत असे, हल्ली १५ जानेवारीला येते. याचा अर्थ तिची तारीख हळू हळू पुढे जात आहे. मागे मागे गेल्यास कधी तरी ती २१ - २२ डिसेंबरला येत असावी. ग्रेगोरियन कँलेंडरमध्ये वेळोवेळी सुधारणा केली गेली असल्यामुळे वर्षातला सर्वात लहान दिवस (विंटर सोलस्टाइस) आजसुध्दा २१ किंवा २२ डिसेंबरलाच येतो. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो आणि सूर्योदय व सूर्यास्ताला ज्या ठिकाणी सूर्याचे बिंब क्षितिजाला टेकतांना दिसते तो बिंदू उत्तरेच्या दिशेने सरकू लागतो. याचा अर्थ सूर्याचे उत्तरायण आधीच सुरू होऊन गेलेले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पृथ्वीचा आंस वाटतो तेवढा स्थिर नाही. अत्यंत सूक्ष्म गतीने त्याचा तिरकसपणा बदलत असतो यामुळे शेकडो वर्षांच्या कालावधीत क्षितिजामध्येही किंचित बदल येत असतो आणि त्याच्या सापेक्ष दिसणारे राशीचक्र किंचित बदलत असते. यामुळे हा फरक येतो. आपले पंचांग पूर्णपणे राशीचक्रामध्ये होत रहाणा-या ग्रहांच्या भ्रमणावर आधारलेले असल्यामुळे विंटर सोलस्टाइस आणि मकरसंक्रांत आता वेगळ्या दिवशी येतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मकरसंक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देऊन आपले संबंध दृढ करायची प्रथा तर आहेच, शिवाय नवीन लग्न झालेली मुलगी, गरोदर स्त्री, नवजात बालक अशा संक्रमणाच्या स्थितीत असलेल्यांचा संक्रांतसण साजरा केला जातो. त्या दिवशी हलव्याचे दागिने तयार करून ते त्यांना चढवले जातात. लहान मुलांचे बोरन्हाण घातले जाते. मराठी माणसांनी या प्रथा आता साता समुद्रापार नेल्या आहेत. अमेरिकेत राहणारे मराठी लोकसुध्दा हे सण साजरे करतांना दिसतात. संक्रांतीचे हळदीकुंकू करून त्यात जमलेल्या सर्वजणींना एकादी क्षुल्लक अशी भेटवस्तू दिली जाते. पण याला लुटवणे असे म्हणायची पध्दत आहे. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-3172840755380690503?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/3172840755380690503/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=3172840755380690503' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/3172840755380690503'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/3172840755380690503'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2012/01/blog-post_15.html' title='मकरसंक्रमण'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-FQNEiGbL7BU/TxLUgQuRWMI/AAAAAAAABNY/07ylGWaf_QU/s72-c/SankrantiGreeting.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-344013273103457044</id><published>2012-01-09T08:51:00.000-08:00</published><updated>2012-01-09T08:51:06.133-08:00</updated><title type='text'>माझ्या ब्लॉग्जचे वाचक</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;या ब्लॉगवर चार ओळी लिहायला सुरुवात केल्यापासूनच कोणी तरी त्या वाचाव्यात असे मला वाटत असे. अर्थातच किती लोक त्या वाचतात हे मला कळायला हवे हे ओघाने आलेच. सहा वर्षांपूर्वीच्या काळात फक्त याहू ३६० या स्थळावर ही सोय असल्यामुळे मी तिथे आपले खाते उघडून लिहायला लागलो. सुरुवातीला शंभर दोनशे पर्यंत पोचण्यासाठीसुध्दा खूप वेळ वाट पहावी लागायची. आपल्या ब्लॉगकडे कोणी फिरकत नाही म्हणून माझे मन विषण्ण होत असे, पण नेटाने तो प्रयत्न चालू ठेवल्यावर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. वाचनांची संख्या शंभर, दोनशे वरून हजार, दोन हजार करीत वर्षाअखेर दहा हजारावर गेली तेंव्हा माझ्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. त्यामुळे माझ्या अंगात हुरुप संचारला आणि दुस-या वर्षात खूप भाग लिहिले. वाचकांनीही अपेक्षेपेक्षा जास्त आधार दिला आणि वाचनसंख्या पांचपटीने वाढून अर्ध्या लाखावर गेली. यामुळे तिस-या वर्षाची (२००८ ची) सुरुवात अत्यंत उत्साहाने झाली होती, पण थोड्याच दिवसांनी याहू ३६० च्या क्षितिजावर अनिश्चिततेचे ढग जमू लागले. तरी ही पुढच्या काळात याहू ३६० ब्लॉग चालत राहिला. १६ ऑक्टोबर २००८ रोजी त्याच्या वाचनसंख्येने लाखाचा आकडा पार केला आणि १२ मे २००९ ला सव्वा लाखांचा टप्पा गाठला. त्यानंतर मात्र लवकरच तो कायमचा बंद झाला.&lt;br /&gt;ब्लॉगस्पॉटवरील माझा हा प्रयत्न वर्ष दीड वर्ष कोमात गेला होता, २००८ च्या सुरुवातीला त्याच्या अंगात धुगधुगी आल्याचे लक्षात आल्यावर त्यात नवे चैतन्य आले. याच सुमारास कधी तरी गूगलने 'ब्लॉगस्पॉट'वर ताबा मिळवून त्याचे 'ब्लॉगर'मध्ये रूपांतर केले असावे. त्या काळात ब्लॉगस्पॉटवर वाचकांची संख्या समजण्याची सोय नव्हती. १ मे २००८ पासून मी एक बाहेरचा फ्री काउंटर लावून घेतला. त्यामुळे भेट देणा-यांची संख्या समजू लागली. सुरुवातीला ती संख्यासुध्दा हळूहळूच वाढत होती. दोन वर्षांनंतर म्हणजे २०१० च्या मध्यापर्यंत ती ३०००० चे वर गेली होती. पण त्यानंतर हा काउंटर अधून मधून बंदच पडू लागला असल्याचे लक्षात आले. तरीही २०१० अखेर ती संख्या ५०००० वर गेली होती. गेल्या महिन्यात सुध्दा तीन चार दिवस तो बंद पडला होता. पण इतर वेळी चालत असल्याने त्याची संख्या वाढत वाढत आता सत्याऐंशी हजारांवर गेली आहे. तो चालत राहिला तर आतापर्यंत मी कदाचित लक्षाधीश होण्याच्या बेतात आलो असतो असे दुस-या गणकावरून दिसते.&lt;br /&gt;काही काळापूर्वी ब्लॉगरने स्वतःच व्हिजिटर्सची आकडेवारी द्यायला सुरुवात केली. १ डिसेंबर २०१० ला फ्री काउंटर वर ४७९६२ आणि ब्लॉगरवरील संख्या २०१२४ होती, म्हणजेच त्या वेळी दोन्हींमध्ये २७८३८ एवढा फरक होता. त्यानंतर फ्री काउंटर अधून मधून थांबत थांबत आणि ब्लॉगरचा गणक व्यवस्थितपणे चालत राहिला असावा असे समजायला हरकत नाही. आज फ्री काउंटरवर ८७२१४ आणि ब्लॉगरच्या हिशोबाने ७२९६१ इतक्या संख्या आहेत. म्हणजे दोन्हीमधील फरक १४२५३ इतकाच आहे. कदाचित काही दिवसांनी ब्लॉगरवरील आकडा पुढे जाईल. त्यानंतर फ्री काउंटरला अर्थच राहणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-K78BxzpDFN8/Twsaw2W7kuI/AAAAAAAABNQ/wynPw3YYFF4/s1600/statsMaster.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="237" rea="true" src="http://3.bp.blogspot.com/-K78BxzpDFN8/Twsaw2W7kuI/AAAAAAAABNQ/wynPw3YYFF4/s320/statsMaster.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;ब्लॉगरवरील आकडेवारीत बराच मजेदार तपशीलसुध्दा मिळतो. किती वाचकांनी या ब्लॉगला भेटी दिल्या एवढा एकच आाकडा फ्री काउंटरवर मिळतो. पण कोणत्या लेखावर किती टिचक्या पडल्या आणि कोणकोणत्या देशामधील वाचकांनी त्या मारल्या, तसेच किती लोकांना माझ्या ब्लॉगचा पत्ता कुठून मिळाला वगैरेची आकडेवारी इथे मिळते. ती माहितीसुध्दा गेला एक दिवस, एक आठवडा, एक महिना आणि आतापर्यंत अशा निरनिराळ्या कालावधीसाठी मिळते. २०११ साली या ब्लॉगला ४७८३१ भेटींची नोंद आहे, म्हणजे सरासरी दर महिन्याला सुमारे चार हजार झाले. कमीत कमी संख्या २६५५ आणि जास्तीत जास्त ४९९३ इतक्या आहेत. एकूण भेटींची संख्या पन्नास हजाराला आणि महिन्यातली संख्या पाच हजाराला थोडी कमी पडली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ब्लॉगवरील माझ्या लेखांची संख्या आणि वाचकांची संख्या यात जवळचा संबंध दिसत नाही. २००८ मध्ये याचे पुनरुज्जीवन केल्यानंतर त्या वर्षी २५१ आणि २००९ साली २२६ भाग टाकले होते. दोन्ही मिळून ४७७ इतकी पोस्ट झाली होती. यातले बरेचसे भाग पूर्वी याहू ३६० वर प्रकाशित केलेले असल्यामुळे ते तयार होते. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे २०१०मध्ये आणि मागील वर्षी मुख्यतः नवे भाग लिहिले असल्यामुळे अर्थातच त्यांची संख्या १०० आणि ८८ अशी कमी भरली होती. वाचकांची संख्या मात्र या काळात २००८ आणि २००९ मिळून सुमारे २००००, सन २०१०मध्ये ३०००० आणि २०११मध्ये ४७००० अशी वाढत गेली आहे. याचा अर्थ जुने भाग कालांतराने वाचणा-यांची संख्या मोठी आहे. कोणता लेख कितीजणांनी वाचला याची आकडेवारी वर दिलेल्या कोष्टकात दिली आहे. त्यावरून हेच दिसते. पण या लेखांच्या वाचकांची एकत्र संख्या एकंदर वाचकांच्या १५-२० टक्के एवढीच भरते त्यामुळे इतर ८०-७५ टक्के लोक काय वाचत असतील ते कळायला मार्ग नाही. मनोगत, मिसळपाव आणि उपक्रम या संस्थळावर मी काही लेख पाठवले होते. त्या ठिकाणी मात्र पहिल्या दोन तीन दिवसात जितक्या वाचकांनी ते वाचले असतील तेवढेच. त्यानंतर वाचकांचा आकडा वाढलाच तर तो मुख्यतः प्रतिसादांमुळे असतो. मूळ लेख सहसा कोणी पुन्हा वाचत नसावा.&lt;br /&gt;बहुधा २००९ च्या सुरुवातीला माझ्या ब्लॉगवर फॉलोअर्सची नावे दिसायला सुरुवात झाली. माझे (सुध्दा) कांही अनुयायीगण आहेत ही भावना जरी अत्यंत उत्साहवर्धक असली तरी ते कोण आहेत आणि कसल्या बाबतीत ते माझ्या कोणत्या मार्गाचे अनुसरण करतात हे काही समजले नाही. यांच्यातले दोन चारजण मला मनोगताच्या कट्ट्यावर किंवा ब्लॉगर्सच्या मेळाव्यात भेटले होते तेवढेच. 'फॉलोअर' या इंग्रजी शब्दाला 'अनुयायी' असा प्रतिशब्द असला तरी या बाबतीत मला तो तेवढा सयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे मी त्यांना माझे 'पाठीराखे' असे म्हणायचे ठरवले. हे लोक नक्कीच माझे लिखाण वाचत असावेत आणि कदाचित त्याची शिफारस करीत असावेत. या पाठीराख्यांची संख्या वाढून आता पंच्याण्णऊवर पोचली आहे. यात कोण कधी आले आणि कोण किती दिवस राहून (कंटाळून) सोडून गेले वगैरेचा हिशोब मी कधी ठेवला नाही. तशी माहिती सोयीस्कररीत्या उपलब्धही नाही. सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या शतकाप्रमाणेच या पाठीराख्यांचे शतकही २०११ मध्ये पुरे झाले नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-1_p4e9-n_Os/TwsaRhvie3I/AAAAAAAABNI/li9tEBmc8mA/s1600/status_global.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" rea="true" src="http://3.bp.blogspot.com/-1_p4e9-n_Os/TwsaRhvie3I/AAAAAAAABNI/li9tEBmc8mA/s320/status_global.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे बहुतेक सारे वाचक भारतवासीच आहेत. ते मराठीभाषिकच असणार हे लिहिण्याची आवश्यकता नाही, पण ते कोणकोणत्या राज्यांमध्ये निवास करतात याची माहिती उपलब्ध नाही. मराठी भाषिकांची संख्या अमेरिकेत भरपूर झाली असल्यामुळे परदेशीय वाचकांमध्ये त्यांची संख्या सर्वात मोठी असणे हे अपेक्षित आहे. व्हिएटनाम किंवा दक्षिण कोरियासारख्या देशात मराठी वाचणारे लोक असतील आणि माझ्यासारखा एकजण (स्क्रीनच्या) पांढ-यावर काळे करत असल्याचा त्यांना पत्ता लागत असेल हे समजल्याने गंमत वाटली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाचकांना वाचेवे असे वाटेल असे लिहिण्याची माझी इच्छा आहे, पण मी जे लिहू शकतो त्यातले त्यांना काय वाचायला आवडते ते मला समजणे जरा कठीण आहे. त्यामुळे मला जे लिहायला आवडते तेच लिहित राहणे भाग आहे. वाचकांनी ते गोड मानून वाचावे आणि मला प्रोत्साहन देत रहावे अशी नम्र विनंती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-344013273103457044?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/344013273103457044/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=344013273103457044' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/344013273103457044'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/344013273103457044'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2012/01/blog-post_09.html' title='माझ्या ब्लॉग्जचे वाचक'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-K78BxzpDFN8/Twsaw2W7kuI/AAAAAAAABNQ/wynPw3YYFF4/s72-c/statsMaster.jpg' height='72' width='72'/><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-8416314962504501563</id><published>2012-01-07T09:27:00.000-08:00</published><updated>2012-01-07T09:27:27.321-08:00</updated><title type='text'>सोनेरी (पिकली) पाने - २ (संयुक्त यादी)</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-EF6d5eiG87s/TwiADrNC2YI/AAAAAAAABM4/xxNQHxqfmy4/s1600/PPaneRevisedS.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="309" rea="true" src="http://2.bp.blogspot.com/-EF6d5eiG87s/TwiADrNC2YI/AAAAAAAABM4/xxNQHxqfmy4/s320/PPaneRevisedS.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;गेल्या वर्षाच्या अखेरीस सोनेरी (पिकली) पाने हा लेख लिहितांनी आठवणींच्या आधाराने एक यादी तयार केली होती. त्यात समाविष्ट नसलेल्या आणखी काही नावांची पुस्ती त्याला जोडली होती. तरीसुध्दा आणखी काही नावे राहून गेली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-Oet2XSN_CgQ/TwiAYaMKIwI/AAAAAAAABNA/1lltdUjeOUM/s1600/pikli+pane2011_2S.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="206" rea="true" src="http://2.bp.blogspot.com/-Oet2XSN_CgQ/TwiAYaMKIwI/AAAAAAAABNA/1lltdUjeOUM/s320/pikli+pane2011_2S.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;गीतकार जगदीश खेबूडकर हे त्यातले सर्वात ठळक नाव. ग दि माडगूळकरांच्या काळात खेबूडकरांनी गीतरचनेला युरुवात केली होती आणि त्यांच्या पश्चात ते मराठी चित्रपटांचे प्रमुख गीतकार झाले होते. वि.आ.बुवांच्या नर्मविनोदी लेखकाने अनेक वर्षे मराठी वाचकांना खूप हसवले होते. बाबा आमटे यांच्या समाजकार्यात साधनाताईंनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. नवीन निश्चल यांचे अनेक चित्रपट गाजले होते. तसेच काळूबाळूंच्या तमाशाने लोककलेच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते. नाट्यदिग्दर्शक बादल सरकार आणि नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार या दोन सरकारांनी कलाक्षेत्रावर राज्य केले होते. हरिश्चंद्र बिराजदारांनी हिंदकेसरी हा सन्मान मिळवला होता. पी.सी.अलेक्झँडर हे ज्येष्ठ प्रशासक होते आणि राज्यपाल म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. महेंद्रसिंग टिकैट हा उत्तर भारतामधील शेतक-यांचे तर वसंत साठे विदर्भातीस जनतेचे पुढारी होते. पहिल्या भागातील आणि वरील सर्वांच्या नावांची एक संयुक्त यादी खाली दिली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गौतम राजाध्यक्ष - छायाचित्रकार १६-९-१९५० -- १३-९-२०११&lt;br /&gt;सुलतानखान - सारंगी वादक, -- २७-११-२०११&lt;br /&gt;जगजीतसिंग - गजल गायक - ८-२-१९४१ --१०-१०-२०११ &lt;br /&gt;श्रीनिवास खळे - संगीत दिग्दर्शक - ३०-४-१९२६ -- २-९-२०११ &lt;br /&gt;भूपेन हजारिका - संगीत दिग्दर्शक --- ५-११-२०११ &lt;br /&gt;अशोक रानडे - संगीतज्ञ --- ३०-७-२०११ &lt;br /&gt;इंदिरा गोस्वामी - साहित्यिक --- २९-११-२०११ &lt;br /&gt;माधव गुडी - गायक --- २२-४-२०११ &lt;br /&gt;भारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी - महान गायक --- २४ जानेवारी -२०११&lt;br /&gt;श्रीकांत देशपांडे - गायक --- ३०-१-२०११ &lt;br /&gt;वंदना विटणकर - कवयित्री --- ३०-१२-२०११ &lt;br /&gt;प्रभाकर पणशीकर - नटश्रेष्ठ, निर्माते --- १३-१-२०११ &lt;br /&gt;शम्मीकपूर - अभिनेता --- १४-८-२०११ &lt;br /&gt;देवआनंद - सदाबहार नट --- ४-१२-२०११ &lt;br /&gt;सत्यदेव दुबे - नटश्रेष्ठ, निर्माते --- २५-१२-२०११ &lt;br /&gt;करुणा देव - आकाशवाणी कलाकार --- ५-६--२०११&lt;br /&gt;पी.के.आयंगार - अणूशास्त्रज्ञ --- २९-६-१९३१ -- २१-१२-२०११&lt;br /&gt;हरगोबिंद खुराणा - शास्त्रज्ञ - नोबेल विजेते -- ९-१-१९२२ --- ९-११-२०११&lt;br /&gt;मणी कौल - चित्रपट निर्माते - २५-१२-१९४४ -- ६-७-२०११&lt;br /&gt;पतौडीचे नवाब (टायगर) - क्रिकेटपटू --- २१-९-२०११ &lt;br /&gt;जहांगीर सबावाला - चित्रकार -- २३-८-१०२२ -- २-९-२०११&lt;br /&gt;मारिओ मिरांडा - व्यंगचित्रकार -- २-५-१९२६ -- ११-१२-२०११ &lt;br /&gt;एम.एफ. हुसेन - चित्रकार - १७-९-१९१५ -- ९-६-२०११ &lt;br /&gt;सत्यसाईबाबा - धर्मगुरू --- २४-४-२०११&lt;br /&gt;&lt;br /&gt;नवीन निश्चल - अभिनेता --- १९-३-२०११ &lt;br /&gt;वि.आ.बुवा - विनोदी लेखक --- १७-४-२०११ &lt;br /&gt;जगदीश खेबुडकर - गीतकार --- ३-५-२०११&lt;br /&gt;बादल सरकार - नाट्यदिग्दर्शक --- १४-५-२०११&lt;br /&gt;महेंद्रसिंह टिकैत - शेतकरी नेते --- १५-५-२०११&lt;br /&gt;लहू खाडे (काळू) - तमाशा कलावंत --- ७-७-२०११&lt;br /&gt;साधनाताई आमटे - समाजसेविका - ५-५-१९२७ - ९-७-२०११ &lt;br /&gt;पी.सी.अलेक्झँडर - ज्येष्ठ प्रशासक --- १०--२०११&lt;br /&gt;अजीजुद्दीन खान (बाबा) - संगीतज्ञ --- २३-८-२०११&lt;br /&gt;हरिश्चंद्र बिराजदार - कुस्तीगीर --- १२-९-२०११&lt;br /&gt;वसंत साठे - राजकीय नेते --- २३-९-२०११&lt;br /&gt;सुबल सरकार - नृत्यदिग्दर्शक --- १२-११-२०११&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-8416314962504501563?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/8416314962504501563/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=8416314962504501563' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/8416314962504501563'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/8416314962504501563'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2012/01/blog-post_07.html' title='सोनेरी (पिकली) पाने - २ (संयुक्त यादी)'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-EF6d5eiG87s/TwiADrNC2YI/AAAAAAAABM4/xxNQHxqfmy4/s72-c/PPaneRevisedS.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-2551167493340248916</id><published>2012-01-04T04:15:00.000-08:00</published><updated>2012-01-04T04:15:57.174-08:00</updated><title type='text'>नव्या वर्षाची सुरुवात</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;नवे निश्चय, निर्धार, योजना वगैरेंनी नव्या वर्षाची सुरुवात करायची अशी जुनी प्रथा आहे. निदान तसा विचार तरी बहुतेकजण करतात. मीसुध्दा ते करीत आलो होतो. पण यंदा मात्र असे काही करायचे नाही, आपण पुढाकार न घेता काय काय घडते आहे ते नुसते पहायचे असेच मी ठरवले होते. या वर्षीचे वेगळेपण यातच होते. अमेरिकेतल्या इंका जमातीच्या नोस्ट्रॅडॅमस किंवा भृगु ऋषींनी तर २०१२ साल उजाडणारच नाही असे वर्तवले होते म्हणे. त्यामुळे त्यापूर्वीच जेवढी मजा करून घ्यायची तेवढी करून घेण्याचा सपाटा काही मंडळींनी लावला होता. आपल्याकडच्या गटारआमूशेची ही अमेरिकन आवृत्ती म्हणायची! चुकून माकून समजा अशी जगबुडी आलीच तर नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आपण केलेली पूर्वतयारी उगाच वाया गेली असती! &lt;br /&gt;&lt;br /&gt;आदले दिवशीच उदय, शिल्पा, ईशा आणि इरा पुण्याहून आलेले होते आणि घरामधले चैतन्य जागे झाले होते. त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी आणि चांगले चुंगले खाणेपिणे, टीव्हीवरील खास कार्यक्रम पाहता पाहता त्यांच्यावर शेरेबाजी, टीकाटिप्पणी वगैरे करता करता रात्रीचे 'वाजले की बारा' आपोआप घडले. मागच्या वर्षी त्याची वाट पहाता पहाता मला अनावर झोप आली होती. नवी खरेदी, कपडे वगैरे दाखवणे, जुने फोटोंचे आल्बम पाहणे वगैरेंमध्ये कपाटांमधले बरेच सामान बाहेर निघाले होते आणि चिमुकल्या ईशाइरांची खेळणी माळ्यावरून खाली काढून दिली होती, शिवाय त्यांनी घरातल्या आणखीही थोड्या वस्तू काढून त्या सगळ्या घरभर पसरवून ठेवल्या होत्याच, पुण्याहून आणलेल्या बॅगांमधले सामानही उचकटवून त्यात मिसळले होते आणि त्यातच खेळता खेळता त्या स्वतःही आडव्या झाल्या होत्या. मध्यरात्रीनंतर ते सगळे आवरण्याचा मूड कोणालाही नव्हता. त्यामुळे मधला पसारा बाजूला सरकवून थोडी मोकळी जागा करून मोठी मंडळी त्यात झोपी गेली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अचानक टेलीफोनची घंटा खणाणली. गाढ झोपेत असल्यामुळे ती कोणालाच ऐकू गेली नाही की कोणाचीही उठायची तयारी नव्हती कोण जाणे, पण ती खणाणत राहिली. दहाबारा सेकंदानंतर मीच उठून हॉलमध्ये गेलो. भारतामधले कोणीही रविवारी इतक्या पहाटे उठून फोन करेल असे वाटत नव्हते, तसेच झाले. अमेरिकेतून अजयचा फोन होता. या वेळी आमच्याशी बोलायला त्यांना फुरसत होती आणि सगळ्यांशी पोटभर गप्पा मारायच्या होत्या. पण इथे तर सारे ढाराढूर झोपलेले होते. मी एकट्यानेच त्यांच्याशी चारपाच मिनिटे बोलून घेतले आणि तिकडे ते लोक झोपायच्या तयारीला लागण्यापूर्वी पुन्हा फोन करायला त्याला सांगितले. तोपर्यंत इकडची बहुतेक मंडळी झोपेतून उठण्याची शक्यता होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माझी झोप मात्र आता पूर्णपणे उघडली होती. बाहेर झुंजूमुंजू उजाडलेही होते. कपडे बदलून मी रोजच्यासारखाच फिरायला बाहेर पडलो. आज पार्कमध्ये फारच कमी माणसे आली होती. य़ा वर्षी लोकांनी कोणते नवे निर्धार केले होते माहीत नाही, पण सकाळी लवकर उठून फिरायला जाणे हे त्यात नक्कीच नव्हते. उलट रोजच्यातल्या काही लोकांनी हवेमधला गारवा पाहून आज मॉर्निंग वॉकला फाटा द्यायचे ठरवले असावे असा विचार करत मी दूध घेऊन घरी परत आलो. दूधवाले, पेपरवाले वगैरे मंडळी मात्र आपल्या नेहमीच्या कामावर दिसत होती. त्यांच्यासाठी नववर्षदिवस काही वेगळा नव्हता. दूध तापेपर्यंत माझ्यापुरता एक कप चहा बनवला आणि कप घेऊन काँप्यूटरसमोर जाऊन बसलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इंटरनेटवरून आलेल्या शुभेच्छापत्रांचा भला मोठा ढीग टपालपेटीत जमा झाला होता. काही वर्षांपूर्वी मी सुध्दा दरवर्षी खास सचित्र शुभेच्छापत्र तयार करून ते सर्वांना पाठवत असे. त्यावेळी माझ्या ईमेलच्या पत्त्यांच्या यादीत पंधरावीसच नावे होती. ती वाढत गेली तसतसा माझा उत्साह कमी होत गेला. आता त्या अॅड्रेसबुकात दोनअडीचशे नावे झाली आहेत, त्यातल्या कोणाकोणाला ग्रीटिंग्ज पाठवायचे याची निवड करायलासुध्दा सहज दिवसभर लागला असता आणि तो मिळाला नव्हता. इराने काढलेल्या एका छानशा चित्रावर थोडा मजकूर घालून एक कार्ड झटपट बनवले आणि ब्लॉगवर तेवढे टाकले. लोकांना ते पाठवायचे राहूनच गेले. ज्यांच्याकडून मला छान सचित्र किंवा अर्थपूर्ण अशी कार्डे आली होती तेवढ्या लोकांना "तुम्हालासुध्दा (सेमटुयू)" एवढे उत्तर देण्यातच तास दोन तास गेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तोपर्यंत घराला जाग आली, पुन्हा चहाची आवर्तने झाली, मनपसंत नाश्ता झाला, अजयचा फोन आला आणि सगळ्यांचे आलटून पालटून त्यावर तासभर संभाषण चालले होते. इतर आप्तेष्ट आणि मित्रमंडळींचे फोनसुध्दा दुस-या यंत्रावर येत होतेच. त्यातला एक बार्शीच्या प्रसादचा होता. तो आजच कामासाठी वाशीला आला होता. त्याला आमच्या घराचे नेमके स्थान आणि आजूबाजूच्या खाणाखुणा सांगितल्या. त्यांच्या आधाराने अर्ध्या तासात तो स्वतःही येऊन पोचला. त्याच्याशी वार्तालाप होईपर्यंत जेवायची वेळ झाली होती, पण त्याला एका ठिकाणी जेवायला जायचे आधीपासून ठरले असल्यामुळे तो थांबला नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नववर्षाचा पहिला दिवस बाहेर जेवून साजरा करण्याचा निर्णय एकमुखाने झाला. त्यासाठी एकाद्या आगळ्या ठिकाणी जाणे ओघाने आलेच. रघुलीलामधल्या द व्हिलेजला जाऊन थडकलो. तिथे आत तर गर्दी होतीच, प्रवेशद्वारातच दहा माणसे वाट पहात उभी होती. तिथला मॅनेजर आणखी कोणाला नंबरसुध्दा द्यायला तयार नव्हता. पंधरावीस मिनिटे टंगळमंगळ करून इतर पर्यांयांवर चर्चा केली आणि पुन्हा व्हिलेजमध्ये गेलो. आता काही लोक बाहेर पडू लागले होते. त्यामुळे चाटपाणीपुरी वगैरेंनी सुरुवात करेपर्यंत बसायला जागा मिळण्याची आशा निर्माण झाली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मॉलमधल्या एका मोठ्या हॉलमध्ये डेरेदार वटवृक्षांचे चार पाच कृत्रिम बुंधे उभे करून आणि त्याला वर फांद्या पाने वगैरे अडकवून हे खेड्याचे दृष्य बनवले होते. त्यातच सगळ्या कडांनी झोपड्यांसारखे दिसणारे स्टॉल्स ठेवले होते, बसायला कुठे बाकडी, कुठे खुर्च्या तर कुठे खाटा ठेवल्या होत्या. राजस्थानमधील ग्रामीण वाटावेत असे कपडे आणि पगड्या धारण केलेले सेवक इकडे तिकडे हिंडत होते. एका कोप-यात कुंभाराचे चाक ठेवले होते आणि कोणालाही त्यावर ठेवलेल्या मातीच्या गोळ्याला आपल्या बोटांनी आकार देऊन त्यातून छोटेसे मडके साकारण्याची सोय केली होती. एका झाडाच्या बुंध्यापाशी पानवाला, ज्योतिषी आणि कासार बसले होते. एकंदरीत द व्हिलेजचे अँबियन्स आणले होते. त्या वातावरणाशी अगदी विसंगत असे पॉप म्यूजिक कानठळ्या बसवत होते आणि त्याच्या ठेक्यावर अनेक तरुण तरुणी आणि मुले मुली मधल्या मोकळ्या जागेत मुक्तपणे नाचत होते. त्यांचे आप्तेष्ट आणि चाहते त्यांचा नाच कॅमेरा किंवा सेलफोनवर रेकॉर्ड करत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्हाला यायला आधीच खूप उशीर झालेला असल्यामुळे आम्ही सरळ खाण्याकडे मोर्चा वळवला. मुख्यतः राजस्थानी पदार्थांच्या जोडीला पंजाबी, गुजराथी, मराठी आणि चिनी खाद्यपदार्थसुध्दा निरनिराळ्या झोपड्यांमध्ये ठेवलेले होते, ते आपण स्वतःच पाहून वाढून घ्यायचे होते. कोणीही कितीही वेळा कुठेही जाऊन कोणताही पदार्थ घ्यायला मुभा होती आणि बहुतेक लोकांचे खाणे होऊन गेले असल्यामुळे त्यासाठी रांगा नव्हत्या. खूप विविधता असल्यामुळे कुठे काय ठेवले आहे हे शोधून इतरांना सांगणे आणि स्वतः तिथे जाऊन त्यातले हवे ते वाढून घेणे यात वेळ चांगला जात होता. शिवाय कानावर संगीत आणि पहायला धांगडधिंगा यानेही थोडे मनोरंजन होत होते. या अनुभवाने एकंदरीत सर्वांना मजा आली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;निरनिराळ्या पदार्थांची थोडी चंव चाखून पाहण्यामध्येच पोट गच्च भरून गेले आणि घरी आल्यावर सर्वांनी ताणून दिली. संध्याकाळी पुण्याच्या मंडळींना परत जायचे होते. वामकुक्षी घेऊन झाल्यानंतर त्यांनी आपले सामान बॅगांमध्ये भरले, कपडे बदलले आणि निघायच्या तयारीत असतांना फोनवरून एक महत्वाची बातमी समजली. लगेच टीव्हीवर चालत असलेला प्रोग्रॅम बदलून मराठी बातम्या लावल्या. नववर्षाच्या दिवशी मुंबई पुणे, मुंबई गोवा आणि पुणे कोल्हापूर हमरस्त्यांवर ठिकठिकाणी अपघात झाले होते. त्यातल्या पुणे महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहतूक बंद पडली होती आणि दोन्ही बाजूला रस्त्यांवर मोटारींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वगैरेचे वर्णन चालले होते. रात्रीच्या वेळी अशा निर्जन ठिकाणी जाऊन अडकून पडण्यात काही अर्थ नसल्यामुळे मंडळींचा मुंबईतला मुक्काम वाढला. अर्थातच आम्ही खूष झालो, पुन्हा एकदा गप्पागोष्टी आणि चर्चासत्रे सुरू झाली. पुण्याला गेल्यानंतर लगेच ईशाइरांच्या परीक्षा होत्या. त्यामुळे एका खोलीत त्यांच्या अभ्यासाची तयारी, दुस-या खोलीत काँप्यूटरवर इंटरनेट आणि दिवाणखान्यात टीव्हीवरील मनोरंजक कार्यक्रम अशी विभागणी झाली खरी, पण कोणीच एका खोलीत जास्त वेळ टिकत नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन तारखेला सकाळी लवकर उठणे सर्वांना भागच होते. पुण्याची मंडळी तिकडे चालली गेली. अलकाला रक्ततपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जायचे होते, ती त्यांच्याही आधी घरातून निघाली. मी इंटरनेट लावून बसलो. थोड्याच वेळात वीज चालली गेली. इंटरनेट, काँप्यूटर, टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव्ह, पाण्याचा फिल्टर, वॉशिंग मशीन, गीजर वगैरे सगळे काही बंद. सूर्यप्रकाशाच्या उजेडात वाचन करणे किंवा डोळे मिटून स्वस्थ पडून राहणे एवढेच शक्य होते. तासभर वीज आली नाही म्हणून चौकशी केली, तेंव्हा ट्रान्स्फॉर्मरवर काम चालले असल्याचे समजले. म्हणजे आता दिवसभर ती काही येणार नव्हती. काल गजबजलेले घर आता अगदी शांत झाले होते ते एका दृष्टीने चांगलेच झाले होते. या सगळ्या सुखसोयींना चटावलेल्यांचे तक्रार करणारे आवाज तरी नव्हते. थोडा वेळ वाचन, थोडी विश्रांती आणि थोडी बाहेरची कामे करून येणे यात दिवस घालवायचा असे ठरवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही वेळाने अलकाशी तिच्या मोबाईलवर बोललो. ती एका मैत्रिणीकडे उपाहार करत बसली होती पण जाम वैतागलेली दिसत होती. दोन महिने आधीपासून ठरवलेली तिची रक्ततपासणी समजुतीच्या काही घोटाळ्यामुळे झालीच नव्हती. आता त्या बाजूची आणखीही इतर काही कामे उरकून संध्याकाळी परत यायचा तिचा विचार होता. इकडे परत यायची मुळीसुध्दा घाई करू नको असे तिला सांगितले. पुण्याला फोन लावला तर मुलींना घेऊन शिल्पा तातडीने शाळेत गेली आहे असे समजले. चार तारखेला परीक्षा सुरू होणार आहे असे ती समजत होती, पण ती दोनलाच सुरू असल्याचे तिला पुण्याला गेल्यानंतर कळले. सकाळी मुंबईहून निघून तिथे पोचेपर्यंत सकाळच्या शाळा केंव्हाच सुरू होऊन गेल्या होत्या. नव्या वर्षाच्या पहिल्या कामाच्या दिवसाची लक्षणे काही ठीक दिसत नव्हती. आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये तर सगळ्यांचीच भविष्ये मारे भन्नाट छान दिलेली होती याचीही आठवण झाली.&lt;br /&gt;संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला. घरातली सगळी यंत्रे कामाला लागली आणि दोन दिवसांचा अनुशेष भरून काढणे चालू झाले. अलकाने तिच्या रक्ततपासणीबद्दल हॉस्पिटलमध्ये याला त्याला गाठून त्यांच्याशी बोलून घेतले होते आणि दुस-या दिवशीची अॅपॉइंटमेंट घेतली होती. शिल्पाशी बोलणे झाले. मुलींच्या लेखी परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे चार तारखेलाच होणार होत्या. दोन तारखेला त्यांच्या तोंडी परीक्षा घेण्याचे अचानक ठरले होते. उशीरा पोचल्यामुळे मुलींची ती परीक्षा बुडली की काय असे आधी वाटले होते, पण तिने शिक्षकांना भेटून ती करवून घेतली होती. दिवसभरात आलेला त्याबद्दलचा थोडासा ताण नाहीसा झाला होता. नव्या वर्षाची सुरुवात थोडी अनपेक्षित अशी झाली असली तरी आता सगळे सुरळीत झाले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-2551167493340248916?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/2551167493340248916/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=2551167493340248916' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/2551167493340248916'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/2551167493340248916'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2012/01/blog-post.html' title='नव्या वर्षाची सुरुवात'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-7760195542532911904</id><published>2011-12-31T06:15:00.000-08:00</published><updated>2011-12-31T21:18:56.437-08:00</updated><title type='text'>नववर्षाच्या शुभेच्छा २०१२</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;हे नववर्ष सर्व वाचकांसाठी सुख, शांती, आयुरारोग्य, धनसंपदा वगैरे जो जे वांछील ते ते घेऊन येवो&amp;nbsp;अशा हार्दिक शुभेच्छा.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-byCWVnezMRE/Tv8Y76TiTUI/AAAAAAAABMM/BqYW6H6tI7I/s1600/ira1HNY.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="184" rea="true" src="http://2.bp.blogspot.com/-byCWVnezMRE/Tv8Y76TiTUI/AAAAAAAABMM/BqYW6H6tI7I/s320/ira1HNY.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-WOs46QvD6wQ/Tv9P0BuzinI/AAAAAAAABMY/4va5-k5mxbI/s1600/HNYSNA3.gif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" rea="true" src="http://3.bp.blogspot.com/-WOs46QvD6wQ/Tv9P0BuzinI/AAAAAAAABMY/4va5-k5mxbI/s1600/HNYSNA3.gif" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;आजचे सुविचार&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।&lt;br /&gt;&lt;br /&gt;फांदीवर बसलेला पक्षी ती तुटण्याची भीती बाळगत नाही कारण त्याचा स्वतःच्या पंखांवर जास्त विश्वास असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;यशाकडे जाणारा रस्ता नेहमीच तयार होत असतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-7760195542532911904?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/7760195542532911904/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=7760195542532911904' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/7760195542532911904'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/7760195542532911904'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post_31.html' title='नववर्षाच्या शुभेच्छा २०१२'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-byCWVnezMRE/Tv8Y76TiTUI/AAAAAAAABMM/BqYW6H6tI7I/s72-c/ira1HNY.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-7059588359599500844</id><published>2011-12-29T22:37:00.000-08:00</published><updated>2012-01-04T21:28:58.702-08:00</updated><title type='text'>सोनेरी (पिकली) पाने</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-Wcs6-0a7-Ys/TwU1CNuOBzI/AAAAAAAABMw/Nlf_vaFEhHk/s1600/PPaneRevisedS.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" rea="true" src="http://1.bp.blogspot.com/-Wcs6-0a7-Ys/TwU1CNuOBzI/AAAAAAAABMw/Nlf_vaFEhHk/s1600/PPaneRevisedS.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पिकल्या पानांनी गळून पडणे हा निसर्गाचा नियम आहे. यातली काही&amp;nbsp;पाने सोनेरीच नव्हे तर ती बावनकशी सोन्याचीच असतात असे म्हणता येईल. अशा अनमोल पानांचा २०११ मध्ये नुसता पाऊस पडला. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थान संपादन केले किंवा सर्वोच्च पातळी गाठली अशा इतक्या व्यक्ती एका वर्षात जगाला सोडून गेल्याचे यापूर्वी कधी झाले नसेल. पूर्वी पंचावन्न वर्षे पूर्ण होताच सरकारी नोकरीमधून सेवानिवृत्त केले जात असे. त्याची मुदत आता वाढवून ५८ ते ६० वर्षांपर्यंत झाली आहे. सत्तरीला पोचेपर्यंत बहुतेक लोकांची क्रियाशक्ती क्षीण झालेली असे. चिकित्सा आणि औषधोपचार यात झालेल्या प्रगतीमुळे आता सत्तरीपार गेल्यानंतरसुध्दा गोळ्या इंजेक्शने घेऊन लोक टुणटुणीत राहतात आणि सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग करून तुकतुकीत दिसतात. पिकल्या पानांचा देठच नव्हे तर ते पानच हिरवे दिसण्याची सोय झाली आहे. रोजच्या जीवनात करावे लागणारे श्रम कमी झाल्यामुळे ते सहजपणे सहन करता येतात. या सगळ्या गोष्टींमुळे आता सत्तरी आणि ऐंशीच्या पार गेल्यानंतरसुध्दा लोक क्रियाशील असतांना दिसतात. अशी पाने गळून पडायच्या वेळी त्यांचे पिकलेपण लक्षात येते. &lt;br /&gt;संगीत जगतावर तर या काळात एकामागोमाग एक आघात होत गेले. भारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक पुन्हा दिसणार नाही. त्यांचे पट्टशिष्य माधव गुडी आणि श्रीकांत देशपांडे हे सुध्दा स्वर्गलोकांत त्यांची साथ करायला निघून गेले. पंडितजींच्या गडद सावलीत हे सुध्दा कधी पिकली पाने झाले होते हे समजलेच नाही. &lt;br /&gt;स्व. सुधीर फडके, स्व.वसंत प्रभू, पं.हृदयनाथ मंगेशकर आणि श्री.यशवंत देव प्रभृतींबरोबरच श्रीनिवास खळे यांनी एकाहून एक सुरेल गाणी मराठी रसिक श्रोत्यांना दिली. या सर्व समकालीन संगीतकारांमध्ये खळे काकांनी सर्वाधिक काळ मराठी सुगमसंगीतावर अधिराज्य गाजवले असे त्यांच्याबद्दल सांगता येईल. &lt;br /&gt;गजल म्हणजे जगजीतसिंग असे समीकरणच आजकाल बनले होते. गजल या प्रकारालाच त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती आणि गजलसम्राट असे मानाभिधान मिळवले होते.&lt;br /&gt;आसाम या राज्यातील मधुर संगीत सर्व जगासमोर आणण्याचे काम पं.भूपेन हजारिका यांनी केले. त्यांच्याएवढा नावलौकिक आसाममधल्या दुस-या कोणीच कुठल्याही क्षेत्रात कमावला नसेल.&lt;br /&gt;संगीताप्रमाणेच नाट्यक्षेत्रानेही दोन अनमोल हिरे गमावले. प्रभाकर पणशीकर हे काही दशके मराठी रंगभूमीचे निर्विवाद सम्राट होते. त्यांच्या हयातीतच त्यांच्या नावाने श्रेष्ठ रंगकर्म्यांना पुरस्कार देण्यात येत होते. सत्यदेव दुबे म्हणजे हिंदीच नव्हे तर जागतिक प्रायोगिक रंगभूमी म्हणता येईल. नाट्यक्षेत्रामधील कलाकारांच्या काही पिढ्या या थोर माणसाने निर्माण केल्या आणि प्रेक्षकांना दिल्या.&lt;br /&gt;नाटकांपेक्षा आकाशवाणीवर ज्यांचा आवाज घरोघरी पोचला आणि सर्वांच्या ओळखीचा झाला असे करुणा देव यांच्याबद्दल म्हणता येईल.&lt;br /&gt;नाटक आणि चित्रपट (नाटकसिनेमे) ही मनोरंजनाची जोडगोळी आहे. एका कालखंडातल्या तमाम तरुणींचा लाडका देव आनंद आणि सर्व तरुणांचा हीरो शम्मीकपूर या दोघांना सिनेमासृष्टीत त्यांच्या विशिष्ट स्पेशलायझेशनमध्ये या दोघांनाही तोड नव्हती.&lt;br /&gt;पतौडीचे नवाब क्रिकेट जगतातसुध्दा नबाबाच्या रुबाबातच राहिले होते. वयाने जवळ जवळ सर्वात लहान असतांनासुध्दा त्यांना संघाचे कप्तानपद मिळाले आणि त्यांनी ते शानदार कामगिरी करून राखले. एकाक्ष असूनही धावांचे डोंगर रचले. शर्मिला टागोरसारख्या स्वरूपसुंदरीशी विवाह केला.&lt;br /&gt;चित्रकलेच्या क्षेत्रात मकबूल फिदा हुसेन यांनी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. त्यांच्या चित्रांना लिलावांमध्ये कोट्यावधी डॉलर्स इतकी किंमत मिळाली, कधी अनवाणी फिरण्यामुळे, तर कधी लोकप्रिय नट्यांच्या चित्रांची मालिका आणि त्यांना घेऊन विचित्र प्रकारचे चित्रपट काढल्यामुळे किंवा वादग्रस्त विधाने करून ते सतत प्रसिध्दीच्या झोतात राहिले. तसेच ते अनेकांच्या तीव्र रोषालाही पात्र झाले. सर्वच बाबतीत त्यांच्यासारखे तेच होते. &lt;br /&gt;व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांनी स्वतःची इतकी खास अशी शैली निर्माण केली की जिचे अनुकरणसुध्दा कोणी करू शकला नाही. मारिओने काढलेले चित्र पाहताच त्यानेच ते चित्र काढले आहे हे ओळखू येत असे. &lt;br /&gt;डॉ.पी.के अय्यंगार यांनी भारताच्या अणुशक्ती विभागाचे प्रमुखपद सांभाळले होतेच, पण डॉ.भाभांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचा पाया घालणा-या शास्त्रज्ञांमधले ते एक होते. वैज्ञानिकांच्या निवडीपासून त्यांचे प्रशिक्षण आणि प्रगती या सर्वांमध्ये ते जातीने लक्ष देत असत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;इंदिरा गोस्वामी ज्ञानपीठविजेत्या महान साहित्यिक होत्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सत्यसाईबाबांच्या एवढा अनुयायीवर्ग कोणालाही मिळाला नसेल. या काळामध्ये त्यांचे इतके असंख्य भक्तगण तयार झाले हाच त्यांनी दाखवलेला सर्वात मोठा चमत्कार म्हणता येईल. दुसरा कोणताही बाबा किंवा स्वामी या बाबतीत त्यांच्या जवळपाससुध्दा येणार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;स्व.पं.अशोक रानडे हे भारतीय संगीताचे ज्ञानकोश होते. संगीतशास्त्रावर त्यांनी केलेले संशोधन आणि लेखन, अध्यापन, व्याख्यान वगैरे माध्यमातून केलेले प्रबोधन अतुलनीय असेच होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;उस्ताद सुलतानखान यांनी सारंगी या भारतीय वाद्याची प्रतिष्ठा राखून ठेवली होती. परदेशातून आलेल्या व्हायोलिनपुढे सारंगी आता मागे पडत चालली असून दुर्मिळ होण्याच्या मार्गावर चालली आहे. सारंगीवादनाच्या कलेवर प्रभुत्व गाजवणार्‍या कलाकारांमध्ये उस्तादजींचे नाव प्रमुख होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाची पदं भूषवलेल्या पी. सी. अलेक्झांडर यांनी एकेकाळी देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ते खास विश्वासातले होते. त्यांचे प्रधान सचिव म्हणून ही ते काम पहात होते . पी.सी. अलेक्झांडर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील होते अन गांधी यांच्या महत्वाच्या निर्णयांवर पि.सी अलेक्झांडर यांचा प्रभाव होता. त्यांनी लिहीलेले 'My Years With Indira Gandhi' हे पुस्तक वाचण्यायोग्य आहे. &lt;br /&gt;जहांगीर सबावाला : महान चित्रकार ! जे स्वतःबध्दल फार कमी बोलत पण त्यांची चित्रे हि बोलकी होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीलाल शुक्ला : 'रंगदरबारी' चे लेखक ज्याचे अनुवाद १५ विविध भाषेत झाले ते हिंदी साहित्यातील महान लेखक यांचे ही निधन २०११ मध्येच झाले &lt;br /&gt;&lt;br /&gt;मणी कौल : ज्यांनी बॉलीवूड मध्ये पैरलल सिनेमाचे पायाभरणी केली. त्यांची नाटक / चित्रपट ' दुविधा', 'उसकी रोटी' , 'आषाढ़ का एक दिन' यांनी कलेचे अतिउच्च शिखर गाठले होते &lt;br /&gt;डॉ हरगोबिंद खुराना : भारतीय मूळ चे अमेरिकी वैज्ञानिक डॉ . हरगोबिंद खुराना यांनी नोबेल पारितोषिक मिळविले होते ज्यांनी जीव रसायन (बायोकेमेस्ट्री) मध्ये क्रांती आणली .&lt;br /&gt;वर्ष सरता सरता अखेरच्या दिवशी ख्यातनाम कवियत्री वंदना विटणकर यांनी देखिल जगाचा कायमचा निरोप घेतला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा इतक्या सगळ्या लोकांना २०११ या एकाच वर्षाने काळाच्या पडद्याआड नेले.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-7059588359599500844?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/7059588359599500844/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=7059588359599500844' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/7059588359599500844'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/7059588359599500844'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post_29.html' title='सोनेरी (पिकली) पाने'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-Wcs6-0a7-Ys/TwU1CNuOBzI/AAAAAAAABMw/Nlf_vaFEhHk/s72-c/PPaneRevisedS.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-8908594243251623393</id><published>2011-12-27T23:21:00.000-08:00</published><updated>2011-12-28T00:08:59.186-08:00</updated><title type='text'>किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग -४)</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;खोलीमध्ये लख्ख उजेड आहे की अंधुक प्रकाश आहे, ताटातला भात ऊन ऊन आहे की गारढोण आहे हे आपल्याला कोणीही न सांगता समजते. मात्र आपल्या शरीरातून कितीही क्ष किरण आरपार गेले तरी आपल्याला त्यांचा पत्ता लागत नाही. प्रयोगशाळांमध्ये आढळलेल्या काही अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घटनांची कारणे शोधतांना अदृष्य किरणांचे अस्तित्व समजले आणि तशा प्रकारच्या परिणामांवरून त्यांचे मोजणे सुरू झाले. या किरणांमधील ऊर्जेचा विचार करून राँट्जेन नावाचे एकक (युनिट) पूर्वी ठरवले गेले. पण हे किरण कोणत्याही वस्तूच्या आत शिरले आणि पुन्हा बाहेर पडले तर त्यांच्याकडे बरीच ऊर्जा शिल्लक असते. अर्थातच त्यामधील जेवढी ऊर्जा या प्रवासात खर्च झाली तेवढ्याचाच परिणाम त्या पदार्थावर होणार. याचा विचार करून रॅड (radioactivity absorbed dose) हे वेगळे युनिट बनवले गेले. पण निरनिराळ्या प्रकारच्या रेडिएशनमुळे होणारे हे परिणाम प्रत्येक पदार्थांच्या बाबतीत वेगळे असतात. माणसाच्या शरीरावर होणारे परिणाम आपल्या दृष्टीने महत्वाचे असतात. यासाठी रेम (Roentgen equivalent man) हे एकक वापरले जाते. वरील अमेरिकन युनिट्सच्या ऐवजी आता ग्रे(Gy) आणि सीव्हर्ट(Sv) ही आंतरराष्ट्रीय एकके इतर देशांमध्ये सर्रास उपयोगात आणतात. पण अमेरिकेत अजूनही पौंड, मैल आणि गॅलन चालतात, त्याच प्रमाणे या बाबतीतसुध्दा ते आपली जुनीच युनिटे वापरतात. या दोन्हींमध्ये १०० पटींचा फरक आहे. १ ग्रे म्हणजे १०० रॅड आणि एक सीव्हर्ट म्हणजे १०० रेम होतात. पण ही मूल्ये उपयोगाच्या दृष्टीने फार मोठी असल्यामुळे मायक्रोसीव्हर्ट (μSv) आणि मिलिरेम (mrem) या युनिट्समध्ये नेहमीचे काम चालते. मायक्रो म्हणजे दहालक्षांश आणि मिनि म्हणजे सहस्रांश असल्यामुळे १ मिलिरेम (mrem) म्हणजे १० मायक्रोसीव्हर्ट (μSv) होतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता या युनिट्समधील काही आकडेवारी पाहू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नैसर्गिक किंवा पार्श्वभूमीवरील किरणोत्सारामुळे मिळालेला सरासरी वार्षिक डोस (The average 'background' dose of natural radiation)&lt;br /&gt;जागतिक सरासरी २.४ मिलिसीव्हर्ट (mSv) - स्थानिक पातळ्या १ पासून १० मिलिसीव्हर्ट (mSv)&lt;br /&gt;अमेरिका ३६० मिलिरेम mrem - ३.६ मिलिसीव्हर्ट (mSv) -- काही ठिकाणी १००० मिलिरेम - १० मिलिसीव्हर्ट (mSv)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जास्तीच्या डोससाठी आयसीआरपीच्या वार्षिक मर्यादा - &lt;br /&gt;नेहमीसाठी - कामगारांसाठी २० मिलिसीव्हर्ट (mSv) - ५ वर्षांची सरासरी&lt;br /&gt;जनतेसाठी १ मिलिसीव्हर्ट (mSv) - १००० मायक्रोसीव्हर्ट (μSv)&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये - कामगारांसाठी १०० ते १००० मिलिसीव्हर्ट (mSv) &lt;br /&gt;जनतेसाठी २० ते १०० मिलिसीव्हर्ट (mSv) &lt;br /&gt;&lt;br /&gt;या मर्यादा फक्त अणुकामगारांसाठी नसून त्या इस्पितळे, कारखाने, खाणी, हवाई वाहतूक इत्यादी सर्व संबंधित क्षेत्रांसाठी आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतीय रिअॅक्टर्सचा अनुभव - जनतेसाठी&lt;br /&gt;जुने रिअॅक्टर्स - प्रतिवर्ष ७ ते ३० मायक्रोसीव्हर्ट (μSv) सरासरी सुमारे १३&lt;br /&gt;नवे रिअॅक्टर्स- प्रतिवर्ष ०.३ ते ७ मायक्रोसीव्हर्ट (μSv) सरासरी सुमारे २&lt;br /&gt;एईआऱबी मर्यादा १००० मायक्रोसीव्हर्ट (μSv)&lt;br /&gt;&lt;br /&gt;कामगारांना मिळालेला सरासरी डोस - ०.३ ते ४ मिलिसीव्हर्ट (mSv)&lt;br /&gt;एईआऱबी मर्यादा २० मिलिसीव्हर्ट (mSv)&lt;br /&gt;&lt;br /&gt;किरणोत्साराचा प्रभाव&lt;br /&gt;० ते १००० मिलिसीव्हर्ट (mSv) - काही नाही - रेफरन्स डोस&lt;br /&gt;&lt;br /&gt;१००० ते २००० मिलिसीव्हर्ट (mSv) - तात्पुरता थकवा&lt;br /&gt;२००० ते ३००० मिलिसीव्हर्ट (mSv) - थकवा, उलट्या - महिना ते वर्षभरात पुन्हा ठीक&lt;br /&gt;३००० ते ६००० मिलिसीव्हर्ट (mSv) - थकवा, उलट्या - मृत्यूची शक्यता&lt;br /&gt;६००० ते १०००० मिलिसीव्हर्ट (mSv) - भीषण थकवा - निश्चित मृत्यू&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमूक इतक्या डोसमुळे कँसर होतो अशी काही आकडेवारी उपलब्ध नाही. किरणोत्सारामुळे, अगदी नैसर्गिक कारणामुळेसुध्दा, तो होण्याची टक्केवारी थोडीशी वाढते. प्रदूषण, रासायनिक खते, जंतूनाशके, वनस्पती तूप, सेलफोन, पिझ्झा, बर्गर वगैरेंमुळे सुध्दा ती वाढते असे सांगितले जात असते. &lt;br /&gt;हिरोशिमा आणि नागासाकीवरील बाँबहल्ले आणि चेर्नोबिल येथील अपघात यामध्ये ज्या लोकांना एकाच वेळी खूप मोठा डोस मिळाला त्यामधील थोड्या लोकांना (प्रत्येकाला नाही) नंतर कँसर झाला. त्यामुळे अशा तीव्र किरणोत्सार मात्र घातक आहे असे म्हणता येईल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वरील डोसची आकडे वारी आणि परिणामांची माहिती यावरून असे दिसते की जनतेसाठी ठेवलेल्या मर्यादेच्या १००० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो.&lt;br /&gt;कामगारांसाठी असलेल्या सामान्य मर्यादेच्या ५० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतामधील जनतेला प्रत्यक्षात मिळत असलेला डोस वरील मर्यादांच्या एक शतांश इतका कमी आहे आणि नैसर्गिक डोसच्या मानाने १ ते ५ टक्के एवढाच आहे.&lt;br /&gt;आणि कामगारांना मिळणारा डोस मर्यादेच्या एक पंचमांश ते एक पन्नासांश आणि सुमारे नैसर्गिक डोसच्या एवढाच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुध्दा जनतेसाठी ठेवलेल्या मर्यादेच्या १० ते ५० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो.&lt;br /&gt;कामगारांसाठी असलेल्या सामान्य मर्यादेच्या १ ते १० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो. त्याच्याही दोनतीनपटीवर गेल्यास तो घातक ठरतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण अशी परिस्थिती चेर्नोबिलनंतर गेल्या पंचवीस वर्षात कधी आली नाही,&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला वाटते की हे आकडे पुरेसे बोलके आहेत. आता अणुशक्तीमुळे होत असणा-या किरणोत्साराला घाबरायचे की नाही हे आपल्यावर आहे. आदिमानव आगीलासुध्दा भीत असे, आजसुध्दा आगीमध्ये होरपळून मरणाच्या बातम्या रोज वाचायला मिळतात, पण एकंदरीत पाहता मानवाने अग्नीच्या भयावर विजय मिळवला आहे. धीटपणे आणि सावधपणे त्याचा उपयोग करून त्याने आपले पूर्ण जीवन बदलून टाकले आहे. किरणोत्साराच्या बागुलबुवाला घाबरून अणुशक्तीचा उपयोग करणेच टाळायचे की आवश्यक तेवढी सावधगिरी बाळगून तिचा उपयोग करून घ्यायचा हे आपणच ठरवायचे आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-8908594243251623393?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/8908594243251623393/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=8908594243251623393' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/8908594243251623393'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/8908594243251623393'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post_7027.html' title='किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग -४)'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-2067299944753624916</id><published>2011-12-27T09:23:00.000-08:00</published><updated>2011-12-27T09:23:27.242-08:00</updated><title type='text'>किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग -३)</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;अणुशक्तीकेंद्रांमधून बाहेर पडणा-या प्रत्यक्ष किरणोत्सारावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले गेले असले तरी याला दुसरी एक बाजू आहे. रिअॅक्टरमधून बाहेर काढलेले वापरलेले इंधन (स्पेंट फ्यूएल) कमालीचे रेडिओअॅक्टिव्ह असते. शिवाय त्यामधून एवढी जास्त ऊष्णता बाहेर पडत असते की विद्युतकेंद्र बंद असले तरीही त्या इंधनाला थंड करण्यासाठी त्यामधून पाण्याचा प्रवाह चालत रहावा यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. एरवी रिअॅक्टरमधून ऊष्णता बाहेर काढण्यासाठी त्यामधून जाणारे शीतलक (कूलंट), तसेच वापरलेले इंधन (स्पेंट फ्यूएल) थंड करण्यासाठी वापरलेले वेगळे पाणी यांमध्ये रेडिओअॅक्टिव्ह द्रव्यांचे कण मिसळलेले आणि विरघळलेले असल्यामुळे तेसुध्दा किरणोत्सारी बनते. हे पाणी क्षेपक(पंप), उष्णता-विनिमयक(हीट एक्स्चेंजर्स) आदि उपस्करांमधून (इक्विपमेंट्समधून) फिरत असते. निरनिराळ्या गाळण्यां(फिल्टर)मधून तसेच आय़ॉनएक्स्चेंजर्समधून त्याचे शुध्दीकरण केले जाते, तेंव्हा हा रेडिओअॅक्टिव्ह कचरा त्यात जमा होतो. याखेरीज रिअॅक्टरच्या सान्निध्यात येणारी यंत्रे, उपकरणे, पाण्याचे पाइप, टाक्या वगैरे सर्वच गोष्टी रेडिओअॅक्टिव्ह द्रव्यांच्या संसर्गाने दूषित (काँटॅमिनेटेड) होत असल्याने त्यांना स्वच्छ (डिकाँटॅमिनेट) करावे लागते. कधी कधी त्या बदलाव्या लागतात. यातून उत्पन्न झालेल्या सर्व किरणोत्सारी कच-याची विल्हेवाट अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. त्यासाठी प्रत्येक अणूशक्तीकेंद्रात एक मोठा वेस्ट मॅनेजमेंट विभाग असतो. केंद्रामधून बाहेर सोडल्या किंवा टाकल्या जाणा-या प्रत्येक पदार्थाची चाचणी करून त्याची उच्च, मध्यम आणि निम्न पातळीचा कचरा (हाय, मीडियम व लो लेव्हल वेस्ट) यात विभागणी केली जाते. त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची व्यवस्थित नोंद ठेवूनच नियमानुसार त्याची योग्य प्रकारे वासलात लावली जाते. &lt;br /&gt;पण काही कारणाने त्यातून काही द्रव्ये पर्यावरणात मिसळली गेली तर ती हवा, पाणी, अन्न यामधून माणसांच्या शरीरात प्रवेश करू शकतात. शरीरात जाऊन त्याचा भाग बनलेली किरणोत्सारी द्रव्ये अल्फा किंवा बीटा रे यांचे प्रक्षेपण करत असतील तर ते किरण शरीराच्या आतल्या इंद्रियांवर प्रभाव टाकू शकतात. चेर्नोबिलच्या अपघातात रिअॅक्टर व्हेसल आणि बिल्डिंगचे छप्पर उडून त्यांच्या आतील किरणोत्सारी द्रव्ये मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळून इतरत्र पसरली आणि त्यांच्यामुळे बरीच हानी झाली. फुकुशिमा येथील अपघातात त्यांचे प्रमाण प्रत्यक्षात मर्यादेच्या फारसे पलीकडे गेले नव्हते, तिथे झालेल्या किरणोत्सारामुळे कोणीही दगावले नाही किंवा पंगू झाले नाही. पण कदाचित तसे होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि प्रतिबंधक उपाय म्हणून लाख दोन लाख लोकांचे त्या भागामधून स्थलांतर करावे लागले होते. थ्री माइल आयलंडमध्ये यातले काहीच झाले नाही. बाहेर सारे आलबेल राहिले. फक्त रिअॅक्टरचा सत्यानाश झाल्यामुळे आर्थिक नुकसान तेवढे झाले. जगामधील इतर सुमारे चारशे रिअॅक्टर्समध्ये अशी आणीबाणीची वेळ कधी आली नाही. एकंदरीत पाहता अणुऊर्जाकेंद्रांचा सुरक्षेतिहास (सेफ्टी रेकॉर्ड) इतर कोणत्याही उद्योगापेक्षा खूप चांगला राहिलेला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वापरलेले इंधन (स्पेंट फ्यूएल) कुठे ठेवायचे हा एक सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे आणि त्याला अनेक बाजू आहेत. औष्णिक केंद्रांमधील कोळशाची राख पूर्वी एका मोठ्या उघड्या खड्ड्यात टाकून दिली जात असे, पण आता पर्यावरणावरील प्रभाव पाहता तिचा इतर कामांसाठी उपयोग करणे सक्तीचे झाले आहे. अणुऊर्जेमधले स्पेंट फ्यूएल अत्यंत किरणोत्सारी असल्यामुळे ते असे उघड्यावर टाकूनही देता येत नाही किंवा इतर कामांसाठी तिचा उपयोग करूनही घेता येत नाही. ते एका अभेद्य अशा कवचात गुंडाळून जमीनीखाली खोलवर पुरून ठेवणे हा एक उपाय आहे आणि काही प्रमाणात तो अंमलात आणला जात आहे. पण तो तरी किती सुरक्षित आहे ? शतकानुशतकानंतर ते कवच असेच अभेद्य राहणार आहे का ? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यांची खात्रीलायक तसेच व्यावहारिक (प्रॅक्टिकल) उत्तरे शोधण्यासाठी सर्वत्र संशोधन चालले आहे. कोळसा जळून गेल्यानंतर त्यातून धूर निघतो आणि राख शिल्लक राहते, त्यानंतर न जळलेला फारसा कोळसा शिल्लक रहात नाही. पण अणूइंधनाची गोष्ट वेगळी असते. सध्याच्या तंत्रज्ञानाप्रमाणे ऱिअॅक्टरमध्ये घातलेल्या इंधनापैकी एकादा टक्काच खर्च होते. त्यामधून बाहेर काढलेल्या इंधनातसुध्दा त्यातले निदान ९८ - ९९ टक्के इंधन शिल्लक असते आणि नवे तंत्रज्ञान विकसित झाल्यास भविष्यात त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. यामुळे आजचे स्पेंट फ्यूएल हा उद्याचा उपयुक्त असा कच्चा माल या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले जाते. ते सांभाळून ठेवण्यात सध्या तरी काहीच तांत्रिक अडचणही नाही. ते जर अतिरेक्यांच्या हाती लागले तर त्याचा दुरुपयोग होईल वगैरे शंका इतर कित्येक गोष्टींच्या बाबतीतसुध्दा काढता येतील. सध्या तरी ते इंधन कडेकोट बंदोबस्तात सांभाळून ठेवणे एवढाच चांगला उपाय आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मोटारीचा किंवा साखरेचा कारखाना चालत असतांना काही आपत्ती उद्भवली तर त्यातील सारी यंत्रे बंद करून ठेवता येतात, पण अणुविद्युतकेंद्र असे बंद करता येत नाही. त्यामध्ये चालत असलेली अणूंच्या विखंडनाची क्रिया कंट्रोल रॉड्सद्वारा पूर्णपणे थांबवली तरी आधीच्या विखंडनातून निर्माण झालेले नवे अणू अत्यंत उद्दीप्त (एक्सायटेड) झालेले असतात आणि त्यांच्या गर्भामधून ऊष्णता बाहेर पडतच राहते. ती हळू हळू शून्यावर येण्यास काही दिवस लागतात. तोपर्यंत अणुभट्टीला थंड करत राहणे अत्यंत आवश्यक असते. या वर्षी फुकुशिमा येथे झालेल्या अपघातात ते करता आले नाही. त्यामुळे रिअॅक्टरमधील पाण्याचे तपमान वाढत जाऊन त्याची वाफ झाली, त्याचा दाब वाढला, इंधनाचे तपमान वाढतच गेल्याने त्या पाण्यामधून हैड्रोजन वायू बाहेर पडला, तो रिअॅक्टर व्हेसलच्या बाहेर येऊन जमा झाला आणि त्याचा हवेशी संयोग होऊन स्फोट झाला. असे काही होऊ नये म्हणून इंधनाला थंड करण्यासाठी अनेक प्रकारच्या पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवलेल्या असतात आणि त्या आपले काम व्यवस्थित रीत्या सांभाळतात. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळात शेकडो रिअॅक्टर हजारो वेळा सुरळीतपणे बंद आणि सुरू झाले आहेत. या काळात फक्त तीन दुर्घटना घडल्या. थ्री माइल आयलंडमध्ये एका चुकीच्या निर्णयामुळे ही पर्यायी यंत्रणा थांबवली गेली. कोणत्याही चालकाला (ऑपरेटरला) तसे करताच येणार नाही अशी तरतूद त्यानंतर करण्यात आली आहे. चेर्नोबिल या एका वेगळ्या प्रकारच्या रिअॅक्टरमध्ये ती यंत्रणा एरवी काम करायची, पण दुर्घटनेच्या वेळी निर्माण झालेल्या विशिष्ट आणि गंभीर परिस्थितीमध्ये ती अपुरी पडली. त्या प्रकारचे रिअॅक्टर आता उभारले जात नाहीत. फुकुशिमामध्ये आलेल्या ऐतिहासिक सुनामी आणि भूकंपानंतरसुध्दा आधी सारे रिअॅक्टर त्या धक्क्यातून वाचले होते पण सुनामीने माजवलेल्या अनपेक्षित हाहाःकारात रिअॅक्टर्सना थंड ठेवणारी पर्यायी व्यवस्था कोलमडल्यामुळे तो तापत गेला. एकाच वेळी चारही पॉवर प्लँट्स बंद पडले, डिझेल इंजिने आणि डिझेलचे साठे महापुरात बुडाले, बाहेरून वीज आणणारे विजेचे खांब पडले, रस्ते उध्वस्त झाले, यामुळे बाहेरून मदत मिळणे अशक्य झाले. अशी अनेक संकटे एकदम आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती उद्भवत गेली. आतापर्यंत ज्या दुर्घटना घडल्या त्यांच्यापासून धडे घेऊन सुधारणा होत आल्या आहेत, आता फुकुशिमा येथील घटनाक्रमाचाही विचार करून भविष्यात यावरही मात केली जाईल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मोटार किंवा साखर कारखाना जेंव्हा अखेर बंद पडतो तेंव्हा तिथली सगळी जुनी यंत्रसामुग्री काढून टाकून त्या जागी आणखी काही करता येते. पण अणूशक्तीकेंद्राच्या बाबतीत तसे करता येत नाही. त्या केंद्रामधील यंत्रसामुग्रीच नव्हे तर मुख्य इमारतीसुध्दा दूषित झालेल्या असतात. त्यातील प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक तपासून त्यांची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असते. याला डीकमिशनिंग असे म्हणतात. यासाठी भरपूर खर्च तर येतो, पण त्यातून काहीच उत्पन्न मिळत नाही. इथल्या वस्तू भंगार म्हणूनसुध्दा विकता किंवा वापरता येत नाहीत. तिथल्या मातीतसुध्दा काही रेडिओअॅक्टिव्ह द्रव्ये मुरलेली असल्यामुळे ती जमीन सहजासहजी इतर कामासाठी उपयोगात आणण्यात अडचणी येण्याची शक्यता असते. पहिल्या पिढीमधील पॉवर स्टेशन्स आता या अवस्थेला पोचली आहेत. हा खर्च करण्यासाठी खाजगी कंपन्या तयार नसतील किंवा त्याच बंद पडल्या तर त्यासाठी कोण पैसे देईल ? या मुद्द्यावर वादविवाद चालले आहेत. भारतामध्ये आतापर्यंत बांधलेली सर्व अणूविद्युत केंद्रे सरकारच्याच किंवा सरकारी कंपनीच्या मालकीची असल्यामुळे ती सरकारचीच जबाबदारी पडते. पेन्शन फंडासारखी काही आर्थिक तरतूद सुरुवातीपासून केली तर त्यामधून भविष्यकाळात निधी जमा होऊ शकेल. सध्या तरी जुनी केंद्रे चालतील तेवढी चालवत रहायची असे धोरण अवलंबले जात आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अॅटॉमिक रिअॅक्टर आणि अॅटम बाँब या दोन्हींमध्ये अणूचे विघटन या एकाच क्रियेचा उपयोग होत असल्यामुळे अणुशक्तीकेंद्रात कोठल्याही क्षणी आण्विक विस्फोट होऊ शकतो अशी बेफाम विधाने काही लोक करतांना दिसतात. पण या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. त्यांच्या रचना संपूर्णपणे निराळ्या असतात. बिरबलाने झाडाच्या उंच फांदीवर टांगलेल्या मडक्यातली खिचडी कदाचित कधीतरी शिजेलही, पण अणुभट्टीचे रूपांतर अणूबाँबमध्ये होण्याची शक्यता तेवढीही नसते. अणुविद्युतकेंद्र सुरू केल्यानंतर त्याची शक्ती(पॉवर) शून्यापासून क्षमतेपर्यंत वाढवण्यासाठी विघटन क्रिया थोडी तीव्र करावी लागते आणि त्याची व्यवस्था केलेली असते. पण ती क्षमतेच्या पलीकडे जाऊ लागली, किंवा जास्तच वेगाने वाढायला लागली तर ताबडतोब पूर्णपणे बंद पडावी अशी व्यवस्था असते. रिअॅक्टर बंद पडला तरी चालेल, पण अनियंत्रित होता कामा नये या पायावर त्याची नियंत्रक यंत्रणा (कंट्रोल सिस्टिम) उभारलेली असते. त्यामुळे अपघाताने तर नाहीच, पण घातपाती कृत्याने सुध्दा असे होऊ शकत नाही. &lt;br /&gt;एवढे गुणात्मक (क्वालिटेटिव्ह) विवरण झाल्यानंतर आता थोडी महत्वाची आकडेवारी पाहू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;. . . . . . . . . .. (क्रमशः)&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-2067299944753624916?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/2067299944753624916/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=2067299944753624916' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/2067299944753624916'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/2067299944753624916'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post_27.html' title='किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग -३)'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-6352159193248031534</id><published>2011-12-26T21:40:00.000-08:00</published><updated>2011-12-26T21:40:45.937-08:00</updated><title type='text'>किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग -२)</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-lfIu-z-8TbM/TvlZDVrwF2I/AAAAAAAABLE/SuKW7ghtAfY/s1600/FissionRadiation.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="213" rea="true" src="http://3.bp.blogspot.com/-lfIu-z-8TbM/TvlZDVrwF2I/AAAAAAAABLE/SuKW7ghtAfY/s320/FissionRadiation.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;अणुशक्ती आणि किरणोत्सार यांचा घनिष्ठ संबंध आहे.&amp;nbsp; अण्वस्त्रे आणि अणुविद्युतकेंद्रे या दोन्हींमध्ये अणूंचे विघटन किंवा भंजन (फिशन) या क्रियेमुळे त्यामधून ऊर्जा बाहेर पडते. या क्रियेमध्ये युरेनियम २३५ या मूलद्रव्याच्या अणूचा न्यूट्रॉनशी संयोग झाला तर तो मोठा अणू दुभंगला जाऊन त्यातून दोन लहान अणू निघतात, तसेच दोन किंवा तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे विमोचन होते. हे नवे अणू&amp;nbsp; किरणोत्सारी द्रव्यांचे असतात.&amp;nbsp; अल्फा, बीटा व गॅमा रे हे किरणोत्सर्गाचे तीन मुख्य प्रकार आहेतच, पण या सर्वाहून न्यूट्रॉन्स अधिक घातक असतात. ते थेट अणुगर्भातच प्रवेश करतात आणि चांगल्या अणूला उद्दीप्त (एक्साइट) करून त्याला किरणोत्सर्गी (रेडिओअॅक्टिव्ह) बनवतात. त्यानंतर तो अणू किरणोत्सर्ग करतच राहतो. अशा प्रकारे आण्विक विखंडनामधून सर्व प्रकारचे किरणोत्सार होतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आण्विक क्रियांमधून (न्यूक्लियर रिअॅक्शनमधून) होणा-या किरणोत्साराची कल्पना शास्त्रज्ञांना असल्यामुळे त्यापासून कोणाला इजा पोहोचू नये याची विशेष काळजी अगदी पहिल्या प्रायोगिक रिअॅक्टरपासून घेतली जात आली आहे. ती कशा प्रकारची असते हे पाहण्याआधी किरणोत्साराबद्दल थोडी माहिती घ्यायला हवी. निरनिराळ्या मूलद्रव्यांपासून होत असणारे किरणोत्सार एकसारखे नसतात. अल्फा, बीटा व गॅमा रे हे तीन प्रकारचे किरण आणि न्यूट्रॉन्स या चार मुख्य प्रकारांमध्ये पुन्हा असंख्य उपप्रकार असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-B1pNDMjwE2E/TvlZmuOGNyI/AAAAAAAABLQ/rFLRCZ6q51M/s1600/RadiationProtectionMarathi.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="228" rea="true" src="http://3.bp.blogspot.com/-B1pNDMjwE2E/TvlZmuOGNyI/AAAAAAAABLQ/rFLRCZ6q51M/s320/RadiationProtectionMarathi.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;अल्फा रेमध्ये मोठी शक्ती असली तरी त्यांची भेदकता (पेनेट्रेशन) अगदी कमी असते. ते साध्या कागदाच्यासुध्दा आरपार जात नाहीत. बीटा रे त्या मानाने जास्त भेदक असले तरी ते सुध्दा अॅल्युमिनियमच्या पातळ पत्र्या(फॉइल)सारख्या लहानशा संरक्षक कवचा(शील्डिंग)ने थांबवले जातात. अल्फा रे निर्माण करणारा पदार्थ पुठ्ठ्याच्या खोक्यात आणि बीटा रे करणारा पदार्थ पत्र्याच्या डब्यात बंद करून ठेवला तरी ते किरण त्यांच्या बाहेर येत नाहीत. त्यामुळे रिअॅक्टरमधील समस्थानिकांमधून निघालेले अल्फा आणि बीटा रे त्याच्या आतच राहतात. गॅमा रे मात्र अत्यंत भेदक असतात. क्ष किरण आपली त्वचा व मांसपेशींना भेदून आरपार जातात पण हाडांमधून जाऊ शकत नाहीत, गॅमा रे त्यांच्यासुध्दा आरपार जातात. लोह, शिसे यासारख्या जड पदार्थांचे जाड कवच किंवा काँक्रीटच्या जाड भिंतीच त्यांची तीव्रता कमी करू शकतात. न्यूट्रॉन्स तर शिशासारख्या जड पदार्थाला जुमानत नाहीत, पण पाण्यासारख्या तरल पदार्थाने शांत होतात. त्यांना थोपवण्याचे काम काँक्रीटच्या जाड भिंतीच करतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;न्यूट्रॉन्सचे उत्सर्जन फक्त युरेनियमच्या अणूंचे विघटन चालले असतांनाच होते. ते थांबले की काही सेकंदानंतर न्यूट्रॉन्सचा मागमूससुध्दा शिल्लक रहात नाही. पण रिअॅक्टर चालत असतांना त्यामधून निघणा-या न्यूट्रॉन्सना थोपवून धरून त्यांचे पूर्ण शोषण करण्यासाठी रिअॅक्टरच्या सर्व बाजूने खूप जाड भिंती बांधून भरभक्कम सुरक्षा कवचाची (शील्डिंगची) व्यवस्था केली जाते, तसेच रिअॅक्टर चालत असतांना कोणीही त्याच्या आसपास फिरकू शकत नाही.&amp;nbsp; रिअॅक्टर पात्रा(व्हेसल)च्या आजूबाजूचे सर्व भरभक्कम कप्पे (व्हॉल्ट्स) सीलबंद करून त्यांना कुलूप लावल्याखेरीज रिअॅक्टरमध्ये विखंडनाची साखळी क्रिया सुरूच होणार नाही असा पक्का बंदोबस्त (फूलप्रूफ इंटरलॉक्स) केलेला असतो. ती क्रिया चालत असतांना ती कुलुपे उघडून कोणीही आत जाऊ शकणार नाही याची इंटरलॉकद्वारा संपूर्ण काळजी घेतली जाते. रिअॅक्टरच्या कार्यात कसलाही बिघाड होण्याची नुसती शंका आली तरी साखळी क्रिया आपोआप ताबडतोब थांबवण्याच्या अनेक सुरक्षा प्रणाली (सेफ्टी सिस्टिम्स) प्रत्येक रिअॅक्टरमध्ये बसवलेल्या असतात. त्या सगळ्या कार्यान्वित न झाल्याची घटना आजतागायत घडलेली नाही आणि तसे घडण्याची शक्यता शून्याएवढीच आहे. अमेरिकेमधील थ्री माइल आयलंड आणि या वर्षीची फुकुशिमा या दोन्ही मोठ्या अपघातांमध्ये रिअॅक्टरमधील विघटनाची साखळी प्रक्रिया (चेन रिअॅक्शन) त्यांच्या नियंत्रण प्रणालीं(कंट्रोल सिस्टिम्स)कडून आपोआप बंद झालीच होती. सोव्हिएट युनियममधील चेर्नोबिलचा अपघात तेथील रिअॅक्टरमधील चेन रिअॅक्शन थांबवल्यानंतर घडला होता. त्यामुळे आतापर्यंत फक्त हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणीच न्यूट्रॉन्सचा झोत माणसांना सहन करावा लागला आहे. अणूबाँबच्या चाचण्या घेतल्या जात असतांना त्यातून क्षणभरासाठी न्यूट्रॉन्सचा किरणोत्सार होतो, पण अशा चाचण्या निर्जन प्रदेशातच घेतल्या जातात. भविष्यकाळातील युध्दांमध्ये अण्वस्त्रांचा उपयोग होण्याची शक्यता मात्र आहे आणि तो झाला तर त्यात किरणोत्सारही होणार. &lt;br /&gt;&lt;br /&gt;न्यूट्रॉन सोडून इतर तीन प्रकारचा किरणोत्सार त्या किरणोत्सारी (रेडिओअॅक्टिव्ह) समस्थानिका(आयसोटोप)च्या जन्माबरोबर सुरू होतो आणि तो कोणत्याही उपायाने थांबवता येणे अशक्य असते. मात्र त्याची तीव्रता आपोआपच कमी होत जाते. एका उंच व मोठ्या टाकीत पाणी भरून ठेवले आणि त्याच्या तळाशी असलेला नळ उघडला तर सुरुवातीला त्यातून अतीशय जोराने पाणी बाहेर येते. टाकीमधील पाण्याची पातळी कमी होत जाते तसतसा नळातून बाहेर पडणा-या पाण्याचा जोर कमी होत जातो. टाकीमधले पाणी तिच्या तळाशी गेल्यावर नळातूनसुध्दा पाण्याची बारीक धार येते आणि अखेर ती थांबते. हा नळ पूर्णपणे उघडून ठेवला तर पाणी जोरात येते आणि टाकी लवकर रिकामी होते, पण तो नळ बंद करून ठेवला आणि त्यानंतरही तो जरासा गळत असला तर ती टाकी हळूहळू रिकामी होते आणि तिच्यामधील पाण्याची गळती दीर्घ काळापर्यंत चालत राहते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;किरणोत्साराचेसुध्दा असेच आहे. तो करणारे समस्थानिक जन्माला येते तेंव्हा त्याच्या अणूगर्भात आवश्यकतेहून जास्तीची ऊर्जा ठासून भरलेली असते. किरणांच्या उत्सर्जनामधून ती कमी कमी होत जाते. पण जसजशी ती जादा ऊर्जा कमी होईल त्यानुसार तिच्या उत्सर्जनाचा वेग कमी होतो. एका क्षणी त्या उत्सर्जनाची जेवढी तीव्रता असते ती ठराविक कालावधीनंतर तिच्या अर्धी होते. या कालावधीला अर्धायु (हाफ लाइफ) म्हणतात. एकाद्या प्रकारच्या किरणांच्या उत्सर्जनाचे अर्धायु एक दिवस एवढे असेल, तर त्याची तीव्रता उद्या निम्मी, परवा पाव, तेरवा एक अष्टमांश अशा रीतीने कमी होत जाते. ज्या समस्थानिकांमधून अत्यंत तीव्र गतीने किरणोत्सार होतो त्यांचे अर्धायु कमी असते. काही बाबतीत ते काही मिनिटे एवढेच असते आणि एक दोन दिवसात त्याची तीव्रता नगण्य होऊन जाते. याच्या उलट काही समस्थानिकांचे अर्धायु लक्षावधी वर्षे असते. युरेनियम व थोरियम हे नैसर्गिक किरणोत्सारी पदार्थ कोट्यावधी वर्षांपासून उत्सर्जन करत आले आहेत. पण त्याची तीव्रता अत्यंत कमी असते. &lt;br /&gt;नैसर्गिक युरेनियम हेच मुळात क्षीण किरणोत्सारी असते. त्यातून बाहेर पडणारे अल्फा किरण आपल्या अंगावरील कपड्यांनासुध्दा भेदू शकत नाहीत, त्वचेला तर नाहीतच.&amp;nbsp; "भारतातल्या युरेनियम खाणींच्या आसपासचे लोक लुळेपांगळे होत आहेत हो!" अशी खोडसाळ बातमी एकाद्या परदेशातल्या वर्तमानपत्राने दिली तर त्यामुळे आपल्याला भेदरून जाण्याचे काडीमात्र कारण नाही. अतीशय वेगाने प्रवास करणारे अत्यंत सूक्ष्म असे गॅमा रे एका बाजूने जसे शरीरात घुसले तसेच दुस-या बाजूने बाहेर पडले तर कदाचित त्याने फारसा काही अपाय होणार नाही. पण ते वाटेत कित्येक अणूंना धडक देऊन त्यांचे मूलकीकरण (आयोनायझेशन) करतात. त्यामुळे काही पेशी मरतात तर काही बदलतात, यामुळे घोटाळा होऊ शकतो. अणुविद्युत केंद्राच्या कोणत्या भागात कोणत्या प्रकारची किरणोत्सर्गी समस्थानिके केवढ्या प्रमाणात तयार होतात आणि साठत जातात याबद्दल आता भरपूर माहिती आणि अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यांच्या सभोवती पुरेसे संरक्षक कवच उभारले जाते. त्या ठिकाणी काम करणा-या लोकांना चांगले प्रशिक्षण दिले जाते. किरणोत्सर्गापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे तीन मुख्य नियम आहेत. ज्या भागात असे किरण येतात त्या भागात कमीत कमी वेळ राहणे, किरणोत्साराच्या स्त्रोतापासून जास्तीत जास्त दूर जाणे आणि पुरेशा कवचाचा उपयोग करणे. यांच्या आधारे प्रत्येक कामाचे तरशीलवार नियोजन करून त्याची रंगीत तालीम (रिहर्सल) घेतली जाते आणि त्यानुसार ते केले जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अणुविद्युतकेंद्रामध्ये ठिकठिकाणी, तसेच त्याच्या परिसरात, शिवाय पाच, दहा, पंधरा, वीस किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी किरणोत्सार मोजणारी उपकरणे बसवलेली असतात. त्यामधून सतत मिळत असलेल्या माहितीची छाननी केली जात असते आणि कोठेही अनपेक्षित वाढ दिसली तर त्यावर उपाययोजना केली जाते. वाढ नसली तरी या वर्षी जेवढे प्रमाण दिसत आहे त्यापेक्षा ते पुढील वर्षी कसे कमी करायचे यावर विचार करून उपकरणे आणि कार्यपध्दती यामध्ये सुधारणा केल्या जात असतात. त्यामुळे या केंद्रामधून प्रत्यक्ष होणारा किरणोत्सार अत्यंत अल्प असतो. पृथ्वीवरील अनेक जागी नैसर्गिक किरणोत्साराचे जेवढे प्रमाण असते तेवढेसुध्दा इतर ठिकाणच्या अणुविद्युतकेंद्रांच्या प्रवेशद्वाराजवळ नसते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नियामक संस्था या किरणोत्सारावर बारकाईने नजर ठेऊन असतात. याबद्दलची माहिती वेळोवेळी अहवालांमधून प्रसिध्द केली जाते. त्यामुळे "अणुशक्तीकेंद्रांमधून सतत मोठ्या प्रमाणात किरणोत्सार होत राहतो" असा अपप्रचार कोणी करत असेल तर तो धादांत खोटा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;. . . . . . .&amp;nbsp; . . . . . . . . . . . .&amp;nbsp; (क्रमशः)&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-6352159193248031534?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/6352159193248031534/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=6352159193248031534' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/6352159193248031534'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/6352159193248031534'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post_2819.html' title='किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग -२)'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-lfIu-z-8TbM/TvlZDVrwF2I/AAAAAAAABLE/SuKW7ghtAfY/s72-c/FissionRadiation.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-8203469999871265327</id><published>2011-12-26T06:53:00.000-08:00</published><updated>2011-12-26T06:53:12.981-08:00</updated><title type='text'>किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा?  (भाग -१)</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;"पुस्तकामध्ये छापलेल्या प्रत्येक समीकरणामुळे त्याची वाचनीयता निम्म्याने कमी होते" असे काहीसे एका थोर शास्त्रज्ञाने त्याच्या एका विज्ञानविषयक जगप्रसिध्द पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिले आहे. त्याचप्रमाणे कोष्टके, संदर्भसूची, अनोळखी पारिभाषिक शब्द यांचाही वाचनीयतेवर परिणाम होतो असा माझा अनुभव आणि अडाखा असल्यामुळे या सर्वांना टाळण्याचा प्रयत्न या लेखात मी केला आहे. मात्र विज्ञानासंबंधीच्या लेखात नेमकेपणासाठी त्याची परिभाषा येणारच, याला इलाज नाही. वाचकांच्या सोयीसाठी अनोळखी मराठी पारिभाषिक शब्दांच्या जोडीला मूळ इंग्रजी शब्द कंसात दिले आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीच्या वेळी आपण एकाद्या अंधा-या खोलीतला दिवा लावतो तेंव्हा लगेच ती प्रकाशाने उजळून निघते आणि त्या खोलीमधील वस्तू आपल्याला दिसतात. दिवा बंद करताच पुन्हा अंधार गुडुप होऊन काही दिसेनासे होते. थोडेसे खोलात जाऊन पाहिल्यास प्रत्यक्षात असे घडते की आपण दिव्याचे स्विच दाबताच विजेला त्यातून जाण्याचा मार्ग मोकळा होतो आणि बल्बला जोडलेल्या तारांमधून विजेचा प्रवाह वाहू लागतो. तांब्याच्या जाड तारा या प्रवाहाला अत्यल्प विरोध करतात आणि फारशा तापत नाहीत, पण बल्बमधील नायक्रोम नावाच्या धातूच्या तलम तारां(फिलॅमेंट्स)मधून जातांना विजेच्या प्रवाहाला प्रखर विरोध होतो आणि त्यामुळे विजेमधील सुप्त ऊर्जा ऊष्णतेच्या रूपात प्रकट होते. त्याने तप्त झालेल्या फिलॅमेंट्समधून प्रकाश आणि ऊष्णता बाहेर पडते आणि सर्व बाजूंना पसरते. खोलीच्या भिंती, जमीन, छप्पर आणि खोलीमधील सर्व वस्तूंवर पडत असलेल्या प्रकाशाचा काही भाग त्या प्रत्येकात शोषला जातो आणि उरलेला परावर्तित होतो आणि पू्र्णपणे शोषला जाईपर्यंत तो पुनःपुन्हा एकमेकावरून परावर्तित होत राहतो, म्हणजे तो सर्व बाजूंनी पसरत जातो. त्यामुळे खोलीच्या एकाच कोप-यात दिवा असला तरी आपल्याला सर्व बाजूंना उजेड दिसतो. वस्तूंवरून निघालेले जे परावर्तित किरण आपल्या डोळ्यात शिरतात त्यामुळे आपल्याला त्या वस्तू दिसतात. दिवा बंद होताच दिसण्याची क्रिया थांबते. पण त्यानंतर लगेच बल्बला हात लावून पाहिल्यास चटका बसतो कारण बल्बच्या काचेमध्ये प्रकाश साठवून ठेवला जात नाही, पण ऊर्जा साठवून ठेवली जाते आणि विजेचा प्रवाह वाहणे थांबल्यानंतरसुध्दा ती ऊष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडत राहते. बल्ब पूर्णपणे थंड झाल्यानंतरसुध्दा ती बाहेर पडत असतेच, पण जेवढी ऊष्णता बाहेर पडेल तेवढीच ऊष्णता आजूबाजूने त्याच्याकडे येत राहिल्यामुळे त्याचे तपमान स्थिर राहते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-y33ghvSq7fI/TviKMroMcXI/AAAAAAAABK4/nLrBH6OpcQA/s1600/EM_Spectrum_Properties_Marathi.bmp" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="192" rea="true" src="http://2.bp.blogspot.com/-y33ghvSq7fI/TviKMroMcXI/AAAAAAAABK4/nLrBH6OpcQA/s320/EM_Spectrum_Properties_Marathi.bmp" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रकाश आणि ऊष्णता या दोन्ही स्वरूपात बल्बमधून बाहेर पडणारी ऊर्जा एकाच मूलभूत पध्दतीने सर्व दिशांना बाहेर पडते. याला उत्सर्जन (रेडिएशन) असे म्हणतात. (त्याशिवाय वहन आणि अभिसरण या दोन वेगळ्या मार्गांनीसुध्दा ऊष्णता पसरत जाते). ऊर्जेचे हे रेडिएशन विद्युत चुंबकीय लहरींमधून (इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज) होत असते. कंपनसंख्या (फ्रिक्वेन्सी) आणि तरललांबी (वेव्हलेंग्थ) हे या लहरींचे मुख्य स्वभावधर्म (कॅरेक्टरिस्टिक्स) असतात. त्यानुसार त्यांचे इतर गुणधर्म ठरतात. सर्वात कमी कंपनसंख्या असलेल्या आणि अत्यंत सौम्य अशा रेडिओ लहरींपासून मायक्रोवेव्हज, अवरक्त(इन्फ्रारेड), दृष्य(व्हिजिबल), जंबूपार (अतीनील किंवा अल्ट्राव्हायोलेट), क्ष किरण (एक्सरे) असे करत करत सर्वाधिक कंपनसंख्येच्या अत्यंत रौद्र प्रकृतीच्या गॅमा रे पर्यंत विविध प्रकारच्या किरणांचा समावेश यात होतो. ३८० नॅनोमीटर ते ७६० नॅनोमीटर एवढी सूक्ष्म वेव्हलेंग्थ किंवा ७९० टेराहर्ट्ज ते ४०० टेराहर्ट्ज इतकी प्रचंड कंपनसंख्या या एवढ्या विशिष्ट अशा दृष्य वर्णपटामधील (visible spedtrum) लहरींपासून आपल्याला रंगांचा बोध होतो म्हणजे या पट्ट्यामधील किरणांमुळे ते जेथून आले असतील त्या वस्तू आपल्याला दिसतात. संपूर्ण वर्णपटाचा विस्तार जवळजवळ शून्यापासून अनंता(इन्फिनिटी)पर्यंत वेव्हलेंग्थ्स इतका आहे. विद्युत चुंबकीय लहरींच्या या एकंदर विस्ताराच्या मानाने दृष्य लहरींचा पट्टा (रेंज) अत्यंत अरुंद आहे. ऊष्णतावाहक लहरी म्हणजे मध्यम इन्फ्रारेड लहरींची कंपनसंख्या दृष्य प्रकाशलहरींहून कमी असते आणि क्ष किरण, गॅमा रेज वगैरेंची फ्रिक्वेन्सी खूप पटींनी जास्त असते. या किरणांपासून आपल्याला दृष्टीबोध होत नाही. म्हणजे अंधारात ठेवलेल्या कोणत्याही वस्तूपासून फक्त हेच किरण आपल्या डोळ्यापर्यंत येऊन पोचले तर ती वस्तू आपल्याला या किरणांमध्ये दिसत नाही. त्यांना अदृष्य किरण असेही म्हंटले जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्यापासून आपल्याला मुख्यतः प्रकाश आणि ऊष्णता मिळते आणि यावरच आपले सारे जीवन चालते. पण दृष्य प्रकाशकिरण आणि अदृष्य अशा ऊष्णतेच्या किरणांखेरीज इतर अनेक प्रकारचे अदृष्य किरणसुध्दा काही प्रमाणात सूर्यप्रकाशामधून आपल्याकडे येतच असतात. इन्फ्रारेडपासून गॅमारेजपर्यंत सर्वांचा त्यात समावेश असतो. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणातून येतांना यातले बरेचसे किरण त्यात, विशेषतः त्यामध्ये असलेल्या ओझोन वायू आणि वाफ यांचेमध्ये शोषले जातात किंवा परावर्तित होतात, पण उरलेले आपल्यापर्यंत पोचतातच. दूरच्या ता-यांपासून निघालेले प्रकाशकिरण आपल्यापर्यंत पोचल्यामुळेच आपण त्यांना पाहू शकतो. त्यांच्याकडून निघणारे काही अदृष्य किरण देखील आपल्यापर्यंत येऊन पोचतात. अशा प्रकारे वैश्विक किरणांमधून (कॉस्मिक रेज) आपल्यावर अनेक प्रकारच्या किरणांचा वर्षाव होतच असतो आणि आपल्यावर त्यांचे जे काही बरे वाईट परिणाम व्हायचे ते होतच असतात. विमानांचे उड्डाण अत्यंत विरळ हवेतून होत असल्यामुळे जे लोक विमानामधून प्रवास करतात ते प्रत्येक प्रवासात या किरणांचा जादा डोस घेऊन येतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कोणतेही पदार्थ प्रकाशाला साठवून ठेवत नसले तरी काही पदार्थ अंधारात चमकतांना दिसतात. त्यांना प्रस्फूरक (फ्लुओरसंट) असे म्हणतात. हे पदार्थ आधी त्यांच्यावर पडलेल्या प्रकाशातून त्यांना मिळालेल्या ऊर्जेचे नंतर हळूहळू एका वेगळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांचे द्वारा उत्सर्जन करतात. अशा पदार्थांवर संशोधन करतांना शास्त्रज्ञांना असे दिसले की काही पदार्थ स्वयंप्रकाशमान असतात. त्यांच्यावर आधी प्रकाश पडलेला नसतांनासुध्दा त्यांचे उत्सर्जन चाललेले असते. हे प्रकाशकिरण अदृष्य अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांचे असतात असे अधिक संशोधनावरून समजले. ग्रीक वर्णमालेमधील पहिली तीन अक्षरे अल्फा, बीटा आणि गॅमा अशी नावे त्यांना दिली गेली. रे़डियम, युरेनियम, थोरियम, रे़डॉन आदि काही मूलद्रव्यांमधून अशा प्रकारचे किरण उत्सर्जित होत असतात. या पदार्थांना किरणोत्सारक (रेडिओअॅक्टिव्ह) असे संबोधतात. यापैकी घनरूप पदार्थांचे साठे भूगर्भामध्ये आहेत, तर वायुरूप द्रव्ये आपल्या वातावरणात मिसळलेली असतात आणि काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळलेले असतात. त्यांच्यामधून निघणारे किरण आपल्यापर्यंत सारखे येतच असतात. शिवाय कर्ब (कार्बन), सोडियम, पोटॅशियम, लोह आदि ज्या पदार्थांपासून आपले शरीर बनलेले असते त्यांच्यातसुध्दा सूक्ष्म प्रमाणात त्यांची किरणोत्सारक समस्थानिके (आयसोटोप्स) असतातच. कोणत्याही प्राण्याच्या शरीरामधून किंवा वनस्पतीमधून बाहेर पडत असलेल्या किरणोत्साराचे अत्यंत संवेदनशील (सेन्सिटिव्ह) अशा उपकरणाने मापन केले तर ते मोजता येण्याइतके निघते. त्या मीटरची सुई सरकते किंवा डिजिटल असेल तर एकादा आकडा दाखवते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-7p6az-irgBw/TviJvV4z6cI/AAAAAAAABKs/ncbCPfWHBIA/s1600/alphaBetaGammarays.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="233" rea="true" src="http://1.bp.blogspot.com/-7p6az-irgBw/TviJvV4z6cI/AAAAAAAABKs/ncbCPfWHBIA/s320/alphaBetaGammarays.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या तीनांपैकी अल्फा रेज हे किरण नसून सूक्ष्म कण असतात. यातील प्रत्येक कणामध्ये दोन प्रोटॉन्स आणि दोन न्यूट्रॉन्स असतात, मात्र त्यांच्यासोबत एकही इलेक्ट्रॉन नसतो. अणूच्या अंतर्गत रचनेवर विचार करता असे मानले जाते की त्याच्या मध्यभागी एक अणूगर्भ (न्यूक्लियस) असतो आणि अनेक ऋणाणू (इलेक्ट्रॉन्स) निरनिराळ्या कक्षांमधून त्या अणूगर्भाला घिरट्या घालत असतात. ते नसल्यामुळे अल्फा कण (पार्टिकल) म्हणजेच हीलीयम या मूलद्रव्याचा अणूगर्भ (न्यूक्लियस) असतो. हीलियमच्या अणूमधले इलेक्ट्रॉन्स वगळले तर हा कण बनेल यामुळे त्याला हीलियमचा आयॉन असेही म्हणता येईल. बीटा रेज म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे कणच असतात. ते सुध्दा किरण नसतात. गॅमा रेज मात्र वर दिल्याप्रमाणे अदृष्य किरण असतात. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांचे वास्तव्य फक्त अणूच्या गर्भातच असल्यामुळे अल्फा रेजचा उगम तेथूनच होऊ शकतो. अणूगर्भाच्या सभोवती इलेक्ट्रॉन्स भ्रमण करत असले तरी बीटा रेजमधले इलेक्ट्रॉन्स मात्र अणूगर्भाच्या विघटनातून तयार होऊन तिथून बाहेर पडतात. अत्यंत शक्तीशाली असे गॅमा रेजसुध्दा अणूगर्भामधून बाहेर येतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हीलियम हा एक निष्क्रिय वायू (इनर्ट गॅस) आहे. तो एकलकोंडा रहात असल्यामुळे त्याचा कोणाशीच संयोग होत नाही आणि तसे पाहता तो निरुपद्रवी असतो. आपल्या शरीराच्या अणूरेणूंमध्ये इलेक्ट्रॉन्स भरलेले असतात. अनेक प्रकारचे किरण आपल्या आसमंतात सतत पसरतच असतात. मग या अल्फा, बीटा, गॅमामुळे एवढी दहशत का वाटावी ? याचे एकच समान कारण आहे, ते म्हणजे हे तीघेही महाशक्तीमान असतात. यांचेमुळे नासधूस होऊ शकते तसेच पदार्थांचे मूलकीकरण (आयोनायझेशन) होऊ शकते. मूलद्रव्यांच्या अणूमधला सर्वात बाहेरचा एकाददुसरा इलेक्ट्रॉन कमी झाला किंवा त्यांची संख्या वाढली तर त्या अणूचे रूपांतर आयॉनमध्ये होते. उदाहरणार्थ सोडियम आणि क्लोरिन यांच्या संयोगाने मीठ बनते, या क्रियेत सोडियमच्या अणूमधला एक इलेक्ट्रॉन क्लोरिनच्या अणूभोवती फिरू लागतो आणि दोघांचा मिळून सोडियमक्लोराइड हा रेणू होतो. एका इलेक्ट्रॉनशिवाय सोडियम अणू आणि एक जास्तीचा इलेक्ट्रॉन असलेला क्लोरिनचा अणू यांना त्यांचे आयॉन असे म्हणतात. हे आयॉन अत्यंत सक्रिय असतात आणि आजूबाजूच्या इतर रेणूंशी त्वरित संयोग साधतात. त्यामुळे नव्या प्रकारचे रेणू निर्माण होतात आणि पदार्थाची रासायनिक रचना बदलते. माणसाच्या शरीरामधील पेशीतील डीएनए, आरएनए वगैरेमध्येच बदल झाला तर त्यामुळे अनेक प्रकारचे गोँधळ होण्याची शक्यता असते. फक्त या तीन प्रकारच्या किरणांमुळेच कशाचेही आयोनायझेशन होते असे नाही. इतर अनेक कारणांनी ते निसर्गातसुध्दा होतच असते. आभाळात कडकडणारी वीज हवेतील वायूंचे आयोनायझेशन करण्यास कारणीभूत असते हे एक नेहमीच्या पाहण्यातले उदाहरण आहे. या तीन घातक किरणांखेरीज सुट्या न्यूट्रॉन्समुळेही आपल्या शरीराला अपाय होतो. त्याचाही समावेश किरणोत्सारात केला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वरील मजकुरावरून असे दिसते की विनाशकारी किरणोत्सार हा निसर्गात सर्वत्र अस्तित्वात असतो. जमीन, पाणी, हवा आणि आकाश या सर्वांमधून तो आपल्यापर्यंत येत असतो. तसेच आपण स्वतः सुध्दा सूक्ष्म प्रमाणात त्याचे उत्सर्जन सतत करत असतो. आपल्या शरीराला त्याची सवय झालेली असते. शरीरामधील सगळ्या पेशी कायम स्वरूपाच्या नसतात. दात, हाडे यासारखे थोडे अपवाद वगळल्यास रक्त, मांस, त्वचा आदि शरीराच्या इतर भागांमधील पहिल्या पेशी झिजून नष्ट होत असतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेत असतात. त्यामुळे त्यातल्या अल्पशा पेशी किरणोत्साराने नष्ट झाल्या किंवा त्यांच्यात काही फेरबदल झाला तरी त्याची भरपाई शरीरामधील दुरुस्ती यंत्रणे(रिपेअर मेकॅनिझम)कडून केली जात असते. त्यातून काही पेशींची भरपाई झालीच नाही तर त्याला इलाज नसतो. रोगराई, कुपोषण, हिंसा, प्रदूषण, विषबाधा वगैरे इतर असंख्य प्रकारच्या कारणांमुळे हे घडत असतेच, तशातलाच हा एक भाग असतो. यामुळे अणुशक्तीचा उदय होईपर्यंत कोणालाही किरणोत्साराची विशेष काळजी वाटत नव्हती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;.............................. (क्रमशः)&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-8203469999871265327?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/8203469999871265327/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=8203469999871265327' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/8203469999871265327'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/8203469999871265327'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post_26.html' title='किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा?  (भाग -१)'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-y33ghvSq7fI/TviKMroMcXI/AAAAAAAABK4/nLrBH6OpcQA/s72-c/EM_Spectrum_Properties_Marathi.bmp' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-1808843806291931657</id><published>2011-12-23T06:32:00.000-08:00</published><updated>2011-12-23T06:32:50.795-08:00</updated><title type='text'>चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-neSRoqMhhVk/TvSQ8HEyNnI/AAAAAAAABKg/7jKPzkdEb2g/s1600/%25E0%25A4%259A%25E0%25A4%25B2%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2587%25E0%25A4%25AD%25E0%25A5%258B%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" rea="true" src="http://1.bp.blogspot.com/-neSRoqMhhVk/TvSQ8HEyNnI/AAAAAAAABKg/7jKPzkdEb2g/s320/%25E0%25A4%259A%25E0%25A4%25B2%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2587%25E0%25A4%25AD%25E0%25A5%258B%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE.jpg" width="313" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;एक गरीब बिचारी म्हातारी होती. तिला खायला पुरेसे अन्न मिळत नसल्याने तिचे पोट पाठीला लागले होते, गालफडे खप्पड झाली होती आणि हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. एकदा तिने आपल्या मुलीकडे जायचे ठरवले. तिची वाट एका घनदाट अरण्यामधून जात होती. वाटेत समोरून एक वाघोबा आला. तो तिला खाणार हे पाहताच म्हातारी त्याला म्हणाली, "अरे वाघोबा, माझ्या अंगात आता फक्त हाडे आणि चामडी तेवढीच शिल्लक राहिली आहे, ती खाऊन तुझे पोट काही भरणार नाही. त्यापेक्षा तू थोडे दिवस माझी वाट पहा, मी माझ्या लेकीकडे जाईन, दूध, तूप, लोणी वगैरे खाऊन पिऊन धष्टपुष्ट होऊन परत येईन तेंव्हा तू मला खा." वाघाला तिचे सांगणे पटले आणि त्याने तिला सोडून दिले. पुढे त्या म्हातारीला सिंह, चित्ता, तरस, अस्वल, लांडगा वगैरे वन्य पशू भेटले, त्या सर्वांना हेच सांगून म्हातारी पुढे गेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लेकीकडे गेल्यावर लेकीने म्हातारीला चांगले चुंगले खायला घातले, खाऊन पिऊन तिचे गाल वर आले, पोट सुटले आणि सर्वांगाला चांगली गोलाई आली. धडधाकट झाल्यानंतर काही दिवसांनी म्हातारी आपल्या घरी परत जायला निघाली. पण पुन्हा त्या वाटेने जातांना वाटेत ती रानटी श्वापदे भेटतील आणि या वेळी मात्र ती तिला सोडणार नाहीत. आता काय करायचे हा प्रश्न पडला. म्हातारीच्या मुलीने एक जादूचा मोठ्ठा भोपळा आणला, त्यात एक खिडकी कापून म्हातारीला आत बसवले आणि पुन्हा बाहेरून झाकण लावून टाकले. हवा आत येण्यासाठी आणि बाहेरचे दिसण्यासाठी दोन लहानशी छिद्रे तेवढी ठेवली. "चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्" असे म्हंटले की तो भोपळा उड्या मारत पुढे जायचा. त्यात बसून म्हातारी निघाली. वाटेत कोणताही हिंस्र प्राणी दिसला की म्हातारी म्हणायची, "चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्, म्हातारीचे घर दूर". लगेच तो भोपळा जोरात टणाटण् उड्या मारू लागायचा. भोपळा हे काही त्यांचे भक्ष्य नसल्याने त्याला पाहूनते प्राणी पळून जायचे. असे करत ती म्हातारी आपल्या घरापर्यंत सुखरूप पोचली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ही गोष्ट मी लहानपणी अनेक वेळा ऐकली होती आणि तीन पिढ्यांमधल्या लहान मुलांना असंख्य वेळा सांगितली आहे. जंगलात गेल्यानंतर म्हातारीला कोणकोणते प्राणी भेटले, ते कसे दिसतात, कसे आवाज काढतात वगैरे त्यांना विचारले आणि हावभाव करून सांगितले की त्यात ती रमतात आणि म्हातारीच्या मुलीने तिला काय काय खाऊ घातले याची चर्चा सुरू केली की मग विचारायलाच नको ! पेरू, चिक्कू, आंबे वगैरेंपासून थेट पास्ता, मॅकरोनी आणि नूडल्सपर्यंत सगळे स्वादिष्ट खाद्यपदार्थ त्या गोष्टीतल्या म्हातारीला खायला मिळतात. मग ती चांगली गलेलठ्ठ होईलच नाही का? बहुतेक मराठी मुलांनी ही गोष्ट लहानपणी ऐकलेली असते आणि कदाचित त्यातून त्यांना भोपळ्याची ओळख झालेली असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भोपळ्यासंबंधी आणखी काही मजेदार गोष्टी आहेत. एक नवी नवरी पहिल्यांदाच माहेरी जाऊन सासरी परत आली तेंव्हा तिच्या आईने पापड, सांडगे, लोणची, मुरंबे वगैरे भरपूर गोष्टी तिला बांधून दिल्याच, परसदारी असलेल्या वेलीला लागलेला एक भोपळा तिच्यासोबत पाठवून दिला. सुनेने दुस-या दिवशी तो चिरला आणि जेवणात भोपळ्याची भाजी केली. तिच्या नव-याला ती आवडत नव्हती, तरीसुध्दा उत्साहाच्या भरात असलेल्या बायकोचा हिरमोड होऊ नये म्हणून त्याने ती "छान झाली आहे" असे म्हणत खाल्ली. त्या काळात रेफ्रिजरेटर नव्हते आणि अन्न वाया घालवायचे नाही अशी शिकवण होती. त्यामुळे संध्याकाळी सुनेने भोपळ्याचे भरीत केले. या वेळी प्रशंसा न करता नव-याने त्यात आणखी दही मिसळून त्याच्या चवीने खाल्ले. दुस-या दिवशी सुनेला उपास होता. तिने शेंगदाण्याचे कूट मिसळून आणि तुपातली जि-याची फोडणी देऊन भोपळ्याची उपासाची भाजी बनवली. तीही नव-याने कशीबशी संपवली. रात्रीच्या जेवणात भोपळ्याची थालीपिठे आली. ती खाल्ल्यावर मात्र नव-याच्या रोमारोमात भोपळा भिनला, त्याच्या डोक्यात शिरला किंवा त्याच्या अंगात आला आणि तोच टुणुक टुणुक उड्या मारत सुटला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याही पूर्वीच्या काळात बालविवाह रूढ होता. बारा तेरा वर्षांपर्यंतचा मुलगा आणि सातआठ वर्षांची मुलगी यांचे लग्न लावून देत असत. पण त्यानंतरसुध्दा ती मुलगी वर्षामधला बराचसा काळ माहेरी व्यतीत करत असे. दस-याला सोने किंवा संक्रांतीला तिळगूळ देणे अशा निमित्याने सणावारी जावई आपल्या सासुरवाडीला जाऊन येत असे. प्रत्येक वेळी परत जातांना त्याला एकादी चांगली भेटवस्तू दिली जात असे. पण एका लोभी वरमाईचे अशा मिळालेल्या भेटीतून समाधान व्हायचे नाही. पुढच्या वेळी काही अधिक चांगले घसघशीत पदरात पडेल अशा आशेने काही तरी निमित्य काढून ती आपल्या मुलाला पुन्हा पुन्हा सासुरवाडी पाठवायची. हे त्या सास-याच्या लक्षात आले. एकदा त्याचा जावई असा विनाकारण येऊन परत जायला निघाला तेंव्हा सास-याने एक भला मोठा भोपळाच त्याच्या हातात ठेवला. त्या काळात वाहने नव्हतीच. पायीच प्रवास करावा लागत असे. बिचारा मुलगा तो भोपळा घेऊन कधी या खांद्यावर, कधी त्या खांद्यावर, कधी डोक्यावर धरून आणि पुन्हा तिकडे फिरकायचे नाही असे मनोमन ठरवत घामाघूम होऊन आपल्या घरी परत आला. या वेळी जावयाला त्याच्या सासुरवाडकडून काय मिळाले याची चौकशी करायला शेजारच्या साळकाया माळकाया टपून बसलेल्या होत्या. त्या सगळ्या गोळा झाल्या. थोडीशी वरमलेली वरमाई त्यांना म्हणाली, "अहो, काय सांगू ? सासरा उदार झाला आणि हातात भोपळा दिला !" &lt;br /&gt;&lt;br /&gt;हीच गोष्ट थोड्या फरकाने एका कंजूस राजाबद्दल सांगितली जाते. राजाकडून चांगले घबाड मिळेल या आशेने त्याच्याकडे जाऊन त्याची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणा-या एका भाटाला तो राजा खूष होऊन फक्त एक भोपळा बक्षिस देतो. कोणाकडून खूप मोठ्या आशा असतांना असा भ्रमनिरास झाल्यावर "राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला !" असे म्हंटले जाते. कधी कधी माणसे एका वेगळ्याच कल्पनेच्या जगात आनंदाने विहार करत असतात, त्यांना जेंव्हा वस्तुस्थितीची जाणीव होते तेंव्हा त्यांच्या 'भ्रमाचा भोपळा' फुटतो. "विळ्यावर भोपळा मारला काय किंवा भोपळ्यावर विळा मारला काय, परिणाम एकच !" अशा अर्थाची एक हिंदी म्हण आहे. भोपळ्याच्या दृष्टीने पाहता दोन्ही वाईटच ! त्यामुळे या दोघांमध्ये सख्य होण्याची शक्यताच नसते. तरीसुध्दा काही वेळा तसे दाखवावे लागते. अशा संबंधांना 'विळ्याभोपळ्याएवढे सख्य' असे नाव आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वास्तविक पाहता लिंबू, संत्रे, मोसंबे वगैरे बरीच फळे भोपळ्यापेक्षाही जास्त गोलाकार असतात. पण शून्याचे प्रतिनिधित्व मात्र भोपळाच करतो. हिंदी भाषेच्या प्रभावामुळे काही लोक शून्याला 'अंडा' वगैरे अलीकडे म्हणायला लागले आहेत, पण बहुतेक लोकांना अजूनही 'शून्य' या शब्दाच्या पुढे 'भोपळा'च आठवतो. त्यामुळे गोष्टींमध्ये मजेदार वाटणारा भोपळा जेंव्हा परीक्षेमध्ये आपल्या उत्तरपत्रिकेत मिळतो तेंव्हा मात्र आपली धडगत नसते. तसेच क्रिकेटच्या मैदानात जाऊन 'भोपळा' काढून परतलेल्या बॅट्समनची प्रेक्षक हुर्रेवडी उडवतात. शून्याशी असलेल्या भोपळ्याच्या संबंधाचा मला मात्र भूगोल शिकतांना चांगला उपयोग झाला. कोणता 'अक्षांश' आणि कोणता 'रेखांश' यात आधी संभ्रम व्हायचा, पण पृथ्वी - गोल - शून्य - भोपळा - त्यावर दिसणा-या उभ्या रेषा - रेखांश अशी साखळी तयार झाल्यानंतर रेखांशाची संकल्पना मनात पक्की झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भोपळ्याच्या चार पदार्थांचा उल्लेख वर आलेलाच आहे. ते तर निरनिराळ्या प्रकाराने बनवले जातातच, त्याशिवाय भोपळ्यांच्या पापडांपासून त्याच्या वड्यांपर्यंत अनेक पदार्थांचा समावेश माझ्या खाद्ययात्रेत झाला आहे. आजकाल शहरांमधल्या भाजीबाजारात अर्धा पाव किलो भोपळा कापून मिळतो, पण माझ्या लहानपणी अशा प्रकारे भोपळ्याची फोड विकत आणलेली मला आठवत नाही. अवजड अख्खा भोपळा बाजारापासून घरापर्यंत उचलून आणणे आणि तो सगळा खाऊन संपवणे या दोन्ही गोष्टी जिवावर आणणा-या असल्यामुळे त्याची खरेदी नैमित्यिकच होत असे. कधी कधी बागेमधून घरात आलेल्या भोपळ्याचे मोठमोठे काप शेजारी पाजारी सढळ हाताने वाटून दिले जात. लग्नसमारंभासारख्या जेवणावळीत भोपळ्याची भाजी हमखास असायची, पण भोपळ्याच्या मोठ्या फोडींचा उपयोग द्रोणाला आधार देण्यासाठी 'अडणी' म्हणूनच होत असे. एकदा मात्र नागपूरकडच्या आचा-याने भोपळ्याच्या फोडी भरपूर तेलावर चांगल्या खरपूस भाजून आणि त्याला खसखस, खोबरे, वेलदोडे वगैरेंचे वाटण लावून इतकी चविष्ट भाजी केली होती की भोजनभाऊ लोकांनी मुख्य पक्वान्नाऐवजी त्या भाजीवरच जास्त ताव मारला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कोहळा नावाचा भोपळ्याचा एक पांढरा प्रकार आहे, त्याला कदाचित भोपळ्याचा गोरापान सावत्रभाऊ म्हणता येईल. त्यापासून पेठा नावाची खास मिठाई तयार करतात. आग्र्याला गेल्यावर पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यातला 'यमुनाकाठी ताजमहाल' जरी पाहिला, तरीसुध्दा संगमरवराच्या कापांसारखा दिसणारा तिथला पेठा खाल्ल्याशिवाय त्या सहलीचे सार्थक होत नाही. दक्षिण भारतात मात्र कोहळ्याच्या फोडी हा सांभाराचा आवश्यक भाग समजला जातो. कोहळ्याला थोडा उच्च दर्जा (हाय स्टेटस) मिळाला आहे. एकाद्याला आधी लहानशी वस्तू देऊन त्याच्याकडून मोठे काम करवून घेण्याला "आवळा देऊन कोहळा काढणे" असे म्हणतात. दुधी भोपळ्याचा आकार लांबट असतो आणि व्यंगचित्रांमधील आदिमानवाच्या हातातल्या सोट्याची आठवण करून देतो. त्याला हातात धरून डोक्याभोवती मुद्गलासारखा फिरवावे अशी इच्छा होते. पूर्वी पांचट समजल्या जात असलेल्या या भाजीमध्ये हृदयविकारांसकट अनेक आजारांचा प्रतिबंध करण्याचे गुण असल्याचे समजल्यापासून तिला जरा चांगले दिवस आले आहेत. उत्तर भारतात मात्र कोफ्ता आणि हलवा हे दोन अत्यंत चविष्ट खाद्यपदार्थ दुधी भोपळ्यापासून तयार करतात. हिंदी सिनेमांमधल्या आयांनी उगाचच 'गाजरका हलवा'चे स्तोम माजवून ठेवले आहे. दुधी हलवाही चवीला तितकाच छान लागतो, तो चांगला शिजलेला असतो आणि खव्याबरोबर त्याचा रंग जुळत असल्यामुळे तो चांगला दिसतोसुध्दा.&lt;br /&gt;'खाणे' आणि 'गाणे' या मला अत्यंत प्रिय असलेल्या दोन विषयांना जोडणारा भोपळा हा बहुधा एकमेव दुवा असावा. हिंदुस्थानी तसेच कर्नाटक शास्त्रीय संगीतातला षड्ज स्थिर रहावा आणि त्याच्या अनुषंगाने इतर स्वरांनी आपापल्या जागा व्यवस्थितपणे घ्याव्यात यासाठी तानपु-याच्या तारा छेडून निघालेल्या स्वरांचा संदर्भासाठी आधार घेतला जातो. तंबो-याच्या तारांमधला ताण कमीजास्त केल्याने आपल्याला हव्या असलेल्या कंपनसंख्या असलेले स्वर त्यातून निघतात. ते स्वर चांगले घुमवून त्यांना सुश्राव्य करण्याचे काम तानपु-याचा भोपळा करतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या भोपळ्यांचे उत्पादन करून, ते भोपळे चांगले वाळवतात, त्यावर अनेक प्रकारचे लेप लावून त्यांना मजबूत तसेच टिकाऊ बनवतात. त्याला विवक्षित आकारात कापून, त्याला लाकडी पट्ट्यांची जोड देऊन आणि तारा, खुंट्या वगैरे त्यावर बसवून तानपुरा (तंबोरा) तयार होतो. त्याच्या भोपळ्याला घासून पुसून छान भरपूर चमकवले जातेच, त्यावर चित्रविचित्र आकाराची नक्षी रंगवून त्याला सुशोभित केले जाते. मोठ्या गायकांच्या भारी तानपु-यांवर हस्तीदंताची नक्षीसुध्दा चिकटवलेली दिसते. ध्वनिवर्धकांचा शोध लागण्यापूर्वी दूरवर बसलेल्या श्रोत्यांना स्वर ऐकू जाण्यासाठी तंबो-याच्या भोपळ्याची आवश्यकता होतीच, आजसुध्दा त्याची उपयुक्तता संपलेली नाही. पुराणकाळातील 'वीणावादिनि वरदे'च्या चित्रातल्या वीणेला दोन बाजूंना दोन भोपळे असतात. भोपळ्याचा हा उपयोग पुरातनकाळापासून चालत आला आहे असे यावरून दिसते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी दिवाळीच्या सुमाराला अमेरिकेत गेलो असतांना तिथल्या स्थानिक बाजारात जागोजागी भोपळ्यांचे मोठाले ढीग रचून ठेवलेले दिसले. अमेरिकेत अशा प्रकारे उघड्यावर भाजी विकली जात नाही आणि ते लोक मुख्यतः मांसाहारी असल्यामुळे भाज्या खाण्याचे प्रमाण एकंदरीतच खूप कमी असते. भोपळ्याची भाजी ते खात असतील असे मला कधीच वाटले नव्हते. त्यामुळे अचानक एवढे मोठे भोपळ्यांचे ढीग पाहून मला खूप आश्चर्य वाटले. पण हे भोपळे खाण्यासाठी नसून 'हॅलोविन' नावाच्या त्यांच्या उत्सवासाठी आणलेले आहेत असे समजले. 'हॅलोविन डे' हा एक प्रकारचा भुतांचा दिवस, किंबहुना रात्र असते. आपण दिवाळीला सुंदर व मंगलमय आकाशकंदील घरावर टांगतो, त्याच सुमाराला तिकडे येत असलेल्या हॅलोविन डे साठी भीतीदायक आकारांचे दिवे करून ते घराच्या बाहेर टांगले जातात. वाळलेल्या भोपळ्याला निरनिराल्या भयावह आकारांची छिद्रे आणि खिडक्या पाडून हे दिवे बनवतात आणि त्यातल्या पोकळीमध्ये दिवा ठेवतात. शिवाय चिंध्या आणि गवतापासून बुजगावण्यांसारखे भुतांचे पुतळे करून तेसुध्दा घरांच्या दाराबाहेर उभे करून ठेवतात. त्यांना आणि त्या भोपळ्यातून कोरलेल्या भयानक दिव्यांना पाहून असतील नसतील ती खरोखरची भुते घाबरून पळून जातात आणि वर्षभर त्रास द्यायला येत नाहीत असा समज त्यामागे असावा. हॅलोविन डे च्या संध्याकाळी एकाद्या मॉलसारख्या ठिकाणी गावातले उत्साही लोक जमा होतात. त्या दिवशी तिथे एक प्रकारची फॅन्सीड्रेस परेड असते. विशेषतः लहान मुलांना चिज्ञविचित्र पोशाख घालून आणतात. त्यांच्या हातात एक गोलाकार परडी धरलेली असते. कोणालाही ती दाखवून "ट्रिक ऑर ट्रीट" म्हंटले की मोठी माणसे त्यात चॉकलेटे, टॉफी वगैरे टाकतात. त्या ठिकाणी एकंदरीत वातावरण जत्रेसारखे मौजेचे असते. त्यात भीतीदायक असे फारसे काही नसते. रंगीबेरंगी आणि चित्रविचित्र पोशाखांमधल्या गोड मुलांना पहायला माणसे तर गर्दी करतातच, देवांना आणि भुतांना सुध्दा (ती असतील तर) तिथे यावेसे वाटेल. त्या जागी करण्यात येणा-या सजावटीतसुध्दा भोपळ्यांच्या विविध आकारांना प्राधान्य दिले जाते. यामुळे कधी कधी हॅलोविनला 'भोपळ्यांचा उत्सव' असेसुध्दा संबोधले जाते.&lt;br /&gt;अशी आहे भोपळ्याची चित्तरकथा ! तिने कोणाच्या मनातल्या मनात 'टुणुक टुणुक' उड्या मारल्या तर ठीक आहे, नाही तर शून्यभोपळा मार्क !&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-1808843806291931657?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/1808843806291931657/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=1808843806291931657' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/1808843806291931657'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/1808843806291931657'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post_23.html' title='चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-neSRoqMhhVk/TvSQ8HEyNnI/AAAAAAAABKg/7jKPzkdEb2g/s72-c/%25E0%25A4%259A%25E0%25A4%25B2%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2587%25E0%25A4%25AD%25E0%25A5%258B%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-7058608681482941457</id><published>2011-12-19T07:28:00.000-08:00</published><updated>2011-12-19T07:28:08.007-08:00</updated><title type='text'>श्रीनिवास खळे रजनी</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;मला भेटलेल्या ज्या लोकांचा माझ्या मनावर खोल ठसा उमटला अशा व्यक्तींची शब्दचित्रे 'तेथे कर माझे जुळती' या लेखमालिकांमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यातल्या काही व्यक्ती खूप प्रसिध्द आहेत. त्यांच्या कारकीर्दीविषयी आधीच उदंड लेखन झालेले आहे, त्यात भर टाकण्यासाठी आणखी काही माझ्याकडे नाही आणि त्यांच्या कार्यक्षेत्रासंबंधी लिहिण्याचा मला अधिकार नाही या दोन कारणांमुळे मी त्याबद्दल विशेष लिहिले नव्हते. पण नंतर असा विचार माझ्या मनात आला की मी जे काही या ब्लॉगवर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे त्यातल्या इतर विषयांना सुध्दा हेच निकष लावले तर ते सगळे लेख बहुधा रद्दबातल होतील. कारण या ठिकाणी लिहिलेल्या प्रत्येक लेखाच्या विषयावर असंख्य तज्ज्ञानी अगणित ग्रंथसंपदा आधीच निर्माण करून ठेवलेली आहे. त्यातली दोन चार पाने वाचूनच तर मला त्याचे थोडे ज्ञान प्राप्त झाले. त्यातल्या कोठल्याच विषयावर माझे प्रभुत्व आहे असेही मी म्हणू शकत नाही. मग मला त्यावर तरी लिहिण्याचा काय अधिकार आहे? असे म्हंटले की मग काहीही लिहायचे प्रयोजनच उरत नाही. पण हा प्रश्न मी सहा वर्षांपूर्वी निकालात काढला होता. कोणत्याही विषयावर याआधी खंडीभर लिहिले गेले असले तरी माझ्या लेखांच्या वाचकांनी ते सगळे वाचलेले असले पाहिजेच असे नाही. मी जे काही लिहिणार आहे ते कदाचित त्यांनी वाचले नसेल, किंवा आधी वाचले असले तरी त्यांना ते पुन्हा माझ्या शब्दात वाचावेसे वाटेल. माझ्या स्वतःच्या पाटीवर काय आणि किती लिहिण्याचा मला अधिकार आहे हे अखेर मीच ठरवायचे आहे. मला जे लिहावे असे माझ्या मनात आले ते इथे लिहायला काय हरकत आहे? इतर कोणी त्यातली चूक दाखवून दिली तर ती मान्य करायची तयारी ठेवली म्हणजे झाले.&lt;br /&gt;स्व.श्रीनिवास खळे यांच्यावरील लेखात त्यांनी दिलेल्या दिव्य संगीतावर मी काही लिहिले नव्हते. पण काल श्रीनिवास खळे रजनीचा एक सुश्राव्य कार्यक्रम पाहिला आणि त्यावर लिहावेसे वाटले या कार्यक्रमाची सुरुवात 'जयजयमहाराष्ट्रमाझा' या समूह गीताने झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सोहळ्यासाठी कवी राजा बढे यांनी लिहिलेले हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द करून घेतले होते. त्याची सुवर्णजयंतीसुध्दा होऊन गेली असली तरी या गीताची जादू पहिल्याइतकीच टिकून राहिली आहे. इतके आवेशपूर्ण दुसरे महाराष्ट्रगीत गेल्या पन्नास वर्षांच्या काळात मी तरी ऐकले नाही. 'सह्याद्रीचा सिंह गर्जतो' ऐकतांना त्याचा दरीदरीतून गुंजलेला नाद आपल्या काळजापर्यंत जाऊन भिडतो. शाहीर साबळे यांच्याइतका तडफदार आवाज इतर कोणापासून अपेक्षित नसला तरी मंदार आपटे आणि अजित परब यांनी प्रयत्नांची शर्थ केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१९७३ साली श्रीनिवास खळे यांनी तयार केलेल्या अभंग तुकयाचे या गीत संग्रहामध्ये संत तुकारामांचे वीस अभंग अजरामर करून ठेवले आहेत. संत तुकारामाच्या गाथेतील शेकडो अभंगांपैकी हे वीस अभंग निवडण्याचेच काम किती कठीण आहे ? खळे काकांनी यासाठी खूप मेहनत करून त्यांचा अभ्यास केला. या कार्यक्रमाचे निवेदक भाऊ मराठे यांच्या शब्दात त्यांनी या अभंगांमागची हिस्टरीच पाहिली नाही तर त्यामधील मिस्टरीचासुध्दा वेध घेतला. त्यांनी आधी काही अभंग निवडले, त्यांवर इतर तज्ज्ञांबरोबर चर्चा करून अखेर त्यातले वीस ठरवले, केवळ वीसच दिवसात त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि लता मंगेशकरांनी गाऊन त्यांना अमरत्व प्राप्त करून दिले. त्यातील 'सुंदर ते ध्यान' या अभंगाने श्रीनिवास खळे रजनीच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि मध्यंतराच्या आधी 'भेटीलागी जीवा' हा अभंग वाद्यसंगीतात सादर केला गेला. हे अभंग वारकरी सांप्रदायामध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. पारंपरिक भजनाची सुरुवात 'सुंदर ते ध्यान' पासून करून त्याचा शेवट 'हेची दान देगा देवा' ने करण्याची प्रथा काही देवळांमध्ये करण्यात येणा-या भजनात आहे हे मी लहानपणी पाहिले आहे. पण श्रीनिवास खळे यांनी लावलेल्या चाली मात्र परंपरागत पध्दतींपेक्षा आगळ्या वेगळ्या आहेत. 'सुंदर ते ध्यान' मधील वर्णनाने विठ्ठलाचे देखणे रूप डोळ्यासमोर उभे राहते आणि ते पाहणे हेची सर्व सुख आहे असे तुकारामांनी का म्हंटले आहे ते समजते. 'भेटीलागी जीवा' या गाण्यात लतादीदींनी जी आर्तता व्यक्त केली आहे, तिने लागलीसे आस या शब्दांचा अर्थ लक्षात येतो. 'हेची दान देगा देवा' मध्ये तुकारामांनी देवापाशी केलेले मागणे किती मनापासून केले आहे हा भाव खळे यांच्या स्वररचनेतून व्यक्त होतो. पण या कार्यक्रमाची सांगता खळ्यांनीच स्वरबध्द केलेल्या 'आनंदाचे डोही आनंद तरंग' या वेगळ्या भैरवीने झाली. लतादीदींची 'अगा करुणाकरा', 'कन्या सासुराशीं जाये', 'कमोदिनी काय जाणे तो परिमळ', 'वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें', 'खेळ मांडीयेला वाळवंटी घाई' यासारखी गाणी आणि पं.भीमसेन जोशींच्या आवाजातले 'सावळे सुंदर रूप मनोहर', 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा', 'जे का रंजले गांजले', सुरेश वाडकरांचा 'काळ देहासी आला खाऊ' यासारखे खळ्यांनी स्वरबद्ध केलेले अप्रतिम अभंग तरीही गायचे राहिलेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'भावभोळ्या भक्तिची', 'रामप्रहरी राम-गाथा', 'मीरेचे कंकण', 'जय जय विठ्ठल रखुमाई' यासारखी मधुर भक्तीगीते खळ्यांनी दिली आहेतच, शिवाय 'लाज राख नंदलाला', 'रुसला मजवरती कान्हा', 'निळासावळा नाथ' यासारखी पौराणिक काळामधील गोष्टींवरील गाणीसुध्दा कधीकधी भक्तीसंगीतात खपून जात असत. टेलिव्हिजन येण्यापूर्वीच्या काळात मराठी माणसांची सकाळ आकाशवाणीवरील मंगल प्रभात या कार्यक्रमात रंगलेली असे. श्रीनिवास खळ्यांनी स्वरबध्द केलेला एकतरी अभंग किंवा भक्तीगीत एकल्याशिवाय ती प्रभात पुरेशी मंगलमय होत नसे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'श्रावणात घननीळा' या गाण्याची निर्मिती कशी झाली याची चित्तरकथा भाऊ मराठ्यांनी सांगितली. त्यांची बोलण्याची शैली अशी आहे की खळे, पाडगावकर, यशवंत देव, शिरीष पै वगैरे सगळी दिग्गज मंडळी त्यांच्या रोजच्या उठण्याबसण्यातली वाटावीत. पूर्वी प्राध्यापक असतांना मंगेश पाडगावकर मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनने रोज प्रवास करत असत. हे मात्र खरे आहे कारण सत्तरीच्या सुरुवातीला मीसुध्दा मानखुर्द ते बोरीबंदर (आताचे सीएसटी आणि पूर्वीचे व्हीटी) पर्यंत हा प्रवास लोकलमधून करत होतो. त्यावेळी कधीकधी पाडगावकर मला पहिल्या दर्जाच्या डब्यात दिसत असत. त्यांच्या जाड भिंगांच्या चश्म्यामुळे ते दुरूनही सहज ओळखू येत असत. तर एकदा म्हणे या प्रवासातच त्यांना या गाण्याचा मुखडा सुचला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा।&lt;br /&gt;उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाडगावकर पूर्वीच्या कोळीवाडा (आताच्या जीटीबीनगर) स्टेशनवर उतरले. मागच्या गाडीने श्रीनिवास खळे आले आणि दोघेही एकत्र पुढील मार्गाला लागले. त्या काळात मी श्रीनिवास खळ्यांच्या नावाशी परिचित होतो, पण त्यांनाच काय, त्यांचा फोटोसुध्दा पाहिला नव्हता, त्यामुळे मी पाहिले असले तरी त्यांना ओळखले नसेल. व्हीटी स्टेशनपर्यंत काही बोलायचे नाही असे खळ्यांनी पाडगावकरांना बजावले आणि तोपर्यंत त्या मुखड्याला चाल लावून ती त्यांना ऐकवली. अशाच प्रकारे पुढील चार दिवसात चार कडवी तयार झाली. यातील प्रत्येक अंतरा त्यातील अर्थानुरूप निरनिराळ्या सुरावटींमध्ये बांधला असला तरी त्यांच्यात मुखड्याशी सलगता आहे. लताबाईंच्या आवाजातले हे गाणे अनेकांच्या टॉपटेनमध्ये असणार यात शंका नाही.&lt;br /&gt;त्यानंतर एकापाठोपाठ एकाहून एक सरस अशा भावगीतांची मालिका सुरू झाली. श्रीनिवास खळे हे तर भावसंगीताचे बादशहाच होते. पं.हृदयनाथ मंगोशकरांच्या आवाजातली 'लाजून हासणे अन्‌' आणि 'वेगवेगळी फुले उमलली' ही गीते झाली, सुरेश वाडकरांचे 'जेंव्हा तुझ्या बटांना', अरुण दाते आणि आशा भोसले यांचे युगलगीत 'सर्व सर्व विसरु दे', सुमन कल्याणपूर व अरुण दाते यांचे द्वंद्वगीत 'पहिलीच भेट झाली' इत्यादि छान छान गाणी सादर केली गेली. पं. वसंतराव देशपांडे यांनी गायिलेले कवी वा. रा. कांत यांचे 'बगळ्यांची माळ फुले' हे गीत भावसंगीतातला एक मैलाचा दगड आहे म्हणता येईल, एरवी भावगीते मोजून मापून बसवली जातात, पण वसंतरावांसारख्या पट्टीच्या गायकाला या गाण्यात पहाडी राग खुलवायला मोकळीक दिली आहे. आता त्यांचा नातू राहुल देशपांडे सुध्दा हे गाणे मस्त रंगवून सादर करतो. टीव्हीवरील एका कार्यक्रमात शंकर महादेवन याने या गाण्याची एकच ओळ बहारदार गाऊन दाखवली होती. 'पाणिग्रहण' या एका नाटकाचे संगीत दिग्दर्शन श्रीनिवास खळे यांनी केले होते. त्यातली 'उगवला चंद्र पुनवेचा', 'प्रीती सुरी दुधारी' आणि 'प्रेम हे वंचिता' ही या नाटकातली शास्त्रीय संगीतावर आधारलेली नाट्यगीते आजही गायली जातात आणि कानावर पडतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीनिवास खळे यांना मराठी चित्रपटश्रृष्टीने विशेष जवळ केले नाही, इतक्या मोठ्या आणि गुणवान संगीतकाराला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट मिळाले. पण त्यातील चित्रगीते सुध्दा अमर झाली आहेत. 'सोबती' या चित्रपटामधील लता मंगेशकर यांचे 'साऊलीस का कळे उन्हामधील यातना' आणि आशाबाईंचे 'पाण्यातले पहाता प्रतिबिंब' तसेच लतादीदींचे 'जिव्हाळा' सिनेमातले 'या चिमण्यांनो परत फिरा रे' ही गाणी या कार्यक्रमात सादर करून त्याची चुणुक दाखवली गेली. खळे यांनी चित्रपटसंगीत फारसे दिले नाही आणि ज्या चित्रपटांना दिले ते सोज्ज्वळ स्वरूपाचे होते. त्यामुळे त्यात लावणीसाठी जागा नसेल. पण 'कळीदार कपूरी पान' या एका लावणीने त्यांनी आपले या क्षेत्रातले प्रभुत्व दाखवून दिले. माधुरी करमरकरने ही लावणी इतकी फक्कड गायली आणि निलेश परब याने ढोलकीची इतकी अफलातून साथ दिली की प्रेक्षकांनी वन्समोअरच्या गजराने सभागृह दणाणून टाकले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीनिवास खळे यांनी बडोद्याला असतांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते आणि रागदारीचे उत्तम ज्ञान त्यांना होते. पण मुख्यतः भावगीतांना स्वरसाज चढवतांना त्यांनी त्यात फार लांबलचक पल्लेदार ताना गुंफल्या नाहीत. शब्दांचा अर्थ खुलवण्याइतपतच त्यांचा वापर केला. काही गाण्यांमध्ये मात्र त्यांनी बहारदार शास्त्रीय संगीत दिले आहे, याचे उदाहरणार्थ 'धरिला वृथा छंद' या सुरेश वाडकरांच्या गाण्यात ऐकायला मिळाले. 'गुरुकृपावंत पायो मेरे भाई' आणि 'एरी माई मोरी गगरिया छीनी' ही पूर्णपणे शास्त्रीय धाटणीची त्यांनी स्वर बध्द केलेली दोन गाणी भरत बळवल्ली या चांगल्या तयारीच्या गायकाने सादर केली आणि लता मंगेशकर व पं.भीमसेन जोशी या दोन भारतरत्नांना एकत्र आणून त्यांच्याकडून 'रामश्यामगुणगान' गाऊन घेण्याचा जो चमत्कार श्रीनिवास खळे यांनी घडवून आणला त्याची झलक बाजे 'मुरलिया बाजे' या गीतात मिळाली. या गाण्यामध्ये बांसरीवरील सूर अप्रतिम पध्दतीने आळवून त्या गाण्यातील मुरलीच्या वर्णनाचे सार्थ रूप वादकाने दाखवून दिले, अमर ओक हे या संचाबरोबर येतील अशी अपेक्षा होती. पण जो कलाकार आला होता, त्याने अमरची उणीव भासू दिली नाही. व्हायलिनवादकाने तर कमालच केली. 'भेटीलागी जीवा लागलीसे आस' आणि 'गोरी गोरी पान' हे अजरामर बालगीत त्याने सोलोमध्ये अप्रतिम वाजवले. 'आ.......स' मधील लता मंगेशकरांनी आळवलेला व्याकुळ भाव आणि 'गोरी गोरी' मधले 'तुल्ला दोन थाप्पा तिल्ला साख्खरेच्चा पाप्पा' या ओळींमध्ये आशा भोसले यांनी दाखवलेल्या खटकेदार जागा व्हायलिनवर ऐकवल्यामुळे त्यातील स्वरांसोबत व्यंजनेसुध्दा ऐकू आली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'गोरी गोरी पान' आणि 'एका तळ्यात होती' या दोन गाण्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून ठेवले आहे. श्रीनिवास खळे यांची ही दोन गाणी आणि पु ल देशपांडे यांचे 'नाचरे मोरा' या गाण्यामुळे बालगीत म्हणजे आशा भोसले असे समीकरणच झाले होते आणि राणी वर्मा, सुषमा श्रेष्ठ, रेखा डावजेकर वगैरे गायिका येईपर्यंत ते टिकून होते. 'एका तळ्यात होती' हे खूप जुने आणि तरीही लोकप्रिय असे एकच बालगीत या कार्यक्रमात घेतले होते, पण 'किलबिल किलबिल पक्षि बोलती', 'मैना राणी चतुर-शहाणी', 'टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय् चल पाहू', 'चंदाराणी चंदाराणी' यारखी कित्येक मजेदार बालगीते खळे काकांनी त्यांच्या लाडक्या बालगोपालांना दिली आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कवीवर्य मंगेश पाडगावकर कधीही ऑर्डरनुसार माल पुरवून देत नाहीत. त्यांच्या खूप कविता गेय आहेत, अर्थातच वृत्त, छंद वगैरेंची बंधने पाळूनच त्या लिहिलेल्या आहेत. त्यांना ठेक्याची आणि सुरांची चांगली जाण असल्याशिवाय ते करता येणार नाही. पण संगीतकाराने दिलेल्या स्वररचनेमध्ये शब्द गुंफून त्याचे गीत करणे त्यांना मान्य नाही. त्याचप्रमाणे अशी स्वररचना करून देणे श्रीनिवास खळे यांना मान्य नाही. आधी शब्द समोर असले तर त्याच्या अर्थानुसार चाल लावून तो अर्थ श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचवणे किंवा त्याच्या काळजाला भिडवणे हे संगीतकाराचे काम आहे असे ते सांगत असत. यामुळे या दोघांची जोडी चांगली जमली. कदाचित तथाकथित हार्बर लाइनच्या एकत्र प्रवासाचासुध्दा त्यात काही भाग असेल. या दोघांनी मिळून मराठी रसिक श्रोत्यांना दिलेल्या गाण्यांची संख्या खूप मोठी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भावगीते हे खळे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची गणना करणे शक्य नाही आणि त्यातली सारी लोकप्रिय गीतेसुध्दा एका कार्यक्रमात सामील करणे वेळेच्या बंधनामुळे शक्य नसते. त्यातली काही गाणी या कार्यक्रमात घेतली आणि बरीचशी राहून गेली. 'नीज माझ्या नंदलाला' सारखी गोड लोरी हिंदीमध्येसुध्दा मी ऐकली नाही. आकाशवाणीवर भावसरगम नावाचा कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला होता. थोडा गाजावाजा करून सुरू केलेल्या या मालिकेचा पहिला भाग मी आवर्जून पाहिला होता. त्या भागात अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायिलेले 'शुक्रतारा मंद वारा' हे गाणे देऊन पहिल्याच बॉलला सिक्सर मारला होता. 'हात तुझा हातातुन' यासारखी छान छान गाणी पुढील भागात येत गेली. श्रीनिवास खळे यांच्या गीतांचा कार्यक्रम शुक्रतारा शिवाय पुरा होऊच शकत नाही असे सांगून निवेदक भाऊ मराठे यांनी याबाबतचे दोन मजेदार किस्से ऐकवले. एका कार्यक्रमात 'अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा' ही ओळ '.... अंथरारे अशी ऐकू येत होती. समोर बसलेल्या खळेकाकांनी कपाळाला हात लावला. दुसरा एक गायक 'शूक्रतारा' असे म्हणत होता. समोर बसलेल्या पाडगावकरांना कोणीतरी "गाणे कसे वाटले?" असे विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, "बाकी ठीक होते, पण गायक जरा जास्तच शू करत होता." असे काही सवंग किंवा पाचकळ विनोद सोडले तर भाऊ मराठे आपल्या निवेदनातून कार्यक्रमाला रंगत आणण्याचे काम चोख करत होते. विशेषतः त्यांचे कित्येक साहित्यिकांच्या रचनांमधील समयोचित ओळीच्या ओळी अस्खलित म्हणून दाखवणे थक्क करणारे होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;टेलिव्हिजनवरील सारेगमप या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमामुळे प्रसिध्दी पावलेल्या सत्यजित प्रभू, निलेश परब यासारख्या गुणी वादकांचा समावेश वादकांच्या संचात होता. संगीत नियोजन सुध्दा टीव्हीस्टार कमलेश भडकमकर याने केले होते. श्रीनिवास खळे यांनी आधीच लावून दिलेल्या चालींवर गाणी म्हणवून घेण्यात त्याचा असा काय मोठा वाटा आहे? असे एकाद्या अनभिज्ञ माणसाला कदाचित वाटणे शक्य आहे. पण यात दोन महत्वाच्या गोष्टी येतात. सुमारे सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात खळे यांनी गाण्यांना संगीतबध्द करतांना त्या त्या काळातल्या उत्तमोत्तम वादकांचा उपयोग करून घेतला होता. ते सगळे वादकच नव्हे तर ती सारी वाद्येसुध्दा आज उपलब्ध असणे शक्य नाही. निवडक वाद्ये आणि वादक यांच्याकडून हुबेहूब किंवा तत्सम सुरांची निर्मिती करून घेणे अवघड असते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या गायक आणि गायिकांनी निरनिराळ्या पट्ट्यांमधील आपापल्या स्वरांमध्ये गायिलेली ही गाणी नव्या कलाकारांकडून गाऊन घेतांना त्यांचे आवाज आणि आवाका (रेंज) लक्षात घेऊनच ती बसवावी लागतात. तसेच या सर्वांनी एकत्र तालीम करून ती गाणी चांगली घटवून घ्यावी लागतात. मोठ्या नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमाचासुध्दा असा तयारीच्या अभावी विचका झालेला मी पाहिला आहे. हा कार्यक्रम मात्र व्यवस्थित झाला याचे श्रेय कमलेशलाच जाते. अजित परब, मंदार आपटे आणि माधुरी करमरकर यांनी या क्षेत्रात नाव मिळवले आहे, मधुरा कुंभार सारेगमपमधून पुढे आली आहे. या कार्यक्रमातील सर्वच गाणी रेडिओ, टेलीव्हिजन आणि रेकॉर्डरवर अनंत वेळा ऐकलेली असल्यामुळे मूळ गायकगायिकांचे स्वर स्मरणात ठसलेले आहेत, लता मंगेशकरांचा अपवाद सोडला तर इतरांची बहुतेक गाणी मी त्यांच्या कार्यक्रमांमधून प्रत्यक्ष सुध्दा ऐकली आहेत. त्या आठवणी पुसून टाकण्याइतके उच्च दर्जाचे गायन नवोदितांकडून अपेक्षित नव्हतेच. त्यांच्या आठवणी ताज्या करता येण्याइतपत चांगला प्रयत्न मात्र सर्वांनीच केला. त्यामुळे हा कार्यक्रम पैसे वसूल करणारा झाला यात शंका नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-7058608681482941457?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/7058608681482941457/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=7058608681482941457' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/7058608681482941457'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/7058608681482941457'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post_19.html' title='श्रीनिवास खळे रजनी'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-4217115353882123652</id><published>2011-12-05T06:49:00.000-08:00</published><updated>2011-12-06T04:08:23.763-08:00</updated><title type='text'>सुसंस्कृत</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;सुसंस्कृत' या शब्दाचा अर्थ 'ज्याच्यावर चांगले संस्कार झाले आहेत' असा मानला जातो. लहान मुलांची वाढ होत असतांना सर्व मार्गांनी अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न ती मुले करत असतातच, शिवाय त्यांचे पालक, शिक्षक आणि इतर वडीलधारी मंडळी त्यांना काही गोष्टी समजावून सांगतात, शिकवतात, त्यांच्याकडून करवून घेतात, त्यांना वळण लावतात. या सगळ्यांमधून त्यांच्यात जो चांगला फरक पडत असतो त्याला 'संस्कार' असे नाव दिले गेले आहे. पहायला गेल्यास जीवंत असेपर्यंत आपल्यावर संस्कार होतच असतात, पण लहान वयातले मूल संस्कारक्षम असल्यामुळे त्याच्या मनावर संस्कार होणे सोपे आणि अधिक टिकाऊ असते. माणसाच्या मनावर झालेल्या संस्कारातून त्याचा स्वभाव, त्याची वागणूक वगैरेवर प्रभाव पडतो. विशेषतः ज्या गोष्टी त्याच्या नकळत तो करत असतो त्यांच्या मुळाशी त्याच्या अंगातले उपजत गुण असतात, तसेच त्याच्या मनावर झालेले संस्कार असतात. लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात. ते पुसायचे असल्यास त्यासाठी त्याला नंतर खूप प्रयत्न करावे लागतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'संस्कार' हा शब्द सर्वसाधारणपणे चांगल्या अर्थाने वापरला जातो. कोणतेही पालक किंवा शिक्षक सहसा मुद्दामहून मुलांना वाईट मार्गाला लावणार नाहीत. पण ती लागली तर बहुतेक वेळी त्यालासुध्दा वाईट संगतीमुळे झालेले चुकीचे संस्कार हे कारण दाखवले जाते. 'चांगले' आणि 'वाईट' या शब्दांचे अर्थ मात्र निरनिराळ्या परिस्थितींमध्ये वेगळे निघतात. खूप श्रीमंत कुटुंबांकडे स्वयंपाकपाणी करण्यासाठी नोकरचाकर असतात. घरातल्या प्रत्येक माणसाने त्याला आवडेल तो पदार्थ यथेच्छ खावा आणि कोणाला तो कमी पडता कामा नये असा हुकूम असल्यामुळे ढीगभर अन्न शिजवले जाते आणि घरातल्या माणसांची जेवणे झाल्यानंतर उरलेल्या अन्नाचे काय होत असेल याची फिकीर कोणीही करत नाही. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांच्या मनावर तसेच वागण्याचे संस्कार होतात, त्यांना तशाच संवयी लागतात. याउलट दरिद्री माणसांच्या घरात अन्नाचा प्रत्येक कण मोलाचा समजला जातो आणि वाया जाऊ दिला जात नाही. मध्यमवर्गीयांची अन्नान्नदशा नसली तरी ती होऊ नये म्हणून "पानात वाढलेले अन्न संपवलेच पाहिजे", "शिजवलेले सारे अन्न खाल्ले गेले पाहिजे" वगैरे शिकवण दिली जाते. शरीराला आवश्यकता नसतांना खाल्ले गेलेले जास्तीचे अन्न अपायकारक असते आणि तेसुध्दा एक प्रकारे वायाच जाते हे अनेक लोकांना शरीरशास्त्राच्या अभ्यासातून कळले तरी वळत नाही. याला कारण लहानपणी मनावर झालेले संस्कार ! कोणते संस्कार चांगले आणि कोणते वाईट याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात हे वरील उदाहरणावरून दिसून येते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पूर्वीच्या काळी रूढ असलेल्या एकत्र कुटुंबांमध्ये आजोबापणजोबा आणि आज्यापणज्यांपासून नातवंडा पणतवंडांपर्यंत खूप माणसे एकत्र रहात असत. त्यांनी आपापसात कलह न करता सामंजस्याने रहावे यासाठी घराघरात एक प्रकारची शिस्त पाळली जात असे. घरातील प्रत्येक सदस्याने ती शिस्त लहानपणापासूनच अंगात भिनवावी या दृष्टीने मुलांच्या व मुलींच्या मनावर विशिष्ट प्रकारचे संस्कार प्रयत्नपूर्वक केले जात असत. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणत्या वेळी काय काय करायचे आणि ते कसे करायचे याचे नियम ठरलेले असत. ते पाळण्याची सवय मुलांना जबरदस्ती करून लावली जात असे. त्यांच्याकडून परवचे आणि श्लोक वगैरेचे पाठांतर करून घेतले जात असे. प्रामाणिकपणा, विनम्रता, आज्ञाधारकपणा वगैरेंसारखे गुण शिकवले जात असत. त्यात आज्ञाधारकपणा हा सर्वात मोठा गुण समजला जात असे. मोठ्या माणसांनी सांगितलेले सर्व काही निमूटपणे ऐकून घ्यायचे, वर तोंड करून त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत, त्यांची चूक काढायची नाहीच, त्यांच्या सांगण्याबद्दल शंकासुध्दा व्यक्त करायची नाही वगैरे बाबींचा त्या काळात थोडा अतिरेक होत असावा असे मला आता वाटते. सुमार वकूब असलेल्या मुलांसाठी हे पढवणे ठीक असेलही, पण स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आणि कल्पकता यांच्या वाढीमध्ये त्या प्रकारच्या संस्कारांचा अडथळा येत असे. संयुक्त कुटुंब पध्दतीच आता मोडीत निघाली आहे आणि टेलिव्हिजनच्या व इंटरनेट यांच्या प्रसारामुळे मुलांना लहानपणापासूनच बाहेरच्या जगात काय चालले आहे हे समजू लागले आहे. त्यामुळे कळत नकळत त्यांच्या मनावर होणारे संस्कार आता बदलले आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माणसाचा आचार, विचार आणि उच्चार या तीन्हीवर संस्काराचा प्रभाव पडतो. लहान मुलांना विचार करण्याएवढी समज नसते म्हणून विचारांवर जास्त भर न देता त्यांना चांगले वागणे आणि बोलणे यांचे वळण लावले जाते. ते सुधारले तर त्याच्या मागील विचार समजला नाही तरी त्या संस्कारांचा फायदाच होईल असे ही कदाचित वाटत असावे. पिढ्या न् पिढ्या असेच चालत राहिल्यास त्या उक्ती किंवा कृतींच्या मागे असलेले विचार हरवूनही जात असतील असे कधीकधी वाटते. अनेक रूढी, रीतीरिवाज वगैरे कधी आणि कशासाठी सुरू झाले ते आता नक्की सांगता येत नाही. त्याबद्दल तर्क करावे लागतात. शिस्त लावणे या उद्देशातून सहनशक्ती, संयम, चिकाटी यासारखे गुण वाढीला लागतात. स्वच्छता आणि नियमित व्यायाम व आहार यामुळे आरोग्य चांगले राहते. दुस-या व्यक्तीला विनाकारण त्रास देऊ नये, तिचा अपमान करू नये असे वागणे सगळ्यांनी ठेवले तर आपसात संघर्ष होत नाहीत, समाज सुसंघटित आणि बलवान होण्यास मदत होते. विनयशीलता बाळगल्यामुळेही चांगले संबंध राहतात, तसेच आत्मवंचना होत नाही. अशा अनेक प्रकारे संस्कारांचा लाभ व्यक्ती आणि समाजाला मिळतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काही विचित्र रूढी मात्र विशिष्ट स्थानिक किंवा तात्कालिक परिस्थितीतून केंव्हातरी सुरू झालेल्या असतात. ती परिस्थिती बदलल्यानंतरसुध्दा त्या तशाच पुढे चालत जातात किंवा अनिष्ट असे विकृत रूप धारण करतात. बहुतेक चालीरीती या विशिष्ट धर्म, पंथ, जात वगैरेंशी जोडल्या असतात आणि त्या समूहाला एकत्र ठेवण्यासाठी किंवा त्याची ओळख म्हणून त्या पाळल्या जातात. कोणालाही त्यांचा उपद्रव होत नसेल तर ठीक आहे, पण त्यांच्यामुळे कोणाला कष्ट होत असतील किंवा त्यातून वैमनस्य निर्माण होत असेल तर त्यांचा त्याग करणेच शहाणपणाचे ठरते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संस्कार हा प्रकार वैश्विक आहे. स्थळकाळानुसार त्यांचा तपशील वेगळा असतो. चांगले संस्कार लाभलेला भारतीय मुलगा आल्यागेल्या मोठ्या माणसाला वाकून नमस्कार करेल, इंग्रज मुलगा हस्तांदोलन करून त्याची विचारपूस करेल किंवा "त्याची सकाळ, संध्याकाळ, किंवा रात्र चांगली जावो" अशी लांबण न लावता फक्त "गुड मॉर्निंग, गुड ईव्हनिंग, गुड नाईट" असे काही तरी उच्चारेल. जाता येता सारखे "थँक्यू, सॉरी" वगैरे म्हणणे हा देखील संस्कारांचाच भाग आहे. आधुनिक काळात हे संस्कारसुध्दा आपल्याकडील मुलांवर केले जात आहेत. कधी कधी ज्या स्वरांमध्ये ते शब्द म्हंटले जातात त्यात तो भाव मुळीसुध्दा दिसत नाही. कारण ते शब्द केवळ संवयीने उच्चारलेले असतात. त्यांचा अर्थ त्यात अपेक्षित नसतो आणि कोणी तो लावायचा प्रयत्नसुध्दा करत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या बालपणी आमच्या पिढीमधल्या मुख्यतः ग्रामीण भागातील मुलांवर जे संस्कार झाले होते, त्यातले काही रिवाज शहरामधील राहणीत चुकीचे, निरुपयोगी किंवा कालबाह्य वाटल्यामुळे आमच्या पिढीने ते आचरणात आणले नाहीत. जे चांगले वाटत राहिले ते आमच्या पिढीने पुढील पिढीमधील मुलांना दिले. शिवाय शेजारी व शाळांमध्ये वेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या आणि मुलांच्या संपर्कात आल्यामुळे आमच्या पिढीमधील लोकांच्या मुलांनी काही वेगळ्या चालीरीती पाहिल्या आणि उचलल्या. ती मुले मोठी झाल्यावर आता जगभर पसरली आहेत आणि त्यांच्या जीवनशैली आमच्यापेक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यांच्या पुढील पिढीमधील मुलांवर वेगळे संस्कार होत आहेत हे उघड आहे. आमच्या आईवडिलांची पिढी आणि त्यांच्या पूर्वीच्या अनेक पिढ्या कदाचित एकाच प्रकारच्या चाकोतीत जगत आल्या असतील, त्यांच्यावरील संस्कारसुध्दा साधारणपणे तसेच राहिले असतील, पण त्यांची आणि आमची पिढी यात सर्वच बाबतीत खूप मोठा फरक होता. त्यामुळे मागील पिढीमधील लोकांना आमचे वागणे कधीकधी पसंत पडत नसे. त्या मानाने आमची पिढी व पुढील पिढी यांच्यातला फरक कमी झालेला असला तरी अजून तो जाणवण्याइतपत आहे. त्यामुळे आमच्या पिढीने पुढच्या पिढीवर केलेले संस्कार तसेच्या तसेच त्यांच्या पुढील पिढीला मिळण्याची शक्यता कमी आहे, निदान त्यांचे प्रमाण तर नक्कीच कमी होणार आहे. &lt;br /&gt;आमच्या आधीच्या पिढीमधले खेड्यात राहणारे लोक शेणाने सारवलेल्या जमीनीवर फतकल मारून बसत असत, जेवायला बसण्यापूर्वी अंगातला सदरा काढून उघड्याने पाटावर बसत असत, टेबल मॅनर्स हा शब्द त्यांनी ऐकलेला नसे, ते लोक नैसर्गिक विधी उघड्यावर करत असत. परमुलुखात राहणार्‍या पुढच्या पिढीमधल्या काही लोकांना साधे श्लोक ठाऊक नसतात, त्यांच्या बायका चार चौघांसमक्ष नव-याला त्याच्या नावाने हाका मारतात, त्याच्याशी उरेतुरेमध्ये बोलतात, रोज अंघोळ करणे काहीजणांना आवश्यक वाटत नाही, सकाळीच ती करण्याची घाई नसते. आम्हाला सवय नसल्यामुळे अशा काही गोष्टी जराशा खटकतात. पण त्यामुळे त्यांच्या सुसंस्कृतपणाला बाधा येण्याचे कारण नाही. मी तर असे म्हणेन की आमच्या मागील पिढ्या, आमची पिढी आणि पुढील पिढ्या यातील लोकांच्या मनावर लहानपणी भिन्न प्रकारचे संस्कार झालेले दिसले तरी त्या सर्वांना सुसंस्कृतच म्हणायला पाहिजे. पूर्वीच्या पिढीप्रमाणे नवी पिढी वागली नाही तर तिला संस्कारहीन म्हणता येणार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वतःवर ताबा ठेवणे आणि दुस-यांचा विचार करणे अशा काही मूलभूत गोष्टी अंगी बाणवणे हे माझ्या मते एकाद्या माणसाला सुसंस्कृत होण्यासाठी पुरेशा असाव्यात. त्याने इतिहास, भूगोल, संस्कृत, गणित किंवा खगोलशास्त्राचा अभ्यास केला असणे वा नसणे हे गौण आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-4217115353882123652?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/4217115353882123652/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=4217115353882123652' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/4217115353882123652'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/4217115353882123652'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post_05.html' title='सुसंस्कृत'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-4897634781458695563</id><published>2011-12-04T05:43:00.000-08:00</published><updated>2011-12-04T09:42:25.195-08:00</updated><title type='text'>देव आनंद</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-Z7QB71mDixE/Ttuw6SRaL3I/AAAAAAAABJc/kcY10Qj4CRQ/s1600/Devanand1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" dda="true" height="320" src="http://2.bp.blogspot.com/-Z7QB71mDixE/Ttuw6SRaL3I/AAAAAAAABJc/kcY10Qj4CRQ/s320/Devanand1.jpg" width="197" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;कॉलेजशिक्षणासाठी मी मुंबईला आलो तेंव्हा आमच्या वसतीगृहात एकनाथ देव नावाचा एक मुलगा होता. आम्हा दोघांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमधील काही बाबतीत बरेच साम्य असल्यामुळे आमचे धागे लवकर जुळले आणि आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. आम्हा दोघांच्या जोडीला इतर मित्र 'देव-आनंद' असे म्हणायला लागले. लहान गावातील सनातनी कुटुंबामधून आलेलो असल्यामुळे देव आनंदचे रोमान्सपूर्ण चित्रपट पाहण्याची संधी आम्हाला कधी मिळालीच नव्हती. त्याची आकर्षक छायाचित्रे तेवढी वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये आणि रस्त्यातील पोस्टर्सवर पाहिली होती. त्यामुळे त्याचा सिनेमा पाहण्याची आम्हालाही खूप उत्सुकता लागली आणि संधी मिळताच ती इच्छा पूर्ण करून घेतली. मी पाहिलेला देव आनंदचा पहिला सिनेमा बहुधा 'काला पानी' किंवा 'काला बाजार' असावा. माझे कॉलेजशिक्षण चालू असतांना घरातली आर्थिक परिस्थिती ओढाताणीचीच असल्यामुळे नाटक सिनेमा वगैरेंची चैन परवडण्यासारखी नव्हती. नोकरीला लागल्यानंतर मात्र या दोघांना अग्रक्रम देऊन तोपर्यंतचा सारा अनुशेष भरून काढला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;राजकपूर, दिलीपकुमार आणि देवानंद (बहुतेक लोक देव आनंद असा उच्चार न करता देवानंद असाच करतात) हे त्रिकूट त्याच्याही आधीच्या काळात हिंदी सिनेमाचे त्रिमूर्ती होते. त्यातला राजकपूर बहुधा शहरातला आणि दिलीपकुमार खेड्यातला गरीब बिचारा साधाभोळा, निरागस (किंचित बावळटपणाकडे झुकणारा) माणूस असायचा. त्या दोघांचे अभिनयकौशल्य वादातीत असले तरी सिनेमातली त्यांची पात्रे आकर्षत वाटत नसत. शिवाय ते दोघेही तोंवर वृध्दापकालाकडे झुकले होते आणि ते स्पष्टपणे दिसून येत असे. देवानंद मात्र चाळिशीत पोचलेला असला तरी अजून देखणा, स्मार्ट आणि स्टाइलिश हीरो शोभत असे. त्याने आपले दिसणे, चालणे, बोलणे, पाहणे वगैरे सगळ्या बाबतीत खास लकब निर्माण केली होती. त्याची केशरचना, वेषभूषा वगैरेंमध्ये खासियत असे. कदाचित त्यामुळेच नकला (मिमिक्री) करणा-या लोकांना देवानंदचे अॅक्टिंग करणे आवडत असावे. शिवाय देवानंदच्या चित्रपटात रडारडीचे प्रमाण कमी असायचे, छान छान गाणी असायची, बहुतेक वेळा उत्कट प्रेमकथा असायचीच, शिवाय उत्कंठावर्धक थरारनाट्य किंवा नर्म विनोदाची झालरही असायची. एकंदरीत 'नो टेन्शन, ओन्ली एंटरटेनमेंट' असल्यामुळे ते पहायला (विशेषतः त्या काळात) मजा येत असे. टेलिव्हिजन, व्हीडिओ किंवा सीडी प्लेयर वगैरे येण्यापूर्वीच्या त्या काळात सिनेमा पाहणे आणि सिनेमाची गाणी ऐकणे हीच मनोरंजनाची मुख्य साधने होती. या सगळ्या कारणामुळे त्या काळात देवानंदचा नवा पिक्चर आला की तो तर पहायचाच, शिवाय एकादा जुना चित्रपट मॅटिनीला लागला असेल तर तोही पहायचा असे ठरून गेले होते. &lt;br /&gt;सिनेनायकांची नवी पिढी तोपर्यंत पडद्यावर आलेली होतीच. ते लोकसुध्दा पुढे वयोमानानुसार काका मामा वगैरे कामे करू लागले, पण देवानंद मात्र चित्रपटाचा नायकच राहिला. त्यामुळेच त्याला चिरतरुण, सदाहरित नायक (एव्हरग्रीन हीरो) असे संबोधले जाऊ लागले. त्याच्या चित्रपटांवर यापूर्वीच खंडीभर लिखाण होऊन गेले आहे आणि उद्या परवाच्या पेपरांमध्ये जिकडे तिकडे तेच पसरलेले दिसणार आहे. त्यामुळे त्यात आपली चिमूट टाकण्यात काही अर्थ नाही. माझ्या वैयक्तिक जीवनात मी कधीतरी कुठेतरी त्याच्या शूटिंगसाठी जमलेली गर्दी पाहिली असेल किंवा त्याला एकाद्या विमानतळावर इकडून तिकडे जातांना ओझरते पाहिले असले तरी अमोरासमोर आल्याचे आठवत नाही. त्याचे दर्शन सिनेमाच्या मोठ्या किंवा टीव्हीच्या (आणि आता संगणकाच्या) छोट्या पडद्यावरच झाले आहे. पण त्याची छबी कायमची स्मरणात राहणार आहे यात कणमात्र शंका नाही.&lt;br /&gt;गाईड आणि हरे रामा हरे कृष्णा हे त्याचे दोन चित्रपट इतर रोमँटिक सिनेमांपेक्षा वेगळे होते. दोन्हींमध्ये उत्कृष्ट संगीत, छायाचित्रण, संकलन वगैरे तांत्रिक गुण होतेच, त्यातले कथा विषय हटके होते. गाईडची कथा निदान तत्कालीन सामाजिक परिस्थितीत पटण्यासारखी नव्हती, नायकाने चक्क एका विवाहित स्त्रीला तिच्या नव-यापासून दूर करण्याचा प्रयत्न करणे आणि तिने ते करणे हे तोपर्यंत चालत आलेल्या नायिकांच्या सती सावित्रीच्या परंपरेला जबरदस्त धक्का देणारे होते. अशा आधुनिक विचारांच्या नायकाने पाऊस पडावा म्हणून आमरण उपोषण करायला तयार होणे आणि देवाने प्रसन्न होऊन चक्क पाऊस पाडणे हे सुध्दा चमत्कारिक वाटणारे होते. तरीसुध्दा ती गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यात देवानंद बराच यशस्वी झाला होता. हरे रामा हरे कृष्णामध्ये थोडासा सामाजिक आशय होता. मोठ्या शहरांमध्ये नुकताच सुरू झालेला परदेशी हिप्पी लोकांचा शिरकाव आणि त्यांची मादक पदार्थांची व्यसनाधीनता वगैरे गोष्टी या सिनेमात प्रथमच दाखवल्या होत्या. या चित्रपटातून झीनत अमान ही नटी (बहिणीच्या रूपात) पुढे आली आणि एक नवी आणि वेगळी दिसणारी नायिका हिंदी सिनेमाला मिळाली. देव आनंद आणि त्याचे दोन बंधू चेतन आनंद व विजय आनंद या तीघांनी अनेक संस्मरणीय चित्रपट निर्माण करून ठेवले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;टेलीव्हिजनच्या माध्यमातून देव आनंद या व्यक्तीला पाहण्याची संधी अनेक वेळा मिळत गेली. नट व नायक देव आनंद म्हणून त्याची स्वतःची अशी एक इमेज तयार झालेली होतीच. माणूस म्हणून सुध्दा एक बुध्दीमान, विचारी, बहुश्रुत, हजरजबाबी आणि निर्भिड गृहस्थ अशी एक वेगळी आणि चांगली प्रतिमा मनात तयार झाली. बहुतेक मुलाखतींमध्ये तो आपली मते आणि विचार स्पष्टपणे आणि नेमक्या शब्दात व्यक्त करतांना दिसत असे. ती पटणे किंवा न पटणे हे वेगळे, पण मांडता येणेसुध्दा कौतुकास्पद वाटते. एक कुशल आणि कल्पक मनोरंजन करणारा (एंटरटेनर) यापेक्षा त्याच्या व्यक्तीमत्वाचा कॅनव्हास मोठा होता. सिनेमामधील त्याचे काम पाहून मजा वाटत असे, आता त्याच्याबद्दल मनात आदरभाव निर्माण झाला. अठ्ठ्याऐंशी वय झाल्यानंतर त्याचे निर्गमन कधीतरी होणार हे माहीत असले तरी आज सकाळी त्याची बातमी अचानक आल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्याला ही एक लहानशी श्रध्दांजली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-4897634781458695563?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/4897634781458695563/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=4897634781458695563' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/4897634781458695563'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/4897634781458695563'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='देव आनंद'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-Z7QB71mDixE/Ttuw6SRaL3I/AAAAAAAABJc/kcY10Qj4CRQ/s72-c/Devanand1.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-9028285973468394140</id><published>2011-11-30T22:28:00.000-08:00</published><updated>2011-11-30T22:28:34.203-08:00</updated><title type='text'>आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हंटले असते</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;आत्याबाईला मिशा असत्या तर ... तिला 'काका' म्हंटले असते. ही म्हण माझ्या लहानपणी खूप प्रचलित होती. कदाचित मी जरा जास्तच चौकस (किंवा आगाऊ) असल्यामुळे नाही नाही ते प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडत असेन आणि त्यामुळे वैतागून ते लोक मला ही म्हण वरचे वर ऐकवत असतील. 'आत्या' म्हणजे पित्याची बहीण म्हणजे ती बाईच असणार आणि 'काका' हा पित्याचा भाऊ असल्याने बुवाच असणार हे या शब्दांच्या व्याख्यांवरून स्पष्ट होते. हिंदी भाषेत आत्याला 'बुवा' म्हणतात हे मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा माझी हंसून हंसून पुरेवाट झाली होती. पण 'बुवा' असा ऐकू येणारा हा शब्द 'बुआ' असा आहे आणि तो स्त्रीलिंगी आहे ही माहिती राष्ट्रभाषेचा अभ्यास करतांना मिळाली. ज्या प्रमाणे मला बुवा(आ) हा शब्द ऐकून गंमत वाटली होती तशीच मजा हिंदी भाषिक लोकांना 'जगन्नाथबुवा' किंवा 'यशवंतबुवा' ही मराठी नावे ऐकतांना वाटत असेल. 'काका' हा शब्द मात्र सगळ्या भाषांमध्ये पुल्लिंगीच असावा. त्या बाबतीत काही गोंधळ नाही. पण पंजाबीमध्ये लहान मुलाला 'काका' किंवा 'काके' असे संबोधतात तेंव्हा त्यांना मिसरूड फुटलेले नसते. त्यामुळे पंजाबी 'काका'ला बहुधा मिशा नसतात. राजेश खन्ना मात्र जन्मभर 'काका'च राहिला. एका चित्रपटात त्याने "ये मर्दोंकी खेती है।" असे म्हणून ओठांवर थोडेसे रान माजवले होते आणि त्याच्या 'मर्दानगी'ची खात्री नायिकेला पटली हे पाहून झाल्यावर त्याला साफ करून टाकले होते.&lt;br /&gt;पुरुषांना मिशा असतात तशा स्त्रियांना त्या नसतात हे सर्वसामान्य निरीक्षण असते. त्यामुळे आत्याबाईला मिशा नसतात हे उघड आहे. पूर्वीच्या काळी बहुतेक काका लोक मिशा ठेवत असत. पण गेल्या दोन तीन पिढ्यांपासून बहुसंख्य पुरुषांनी मिशांना चाट दिली असल्यामुळे आत्या आणि काका यांच्यातला एक महत्वाचा दृष्य फरक नाहीसा झाला (दोघेही पँट चढवू लागले असल्यामुळे आणखी एक फरक कमी झाला) आणि ही म्हण किंचित मागे पडली असावी. खूप दिवसांपासून माझ्या कानावर ती पडली नाही. पण लेखनामध्ये आणि भाषणांमध्ये ती अजूनही सर्रास वापरली जातेच. 'जर असे झाले असते तर' असे तर्ककुतर्क असलेले प्रश्न कोणी विचारले आणि त्याला उत्तर देणे अडचणीचे असले तर ही म्हण त्या प्रश्नकर्त्याच्या तोंडावर फेकली जाते. उदाहरणार्थ तुमचा अमका उमेदवार निवडणूकीत पडला असता, तमक्याला भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन बनवले असते, व्यापाराचे जागतिकीकरण झाले नसते, न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडण्याऐवजी त्याचे झाडच पडले असते वगैरे वगैरे. ज्या गोष्टीची मुळीच शक्यता नसते अशी एकादी गोष्ट झाली तर (तू काय करशील?) किंवा जी गोष्ट घडलेली नाही ती घडली असती तर काय झाले असते? असे विचारणे हा या म्हणीचा अर्थ आहे. तसेच एकादी गोष्ट करण्यासाठी अशक्य अशा अटी घालणे असाही होऊ शकतो. "आत्याबाईला मिशा असत्या तर ..." असे विचारणे मूर्खपणाचे आहे असे म्हणू शकतो किंवा तसे न म्हणता "तर तिला 'काका' म्हंटले असते." असे चतुराईचे उत्तर देता येते. न होणा-या गोष्टींबद्दल चिकित्सा करत बसू नये असा बोध त्यावरून मिळतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुला दोन शिंगे फुटली तर .." असे एकाद्याला म्हंटले तर तो माणूस प्रश्न विचारणा-याला मूर्खात काढेल किंवा "आधी मी ती तुझ्या पोटात खुपसेन" असे उत्तर देईल. 'आत्याबाईला मिशा असत्या तर' ही म्हण या ठिकाणी लागू पडते कारण तसे घडण्याची शक्यता नसते. या उलट "तुला खूप भूक लागली तर ..." असा प्रश्न विचारला तर त्यात काहीच अशक्य नाही. प्रत्येक माणसाला भूक तर लागतेच. पण तिचे शमन अन्न खाऊन करतात हे उत्तरसुध्दा सर्वांना माहीत असते. त्यामुळे हा प्रश्न "काकाला मिशा असल्या तर... " असा (निर्बुध्दपणाचा) होऊ शकेल आणि वैतागून "तुलाच खाईन." असे उत्तर त्यावर मिळण्याची शक्यता आहे. पण जर तो माणूस अंटार्क्टिका किंवा सहारा वाळवंटात मोहिमेवर निघाला असेल तर मात्र आपण भूक भागवण्याची कशी जय्यत तयारी केली आहे हे फुशारकीने सांगेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपट आणि मालिकांमध्ये न्यायालयाची जी दृष्ये दाखवतात त्यांमध्ये साक्षीदाराला एका बाजूच्या वकीलाने 'जर तर' असलेला काही प्रश्न विचारला की लगेच विरुध्द बाजूचा वकील "ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा प्रश्न हायपॉथिटीकल आहे" असे म्हणत उभा राहतो. त्या वेळी प्रेक्षकांमध्ये पिकलेल्या हंशावरून कदाचित हा प्रश्न 'आत्याबाईला मिशा असत्या तर' अशा प्रकारचा असावा असे आपल्यालाही वाटते. मग त्या प्रश्नाचा न्यायालयासमोर असलेल्या खटल्याशी कसा संबंध आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न पहिला वकील करतो. ते ऐकून घेतल्यानंतर "ऑब्जेक्शन सस्टेन्ड किंवा ओव्हररूल्ड" असा निर्णय न्यायमूर्ती देतात. याबद्दल थोडी फार संदिग्धता असते हेच यावरून दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही दिवसांपूर्वी परगावी गेलो असतांना परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्टेशनावर आलो असतांना अचानक माझी प्रकृती खूप बिघडली होती. त्या वेळी आलेल्या अनुभवावर मी एक लेख लिहून तो एका संकेतस्थळावर प्रसिध्द केला होता. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी एका प्रतिसादात "जे घडलेच नाही त्यावर जर तर चर्चा करून उगाच त्रास कशाला करून घ्यायचा ?" असे विचारले होते. त्यामुळे त्या लेखात केलेले माझे विवेचन 'आत्याबाईला मिशा असत्या तर' अशा प्रकारचे होते का असे मला क्षणभर वाटले. पण ते तसे नव्हते. कोठल्याही माणसाची प्रकृती अचानक बिघडण्याची शक्यता तरुणपणी अगदी कमी म्हणजे शून्याच्या जवळपास इतकीच असते. त्यामुळे नको ते विचार मनात आणून स्वतःला ताप करून घेण्यात अर्थ नसतो हे खरे आहे. पण माझी तब्येत बिघडण्यासाठी माझ्या शरीरात जे काही (मला माहीत नसतांना) चालले होते त्याचा परिपाक मी रेल्वे स्टेशनवर असतांना ती व्याधी एकदम विकोपाला जाण्यात झाला. जी गोष्ट प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर अर्ध्या तासात झाली ती नंतरच्या सोळा तासात होण्याची शक्यता बत्तीसपट जास्त होती. त्यामुळे प्रवासात असतांना ती झाली असती तर काय झाले असते हा प्रश्न गैरलागू ठरत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हृदयविकार, एड्स किंवा कँसर या व्याधी कोणालाही जडण्याची शक्यता संख्याशास्त्रानुसार नगण्यच असते, पण कोणत्याही दिवसाचे वर्तमानपत्र वाचतांना त्यासंबंधी निदान एक तरी बातमी, लेख किंवा जाहिरात त्यात दिसतेच. जेंव्हा एकादा प्रसिध्द माणूस त्यांना बळी पडलेला असतो तेंव्हा त्याच्य़ासमवेत त्याला जडलेल्या विकारालासुध्दा प्रसिध्दी मिळते. रोगाचे निदान आणि त्यावरील उपाययोजना यात झालेल्या प्रगतीमुळे बहुतेक इतर व्याधी पहिल्यासारख्या दुर्धर राहिलेल्या नाहीत. त्यांची गणना आता बातमी या सदरात होत नाही. त्यामुळे प्रसिध्द व्यक्तींना दुर्धर व्याधी जडण्याची शक्यता अजूनही तशी कमीच असली तरी त्याची बातमी होण्याची शक्यता मात्र प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्या बातमीमुळे सर्वसामान्य लोकांनासुध्दा त्याची माहिती मिळते तसेच त्याची भीती वाटते. ते विकार होऊ नयेत यासाठी घेण्याची सावधगिरी किंवा त्यांचे नियंत्रण व निवारण करण्याठी करण्याचे उपाय, ते जडल्यानंतर काय करावे यावर सल्ले अशा अनेक प्रकारचे लेख रोज वर्तमानपत्रात येत असतात किंवा त्याची चर्चा टीव्हीवर होत असते. त्यावरील प्रतिबंधक व निवारक औषधे आणि त्यांचे निदान व त्यावर उपचार करण्याची व्यवस्था असलेल्या संस्था त्यांची जाहिरात मोठ्या प्रमाणावर करत असतात. कांही लोकांना याचा उपयोग होत असतो. त्यामुळे आपल्याला असे काही होईल का हा विचार आत्याबाईंना मिशा असण्याच्या जवळपास असला तरी तो करणे योग्य ठरते. फक्त त्याविषयी भलभलत्या शंकाकुशंका मनात आणून त्यावर चिंता करून फार मनस्ताप करून घेतला, नको तेवढ्या अनावश्यक चाचण्या करून घेतल्या आणि अखेरीस ते 'गुंड्याभाऊचे दुखणे' ठरले तर मात्र कपाळाला हात लावायची पाळी येते.&lt;br /&gt;'आत्याबाईला मिशा असत्या तर ...' हा वाक्यप्रयोग त्याची किती टक्के शक्यता आहे एवढ्यावरच अवलंबून नसते, शक्यतेपेक्षाही त्याचे संभाव्य परिणाम किती विदारक असू शकतात यांचा परिणाम जास्त प्रभावी ठरतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-9028285973468394140?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/9028285973468394140/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=9028285973468394140' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/9028285973468394140'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/9028285973468394140'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/11/blog-post_30.html' title='आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हंटले असते'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-4468164896964284092</id><published>2011-11-22T23:04:00.000-08:00</published><updated>2011-11-25T21:26:13.016-08:00</updated><title type='text'>विज्ञाननिष्ठा आणि निरीश्वरवाद (सुधारित आवृत्ती)</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;विज्ञाननिष्ठा आणि निरीश्वरवाद&lt;br /&gt;&lt;br /&gt;विज्ञानाच्या मार्गावर चालणा-या लोकांनी निरीश्वरवादी असावे अशी काही लोकांची अपेक्षा असते. त्यांनी (विज्ञाननिष्ठांनी) देवाला नमस्कार करणे ही विज्ञानाशी प्रतारणा आहे असा सूर या (टीकाकार) लोकांच्या बोलण्यातून किंवा लिहिण्यातून निघतो. उलटपक्षी सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, विश्वाचा कर्ताधर्ताहर्ता अशा ईश्वराचे अस्तित्व निर्विवाद आहे अशी गाढ श्रध्दा अधिक लोक बाळगतात. त्यांच्यातील काही जण अधून मधून उगाच विज्ञानाच्या नावाने खडे फोडत असतात. "देवदानवा नरे निर्मिले हे मत लोकां कवळू द्या।" अशी तुतारी फुंकणारे केशवसुत किंवा "धर्म ही अफूची गोळी आहे." असे सांगून देवासकट धर्माचे उच्चाटन करायला निघालेला माओझेदोंग (माओत्सेतुंग) यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्याचे ऐकिवात नाही. नास्तिक विचारसरणी बाळगणारे लोक इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, भाषा अशा इतर विषयांचे विद्यार्थी किंवा निरक्षरसुध्दा असू शकतात. अमेझॉनच्या अरण्यामध्ये झाडावर झोपणारे किंवा उत्तर ध्रुवावरील बर्फात इग्लू बांधून राहणारे काही लोक अद्याप शिल्लक असतील तर ते नास्तिक असण्याचीच शक्यता मला जास्त वाटते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;विज्ञानाचा आणि परमेश्वरावरील अविश्वासाचा थेट संबंध दिसत नाही. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसारामुळे लोकांच्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या. अज्ञानाचा अंधार काही प्रमाणात नाहीसा झाल्यामुळे अज्ञाताची भीती कमी झाली, लोकांचा आत्मविश्वास वाढला. देवाच्या नावावर आणि त्याच्या कोपाच्या धाकामुळे चालत आलेल्या अनिष्ट प्रथांचे पालन न करण्याचे धारिष्ट्य ते दाखवू लागले. "हे लोक मुजोर झाले आहेत, देवालासुध्दा ते जुमानत नाहीत" अशा त्यावरील प्रतिक्रिया परंपराग्रस्त मंडळींकडून आल्या. यामुळे विज्ञानाचा ईश्वराला विरोध आहे असा समज प्रचलित झाला आणि तो टिकून आहे. माझ्या लहानशा जगात आलेला त्यासंबंधीचा माझा अनुभव आणि माझे निरीक्षण यांच्या आधारे या समजाबद्दल मी या लेखात लिहिणार आहे. देवधर्म, श्रध्दा, अंधश्रध्दा वगैरेंवर पूर्वीही अनेक वेळा चर्चा होऊन गेल्या आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या मुद्यांवर ठाम असल्यामुळे त्यात स्टेलमेट होते. दुसरा कसा चूक आहे हे दाखवण्याच्या नादात कधीकधी याचे पर्यवसान परस्परावर आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या लिखाणाचा विपर्यास, एकमेकांना शब्दात पकडणे वगैरेमध्ये होऊ लागल्यावर ते (आणि वाचक) त्याला कंटाळतात. या सगळ्याची पुनरावृत्ती करणे हे या लेखाचे प्रयोजन नाही. वैचारिक, तात्विक किंवा सैध्दांतिक पातळीवरून खाली येऊन जमीनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती (ग्राउंड रिअॅलिटी) काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी या लेखात करणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अणुशक्ती विभागातील वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यांना सहाय्य करणारे इतर कर्मचारी यांच्या वसाहतीचे नाव 'अणुशक्तीनगर' असे आहे. या वसाहतीत वास्तव्याला राहिलेल्या लोकांमधून काही जण या क्षेत्रामधील सर्वोच्च पातळीपर्यंत पोचलेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. अशा बुध्दीमान लोकाच्या सहवासात तीन दशके राहण्याची संधी मला मिळाली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करणा-या अनेक विद्वानांबरोबर व्यक्तीगत परिचय झाला, अनेक विषयांवर त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांच्या सहवासात दीर्घकाल राहिल्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा माझ्या मनावर उमटला असणे साहजीक आहे. त्या सर्वांमध्ये पूर्ण मतैक्य होते अशातला भाग नाही. पण सर्वांच्या मतांचा ढोबळ विचार करता त्यातून मला जे जाणवले आणि समजले ते लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण 'निधर्मी' आहोत असे त्यांच्यापैकी कोणीही अधिकृतरीत्या कागदोपत्री नमूद केले असल्याचे मी तरी ऐकले नाही. माझ्या माहितीमधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या धर्माची होती. त्याचा वृथा अभिमान ते एरवी मिरवत नसले तरी त्याचे एकादे तरी चिन्ह त्यांच्या घरात किंवा वागण्यात दिसत असे. गणेशोत्सव, दुर्गापूजा, कृष्णजन्माष्टमी, अय्यप्पापूजा यासारखे उत्सव सार्वजनिकरीत्या आणि दिवाळी, पोंगल, ओणम, लोहडी वगैरे सण वैयक्तिक पण मोठ्या प्रमाणावर इथे साजरे केले जात. अर्थातच त्या निमित्याने विवक्षित देवतांच्या प्रतिमांचे पूजन आणि त्यांची आराधना होतच असे. मूर्तीपूजा न करणारे धर्मीय त्यांच्या सणांच्या काळात त्यांच्या परंपरागत पध्दतीने ईश्वराची प्रार्थना करीत. बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या परिसरात मी अनेक वेळा गेलो आहे. त्या ठिकाणी देखील मला असेच दृष्य दिसले. एका वर्षी मी ख्रिसमसच्या काळात इंग्लंडमध्ये आणि एकदा अमेरिकेत होतो. दोन्ही वेळी मी कुतूहलापोटी स्थानिक चर्चला भेट दिली होती. त्या वेळी तिथे अलोट गर्दी होत होती. वैज्ञानिक, तंत्रज्ञ, डॉक्टर वगैरे मंडळी या उत्सवात सहभाग घेत नसल्याचे मी कुठेच ऐकले नाही. विज्ञानाकडे वळल्यामुळे जर माणसे सरसकट नास्तिक होत असली तर त्यांच्या वसाहती हे अंधश्रध्दा निर्मूलन संघटनांचे भक्कम किल्ले (गढ) व्हायला पाहिजे होते, पण आमच्या वसाहतीत मला त्यांचे अस्तित्वफारसे जाणवले नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कार्यालये, कार्यशाळा आणि प्रयोगशाळांमध्ये काम करतांना हीच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ मंडळी त्यात मग्न होऊन जात असत. काही लोकांना आपला प्रपंचच नव्हे तर तहानभूकसुध्दा विसरून तास न् तास संशोधनकार्यात गढून गेलेले मी अनेक वेळा पाहिले आहे. त्यातील आव्हाने पेलण्यासाठी आणि अडचणींचे डोंगर पार करण्यासाठी ते स्वतःच कसून मेहनत करीत, त्यासाठी कोणी देवाचा धावा केलेला मला दिसला नाही. संशोधन किंवा निर्मितीमधील प्रत्येक काम त्या ठिकाणी वैज्ञानिक आणि शास्त्रशुध्द पध्दतीने केले जात असे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयी त्यांच्या ठायी असलेल्या निष्ठेबद्दल शंका घेता येणार नाही. परिसंवाद, चर्चासत्रे वगैरेंमध्ये विषयाला धरून विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील सिध्दांतांच्या आधारेच वाद, विवाद, संवाद वगैरे होत असत. देवाचे असणे किंवा नसणे यापैकी कशाचाच उल्लेख त्यात येत नसे. त्या ठिकाणी ही बाब पूर्णपणे अप्रस्तुत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वसाहतीमध्ये होणारे उत्सव आणि समारंभ यात भाग घेतांना मात्र देवाचा उल्लेख करतांना कोणाला संकोच वाटत नसे किंवा त्यात आपले काही चुकते आहे अशी अपराधीपणाची भावनाही वाटत नसे. अर्थातच 'विज्ञान' आणि 'ईश्वर' या एकमेकांच्या विरोधी 'म्यूच्युअली एक्स्क्ल्यूझिव्ह' संकल्पना आहेत असे मानले जात नसे. अणुशक्ती आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष असलेले एक ज्येष्ठ वैज्ञानिक आमच्या वसाहतीत खूप वर्षांपूर्वी झालेल्या एका समारंभात प्रमुख पाहुणे होते. त्यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग मला अजून आठवतो. त्या वेळी त्यांनी असे सांगितले, "आमची कार्यालये, प्रयोगशाळा वगैरेंमध्ये काम करण्यासाठी काही नियम असतात, पोलिस अधिकारी वाहतुकीचे नियम करतात, तसेच नागरिकांसाठी सरकार कायदे कानून करते. यांचे पालन कशा प्रकारे केले जाते हे पाहण्यासाठी खास यंत्रणा उभ्या कराव्या लागतात, तरीसुध्दा त्यांचे उल्लंघन होण्याचे प्रकार घडतच असतात, हे नियम वेळोवेळी बदलले जातात किंवा ते बदलावे लागतात. पण विज्ञानातले नियम मात्र कधीही कोणीही तोडू किंवा बदलू शकत नाही. अमेरिकेला किंवा चीनला जाल तर तिथले काही कायदे वेगळे दिसतील, पण विज्ञानविषयामधील नियम तेच्या तेच असतात. विज्ञानामधील कोणत्याही समीकरणातला 'कांन्स्टंट' हा काँन्स्टंटच राहतो. अशा ज्या अगणित नियमांच्या आधारावर या विश्वाचे व्यवहार अचूकपणे आणि अव्याहतपणे चालत राहिलेले आहेत त्यामधील सातत्य कशामुळे किंवा कोणामुळे आले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात परमेश्वर या संकल्पनेचा आधार मिळतो. वगैरे वगैरे ..." थोडक्यात म्हणजे अगम्य आणि अतर्क्य अशा गोष्टींची जबाबदारी अखेरीस देवावर सोपवणे वैज्ञानिकांनाही भाग पडते किंवा सोयिस्कर वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या कामापुरता विचार करतांना असे जाणवते की कित्येक बुध्दीमान आणि तज्ज्ञ लोकांचे ज्ञान, विचार, कल्पना, अनुभव आणि कौशल्य यांचा उपयोग करून आणि अनेक प्रकारची किचकट आकडेमोड व विश्लेषणे करून आम्ही नवनवी स्वयंचालित यंत्रसामुग्री बनवून घेत असू. पण आम्ही कागदावर ओढलेल्या रेघोट्यांवरून त्याचे सर्व भाग कारखान्यांमध्ये तयार झाले, ते एकमेकांशी नीटपणे जुळले, त्यातून तयार झालेले नवे यंत्र पहिल्याच प्रयत्नात सुरू झाले आणि अपेक्षेप्रमाणे सुरळीतपणे काम करायला लागले असे कधीच झाले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या इतर क्षेत्रात काम करणा-या लोकांचा अनुभवसुध्दा असाच असतो असे त्यांच्याकडून कळत असे. यामागील कारणे किंवा त्यावरील उपाययोजना हा या लेखाचा विषय नाही. याच्या उलट एका लहानशा मुंगीच्या शरीरातील श्वसन, पचन, रक्ताभिसरण वगैरे गुंतागुंतीच्या संस्था, तिच्या ठायी असलेली दृष्टी व घ्राणेंद्रियांसारखी ज्ञानेंद्रिये, पाय व तोंडासारखी कर्मेंद्रिये आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती बाळगणारा निर्णयक्षम असा मेंदू हे सगळे किती सूक्ष्म असतात, त्यांची रचना कशा प्रकारची असते आणि त्यांचे कार्य कसे चालते यावर खूप संशोधन केले गेले आहे. पण अजूनपर्यंत ते पूर्णपणे समजलेले असावे असे मला वाटत नाही. हे सगळे आपल्या आपण होत असते असे मान्य करणे जड जातेच. विचारपूर्वक आणि योजनापूर्वक रीतीने करूनसुध्दा आपली तुलनेने सोपी असलेली कामे पूर्णपणे मनासारखी होत नाहीत आणि असंख्य प्राणीमात्रांच्या शरीरातल्या इतक्या गुंतागुंतीच्या क्रिया आपोआप कशा चालत रहातात याचे आश्चर्य वाटते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या शरीरातील बाह्य आणि अंतर्गत अवयवांच्या रचना आणि कार्यप्रणाली थक्क करतातच, त्या शिवाय त्यात किती प्रकारच्या ग्रंथी असतात आणि त्या ठराविक वेळी ठरलेली निरनिराळी द्रव्ये योग्य त्याच प्रमाणात निर्माण करून त्यांचा पुरवठा आपल्या शरीराला करत असतात यांचा अंत लागत नाही. आपण खाल्लेल्या अन्नाचा एकत्रित रस रक्तामधून शरीरभर फिरत असतो. त्यातला काही भाग त्या ग्रंथींपर्यंत जाऊन पोचतो आणि त्यातील नेमकी द्रव्ये शोषून घेऊन या ग्रंथी विशिष्ट प्रकारचे रस तयार करून ते विशिष्ट अवयवांकडे पाठवतात आणि ते रस योग्य त्या जागेपर्यंत जाऊन पोचतात. या गोष्टी कशा घडतात हे आपल्या आकलनाच्या पलीकडेच नव्हे तर कल्पनेच्या पलीकडे असल्याचे जाणवते. आपल्याच शरीरात हे काम अविरतपणे बिनबोभाट चाललेले असते, पण आपल्याला त्याची जाणीवसुध्दा नसते आणि काही कारणाने त्यात खंड पडला तरच त्याचे परिणाम आपल्याला समजतात. कदाचित यामधील गुंतागुंत, विविधता आणि अनिश्चितता यामुळेच काही डॉक्टर मंडळी "मी इलाज करतो, 'तो' बरे करतो (आय ट्रीट, 'ही' क्युअर्स)" असे सांगणारे फलक दवाखान्यात लावत असावेत. प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि शल्यक्रियाविशारद स्व.डॉ.नितू मांडके यांची टीव्हीवरील एक मुलाखत मला चांगली आठवते. त्यात त्यांनी सांगितले होते, "कोणत्या क्षणी कोणत्या व्यक्तीला कोणता आजार होईल, त्या वेळी त्याला कोणता डॉक्टर भेटेल, त्याने दिलेल्या औषधोपचाराला त्या रुग्णाचे शरीर कसा प्रतिसाद देईल या सगळ्याबद्दल काहीही निश्चितपणे सांगता येत नाही." आभाळाकडे बोट दाखवत ते म्हणाले होते, "हे सगळे 'तो' ठरवतो." त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या बाबतीतच धक्कादायक असे काही अघटित घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही त्या वेळी कोणाच्या मनाच आली नसेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या आठवड्यात मला आलेल्या एका लहानशा अनुभवाचे कथन मी एका लेखात केले होते. ध्यानीमनी नसतांना अचानक एकादे संकट ओढवावे किंवा खूप मोठ्या संकटाची चाहूल लागावी आणि त्यातून सुटका व्हावी असे अनेक अनुभव बहुतेक लोकांच्या आयुष्यात घडत असतात. एकादा अपघात होऊन गेल्यानंतर त्यातून (योगायोगाने की सुदैवाने की ईश्वरी कृपेने?) बचावलेल्या लोकांच्या (मिरॅक्युलर एस्केपच्या) अनेक गोष्टी बाहेर येतात. प्रत्यक्ष अॅक्सिडेंट्सच्या तुलनेत थोडक्यात वाचण्याची ('नियर मिस'ची) संख्या मोठी असते असा निदान माझा अनुभव आहे. त्यामुळे कोणी अदृष्यपणे हे घडवून आणत असावे की काय? असा विचार मनात येणे स्वाभाविक असते. हा निव्वळ योगायोगाचा भाग असणार हे बुध्दीला पटले तरी त्याने मनाचे पूर्ण समाधान होत नाही. शिवाय आपला कोणी अज्ञात आणि अदृष्य पाठीराखा (किंवा कर्ता करविता) आहे ही सुखद कल्पना मनाला धीर देते, मनाचा समतोल सांभाळायला मदत करते. मनामधील घालमेलींचा शरीरावर परिणाम होतो असे डॉक्टरही सांगतात. त्यामुळे याचा प्रत्यक्ष लाभ होऊ शकतो. हे सारे खूप किचकट आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीतले धागेदोरे आणि त्यांची गुंतागुंत निराळी असते. पण बहुतेक वेळा शेवटी त्याचा परिणाम देवावरील विश्वासाकडे झुकण्यात होतो. 'त्या'चे कार्यक्षेत्र 'संकटमोचन' एवढेच न राहता विश्वाचा सारा पसारा सांभाळण्यापर्यंत विस्तारते. तसेच अनपेक्षित असे विपरीत काही घडले आणि त्याची कारणे समजली नाहीत तर त्याची जबाबदारी 'त्या'च्यावर टाकणे हे त्या विषयावर जास्त विचार करण्यापेक्षा कमी कष्टप्रद असते. घरातील आणि समाजातील वातावरणामुळे ही गोष्ट अंतर्मनात ठसलेली असते हे बहुधा त्याचे मुख्य कारण असावे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मला आश्चर्यकारक वाटणारी आणखी एक गोष्ट आहे. स्वार्थ हा सर्व प्राणीमात्रांचा मूळ स्वभाव असावा असे मला तरी दिसते. मुंग्या, झुरळे, उंदीर, चिमण्या वगैरे जीव बेधडक आपल्या घरात शिरतात आणि त्यांना मिळेल त्यातले हवे असेल ते भक्षण करतात किंवा घेऊन जातात. जंगलामधील हिंस्र पशू मिळेल त्या अन्य पशूंची शिकार करून त्यांना खातात, तसेच शाकाहारी पशू त्यांना सापडलेल्या वनस्पतींच्या पानाफुलाफळांना खाऊन फस्त करतात. "हे आपले नाही, परक्याचे आहे" असा विचार ते करत नसणार. मनुष्यप्राण्याची मूळ वृत्ती याहून निराळी असण्याचे शास्त्रीय कारण मला दिसत नाही. तरीसुध्दा दुस-यांचा विचार, परोपकार, त्याग, बलिदान वगैरे करावे असे माणसांना का वाटते? तात्कालिक विचार करता माणसामधील चांगुलकीचा त्याला प्रत्यक्ष लाभ होण्यापेक्षा थोडीशी हानी होण्याची अधिक शक्यता दिसत असते, दुस-याला मदत करणे याचा अर्थ आपल्या मालकीचे काही तरी त्याला देणे किंवा त्याच्या भल्यासाठी स्वतःला कष्ट देणे असा होतो, तरीसुध्दा माणसे इतरांच्या मदतीला का धावतात? काही दुष्ट आणि लबाड लोक यशस्वी होऊन मजेत राहतात आणि त्यांच्या तुलनेत प्रामाणिक सरळमार्गी लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो असे दिसत असतांना माणसे चांगली का वागतात? या प्रश्नांचे तर्कशुध्द उत्तर मला मिळत नाही, त्यामुळे अशा सत्प्रेरणा त्यांच्या मनात उत्पन्न करणारी एकादी अगम्य अशी (ईश्वरी) शक्ती त्यामागे असावी असे कोणी सांगितले तर ते थोडेसे पटते. या सत्प्रेरणा दुष्टांच्या मनात का निर्माण होत नाहीत या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी देवालाच शरण जाणार असलात तर तुमच्या विज्ञानाच्या अभ्यासाचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होणे साहजीक आहे. हा प्रश्न स्वतःलासुध्दा पडतो आणि त्याचे उत्तर सुचते. ते सर्वांना मान्य होईल अशी माझी अपेक्षा नाही. विज्ञानाच्या अभ्यासातून मला जेवढे समजले त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणताही मानव शून्यामधून धुळीचा एक कणसुध्दा तयार करू शकत नाही किंवा त्याला नष्ट करू शकत नाही (काँझर्वेशन ऑफ मॅटर). त्यामुळे असे चमत्कार करून दाखवणा-या बाबांच्या हातचलाखीवर मी विश्वास ठेवत नाही. सूर्य, चंद्र, शनी, मंगळ वगैरे आकाशात फिरत राहणा-या (निर्जीव) गोलांची शास्त्रीय माहिती उपलब्ध झालेली असल्यामुळे राग, लोभ, प्रेम, द्वेष, दया, इच्छा, अपेक्षा यासारख्या मानवी भावना त्यांना असण्याची कणभर शक्यता मला दिसत नाही आणि माणसांच्या वैयक्तिक जीवनात ते उगाच लुडबूड करत नाहीत याची मला खात्री आहे. 'पॉझिटिव्ह' किंवा 'निगेटिव्ह व्हायब्रेशन्स', 'आत्मिक' किंवा 'प्राणिक' प्रकारची 'कॉस्मिक एनर्जी' असल्या भंपक शब्दांनी मी फसत नाही. मला आजारपण आले तर मी त्याच्या निवारणासाठी डॉक्टरकडेच जातो. 'सिध्दीं'द्वारे तो 'छूमंतर' करणा-यांकडे जात नाही. पुराणातील 'सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथां'ना मी त्यापेक्षा वेगळे समजत नाही. देवाने मला ढीगभर दिले तर त्यातले चिमूटभर मी त्याला (म्हणजे त्याचे प्रतिनिधित्व करणा-याला) परत देईन असली सौदेबाजी मी करत नाही. उपाशी राहून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मी स्वतःला कष्ट करून घेण्यामुळे देवाला आनंद होत असेल आणि तो माझ्यावर अधिक कृपावंत होईल असे मला वाटत नाही. विज्ञानाच्या अभ्यासामुळे मिळालेल्या चिकित्सक वृत्तीची आणि त्यानुसार करत असलेल्या आचरणाची अशी असंख्य उदाहरणे देता येतील. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण कधी कधी अनाकलनीय, विलक्षण असे अनुभव येतात आणि त्यांचे समर्पक स्पष्टीकरण मिळत नाही. शरीरात त्राण नसते, मनामध्ये अगतिकता आलेली असते, विचारशक्ती बधिर झालेली असते, स्मरणशक्ती क्षीण झालेली असते, अशा वेळी देवाची आठवण कशी होते हे सुध्दा पहायला गेल्यास एक गूढ आहे. पण हा अनुभव नाकारता येत नाही. तसेच त्यातून मनाला दिलासा मिळत असला तर तो नाकारण्याचा हट्ट तरी कशाला? बालपणापासून अंतर्मनात नकळत साठवला गेलेला आस्तिकतेचा विचार त्या वेळी समोर येतो आणि मनाला पटतो. हा सोपा मार्ग असेलही, पण तो सोयीचा असेल आणि दुस-या कोणाला त्याचा उपसर्ग होत नसेल तर तो चोखाळायला काय हरकत आहे? आजूबाजूच्या बहुतेक लोकांच्या बाबतीत असेच होत असावे. अखेर विज्ञानाची उपासना हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नव्हे, हे सत्य आहे. जीवनाच्या सर्व पैलूंनी एकमेकांशी सुसंगत असायलाच पाहिजे असे प्रत्यक्षात झालेले दिसत नाही, त्यामुळे असा आग्रह धरण्यात अर्थ नाही. त्यातले विविध रंग हेच कदाचित त्याचे वैशिष्ट्य असेल ! कुंपणावर बसणे किंवा दोन्ही दगडावर हात ठेवणे असे त्यातून वाटले तरी आजूबाजूला सगळे तेच करतांना दिसतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;थोडक्यात सांगायचे तर विज्ञानावरील निष्ठा आणि आस्तिकपणा यामधील फक्त एकाचीच निवड करण्याची गरज नाही. बुध्दीच्या आवाक्यापर्यंत विज्ञानावर निष्ठा आणि त्याच्या पलीकडे अंतर्मनात वसलेला परमेश्वरावरील विश्वास असे दुहेरी धोरण अवलंबणारे मोठ्या संख्येने दिसतात. विज्ञानाच्या क्षेत्रामधील संशोधनातून जगापुढे मांडले गेलेले निसर्गाचे नियम हे त्या जगन्नियंत्या परमेश्वराने बनवले आहेत असा विचार केल्यास त्याबद्दल असलेली निष्ठा हा देवावरील श्रध्देचा एक भाग (सबसेट) होतो असेही म्हणता येईल आणि त्यात विसंगती वाटणार नाही. या उलट पाहता परमेश्वराचे अस्तित्व प्रयोगातून सिध्द करता येत नाही आणि त्याबद्दल केलेली विधाने पुरेशी तर्कशुध्द वाटत नाहीत म्हणून ते नाकारणे विज्ञानावरील निष्ठेशी सुसंगत आहे असे म्हणता येईल. मन आणि बुध्दी यांचे कार्य नेमके कसे चालते हे जेंव्हा (आणि जर) विज्ञानाद्वारे स्पष्टपणे कळेल तेंव्हाच याचा अधिक उलगडा होईल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-4468164896964284092?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/4468164896964284092/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=4468164896964284092' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/4468164896964284092'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/4468164896964284092'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/11/blog-post_22.html' title='विज्ञाननिष्ठा आणि निरीश्वरवाद (सुधारित आवृत्ती)'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-4306500861968928682</id><published>2011-11-18T06:44:00.000-08:00</published><updated>2011-11-18T06:45:26.739-08:00</updated><title type='text'>ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;विश्वामधील सर्व चराचरांचा कर्ता करवता परमेश्वरच असतो. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचे एक पानदेखील हलत नाही. तसेच मनुष्याला आपल्या पापपुण्याचे फळ या किंवा पुढल्या जन्मात मिळतेच. त्याच्या आयुष्यात काय काय घडणार आहे हे आधीच ठरलेले असते आणि त्याच्या कपाळावरील विधीलिखितात लिहून ठेवलेले असते. ते घडल्याशिवाय रहात नाही. वगैरे गोष्टींवर अढळ विश्वास ठेवणा-या लोकांची संख्या प्रचंड आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्व सजीव आणि निर्जीवांचे गुणधर्म आणि त्यात होणारे बदल या गोष्टी निसर्गाच्या निश्चित आणि शाश्वत अशा नियमांनुसार होत असतात. प्रत्येक घटनेच्या मागे एक कार्यकारणभाव असतो आणि त्या क्षणी असलेली परिस्थिती आणि ते नियम य़ांच्या अनुसार सर्व घटना घडत असतात असे मला वाटते. विज्ञानामधले शोध, श्रेष्ठ साहित्यकृती व कलाकृती, तंत्रज्ञानातून निर्माण झालेली उत्पादने वगैरे सगळे पुढे घडणार आहे असे आधीच ठरले असेल असे म्हणणे मला पटत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आय़ुष्यात घडत असलेल्या घटना हा एका मोठ्या गुंतागुंतीच्या योजनेचा लहानसा भाग असतो असे मला वाटत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;असे असले तरी कधी कधी आलेले अनुभव चक्रावून सोडतात. असेच माझ्या बाबतीत नुकतेच घडले. आमच्या नात्यातील एका मुलाच्या लग्नासाठी आम्ही जबलपूरला गेलो होतो. लग्नामधले धार्मिक विधी, सामाजिक रूढीरिवाज, नाचणे, भेडाघाटची सहल वगैरेंमध्ये धमाल आली. लग्न संपल्यानंतर त्या रात्रीच सर्व पाहुण्यांची पांगापांग सुरू झाली. जबलपूरमधीलच एका आप्तांना भेटायला आम्ही गेलो आणि तिथेच राहिलो. तोपर्यंत सारे काही अपेक्षेप्रमाणे सुरळीत चालले होते. पण दुसरे दिवशी पहाटेच पोटात गुरगुरू लागले आणि उठल्याबरोबर एक उलटी आणि जुलाब झाला. आमचे यजमान स्वतःच निष्णात आणि अनुभवी डॉक्टर असल्याने त्यांनी लगेच त्यावर औषध दिले. ते घेऊन आम्ही आपल्या मुक्कामी परत गेलो. त्यानंतर दिवसभर पुन्हा काही झाले नाही. तरीही दुस-या एका स्थानिक डॉक्टराचा सल्ला घेऊन आम्ही मुंबईला परत यायला निघालो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्लॅटफॉर्मवर बसून गाडीची वाट पहात असतांना एकाएकी मला डोळ्यापुढे निळाशार समुद्र पसरलेला दिसला, आजूबाजूला चाललेला गोंगाट ऐकू येईना, क्षणभर सगळे शांत शांत वाटले आणि ते वाटणेही थांबले. प्रत्यक्षात मी माझी मान खाली टाकली होती, माझ्या पोटातून बाहेर पडलेल्या द्रावाने माझे कपडे आणि पुढ्यातले सामान भिजले होते आणि मी नखशिखांत घामाने थबथबलो होतो, पण मला त्याची शुध्दच नव्हती. जवळच बसलेल्या पत्नीने मला गदागदा हलवल्यावर मी डोळे किलकिले करून वर पाहिले. तोपर्यंत आमची गाडी प्लॅटफॉर्मवर आली होती, पण त्यात चढण्याचे त्राणसुध्दा माझ्यात नव्हते, तसेच ते करण्यात काही अर्थ नव्हता. आम्हाला पोचवायला आलेल्या नातेवाईकांनी धावपळ करून एक व्हीलचेअर आणली आणि तिच्यावर बसवून तडक एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले. अतिदक्षता विभागात दाखल करून इंजेक्शन्स, सलाईन वगैरे देत राहिले. तिथून दुसरे दिवशी वॉर्डमध्ये आणि तिसरे दिवशी घरी पाठवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जबलपूरच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण दाखल झाला तर त्याच्या सोबतीला सतत कोणीतरी तिथे उपस्थित असणे आवश्यक असते. रुग्णासाठी अन्न, पाणी, औषधे वगैरे गोष्टी त्याने वेळोवेळी आणून द्यायच्या असतात. माझी पत्नी सोबत असली तरी त्या नवख्या गावात ती काय करू शकणार होती? डॉक्टर्स सांगतील ती औषधे केमिस्टकडून आणून देणे एवढेच तिला शक्य होते. बाहेरगावाहून लग्नाला आलेले सर्व पाहुणे परतीच्या वाटेवर होते. आता फक्त नवरदेवाचे आईवडील तिथे राहिले होते. लग्नकार्यातली धावपळ आणि जागरणे यांनी त्यांनाही प्रचंड थकवा आला होता आणि उरलेल्या कामांचे डोंगर समोर दिसत होते. तरीही त्यातल्या एकाने माझ्या पत्नीसोबत तिथे राहून दुस-याने घर व हॉस्पिटल यामध्ये ये जा करायची असा प्रयत्न ते करत होते. या दोन्हीमधले अंतरही खूप असल्यामुळे ते कठीणच होते. त्यांनी आणलेले उसने बळ कुठपर्यंत पुरेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पुढे उभा होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण माझ्या आजाराबरोबर जसा हा प्रश्न अचानक उद्भवला, तसाच तो सुटलासुध्दा. मला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची वार्ता मोबाईल फोनवरून सगळीकडे पसरली होतीच. बाहेरगावातल्या एका नातेवाईकाने त्याच्या चांगल्या परिचयाच्या जबलपूरमधील एका हिंदी भाषिक व्यक्तीचा फोन नंबर माझ्या पत्नीला कळवला. त्यांना फोन लावताच दहा मिनिटात ते सद्गृहस्थ हॉस्पिटलात येऊन हजर झाले आणि त्यांनी आमच्या कल्पनेच्या पलीकडे मदत केली. डॉक्टरांना विचारून माझ्यासाठी ते सांगतील तसे मऊ आणि सात्विक अन्नपदार्थ त्यांच्या घरी तयार करून आणून दिले, तसेच माझ्या पत्नीला जेवणासाठी त्यांच्या घरी घेऊन गेले आणि परत हॉस्पिटलात आणून सोडले. असे दोन्ही वेळा केले. गावातच राहणारी त्यांची बहीण आणि तिचे पती यांनी दुसरे दिवशी अशाच प्रकारे आमची काळजी घेतली. त्या संध्याकाळी आम्ही आमच्या आप्तांच्या घरी परतलोच. पुण्याहून माझा मुलगा विमानाने जबलपूरला येऊन पोचला आणि त्याने आम्हाला विमानानेच मुंबईला परत आणले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आजारपण हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक भाग असतो आणि ते काही सांगून येत नाही. त्यामुळे तसे पाहता यात काहीच विशेष असे नव्हते, पण या वेळचा सारा घटनाक्रम मात्र माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाहून काही बाबतीत वेगळा होता. आम्ही जबलपूरला गेल्यावेळी तिथे कसलीही साथ आलेली नव्हती आणि लग्नसमारंभ एका चांगल्या दर्जाच्या हॉटेलात होता. शुध्दीकरण केलेले पाणी पिणे आणि भरपूर शिजवलेले किंवा भाजलेले ताजे अन्न खाणे याची सावधगिरी मी कटाक्षाने घेतली होती. तरीसुध्दा कोणत्या रोगजंतूंना माझ्या पोटात प्रवेश मिळाला हे पहिले गूढ. त्यांच्या पराक्रमाचा सुगावा लागताच मी त्यावर औषधोपचार सुरू केला होता आणि दिवसभर त्रास न झाल्यामुळे तो लागू पडला आहे असे मला वाटले होते. तरीसुध्दा माझी प्रकृती क्षणार्धात एकदम का विकोपाला गेली हे दुसरे गूढ आणि या गोष्टींचे परफेक्ट टायमिंग हे सर्वात मोठे तिसरे गूढ. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मला सकाळी दिसलेली आजाराची लक्षणे औषध घेऊनसुध्दा दिसत राहिली असती, तर मी लगेच त्यावर वेगळे उपाय केले असते आणि माझी परिस्थिती कदाचित इतकी विकोपाला गेली नसती, परगावाहून आलेला एकादा धडधाकट नातेवाईक माझ्यासाठी मागे थांबला असता. थोडक्यात सांगायचे तर आम्हा सर्वांना झालेल्या त्रासाची तीव्रता कमी झाली असती. पण तसे झाले नाही. नंतर ज्या वेळी परिस्थिती अगदी असह्य होत चाललेली दिसायला लागली होती तेंव्हा नात्यागोत्यात नसलेल्या एका सद्गृहस्थांनी पुढे येऊन तिचा भार उचलला आणि तिला सुसह्य केले. गाडी सुटून पुढे निघून गेल्यानंतर जर मला हेच दुखणे झाले असते, तर त्यावर तातडीचे उपाय होण्याची शक्यताच नव्हती आणि कदाचित त्यातून भयानक प्रसंग ओढवला असता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-4306500861968928682?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/4306500861968928682/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=4306500861968928682' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/4306500861968928682'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/4306500861968928682'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/11/blog-post_18.html' title='ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव ...'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-3395720821718826225</id><published>2011-11-08T09:57:00.000-08:00</published><updated>2011-11-08T09:57:44.220-08:00</updated><title type='text'>सात अब्ज</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;गेल्या महिन्याच्या अखेरीस जगाची लोकसंख्या सात अब्जावर पोचली अशी बातमी आली. ही संख्या अचूकपणे काढता येणे शक्यच नाही. कारण बरेच वर्षात कित्येक देशात खानेसुमारीच झालेली नाही आणि जेथे ती नियमितपणे होते तेथेसुध्दा ती कितपत बरोबर असते याबद्दल शंका कुशंका असतातच. जन्म आणि मृत्यू यांची नोंदणीसुध्दा सगळीकडे काटेकोरपणे केली जातेच असे नाही. ग्रामीण भागात याबद्दल अजूनही पूर्ण लोकजागृती झालेली नाही किंवा त्यांची सोयच नसते. या सगळ्या गोष्टीबद्दल काही अनुमाने काढून हिशोब मांडले जातात. जनगणनेतून उपलब्ध झालेले आकडे आणि जन्म मृत्यू यांच्या संख्या यावरून प्रत्येक देशाची लोकसंख्या किती दराने वाढत आहे याचा अंदाज बांधून त्यावर चालणारी मीटरे अनेक उत्साही मंडळींनी तयार केली आहेत. प्रत्येकाकडे उपलब्ध असलेली माहिती आणि त्यांची गृहीतकृत्ये यात थोडी फार तफावत असल्यामुळे त्यांच्यात मतैक्य नाही. पण एकाद्या टक्क्याच्या फरकाने ती जुळतात. सात अब्जाचे एक टक्कासुध्दा सत्तर कोटी म्हणजे लहान देशाच्या लोकसंख्येहून जास्त होतात ही गोष्ट वेगळी. या फरकामुळे लोकसंख्येच्या काही मीटर्समध्ये अजून सात अब्जाचा पल्ला गाठला गेलेला नाही. बीबीसी या विश्वसनीय अशा वृत्तसंस्थेचा समावेश त्यात होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे असले तरी अत्यंत मनोरंजक आणि उद्बोधक अशी माहिती क्षणार्धात मिळवून देण्याची सोय त्यांनी केली आहे. त्यावरून खालील माहिती मिळाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जगामध्ये दर तासाला १५३४७ अर्भके जन्माला येतात आणि ६४१८ व्यक्ती दिवंगत होतात त्यामुळे जगाची लोकसंख्या दर तासागणिक ८९२९ ने वाढत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यापैकी भारतात दर तासाला ३११३ अर्भके जन्माला येतात आणि १११४ व्यक्ती दिवंगत होतात, शिवाय ६८ व्यक्ती परदेशगमन करतात त्यामुळे भारताची लोकसंख्या दर तासागणिक १९३१ ने वाढत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चीनमध्ये हे प्रमाण दर तासाला १९०८ अर्भकांचा जन्म, १०९५ व्यक्तींचा मृत्यू आणि ४३ बहिर्गमन असल्यामुळे चीनची लोकसंख्या दर तासागणिक ७७० ने वाढत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जगाची लोकसंख्या सात कोटी आणि त्यातील वाढ होण्याचा दर दर वर्षी १.१६ टक्के इतका आहे. चीनची आजची लोकसंख्या सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज ३४ कोटी इतकी असली तरी त्यातील वाढीचा दर फक्त अर्धा टक्का इतकाच आहे. दुस-या क्रमांकावरील भारताची आजची संख्या १ अब्ज २३ कोटी इतकी असली तरी त्यातील वाढीचा दर १.४ टक्के इतका असल्यामुळे काही वर्षानंतर नक्कीच या बाबतीत आपण अग्रगण्य होणार हे ठरलेले आहे. तिस-या क्रमांकावरील यूएसए आणि चौथ्या इंडोनेशियाची लोकसंख्या अजून अनुक्रमे ३१ व २४ कोटी एवढीच असल्यामुळे ते देश आपल्या बरेच मागे आहेत आणि त्यांचा वाढीचा दरसुध्दा अनुक्रमे ०.९ व १.१ टक्के एवढाच म्हणजे आपल्याहून कमी असल्यामुळे ते देश आपल्यापुढे जाण्याची शक्यता नाही. लोकसंख्येच्या बाबतीत बांगलादेशाला मागे सारून पाकिस्तानने आघाडी मारलेली आहे हे मला ठाऊक नव्हते. तसेच बांगलादेशातील वाढीचा दर भारतापेक्षा कमी आहे आणि त्या देशातून परदेशी जाणा-या लोकांची संख्या मात्र जवळ जवळ भारतीयांएवढीच आहे ही नवी माहिती मिळाली. कदाचित यातले बरेच लोक तिकडून इकडे येत असण्याची दाट शक्यता आहे. बेकायदेशीररीत्या येणा-यांचा समावेश यात होत नसावा. असे सगळे असले तरी बांगलादेशीयांच्या लोकसंख्येची घनता (दाटीवाटी) अपरंपार आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कतार या देशाची लोकसंख्या सर्वाधिक झपाट्याने वाढत असली तरी तिचा परिणाम जगाची लोकसंख्या वाढण्यावर होत नाही. फक्त अठरा लक्ष एवढीच लोकसंख्या असलेल्या या देशात दर तासाला दोन मुले जन्माला येतात आणि एक माणूस हे जग सोडून जातो. पण दर तासाला वीस माणसे बाहेरून येत असल्याकारणाने त्या देशाच्या लोकसंख्यावाठीचा दर वर्षाला पंधरा टक्के एवढा फुगला आहे. रशिया या मोठ्या देशामधील मृत्यूंचे प्रमाण जन्मांपेक्षा जास्त असून शिवाय काही लोक बहिर्गमन करत आहेत. त्यामुळे त्या देशाची लोकसंख्या घटत चालली आहे. सोव्हिएट युनियनमधून बाहेर पडलेल्या मोलदोव्हा नावाच्या देशाची लोकसंख्या सर्वाधिक वेगाने कमी होत चालली आहे. फक्त ३५ लाख लोकसंख्या असलेल्या या देशात तासाला पाच बालके जन्माला येतात, सहा जण हे जग सोडून जातात आणि चार जण देश सोडून परागंदा होतात. लोकसंख्या कमी होत असतांनासुध्दा उरलेल्या लोकांना तिथून बाहेर जावे असे का वाटते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोठल्याही सर्वसाधारण कुटुंबात चिमुकल्या नव्या पाहुण्याचे स्वागत खूप आनंदाने केले जाते. काही मुलांची गणना ७ अब्जाव्वा जीव म्हणून केली गेली आहे. त्यांचे जरा जास्तच कौतुक होत असेल. एकंदरीतच कोणत्याही क्षेत्रातल्या नव्या उच्चांकाचा जल्लोश साजरा केला जातो. पण या सात अब्जांच्या टप्प्यावर मात्र उत्साह आणि उल्हास यापेक्षा चिंताजनक प्रतिक्रियाच मोठ्या प्रमाणात व्यक्त केल्या जात आहेत. त्याची कारणे उघड आहेत. सात अब्ज तोंडांबरोबर चौदा अब्ज हातसुध्दा उपलब्ध झाले आहेत आणि ते काम करून त्या तोंडांना खाऊ घालू शकतील असे म्हणता येत असले तरी पृथ्वीतलावरील उपलब्ध जमीन, हवा, पाणी वगैरेंचा आजच जवळ जवळ पुरेपूर उपयोग केला जात असल्यामुळे त्यांच्यावील ताण वाढत चालला आहे. शिवाय आजच्या राहणीमानानुसार अन्नाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि बहुसंख्य लोकांकडे त्या अल्प प्रमाणात असल्यामुळे किंवा मुळीच नसल्यामुळे त्यांची मागणी लोकसंख्येमधील वाढीच्या काही पटीने वाढत जाणार आहे. त्या सर्वांची पूर्तता कशी करता येईल हा यक्षप्रश्न जगापुढे उभा आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेले प्रदूषण, जंगलांचा नाश वगैरेंमुळे पर्यावरणावर होत असलेले दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;व्यक्तीगत पातळीवर तुलना करायची झाली तर माझ्या जन्माच्या वेळी जगाची लोकसंख्या अडीच अब्जाहून थोडी कमी होती, ती माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी चार अब्जाच्या जवळ पोचली होती आणि नातवंडाच्या जन्मकाली सहा अब्जाच्या वर गेली होती. पृथ्वी मात्र जेवढी होती तेवढीच राहिली. नव्या खंडांचा शोध लागणे वगैरे संपून काही शतके उलटून गेली होती. उपलब्ध असलेल्या जमीनीवरच एकाऐवजी दोन, किंवा दोनाऐवजी तीन चार पिके घेऊन आणि रासायनिक खते वापरून अन्नधान्यांचे उत्पादन वाढवले गेले आहे. याहून जास्त ते कुठपर्यंत वाढवता येणे शक्य आहे हे सांगणे कठीण आहे.&lt;br /&gt;या सर्वांची जाणीव मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे आणि या सर्वांवर उपाययोजना करण्यासाठीसुध्दा अनेक लोक प्रयत्नशील आहेत आणि त्यांना थोडे तरी यश मिळत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे आशेचे किरण नाहीतच असे म्हणता येणार नाही. विज्ञानाच्या प्रगतीमधून काही नव्या वाटा सापडतात का याकडेही लक्ष दिले जात आहे. फक्त शंभरच वर्षांपूर्वी निसर्गावर पूर्णपणे विसंबून असलेला मानव अजूनही त्याच्या सहाय्यानेच जगू शकत असला तरी काही बाबतीत त्याच्याशी संघर्ष करू लागला आहे आणि हा संघर्ष दिवसेदिवस वाढत जाणार असल्याची लक्षणे दिसत आहेत. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-3395720821718826225?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/3395720821718826225/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=3395720821718826225' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/3395720821718826225'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/3395720821718826225'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='सात अब्ज'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-1764965065550617756</id><published>2011-10-27T22:37:00.000-07:00</published><updated>2011-10-27T22:37:07.360-07:00</updated><title type='text'>यंत्रे तयार करणारी यंत्रे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-O-usgTjUjPU/Tqo_byY7zaI/AAAAAAAABJQ/Jjf2Sbs8Ctg/s1600/yantra.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="172" ida="true" src="http://4.bp.blogspot.com/-O-usgTjUjPU/Tqo_byY7zaI/AAAAAAAABJQ/Jjf2Sbs8Ctg/s320/yantra.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कापड, भांडी, कागद वगैरे साध्या गोष्टींपासून ते फ्रिज, टीव्ही, काँप्यूटर वगैरेपर्यंत घरात, ऑफिसात किंवा दुकानात आजकाल दिसणार्‍या बहुतांश वस्तू निरनिराळ्या यंत्रांद्वारे कारखान्यांमध्ये निर्माण केलेल्या असतात. त्या कारखान्यांमधली ही यंत्रे कशा प्रकारची असतात, ती कशी चालतात, वगैरेंबद्दल सर्वसामान्य माणसांना काही कल्पना नसते. त्याच्याही पलीकडे जाऊन ही यंत्रे कशी निर्माण केली जात असतील हा विचार सहसा कोणाच्याच मनात येत नसेल. पण मला मात्र लहानपणापासून अशा प्रकारचे खूप कुतूहल होते. साबण, बल्ब, चमचा असल्या रोजच्या वापरातल्या वस्तू कशापासून आणि कशा तयार करतात असले प्रश्न विचारून मी मोठ्यांना भंडावत असे. कारखान्यांमध्ये त्यांची मशिने असतात असे मोघम उत्तर मिळे. मशीन किंवा यंत्र म्हणजे काही तरी अगडबंब धूड असेल, खडखडाट करीत वेगाने फिरणारी अनेक चक्रे त्यात असतील, त्यातून धूर, वाफ, उग्र वास असे काही भयानक निघत असेल आणि त्याच्या जवळ गेल्यास आपल्याला कदाचित दुखापत होईल, चटका बसेल, कपडे तर नक्कीच घाण होतील असा सार्वत्रिक समज होता. त्यामुळे शहाण्या माणसाने कसल्याही प्रकारच्या यंत्राच्या जवळपास फिरकू नये असे लोकांना वाटत असे. त्या काळात घड्याळ, रेडिओ वगैरेंची गणना 'यंत्र' या सदरात केली जात नव्हती. त्यांच्याखेरीज आमच्या घरात आपल्या आप चालणारे कोणतेही यंत्र नव्हते. साधा विजेचा पंखासुध्दा नव्हता. मिक्सर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, वगैरेंतले काहीसुध्दा ठाऊक नव्हते. पिठाची गिरणी हे माझ्या पाहण्यातले एकमेव 'यंत्र' होते. त्या चक्कीतून भुरूभुरू निघणा-या पिठाप्रमाणेच साखरेचे दाणे, साबणाच्या वड्या, पेन्सिली, ताटे, वाट्या वगैरेसुध्दा त्यांच्या त्यांच्या यंत्रांमधून बदाबदा खाली पडत आहेत असे एक काल्पनिक दृष्य त्या वेळी माझ्या डोळ्यासमोर येत असे. ते तसे अगदीच चुकीचे नव्हते. लहानपणी कोठलेही यंत्र जवळून पाहिलेले नसतांनातासुध्दा कुतूहलापोटी माझ्या मनात यंत्रांच्याबद्दल ओढ निर्माण झाली होती. सुदैवाने मला पुढील आयुष्यात अनेक प्रकारची अद्ययावत यंत्रे पहायला मिळालीच, पण तशी खास यंत्रे तयार करवून घेणे हेच माझे मुख्य काम झाले. त्यामुळे यंत्रे तयार करणा-या यंत्रांची ओळख झाली आणि गट्टी जमत गेली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;यंत्रांचे विविध प्रकार आजकाल जन्माला येण्याच्या आधीपासून बालकाची सोनोग्राफीने तपासणी होणे सुरू होते. आरोग्याचे परीक्षण, विकाराचे निदान आणि त्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी आता यंत्रांची मदत घेतली जातेच, चांगले आरोग्य राखण्यासाठी व्यायामसुध्दा जिममधील यंत्रांच्या सहाय्याने केला जातो. आवश्यकता पडल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण आणि रक्ताचे शुध्दीकरण यांच्यासाठीसुध्दा यांत्रिक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आणि शिक्षण, प्रवास, कला, क्रीडा, मनोरंजन वगैरे सर्वच बाबतींतील असंख्य प्रकारच्या वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी आज यंत्रांचा उपयोग केला जातो. पाणी आणि हवा या नैसर्गिक गोष्टीसुध्दा आपल्याला हव्या तशा मिळवण्यासाठी आता यंत्रांची कास धरली जाते. मुठीत धरता येण्याजोग्या घड्याळापासून ते प्रचंड इमारतींच्या बांधकामाच्या जागी दिसणार्‍या अगडबंब जायंट क्रेन्सपर्यंत अनेक प्रकारची आणि विविध आकारांची यंत्रे आता आपल्याला जाता येता दिसत असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;साखरेच्या कारखान्यात उसापासून साखर तयार होईपर्यंत अनेक प्रक्रिया केल्या जातात. उसाचे मोठेमोठे तुकडे होतात, त्यांचे बारीक तुकडे करून त्यांना चेचून त्यातला रस बाहेर काढतात, रस आणि चोथा वेगळा करतात, उसाच्या रसात काही रसायने मिसळून त्यांना वेगाने घुसळल्यावर त्यातून मळी बाहेर निघते. स्वच्छ रस तापवून त्यातल्या पाण्याची वाफ करून तिला वेगळे करतात आणि अखेरच्या टप्प्यात त्या दाट झालेल्या द्रावापासून साखरेचे दाणे तयार होऊन घरंगळत बाहेर पडतात. या सगळ्या प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये केल्या जातात आणि त्यासाठी निरनिराळ्या प्रकारची यंत्रे लागतात. शिवाय मागील टप्प्यावरून पदार्थ पुढील टप्प्याकडे वाहून नेण्याचे कामसुध्दा खास यंत्रांकरवीच (कन्व्हेयर्सने) केले जाते. या सगळ्या प्रकारच्या यंत्रांची निर्मिती करण्याचा एक मोठा उद्योग उभा राहिला आहे. या उद्योगातील यंत्रांना मशीन टूल्स असे म्हणतात.&lt;br /&gt;कोणतेही यंत्र आकाराने लहान असो किंवा मोठे असो, त्याची विशिष्ट रचना असते. एका दणकट सांगाड्याच्या आत इतर अनेक सुटे भाग बसवून एकमेकांमध्ये गुंतवलेले असतात. हे भाग मुख्यतः निरनिराळ्या आकाराची चक्रे किंवा तरफा असतात. चक्रे गोल फिरतात आणि तरफांचे दांडे खाली वर किंवा मागे पुढे सरकत असतात. त्यांच्या या सतत किंवा वारंवार होत असलेल्या हालचालीमधून ईप्सित कार्य साधले जाते. यातले बहुतेक भाग कोणत्या ना कोणत्या धातूपासून तयार केले जातात आणि त्यातही ते प्रामुख्याने लोखंडाच्या वा पोलादाच्या एकाद्या मिश्रधातूचे असतात. या कामासाठी खास प्रकारची प्लास्टिक्स, फायबर ग्लास, कार्बन काँपोझिट्स यासारख्या कृत्रिम पदार्थांचा उपयोग आता सुरू झाला असला तरी अजून तो काही विशिष्ट कामांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे मशीन टूल्सची निर्मिती ही बहुतांशपणे लोहमिश्रित धातूंपासून होते. त्यामधील भागांना (पार्ट्सना) त्यांचा विशिष्ट आकार देणे हे त्या निर्मितीच्या क्रियेमधील मुख्य काम असते. आपल्याला ज्या प्रकारचे काम यंत्राकडून करवून घ्यायचे आहे त्यानुसार आधी त्याचा एक ढोबळ आराखडा केला जातो. त्या यंत्राकडून ते काम करवून घेण्याच्या दृष्टीने त्यात आवश्यक असणारे भाग आणि त्यांची रचना ठरवली गेल्यानंतर त्या सर्वांची तपशीलवार ड्रॉइंग्ज तयार होतात आणि त्यानुसार ते यंत्र तयार करण्याचे काम केले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यंत्रे तयार करणार्‍या कारखान्यांमध्ये अनेक विभाग असतात. फॅब्रिकेशन शॉप, मशीन शॉप, हीट ट्रीटमेंट फॅसिलिटी, असेंब्ली शॉप वगैरे त्यातले मुख्य विभाग आहेत. मोठ्या यंत्रांचे सांगाडे फॅब्रिकेशन शॉपमध्ये तयार होतात. पोलादाच्या जाड प्लेट्सना ऑक्सीऍसिटिलीनसारख्या प्रखर धगीच्या ज्वालेने कापून हव्या त्या आकाराचे तुकडे केले जातात. सरळ रेषेतील चौकोनी किंवा वर्तुळाकार आकाराचे तुकडे करण्याची सोय यात असतेच, पण एकादा वाकडा तिकडा भाग, हवा असेल तर अगदी भारताचा नकाशासुध्दा प्लेटमधून बरोबर कापण्याची सोय त्या यंत्रात असते. शिंपी ज्याप्रमाणे कपडे बेतून त्यासाठी कापडावर रेघा मारून कटिंग करतात तशाच स्वरूपाचे काम या विभागात लोखंडाच्या प्लेट्सवर केले जाते. कापलेले हे तुकडे वेल्डिंगने एकमेकांना जोडून सांगाडा तयार केला जातो. जे तुकडे एकमेकांना जोडायचे असतात त्यांच्या कडा वेल्डिंगच्या क्रियेत अत्यंत प्रखर अशा विजेच्या ठिणगीद्वारे (आर्कने) वितळवल्या जातात. वितळलेले धातू एकमेकांत मिसळून एकसंध होतात आणि थंड झाल्यावर सुध्दा एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. पूर्वीच्या काळी यंत्रांचे सांगाडे भट्टी(फाउंड्री)मध्ये ओतीव काम (कास्टिंग) करून तयार करण्यावर भर दिला जात होता, आजकाल त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. पातळ पत्र्यांना वाकवून किंवा प्रेसमध्ये साच्यावर ठोकून हवा तसा आकार दिला जातो. मोटारीचा बाहेरचा आकार, दरवाजे वगैरे पत्र्याचे भाग अशा प्रकारे तयार करतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;धातूच्या वस्तूंना निरनिराळे आकार देण्यासाठी मशीन शॉपमध्ये अनेक प्रकारांची यंत्रे असतात. त्यामधील लेथ या प्रकारात जॉब स्वतःभोवती फिरत असतो आणि त्याला तीक्ष्ण असे टूल लावून त्याची सोलपटे काढली जातात. काही अंशी कुंभाराच्या चाकाचाच लेथ हा अवतार असतो. कुंभाराच्या चाकावर फिरत असलेल्या मातीच्या गोळ्याला हाताच्या बोटांनी दाबून तो आकार देतो, लेथमध्ये ते काम धारदार हत्यार करते. पण काही अपवाद वगळता लेथमधील चाकाचा आंस आडवा असतो, तर कुंभाराचे चाकच नेहमी आडवे असते आणि उभ्या आंसाभोवती फिरते. मिलिंग मशीनमध्ये कार्यवस्तू (जॉब) स्थिर असते आणि सुदर्शन चक्रासारखे धारदार चक्र फिरता फिरता त्याची सोलपटे काढते. ड्रिलमध्ये सुध्दा जॉब स्थिर असतो आणि फिरणा-या चाकाच्या दांड्याच्या अग्रभागी असलेले ड्रिल त्यात भोक पाडते. हे यंत्र बहुतेकांनी घरातील भिंतीवर खिळे ठोकण्यासाठी वापरतांना पाहिले असेल. बोअरिंग मशीन मिलिंग मशीनसारखेच असते, पण यात सुदर्शन चक्र लावता येते त्याचप्रमाणे लेथसारखे सरळ हत्यार किंवा ड्रिलसारखे भोक पाडणारे अस्त्रसुध्दा बसवता येते. शेपिंग मशीनमधील हत्यार सरळ रेषेत मागे पुढे सरकून सोलपटे काढते. याचे काम सुताराच्या रंध्यासारखे असते. प्लेनिंग मशीनमध्येसुध्दा हेच काम अशाच प्रकारे होते, पण यात हत्यार स्थिर असते आणि जॉब पुढे मागे सरकत असतो. या मुख्य यंत्रांच्या आणि हत्यारांच्या संयोगातून त्यांचे अनंत प्रकार बनवले जातात. ज्या कामात अतीशय सफाई आणि गुळगुळीतपणा यांची आवश्यकता असते त्यात शेवटी ग्राइंडिंग केले जाते. विळी, चाकू, कात्री यांना धार लावण्याचे काम ग्राइंडिंगनेच होते. यातील हत्यार हे अत्यंत कठीण अशा दगडाचे चक्र असते आणि ते खूप वेगाने फिरून लोखंडाचा सूक्ष्म आकाराचा भुगा काढते. अशा प्रकारच्या यंत्रांद्वारे यंत्रांची चाके, दांडे वगैरे सर्व प्रकारचे भाग त्यांच्या आकारानुसार तयार केले जातात.&lt;br /&gt;ऊष्णउपचार (हीट ट्रीटमेंट) विभागात लहान मोठ्या आकाराच्या भट्ट्या असतात. पोलादाच्या मिश्रधातूंना विशिष्ट तपमानापर्यंत तापवले आणि पाण्यात किंवा विशिष्ट प्रकारच्या तेलात बुडवून त्वरेने थंड केल्यास त्याचे काठिण्य (हार्डनेस) वाढते. इतिहासकाळात या तंत्राचा वापर करून तलवारींना पाणी दिले जात असे आणि त्यानंतर कानसाने व दगडावर घासून धार दिली तर ती लढाईत बोथट होत नसे. यंत्रांचे गीअरसारखे भाग घर्षणाने लवकर झिजू नयेत यासाठी त्यांचेवर ऊष्णोपचार करून त्यांना मजबूत केले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जोडणी खात्यात (असेंब्ली शॉपमध्ये) सर्व सुटे भाग एकमेकांना जोडले जातात आणि नट बोल्ट स्क्रू वगैरेनी घट्ट कसून त्यांची जोडणी केली जाते. त्यापूर्वी प्रत्येक भागाचे सूक्ष्म निरीक्षण परीक्षण (इन्पेक्शन टेस्टिंग) करून झालेले असते. जोडणी करतांना त्यांची अत्यंत काळजीपूर्वक तपासणी करून ते एकमेकांना साजेसे असल्याची खात्री करून घेतली जाते. यंत्रामधील फिरणारे किंवा मागे पुढे सरकणारे भाग घट्ट बसले तर अडकतील, आवश्यक त्या हालचाली करणार नाहीत आणि ते भाग जास्तच सैल असतील तर थरथरतील (व्हायब्रेट होतील), आपल्या जागा सोडून किंचित बाजूला सरकतील, त्यामुळे यंत्राचे काम अचूकपणे होणार नाही. या दोन्ही गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेतली जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जो़डणी केलेले यंत्र परीक्षण विभागात चालवून पाहिले जाते. ते योग्य प्रकारे काम करते याची खात्री करून घेतली जाते. काही यंत्रांच्या बाबतीत त्यापूर्वी आणि काहींच्या बाबतीत सर्वात अखेरीस त्यांची साफसफाई आणि रंगकाम करून त्याला आकर्षक रूप दिले जाते. यंत्रांच्या आकारानुसार तयार करून ठेवलेल्या खोक्यांमध्ये ठेऊन सीलबंद केले जाते. काही महाकाय यंत्रे ट्रक किंवा ट्रेलरवर मावत नाहीत. अशा वेळी संपूर्ण यंत्र एकत्र न पाठवता त्याच्या भागांची ढोबळ विभागणी केली जाते आणि ज्या कारखान्यात ते यंत्र बसवायचे असेल त्या ठिकाणी ते भाग पुन्हा एकमेकांना जोडून ते यंत्र उभे केले जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याचा थोडासा परिचय करून देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20484515-1764965065550617756?l=anandghan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://anandghan.blogspot.com/feeds/1764965065550617756/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20484515&amp;postID=1764965065550617756' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/1764965065550617756'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20484515/posts/default/1764965065550617756'/><link rel='alternate' type='text/html' href='http://anandghan.blogspot.com/2011/10/blog-post_27.html' title='यंत्रे तयार करणारी यंत्रे'/><author><name>Anand Ghare</name><uri>http://www.blogger.com/profile/16469879163774743077</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='28' src='http://3.bp.blogspot.com/_3Rrw3_fVugk/SSYk89y_lzI/AAAAAAAAAZs/6E62VrWpglc/S220/fotoo.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-O-usgTjUjPU/Tqo_byY7zaI/AAAAAAAABJQ/Jjf2Sbs8Ctg/s72-c/yantra.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20484515.post-874851066126847494</id><published>2011-10-25T23:16:00.000-07:00</published><updated>2011-10-25T23:16:37.844-07:00</updated><title type='text'>गुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत ...... आणि क्वालिटी!</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;निरनिराळ्या सरकारी किंवा खाजगी संस्थांच्या 'गुणवत्ता नियंत्रण' प्रभागात कार्यरत असलेल्या लोकांशी माझा मराठी किंवा हिंदी भाषांमध्ये शेकडो वेळा वार्तालाप झाला असेल, पण त्यातल्या एकानेही एकही वेळा 'गुणवत्ता' या शब्दाचा उच्चार केला नाही. हा शब्द अजून कोणाच्या ओठावर बसलेला दिसत नाही. दर्जा, प्रत, स्तर वगैरे शब्द कधी कधी कानावर पडतात किंवा बोलण्यात येतात, पण त्या वेळी त्यांचा अर्थ काहीसा मर्यादित असतो. 'क्वालिटी' हा शब्द कानावर पडला नाही किंवा बोलण्यात आला नाही असा मात्र एकही दिवस जात नाही, इतका तो आपल्या ओळखीचा झाला आहे. बाजारातला माल, भोजनालयातले खाद्यपदार्थ किंवा ते पुरवण्याची सेवा, शाळांमधले शिक्षण, शिक्षक किंवा व्यवस्थापन, प्रवासाची वाहने, त्यामधील सोयी आणि त्यांची नियमितता, चित्रपटांमधील कथा, संवाद, अभिनय, संगीत, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण वगैरे वगैरे आपल्या रोजच्या जीवनात समोर आलेल्या सगळ्याच बाबींच्या बाबतीत बोलतांना आपण त्यांच्या गुणवत्तेवर भाष्य करत असतो. इतकेच काय 'स्टॅन्डर्ड ऑफ लिव्हिंग' बरोबरच 'क्वालिटी ऑफ लाइफ' हा सुद्धा आपल्या चर्चेचा विषय असतो. 'क्वालिटी' हा शब्द आता आपल्या मनात इतका मुरला आहे. या लेखात मी मुख्यतः 'गुणवत्ता' हा अप्रचलित मराठी शब्द वापरला असला तरी त्यातून 'क्वालिटी' या रोजच्या वापरातील शब्दाचा व्यापक अर्थच मला अभिप्रेत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कळायला लागल्यापासून आपण आजूबाजूच्या जगाचे अवलोकन करत असतांनाच त्याचे मूल्यमापनसुद्धा करतच असतो. 'चांगले-वाईट', 'सुंदर-कुरूप', 'उत्तम-अधम', 'मंजुळ-कर्कश', गोड-कडू, 'छान-टाकाऊ', 'मस्त-भिकार' वगैरे शेरे मारत असतो. जीवनाच्या सर्व क्षेत्रात हे चालत असले तरी 'गुणवत्ता नियमन', 'गुणवत्ता हमी', 'गुणवत्ता व्यवस्थापन' (क्वालिटी कंट्रोल, अ‍ॅशुरन्स, मॅनेजमेंट) वगैरेंच्या द्वारे त्याचा सविस्तर शास्त्रशुद्ध अभ्यास आणि व्यावहारिक उपयोग, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आधी सुरू झाला. त्याच्या तत्त्वांची अंमलबजावणी आता इतर क्षेत्रांमध्ये व्हायला लागली आहे. त्यामुळे या विषयामधील तांत्रिक क्षेत्रांमधील मूळ संकल्पना रोजच्या जीवनातल्या उदाहरणांच्या द्वारे मांडण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'गुणवत्ता' या शब्दाची अनंत प्रकाराने व्याख्या करण्यात आली आहे. गुणवत्ता ही मुख्यतः संवेदनात्मक, परावलंबी आणि सापेक्ष (पर्सेप्च्युअल, कंडीशनल आणि सब्जेक्टिव्ह) अशी संकल्पना आहे. एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीची गुणवत्ता बहुतेक प्रसंगी दुसरा कोणी ठरवत असतो त्यामुळे ती असण्यापेक्षा ठरवणार्‍याला ती भासणे जास्त महत्त्वाचे असते, त्याला फक्त चांगली बाजूच दिसली वा महत्त्वाची वाटली तर तो स्तुती करेल, सुमार बाजू दिसली किंवा जास्त महत्त्वाची वाटली तर त्याला ती वस्तू सुमार वाटेल. एखाद्या नवर्‍याने मन लावून पातळ चपात्या लाटल्या आणि त्यांना व्यवस्थित भाजल्या तर अन्न या दृष्टीने त्याने उत्तम उत्पादन केलेले असते, पण बायको मात्र त्यांचा आकार आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया खंडासारखा झाला आहे यावरच त्याची टिंगल करेल हा अनुभव अनेकांना असेल. गुणवत्ता ही स्वयंभू नसून दुसर्‍या कोणत्या तरी गुणांच्या आधारावर ठरवली जाते. एखादी वस्तू सुंदर, आकर्षक, मुलायम, चमत्कृतीपूर्ण, टिकाऊ, दुर्मिळ वगैरेपैकी काही गुणांनी युक्त असेल तर त्या गुणांच्या आधारावर त्या वस्तूची गुणवत्ता उच्च दर्जाची मानली जाते. तिला स्वतःचे असे अस्तित्व नसते. अखेर गुणवत्ता ही अर्थातच ठरवणार्‍याच्या आवडी निवडीवर व पूर्वानुभवावर अवलंबून असल्याने एकाच वस्तूबद्दल निरनिराळ्या लोकांची मते वेगवेगळी असू शकतात. यात सुसूत्रपणा आणण्यासाठी काही विद्वानांची मते सर्वानुमते ग्राह्य ठरवली गेली आहेत. &lt;br /&gt;संवर्णनाशी सारूप्यता (Conformance to specifications) ही व्याख्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वसाधारणपणे मान्य केली जाते. एखादी इमारत असो किंवा यंत्राचा भाग असो, त्याची सविस्तर रेखाचित्रे (ड्रॉइंग्ज) काढून त्यात संपूर्ण तपशील दाखवतात. त्यातील प्रत्येक विभागाची लांबी, रुंदी, उंची, जाडी, खोली वगैरे एकूण एक मापे त्यात दाखवली जातात तसेच प्रत्येक मापाची मोजणी जास्तीत जास्त आणि कमीत कमी केवढी असायला हवी ते दिलेले असते. इमारतीच्या बाबतीत तसूभर फरकसुद्धा कधी कधी मान्य होण्यासारखा नसतो आणि काही यंत्रांच्या बाबतीत एका मिलिमीटरचा हजारावा भाग (एक मायक्रॉन) इतक्या सूक्ष्म परिमाणामध्ये ते माप (डायमेन्शन) दाखवले जाते. याशिवाय कोणकोणता कच्चा माल वापरायचे हे ठरवले जाते, त्यांचे रासायनिक पृथक्करण केल्यावर त्यात कोणकोणती मूलद्रव्ये (केमिकल काँपोजिशन) किती प्रमाणात हवीत, त्यांचे कोणते गुणधर्म किती मर्यादेत असायला हवेत, त्यासाठी कोणकोणत्या चाचण्या (टेस्टिंग) करून घेणे आवश्यक आहे वगैरे वगैरे, अनेक नियमांचा समावेश असलेला संवर्णनाचा दस्तऐवज (स्पेसिफिकेशन) तयार केलेला असतो. यांच्या बरहुकूम तयार केलेले उत्पादन गुणवत्तापूर्ण असते. उत्पादकांच्या दृष्टीने सुद्धा ही व्याख्या उपयुक्त आहे. कोणत्या वस्तूचे उत्पादन कसे करायचे हे ठरवले, त्यासाठी लागणारा कच्चा माल नीट तपासून घेतला, त्यावर केल्या जाणार्‍या प्रक्रिया काळजीपूर्वक रीतीने केल्यानंतर अपेक्षित असलेली गुणवत्ता मिळावी अशी अपेक्षा असते. तयार झालेल्या उत्पादनाची अखेरची तपासणी करतांना त्यात काही त्रुटी आढळल्यास त्या सुधारल्या जातात, तसेच त्या कोणत्या कारणांमुळे आल्या याचे विश्लेषण करून ती कारणे दूर केली तर पुढील उत्पादन अधिक चांगल्या दर्जाचे होऊ शकते. अशा कारणांमुळे गुणवत्तेची ही व्याख्या तंत्रज्ञांमध्ये मानली जाते. या व्याख्येनुसार निरीक्षण आणि परीक्षण (इन्पेक्शन आणि टेस्टिंग) या द्वारे गुणवत्ता निर्विवादपणे ठरवणे शक्य असल्यामुळे खरेदी विक्रीचे करार करण्यासाठी हीच व्याख्या सोयिस्कर असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या व्यावसायिक जीवनाच्या पहिल्या दिवसापासून आजतागायत निरनिराळ्या यंत्रांसाठी करण्यात येणारे आरेखन आणि संवर्णन यांच्याशी माझा घनिष्ठ संबंध आला असल्यामुळे गुणवत्तेची ही व्याख्या माझ्या चांगल्या परिचयाची आहे.पण वैयक्तिक जीवनातली गोष्ट मात्र नेहमीच वेगळी असायची. कोणतीही खरेदी करण्यासाठी बाजारात जातांना आपण त्याचे आरेखन, संवर्णन वगैरे दस्तऐवज आपल्या सोबत घेऊन जात नाही. आपल्याला काय विकत घ्यायचे आहे आणि ते कशासाठी घ्यायला हवे, त्याचा आपल्याला काय उपयोग आहे, त्या खरेदीमागे आपला कोणता उद्देश आहे, त्यासाठी किती किंमत मोजण्याची आपली तयारी किंवा क्षमता आहे एवढा विचार करून फक्त तेवढ्यानिशी आपण बाजारात जातो. उदाहरणार्थ आपल्या रोजच्या उपयोगासाठी पेन हवे असल्यास ते कसे चालते हे आपण कागदावर रेघोट्या मारून पाहतो, ते आपल्या खिशात मावेल, क्लिपने अडकवता येईल हे पाहतो आणि किंमत पाहून त्याची निवड करतो. कोणाला भेटवस्तू म्हणून पेन विकत घ्यायचे असल्यास या गोष्टींपेक्षा त्या पेनचे आणि ते ठेवण्याच्या डबीचे सौंदर्य पाहून निवड करतो. या गुणांसाठी जास्त किंमत मोजतो. कधी कधी तर बाजारात आलेली वस्तू पाहिल्यानंतर त्याबद्दल विचार करतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाजारातील वस्तूची गुणवत्ता ठरवतांना ती वस्तू त्याच्या आरेखनानुरूप आणि संवर्णनानुसार बनलेली आहे की नाही हे समजण्याचा मार्गच आपल्याकडे सहसा उपलब्ध नसतो. त्यामुळे ती वस्तू विकत घेण्यामागे आपला कोणता उद्देश आहे आणि तो कितपत सफळ होण्याची शक्यता किंवा खात्री आहे यावरून आपण तिची गुणवत्ता ठरवतो. संभाव्य उपयोगासाठी लायकी (Fitness for intended use) अशी गुणवत्तेची व्याख्या या क्षेत्रामधील भीष्मपितामह डॉ.जुरान यांनी केली आहे. उपभोक्त्याच्या दृष्टीने हीच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची असते. कोणतीही वस्तू विकत घेण्याआधी तो तिच्या उपयुक्ततेचा विचार करतो. अमक्या तमक्या हलवायाची मिठाई अतिशय उच्च दर्जाची म्हणून सुप्रसिद्ध असेल, त्यात ताजे शुद्ध तूप, निवडक बदाम, पिस्ते वगैरे घातले असतील, त्याची चव अवर्णनीय असेल पण मधुमेह, हृदयविकार वगैरेमुळे ग्राहकाला साखर आणि स्निग्ध पदार्थ खाणे वर्ज्य असेल तर त्या मिठाईचा त्याला काय उपयोग? ढाक्याची अतिशय तलम मलमल एका काळी सर्व जगात सर्वोत्कृष्ट मानली जात असे, कदाचित अजूनही असेल, पण स्वीडनच्या थंडगार वातावरणात ती कोण विकत घेईल? त्या प्रदेशात लोकरीचे जाडजूड कापडच उपयोगी पडते. त्यालाच चांगले मानले जाते.&lt;br /&gt;उत्पादक आणि उपभोक्ता जर एकमेकांना भेटून उत्पादनासंबंधी ठरवत असतील तर उत्पादनाची गुणवत्ता वरील व्याख्येनुसार राखणे शक्य असते. उदाहरणार्थ आपण शिंप्याकडे कपडे शिवायला टाकतांना आपल्याला काय काय पाहिजे ते त्याला सांगतो. आपल्याला तंग कपडे पाहिजेत की ढगळे, पायघोळ की आखूड वगैरे आपल्या सांगण्याप्रमाणे तो आपल्या कपड्यांची मापे घेतो, कॉलर किंवा बेल्ट कशा प्रकारचे पाहिजेत, कोणत्या आकाराचे किती खिसे पाहिजेत वगैरे सारा तपशील तो लिहून घेतो. तंतोतंत, त्यानुसार त्याने आपले कपडे वेळेवर शिवून दिले तर आपण खूश होतो, त्याला शाबासकी देतो पण त्याने त्यात गफलत केली, त्याच्या हलगर्जीमुळे कपड्यांना डाग पडले किंवा त्याने कपडे नेण्यासाठी आपल्याला अनेक हेलपाटे घालायला लावले तर तो आपल्या नजरेतून उतरतो. काही वेळा असे होते की आपल्याला त्याचा एखादा गुण आवडतो आणि त्या बाबतीत आपण त्याला उच्च गुणवत्ता बहाल करतो. समजा माझ्या मुलाच्या लग्नात घालून मिरवण्यासाठी मला सूट शिवायचा असेल तर तो उत्कृष्ट प्रतीचा असणे आवश्यक आहे. त्यासाठी विकत घेतलेले महाग कापड वाया जाऊ नये अशी माझी इच्छा असते. अशा वेळी मी सुबक कारागिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुशल शिंप्याकडे दोन महिने आधीच जाईन. शिलाईच्या कामासाठी त्याला हवा तेवढा अवधी देईन, त्याला घाई करणार नाही. तेवढ्या काळात माझ्या देहाचा आकार बदलणार नाही इकडे जरा जास्त लक्ष देईन. कपडे मिळण्यासाठी दोन तीन खेटे घालावे लागले तरी ते चालवून घेईन. पण लग्नाला दोन दिवस असतांना माझ्या असे लक्षात आले की आपल्याकडल्या, झोपायच्या वेळी घालायच्या कपड्यांची अवस्था काही ठीक दिसत नाही. चार पाहुण्यांच्या समोर ते बरे दिसणार नाहीत. आता मला त्यासाठी नवे कपडे तातडीने हवे आहेत, पण माझ्याकडे मुळीच वेळ नाही. अशा प्रसंगी मी घराच्या शेजारील दुकानातल्या नवशिक्या शिंप्याला बोलावणे पाठवीन. तोच माझ्या घरी येऊन मापे घेऊन कपडे शिवून दुसरे दिवशी घरी आणून देईल. या कामासाठी तत्परता आणि विश्वासार्हता या बाबतीतली त्याची गुणवत्ता मला अधिक महत्त्वाची वाटेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;यंत्रयुगाच्या काळात सर्व वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले आणि उत्पादक व उपभोक्ता यांचा थेट संबंध येणे कमी होत गेले. आज आपण बाजारातून ज्या वस्तू विकत घेतो त्या नक्की कोणत्या ठिकाणी असलेल्या कारखान्यात तयार झाल्या आहेत हे सहसा आपल्याला समजत नाही. एखाद्या मोठ्या उद्योगाच्या नावाचा बिल्ला (लेबल) त्यावर लावला असला तर निदान ते नाव आपल्या ऐकीवात असते, पण आपल्या नावाची कोणी व्यक्ती त्याची ग्राहक आहे हे त्या उत्पादकाला माहीत असण्याची सुतराम शक्यता नसते. त्यापुढे जाऊन आपल्याला कशाची गरज आहे किंवा आपण ती वस्तू कशासाठी विकत घेत आहोत ते त्याला कसे समजणार? आणि त्यानुसार तो आपल्या उत्पादनाची गुणवत्ता कशी राखणार?हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काही मार्ग काढले. सध्या कोणत्या वस्तूचे कोण ग्राहक आहेत, त्यांच्या कोणत्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा असतात, त्या किती प्रमाणात पूर्ण होतात, ते ग्राहक समाधानी आहेत का वगैरे प्रश्नावली घेऊन निरीक्षणे (सर्व्हे) केली जातात. जे लोक सध्या त्या उत्पादनाचे ग्राहक नाहीत त्यांना आकर्षित करण्यासाठी त्या वस्तूला आणखी कोणते गुण चिकटवायला हवेत अशा विचारांची सुद्धा पाहणी होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे काम करणार्‍या खास संस्थाच उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीची नसतील पण समाजाची किंवा व्यक्तींच्या समूहांची मते, आवडी निवडी, पसंती, प्राधान्य वगैरे अनेक गोष्टी यातून समजतात. सर्वसामान्य ग्राहकाची फसवणूक किंवा अपेक्षाभंग होऊ नये यासाठी विशिष्ट उत्पादनांचे दर्जामानांकन (Standardization सर्वमान्यता, सर्वमतसिद्धता) केले जाते. हे काम करण्यासाठी आयएसए (इंडियन स्टॅंडर्डस्‌ असोशिएशन) सारख्या देशादेशांमधील राष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या आहेत. आयएसओ (इंटरनॅशनल स्टॅंडर्डस् ऑर्गनायझेशन) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. गुणवत्ता व्यवस्थापन या विषयावरसुद्धा या संस्थेने मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार गुणवत्तेची व्याख्या अशी केली आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"The totality of features and characteristics of a product or service that bears on its ability to satisfy stated or implied needs" &lt;br /&gt;एखादे उत्पादन किंवा सेवा यांची व्यक्त किंवा अव्यक्त गरजांची पूर्तता करण्याची क्षमता ज्यामुळे प्रभावित होते असे सर्व गुणधर्म म्हणजे त्याची गुणवत्ता. &lt;br /&gt;ही लांबलचक व्याख्या करण्यात नक्कीच एखाद्या कायदेपंडिताचा सहभाग असणार. न्यायालयातले विरुद्ध पक्षांचे वकील त्याच कायद्याचा आपापल्या अशिलाच्या दृष्टीने वेगळा अर्थ लावतात हे आपण पाहतोच. तसेच या बाबतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सर्वसाधारण उपभोक्ता किंवा उत्पादक यांना आपले उद्योग व्यवसाय सोडून कज्जे खटले चालवण्यात स्वारस्य नसते. त्यामुळे दोघेही त्याचा ढोबळ अर्थ घेतात आणि त्याला सर्वसंमती असते. थोडक्यात म्हणजे कोणतेही उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी ते कशासाठी वापरावे आणि ते वापरतांना कोणती काळजी घ्यावी हे उत्पादक स्पष्ट करतो आणि तो उद्देश सफल होत आहे याची चाचणी करून खात्री करून घेतो. यासाठी कोणकोणती परीक्षणे करून त्यांचे निष्कर्ष काढावेत हे दर्जामानांकन करतांना ठरवलेले असते. त्यामुळे उपभोक्त्याला त्याची माहिती आणि मार्गदर्शन मिळते आणि त्याला आपल्या गरजा पुरवून घेता येतात, त्याचा अपेक्षाभंग होत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुणवत्ता या शब्दाच्या याखेरीज काही मनोरंजक आणि उद्बोधक अशा व्याख्या करण्यात आल्या आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सुप्रसिद्ध जपानी तज्ज्ञ तागुची म्हणतात, "ध्येयाच्या निकट राहणे Uniformity around a target value." एखाद्या वस्तूच्या उत्पादनामधील गुणवत्तेच्या सातत्याचा विचार यात आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पीटर ड्रकरचे म्हणणे आहे, "वस्तूचा किंवा सेवेचा पुरवठा करणारा त्यात गुणवत्ता घालत नाही, ग्राहक त्यातून जे प्राप्त करून घेतो आणि ज्यासाठी मूल्य चुकवतो ती गुणवत्ता Quality in a product or service is not what the supplier puts in. It is what the customer gets out and is willing to pay for." &lt;br /&gt;वीनबर्गच्या मते गुणवत्ता म्हणजे मूल्य "Value (for money)" &lt;br /&gt;&lt;br /&gt;डॉ.डेमिंगच्या मते ग्राहकाचे समाधान करणे पुरेसे नाही, त्याला आनंद मिळायला हवा "A step further in delighting the customer"&lt;br /&gt;हेन्री फोर्ड यांनी सांगितले, "जेंव्हा कोणीही पाहत नसतांनासुध्दा योग्य तेच करणे म्हणजे गुणवत्ता (काम करणार्‍याच्या अंगात ती इतकी भिनली पाहिजे) Quality means doing it right when no one is looking" &lt;br /&gt;गुणवत्तेची एक मार्मिक व्याख्या अशी सुद्धा आहे "जर ग्राहक परत येत असेल आणि उत्पादन परत येत&amp;nbsp;&amp;nbsp;नसेल!"&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता या लेखाची गुणवत्ता किती आहे ते अखेर वाचकांनीच ठरवायचे आहे ! &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-
